मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने वर्ष २००५ मध्ये मध्य रेल्वेला पाठवलेल्या एका महत्त्वाच्या पत्रात ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गिकेवरील स्थानकांची नावे गंभीरपणे चुकीची लिहिण्यात आली आहेत. ५ फेब्रुवारी २००५ रोजीच्या या पत्रात (क्रमांक No. RLY 1002/1766/CR-253/TRA-5) ठाणे-तुर्भे नवीन रेल्वे मार्गावरील स्थानकांची मंजूर नावे देताना ‘ऐरोली’ ऐवजी ‘ऐरावली’ (AIRAVALI), ‘रबाळे’ ऐवजी ‘राबाडा’ (RABADA) आणि ‘कोपरखैरणे’ ऐवजी ‘कोपर खैर्ना’ (KOPAR KHAIRNA) अशी अशुद्ध नावे अधिकृत रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली आहेत.
या चुका स्थानिक नागरिकांच्या भौगोलिक ओळखीला धक्का पोहोचवणाऱ्या आहेत आणि रेल्वे प्रवाशांना दररोज गोंधळात टाकत आहेत.सुभाष जगताप यांनी सोशल मीडियावर या पत्राची प्रत शेअर करत या चुकीकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृह विभागाला टॅग करून तातडीने या नावांमध्ये सुधारणा करण्याची नम्र विनंती केली आहे. ट्रान्स हार्बर लाइन ही मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारी महत्त्वाची रेल्वे प्रकल्प आहे. या मार्गावरून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. अशा स्थितीत चुकीची नावे अधिकृत दस्तऐवजात राहिल्याने प्रवाशांना तिकिट बुकिंग, प्लॅटफॉर्म ओळख आणि स्थानिक सल्ला यामध्ये अडचणी येत आहेत.या पत्रात इंग्रजी, हिंदी आणि मराठी (देवनागरी) अशा तीनही भाषांमध्ये चुकीची नावे दिली गेली आहेत.
२१ वर्षे उलटूनही या अशुद्धींमध्ये सुधारणा न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली असून, अधिकृत सुधारणेसाठी लवकरच पावले उचलली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












