Konkan  Railway: सीएसएमटी स्थानकावर ८५ दिवसांचा ‘ब्लॉक’; विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जाणार्‍या गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

मुंबई, दि. (प्रतिनिधी) — छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकासकामांमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ हे १ फेब्रुवारीपासून पुढील ८५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे २६ एप्रिलपर्यंत या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे.

या कालावधीत कोकणवासियांची पसंती असलेली मडगाव–सीएसएमटी ‘तेजस एक्सप्रेस’ ही सीएसएमटीऐवजी दादर स्थानकावरच टर्मिनेट होईल. तसेच मंगळुरु–सीएसएमटी एक्सप्रेसचा प्रवास आता ठाणे स्थानकावरच संपणार आहे.

सीएसएमटी स्थानकाचा सुमारे २,४५० कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येत असून, या कामाची जबाबदारी अहलूवालिया कॉन्ट्रॅक्ट्स लिमिटेडकडे देण्यात आली आहे. या प्रकल्पात नवीन इमारतींचे बांधकाम, प्रवाशांसाठी अद्ययावत सुविधा, पार्सल सेवा तसेच हेरिटेज इमारतीचे जतन यांचा समावेश आहे. काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी विभागली जाऊन प्रवास अधिक सुकर होईल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातून येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात आणि टर्मिनसमध्ये बदल करण्यात आले आहेत. अमरावती–सीएसएमटी एक्सप्रेस, बल्लारशाह–सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस, हावडा मेल, भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस, बिदर एक्सप्रेस आणि लातूर एक्सप्रेस या गाड्या आता सीएसएमटीऐवजी दादर स्थानकापर्यंतच धावतील.

खालील गाड्या त्यांच्या निर्धारित स्थानकापर्यंत (CSMT) न जाता दादर स्थानकावरच थांबतील:

​१२११२ अमरावती-CSMT एक्सप्रेस

​११००२ बल्लारशाह-CSMT नंदीग्राम एक्सप्रेस

​१२८१० हावडा-CSMT एक्सप्रेस

​११०२० भुवनेश्वर-CSMT कोणार्क एक्सप्रेस

​२२१४४ बिदर-CSMT एक्सप्रेस / २२१०८ लातूर-CSMT एक्सप्रेस

​२२१२० मडगाव-CSMT तेजस एक्सप्रेस

​ठाणे स्थानकावर थांबणारी गाडी (Short Terminated at Thane)

​१२१३४ मंगळुरू-CSMT एक्सप्रेस ही गाडी आता फक्त ठाणे स्थानकापर्यंतच धावेल.

Facebook Comments Box

कसबा पंचायत समिती गणात संदेश जिमन यांच्या प्रचाराचा झंझावात; बदलाचे वारे वेगाने वाहू लागले

   Follow us on        

रुपेश मनोहर कदम / सायले: कसबा पंचायत समिती गणामध्ये निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून, अपक्ष उमेदवार संदेश सुरेश जिमन यांच्या प्रचाराने संपूर्ण गणात चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले असताना, काही उमेदवारांना पक्षीय दिग्गजांचा पाठिंबा आहे, तर काही उमेदवार आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर राजकीय प्रवास घडवू पाहत आहेत. अशा परिस्थितीत संदेश सुरेश जिमन यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

सध्या सुरू असलेल्या प्रचारात संदेश जिमन यांनी आघाडी घेतली असून, त्यांचे नेतृत्व जनतेच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाड्या-वस्त्यांवर जाऊन थेट जनतेशी संवाद साधत, त्यांनी आजवर केलेली जनसेवा आणि पुढील काळात समाजकार्य अधिक प्रभावीपणे करण्याची आपली निर्भीड भूमिका स्पष्ट केली आहे. कमी वयात समाजासाठी केलेल्या कामांमुळे त्यांना जनसामान्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने पाठपुरावा करत लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न, दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, शिवरायांच्या चरित्र ग्रंथांचे तसेच गोष्टींच्या पुस्तकांच्या संचांचे वितरण, ही त्यांची उल्लेखनीय सामाजिक कामगिरी ठरली आहे. याशिवाय, पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, तसेच गरीब व गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत देण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.

विकास आणि रोजगारनिर्मिती, पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजना, या गणातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी गरजेनुसार एसटी बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न, तसेच कसबा हे ऐतिहासिक क्षेत्र पर्यटनाचे आकर्षक केंद्र बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संदेश जिमन यांनी दिले आहे.

कसबा पंचायत समिती गणातील या चुरशीच्या लढतीत संदेश सुरेश जिमन यांची सरशी होताना दिसत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. ही वाढती लोकप्रियता इतर उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार की काय, याची उत्सुकता आता निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Facebook Comments Box

प्रवाशांना दिलासा! लोकमान्य टिळक टर्मिनसवरील ‘ब्लॉक’ संपला; गाड्यांचे वेळापत्रक पूर्वपदावर

मुंबई: मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे १ जानेवारी २०२६ पासून घेतलेला पायाभूत सुविधांच्या कामाचा ‘ब्लॉक’ आता नियोजित वेळेनुसार यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. ३० जानेवारी २०२६ रोजी हा ब्लॉक संपल्यामुळे, या काळात विस्कळीत झालेली रेल्वे सेवा आता पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे.

या बदलामुळे कोकण रेल्वे आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, खालील गाड्या आता त्यांच्या मूळ वेळापत्रकानुसार आणि मूळ स्थानकापर्यंत धावतील:

१. आजपासून खालील गाड्या पुन्हा त्यांच्या मूळ गंतव्य स्थानकापर्यंत (LTT) धावतील: (३१ जानेवारी २०२६ पासून):

आजपासून खालील गाड्या पुन्हा त्यांच्या मूळ गंतव्य स्थानकापर्यंत (LTT) धावतील

गाडी क्र. १६३४६: तिरुअनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस (नेत्रावती एक्सप्रेस)

गाडी क्र. १२६२०: मंगळुरु सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस (मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस)

२. एल.टी.टी. वरून सुटणाऱ्या गाड्या:

३१ जानेवारी २०२६ पासून: गाडी क्र. १२६१९ (लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस) आता मूळ वेळापत्रकानुसार एल.टी.टी. वरून सुटेल.

१ फेब्रुवारी २०२६ पासून: गाडी क्र. १६३४५ (लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस) आपल्या नियमित वेळेनुसार एल.टी.टी. वरून मार्गस्थ होईल.

महिनाभर चाललेल्या या ब्लॉकचा फटका केवळ मुंबईकरांनाच नाही, तर कोकण आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना बसला होता.

Facebook Comments Box

मुंबई-पुणे अंतर येणार ४० मिनिटांवर! केंदीय अर्थसंकल्पात ७ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरची घोषणा

   Follow us on        

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२६ चा अर्थसंकल्प सादर करताना रेल्वे क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. देशातील रेल्वे पायाभूत सुविधांना आधुनिक रूप देण्यासाठी सरकारने सात नवीन हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) कॉरिडॉर विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

​या नवीन प्रकल्पांमुळे प्रमुख शहरे आणि आर्थिक केंद्रांमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार असून प्रादेशिक विकासाला गती मिळणार आहे.

​हे आहेत ७ नवीन हाय-स्पीड मार्ग:

​अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार, खालील मार्गांवर हाय-स्पीड ट्रेन धावतील:

१. मुंबई ते पुणे (दैनंदिन प्रवाशांसाठी मोठा दिलासा)

२. पुणे ते हैदराबाद

३. हैदराबाद ते बेंगळुरू

४. हैदराबाद ते चेन्नई

५. चेन्नई ते बेंगळुरू

६. दिल्ली ते वाराणसी

७. वाराणसी ते सिलिगुडी

​मालवाहतुकीसाठी नवीन कॉरिडॉर

​केवळ प्रवासी वाहतूकच नाही, तर मालवाहतुकीला गती देण्यासाठी पश्चिमेकडील सुरत (गुजरात) ते पूर्वेकडील दानकुनी (पश्चिम बंगाल) दरम्यान एक नवीन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे मालाची ने-आण जलद आणि स्वस्त होईल.

मुंबई पुणे अंतर ४० मिनिटांवर

मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रस्तावित असलेला हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) कॉरिडॉर दळणवळणाच्या क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणणारा ठरेल. सध्या या प्रवासासाठी रस्ते किंवा रेल्वे मार्गाने ३ ते ४ तास लागतात; मात्र बुलेट ट्रेनमुळे हे अंतर अवघ्या ४० ते ६० मिनिटांत पार करणे शक्य होईल. ताशी २५० ते ३०० किमी वेगाने धावणारी ही ट्रेन प्रामुख्याने उड्डाणपूल आणि बोगद्यांमधून जाणार असून, यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचणार आहे.

​हा प्रकल्प केवळ वेळेची बचत करणारा नसून, तो दोन्ही शहरांतील दैनंदिन प्रवाशांसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी वरदान ठरेल. जलद कनेक्टिव्हिटीमुळे मुंबईत राहून पुण्यात नोकरी करणे किंवा उलट, ही बाब सहज शक्य होईल. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील वाहतूक कोंडी कमी होईलच, पण त्यासोबतच या मार्गावरील ग्रामीण आणि उपनगरीय भागांत रिअल इस्टेट व व्यावसायिक संकुलांचा विकास होऊन रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

​पर्यावरण आणि तांत्रिकदृष्ट्याही हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. खाजगी वाहनांचा वापर कमी झाल्यामुळे इंधनाची बचत होऊन कार्बन उत्सर्जन घटण्यास मोठी मदत होईल. ‘महारेल’ आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने साकारला जाणारा हा प्रकल्प दोन्ही शहरांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ करून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला एक नवी गती प्रदान करेल.

​अर्थसंकल्पातील इतर महत्त्वाचे मुद्दे:

​जलमार्ग विकास: पुढील पाच वर्षांत २० नवीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट.

​रोजगार निर्मिती: या मोठ्या रेल्वे प्रकल्पांमुळे बांधकाम, मॅन्युफॅक्चरिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

पर्यावरणपूरक प्रवास: कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि जलमार्गांवर भर दिला जाणार आहे.

​सध्या मुंबई-अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू असतानाच, या नवीन घोषणांमुळे भारताच्या रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Facebook Comments Box

Badlapur Train Accident: लोकल गाड्यांच्या ‘लेटमार्क’ चा अजून एक बळी

   Follow us on        

बदलापूर: मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकात धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात आज एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, यामध्ये गाडी फलाटावरून सुटत असताना ती पकडताना महिलेचा तोल गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, या अपघातानंतर रेल्वेच्या ढिसाळ नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

​नेमकी घटना काय?

​सकाळच्या गर्दीच्या वेळी (Peak Hours) बदलापूर स्थानकावर ही घटना घडली. समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओनुसार, लोकल फलाटावरून वेग घेत होती. त्याच वेळी या महिलेने डब्यात चढण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा पाय घसरला आणि ती थेट रेल्वे आणि फलाट यांच्यातील फटीत पडली. उपस्थित प्रवाशांनी आरडाओरड करेपर्यंत आणि गाडी थांबेपर्यंत खूप उशीर झाला होता. गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा जागीच मृत्यू झाला

अपघाताला जबाबदार कोण? 

​बदलापूर रेल्वे स्थानकावरील या दुर्दैवी अपघाताकडे पाहिल्यास, प्रथमदर्शनी धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती महिलाच याला जबाबदार असल्याचे भासते. मात्र, या अपघाताला केवळ वैयक्तिक चूक मानणे तांत्रिकदृष्ट्या सोपे असले, तरी त्यामागील ईतर कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या विस्कळीत नियोजनाचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. बदलापूर ते दादर हा साधारण तासाभराचा प्रवास आता चक्क दीड ते पावणेदोन तास घेत आहे. सकाळी नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांवर कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याचे प्रचंड दडपण असते आणि रेल्वेच्या ‘लेट-लतीफी’मुळे हे दडपण अधिकच वाढते. याच मानसिक तणावातून प्रवासी जीव धोक्यात घालून धावती गाडी पकडण्याचा धोका पत्करतात.

​या परिस्थितीला रेल्वेचे विसंगत प्राधान्यक्रम मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. सकाळी जेव्हा नोकरदार वर्गाची सर्वाधिक गर्दी असते (पीक अवर्स), तेव्हा प्रशासनाकडून लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जाते. बदलापूरहून निघालेली लोकल गाडी ठाण्यापर्यंत वेळेत पोहोचते, परंतु त्यानंतर फास्ट ट्रॅकवर एक्सप्रेस गाड्यांची रांग असल्याने लोकलचा वेग बैलगाडीसारखा होतो. जलद मार्ग पूर्णपणे ‘जाम’ झाल्यामुळे लोकल गाड्या रखडतात.

हे रोजचेच झाले असल्याने कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी आणि लेट मार्क वाचवण्यासाठी बहुतेक जणांना आता आपल्या नेहमीच्या गाडी आधी अर्धा पाउण तासतास पूर्वीची गाडी पकडावी लागत आहे. प्रवाशांची खासकरून महिला वर्गाची जी आपली घरची कामे आटोपून नोकरी करतात त्यांची खूपच मोठी धावपळ होत आहे. अशा धावपळीत गाडी पकडताना असे अपघात होत आहेत.

रेल्वे प्रशासनाने यावर लवकरात लवकर याकडे लक्ष देवून गाड्यांचे लेटमार्क कमी करावेत अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

 

अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ 👇

Facebook Comments Box

जिल्हापरिषद निवडणूका आणि आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबई पुण्याहून कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्यांची मागणी

   Follow us on        

मुंबई | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कोकणातील अतिशय महत्त्वाचा धार्मिक उत्सव आंगणेवाडी जत्रा पार पडणार आहे. यामुळे ६ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबई/पुणे ते कोकण व कोकण ते मुंबई/पुणे मार्गावर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.

या काळात मतदार, मतदान व शासकीय कर्मचारी, सुरक्षा दल तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी जाणारे व परतीच्या प्रवासातील लाखो भाविक मोठ्या संख्येने प्रवास करतील. मागील अनुभव लक्षात घेता, कोकण रेल्वे मार्गावरील सध्याच्या नियमित गाड्या ही अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी अपुऱ्या ठरण्याची शक्यता असून, यामुळे प्रचंड गर्दी, प्रतीक्षा यादी (वेटिंग), तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

या पार्श्वभूमीवर, ६, ७, ८, ९ आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवाव्यात, अशी ठाम मागणी कोकण विकास समिती (शहरी व ग्रामीण विभाग) यांच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रस्तावित विशेष गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असावे अशी विनंती कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे.

या विशेष गाड्यांमुळे कोकणकडे जाणाऱ्या व येणाऱ्या विद्यमान सेवांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होईल, तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व शिस्तबद्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

तातडीने निर्णयाची अपेक्षा

मागणी निश्चित असून नियोजनासाठी वेळ मर्यादित असल्याने, या विशेष गाड्यांना लवकर मंजुरी देऊन तातडीने अधिसूचना जारी करावी, अशी जोरदार विनंती करण्यात आली आहे. वेळेत सकारात्मक निर्णय झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि स्थानिक प्रशासनालाही नियोजनात मदत होईल.

ही मागणी जयवंत शंकर दरेकर व अक्षय मधुकर महापदी (कोकण विकास समिती – शहरी व ग्रामीण विभाग) यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर आज आणि उद्या धावणार ‘वीकेंड स्पेशल’ एक्सप्रेस

   Follow us on        

रत्नागिरी/सिंधुदुर्ग :आठवड्याच्या शेवटी होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दोन्ही दिशांनी प्रत्येकी एक फेरी पूर्ण करेल.

​गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

​१. मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (०१००४):

ही गाडी शनिवारी, ३१ जानेवारी २०२६ रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (रविवारी) पहाटे ०५:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

​२. लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष (०१००३):

ही गाडी रविवारी, १ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०७:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:०० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे:

या विशेष ट्रेनच्या प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

​गाडीची रचना (Composition):

​या विशेष ट्रेनला एकूण २० डबे असतील. यामध्ये:

​१८ स्लीपर क्लास डबे.

​०२ एसएलआर (SLR) डबे.

Facebook Comments Box

​मुंबईत परदेशी महिला पर्यटकाची फसवणूक; ४०० मीटरच्या प्रवासासाठी लुटले १८ हजार रुपये, टॅक्सी चालकाला अटक

   Follow us on        

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका अमेरिकन महिला पर्यटकाला अवघ्या ४०० मीटर अंतरासाठी १८ हजार रुपये (२०० डॉलर्स) आकारून लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ५० वर्षीय टॅक्सी चालक देशराज यादव याला अटक केली आहे. पीडित महिलेने सोशल मीडियावर आपली कैफियत मांडल्यानंतर पोलिसांनी या घटनेची स्वतःहून दखल (Suo-motu FIR) घेतली आणि अवघ्या तीन तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला विमानतळावर उतरल्यानंतर जवळच असलेल्या ‘हिल्टन’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यासाठी टॅक्सीत बसली होती. हॉटेलचे अंतर अवघे ४०० मीटर असतानाही, चालकाने तिला थेट हॉटेलवर न नेता अंधेरी पूर्व परिसरात सुमारे २० मिनिटे फिरवले. तिला एका अनोळखी ठिकाणी नेऊन भीती दाखवण्यात आली आणि त्यानंतर हॉटेलवर सोडण्यासाठी १८ हजार रुपयांची मागणी केली गेली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने टॅक्सी क्रमांक (MH 01 BD 5405) आणि आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता. पोलिसांनी या प्रकरणी टॅक्सी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: आंगणेवाडीच्या जत्रेसाठी कोकणात जाणार्‍या भाविकांसाठी खुशखबर! ‘या’ विशेष गाडीला मुदतवाढ

 

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने सुरत-मंगळुरू-सुरत विशेष गाडीला (०९०५७/०९०५८) मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रति पंढरपूर अशी खास ओळख असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा 9 फेब्रुवारी 2026रोजी होणार आहे या गाडीच्या मुदतवाढी मुळे या जत्रेसाठी कोकणात जाणार्‍या भाविकांची सोय होणार आहे.

गाड्यांचे वेळापत्रक आणि दिवस:

गाडी क्र. ०९०५७ (सुरत ते मंगळुरू): ही गाडी १ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दर बुधवारी आणि रविवारी धावेल.

गाडी क्र. ०९०५८ (मंगळुरू ते सुरत): ही गाडी २ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दर गुरुवारी आणि सोमवारी धावेल.

आरक्षण तपशील:

गाडी क्र. ०९०५७ साठीचे आरक्षण ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून सुरू होणार आहे.

गाडीचे थांबे:

ही गाडी प्रवासादरम्यान महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे, ज्यात प्रामुख्याने यांचा समावेश आहे: उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, मुरूडेश्वर, उडुपी आणि सुरतकल.

गाडीची रचना (Coaches):

प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीत खालीलप्रमाणे डबे असतील:

६ शयनयान (Sleeper)

१० वातानुकूलित तृतीय श्रेणी (3AC)

१ वातानुकूलित द्वितीय श्रेणी (2AC)

२ सामान्य द्वितीय श्रेणी (General)

२ एसएलआर (SLR)

उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुरूडेश्वर, भटकळ, मूकाम्बिका रोड बैन्दूर, कुंदापूर, उडुपी, मुळकी आणि सुरतकल.

Facebook Comments Box

कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा डंका! गणेशोत्सवाच्या चित्ररथाला देशात प्रथम क्रमांक

   Follow us on        

नवी दिल्ली: यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारली असून, राज्याला राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गणेशोत्सव आणि आत्मनिर्भरता’ या विषयावर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने उपस्थितांची मने जिंकली. या चित्ररथावर पारंपरिक लेझीम नृत्य सादर करणाऱ्या महिला पथकाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. राज्यांच्या या स्पर्धेत जम्मू-काश्मीरने दुसरे, तर केरळने तिसरे स्थान पटकावले आहे.

​लष्करी दलांमध्ये भारतीय नौदलाला सर्वोत्तम संचलन तुकडीचा बहुमान मिळाला आहे. तर निमलष्करी दलांमध्ये दिल्ली पोलीस ही सर्वोत्तम तुकडी ठरली आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या चित्ररथांमध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘वंदे मातरम’ संकल्पनेवरील चित्ररथाला पहिले पारितोषिक देण्यात आले. या चित्ररथातून वंदे मातरम गीताचा १५० वर्षांचा वारसा आणि बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे योगदान अतिशय देखण्या पद्धतीने मांडण्यात आले होते.

​लोकपसंती (Popular Choice) श्रेणीमध्ये मात्र निकाल काहीसे वेगळे राहिले. यामध्ये नागरिकांनी आसाम रेजिमेंटला सर्वोत्तम लष्करी तुकडी आणि गुजरातच्या चित्ररथाला राज्यांच्या श्रेणीमध्ये पहिले स्थान दिले आहे. गुजरातच्या चित्ररथाची संकल्पना ‘स्वदेशीचा मंत्र’ यावर आधारित होती. लोकपसंती श्रेणीत उत्तर प्रदेश दुसऱ्या आणि राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या सर्व विजेत्यांना ३० जानेवारी रोजी एका विशेष सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search