Mumbai Water Metro: मुंबईत धावणार ‘जल मेट्रो’! मंत्री नितेश राणेंचा मास्टर प्लॅन तयार; आठ मार्ग प्रस्तावित

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील रस्ते आणि लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने आता जलवाहतुकीवर लक्ष केंद्रित केले असून, ‘मुंबई जल मेट्रो’ (Mumbai Water Metro) हा प्रकल्प मुंबईकरांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा मांडला असून, कोची जल मेट्रोच्या धर्तीवर मुंबईतही ही सेवा सुरू केली जाणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत प्रत्यक्षात सुरू करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. सुमारे १,२०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई हा प्रवास अत्यंत सुलभ आणि वेगवान होणार आहे.

​या प्रकल्पांतर्गत एकूण ८ महत्त्वाचे जलमार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात नरिमन पॉइंट, वरळी, वांद्रे, जुहू आणि वर्सोवा यांसारख्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाच्या भागांना जल मेट्रोने जोडले जाईल. विशेष म्हणजे, गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रवास या मेट्रोमुळे अवघ्या ४० मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. यामुळे विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीतून मोठी सुटका मिळेल. याशिवाय, भविष्यात बोरिवली, वसई, मीरा-भाईंदर, कल्याण आणि ऐरोली या भागांनाही या जाळ्यात समाविष्ट केले जाणार आहे.

​पर्यावरणाचा विचार करून ही जल मेट्रो पूर्णपणे बॅटरीवर चालणारी आणि प्रदूषणमुक्त असेल. एका वेळी ५० ते १०० प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या या वातानुकूलित बोटी असतील. २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सादर केला जाणार असून, आगामी राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी मोठ्या निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता, जलवाहतुकीचा हा पर्याय मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि इंधन बचतीसाठी एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

Facebook Comments Box

Ro Ro Service: मुंबई – विजयदुर्ग रो-रो सेवेचा मुहूर्त ठरला; असे असतील तिकीटदर

   Follow us on        

मुंबई: मुंबईकरांसाठी आणि कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर आता केवळ ५ तासांत पार करणे शक्य होणार आहे. रस्ते मार्गे या प्रवासासाठी साधारण १० ते १२ तास लागतात, मात्र एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या ‘रो-रो फेरी’ (Ro-Ro Ferry) सेवेमुळे प्रवाशांचा वेळ निम्म्याने वाचणार आहे. ही सेवा थेट मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान चालवली जाणार असून, यामुळे कोकणच्या किनारपट्टीवरील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

​या रो-रो सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना त्यांच्या स्वतःच्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांसह प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवाशांना कोकणात पोहोचल्यावर स्वतःच्या गाडीने फिरणे सोपे जाईल. या जहाजांमध्ये प्रवाशांच्या आरामासाठी वातानुकूलित व्यवस्था, कॅफेटेरिया आणि विस्तीर्ण डेकची सुविधा असणार आहे, ज्यामुळे प्रवासाचा आनंद द्विगुणित होईल.

​तिकीट दरांबाबत बोलायचे झाले तर, अद्याप अधिकृत दरपत्रक जाहीर झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार, एका प्रवाशासाठी साधारण ८०० ते १,२०० रुपयांपर्यंत तिकीट असू शकते. वाहनांसाठीचे शुल्क त्यांच्या आकारानुसार वेगळे आकारले जाईल; ज्यामध्ये दुचाकीसाठी ५०० ते ८०० रुपये आणि चारचाकी गाड्यांसाठी २,५०० ते ४,००० रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. लांबचा प्रवास आणि इंधनाचा खर्च विचारात घेता, ही सेवा सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरेल असा अंदाज आहे.

Facebook Comments Box

कोकण रेल्वेच्या विलंबाचा प्रवाशांना फटका; माजी खासदारांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

   Follow us on        

मुंबई:गेल्या पाच महिन्यांपासून ‘मत्स्यगंधा एक्सप्रेस’ आणि ‘मुंबई-मंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेस’ या गाड्यांच्या सातत्यपूर्ण विलंबामुळे लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि मीरा-भाईंदरचे भाजप नेते सच्चिदानंद शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रवाशांच्या समस्यां तातडीने सोडवण्याची मागणी केली.

​प्रवाशांच्या समस्या आणि मागण्या:

​मुंबई आणि किनारपट्टी कर्नाटकला जोडणाऱ्या या गाड्या प्रवाशांसाठी जीवनवाहिनी आहेत. मात्र, रेल्वेच्या अनियमित वेळामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिष्टमंडळाने कोकण रेल्वेचे संचालक (वाणिज्य आणि परिचालन) सुनील गुप्ता यांची भेट घेतली.

​रेल्वे प्रशासनाचे आश्वासन:

​बैठकीत सुनील गुप्ता यांनी स्पष्ट केले की, रत्नागिरी आणि मडगाव विभागात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, शिष्टमंडळाच्या विनंतीची दखल घेत त्यांनी पुढील एका आठवड्यात मत्स्यगंधा एक्सप्रेसची वेळ नियमित करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि इतर गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.

​सुरक्षेचा मुद्दा आणि चोरीच्या घटना:

​गाड्यांमधील वाढत्या चोऱ्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर विषयही यावेळी मांडण्यात आला. यावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले.

​इतर महत्त्वाचे विषय:

​वांद्रे-वसई-मंगळुरू रेल्वे सेवा: बंद असलेली ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. कोकण रेल्वेने यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले असून, पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या संदर्भात पाठपुरावा करण्याची सूचना शिष्टमंडळाला दिली.

​शिष्टमंडळातील उपस्थित मान्यवर:

​या शिष्टमंडळात रेल्वे यात्री संघाचे (बोरीवली) अध्यक्ष वीरार शंकर शेट्टी, टीम युवा ब्रिगेडचे अध्यक्ष अरुण शेट्टी पणियूर, वाशी येथील उद्योजक संजीव शेट्टी अश्विथ, भास्कर शेट्टी ताळीपाडीगुत्तू, कांदेश भास्कर शेट्टी, प्रेमनाथ कोट्यान, जगदीश शेट्टी नंदीकूर, राजेश शेट्टी पूवणी गुत्तू, रजित सुवर्ण आणि इतर अनेक सामाजिक प्रतिनिधी उपस्थित होते.

​”रेल्वे प्रशासनाने दिलेली आश्वासने लवकरच प्रत्यक्षात येतील आणि प्रवाशांचा प्रवास पुन्हा सुरक्षित आणि वेळेवर होईल, अशी आम्हाला आशा आहे.”

— सच्चिदानंद शेट्टी (टीम युवा ब्रिगेड)

Facebook Comments Box

Konkan Railway: प्रवाशांसाठी खुशखबर! होळीसाठी विशेष गाडीला मुदतवाढ; वेळापत्रकातही बदल

   Follow us on        

Konkan Railway: होळी आणि शिमगोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक ०९०५७ / ०९०५८ सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत द्विसाप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल गाडीच्या फेऱ्या मार्चअखेरपर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी गाडी क्रमांक ०९०५७ / ०९०५८ सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत द्विसाप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल गाडीच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, १ मार्च २०२६ पासून या गाडीच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

​गाडी क्र. ०९०५७ दिनांक २५/०२/२०२६ ते २९/०३/२०२६ पर्यंत आणि  ​गाडी क्र. ०९०५८ दिनांक २६/०२/२०२६ ते ३०/०३/२०२६ पर्यंत या गाडीचा विस्तार करण्यात येणार आहे. विस्तारित कालावधीत दोन्ही दिशांनी मिळून एकूण १८ फेऱ्या (९ येण्याच्या आणि ९ जाण्याच्या) चालवल्या जाणार आहेत.

गाडीची नवीन वेळ (१ मार्च २०२६ पासून प्रभावी)

​ही गाडी दिनांक १ मार्च २०२६ पासून सुधारित वेळापत्रकावर चालविण्यात येणार आहे.

गाडी क्र. ०९०५७ (सुरत – मंगळुरू जंक्शन): ही गाडी सुरत येथून दर बुधवारी आणि रविवारी रात्री १९:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी १९:४५ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.

​गाडी क्र. ०९०५८ (मंगळुरू जंक्शन – सुरत): ही गाडी मंगळुरू जंक्शन येथून दर गुरुवारी आणि सोमवारी रात्री २२:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २३:४५ वाजता सुरतला पोहोचेल.

​या प्रवासात गाडी खालील स्थानकांवर थांबेल:

​१. उधना जंक्शन | २. वलसाड | ३. वापी | ४. पालघर | ५. वसई रोड | ६. भिवंडी रोड | ७. पनवेल | ८. पेण | ९. रोहा | १०. माणगाव | ११. खेड | १२. चिपळूण | १३. सावर्डे | १४. संगमेश्वर रोड | १५. रत्नागिरी | १६. राजापूर रोड | १७. वैभववाडी रोड | १८. कणकवली | १९. सिंधुदुर्ग | २०. कुडाळ | २१. सावंतवाडी  | २२. थिवि | २३. करमळी | २४. मडगाव जंक्शन | २५. काणकोण | २६. कारवार | २७. अंकोला | २८. गोकर्ण रोड | २९. कुमटा | ३०. मुरुडेश्वर | ३१. भटकळ | ३२. मुकांबिका रोड बिंदूर | ३३. कुंदापुरा | ३४. उडुपी | ३५. मुल्की | ३६. सुरथकल.

Facebook Comments Box

Konkan Railway: मध्यरेल्वेकडून कोकणात जाण्यासाठी होळी विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई: होळी आणि शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सणासुदीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या दोन विशेष गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

१. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – सावंतवाडी रोड साप्ताहिक स्पेशल

​गाडी क्र. ०१११९: ही गाडी २६ फेब्रुवारी आणि ५ मार्च २०२६ रोजी LTT वरून रात्री २२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११२०: ही गाडी २७ फेब्रुवारी आणि ६ मार्च २०२६ रोजीसावंतवाडीवरून सायंकाळी १७:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०५ वाजता LTT ला पोहोचेल.

​थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

​डब्यांची रचना (Coach Composition):१ एसी फर्स्ट क्लास + ३ एसी २-टायर + ७ एसी ३-टायर + ८ स्लीपर क्लास. (एकूण १९ डबे)

​२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – सावंतवाडी रोड साप्ताहिक स्पेशल

​गाडी क्र. ०११७१: ही गाडी २६ फेब्रुवारी आणि ५ मार्च २०२६ रोजी CSMT वरून मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि दुपारी १२:३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११७२: ही गाडी दिनांक २६ फेब्रुवारी आणि ५ मार्च २०२६ रोजी सावंतवाडीवरून सायंकाळी १७:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता CSMT ला पोहोचेल.

​थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

​डब्यांची रचना (Coach Composition):१ एसी २-टायर + ६ एसी ३-टायर + ९ स्लीपर क्लास + ४ जनरल डबे + २ एसएलआरडी. (एकूण २२ डबे)

​प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आरक्षणासंदर्भातील अधिक माहितीसाठी प्रवासी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

Facebook Comments Box

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप सोडण्याचा ‘प्रँक’ पडला महागात; आरोपीला अटक

   Follow us on        

मुंबई: मुंबई–सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या शौचालयात जिवंत साप ठेवणाऱ्या एका ३७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार २७ डिसेंबर २०२५ रोजी घडला होता. प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत शोधमोहीम सुरू केली. सुरुवातीला साप सापडला नाही, मात्र सोलापूर स्थानकावर सखोल तपास केल्यानंतर तो सुरक्षितपणे पकडण्यात आला. हा साप भारतीय ‘रॅट स्नेक’ प्रजातीचा असून तो प्रामुख्याने बिनविषारी असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीदाराच्या मदतीने रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) संशयिताचा माग काढला. जालन अर्जुन भाले (वय ३७, राहणार मुंब्रा) याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने हा प्रकार केवळ खोडसाळपणातून आणि लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याच्या उद्देशाने केल्याची कबुली दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेनंतर त्याच्यावर रेल्वे कायदा १९८९ अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

Facebook Comments Box

मुंबई लोकल: पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचणार नाही! मध्य रेल्वेचा ‘मायक्रो-टनलिंग’चा प्रयोग

   Follow us on        

मुंबई: दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी ‘लोकल ट्रेन’ रुळांवर पाणी साचल्यामुळे ठप्प होते. याचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसतो. मात्र, आगामी पावसाळ्यात प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि पाणी साचण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. भायखळा आणि ठाणे या दोन महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान रेल्वेने ‘मायक्रो-टनलिंग ड्रेनेज सिस्टीम’ (Micro-Tunneling Drainage System) राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

​काय आहे ही योजना?

१. भूमिगत बोगदा (Micro-Tunneling): रेल्वे रुळांच्या खालून सूक्ष्म बोगदे (Micro Tunnels) तयार केले जाणार आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा निचरा करणारी एक सक्षम ड्रेनेज यंत्रणा विकसित केली जात आहे.

२. पाण्याचा निचरा: मुसळधार पाऊस पडल्यास रुळांवर साचलेले पाणी या बोगद्यांमार्फत तातडीने बाहेर काढले जाईल. यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह विस्कळीत होणार नाही.

३. लोकल सेवा अखंडित राहणार: पाणी साचल्यामुळे अनेकदा सिग्नल यंत्रणा निकामी होते किंवा इंजिनमध्ये पाणी शिरते. या नवीन प्रणालीमुळे रुळांवर पाणी साचणार नाही, परिणामी पावसाळ्यातही लोकल सेवा विनाअडथळा सुरू राहण्यास मदत होईल.

​भायखळा आणि ठाणे स्थानकांची निवड का?

भायखळा आणि ठाणे ही मध्य रेल्वेवरील अत्यंत वर्दळीची आणि सखल भागातील स्थानके आहेत. दरवर्षी अतिवृष्टी दरम्यान या ठिकाणी पाणी साचण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडते. म्हणूनच रेल्वेने या दोन ठिकाणांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित केले आहे.

​या तंत्रज्ञानाचे फायदे:

​कमी वेळात काम: मायक्रो-टनलिंग तंत्रज्ञानामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद न ठेवता जमिनीखाली काम करणे शक्य होते.

​शाश्वत उपाय: पारंपारिक नालेसफाईपेक्षा ही आधुनिक ड्रेनेज सिस्टीम जास्त प्रभावी ठरणार आहे.

​प्रवाशांना दिलासा: कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना पावसाळ्यात होणाऱ्या लोकलच्या विलंबापासून आणि गर्दीपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

​मध्य रेल्वेने उचललेले हे पाऊल मुंबईकरांसाठी पावसाळ्यात वरदान ठरू शकते. या प्रकल्पाच्या यशामुळे भविष्यात मुंबईतील इतर सखल भागांतही अशाच प्रकारची यंत्रणा राबवली जाण्याची शक्यता आहे.

Facebook Comments Box

मुंबईत साकारणार हायटेक मासळी बाजार; मरोळच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाला केंद्राची मंजुरी!

   Follow us on        

मुंबई अंधेरी-मरोळ येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या घाऊक मासळी बाजार प्रकल्पास प्रशासकीय मान्यता!

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या सन 2025-26 च्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये मुंबईतील मरोळ (अंधेरी) येथे ₹१३८ कोटींच्या आधुनिक घाऊक मासळी बाजार प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच मासेमारी बंद कालावधीत पारंपरिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सुमारे २,८१६ लाभार्थ्यांना उपजीविका व पोषण सहाय्य देण्याचाही समावेश आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, याचे आज फलित झाल्याचे समाधान वाटते.

मुंबईसारख्या महानगरात आंतरराष्ट्रीय दर्जाचा घाऊक मासळी बाजार उभारणे ही काळाची गरज होती. या प्रकल्पामुळे केवळ व्यापार सुलभ होणार नाही, तर हजारो मासेमार व संबंधित घटकांना रोजगार आणि स्थैर्य मिळेल. महाराष्ट्रात ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ मजबूत करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा ठाम विश्वास वाटतो.

 

Facebook Comments Box

राज्य सरकारचा मोठा निर्णय: ५,०१२ सहायक प्राध्यापकांच्या पदभरतीला मान्यता

   Follow us on        

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने बुधवारी ५,०१२ सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीला अधिकृत मान्यता देणारा शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.

​एकूण पदे: राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या अनुदानित महाविद्यालयांमधील एकूण रिक्त पदांपैकी ५,०१२ पदे भरली जाणार आहेत.

​कार्याभारानुसार वाटप: १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार परिगणित केलेल्या कार्यभारानुसार ही पदे भरली जातील.

​NEP ची अंमलबजावणी: नवीन शैक्षणिक धोरणामुळे वाढलेला शैक्षणिक कार्यभार पाहता, गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ही पदे भरणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

​भरती प्रक्रियेसाठी अटी व शर्ती:

​शासनाने ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी काही कडक अटी घातल्या आहेत:

१. कालबद्ध प्रक्रिया: उच्च शिक्षण संचालकांनी या पदभरतीची निश्चित कालमर्यादा ठरवून ती प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

२. पारदर्शकता: भरती प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागीय सहसंचालक आणि उच्च शिक्षण संचालक यांची असेल.

३. NAAC मानांकन: ज्या महाविद्यालयांकडे NAAC मान्यता नाही, त्यांना नवीन पदनिर्मिती करता येणार नाही. मात्र, ज्यांचे मूल्यांकन कमी आहे, त्यांना सुधारणेसाठी ३ वर्षांचा ‘सवलतीचा कालावधी’ (Grace Period) देण्याबाबत धोरण तयार केले जाणार आहे.

४. आचारसंहिता: राज्यात निवडणूक किंवा अन्य कारणाने आचारसंहिता लागू असल्यास, निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

​विद्यार्थी हिताचा निर्णय

​गेल्या अनेक दिवसांपासून प्राध्यापक भरतीची मागणी होत होती. सेवानिवृत्ती, राजीनामा आणि मृत्यू यांमुळे महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली होती. या निर्णयामुळे आता महाविद्यालयांना पूर्णवेळ प्राध्यापक मिळतील, ज्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणार आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग: गोव्याच्या दिशेने जाणार्‍या ट्रकचा विचित्र अपघात

   Follow us on        

ओटवणे : कोल्हापूरहून बांदा-गोव्याच्या दिशेने लोखंडी प्लेट्स आणि स्टील ट्यूब्स घेऊन जाणारा एक कॅन्टर (MH 09 BA 9279) विलवडे तिठ्यावर पहाटे एका विचित्र अपघाताचा बळी ठरला. रस्त्यावरील मोठी चढण, खड्डे आणि क्षमतेपेक्षा जास्त भरलेला लोखंडी माल यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

​चढणीवर गाडी आवरताना कॅन्टरची पुढची दोन्ही चाके जमिनीपासून तब्बल १० ते १५ फूट हवेत उडाली. गाडी अशा विचित्र अवस्थेत हवेत लटकलेली पाहून परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने, मागच्या बाजूला असलेला जड माल जमिनीला टेकल्यामुळे गाडी मागे सरकली नाही किंवा उलटली नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

​या घटनेत चालक सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेनंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती, जी जेसीबीच्या मदतीने पूर्ववत करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी या धोकादायक चढणीची आणि खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

 

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search