सिंधुदुर्ग-मालवण: दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या आंगणेवाडीची जत्रा यंदा शनिवारी दिनांक ०२ मार्च २०२४ या दिवशी संपन्न होणार आहे. नुकतीच या यात्रेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.
आंगणेवाडीच्या यात्रेसाठी देवीला कौल लावून तारीख निश्चित करण्याची पद्धत आहे. आजही लावलेल्या कौलानुसार शनिवार ०२ मार्च २०२४ हा दिवस यात्रेसाठी ठरवण्यात आला आहे.
दरवर्षी कोकणवासियांना या यात्रेच्या तारखेबद्दल उत्सुकता असते. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला या जत्रेत दर्शनाला भाविक देशा-परदेशातून येतात.आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला या जत्रोत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी आवर्जुन हजेरी लावतात. लाखो भक्त दिवसभरात देवीचं दर्शन घेतात. यासाठी विशेष सोय केली जाते. रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष रेल्वे फेर्या चालवल्या जातात. एसटी कडूनही भाविकांना खास बससेवा असते.
गोवा वार्ता : गोवा-बांबुळीच्या धर्तीवर पेडणे-तूये येथे उभारण्यात आलेल्या शंभर बेडच्या हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले आहे. हे हॉस्पिटल जानेवारीपासून रुग्णांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. याचा विशेष करून फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना होणार आहे, असे मत पेडणे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी केला. या हॉस्पिटलमध्ये गोवा मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर उपचार होणार आहेत. त्यामुळे गोवा-बांबुळी “सेकंड पार्ट” असा दर्जा त्या हाॅस्पिटलला देण्यात आला आहे. त्यामुळे बांबुळीला होणारे सर्व उपचार या ठिकाणी होणार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पणजी-गोवा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष भाई सावंत उपस्थित होते. सावंतवाडी पत्रकार संघाच्या कार्यक्रमा दरम्यान आरोलकर दीड वर्षांपूर्वी सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. याबाबत श्री. आरोलकर यांना विचारले असता ते म्हणाले पेडणे तुये येथे हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. गोवा-बांबुळीच्या धर्तीवर त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना हे अत्यंत जवळचे हॉस्पिटल ठरणार आहे. त्यामुळे आता उपचारासाठी त्यांना गोवा-बांबुळीत जावे लागणार नाही. या हॉस्पिटलचा शुभारंभ जानेवारी अखेरपर्यंत होणार आहे.
Konkan Railway News :कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर दरम्यान 741 किमी पूर्ण नेटवर्कवर धावणारी पहिली प्रवासीसेवा गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसने याच वर्षी आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले आहे. ट्रेन क्रमांक १२६१९/६२० मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरु सेंट्रल-मुंबई एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेसला १ मे १९९८ रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान ए.बी. वाजपेयी आणि रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी ही गाडी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला समर्पित केली होती.
मात्र जो रेक या गाडीसाठी चालवला जात आहे तो तिच्या गौरवाला साजेशा वाटत नाही आहे. तिच्या रेकची स्थिती बिघडत चालली असून त्याकडे कोणाचे लक्ष नाही आहे. मत्स्यगंधा एक्स्प्रेसला या आधुनिक रेक मध्ये LBH रेक मध्ये अपग्रेड करण्याची नितांत गरज आहे अशा मागणीचा एक ई-मेल रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय म्हापदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वेबोर्ड आणि संबंधित आस्थापनांना केला आहे. असे केल्याने या लांब पल्ल्याच्या गाडीचा प्रवास आरामदायक होईलच आणि सुरक्षित सुद्धा होईल. आशा आहे त्यांच्या या मागणीची दखल घेतली जाऊन लवकरच या गाडीला अत्याधुनिक LHB रेक दिला जाईल.
I hope this email finds you well. I am writing to express my concern and disappointment regarding the current state of the 12619/12620 Matsyagandha Express, a prestigious service along the West Coast and an integral part of the transportation network in Coastal Karnataka.
Despite its significance, the condition of the train’s rakes has been deteriorating, causing inconvenience to passengers and raising safety concerns. The Matsyagandha Express has been a lifeline for commuters, tourists, and traders in the region for many years. However, the train’s current rolling stock, which has served faithfully but is now showing signs of wear and tear, is in dire need of an upgrade.
The introduction of modern Linke Hofmann Busch (LHB) rakes is long overdue, and I urge you to expedite the process of allocating brand new LHB rakes for this vital service. The benefits of LHB rakes, including enhanced passenger comfort, improved safety features, and reduced maintenance costs, are well-documented.
Upgrading the Matsyagandha Express with these modern rakes will not only enhance the overall travel experience but also contribute to the safety and efficiency of this critical service. I kindly request that Southern Railway take immediate action to prioritize the allocation of new LHB rakes for the Matsyagandha Express. This would not only demonstrate your commitment to passenger satisfaction but also boost the reputation of the Southern Railway as a forward-thinking and customer-centric organization.
I understand that the process of acquiring new rakes can be complex, but I urge you to expedite it as much as possible to ensure that the Matsyagandha Express continues to serve the people of Coastal Karnataka effectively and safely.
Thank you for your attention to this matter, and I look forward to hearing about the progress in this endeavor.
Mumbai Goa Highway:गोव्यात जाणे आता महागणार आहे. गोवा राज्यात जाणाऱ्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पर्यटकांच्या वाहनांना आता टोल देणे बंधनकारक होणार आहे. गोवा राज्याच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर टोलनाके बसवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना. नितीन गडकरी यांनी पणजी (गोवा) येथे दिले. तीन राज्यांचे प्रमुख मंत्री आणि रस्ते वाहतूक संचालकांच्या बैठकीमध्ये हे निर्देश ना. गडकरी यांनी दिले. त्यामुळे आता गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या वाहनांसाठी बांदा – पत्रादेवी बॉर्डरवर टोल नाका कार्यान्वित होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
पणजी गोवा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह तीन राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना आता टोल लागणार असून हा टोलनाका गोव्याच्या एन्ट्री पॉईंटवर बसविण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव गोवा शासनाकडून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आला आहे. ना. नितीन गडकरी यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र – गोवा राज्याच्या सीमेवर बांदा येथे आरटीओ विभागाचा टोलनाका सुमारे ३२ एकर जागा संपादन करून याआधीच उभारण्यात आलेला आहे. मात्र कधीपासून टोल घेण्यास सुरुवात करणार, कोणाला या टोल मधून सवलत असेल, टोलचे दर काय असतिल याची अद्याप निश्चिती झालेली नाही.
Goa News:गोव्यात पर्यटनासाठी जगभरातून पर्यटक येतात. गोव्यातील समुद्रे किनारे जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढीच येथील मंदिरेही प्रसिद्ध आहेत. या मंदिरांना सुद्धा लाखो पर्यटक भेट देताना दिसतात. मात्र पर्यटकांच्या कपड्यांवरून मंदिर समित्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून येत्या 1 जानेवारीपासून गोव्यातील मंदिरांमध्ये कडेकोट ड्रेस कोड लागू होणार आहे. मात्र लहान मुलांना यातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिर हे फॅशन दाखवण्याचे ठिकाण नाही, असे व्यवस्थापनाचे मत आहे. अनेक पर्यटक येथे आधुनिक कपडे घालून येतात ज्यामुळे प्रतिष्ठा राखली जात नाही. त्यामुळे लहान कपड्यांमध्ये कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
गोव्यातील फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थानने म्हटले आहे की, मंदिराचे पावित्र्य आणि आदर राखण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व पर्यटकांसाठी कठोर ड्रेस कोड लागू केला जाईल. शॉर्ट्स, मिनी स्कर्ट, मिडी, स्लीव्हलेस टॉप, लो-राईज जीन्स आणि शॉर्ट टी-शर्ट परिधान केलेल्या लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. गोव्यातील सुप्रसिद्ध श्री मंगेश देवस्थाननेही नवीन वर्षापासून अतिशय कडक ड्रेस कोड लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाविकांनी योग्य कपडे घालूनच मंदिरात यावे.
मंदिर समिती देणार कपडे
अयोग्य कपडे घालून मंदिरात येणाऱ्यांना मंदिर समितीतर्फे छाती, पोट, पाय झाकण्यासाठी लुंगी किंवा कापड दिले जाईल. त्यामुळे आत्तापर्यंत दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
श्री रामनाथ देवस्थानचे अध्यक्ष फोंडा म्हणाले की, आम्ही 1 जानेवारीपासून ड्रेस कोड लागू करणार आहोत. यासाठी आम्ही एक सूचना जारी केली असून मंदिर परिसरात फलकही लावला आहे. पर्यटकांना जागरूक करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटक अनेकदा सभ्य कपडे घालून येतात. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी लहान कपडे घालून कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
मंदिरांनी म्हटले आहे की 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना या ड्रेस कोडमधून सूट दिली जाईल, परंतु 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना आणि प्रौढांना ड्रेस कोडचे पालन करावे लागेल. जर कोणी लहान कपडे घालून आले तर त्याला स्मोक आणि लुंगी दिली जाईल. हे परिधान करून तुम्ही मंदिराला भेट देऊ शकाल. यापूर्वीही या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात आले नव्हते. आता आम्ही ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करू.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या मंगळवारी (२६ डिसेंबर) कळंबणी बुद्रुक ते कामथे या विभागां दरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सुमारे अडीच तास हा मेगाब्लॉक चालणार आहे. दुपारी १२:४० ते १५:१० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 02197 Coimbatore Jn. – Jabalpur Special
दिनांक २५ डिसेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कणकवली ते संगमेश्वर रोड या स्थानकांदरम्यान १ तास ४५ मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.
२) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express
दिनांक २६ डिसेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान १ तास १० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.
रत्नागिरी: कोकणात पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग आता दिसायला लागला आहे. होम स्टे, हॉटेल रेस्टॉरंट आणि इतर व्यवसायात महिला महिला व्यावसायिक छाप पाडताना दिसत आहे. अशा महिलांसाठी राज्यसरकारने यावर्षी ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण आखले आहे. महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने, सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही या धोरणाची पंचसुत्री महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत तयार केली आहे.
या योजने अंतर्गत खालील फायदे मिळतील.
प्रत्येक तालुक्यात पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालवलेल्या १० पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याजाची रक्कम १२ टक्केच्या मर्यादेत, त्यांच्या आधार लिंक बँकखात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा ७ वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम ४ लाख ५० हजारांच्या मर्यादेपर्यंत या तीन पर्यायांपैकी जे आधी घडेल तोपर्यंत दरमहा पुढील अटींच्या अधीन राहून जमा करण्यात येईल.
या अटी असतील
पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे. पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालवलेल्या असल्या पाहिजेत. महिलांच्या मालकीच्या हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात, कर्जाचे हप्ते वेळेत भरणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी, महिला बचतगटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादींच्या विक्रीसाठी स्टॉल, जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
रिसॉर्टसमध्ये महिला पर्यटकांसाठी विशेष सुविधा, महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेस, महिला केंद्रित पर्यटन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष स्थापन करण्यात येईल. महिलांना पर्यटन क्षेत्रामध्ये व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी तयार करण्यात आलेल्या आई या महिला केंद्रित पर्यटन धोरणासाठी वार्षिक कृती आराखडा निश्चित केला आहे.
अर्ज आणि इतर माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून PDF डाउनलोड करावा. हि माहिती शक्य होईल तितकी समाज माध्यमांवर फॉरवर्ड करा जेणेकरून आपल्या कोकणातील भगिनी याचा लाभ घेऊन स्वावलंबी होतील
Mumbai: मध्य रेल्वेने महिला प्रवाशांसाठी सुविधेकरिता शुक्रवारी मुलुंड स्थानकावर वुलू WOLOO महिला पावडर रूमचे उद्घाटन केले. मुलुंड येथील पावडर रूम हे केवळ स्वच्छतागृह नसून सुविधा आणि लक्झरी यांचे एक चांगले उदाहरण आहे असल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे.
पावडर रूममध्ये कोणत्या सुविधा आहेत ?
वाय-फाय, मध्यवर्ती वातानुकूलित अंतर्गत भाग आणि वर्धित सुरक्षिततेसाठी प्रवेश नियंत्रण सॉफ्टवेअरसह सुसज्ज,स्वच्छ स्वच्छतागृह तसेच आनंददायी वातावरण या पावडर रूम मध्ये असणार आहेत. तसेच येथे महिला-केंद्रित उत्पादनांचा साठा असलेले किरकोळ स्टोअर देखील आहे.
या पावडर रूमच्या एकवेळ वापर करण्यासाठी 10 रुपये प्रति व्यक्ती आकारण्यात येणार असून याचे वार्षिक सबस्क्रिप्शन सुद्धा उपलब्ध आहे. मात्र ३६५ रुपये भरून ही पावडर रूम वर्षभरासाठी वापरू शकता. वार्षिक सुसंबक्रिप्टिव घेतल्यास ही पावडर रूम वापरण्यासाठी प्रतिदिवस मात्र एक रुपया एवढे चार्जेस द्यावे लागणार आहे.
मुंबई विभागातील सहा अतिरिक्त स्थानकांवर देखील अशा पावडर रूमची स्थापना करण्याचा मध्य रेल्वेचा हेतू आहे. एलटीटी, घाटकोपर, कांजूरमार्ग, ठाणे, मानखुर्द आणि चेंबूर या स्थानकांवर हे पावडर रूम लेकराचं बांधले जाणार आहेत.
Konkan Railway News: मडगाव – मंगळुरु सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी दक्षिण रेल्वे सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी देशातील इतर पाच गाड्यांबरोबर या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती समोर आली आहे. या आधी मुंबई ते मडगाव वंदे भारत कोकण रेल्वे मार्गावर चालत आहे. मडगाव – मंगळुरु सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस सुरु केल्यानंतर वंदे भारत या प्रीमियम गाडीची सेवा दक्षिणेच्या मंगळुरु स्थानकापर्यंत विस्तारित होणार आहे.
दक्षिण रेल्वेच्या पलक्कड विभागाने या बातमीची पुष्टी केली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरुण कुमार चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, विभागाने मंगळुरू सेंट्रल येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उदघाटनासाठी विस्तृत तयारी केली गेली आहे.
प्राथमिक माहितीनुसार,ज्याची विभागाकडून पुष्टी करण्यात आलेली नाही आहे, ही गाडी मंगळुरु सेंट्रल येथून सकाळी ८.३० वाजता निघून दुपारी १.०५ वाजता मडगावला पोहोचेल, परतीच्या प्रवासात वंदे भारत एक्सप्रेस मडगावहून संध्याकाळी 6.10 वाजता सुटून, मंगळुरु सेंट्रलला रात्री 10.45 वाजता पोहोचेल. या गाडीला दोन्ही स्थानकामध्ये फक्त उडपी आणि कारवार येथे थांबे असतील.
कनेक्टेड सेवेचा लाभ
मडगाव साठी ही गाडी मंगळुरु सेंट्रल येथून सकाळी ८.३० वाजता निघून दुपारी १.०५ वाजता मडगावला पोहोचणार आहे. सध्याच्या २२२३० मडगाव – मुंबई या गाडीची मडगाव वरून मुंबईसाठी निघण्याची वेळ दुपारी १४:४० अशी आहे. त्यामुळे मंगुळुरु येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक सोयीची कनेक्टेड सेवा उपलब्ध होणार आहे. वेळेमध्ये काहीसा बदल केल्यास मुंबई ते मंगुळुरु साठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा ही गाडी एक कनेक्टेड सेवेचा पर्याय बनू शकते.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून, किमती वस्तू बरोबर घेऊन प्रवास करणे आता मोठे जिकिरीचे झाले आहे.. कोचिवली-चंदीगड संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने ५ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी सव्वासहाच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाईन कुन्नेल दिवाकरण (वय ४९, रा. सुरत, गुजरात) हे संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. ते झोपेत असल्याचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्याकडील ४ लाख ७७ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने, ३३ हजारचे डायमंड इअररिंग, २ हजार ६०० रुपयांचे चांदीचे दागिने, ३० हजारांची पाच घड्याळे, ४ हजार ५०० रुपये रोख व कागदपत्रे असा सुमारे ५ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल चोरला. या प्रकरणी दिवाकरण यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलिस अमलदार करत आहेत.