कोकण आयुक्तांचे न्यायालय रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गात व्हावे!

   Follow us on        

सिंधुदुर्ग: देवगड येथे अधिवक्ता परिषद, कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हतर्फे कोकण आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या महसूल न्यायप्रकरणांच्या सुनावणीसाठी रत्नागिरी अथवा सिंधुदुर्ग येथे नियमितपणे कोकण आयुक्तांचे न्यायालय भरविण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आले.

​या प्रसंगी ज्येष्ठ अधिवक्ता व माजी आमदार अजित गोगटे, अधिवक्ता परिषद प्रांत उपाध्यक्ष अभिषेक गोगटे, अधिवक्ता राहुल तांबोलकर, अधिवक्ता स्वप्नील सावंत, अधिवक्ता अग्निवेश तावडे, अधिवक्ता प्रतिमा सातवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

​या निवेदनातून मागणी करताना, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल न्याय प्रकरणांच्या सुनावणीसाठी पक्षकार, वकील आणि संबंधित नागरिकांना प्रत्येकवेळी मुंबईला जावे लागत असल्याने त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

​रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग येथे कोकण आयुक्तांचे न्यायालय नियमितपणे भरविल्यास दोन्ही जिल्ह्यातील प्रलंबित महसूल प्रकरणांचा जलद निपटारा होण्यास मदत होईल आणि पक्षकार, वकील तसेच नागरिकांच्या प्रवासाचा खर्च, वेळ व श्रम यांची मोठी बचत होऊन न्यायप्रवेश सुलभ होईल.

​या मागणीची शासनाने सकारात्मक दखल घेऊन रत्नागिरी अथवा सिंधुदुर्ग येथे ठराविक कालावधीनंतर नियमितपणे कोकण आयुक्तांचे न्यायालय भरविण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी अधिवक्ता परिषद, कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

Facebook Comments Box

शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी विदेशात जाण्याची संधी

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग नगरी येथील कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ ची राज्य पुरस्कृत ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र व प्रगतशील शेतकऱ्यांनी २० ऑगस्टपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

​या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती, बाजार व्यवस्थापन, निर्यात प्रक्रिया तसेच सेंद्रिय शेतीविषयक कार्य प्रत्यक्ष पाहण्याची आणि ज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यामध्ये युरोप येथे फलोत्पादन, सेंद्रिय शेती व दूधोत्पादन तर चीन येथे विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढ आणि कृषी एक्स्पो यांचा अभ्यास दौरा प्रस्तावित आहे.

​निवड झालेल्या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढे शासकीय अनुदान दिले जाईल. उरलेला ५० टक्के खर्च शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँक खात्यातून कॅशलेस पद्धतीने (NEFT/RTGS/Cheque) संबंधित ट्रॅव्हल कंपनीकडे जमा करणे आवश्यक राहणार आहे.

​या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय २५ वर्षे पूर्ण असावे, तो मुख्य व्यवसाय शेती करणारा असावा आणि त्याच्याकडे ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदार सरकारी किंवा निमशासकीय कर्मचारी, डॉक्टर, वकील, सीए, अभियंता किंवा कॉन्ट्रॅक्टर नसावा आणि कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस याचा लाभ दिला जाईल.

​जिल्हास्तरावर पात्र अर्जदारांची निवड पारदर्शक पद्धतीने वीडिओग्राफूसह सोडत काढून केली जाणार असून, यात किमान एक महिला शेतकरी आणि कृषी पुरस्कार प्राप्त किंवा पीक स्पर्धेतील विजेता शेतकरी यांचा समावेश अनिवार्य आहे. इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात २० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत.

Facebook Comments Box

भगवती बंदर येथे क्रूझ टर्मिनल उभारणीला वेग; कोकणातील पर्यटनाला मिळणार नवी दिशा

   Follow us on        

रत्नागिरी:

​रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे अत्याधुनिक क्रूझ टर्मिनल विकसित करण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाळुळे कोकणातील सागरी पर्यटन, स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा ठाम विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

​या प्रकल्पाबाबत मंत्रालयात एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मंत्री नितेश राणे बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

​मंत्री नितेश राणे यांनी बैठकीत सांगितले की, कोकण किनारपट्टीची नैसर्गिक संपन्नता, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन क्षमता लक्षात घेता भगवती बंदर येथे होणारे क्रूझ टर्मिनल राज्याच्या सागरी पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

​या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होऊ शकतील. यामुळे रत्नागिरी पर्यटन जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकण्यास मोठी मदत होईल.

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन कोकणातील बंदर विकास आणि सागरी पर्यटनाला सर्वोच प्राधान्य देत आहे, असेही मंत्री नितेश राणे यांनी शेवटी सांगितले.

Facebook Comments Box

गणेशभक्तांसाठी खुशखबर! पाश्चिम रेल्वेतर्फे गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा

   Follow us on        

पश्चिम रेल्वेने गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीला नियंत्रित करण्यासाठी विशेष गाड्या (Ganpati Special Trains 2026) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली होती. त्या गाड्यांचे आरक्षण पण फूल झाले आहे. आता पाश्चिम रेल्वेनेही विशेष गाड्यांची घोषणा केल्याने ज्या चाकरमान्यांना तिकिटे आरक्षित तिकिटे भेटली नाहीत त्यांची सोय होणार आहे. गाड्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

१. मुंबई सेंट्रल – थोकूर – मुंबई सेंट्रल साप्ताहिक विशेष गाडी (क्र. ०९०१३ / ०९०१४)

कोणत्या दिवशी धावणार:

गाडी क्र. ०९०१३ (मुंबई सेंट्रल ते थोकूर): दर मंगळवारी धावणार.

गाडी क्र. ०९०१४ (थोकूर ते मुंबई सेंट्रल): दर बुधवारी धावणार.

वेळापत्रक:

सुटण्याची वेळ: मुंबई सेंट्रलवरून दर मंगळवारी सकाळी १०:४५ वाजता सुटून गुरुवारी सकाळी ०७:४० वाजता थोकूर येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासाची वेळ: थोकूरवरून दर बुधवारी सकाळी ११:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सकाळी ०८:५० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.

गाडीचे सर्व थांबे:

बोरीवली, वसई रोड, कामन रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्णा रोड, कुमटा, मूरडेश्वर, मूकांबिका रोड बैंदूर, कुंदानपूर, उडुपी, मुल्की आणि सुरतकल.

डब्यांची रचना:

३ वातानुकूलित (ACCN), १५ स्लीपर (GSCN), २ जनरल (GS), आणि २ एसएलआर (SLR/D) अशा एकूण २२ ICF डब्यांची रचना असेल.

२. मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल विशेष गाडी (क्र. ०९०१९ / ०९०२० – आठवड्यातून ४ दिवस)

कोणत्या दिवशी धावणार:

गाडी क्र. ०९०१९ (मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड): दर बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी.

गाडी क्र. ०९०२० (सावंतवाडी रोड ते मुंबई सेंट्रल): दर गुरुवार, शनिवार, रविवार आणि सोमवार.

वेळापत्रक:

सुटण्याची वेळ: मुंबई सेंट्रलवरून रात्री १०:४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०२:३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

परतीच्या प्रवासाची वेळ: सावंतवाडी रोडवरून पहाटे ०४:५० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ०८:१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.

गाडीचे सर्व थांबे:

बोरीवली, वसई रोड, कामन रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विळवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि जरप.

डब्यांची रचना:

३ AC, १५ स्लीपर, २ जनरल आणि २ एसएलआर मिळून एकूण २२ ICF डबे.

३. बांद्रा टर्मिनस – रत्नागिरी – बांद्रा टर्मिनस साप्ताहिक अनारक्षित विशेष गाडी (क्र. ०९०३५ / ०९०३६)

कोणत्या दिवशी धावणार:

गाडी क्र. ०९०३५ (बांद्रा ते रत्नागिरी): दर गुरुवारी.

गाडी क्र. ०९०३६ (रत्नागिरी ते बांद्रा): दर शुक्रवारी.

वेळापत्रक:

सुटण्याची वेळ: बांद्रा टर्मिनसवरून दुपारी ०२:२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १२:३० वाजता (शुक्रवारी) रत्नागिरी पोहोचेल.

परतीच्या प्रवासाची वेळ: रत्नागिरीहून पहाटे ०१:३० वाजता सुटून दुपारी १२:३० वाजता बांद्रा टर्मिनस येथे पोहोचेल.

गाडीचे सर्व थांबे:

बोरीवली, वसई रोड, कामन रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना:

२२ LHB डबे (२० जनरल, १ LSLRD, १ LWRRM).

४. वडोदरा – रत्नागिरी – वडोदरा साप्ताहिक विशेष गाडी (क्र. ०९११४ / ०९११३)

कोणत्या दिवशी धावणार:

गाडी क्र. ०९११४ (वडोदरा ते रत्नागिरी): दर मंगळवारी.

गाडी क्र. ०९११३ (रत्नागिरी ते वडोदरा): दर बुधवारी.

वेळापत्रक:

सुटण्याची वेळ: वडोदरावरून सकाळी ११:१५ वाजता सुटून रात्री १२:३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासाची वेळ: रत्नागिरीहून पहाटे ०१:३० वाजता सुटून दुपारी ०५:३० वाजता वडोदराला पोहोचेल.

गाडीचे सर्व थांबे:

भरूच, सुरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, कामन रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना:

एकूण २२ LHB डबे (विविध वर्ग जसे की AC आणि स्लीपर समाविष्ट).

५. विश्वमित्री – रत्नागिरी – विश्वमित्री द्वي-साप्ताहिक विशेष गाडी (क्र. ०९११० / ०९११०९)

कोणत्या दिवशी धावणार:

गाडी क्र. ०९११० (विश्वमित्री ते रत्नागिरी): दर बुधवार व शनिवारी.

गाडी क्र. ०९१०९ (रत्नागिरी ते विश्वमित्री): दर गुरुवार व रविवारी.

वेळापत्रक:

सुटण्याची वेळ: विश्वमित्रीवरून सकाळी १०:०० वाजता सुटून रात्री १२:३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासाची वेळ: रत्नागिरीहून पहाटे ०१:३० वाजता सुटून संध्याकाळी ०५:३० वाजता विश्वमित्री येथे पोहोचेल.

गाडीचे सर्व थांबे:

भरूच, सुरत, वलसाड, वापी, डहाणू रोड, पालघर, वसई रोड, कामन रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना:

३ AC, १५ स्लीपर, २ जनरल आणि २ SLR मिळून एकूण २२ ICF डबे.

६. विश्वमित्री – रत्नागिरी – विश्वमित्री साप्ताहिक विशेष गाडी (क्र. ०९१२४ / ०९१२३)

कोणत्या दिवशी धावणार:

गाडी क्र. ०९१२४ (विश्वमित्री ते रत्नागिरी): दर सोमवारी.

गाडी क्र. ०९१२३ (रत्नागिरी ते विश्वमित्री): दर सोमवारी/मंगळवारी.

वेळापत्रक:

सुटण्याची वेळ: विश्वमित्रीवरून सकाळी ०५:५५ वाजता सुटून रात्री ०८:०० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासाची वेळ: रत्नागिरीहून रात्री ०९:०० वाजता सुटून दुपारच्या सुमारास विश्वमित्रीला पोहोचेल.

गाडीचे सर्व थांबे:

भरूच, सुरत, वलसाड, वापी, डहाणू रोड, पालघर, वसई रोड, कामन रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना:

एकूण २२ ICF डबे (AC, स्लीपर आणि जनरल डब्यांसह).

७. उधना – रत्नागिरी – उधना साप्ताहिक विशेष गाडी (क्र. ०९०२२ / ०९०२१)

कोणत्या दिवशी धावणार:

गाडी क्र. ०९०२२ (उधना ते रत्नागिरी): दर गुरुवारी.

गाडी क्र. ०९०२१ (रत्नागिरी ते उधना): दर गुरुवारी.

वेळापत्रक:

सुटण्याची वेळ: उधना जंक्शनवरून सकाळी ०८:०५ वाजता सुटून रात्री ०८:०० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासाची वेळ: रत्नागिरीहून रात्री ०९:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०:२० वाजता उधनाला पोहोचेल.

गाडीचे सर्व थांबे:

वलसाड, वापी, डहाणू रोड, पालघर, वसई रोड, कामन रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना:

एकूण २२ ICF डबे.

८. वलसाड – रत्नागिरी – वलसाड साप्ताहिक विशेष गाडी (क्र. ०९०३० / ०९०२९)

कोणत्या दिवशी धावणार:

गाडी क्र. ०९०३० (वलसाड ते रत्नागिरी): दर सोमवारी.

गाडी क्र. ०९०२९ (रत्नागिरी ते वलसाड): दर मंगळवारी.

वेळापत्रक:

सुटण्याची वेळ: वलसाडवरून दुपारी ०२:५० वाजता सुटून मंगळवारी पहाटे ०२:३० वाजता रत्नागिरी पोहोचेल.

परतीच्या प्रवासाची वेळ: रत्नागिरीहून पहाटे ०३:१० वाजता सुटून संध्याकाळी ०४:१५ वाजता वलसाड येथे पोहोचेल.

गाडीचे सर्व थांबे:

वापी, डहाणू रोड, पालघर, वसई रोड, कामन रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना:

३ AC, १५ स्लीपर, २ जनरल आणि २ SLR असे एकूण २२ ICF डबे.

 

Facebook Comments Box

आंबोली घाटात ४०० फूट दरीत पडलेल्या त्या तरुणाचा मृत्यू

   Follow us on        

आंबोली: निसर्गरम्य आंबोली परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) असे दरीत कोसळलेल्या दुर्दैवी पर्यटकाचे नाव असून, ते आपल्या नऊ मित्रांसह आंबोलीत पर्यटनासाठी आले होते.

​मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा मित्रपरिवार महादेवगड पॉईंट परिसरात फिरत असताना, डॉ. आयुब हे लघुशंकेसाठी सुरक्षिततेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले. यादरम्यान अचानक तोल गेल्याने ते थेट सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळले. तिथे मका विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने त्यांना खाली पडताना पाहताच सहकाऱ्यांना तातडीने याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मकदून आपल्या पथкаसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंबोलीच्या ‘सह्याद्री एडव्हेंचर रेस्क्यू टीम’ला पाचारण करून शोधमोहीम सुरू केली. परंतु, परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस, दाट धुके आणि अंधार यामुळे मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता ही बचाव मोहीम तात्पुरती थांबवावी लागली होती.

​बुधवारी सकाळी पहाटेपासून सावंतवाडी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीमने पुन्हा एकदा वेगाने शोधमोहीम हाती घेतली. सकाळी दहाच्या सुमारास खोल दरीत डॉ. आयुब सय्यद यांचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले. सध्या रेस्क्यू टीमच्या साह्याने मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू असून, या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Facebook Comments Box

वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेचा अहवाल महिनाभरात

   Follow us on        

सिंधुदुर्ग: ​सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी तिलारी प्रकल्पावर आधारित ‘वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजना (टप्पा-२)’ आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. नायक, वित्त विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर, पाणीपुरवठा विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी, कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, नाबार्डचे वरिष्ठ महाव्यवस्थापक अविनाश सेवलकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

​या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासह पाणीपंप, बीज खर्च कमी करण्यासाठी १५०० केव्हीए क्षमतेच्या प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून, तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय बाबींसह सविस्तर अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच नाबार्डच्या माध्यमातून निधी उभारणे अत्यावश्यक असल्याने या योजनेचा प्रस्ताव वित्तपुरवठ्यासाठी शासनाकडे त्वरीत सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

​सागरी किनारपट्टीवरील वेंगुर्ला-चिपी परिसरात गोड्या पाण्याची उपलब्धता अत्यंत मर्यादित असल्यामुळे या भागातील अनेक ग्रामपंचायतींनी तिलारी प्रकल्पातून पाणीपुरवठा मिळण्याबाबत ठराव मंजूर करून शासनाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. भविष्यात चिपी विमानतळाचा विस्तार, पर्यटन उद्योगाची वाढ आणि नवीन व्यावसायिक प्रकल्पामुळे पाण्याची मागणी अधिक वाढणार असल्याने ही योजना अतिशय दूरदृष्टीची ठरणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.

Facebook Comments Box

‘गोपीनाथ मुंडे शेतकरी’ योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश होणार

   Follow us on        

मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा तसेच या योजनेत पात्र भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी ही योजना कुटुंबातील दोनच सदस्यांना लागू होती, पण आता ही योजना शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांना लागू होणार आहे.

​शेतकरी कुटुंबातील १० ते ७५ वर्ष वयोगटातील २ जणांसाठी ही योजना राबविण्यात येत होती, ज्यामध्ये मृत्यू आणि अपंगत्व आल्यास आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेस ३१ मार्च २०३१ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, यात भूमिहीन शेतमजुरांसह महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र मिळालेल्या महिला शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली असून, यात अपघातामुळे झालेला अंतर्गत रक्तस्त्राव आणि उष्माघात यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

​या योजनेसाठी यापुढे अपिलीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या ऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी राहतील आणि आर्थिक मदतीचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी दोन महिन्यांची मुदत राहणार आहे. आर्थिक मदत थेट लाभ हस्तांतरण (डिबिटी ट्रान्सफर) पद्धतीने लाभार्थीच्या खात्यात जमा केली जाईल.

Facebook Comments Box

Konkan Railway: मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी खूशखबर! सीएसएमटी – मडगाव दरम्यान TOD विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

मुंबई:

कोकण आणि गोवा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीचा ताण कमी करण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाची सोय सुरळीत व्हावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि मडगाव (MAO) दरम्यान विशेष ट्रेन (TOD Special) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट २०२६ मधील अतिरिक्त गर्दीच्या काळात या विशेष गाड्या धावणार आहेत.

​गाडीचे तपशील आणि फेऱ्या

​गाडी क्रमांक 01029 (CSMT – MAO विशेष): ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.०८.२०२६ आणि १५.०८.२०२६ रोजी मडगावसाठी प्रस्थान करेल. या मार्गावर याच्या एकूण २ फेऱ्या असणार आहेत.

​गाडी क्रमांक 01030 (MAO – CSMT विशेष): ही ट्रेन मडगाव येथून १३.०८.२०२६ आणि १५.०८.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना होईल. या मार्गावरही एकूण २ फेऱ्या नियोजित आहेत.

​डब्यांची रचना (Coach Composition)

​प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी या विशेष ट्रेनमध्ये एकूण २४ ICF कोचेस जोडण्यात आले आहेत. यामध्ये खालीलप्रमाणे डब्यांचा समावेश आहे:

​१२ शयनयान (GSCN) कोचेस

​०१ प्रथम वातानुकूलित (ACCW) कोच

​०५ वातानुकूलित (ACCN) कोचेस

​०४ सामान्य (GS) कोचेस

​०२ एसएलआरडी (SLRD) कोचेस

​थांबे आणि वेळापत्रक (Schedule)

​ही विशेष ट्रेन मार्गावरील सर्व प्रमुख स्थानकांवर थांबणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

01029 सीएसएमटी – मडगाव विशेष ट्रेनचे वेळापत्रक (आगमन / प्रस्थान)

* CSMT: 00:25 (सुटते)

* दादर (Dadar): 00:37 / 00:40

* ठाणे (Thane): 01:20 / 01:23

* पनवेल (Panvel): 02:10 / 02:15

* पेन (Pen): 03:14 / 03:16

* रोहा (Roha): 03:50 / 03:55

* माणगाव (Mangaon): 04:18 / 04:20

* वीर (Veer): 04:32 / 04:34

* खेड (Khed): 05:10 / 05:12

* चिपळूण (Chiplun): 05:40 / 05:45

* सावर्डा (Sawarda): 06:05 / 06:07

* संगमेश्वर रोड (Sangameshwar Road): 06:32 / 06:34

* रत्नागिरी (Ratnagiri): 07:20 / 07:25

* अडवली (Adavali): 07:55 / 07:57

* राजापूर रोड (Rajapur Road): 08:26 / 08:28

* वैभववाडी रोड (Vaibhavwadi Road): 08:40 / 08:42

* कणकवली (Kankavali): 09:28 / 09:30

* सिंधुदुर्ग (Sindhudurg): 09:50 / 09:52

* कुडाळ (Kudal): 11:05 / 11:07

* सावंतवाडी रोड (Sawantwadi Road): 11:30 / 11:32

* थिविम (Thivim): 12:40 / 12:42

* करमाळी (Karmali): 13:20 / 13:22

* मडगाव (Madgaon – MAO): 15:15 (येते)

01030 मडगाव – सीएसएमटी विशेष ट्रेनचे वेळापत्रक (आगमन / प्रस्थान)

* मडगाव (Madgaon – MAO): 16:00 (सुटते)

* करमाळी (Karmali): 16:30 / 16:32

* थिविम (Thivim): 16:50 / 16:52

* सावंतवाडी रोड (Sawantwadi Road): 17:18 / 17:20

* कुडाळ (Kudal): 17:38 / 17:40

* सिंधुदुर्ग (Sindhudurg): 17:52 / 17:54

* कणकवली (Kankavali): 18:12 / 18:14

* वैभववाडी रोड (Vaibhavwadi Road): 18:42 / 18:44

* राजापूर रोड (Rajapur Road): 19:10 / 19:12

* अडवली (Adavali): 19:45 / 19:47

* रत्नागिरी (Ratnagiri): 20:20 / 20:25

* संगमेश्वर रोड (Sangameshwar Road): 21:00 / 21:02

* सावर्डा (Sawarda): 21:30 / 21:32

* चिपळूण (Chiplun): 21:50 / 21:52

* खेड (Khed): 22:08 / 22:10

* वीर (Veer): 23:30 / 23:32

* माणगाव (Mangaon): 23:56 / 23:58

* रोहा (Roha): 00:55 / 01:00

* पेन (Pen): 01:20 / 01:22

* पनवेल (Panvel): 02:05 / 02:10

* ठाणे (Thane): 02:47 / 02:50

* दादर (Dadar): 03:10 / 03:13

* CSMT: 03:45 (येते)

 

Facebook Comments Box

आंबोली घाटात अपघात! तरुण ४०० फूट दरीत पडला; शोधमोहीम सुरू

   Follow us on        

​आंबोली:

वर्षा पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आलेले बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील डॉ. आयूब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) हे मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आंबोलीतील महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. डॉ. सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत मंगळवारी सकाळी आंबोलीत आले होते. सायंकाळी महादेवगड पॉईंट परिसरात फिरत असताना, लघुशंकेसाठी ते दरीच्या बाजूला असलेल्या सुरक्षेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले आणि अचानक त्यांचा तोल गेल्याने ते थेट दरीत कोसळले. पॉईंटवर मक्याची कणसे विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने हा अपघात पाहताच त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ याची माहिती दिली.

​घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आपल्या पथкаसह आणि आंबोलीतील ‘सह्याद्री एडव्हेंचर रेस्क्यू टीम’ने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम हाती घेतली. मात्र, परिसरात सुरू असलेला संततधार पाऊस, दाट धुके आणि अंधार यामुळे मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही शोधमोहीम तात्पुरती थांबवावी लागली.

​रेस्क्यू टीमच्या माहितीनुसार, संबंधित पर्यटक पारपोली येथील सिद्धेश्वर मंदिरापासून सुमारे दोनशे फूट पुढे असलेल्या जंगल भागात कोसळला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताच्या ठिकाणीच संबंधित व्यक्तीचा मोबाईल राहिल्यामुळे मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेणे अशक्य झाले आहे. या प्रतिकूल हवामानामुळे थांबवण्यात आलेली रेस्क्यू मोहीम बुधवारी सकाळी लवकर पुन्हा सुरू करण्यात येणार असून, त्यानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Facebook Comments Box

नवीन गाडी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा विशेष सत्कार

   Follow us on        

नवी दिल्ली:

​छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याच्या दीर्घप्रलंबित मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कोकणवासीयांच्या प्रवासाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असून, संपूर्ण कोकणात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​या रेल्वे मंजूर झाल्याबद्दल कोकणवासीयांच्या वतीने नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आणि कोकणवासीयांनी एकत्र येत रेल्वेमंत्र्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

​या सत्कार सोहळ्याला शिवसेनेचे संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर उपस्थित होते. तसेच, खासदार संजय दिना पाटील, खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार ओम राजे निंबाळकर हे प्रमुख नेतेही यावेळी आवर्जून हजर होते.

​ही नवीन ट्रेन सुरू झाल्यामुळे आगामी गणेशोत्सवात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय होणार आहे. गावी जाण्यासाठी नेहमीच होणारी गर्दी आणि तिकिटांची मारामारी यांमुळे गणेशोत्सवात होणारा त्रास यामुळे काही प्रमाणात कमी होणार आहे.

​केवळ सणउत्सवातच नव्हे, तर वर्षभर नियमित प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. मुंबई आणि कोकणातील दळणवळण अधिक वेगवान आणि सुखकर होणार असल्याने प्रवाशांमधून रेल्वे प्रशासनाचे आभार मानले जात आहेत.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search