सातबारा उतारा बंद होणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारने जमिनीच्या नोंदींबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील ज्या गावांचा समावेश नव्याने नगरपालिका किंवा महानगरपालिकांच्या हद्दीत झाला आहे, त्या भागांतील जमिनींसाठी आता ‘सातबारा उतारा’ (7/12 Extract) बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी, संबंधित जमिनींच्या मालकी हक्कासाठी आता ‘प्रॉपर्टी कार्ड’ (Property Card) म्हणजेच ‘मालमत्ता पत्रक’ उपलब्ध करून दिले जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले असून, लवकरच याचे अधिकृत आदेश जारी केले जाणार आहेत.

​ग्रामीण भागातून शहरी भागात रूपांतरित होणाऱ्या गावांचे स्वरूप पूर्णपणे बदलते. शेती जमिनीचा वापर हळूहळू निवासी, व्यावसायिक किंवा नागरी कारणांसाठी होऊ लागतो. अशा परिस्थितीत, शहरी मालमत्ता व्यवस्थापनासाठी सातबारा उताऱ्यापेक्षा प्रॉपर्टी कार्ड हे अधिक कायदेशीर आणि सोयीचे मानले जाते. या निर्णयामुळे जमीन नोंदींमधील गुंतागुंत कमी होऊन कामकाजात सुसूत्रता आणि स्पष्टता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. भविष्यातील जमिनींचे व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

​या नवीन प्रणालीचा शेतकऱ्यांना आणि शहरी नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. प्रॉपर्टी कार्ड लागू झाल्यामुळे मालमत्तेचे हस्तांतरण करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होईल. तसेच, बँकांकडून कर्ज घेताना कागदपत्रांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी दूर होतील. जमिनीच्या नोंदी अधिक अचूक आणि सुसंगत पद्धतीने ठेवल्या जाणार असल्याने, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. महापालिका किंवा नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासाला या निर्णयामुळे अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती; २४ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

   Follow us on        

नवी मुंबई: रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने विविध विभागांमधील ज्युनिअर स्केल एक्झिक्युटिव्ह (गट-ब) पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीद्वारे सिव्हिल इंजिनीअरिंग, मेडिकल, आयटी, आणि जनरल ॲडमिनिस्ट्रेशन यांसारख्या विभागांत पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता:
भरती प्रक्रियेत खालील प्रमुख पदांचा समावेश आहे:

असिस्टंट इंजिनीअर (सिव्हिल)- १ जागा. पात्रता: किमान ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी आणि २०२३, २०२४ किंवा २०२५ चा वैध GATE स्कोअर आवश्यक.

असिस्टंट मेडिकल ऑफिसर: ३ जागा. पात्रता: MBBS पदवी आणि राज्य वैद्यकीय परिषदेची नोंदणी.

 

असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर (ऑपरेटिंग आणि कमर्शियल): ४ जागा. पात्रता: पदवी आणि किमान ६०% गुणांसह MBA/MMS. उमेदवाराकडे २०२३ नंतरचा किमान ८० पर्सेंटाईल असलेला CAT स्कोअर असणे आवश्यक आहे.

 

इतर पदे: यामध्ये असिस्टंट मॅनेजर (IT), असिस्टंट मेकॅनिकल इंजिनीअर, असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनीअर, असिस्टंट सिग्नल आणि टेलिकॉम इंजिनीअर, असिस्टंट फायनान्शिअल ॲडव्हायझर, असिस्टंट पर्सनल ऑफिसर आणि असिस्टंट डेप्युटी जनरल मॅनेजर या पदांचा समावेश आहे

इतर अटी

  • उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे.
  • SC उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि OBC-NCL उमेदवारांसाठी ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
  • कोकण रेल्वेच्या नियमित कर्मचाऱ्यांसाठी उच्च वयोमर्यादेत ४५ वर्षांपर्यंत (प्रवर्गानुसार अधिक) सवलत आहे.

निवड प्रक्रिया

AMO आणि AFA पदांसाठी:: लेखी परीक्षा (७०% वेटेज), सादरीकरण (१०%) आणि वैयक्तिक मुलाखत (२०%).
इतर पदांसाठी: GATE किंवा CAT स्कोअरला ५०% वेटेज दिले जाईल, तर सादरीकरण आणि मुलाखतीला प्रत्येकी २५% वेटेज असेल.
उमेदवारांना सादरीकरण आणि मुलाखतीत किमान ६०% गुण मिळवणे अनिवार्य आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २४ मे २०२६, संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत.

अर्ज पद्धती: उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज (Annexure-A) सर्व आवश्यक कागदपत्रांसह पोस्टाने पाठवायचा आहे.

अर्ज जमा करण्याचा पत्ता: सिनियर पर्सनल ऑफिसर/भरती आणि स्थापना, ४ था मजला, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, बेलापूर भवन, प्लॉट नं. ६, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.

अर्ज शुल्क: ५९० रुपये (GST सह). SC, ST, महिला आणि अल्पसंख्याक उमेदवारांना प्रक्रियेनंतर ५०० रुपये शुल्क परत केले जाईल.

इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी कोकण रेल्वेच्या **www.konkanrailway.com** या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1Ik6Ckdp_ylzK5KCK2J1VzVhUxKdy0Hkl/view?usp=drive_link

Facebook Comments Box

कणकवलीत भीषण कार अपघात; एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू, दोन गंभीर जखमी

   Follow us on        

कणकवली: मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारचा आज, ९ मे रोजी सकाळी साडेऊ नऊ वाजता नांदगाव ओटव पुलावर (ब्रिजवर) भीषण अपघात झाला. ही कार वेगात असताना अचानक दुभाजकाला (डिव्हायडरला) जोरात धडकली. या भीषण धडकेत कारच्या मागील सीटवर बसलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

​या अपघातात कार चालकासह पुढच्या सीटवर बसलेली मुलगी देखील गंभीररीत्या जखमी झाली आहे. मुलगी कारमध्ये अडकून पडली होती, तिला स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत

Facebook Comments Box

प्रस्तावित मुंबई-पुणे-हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाची प्राथमिक आखणी निश्चित

   Follow us on        

नवी दिल्ली: रेल्वे मंत्रालयाने मुंबई-पुणे-हैद्राबाद या प्रस्तावित हायस्पीड रेल्वेची (बुलेट ट्रेन) प्राथमिक आखणी निश्चित केली असून, हा मार्ग पुणे शहराच्या मुख्य भागातून न जाता शहराच्या बाहेरून पुढे नेण्याचे प्रस्तावित केले आहे. या नवीन आराखड्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रवाशांसाठी शहराच्या बाह्य भागात स्थानके उभारली जाणार आहेत, ज्यामुळे शहरी भागातील गर्दी टाळून वेगवान प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल.

​पुणे जिल्ह्यातील स्थानकांचा विचार करता, मुंबईहून पुण्याकडे येताना पहिले स्थानक लोणावळ्याजवळील मळवली आणि कामशेत दरम्यान असेल. त्यानंतरचे स्थानक पिंपरी-चिंचवडसाठी कुरुळी येथे नियोजित असून, पुण्याचे मुख्य स्थानक लोणी काळभोर आणि मांजरी बुद्रुक यांच्या दरम्यान प्रस्तावित करण्यात आले आहे. ही सर्व स्थानके मुख्य शहरापासून दूर असली, तरी तेथून शहरात ये-जा करण्यासाठी स्वतंत्र कनेक्टिव्हिटीची व्यवस्था करावी लागणार आहे.

​या हायस्पीड रेल्वेमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी क्रांती होणार असून मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होईल, असा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे. तसेच पुणे ते हैदराबाद हे मोठे अंतर पार करण्यासाठी केवळ १ तास ५५ मिनिटे लागणार आहेत. वेगाच्या या मर्यादेमुळे रस्ते मार्गावरील ताण कमी होऊन आंतरराज्य प्रवासाला मोठी गती मिळणार आहे.

​पुणे स्थानकानंतर हा मार्ग शिंदवणेमार्गे बारामतीकडे वळणार असून बारामती शहराबाहेर त्याचे स्थानक असेल. पुढे हा मार्ग पंढरपूर आणि सोलापूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहे. जरी ही स्थानके शहराच्या मूळ ठिकाणापासून काही किलोमीटर दूर असली, तरी या प्रकल्पामुळे सोलापूर आणि पंढरपूर सारख्या शहरांच्या परिसराचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे.

​सध्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे काम सुरू असतानाच केंद्र सरकारने सात नवीन हायस्पीड मार्ग जाहीर केले असून त्यात महाराष्ट्रातील या दोन मार्गांचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रथमच या मार्गांची आखणी ‘रेल्वे ॲटलास’मध्ये दर्शविली आहे. या संपूर्ण मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार झाल्यावरच स्थानकांची निश्चिती आणि जमिनीचे आरक्षण यांसारख्या तांत्रिक बाबी अधिक स्पष्ट होणार आहेत.

Facebook Comments Box

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! मडगाव – पनवेल दरम्यान धावणार ‘समर स्पेशल’ ट्रेन

   Follow us on        

रत्नागिरी:उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव आणि पनवेल दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाड्यांचे वेळापत्रक आणि मार्ग:

​गाडी क्र. ०११०६ (मडगाव – पनवेल साप्ताहिक स्पेशल): ही गाडी रविवार, १० मे २०२६ रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता पनवेलला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११०५ (पनवेल – मडगाव साप्ताहिक स्पेशल): ही गाडी सोमवार, ११ मे २०२६ रोजी पनवेल येथून पहाटे ०५:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:१० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

​गाडीचे थांबे:

​ही ट्रेन प्रवासात करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबेल.

​डब्यांची रचना (Composition):

​या विशेष ट्रेनमध्ये एकूण २३ डबे असतील, ज्यात खालीलप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे:

​AC 3 Tier: ०३ डबे

​Sleeper (शयनयान): ११ डबे

​General (सामान्य): ०७ डबे

​SLR: ०२ डबे

​प्रवाशांना अधिक माहितीसाठी आणि वेळपत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे किंवा ‘KR Mirror’ ॲप वापरण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

ठाणे आणि मुलुंड स्थानकावरील गर्दी कमी होणार; प्रस्तावित रेल्वे स्थानकाला मंजुरी

   Follow us on        

ठाणे: मुंबईकरांच्या आणि विशेषतः ठाणेकरांच्या प्रवासातील कोंडी फोडण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्टेशन उभारण्यास ‘इन-प्रिन्सिपल’ (तत्वतः) मंजुरी दिली आहे. २०१९ मध्ये संकल्पित करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे स्थान ठाणे मानसिक रुग्णालयाजवळील कोपरी बाजूच्या परिसरात प्रस्तावित आहे. या नवीन स्टेशनमुळे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या ठाणे स्टेशनवरील प्रवासी भार ३१ टक्क्यांनी, तर मुलुंड स्टेशनवरील भार २४ टक्क्यांनी कमी होण्याची दाट शक्यता आहे. केवळ गर्दीचे विभाजनच नाही, तर या प्रकल्पामुळे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गांचे विलगीकरण करणे अधिक सुलभ होणार असून, संपूर्ण मुंबई रेल्वे वाहतुकीच्या कार्यक्षमतेत सुधारणा होणार आहे.

​या प्रकल्पाच्या आर्थिक नियोजनासाठी ठाणे स्मार्ट सिटी आणि ठाणे महानगरपालिका (टीएमसी) यांच्याकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी भारतीय रेल्वे पार पाडणार आहे. दरम्यान, या निर्णयावर स्थानिक प्रवाशांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका बाजूला मोठ्या वर्गाकडून गर्दी कमी होण्याच्या शक्यतेमुळे या निर्णयाचे स्वागत होत असताना, दुसऱ्या बाजूला दोन स्टेशनमधील अंतर कमी असल्याने लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावर आणि वेगावर विपरीत परिणाम होईल का, अशी भीती काही प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. तरीही, वाढती लोकसंख्या लक्षात घेता हे स्टेशन भविष्यात मध्य रेल्वेचा कणा ठरेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: ‘सोशिक’ चाकरमान्यांच्या नशिबी २७ तासांचा यातनेचा प्रवास

   Follow us on        

ठाणे: कोकणात गावी जाण्यासाठी सध्या चाकरमान्यांची ‘तुफान गर्दी’ उसळली आहे. नियमित गाड्यांसह विशेष गाड्यांचे आरक्षण (Reservation) आधीच फूल झाल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. खाजगी बसचे दर गगनाला भिडलेले असल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना ते परवडत नाहीत. परिणामी, जनरल डब्यातून प्रवास करणे हा एकमेव पर्याय आता कोकणी माणसासमोर उरला आहे.

​या भीषण गर्दीमुळे दादर, ठाणे आणि सीएसएमटी यांसारख्या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांना कमालीचा संघर्ष करावा लागत आहे. कोकण कन्या, मंगलोर आणि तुतारी एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांच्या जनरल डब्यात पाय ठेवण्यासाठी जागा मिळावी, म्हणून प्रवाशांना गाडी सुटण्यापूर्वी १२ ते १५ तास आधीच स्थानकावर रांगा लावाव्या लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहून जागा मिळवण्यासाठी ही जीवघेणी कसरत सुरू आहे.

​या लांबच लांब रांगांचा आणि प्रवासाचा सर्वाधिक फटका महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. १५ तास रांगेत उभे राहिल्यानंतर पुन्हा पुढील १० ते १५ तासांचा गर्दीत करावा लागणारा प्रवास, असा एकूण २७ ते ३० तासांचा हा प्रवास प्रवाशांच्या पाचवीलाच पुजला आहे. यामध्ये रात्रीची झोप नाही आणि बसण्यासाठी हक्काची जागाही नाही, अशा स्थितीत चाकरमानी आपला प्रवास पूर्ण करत आहेत.

​प्रवासादरम्यानच्या सुविधांची स्थिती तर अत्यंत भयावह आहे. प्रचंड उकाडा आणि गर्दीमुळे डब्यात साधे बाथरूमपर्यंत पोहोचणेही अशक्य होऊन बसते. रांगेत उभे असताना जेवणाखाण्याचे हाल होतात आणि प्रवासात पाण्याचा घोट घेण्यासाठीही कसरत करावी लागते. ‘नकोसा वाटणारा हा प्रवास’ केवळ गावाकडच्या ओढीपोटी कोकणी माणूस सहन करत आहे. मात्र, या गैरसोयींमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

​इतकी भीषण परिस्थिती असूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. ‘सोशिक कोकणी माणूस’ सर्व काही निमूटपणे सहन करतो, याचाच गैरफायदा घेतला जात असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. दरवर्षीची हीच परिस्थिती असूनही जनरल डब्यांची संख्या वाढवणे किंवा रांगांचे सुयोग्य नियोजन करणे यामध्ये रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याने, आता हे चाकरमान्यांचे दुःख नेमकं कोणाला दिसेल, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

याशिवाय यावर कायमस्वरूपी उपाय म्हणजे कोकण रेल्वे मार्गाचे कोकण रेल्वेच्या या कायमस्वरूपी समस्यांवर मात करण्यासाठी मार्गाचे दुहेरीकरण आणि भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि गाड्यांची गर्दी पाहता, जोपर्यंत रेल्वे मार्गाचे पूर्णतः दुहेरीकरण होत नाही, तोपर्यंत गाड्यांचा वेग वाढवणे आणि नवीन फेऱ्या सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. तसेच, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेच्या मुख्य प्रवाहात विलिनीकरण झाल्यास निधीची उपलब्धता वाढून पायाभूत सुविधांचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो. मात्र, दुर्दैवाने या कळीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत असून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे कोकणचा रेल्वे प्रवास आजही ‘सिंगल ट्रॅक’वरच अडकून पडला आहे.

Facebook Comments Box

भालावलीत जंगली हत्तीचा ‘रात्रीस खेळ चाले’; गाड्यांचे नुकसान करत उच्छाद

   Follow us on        
सिंधुदुर्ग: सावंतवाडी  तालुक्यातील भालावल परिसरात काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका जंगली हत्तीने जोरदार एन्ट्री करत भीतीचे वातावरण निर्माण केले. या हत्तीने गावात प्रवेश केल्यानंतर आपला मोर्चा थेट उभ्या असलेल्या गाड्यांकडे वळवला.
स्थानिक रहिवासी विकास गुयेकर यांच्या गाडीचे या हत्तीने प्रचंड नुकसान केले आहे. सुमारे अर्धा तास हा हत्ती गाडीसोबत खेळत होता; त्याने गाडी चहूबाजूंनी फिरवून अक्षरशः उचलून फेकण्याचा प्रयत्न केला. यानंतर हत्तीने आपला मोर्चा शेजारच्या बागांकडे वळवला. तिथे असलेल्या फणसाच्या झाडाला जोरात हलवून त्याने फणस पाडले आणि फस्त केले. एवढ्यावरच न थांबता, हत्ती पुन्हा परतला आणि त्याने तिथे उभ्या असलेल्या दुसऱ्या एका गाडीचीही तोडफोड केली.
हा हत्ती आकाराने मध्यम असला तरी तो एकटाच फिरत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हत्तीचा नेमका ठावठिकाणा शोधण्यासाठी वनविभागाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने हवेतून हत्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या हा हत्ती तांबोळीच्या दिशेने गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Facebook Comments Box

भारतीय रेल्वेची डिजिटल झेप; ऑनलाइन तिकीट बुकिंगचा वाटा ८८% वर

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेच्या आरक्षण व्यवस्थेत मोठे तांत्रिक बदल करण्यात येत असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी नव्या आरक्षण प्रणालीच्या संक्रमण प्रक्रियेचा आढावा घेतला. सुमारे ४० वर्षांपासून वापरात असलेल्या जुन्या प्रणालीऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन आरक्षण प्रणाली लागू करण्यात येत आहे. या बदलादरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. रेल भवन येथे झालेल्या बैठकीला रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा आणि रवनीत सिंह बिट्टू उपस्थित होते.

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, १९८६ मध्ये सुरू झालेली आरक्षण प्रणाली आता पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यात आली आहे. २००२ मध्ये भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा सुरू केली होती आणि सध्या देशातील जवळपास ८८ टक्के तिकीट बुकिंग ऑनलाइन पद्धतीने होत आहे. रेल्वेचे ‘RailOne’ हे मोबाईल अ‍ॅप गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू करण्यात आले असून, एका वर्षातच या अ‍ॅपचे ३.५ कोटी डाउनलोड्स झाले आहेत.

रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, RailOne अ‍ॅपमुळे सामान्य प्रवाशांना रेल्वेशी संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी मिळत असून, तिकीट बुकिंग, रद्द करणे, परतावा, लाईव्ह ट्रेन स्टेटस, कोच पोझिशन, प्लॅटफॉर्म माहिती, रेल मदत सेवा तसेच खाद्यपदार्थ ऑर्डर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय, अ‍ॅपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन अंदाज सुविधा देण्यात आली असून, तिची अचूकता पूर्वीच्या ५३ टक्क्यांवरून आता ९४ टक्क्यांपर्यंत वाढल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे.

दररोज सुमारे ९.२९ लाख तिकीटे RailOne अ‍ॅपद्वारे बुक केली जात असल्याची माहिती मंत्रालयाने दिली. त्यामध्ये ७.२ लाख अनारक्षित आणि २.०९ लाख आरक्षित तिकिटांचा समावेश आहे. तसेच, भारतीय रेल्वेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्रवासी तिकिटांवर तब्बल ६०,२३९ कोटी रुपयांची अनुदान मदत दिली असल्याचे सांगण्यात आले. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, एखाद्या सेवेसाठी प्रत्यक्ष खर्च १०० रुपये येत असला तरी प्रवाशांकडून सरासरी फक्त ५७ रुपयेच आकारले जातात.

Facebook Comments Box

महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

   Follow us on        

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल उद्या, ८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. निकालापूर्वी उद्या सकाळी ११ वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात अधिकृत पत्रकार परिषद घेऊन निकालाची आकडेवारी जाहीर केली जाईल, त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक निकालाची प्रत ऑनलाईन पाहता येईल.

​यावर्षी राज्याच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. बोर्डाने बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर केल्यानंतर आता अवघ्या काही दिवसांतच दहावीचा निकाल लावून आपली ‘विक्रमी वेळेत निकाल’ लावण्याची परंपरा कायम ठेवली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मदत होणार आहे.

​निकाल कुठे पाहाल?

​विद्यार्थी खालील अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतात:

​sscresult.mahahsscboard.in

​mahahsscboard.in

​results.digilocker.gov.in

​results.targetpublications.org

​results.navneet.com

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search