Mumbai: महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ सवलत लागू

   Follow us on        

Mumbai: मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) कार्यरत असणाऱ्या महिला शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे गाड्यांमधील सकाळची आणि सायंकाळची प्रचंड गर्दी तसेच प्रवासासाठी लागणारा मोठा वेळ विचारात घेऊन, महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी ‘लवकर या, लवकर जा’ (Come Early, Go Early) ही सवलत जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियमानुसार, ज्या महिला कर्मचारी सकाळी ९:१५ ते ९:४५ या वेळेत कार्यालयात लवकर येऊन आपले काम सुरू करतील, त्यांना तेवढ्याच प्रमाणात (जास्तीत जास्त ३० मिनिटे) सायंकाळी कार्यालय लवकर सोडण्याची मुभा देण्यात आली आहे. १० मार्च २०२६ रोजी सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून, यामुळे महिला कर्मचाऱ्यांचा प्रवास सुसह्य होण्यास मदत होणार आहे.

​मात्र, ही सवलत देताना शासनाने काही अटी देखील घातल्या आहेत. या लवचिक वेळेमुळे शासकीय कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता महिला कर्मचाऱ्यांनी घेणे अनिवार्य आहे. तसेच, विधानमंडळाचे कामकाज, न्यायालयीन प्रकरणे किंवा इतर तातडीच्या कामाच्या वेळी कार्यालयात वेळेनंतर थांबणे बंधनकारक राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशिष्ट सूचना दिल्यास त्या पाळणेही आवश्यक असेल. मुंबईतील रेल्वेमधील गर्दीचे विभाजन व्हावे आणि महिलांचा प्रवासाचा ताण कमी व्हावा, या उदात्त हेतूने राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Facebook Comments Box

मुंबई – विजयदुर्ग रो-रो सेवेला मिळणार दोन नवीन थांबे

   Follow us on        

मुंबई: कोकण किनारपट्टीवरील प्रवासाला वेग देण्यासाठी मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रो-रो (Ro-Ro) सेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या जलवाहतुकीमुळे मुंबई ते कोकण हा प्रवास आता अवघ्या सहा तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ला येथे या सेवेचे दोन नवे थांबे देण्यात आले आहेत. बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, या ठिकाणच्या जेटीची कामे पूर्ण करण्यासाठी सागरी महामंडळाने विशेष प्रयत्न केले असून, महिनाभरात हे थांबे पूर्णपणे कार्यान्वित होतील.

​या जलवाहतुकीमुळे कोकणातील पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः वेंगुर्ला येथील थांब्यामुळे मालवण, तारकर्ली आणि आचरा यांसारख्या पर्यटन स्थळांना भेट देणे पर्यटकांना सोयीचे होणार आहे. तसेच, नेरूळ ते मुंबई अशी जलवाहतूक सेवा देखील सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही सेवा प्रवाशांसाठी वेळेची बचत करणारी ठरेल, मात्र तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची चर्चाही सध्या होत आहे.

​दुसरीकडे, दापोलीतील प्रवाशांच्या सोयीसाठी हर्णे बंदरात देखील रो-रो सेवेचा थांबा मिळावा, अशी मागणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नितेश राणे यांच्याकडे केली आहे. दापोलीत रेल्वेची सुविधा नसल्यामुळे सागरी मार्ग हा प्रवाशांसाठी एक उत्तम आणि जलद पर्याय ठरू शकतो. या नव्या जलमार्गामुळे कोकणच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Facebook Comments Box

जमीन मोजणी प्रक्रिया होणार जलद! राज्यात २०० खाजगी भूमापकांची नियुक्ती, अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही दिलासा

   Follow us on        

मुंबई: राज्यात जमिनीच्या मोजणीसाठी प्रलंबित असलेल्या हजारो अर्जांचा निपटारा करण्यासाठी महसूल विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय भूमापकांची कमतरता लक्षात घेता, नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी राज्यात २०० खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. यामुळे आता जमीन मोजणीची प्रक्रिया अधिक वेगवान होणार असून, अर्ज केल्यानंतर एक महिन्यात मोजणी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

​राज्यात सध्या मनुष्यबळाच्या अभावामुळे पोट-हिस्सा, हद्दकायम, बिनशेती आणि गुंठेवारी यांसारखी मोजणीची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर रखडली होती. यावर तोडगा म्हणून शासनाने दोन खाजगी यंत्रणांमार्फत २०० परवानाधारक भूमापकांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. हे भूमापक दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करून ३० मार्चपासून प्रत्यक्ष मोजणीच्या कामाला सुरुवात करतील.

​अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शुल्कात कपातीचे संकेत

​जमीन मोजणीसाठी सध्या सरसकट नऊ हजार रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, हे शुल्क अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी परवडणारे नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला. गरीब शेतकऱ्यांसाठी हे शुल्क कमी करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, अडीच एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारकांसाठी मोजणी शुल्काबाबत शासन वेगळा प्रस्ताव तयार करत असल्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले.

Facebook Comments Box

कोकण रेल्वेमध्ये ‘परवानाधारक पोर्टर’ पदांसाठी भरती; ४९ जागांसाठी अर्ज सुरू

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने रत्नागिरी क्षेत्रातील विविध रेल्वे स्थानकांसाठी ‘परवानाधारक पोर्टर’ (Licensed Porter) पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ७ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत पत्रकानुसार, प्रवाशांचे सामान वाहून नेण्यासाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

​विविध स्थानकांसाठी रिक्त जागा

​या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ४९ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ८ जागा रत्नागिरी स्थानकासाठी, तर कणकवलीसाठी ७, कुडाळसाठी ६ आणि चिपळूणसाठी ५ जागा रिक्त आहेत. याशिवाय खेड आणि सावंतवाडी रोड येथे प्रत्येकी ४, तर माणगाव आणि संगमेश्वर रोड येथे प्रत्येकी ३ जागांसाठी भरती केली जाणार आहे. सिंधुदुर्ग स्थानकासाठी २ जागा असून वीर, सावर्डा, आरवली रोड, आडवली रोड, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड आणि कणकवलीच्या लगतच्या स्थानकांसाठी प्रत्येकी १ जागेची आवश्यकता आहे.

​जातीनिहाय आरक्षण

​एकूण ४९ जागांचे वर्गीकरण आरक्षणाच्या नियमांनुसार करण्यात आले आहे. यामध्ये सामान्य प्रवर्गासाठी २१, ओबीसीसाठी १३, अनुसूचित जातीसाठी (SC) ७, अनुसूचित जमातीसाठी (ST) ४ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) ४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

​या नियुक्तीबाबत रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाची सूचना दिली आहे. परवानाधारक पोर्टर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना रेल्वेमध्ये कायमस्वरूपी नोकरीचा कोणताही हक्क सांगता येणार नाही. तसेच, परिस्थितीनुसार रेल्वे प्रशासन हा परवाना कधीही रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.

Facebook Comments Box

जनशताब्दी एक्सप्रेस अडीच तास उशिरा पोहोचली! ठाणे स्थानकावर शेकडो चाकरमानी रात्रभर ताटकळत

   Follow us on        

ठाणे: कोकण रेल्वेची शान आणि वेगासाठी ओळखली जाणारी १२०५२ मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस सोमवारी (९ मार्च) तब्बल अडीच तास उशिराने धावल्यामुळे होळीचा सण साजरा करून परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. विशेषतः ठाणे स्थानकावर उतरलेल्या अंबरनाथ आणि बदलापूरच्या प्रवाशांना शेवटची लोकल हुकल्यामुळे संपूर्ण रात्र प्लॅटफॉर्मवर काढावी लागली.

​होळीच्या सुट्ट्या संपवून मुंबईत कामावर परतण्यासाठी कोकणातील प्रवाशांनी जनशताब्दी एक्सप्रेसला पसंती दिली होती. मात्र, कोकण रेल्वेच्या विस्कळीत नियोजनामुळे ही गाडी रात्री उशिरा मुंबईत पोहोचली. ठाणे स्थानकावर ही गाडी आली तेव्हा शेवटची लोकल सुटून अवघी १० मिनिटे झाली होती. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जतच्या दिशेला जाणाऱ्या शेकडो प्रवाशांची मोठी कोंडी झाली.

​प्रवाशांचा संताप: “आम्ही करायचे काय?”

​ठाणे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. या प्रवाशांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली:

​ओला/उबेर परवडत नाही: लांबच्या प्रवासासाठी टॅक्सीचे भाडे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेक प्रवाशांनी स्थानकावरच थांबणे पसंत केले. एकटी महिला असल्यास सुरक्षेच्या दृष्टीने या पर्यायाचा विचारच न केलेला बरा.

​अतिरिक्त लोकल का नाही?: “नवीन वर्षाचे स्वागत असो किंवा क्रिकेटचे सामने, रेल्वे प्रशासन रात्री उशिरापर्यंत जादा गाड्या चालवते. मग अशा आपत्कालीन परिस्थितीत, जेव्हा एखादी महत्त्वाची एक्सप्रेस उशिरा येते, तेव्हा माणुसकीच्या नात्याने एखादी जादा लोकल का सोडली जात नाही?” असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

​प्लॅटफॉर्मवरच काढली रात्र

​शेवटची गाडी हुकल्याने प्रवाशांना पहाटेच्या पहिल्या लोकलची (सुमारे ४ तास) वाट पाहत प्लॅटफॉर्मवरच बसून किंवा झोपून राहावे लागले. रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे “वेगाचा दावा करणाऱ्या जनशताब्दीने प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याऐवजी कष्टदायकच केला,” अशी भावना व्यक्त होत आहे.

​प्रशासनाला प्रश्न:

सणासुदीच्या काळात गाड्या उशिरा धावणार हे माहित असताना, समन्वय राखून शेवटची लोकल १० मिनिटे थांबवून ठेवता आली नसती का? किंवा प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था का केली गेली नाही?

Facebook Comments Box

Shaktipeeth Expressway: नागपूर – पत्रादेवी शक्तिपीठ महामार्गाच्या संरेखनात बदल; नवीन गावांची नावे समाविष्ट

   Follow us on        

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल करण्यात आला असून आता या महामार्गाची नवी अलाइनमेंट पुढे आली आहे. राज्य शासनाने या बदलाला मंजुरी दिल्यानंतर महामार्गाची दिशा काही प्रमाणात बदलणार आहे.

नवीन अलाइनमेंटमुळे कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांना वगळून या भागातील वेगळ्या मार्गाने महामार्ग नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित नव्या मार्गानुसार अनेक तालुक्यांतील गावांमधून हा महामार्ग जाणार आहे.

नव्या अलाईन्मेंटनुसार संभाव्य गावे:

​नव्या प्रस्तावाप्रमाणे सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालील तालुक्यांमधील गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे:

​पलूस तालुका: देवराष्ट्रे, कुंभारगाव, कुंडल, घोगाव, मसुचीवाडी, जुने खेड, बोरगाव.

​वाळवा तालुका: वाळवा, उरण, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, येलूर, कुरळप, ऐतवडे खुर्द.

​हातकणंगले व पन्हाळा तालुका: पारगाव, बहिरेवाडी, जाखले, गिरोली, पोहाळे तर्फ आळते, कुशिरे, मनपाडले.

​करवीर तालुका: केली, केळें, वरणगे, पाडळी बु., शिदेवाडी, खुपीरे, वाकरे, कुडित्रे, बहिरेेश्वर, बीड, गणेशवाडी, शिरोली दु., सडोली दु., भाटणवाडी, हसूर.

​राधानगरी तालुका: राशिवडे बु., कोदवडे, वाघवाडे, मोहाडे, माजगाव, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, सरवडे.

​कागल व भुदरगड तालुका: उंदरवाडी (कागल), खापरेवाडी, टिकेवाडी, नाधवडे, पाचवडे, बसरेवाडी, मिणचे खु., लोटेवाडी, कोळवण, पालेवाडी, भाटिवडे, हेदवडे, देवकेवाडी, शेणगाव, कराडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुले, मेघोली, अरळगुंडी.

​आजरा तालुका: कोरीवडे, हरपवडे, पेरनोली, देवर्डे, वेळवट्टी, पेठेवाडी, मासोळी, खानापूर, पोळगाव, एरंडोल, सातेवाडी.

​चंदगड तालुका:गवसे, भुजवडे, कुर्णी, म्हाळुंगे, बिझूर, भोगोली, कानूर बु., पिलानी, जांबरे आणि इसापूर.

​दोडामार्ग तालुका:कुंभवडे, भेकुर्ली, कोळझर आणि झोळंबे.

​सावंतवाडी तालुका: पडवे माजगाव, पडवे, देगाव आणि बांदा.

या बदलामुळे काही गावांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, महामार्ग प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रशासनाला मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार एर्नाकुलम–अंबाला होळी विशेष एक्सप्रेस

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रवासी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षिण रेल्वेने एर्नाकुलम जंक्शन–अंबाला कॅन्टोनमेंट दरम्यान एकमार्गी विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक ०६०७४ एर्नाकुलम जंक्शन – अंबाला कॅन्टोनमेंट वन-वे एक्सप्रेस स्पेशल ही गाडी ११ मार्च २०२६ (बुधवार) रोजी एर्नाकुलम जंक्शन येथून सकाळी ०९.५० वाजता सुटणार असून तिसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता अंबाला कॅन्टोनमेंट येथे पोहोचणार आहे. ही सेवा एकदाच चालवण्यात येणार आहे.

या गाडीची रचना पुढीलप्रमाणे असेल:

१ एसी थ्री टियर डबा

१३ स्लीपर वर्ग डबे

३ जनरल सेकंड क्लास डबे

२ दिव्यांग प्रवाशांसाठी अनुकूल जनरल सेकंड क्लास डबे

 

स्थानके, वेळ व तारीख:

एर्नाकुलम जंक्शन – ०९:५० (११ मार्च)

अलुवा – १०:१२ / १०:१४ (११ मार्च)

त्रिशूर – ११:०७ / ११:१० (११ मार्च)

शोरनूर – १२:०० / १२:०५ (११ मार्च)

तिरूर – १२:४३ / १२:४५ (११ मार्च)

कोझिकोड – १३:२२ / १३:२५ (११ मार्च)

कन्नूर – १४:४२ / १४:४५ (११ मार्च)

कासरगोड – १५:४८ / १५:५० (११ मार्च)

मंगळुरू जंक्शन – १७:०० / १७:१० (११ मार्च)

उडुपी – १९:३० / १९:३२ (११ मार्च)

कुंदापूर – २०:१० / २०:१२ (११ मार्च)

मूकांबिका रोड – बिंदूर – २०:४२ / २०:४४ (११ मार्च)

मुरुडेश्वर – २१:३० / २१:३२ (११ मार्च)

कुमटा – २२:१० / २२:१२ (११ मार्च)

कारवार – २३:१० / २३:१२ (११ मार्च)

१२ मार्च २०२६ (गुरुवार)

मडगाव – ००:१० / ००:२०

थिवीम – ०१:०० / ०१:०२

सावंतवाडी रोड – ०१:४० / ०१:४२

कणकवली – ०२:२० / ०२:२२

राजापूर रोड – ०३:१८ / ०३:२०

रत्नागिरी – ०४:३५ / ०४:४०

संगमेश्वर रोड – ०५:२५ / ०५:२७

चिपळूण – ०६:१० / ०६:१५

खेड – ०६:४० / ०६:४२

माणगाव – ०८:१२ / ०८:१४

रोहा – ०९:०० / ०९:०५

पनवेल – १०:२५ / १०:३५

वसई रोड – १२:३५ / १२:४५

सूरत – १५:२६ / १५:२८

वडोदरा – १७:०४ / १७:१२

कोटा – २३:५१ / २३:५६

१३ मार्च २०२६ (शुक्रवार)

मथुरा – ०४:१५ / ०४:२०

नवी दिल्ली – ०७:३५ / ०७:४५

अंबाला कॅन्टोनमेंट – ११:२५ (पोहोच)

Facebook Comments Box

कोकण रेल्वे प्रवासात साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला

   Follow us on        

कणकवली : मुंबईहून कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे  साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राकेश सदानंद मिठबावकर (वय ३५, रा. कुर्ला-मुंबई, मूळ रा. पडेल-देवगड) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिठबावकर हे पत्नी आणि मेहुण्यासोबत ८ मार्च रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता एलटीटी–मडगाव एक्सप्रेसने मुंबईहून देवगडकडे निघाले होते. दुपारी सुमारे १.३० वाजता गाडी कणकवली रेल्वे स्थानकावर पोहोचली. गाडीतून उतरण्यासाठी सामान आवरत असताना दागिन्यांची बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण डब्यात बॅगचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही.

दरम्यान गाडी सावंतवाडी स्थानकावर पोहोचल्यावर त्यांनी तात्काळ तेथील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. मात्र ही घटना कणकवली स्थानकाच्या दरम्यान उघडकीस आल्याने त्यांना कणकवली येथे तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार मिठबावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ३२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ३ ग्रॅम वजनाचे छोटे मंगळसूत्र असा ऐवज आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Facebook Comments Box

वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक; दोन डब्यांच्या काचा फुटल्या

   Follow us on        

कोची : तिरुवनंतपुरम–मंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. अंगमलीजवळ हा प्रकार घडल्याचे समोर आले असून, या घटनेत दोन डब्यांच्या काचांना तडे गेले आहेत. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

रेल्वे संरक्षण दल (RPF) अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही गाडी अलुवा स्थानक सोडल्यानंतर सुमारे संध्याकाळी ७.५० वाजता मंगळुरूकडे जात असताना दगडफेक झाली असावी. या घटनेत कोच क्रमांक १ आणि १८ मधील खिडक्यांच्या काचांना तडे गेले.

गाडी मंगळुरूला पोहोचल्यानंतर नुकसान लक्षात आले. त्यानंतर गाडीत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. प्राथमिक तपासात ही घटना अंगमली परिसरात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अलुवा आरपीएफने मंगळुरू येथील अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेज मागवले असून पुढील तपास सुरू आहे. वंदे भारत गाड्यांमध्ये प्रत्येक डब्यात तसेच बाहेर देखील देखरेखीसाठी कॅमेरे बसवलेले आहेत.

रेल्वे प्रशासनाने या प्रकाराचा निषेध करत दोषींना लवकरच शोधून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या विकासासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ची घोषणा

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणच्या विकासासाठी मोठी घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सर्वांगीण आणि सर्वांकष विकासाला गती देण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यांतील पायाभूत सुविधा, पर्यटन, कृषी आणि मत्स्यव्यवसाय यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा सरकारचा मानस आहे.

सिंधुरत्न समृद्ध योजना ही महाराष्ट्र सरकारची प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे. कोकण किनारपट्टीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून स्थानिकांचे उत्पन्न वाढवणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत प्रामुख्याने पर्यटन, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन (विशेषतः आंबा, काजू, कोकम प्रक्रिया) आणि कौशल्य विकास या क्षेत्रांवर विशेष भर दिला जातो. सुरुवातीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी आणि सुमारे ३०० कोटींच्या निधीसह सुरू झालेल्या या योजनेच्या यशानंतर, आता सरकारने ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ प्रस्तावित केली आहे. या नवीन टप्प्यामुळे कोकणच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी मिळेल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्थानिक उद्योगांचा विस्तार होऊन पर्यायाने कोकणच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती प्राप्त होईल.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search