Railway Updates: अजून दोन महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर कवच प्रणाली कार्यान्वित

   Follow us on        

Railway Updates: भारतीय रेल्वेने आपल्या स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली ‘कवच ४.०’ च्या अंमलबजावणीमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा या उच्च घनतेच्या मार्गांवर २,४९० रूट किलोमीटर अंतरावर हे तंत्रज्ञान यशस्वीरित्या सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत ११,२५३ किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबल, १,६६८ टेलिकॉम टॉवर्स आणि ९५८ स्टेशन डेटा सेंटर्स उभारण्यात आले असून, ७,७२१ रूट किलोमीटरवर ट्रॅकसाइड उपकरणे बसवण्यात आली आहेत. याशिवाय गोल्डन क्वाड्रिलॅटरल, गोल्डन डायगोनल आणि उच्च घनता नेटवर्कवरील २४,४२७ रूट किलोमीटरवर काम वेगाने सुरू असून, रेल्वे आपल्या ७,४३५ लोकोमोटिव्ह्स आणि १,२०० ईएमयू/मेमू ट्रेनसेट्स या प्रणालीने सुसज्ज करत आहे. जून २०२६ पर्यंत या प्रकल्पावर ३,८७४.९ कोटी रुपयांचा खर्च झाला असून, ९४,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

​कवच ४.० तंत्रज्ञान आणि कार्यप्रणाली

​कवच ४.० ही भारतीय रेल्वेची अत्यंत प्रगत अशी स्वदेशी ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे. ही प्रणाली ट्रेनची गती, सिग्नल आणि इतर ट्रेनची स्थिती सतत मॉनिटर करते. ट्रॅकवर दर एक किलोमीटर अंतरावर RFID टॅग्स बसवलेले असतात, ज्यावरून ट्रेनचे नेमके स्थान ओळखले जाते. स्टेशन आणि ट्रॅकसाइड युनिट्स सिग्नल आणि ट्रॅकच्या उपलब्धतेची माहिती गोळा करतात, तर लोकोमोटिव्हमधील कवच युनिट (Loco Kavach) आणि ड्रायव्हर मशीन इंटरफेस (DMI) स्क्रीनद्वारे लोको पायलटला पुढील सिग्नल, अनुमत गती आणि लक्ष्याबद्दलची रिअल-टाइम माहिती मिळते.

​स्वयंचलित सुरक्षा आणि प्रमुख सुधारणा

​ही प्रणाली मानवी चुका टाळून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिशय प्रभावी ठरते. लोको पायलटने लाल सिग्नल ओलांडल्यास (SPAD) किंवा ट्रेन निर्धारित गतीपेक्षा जास्त वेगाने गेल्यास कवच स्वयंचलितपणे ब्रेक लावून ट्रेन नियंत्रित करते. तसेच, दोन कवच-युक्त ट्रेन्स समोरासमोर आल्यास त्या आपोआप थांबवल्या जातात. धुक्यात, पावसात किंवा कमी दृश्यता असतानाही केबिनमध्ये सिग्नलची अचूक माहिती उपलब्ध राहते. LTE-R आधारित संवाद, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगशी उत्तम एकत्रीकरण आणि सुरक्षेचा सर्वोच्च SIL-4 स्तर यामुळे ही आवृत्ती अत्यंत विश्वासार्ह बनली असून, भारतीय रेल्वेच्या व्यस्त मार्गांवर अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

Facebook Comments Box

रस्ता खचल्याने माळशेज घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद

   Follow us on        

सातारा: सततच्या मुसळधार पावसामुळे ओतुर पोलीस स्टेशन हद्दीतील कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ हा करंजाळे गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खचला आहे. यामुळे प्रशासनाने तातडीची खबरदारी घेत माळशेज घाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद केली आहे.

​रस्ता खचल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. संबंधित मार्गाची दुरुस्ती पूर्ण होऊन तो सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत हा बंदी आदेश कायम राहणार आहे.

​दरम्यान, अहिल्यानगर व पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले असून, वाहनचालकांसाठी आळेफाटा – नारायणगाव – खेड – चाकण – तळेगाव एमआयडीसी – लोणावळा – खोपोली – मुंबई हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. आवश्यकतानुसार इतर पर्यायी मार्गांचाही वापर करण्याचे सांगण्यात आले आहे.

​माळशेज घाट परिसरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातील परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ओतुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी ही माहिती देत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Facebook Comments Box

कुडाळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! घर सोडलेल्या प्रेमी युगालाचा अवघ्या ४८ तासांत शोध

   Follow us on        

कुडाळ: तालुक्यातील एका १९ वर्षीय तरुणीने घर सोडून थेट पुण्यात आपल्या प्रियकराकडे धाव घेतल्याची घटना समोर आली होती. मुलगी अचानक गायब झाल्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी तत्काळ कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुडाळ पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. सुरुवातीला दोन्ही तरुण-तरुणींचे मोबाईल फोन बंद असल्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते, तसेच पालकांकडेही युवकाबाबत कोणतीच ठोस माहिती नव्हती.

​परंतु, कुडाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत वेगाने पावले उचलत तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतली. या तांत्रिक तपासाच्या आधारे दोघेही पुण्याच्या स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट झाले. कुडाळ पोलिसांनी तत्काळ स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधून सविस्तर माहिती आणि मोबाईल क्रमांक त्यांच्याकडे सुपूर्द केला.

दोन्ही पोलीस दलांमधील उत्कृष्ट समन्वयामुळे अवघ्या ४८ तासांच्या आत या प्रेमीयुगुळाचा शोध घेण्यात यश आले आणि त्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. स्वारगेट पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या पालकांसमोर या तरुण-तरुणींनी आपण स्वेच्छेने आणि परस्पर संमतीने एकत्र येऊन लग्नाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे मुलीचा सुरक्षित शोध लागल्याने पालकांनी कुडाळ पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

Facebook Comments Box

Lanja: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका जखमी

   Follow us on        

लांजा: लांजा शहरातील सार्डळवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

​जखमी बालकेचे नाव स्वभवी समीर तानवडे (वय ४) असून, ती घराच्या अंगणात खेळत असताना आठ ते दहा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर अचानक झडप घातली. कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिका जखमी झाली.

​आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कुत्र्यांना पळवून लावत बालकेची सुटका केली. त्यानंतर तिला प्रथम स्थानिक स्तरावर उपचारासाठी नेण्यात आले आणि पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

​या घटननंतर सार्डळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने त्वरित आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Facebook Comments Box

🌺भावपूर्ण श्रद्धांजली | बारावा दिवस🌺कु. समर्थ सीताराम गावडे

🌺भावपूर्ण श्रद्धांजली | बारावा दिवस🌺

 

कु. समर्थ सीताराम गावडे

– जन्म दिनांक: २३ जानेवारी २०११

– मृत्यू दिनांक: १५ जुलै २०२६

 

“आयुष्याच्या या क्षणभंगुर प्रवासात, तुझी ही आकस्मिक एक्झिट आम्हां सर्वांना सुन्न करून गेली. तुझा हसरा चेहरा आणि आठवणी नेहमीच आमच्या हृदयात राहतील. तुला भावपूर्ण श्रद्धांजली.”😔

 

🙏शोकाकुल परिवार:

 

– बाबा: सीताराम गावडे

– आई: सौ. संयुक्ता गावडे

– भाऊ: साईश गावडे

– काका: रामकृष्ण गावडे, प्रकाश गावडे, संतोष गावडे

– काकी: सौ. रश्मी गावडे, सौ. प्रज्ञा गावडे, सौ. सिध्दी गावडे

– वहिनी: सौ. योगिता गावडे, सौ. पवित्रा गावडे

– भाऊ: श्री. उदय गावडे, श्री. संदिप गावडे, श्री. प्रथमेश गावडे, श्री. सागर गावडे, साहिल गावडे, कु. अंश गावडे

– बहीण: कु. सुचिता गावडे, सौ. समिता सावंत, सौ. सुविधा बिरोडकर

– भाचे: कु. संकेत सावंत, कु. रियांश बिरोडकर

– भाची: कु. परी बिरोडकर, स्वानंदी सावंत

– भावोजी: सुधीर सावंत, प्रशांत बिरोडकर

– आत्या: श्रीमती महानंदा नाईक

 

*🙏समस्त गावडे, सावंत, बिरोडकर परिवार.🙏*

पत्ता: बिरोडकर टेंब, सावंतवाडी

Facebook Comments Box

धक्कादायक! टीसीने विनातिकीट प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून लाथ मारून खाली पाडल्याचा गंभीर आरोप

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानकावर एका तिकिट तपासनिसाने (TTE) विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून लाथ मारून खाली पाडल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. एका तरुण प्रवाशाने केलेल्या या तक्रारीमुळे रेल्वे वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील गंभीर आरोप आणि तक्रारदाराची वेगळी शैली यामुळे हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे.

ही घटना २५ जुलै रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता घडली. तक्रारदार सचिन कुमार मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते स्थानिक ट्रेनमधून उतरत असताना त्यांनी टीटीईला एका प्रवाशाकडे तिकीट मागताना आणि चौकशी करताना पाहिले. त्या प्रवाशाकडे दंडाची रक्कम भरण्यासाठी पुरेशी रक्कम नव्हती.

मौर्य यांच्या दाव्यानुसार, प्रवाशाकडे दंडाचे पैसे नसल्याचे समजताच चिडलेल्या टीटीईने ट्रेन चालू असतानाच त्या प्रवाशाला जोरदार लाथ मारली. यामुळे तो प्रवासी थेट धावत्या ट्रेनमधून खाली रेल्वे रुळांवर जाऊन पडला. या घटनेनंतर मौर्य यांनी २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.२६ वाजता रेल्वे हेल्पलाइन नंबर १५१२ वर कॉल करून या घटनेची तात्काळ तक्रार नोंदवली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या घटनेची शहानिशा केली आणि अधिकृत निवेदन जारी केले. रेल्वेनुसार, संबंधित टीटीईने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. टीटीईला पाहताच त्या विनातिकीट प्रवाशाने घाबरून स्वतःच डब्याच्या दुसऱ्या बाजूने रुळावर उडी मारली आणि त्यानंतर टीटीई त्याच्या मागे ट्रेनमधून खाली उतरला, असा दावा रेल्वेने केला आहे.

भायखळा येथील आरपीएफ (RPF) कक्षातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, टीटीई डब्यात प्रवेश करताना दिसत आहे. मात्र, फुटेजमध्ये कोणतीही मारहाण किंवा बळजबरी केल्याचा प्रकार दिसून येत नाही. टीटीई अवघ्या ४ ते ५ सेकंदांत ट्रेनमधून खाली उतरल्याचे स्पष्ट दिसते. एवढ्या अपुऱ्या वेळेत डब्यात शिरणे, मारहाण करणे किंवा लाथ मारणे शक्य नसल्याचे सांगत रेल्वेने टीटीईवरील आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: मध्य रेल्वेकडून गणपती स्पेशल गाड्यांची यादी जाहीर

   Follow us on        

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांची आणि चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाने संयुक्तपणे ‘ट्रेन ऑन डिमांड’ (TOD) अंतर्गत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबई, ठाणे, पनवेल आणि पुण्याहून सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि मडगावसाठी या विशेष गाड्या धावतील.

या विशेष रेल्वे गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि फेऱ्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी

  • गाडी क्र. ०११०३ / ०११०४ सीएसएमटी- सावंतवाडी – सीएसएमटी दैनिक विशेष (१६ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११०३ (सीएसएमटी ते सावंतवाडी): ११ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान रोज दुपारी १५:३० वाजता सीएसएमटी वरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ०४:०० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११०४ (सावंतवाडी ते सीएसएमटी): १२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान रोज पहाटे ०४:३५ वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १६:४० वाजता सीएसएमटी ला पोहोचेल.
    • डबे: २२ ICF डबे (१२ स्लीपर, ६ सामान्य/अनारक्षित, २ एसी ३-टायर, २ एसएलआरडी).

 

  • गाडी क्र. ०११५१ / ०११५२ सीएसएमटी – सावंतवाडी – सीएसएमटी दैनिक विशेष (१७ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११५१ (सीएसएमटी ते सावंतवाडी): ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान रोज मध्यरात्री ००:२५ वाजता सीएसएमटी वरून सुटेल आणि दुपारी १४:२० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११५२ (सावंतवाडी ते सीएसएमटी): ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान रोज दुपारी १५:३५ वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:३५ वाजता सीएसएमटी ला पोहोचेल.

२. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सावंतवाडी / रत्नागिरी / मडगाव

  • गाडी क्र. ०११७१ / ०११७२ एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी दैनिक विशेष (१७ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११७१: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सकाळी ०८:२० वाजता एलटीटी वरून सुटेल आणि रात्री २१:०० वाजता सावंतवाडी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११७२: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज रात्री २२:३५ वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०११६७ / ०११६८ एलटीटी – रत्नागिरी – एलटीटी (आवड्यातून ५ दिवस) (११ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११६७: ११ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान (मंगल, बुध, गुरु, शनि, रवि) रात्री २१:०० वाजता एलटीटी वरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:०० वाजता रत्नागिरी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११६८: १२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान (बुध, गुरु, शुक्र, रवि, सोम) दुपारी १५:१५ वाजता रत्नागिरीवरून सुटेल आणि मध्यरात्री ००:४० वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०११२९ / ०११३० एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११२९: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी सकाळी ०८:४५ वाजता एलटीटी वरून सुटेल आणि रात्री २२:१० वाजता सावंतवाडी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११३०: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी रात्री २३:२० वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०११३१ / ०११३२ एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी द्वि-साप्ताहिक (४ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११३१: १७, २०, २४ आणि २७ सप्टेंबर २०२६ (गुरुवार आणि रविवार) रोजी सकाळी ०८:४५ वाजता एलटीटी वरून सुटेल आणि रात्री २२:१० वाजता सावंतवाडी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११३२: १७, २०, २४ आणि २७ सप्टेंबर २०२६ (गुरुवार आणि रविवार) रोजी रात्री २३:२० वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०११६५ / ०११६६ एलटीटी – मडगाव – एलटीटी एसी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११६५: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी रात्री ००:४५ वाजता एलटीटी वरून सुटेल आणि दुपारी १४:३० वाजता मडगाव जंक्शन पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११६६: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी दुपारी १६:३० वाजता मडगाववरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:१० वाजता एलटीटी ला पोहोचेल.
    • डबे: २२ LHB ऑल-एसी डबे (१st AC, AC २-टायर, AC ३-टायर).

 

  • गाडी क्र. ०११८५ / ०११८६ एलटीटी – मडगाव – एलटीटी LHB साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११८५: १६ आणि २३ सप्टेंबर २०२६ (बुधवार) रोजी रात्री ००:४५ वाजता एलटीटी वरून सुटेल आणि दुपारी १४:३० वाजता मडगाव पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११८६: १६ आणि २३ सप्टेंबर २०२६ (बुधवार) रोजी दुपारी १६:३० वाजता मडगाववरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:१० वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

३. पुणे ते रत्नागिरी विशेष गाड्या

  • गाडी क्र. ०१४४५ / ०१४४६ पुणे –  रत्नागिरी – पुणे साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०१४४५: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी रात्री ००:२५ वाजता पुण्यावरून सुटेल (कल्याण, पनवेल मार्गे) आणि दुपारी ११:५० वाजता रत्नागिरी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०१४४६: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी सायंकाळी १७:५० वाजता रत्नागिरीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:२० वाजता पुणे जंक्शन पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०१४४७ / ०१४४८ पुणे – रत्नागिरी – पुणे साप्ताहिक विशेष (३ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०१४४७: १२, १९ आणि २६ सप्टेंबर २०२६ (शनिवार) रोजी रात्री ००:२५ वाजता पुण्यावरून सुटेल आणि दुपारी ११:५० वाजता रत्नागिरी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०१४४८: १२, १९ आणि २६ सप्टेंबर २०२६ (शनिवार) रोजी सायंकाळी १७:५० वाजता रत्नागिरीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:२० वाजता पुणे जंक्शन पोहोचेल.

 

४. दिवा येथून सुटणाऱ्या मेमू (MEMU) विशेष गाड्या

  • गाडी क्र. ०११५५ / ०११५६ दिवा – खेड – दिवा मेमू दैनिक विशेष (१६ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११५५: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सकाळी ०७:१५ वाजता दिव्यावरून सुटेल आणि दुपारी १४:३५ वाजता खेड पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११५६: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज दुपारी १६:०० वाजता खेडवरून सुटेल आणि रात्री २२:५० वाजता दिवा जंक्शन पोहोचेल.
    • (टीप: २२ सप्टेंबर २०२६ रोजी मेन्टेनन्समुळे ही सेवा उपलब्ध नसेल).

 

  • गाडी क्र. ०११३३ / ०११३४ दिवा – चिपळूण – दिवा मेमू दैनिक विशेष (१५ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११३३: ११ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज दुपारी १३:४० वाजता दिव्यावरून सुटेल आणि रात्री २१:३० वाजता चिपळूण पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११३४: १२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सकाळी ०७:३० वाजता चिपळूणवरून सुटेल आणि दुपारी १३:०० वाजता दिवा जंक्शन पोहोचेल.
    • (टीप: २३ सप्टेंबर रोजी दिव्यावरून आणि २४ सप्टेंबर रोजी चिपळूणवरून मेन्टेनन्समुळे सेवा बंद राहील).

 

या सर्व गाड्या दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, साखळी/आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर थांबतील.

सर्व गाड्या विद्युत इंजिनावर (Electric Locomotives) चालवल्या जाणार असून, प्रवाशांनी आरक्षण आणि तिकिटांसंबंधी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा आयआरसीटीसी (IRCTC) ॲपला भेट द्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे व मध्य रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Facebook Comments Box

Breaking News: NEET-UG गैरव्यवहार प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

   Follow us on        

​नवी दिल्ली:

​केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा सोपवला आहे. ३ मे २०२६ रोजी पार पडलेल्या NEET-UG परीक्षेमध्ये झालेल्या अनियमितता आणि गैरव्यवहाराची संपूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची दखल घेत केंद्र सरकारने तपास त्वरित सीबीआयकडे (CBI) सोपवला होता आणि परीक्षा रद्द करून २१ जून २०२६ रोजी ती पुन्हा सुरळीत पार पाडली होती. तसेच पुढील वर्षापासून ही परीक्षा ‘CBT’ (Computer-based-test) मोडमध्ये घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. १६ जुलै रोजी घोषित झालेल्या पुनर्रचित निकालांमध्ये अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना यश मिळाले असले, तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे मन अत्यंत व्यथित झाल्याचे प्रधान यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

​गेल्या दहा दिवसांतील घडामोडी, जंतर-मंतर येथील आंदोलने आणि देशभरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता, राष्ट्रविरोधी शक्तींनी याचा गैरफायदा घेऊ नये आणि विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर अडचणींत अडकू नये, यासाठी पद सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “परीक्षेतील गैरव्यवहाराची जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून स्वीकारली असून कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे नुकसान होऊ दिले जाणार नाही,” असा पुनरुच्चार त्यांनी केला. पंतप्रधानांचे मार्गदर्शन व सहकाऱ्यांचे आभार मानत, भविष्यातही जगन्नाथ स्वामींच्या आशीर्वादाने देश, ओडिशाची जनता आणि युवा पिढीच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडी-कुडाळ रस्त्यावर भीषण अपघात: दुचाकीवरील तरुण-तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

सामंतवाडी:

सावंतवाडी-कुडाळ रस्त्यावरील कोलगाव मियासाब दर्ग्या जवळ (समाधीजवळ) दुचाकी आणि स्विफ्ट कार यांच्यात भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण आणि तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयुषी देसाई असे तरुणीचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झाला, तर कार्तिक परब या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

​मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळच्या दिशेने जाणारी दुचाकी (क्रमांक GA 03 AB 7501) आणि सावंतवाडीच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार (क्रमांक MH 07 AG 7801) यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघेही उडून रस्त्यावर फेकल गेले. अपघाताच्या तीव्रतेमुळे स्विफ्ट कार रस्त्याशेजारील गटारात जाऊन कोसळली आणि कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

​घटनेनंतर स्थानिक नागरिक महेश बांदेकर, कृष्णा धुळपनावर आणि लाडू रायका यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारास सुरुवात केली, मात्र उपचारादरम्यान कार्तिक परब यांची प्राणज्योत मालवली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर स्विफ्ट कारच्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार राऊत, पोलीस हवालदार सुरेश पाटील, पोलीस हवालदार धोत्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन परब करत आहेत.

Facebook Comments Box

सुवर्णसंधी! सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याची संधी; अर्ज कसा कराल?

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ३६५ ग्रामपंचायत क्षेत्रे आणि ३ नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (ASSK) आयडी प्रदान करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली सहजरीत्या उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. या संदर्भातील अधिकृत जाहिरात २३ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

​या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना २९ जुलै २०२६ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेतच हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची माहिती २० ऑगस्ट २०२६ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १ सप्टेंबर २०२६ रोजी प्राप्त हरकती आणि अपात्र अर्जांची छाननी केली जाईल. एखाद्या ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास उमेदवारांच्या मुलाखतीची तारीख स्वतंत्रपणे घोषित केली जाऊन अंतिम निवड यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.

​जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की अर्जाचा नमुना, आवश्यक अटी व शर्ती आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (sindhudurg.nic.in) उपलब्ध आहे. तसेच, निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही उमेदवाराशी फोन अथवा ई-मेलद्वारे वैयक्तिक संपर्क साधला जाणार नसल्यामुळे सर्व अपडेट्ससाठी उमेदवारांनी संकेतस्थळावरच लक्ष ठेवावे. स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search