सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या विकासासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ची घोषणा

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणच्या विकासासाठी मोठी घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सर्वांगीण आणि सर्वांकष विकासाला गती देण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यांतील पायाभूत सुविधा, पर्यटन, कृषी आणि मत्स्यव्यवसाय यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा सरकारचा मानस आहे.

सिंधुरत्न समृद्ध योजना ही महाराष्ट्र सरकारची प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे. कोकण किनारपट्टीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून स्थानिकांचे उत्पन्न वाढवणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत प्रामुख्याने पर्यटन, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन (विशेषतः आंबा, काजू, कोकम प्रक्रिया) आणि कौशल्य विकास या क्षेत्रांवर विशेष भर दिला जातो. सुरुवातीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी आणि सुमारे ३०० कोटींच्या निधीसह सुरू झालेल्या या योजनेच्या यशानंतर, आता सरकारने ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ प्रस्तावित केली आहे. या नवीन टप्प्यामुळे कोकणच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी मिळेल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्थानिक उद्योगांचा विस्तार होऊन पर्यायाने कोकणच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती प्राप्त होईल.

Facebook Comments Box

MSRTC: “राजमाता जिजाऊ” बससेवा लवकरच सेवेत दाखल होणार

   Follow us on        

मुंबई: राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी आणखी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद पाऊल उचलले आहे. स्वराज्याची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नवीन अत्याधुनिक बससेवा सुरू करण्यात येणार आहे. एसटीच्या नव्या ५५ आसनी (३×२ आसन रचना) असलेल्या आधुनिक बसेसना “राजमाता जिजाऊ” असे नाव देण्यात आले असून या बसांची पहिली झलक समोर आली आहे. या बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणार असून अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.

राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा यामुळे हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला आकार मिळाला. त्यांच्या दूरदृष्टी, धैर्य आणि संस्कारांमुळेच स्वराज्याची पायाभरणी झाली. त्यामुळे त्यांच्या नावाने सुरू होणारी ही बससेवा केवळ प्रवासाची सुविधा नसून इतिहासाचा आणि स्वराज्याच्या मूल्यांचा सन्मान मानला जात आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला सलाम करत ही “राजमाता जिजाऊ” बससेवा लवकरच राज्याच्या विविध मार्गांवर धावू लागणार आहे.

Facebook Comments Box

Mumbai konkan Ro Ro Service: विजयदुर्ग बंदरात ‘एम-२-एम प्रिन्सेस’ फेरीत ‘विघ्न’!

   Follow us on        

विजयदुर्ग: कोकणातील महत्त्वाच्या मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेत धावणाऱ्या ‘एम-२-एम प्रिन्सेस’ या फेरीबोटला गुरुवारी विजयदुर्ग बंदरात किरकोळ अपघात झाला. बंदरात उभ्या असलेल्या या फेरीबोटला एका टगबोटीची धडक लागल्याने बोटीचे थोडे नुकसान झाले.

ही रो-रो सेवा २ मार्चपासून सुरू झाली असून बुधवारी विजयदुर्ग येथे तिची दुसरी फेरी दाखल झाली होती. गुरुवारी दुपारी ही बोट पुन्हा मुंबईकडे रवाना होणार असतानाच बंदरातील एका टगबोटीने फेरीबोटला धडक दिली. या धडकेत बोटीचे काही प्रमाणात नुकसान झाले.

प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने प्रवाशांच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला. गुरुवारी मुंबईला जाण्यासाठी एकूण ३० प्रवाशांनी बुकिंग केले होते.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कंपनीने सर्व प्रवाशांचे तिकीट पैसे तत्काळ परत केले. तसेच बोटीवरील काही कर्मचाऱ्यांना देवगडमार्गे खासगी ट्रॅव्हल्सने मुंबईला पाठविण्यात आले. दिवसभर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा तपासणी करून ‘एम-२-एम प्रिन्सेस’ ही फेरीबोट प्रवाशांविना मुंबईकडे रवाना झाली.

या किरकोळ अपघातामुळे नव्याने सुरू झालेल्या या जलवाहतूक सेवेला तात्पुरता खंड पडला असला, तरी प्रवाशांच्या हिताचा विचार करून कंपनीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.

Facebook Comments Box

दक्षिण मुंबई – अलिबाग प्रवास ७५ मिनिटांवर आणणार्‍या रेवास–करंजा सागरी पूल प्रकल्पाला वेग

   Follow us on        

रायगड: महाराष्ट्राच्या किनारी भागातील महत्त्वाकांक्षी रेवास–करंजा सागरी पूल प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून मार्च २०२६ पर्यंत सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. धर्मतर खाडीवर उभारण्यात येणारा हा पूल महाराष्ट्राच्या सागरी कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

या प्रकल्पात २ किलोमीटर लांबीचा मुख्य सागरी पूल आणि अ‍ॅप्रोच रस्त्यांसह एकूण १०.६५ किलोमीटर लांबीचा मार्ग तयार करण्यात येत आहे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून हा प्रकल्प राबवला जात असून तो ३० महिन्यांच्या मुदतीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्याची कामाची गती पाहता हा प्रकल्प मुदतीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हा पूल अटल सेतूच्या चिर्ले इंटरचेंजपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई ते अलिबागचा प्रवास सध्याच्या सुमारे २.५ तासांवरून फक्त ७५ मिनिटांवर (१ तास १५ मिनिटे) येणार आहे. यामुळे अलिबागसह संपूर्ण कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

रेवास–करंजा पूल हा महाराष्ट्र कोस्टल हायवे (सागरी महामार्ग) प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असून तो उरण (नवी मुंबई) आणि रेवस (अलिबाग) यांना थेट जोडणार आहे. यामुळे मुंबई–कोकण–गोवा किनारी मार्ग अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.

प्रकल्पाची प्रगती सातत्याने वाढत असून ऑक्टोबर २०२५ मध्ये १५%, नोव्हेंबरमध्ये १८%, फेब्रुवारी २०२६ मध्ये २२% आणि मार्चमध्ये २५% काम पूर्ण झाले आहे. पूल तयार झाल्यानंतर पावसाळ्यात फेरी सेवा बंद असतानाही बारमाही सुरक्षित आणि जलद रस्ता उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पामुळे रायगड जिल्हा आणि मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटीला नवे आयाम मिळणार असून कोकणवासीयांसाठी हा पूल खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरणार आहे.

Pic credit – Infra News India (INI)

Facebook Comments Box

Mumbai Local: फुकट्या प्रवाशांची कोणतीच सबब चालली नाही! मुंबईत ‘रॉकस्टार’ टीसीचा नवा विक्रम

   Follow us on        

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य तिकीट तपासनीस (Chief Ticket Inspector) सुधा द्विवेदी यांनी एकाच दिवसात तब्बल २०२ विनातिकीट किंवा अनियमित प्रवाशांना पकडत ५५,२१० रुपयांचा दंड वसूल करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली असून, मुंबई उपनगरीय रेल्वेच्या इतिहासातील एकल दिवसातील सर्वाधिक दंड वसुलीचा हा विक्रम ठरला आहे.

सुधा द्विवेदी यांनी सकाळी ६.४८ वाजता खारघर स्थानकापासून तिकीट तपासणीस सुरुवात केली आणि दुपारी ३.३० वाजेपर्यंत सुमारे नऊ तास सातत्याने तपासणी केली. या कालावधीत त्यांनी सरासरी दर अडीच मिनिटांनी एक प्रकरण हाताळले. काही ठिकाणी संपूर्ण गट एकत्र आढळल्याने कारवाईची संख्या अधिक वाढली.

यापूर्वीचा विक्रम मध्य रेल्वेच्या रुबिना अकिब इनामदार यांच्या नावावर होता. त्यांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी १५० प्रकरणांतून ४५,७०५ रुपयांचा दंड वसूल केला होता. मात्र, सुधा द्विवेदी यांनी हा आकडा मागे टाकत नवा उच्चांक नोंदवला.

मध्य रेल्वे प्रशासनाने या उल्लेखनीय कामगिरीचे अधिकृतपणे कौतुक केले असून, त्यांना ‘रॉकस्टार’ अशी उपाधी देत गौरविण्यात आले आहे. यापूर्वीही त्यांना ‘अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला होता.

मुंबई लोकल ही शहराची जीवनरेषा मानली जाते. तरीही, UTS मोबाईल अॅप, UPI पेमेंट सुविधा आणि स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रणा उपलब्ध असतानाही काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. अशा परिस्थितीत सुधा द्विवेदी यांसारख्या अधिकाऱ्यांची कठोर आणि सातत्यपूर्ण तपासणी रेल्वेच्या महसुलात वाढ करण्यासोबतच प्रामाणिक प्रवाशांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास महत्त्वाची ठरते.

Facebook Comments Box

‘शिवनेरी’ आता मुंबई–पुण्याबाहेरही धावणार; प्रस्तावित मार्गांची यादी जाहीर, ‘स्लीपर शिवनेरी’चीही सुरूवात होणार

   Follow us on        

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) ‘शिवनेरी’ बससेवा लवकरच मुंबई–पुणे मार्गाबाहेर राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये सुरू होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा MSRTC चे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली.

२००२ मध्ये सुरू झालेली शिवनेरी सेवा वेळेची काटेकोरता, आरामदायी आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवासासाठी ओळखली जाते. सामान्य बसांच्या तुलनेत भाडे थोडे अधिक असले तरी प्रवाशांचा या सेवेला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

२०० नवीन व्होल्वो बसांची भर

राज्यभर विस्तारासाठी MSRTC ने २०० अत्याधुनिक व्होल्वो बस खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या बस पुढील प्रमुख मार्गांवर धावणार आहेत:

नाशिक–पुणे

नाशिक–छत्रपती संभाजीनगर

नाशिक–जळगाव–धुळे

पुणे–कोल्हापूर

पुणे–सांगली

पुणे –सोलापूर

नागपूर–चंद्रपूर

नागपूर–अमरावती–अकोला

ई-शिवनेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सध्या दादर–स्वारगेट, दादर–शिवाजीनगर, बोरिवली–स्वारगेट, ठाणे–शिवाजीनगर आदी मार्गांवर ई-शिवनेरी (इलेक्ट्रिक) बस धावत आहेत. पर्यावरणपूरक या बसांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महिलांना व ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत दिली जाते, तर ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा आहे.

स्लीपर शिवनेरी’चीही सुरूवात

नवीन २०० बसांपैकी ३० बस स्लीपर कोच असणार आहेत. या ‘स्लीपर शिवनेरी’ बस काही लांब पल्ल्याच्या मार्गांवरील नॉन-एसी स्लीपर बसांची जागा घेणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, अधिक सुरक्षितता आणि आरामदायी बेड-कोच सुविधेमुळे रात्रीच्या प्रवासासाठी ही सेवा अधिक सोयीस्कर ठरणार आहे.

शिवनेरी सेवेचा हा विस्तार म्हणजे महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतुकीच्या नव्या पर्वाची सुरूवात असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Facebook Comments Box

Fact check: होळीसाठी ४ मार्च सुट्टी असल्याची बातमी खोटी

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) स्पष्ट केले आहे की, होळीनिमित्त फक्त मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. सोशल मीडियावर बुधवार, ४ मार्च २०२६ रोजीही सुट्टी असल्याचा खोटा दावा आणि फेक नोटिफिकेशन व्हायरल झाले होते. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीत (२०२६) ४ मार्चला कोणतीही अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली नाही.

यंदा चंद्रग्रहणामुळे (३ मार्चला) आणि धार्मिक परंपरेनुसार काही ठिकाणी लोकांनी रंग खेळणे ४ मार्चला पुढे ढकलले असले तरी, शासकीय/शाळा/बँक/कार्यालयांसाठी सुट्टी फक्त ३ मार्चलाच आहे. ४ मार्च हा सामान्य कार्यदिवस राहील.महाराष्ट्रातील २०२६ सार्वजनिक सुट्ट्यांची यादी (मार्च महिन्यातील महत्त्वाच्या) ३ मार्च २०२६ (मंगळवार) – होळी (धुलिवंदन/दुसरा दिवस)

अधिकृत माहितीसाठी DGIPR च्या पोस्ट किंवा शासनाच्या वेबसाइटला (https://dgipr.maharashtra.gov.in) भेट द्या. फेक न्यूज पसरवू नका, फक्त विश्वसनीय स्रोतांवर विश्वास ठेवा!

 

 

 

Facebook Comments Box

सर्व बाबी अनुकूल, तरीही विलंब का? २० डब्यांच्या मुंबई–गोवा वंदेभारत एक्सप्रेसची प्रतीक्षा कायम

   Follow us on        

मुंबई: मुंबई–मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्र. २२२२९/२२२३०) या अत्यंत लोकप्रिय गाडीची क्षमता तातडीने वाढवून ती २० डब्यांची करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे. मध्य रेल्वेअंतर्गत सर्वाधिक प्रवासी प्रतिसाद मिळणारी ही वंदे भारत सेवा सध्या केवळ ८ डब्यांसह चालवली जात असून, सुरुवातीपासूनच सातत्याने उच्च प्रवासी गर्दी असूनही क्षमतेत वाढ न होणे आश्चर्यकारक आणि अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेतील अनेक वंदे भारत गाड्या ९० टक्क्यांहून अधिक प्रवासी भराव नोंदवताच १६ किंवा २० डब्यांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत, त्यामुळे मुंबई–मडगाव मार्गालाही त्याच धर्तीवर वाढ मिळावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, नांदेड–मुंबई आणि सोलापूर–मुंबई वंदे भारत गाड्यांची मालकी व देखभाल जबाबदारी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे वर्ग झाल्याने मुंबईतील देखभाल सुविधा व पिट लाईनची क्षमता मोठ्या प्रमाणात मोकळी झाली आहे. त्यामुळे मुंबई–मडगाव वंदे भारतला कायमस्वरूपी २० डब्यांची रचना देण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

उच्च मागणी असलेल्या या महत्त्वाच्या मार्गावर अजूनही कमी क्षमतेची गाडी चालवली जाणे योग्य नसल्याचे सांगत रेल्वे बोर्ड तसेच संबंधित विभागांनी तातडीने निर्णय घेऊन ही वाढ प्राधान्याने लागू करावी, अशी मागणी कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी संबधित आस्थापना आणि लोकप्रतिनिधींना ईमेल द्वारे केली आहे. कोकणातील प्रवासी या दीर्घकालीन आणि रास्त मागणीच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी येथे थांबा देणे गरजेचे

या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त एका स्थानकावर, म्हणजे कणकवली येथेच थांबा आहे. राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेल्या या जिल्ह्यात अशा प्रीमियम गाड्यांना पुरेसे थांबे न देणे हा मोठा विरोधाभास म्हणावा लागेल. तळकोकणातील सावंतवाडी येथे या गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी गाडी सुरू झाल्यापासून सातत्याने होत आहे. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी वंदे भारत एक्स्प्रेससाठी सावंतवाडी थांब्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत हा थांबा मिळालेला नाही. ही गाडी २० डब्यांची करून तिला सावंतवाडी येथे थांबा मिळावा, यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) प्रयत्नशील आहे.

Facebook Comments Box

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा: सामान्यांसाठी “चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला”!

   Follow us on        

मुंबई: कोकणच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राज्यकर्त्यांनी मुंबई ते विजयदुर्ग अशी ‘M2M’ रो-रो सेवा नुकतीच थाटामाटात सुरू केली. मात्र, या सेवेचे भाडेपत्रक पाहिल्यावर सामान्य कोकणी माणसाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. “चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला” अशी या प्रवासाची अवस्था झाली असून, या भाडेवाढीमुळे कोकणचा सामान्य चाकरमानी पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

गणिताचा ‘झोल’: रस्ते प्रवास स्वस्त, जलप्रवास महाग!

कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी या भाडेवाढीचे वाभाडे काढताना एक बोलके गणित मांडले आहे. जर एखादा मध्यमवर्गीय माणूस स्वतःच्या कारने (४ प्रवाशांसह) मुंबईहून कोकणात गेला, तर त्याचे गणित खालीलप्रमाणे बसते:

प्रवास साधन इंधन (Fuel) टोल (Toll) एकूण खर्च
खाजगी कार (रस्त्याने) ₹ ४,५०० (10kmpl) ₹ १,००० ₹ ५,५००/-

म्हणजेच, रस्त्याने जाण्यापेक्षा जलमार्गाने जाण्यासाठी कोकणी माणसाला तब्बल १०,५०० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. हा कुठल्या प्रकारचा विकास आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

“सामान्य माणूस केंद्रस्थानी की फक्त श्रीमंत पर्यटक?”

विजयदुर्गला पोहोचल्यानंतर तिथून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पुन्हा खाजगी वाहन किंवा एसटीचा खर्च वेगळाच. तसेच मुंबईत घरून भाऊच्या धक्क्यापर्यंत पोहोचण्याचा खर्च धरला, तर हे बजेट सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाते. मंत्र्यांनी हे दर ठरवताना नेमका कोणाचा विचार केला? केवळ आलिशान गाड्यांमधून फिरणाऱ्या पर्यटकांचा की घाम गाळून कोकण जिवंत ठेवणाऱ्या चाकरमान्यांचा?

“कोकणवासीयांची परवड कधी थांबणार? विजयदुर्गला उतरल्यावर पुढे घरापर्यंतचा प्रवास खर्च जोडला तर हे आर्थिक गणित कोलमडते. ही सेवा सामान्यांसाठी नसून केवळ श्रीमंतांच्या चोचल्यांसाठी आहे असे वाटते.”सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर, संस्थापक सदस्य, कोकण रेल्वे.

त्यापेक्षा ‘वसई ते सावंतवाडी पॅसेंजर’ सुरू करा

कोकणच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सामान्यांना न परवडणारी ‘रो-रो’ सेवा सुरू करण्यापेक्षा, रेल्वे प्रशासनाने ‘वसई ते सावंतवाडी पॅसेंजर’ सुरू करणे हाच खरा आणि व्यवहार्य तोडगा ठरेल, असे प्रतिपादन सुरेंद्र नेमळेकर यांनी केले आहे. या प्रस्तावानुसार, ही गाडी रात्री १० वाजता वसईवरून सुटावी, ज्यामुळे नोकरी-धंद्यावरून सुटलेला चाकरमानी सुखाने प्रवास करू शकेल. भिवंडी आणि कोपर रोडसह कोकणातील सर्व प्रमुख स्थानकांवर या गाडीला थांबा दिल्यास ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगरातील प्रवाशांची मोठी सोय होईल. महत्त्वाचे म्हणजे, अवघ्या २२५ रुपयांत प्रवासी सकाळी सावंतवाडीपर्यंत पोहोचू शकतील आणि तिथून एसटीने आपापल्या घरी जाणे त्यांना अत्यंत स्वस्त पडेल. सकाळी तिथूनच ही गाडी परतीच्या प्रवासाला निघून रात्री १० वाजेपर्यंत पुन्हा वसईला पोहोचू शकते. ही साधी पण प्रभावी योजना राबवल्यास कोकणवासीयांची वर्षानुवर्षांची आर्थिक परवड खऱ्या अर्थाने थांबेल.

Facebook Comments Box

मुंबई विमानतळांना थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी! मेट्रो-८ साठी ₹२२ हजार कोटींची गुंतवणूक

   Follow us on        

मुंबई : Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA) ते Navi Mumbai International Airport (NMIA) दरम्यान प्रस्तावित मेट्रो मार्ग-८ प्रकल्पाचा सविस्तर आर्थिक आराखडा जाहीर झाला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ₹२२,६६२ कोटी इतकी असून मुख्य बांधकामासाठी ₹१९,२७८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.

निधी उभारणीची रचना

प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारकडून व्यवहार्यता अंतर निधी (VGF) स्वरूपात प्रत्येकी ₹३,४५६ कोटी (२०%) देण्यात येणार आहेत. नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाकडून ₹५६४ कोटी (सुमारे ३%) तर खासगी विकसकाकडून ₹७,८०३ कोटी (सुमारे ४५%) गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे सुमारे ४० टक्के हिस्सा हा सार्वजनिक अनुदानाचा असून उर्वरित मोठा वाटा खासगी क्षेत्राकडून उचलला जाणार आहे.

अतिरिक्त खर्चाचाही समावेश

मुख्य प्रकल्प खर्चाव्यतिरिक्त जमीन संपादन व पुनर्वसनासाठी ₹२,३२३ कोटी, विविध कर व शुल्कासाठी ₹१,१३० कोटी तसेच बांधकाम कालावधीतील व्याज (IDC) म्हणून ₹२,९९९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व खर्चांसह प्रकल्पाची एकूण किंमत ₹२२,६६२ कोटींवर पोहोचते.

विमानतळांना थेट मेट्रो जोडणी

हा मेट्रो मार्ग मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांना थेट जोडणार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सोय निर्माण होणार आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यास या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search