गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद राहणार?

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याची शक्यता आहे.

​महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर उभी केली जाणारी अवजड वाहने तातडीने हटवण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

   Follow us on        

​गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व विनाअडथळा व्हावा यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून दरवर्षी सणांच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाहने जात असल्याने वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आणि महामार्ग प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.

​दरवर्षी गणेशोत्सवात महामार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली जाते. मात्र, या बंदीच्या काळात इतर राज्यांत जाणारी किंवा परतीच्या प्रवासातील अवजड वाहने महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवरच पार्क केली जातात. यामुळे गणेशभक्तांच्या वाहनांना पुढे जाण्यात मोठा अडथळा निर्माण होतो आणि सर्व्हिस रोडवरही मोठ्या रांगा लागतात.

​या समस्येबाबत प्रवाशांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या तसेच हे सर्व्हिस रोडवरील ट्रक तातडीने हटवण्यात यावेत अशी आग्रही मागणी केली जात होती. प्रवाशांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत पोलीस आणि महामार्ग प्रशासनाने तातडीने कारवाई करत उपाययोजना आखण्यास प्रारंभ केला आहे.

​कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असल्याने वाहतूक यंत्रणेवर पडणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन जिल्हा वाहतूक शाखेने एक सविस्तर अहवाल तयार केला आहे. हा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आला असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर नियोजन केले जात आहे.

​शासनाला पाठवलेल्या या अहवालानुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक ११ सप्टेंबरच्या सकाळपासूनच पूर्णपणे बंद केली जाण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे यंदाचा गणेशोत्सवातील चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगाने होण्यास मदत होणार आहे

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच सुरू होणार आधुनिक फेरी बोट सेवा! या मार्गावर धावणार पहिली बोट

   Follow us on        

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सिंधुदुर्गातील अंतर्देशीय जलवाहतूक सक्षम करण्यासाठीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

​या योजनेअंतर्गत कर्ली ते तारकर्ली रस्त्यावरील १.५ ते २ तासांचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून यामुळे पर्यटन आणि स्थानिक रोजगाराला मोठा दिलासा मिळणार आहे.

   Follow us on        

​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्देशीय जलवाहतूक अधिक मजबूत आणि आधुनिक करण्यासाठी मंत्रालयात विशेष आढावा बैठक पार पडली. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील प्रवाशांचा जलप्रवास अतिशय सुलभ आणि जलद होणार आहे. याशिवाय स्थानिक स्तरावर जहाजबांधणी, सागरी अभियांत्रिकी, पर्यटन व्यवसाय आणि रोजगाराच्या विविध संधींना मोठी चालना मिळेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.

​प्रस्तावित फेरीसेवेसाठी जिल्ह्यातील एकूण पाच महत्त्वाच्या जलमार्गांचा विचार केला जात आहे. यामध्ये कर्ली-तारकर्ली, कर्ली-देवबाग, देवबाग-निवती, विजयदुर्ग अनुसरे-दांडे आणि आरोंदा-किरणपाणी या मार्गांचा समावेश आहे. प्राथमिक टप्प्यात कर्ली जेट्टी ते तारकर्ली जेट्टी या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्याचे नियोजित आहे. सध्या या दोन ठिकाणांदरम्यान रस्तेमार्गे प्रवास करण्यासाठी सुमारे दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. मात्र, ही जलसेवा सुरू झाल्यावर हे अंतर केवळ १५ मिनिटांत कापले जाईल, ज्यामुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ वाचणार असून किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेला नवी भरारी मिळेल.

​या नव्या फेरीबोटींची निर्मिती, संचालन आणि देखभाल करण्यासाठी ‘बांधा आणि चालवा’ (BOO), ‘बांधा-चालवा-हस्तांतरित करा’ (BOT) किंवा ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (PPP) यांपैकी योग्य प्रारूपाचा (मॉडेल) वापर केला जाणार आहे. बैठकीदरम्यान प्राका इंजिनिअरिंग शिपयार्डसह अन्य कंपन्यांनी या संदर्भात आपली सादरीकरणे केली. एका फेरीबोटीच्या बांधणीसाठी अंदाजे ४ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. बोटीचे दैनंदिन व्यवस्थापन, कर्मचारी वर्ग, देखभाल आणि विमा ही सर्व जबाबदारी संबंधित ऑपरेटरची असेल; तर मार्गांचे नियमन, तिकिटांचे दर आणि वेळापत्रकावर शासनाचे पूर्ण नियंत्रण राहील, असे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

​जलवाहतुकीचे अंतिम नियोजन करण्यापूर्वी सर्व तांत्रिक व भौगोलिक बाबींची अचूक पडताळणी केली जाणार आहे. यासाठी विविध ठिकाणच्या जेट्टींची उपलब्धता, समुद्रातील भरती-ओहोटीची स्थिती, पाण्याची खोली आणि प्रवासी व वाहनांच्या संभाव्य मागणीचा सविस्तर सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच फेरीसेवेच्या अंतिम मार्गांची निश्चिती केली जाईल. यामुळे ही वाहतूक सेवा अत्यंत सुरळीत आणि विनाअडथळा चालण्यास मदत होणार आहे.

​प्रस्तावित अत्याधुनिक फेरीबोट सुमारे २० मीटर लांब आणि ७.५ मीटर रुंद अशा एकेरी देख (Single Deck) स्वरूपाची असेल. या बोटीची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, त्यातून प्रवाशांसोबतच चारचाकी आणि दुचाकी वाहने सहज वाहून नेणे शक्य होईल. खासगी क्षेत्राच्या सहकार्यातून सुरू होणारा हा प्रकल्प जिल्ह्यातील जलवाहतुकीचे चित्र बदलून टाकणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: मुंबई-सावंतवाडी नवीन दैनंदिन एक्सप्रेसच्या तिकीट आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी

   Follow us on        

मुंबई:

कोकणवासीयांसाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित दैनंदिन गाडी (गाडी क्र. १५०८७ / १५०८८) सुरू करण्याचा निर्णय मध्य व कोकण रेल्वेने घेतला आहे. या प्रवासासाठी आरक्षणाची (Reservation) तारीख व वेळ घोषित करण्यात आली आहे.

आरक्षण कधीपासून सुरू होणार? (Booking Details)

गाडी क्र. १५०८८ (सावंतवाडी रोड ते मुंबई CSMT): ९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या प्रवासासाठीचे तिकीट आरक्षण ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजल्यापासून सुरू होईल.

नियमित व पुढील सर्व फेऱ्यांसाठी म्हणजे १० सप्टेंबर २०२६ व त्यानंतरच्या सर्व प्रवासांसाठीचे बुकिंग ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजल्यापासून उघडेल.

हे आरक्षण सर्व PRS काउंटर, IRCTC वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध असेल.

गाडीची वेळ व वेळापत्रक:

गाडी क्र. १५०८७ (मुंबई CSMT ते सावंतवाडी रोड): ८ सप्टेंबर २०२६ पासून दररोज रात्री ११:५५ (२३:५५) वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १:५० (१३:५०) वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

गाडी क्र. १५०८८ (सावंतवाडी रोड ते मुंबई CSMT): ९ सप्टेंबर २०२६ पासून दररोज संध्याकाळी ५:०० (१७:००) वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:४० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.

(टीप: २१ ऑक्टोबर २०२६ पासून बिगर-पावसाळी (Non-Monsoon) वेळापत्रकानुसार ही गाडी सावंतवाडी येथे दुपारी २:१५ वाजता पोहोचेल आणि परतीची गाडी सायंकाळी ५:२० वाजता सुटेल.)

गाडीची रचना आणि थांबे:

या २३ डब्यांच्या एलएचबी (LHB) गाडीमध्ये फर्स्ट एसी (०१), टू-टायर एसी (०२), थ्री-टायर एसी (०३), ३ एसी इकॉनॉमी (०५), स्लीपर क्लास (०४) आणि जनरल अनरिझर्व्हड डबे (०४) असणार आहेत.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या  स्थानकांवर थांबेल.

गणेशोत्सव आणि ऐन सणासुदीच्या काळात या नियमित गाडीमुळे कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणे सुलभ होणार आहे.

 

Facebook Comments Box

ग्रामीण भागातील एलपीजी रिफिल बुकिंगचा कालावधी कमी होणार

 

ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी रिफिल बुकिंगचा कालावधी ४५ दिवसांवरून कमी करून शहरांप्रमाणेच २५ दिवस करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

   Follow us on        

गणेशोत्सवाच्या सण-उत्सवाच्या काळात ग्रामीण भागातील घरगुती गॅस ग्राहकांना भेडसावणारी अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांसाठी दोन रिफिल बुकिंगमधील ४५ दिवसांच्या बंधनकारक कालावधीची अट हटवण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही क्षेत्रांतील ग्राहकांसाठी रिफिल बुकिंगचा कालावधी समान म्हणजे २५ दिवस करण्यात आला आहे.

​केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ७ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे. यापूर्वीच्या नियमांनुसार शहरी भागातील ग्राहकांना २५ दिवसांत गॅस पुनर्भरण (रिफिल) करण्याची सुविधा होती, तर ग्रामीण भागातील ग्राहकांना पुढचे बुकिंग करण्यासाठी ४५ दिवस वाट पाहावी लागत होती. एलपीजीच्या पुरवठ्याची सध्याची स्थिती सुधारली असून तुटवडा आणि प्रलंबित मागण्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा सकारात्मक बदल करण्यात आला आहे

भाजप कार्यकर्ते आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश. 

गणेशोत्सवात पाहुण्यांची ये-जा, वाढता स्वयंपाक आणि घरगुती वापरामुळे ग्रामीण भागात गॅसची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. अशा वेळी ४५ दिवसांची मर्यादा अडथळा ठरत असल्याने दोडामार्ग भाजपचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, आनंद तळवणकर, देवा शेटकर, पराशर सावंत, अंकुश उर्फ भैया नाईक, सिद्धेश सांगम यांसह शिष्टमंडळाने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे हा विषय मांडला होता.

​पालकमंत्री नितेश राणे यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकार आणि संबंधित मंत्रालयाकडे या विषयाचा तातडीने व प्रभावी पाठपुरावा केला. त्यांच्या या निवेदनाची आणि पाठपुराव्याची दखल घेत केंद्र सरकारने ग्रामीण भागातील ग्राहकांची अडचण दूर करत २५ दिवसांची नवीन मर्यादा लागू केली. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही प्रमुख तेल विपणन कंपन्यांना या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

​या नव्या नियमामुळे दोडामार्ग तालुका तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण एलपीजी ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या दिवसांत गॅस संपल्यास ४५ दिवस वाट पाहण्याचा मनस्ताप आता टळणार असून सर्वत्र या निर्णयाचे आणि या संदर्भात केलेल्या यशस्वी पाठपुराव्याचे मनापासून स्वागत केले जात आहे..

Facebook Comments Box

मुंबई-सावंतवाडी दरम्यान नवीन एक्स्प्रेस; सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांची यादी जाहीर

   Follow us on        

मुंबई:

गणेशोत्सवाच्या तोंडावर मध्य रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान दररोज धावणारी गाडी क्रमांक १५०८७ / १५०८८ ‘सीएसएमटी – सावंतवाडी रोड – सीएसएमटी एक्स्प्रेस’ ही नवीन गाडी सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने या नव्या रेल्वे सेवेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे.

​मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी मुंबई आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना थेट जोडणार असून यामुळे तब्बल ५०९ किलोमीटरचा प्रवास सुलभ होणार आहे.

 

​वेळापत्रक आणि प्रवास वेळ

​गाडी क्र. १५०८७ (CSMT ते सावंतवाडी रोड): ही गाडी मुंबई सीएसएमटीवरून दररोज रात्री २३:५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १४:१५ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

​गाडी क्र. १५०८८ (सावंतवाडी रोड ते CSMT): परतीच्या प्रवासात ही गाडी सावंतवाडी रोडवरून दररोज सायंकाळी १७:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:४० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.

​महत्त्वाचे थांबे

या गाडीला दोन्ही मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत:

दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

Long Press to View This Image

​कोकणच्या विकासाला गती

या नियमित एक्स्प्रेसमुळे केवळ चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार नसून कोकणातील पर्यटन, स्थानिक उद्योग आणि व्यापारी वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. नियमित गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होण्यास या गाडीमुळे मदत होईल.

Facebook Comments Box

गणेशचतुर्थीसाठी आरक्षित तिकीट मिळवण्याची अजून एक संधी; विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर

   Follow us on        

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून, या गाड्यांचे बुकिंग (आरक्षण) ०८ सप्टेंबर २०२६ पासून अधिकृतपणे सुरु होत आहे.

​आरक्षणाची तारीख जवळ आल्याने कोकणात जाणाऱ्या भक्तांनी तिकिट बुकिंगसाठी पूर्वतयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​आरक्षण आणि तिकीट विक्रीची सविस्तर माहिती

​आरक्षणाची सुरुवात: ०८ सप्टेंबर २०२६

​कसे कराल आरक्षण?

​ऑनलाइन बुकिंग: IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.irctc.co.in) व मोबाईल ॲपवर.

​ऑफलाइन बुकिंग: सर्व संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्रांवर (PRS Counter).

​अनारक्षित (General) गाड्यांचे तिकीट: पनवेल-चिपळूण मेमू सेवांसाठी UTS प्रणालीद्वारे किंवा ‘रेलवन’ (RailOne) ॲपद्वारे सामान्य शुल्कात तिकीट काढता येईल.

​गाड्यांचे वेळापत्रक व मार्ग

​१. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – मडगाव विशेष (४ आरक्षित सेवा)

​गाडी क्र. ०१००३ (LTT ते मडगाव): LTT वरून सकाळी ०७:५० वा. सुटेल व त्याच दिवशी रात्री ११:४५ वा. मडगावला पोहोचेल (फेऱ्या: १६.०९.२०२६ व १९.०९.२०२६).

​गाडी क्र. ०१००४ (मडगाव ते LTT): मडगाववरून सायंकाळी ०४:०० वा. सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:०५ वा. LTT येथे पोहोचेल (फेऱ्या: १५.०९.२०२६ व १८.०९.२०२६).

​डब्यांची रचना: ३ एसी तृतीय श्रेणी (3AC), ८ स्लीपर (Sleeper) आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

​मुख्य थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.

​२. पनवेल – चिपळूण – पनवेल (३० अनारक्षित मेमू सेवा)

​पनवेल आणि चिपळूण दरम्यान ३० फेऱ्या चालवल्या जातील (१५.०९.२०२६ ते १७.०९.२०२६ दरम्यान या सेवा बंद राहतील).

​अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी.

Facebook Comments Box

गणेशोत्सवाच्या सुरवातीलाच राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

​बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पिकांसाठी वरदान ठरेल.

   Follow us on        

​राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. श्रावण महिना संपत आला तरीही म्हणावा तसा पाऊस न बरसल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची भीती पसरली होती. अनेक भागांत पावसाची तूट राहिल्यामुळे येत्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका आहे, तसेच शेतीसाठी पुरेशा पावसाअभावी बळीराजा कमालीचा चिंतेत सापडला होता.

​अशा गंभीर परिस्थितीत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक दिलासादायक आणि नवीन आशा देणारा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच राज्यात जोरदार पावसाचे आगमन होणार आहे. त्यामुळे श्रींच्या आगमनासोबतच राज्यातील पावसाची प्रतीक्षा अखेर संपणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.

​पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात धुवांधार पावसाची शक्यता आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील ज्या कोरड्या भागात पाऊस झाला नव्हता, तिथे आणि धाराशिव, लातूर, सोलापूर यांसारख्या पर्जन्यछायेच्या जिल्ह्यांमध्ये जिथे अपेक्षित पाऊस झाला नव्हता, तिथे आता चांगला पाऊस हजेरी लावेल.

​याशिवाय, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ६ आणि ७ सप्टेंबर दरम्यान पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हा पाऊस कोमेजणाऱ्या पिकांना नवसंजीवनी देणारा ठरेल. त्यामुळे विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांतील शेतकरी आणि नागरिकांसाठी ही अत्यंत आनंदाची व दिलासा देणारी बातमी आहे, असे पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे.

​एकंदरीत, दीर्घ प्रतीक्षेनंतर पडणारा हा पाऊस केवळ शेती पिकांना जीवनदान देणार नाही, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर होणाऱ्या या वृष्टीमुळे राज्यातील शेतकरी व सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे.

Facebook Comments Box

मराठी शाळा वाचवण्यासाठी जांभवडे ग्रामपंचायतीचे कौतुकास्पद निर्णय

जांभवडे ग्रामपंचायतीने मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

​विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसोबतच संबंधित कुटुंबांची घरपट्टी माफ करणे आणि दरवर्षी मोफत शेती उपयोगी साहित्य पुरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

   Follow us on        

​ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची रोखलेली संख्या वाढवून बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना पुनरुज्जीवित करण्यासाठी जांभवडे ग्रामपंचायतीने एक कौतुकास्पद आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे आणि पालक व विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

​या निर्णयाची अधिकृत घोषणा सरपंच अमित मडव आणि ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांनी मिळून केली आहे. या योजनेनुसार मराठी शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रामपंचायतीतर्फे ५,००० रुपयांची रोख आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय, शासकीय नियमांनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी मिळणारे ६,००० रुपयांचे अनुदानही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

​ग्रामपंचायतीने केवळ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन न थांबता त्यांच्या कुटुंबांनाही मोठा दिलासा दिला आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची ग्रामपंचायतीकडून आकारली जाणारी घरपट्टी पूर्णपणे माफ केली जाणार आहे. तसेच, शेतीवर अवलंबून असलेल्या या कुटुंबांना शेतीसाठी लागणारे आवश्यक साहित्य दरवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत पुरवले जाईल.

​जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी जांभवडे येथे विशेष ‘शैक्षणिक ग्रामसभा’ आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेला सरपंच अमित मडव, ग्रामपंचायत सदस्य उदय मडव, शाळू कदम, बाबा परेरा, उपसरपंच श्री. पावसकर, सौ. पिंटो यांच्यासह गावातील विविध शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला बळ देण्यासाठी जांभवडे ग्रामपंचायतीने घेतलेल्या या क्रांतिकारक निर्णयाचे सर्व स्तरांतून, विशेषतः पालक आणि ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत केले जात आहे.

Facebook Comments Box

नवी मुंबई – सिंधुदुर्ग विमान प्रवासाचे भाडे निश्चित

   Follow us on        

​कोकण किनारपट्टीला राज्याची आर्थिक राजधानी मुंबईशी थेट जोडण्यासाठी आणि स्थानिक पर्यटनाला गती देण्यासाठी राज्य सरकारने हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्याने उभारल्या जात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळासाठी थेट विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्र सरकारच्या ‘उडान’ (UDAN) योजनेअंतर्गत हा हवाई मार्ग विकसित केला जात असून, यामुळे तासनतासांचा रस्ते व रेल्वेचा प्रवास आता काही मिनिटांवर येणार आहे. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यात यश आले आहे.

​या विमानसेवेअंतर्गत नवी मुंबई ते सिंधुदुर्ग असा एकेरी प्रवास ३,५८० रुपयांत तर सिंधुदुर्ग ते नवी मुंबई असा परतीचा प्रवास ३,७३५ रुपयांत करता येणार आहे. प्रवाशांना खिशाला परवडणारे तिकीट दर मिळावेत आणि त्याच वेळी विमान कंपन्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी राज्य सरकार १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी (VGF) पुरवणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (MADC) या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी नामांकित विमान कंपन्यांकडून ई-निविदा आणि व्यावसायिक प्रस्ताव मागवले आहेत.

​विमानसेवा सुरळीत आणि विनाअडथळा सुरू राहावी यासाठी प्रशासनाने विमान कंपन्यांवर काही कडक अटी लादल्या आहेत. सेवा देणाऱ्या कंपनीला सलग दोन महिने किमान ७५ टक्के प्रवासी उपस्थिती राखणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, कोणत्याही तांत्रिक कारणाशिवाय किंवा विनाकारण विमान जमिनीवर थांबवून ठेवल्यास संबंधित कंपनीला प्रतिदिन १ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल.

​चिपी विमानतळावर मोठ्या विमानांच्या (एरबस A321) लँडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक सोयी-सुविधा आधीपासूनच सज्ज करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही विमानसेवा सुरू होताच अवघ्या तासाभरात मुंबईकर थेट सिंधुदुर्गात दाखल होऊ शकतील. या जलद प्रवासामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.

​या नवीन हवाई सेवेमुळे मुंबईतील चाकरमानी, पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. कोकणातील निसर्गरम्य पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना मिळण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही यामुळे मोठा दिलासा आणि गती मिळणार आहे.

Facebook Comments Box

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर अनारक्षित मेमूसह विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

नवी मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात कोकण मार्गावर होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) मध्य रेल्वेच्या सहकार्याने अतिरिक्त ‘ऑन डिमांड’ (TOD) विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोकण रेल्वेने जारी केलेल्या सूचनेनुसार (Notification No. 121 / 2026-27), खालीलप्रमाणे विशेष गाड्या चालवल्या जातील:

 

१. मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – मडगाव विशेष गाडी (ट्रेन क्र. ०१००४ / ०१००३)

 

ट्रेन क्र. ०१००४ (मडगाव ते एलटीटी)

फेऱ्यांच्या तारखा:मंगळवार, १५ सप्टेंबर २०२६ आणि शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६ (एकूण २ फेऱ्या).

वेळ: मडगाव येथून दुपारी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे पोहोचेल.

 

ट्रेन क्र. ०१००३ (एलटीटी ते मडगाव):

फेऱ्यांच्या तारखा: बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ आणि शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ (एकूण २ फेऱ्या).

वेळ:एलटीटी येथून सकाळी ०७:५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २३:४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.

प्रमुख थांबे: करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावरडा, चिपळूण, खेड, वीर, मानगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे.

डब्यांची रचना: एकूण १९ डबे (८ स्लीपर, ६ सामान्य/अनारक्षित, ३ एसी ३-टायर आणि २ एसएलआर).

 

२. चिपळूण – पनवेल – चिपळूण अनारक्षित मेमू (MEMU) विशेष गाडी (ट्रेन क्र. ०११६० / ०११५९)

कालावधी:१० सप्टेंबर २०२६ ते १४ सप्टेंबर २०२६ आणि १८ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ (दररोज, एकूण १५ फेऱ्या).

(टीप: १५, १६ आणि १७ सप्टेंबर रोजी ही गाडी धावणार नाही)

ट्रेन क्र. ०११६० (चिपळूण ते पनवेल)

वेळ:चिपळूण येथून सकाळी ०९:०० वाजता सुटेल आणि दुपारी १४:३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.

ट्रेन क्र. ०११५९ (पनवेल ते चिपळूण):

वेळ: पनवेल येथून दुपारी १५:२० वाजता सुटेल आणि रात्री २२:२० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.

प्रमुख थांबे: अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, मानगाव, इंदापूर, कोलाड, रोहा आणि पेन.

डब्यांची रचना: ८ डब्यांची मेमू (MEMU) ट्रेन.

प्रवाशांनी या विशेष गाड्यांच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search