सावंतवाडी: आंबोली घाटरस्त्यात कोसळला भला मोठा दगड; रस्ता खचण्याची शक्यता

सावंतवाडी, दि. १७ जुलै: :  आंबोलीत काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान आज (दि.17) सकाळी आंबोली घाटमार्गात दरडीतील भला मोठा दगड कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही हानी झाली नाही. ही घटना  सकाळी ७ च्या सुमारास घडली. .या घटनेमुळे सद्या घाटमार्गातून एकेरी वाहतूक सुरू आहे. तर दगड कोसळलेल्या ठिकाणी लहान – मोठे धबधबे असून नेहमी तेथे पर्यटकांची रेलचेल असते. त्यावेळी अशी घटना घडली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती, मात्र, सकाळी ७ वा. सुमारास सदर घटना घडल्याने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. तर भला मोठा दरडीतील दगड थेट घाटमार्गात कोसळल्याने रस्त्याला मोठा खड्डा पडत भेग पडली आहे. त्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता आहे.



वाहन चालकांनी याबाबतची माहिती आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई यांना दिली. त्यानंतर त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली. सध्या जेसीबीच्या सहाय्याने हा दगड हटविण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेवेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. सद्यस्थितित या भागातून एकेरी वाहतूक सुरू असल्याची माहिती दत्तात्रय देसाई यांनी दिली आहे.
Facebook Comments Box

आंबोली: हुल्लडबाजीच्या सर्व मर्यादा पार, जिल्हा परिषद शाळेतच पर्यटकांची मद्य पार्टी

सावंतवाडी : आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी केल्याच्या बर्‍याच तक्रारी येत आहेत. आता तर काही पर्यटकांनी चक्क विद्येचे माहेरघर असलेल्या शाळेतच मद्याची पार्टी करून हद्दच पार केली आहे. आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हुल्लडबाज लोकांकडून विद्येचे मंदीर असणाऱ्या शाळेत मद्यपानास बसल्याची घटना घडली. भाजप माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. देवस्थान, मंदीर परिसरात असे प्रकार घडता नये याची काळजी पोलिसांकडून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा जनतेला यात लक्ष घालावे लागेल असा इशारा श्री. गावडे यांनी दिला आहे‌.





आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे येथील शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेले असता पालकांनी संबंधितांचा व्हिडिओ दाखवत आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. यानंतर पोलिस निरिक्षकांच संदीप गावडे यांनी लक्ष वेधल‌. श्री गावडे म्हणाले, अशा लोकांना पर्यटक म्हणणार नाही. केवळ मद्य पिऊन मजा करायला येणारी ही लोक आहेत. शाळेत केलेला हा प्रकार निंदनीय आहे. शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेलो असता तिथल्या पालकांनी ही व्यथा मांडली. मन हेलावून टाकणारा हा प्रकार आहे. पर्यटनाच्या नावाखाली होणारा त्रास कमी झाला पाहिजे. शाळा, देवस्थान असतील अशा ठिकाणी असे प्रकार घडता नयेत. बाहेरून येणारे पर्यटक या ठिकाणी हुल्लडबाजी करतात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. याबाबत पोलिसांनी माहिती देऊन त्याप्रकारचं निवेदन दिले आहे. आंबोली, चौकुळ भागात ज्या ठिकाणी असे प्रकार होतात त्याबद्दल पोलिसांना कल्पना दिली आहे. ताबडतोब कारवाईची मागणी केली आहे. विशेषतः शनिवारी, रविवारी असे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्याची गरज आहे. पोलिसांनी याबाबत दक्षता घेणार असल्याचे सांगितले. यापुढे असे प्रकार दिसल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तशी कारवाई न झाल्यास एक नागरिक म्हणून प्रतिकार आम्ही करू, स्थानिकांच्या बाजून आम्ही राहू. या अशाच गोष्टींमुळे मारहाणीसारखे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी योग्य उपाययोजना करावी, अशा लोकांवर कारवाई न केल्यास जनता म्हणून आम्हाला त्यात लक्ष घालावं लागेल असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी आंबोली प्रमुख गांवकर तानाजी गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे आदी उपस्थित होते.

Facebook Comments Box

१७ जुलै दिनविशेष – 17 July in History

जागतिक दिवस:
  • आंतरराष्ट्रीय न्याय दिन: World Day for International Justice
  • World Emoji Day
महत्त्वाच्या घटना:
  • १४८९: निजाम खान यांची सिकंदर शाह द्वितीय यांच्या नावाने दिल्लीचे सुल्तान म्हणून घोषित करण्यात आलं.
  • १८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
  • १८१९: ’अ‍ॅडॅम्स-ओनिस’ करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.
  • १८४१: अतिशय गाजलेल्या ’पंच’ या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • १९१७: किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी ’विंडसर’ हे आडनाव लावतील.
  • १९४७: मुंबई ते रेवस अशी जलवाहतुक करणार्‍या ’रामदास’ या फेरीबोटीला गटारी अमावस्येच्या रात्री ’काशाचा खडक’ या ठिकाणाजवळ जलसमाधी मिळुन सुमारे ७०० लोक मृत्यूमुखी पडले.
  • १९५०: देशांतील पहिली विमान दुर्घटना पंजाब राज्यातील पठाणकोट येथे घडून आली.
  • १९५३: अमेरिकन व्यंग चित्रकार व लेखक वॉल्ट डिज़्नी (Walt Disney) यांनी अमेरिकेतील अ‍ॅनाहेम, कॅलिफोर्निया या दोन ठिकाणी ‘डिस्‍नेलँड’ सुरू केले.
  • १९५५: वॉल्ट डिस्‍ने यांनी अ‍ॅनाहेम, कॅलिफोर्निया येथे ’डिस्‍नेलँड’ सुरू केले.
  • १९७५: अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
  • १९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
  • १९९३: तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘तेलगू थल्ली’ हा सर्वोच्‍च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान
  • १९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.
  • २०००: अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना’भरतनाट्य शिखरमणी’ पुरस्कार जाहीर
  • २००४: तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.






जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८८९: अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (मृत्यू: ११ मार्च १९७०)
  • १९१७: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९७८)
  • १९१८: ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष कार्लोसमनुएल अराना ओसोरिया यांचा जन्म.
  • १९१९: स्‍नेहल भाटकर – संगीतकार (मृत्यू: २९ मे २००७)
  • १९२३: कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २०००)
  • १९३०: बाबुराव बागूल – दलित साहित्यिक (मृत्यू: २६ मार्च २००८)
  • १९५४: अँजेला मेर्केल – जर्मनीच्या चॅन्सेलर
  • १९५९: भारतीय हिंदी आणि मल्याळम चित्रपट अभिनेत्री जरीना वहाब यांचा जन्मदिन.
  • १९६९: भारतीय हिंदी आणि भोजपुरी चित्रपट अभिनेता रवी किशन यांचा जन्मदिन






मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७९०: अ‍ॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (जन्म: ५ जून १७२३)
  • १८३५: मेघालय सम्राट तिरोट सिंग यांचे निधन.
  • १९२८: भारताच्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या आणि भारतीय संसदेच्या सदस्या मृणाल गोरे यांचे निधन.
  • १९७२: गुजरात राज्यातील प्रसिद्ध राजकारणी आणि ‘अखिल भारतीय किसान सभे’चे नेते, इंदुलाल याज्ञिक यांचे निधन.
  • १९९२: काननदेवी – बंगाली व हिंदी चित्रपटातील अभिनेत्री व गायिका [१९३० ते १९५०] (जन्म: २२ एप्रिल १९१६)
  • १९९२: शांता हुबळीकर – प्रभातच्या ’माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री, पुणे महापालिकेतर्फे ’बालगंधर्व पुरस्कार’ (जन्म: १४ एप्रिल १९१४)
  • २००५: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर एडवर्ड हीथ यांचे निधन.
  • २०१२: मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य (जन्म: २४ जून १९२८)
  • २०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४)
  • २०२०: सी.एस. शेषाद्री – भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक – पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (जन्म: २९ फेब्रुवारी १९३)





Facebook Comments Box

Konkan Railway | उद्याची जनशताब्दी एक्सप्रेस रद्द; कोचुवेली एक्सप्रेस उशिराने धावणार

   Follow us on        
Konkan Railway Updates: कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक अजूनही पूर्वपदावर आले नसून बऱ्याच गाड्या उशिराने धावत आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात अजून काही गाड्यांची भर पडली असून आताच हाती आलेल्या माहितीनुसार  उद्या दिनांक १७ जुलै रोजीची मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस (१२०५२) पूर्णतः रद्द करण्यात आली आहे तर आज दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११३  लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली एक्सप्रेस जी संध्याhttps://kokanai.in/wp-admin/edit.phpकाळी १६:४५ वाजता सुटणार होती ती १७ जुलैला ००:५० वाजता म्हणजे आज मध्यरात्री सोडण्यात येणार आहे.

Block "ganesh-makar-1" not found

Facebook Comments Box

Rain Alert: कोकण आणि पश्चिम महाराष्टात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस – हवामान खात्याचा इशारा

   Follow us on        
Rain Alert:मागील दोन दिवसात कोकणात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले होते. हवामान खात्याने पुढील चार दिवसहि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. खास करून कोकण पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांना सावधानतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Block "ganesh-makar-1" not found

हवामान खात्याने खालील जिल्ह्यांत मुसळधार पावसाची  शक्यता वर्तवली आहे. 
आज दिनांक 16 जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांना, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर तसेच इतर विभागातून  अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांना दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
उद्या दिनांक १७ जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांना, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
दिनांक १८ जुलै रोजी रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
दिनांक १९ जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांना, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
Facebook Comments Box

कुडाळ: शाळकरी मुलांकडून साळगाव जांभरमळा प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप

क्रिकेट व भजन मंडळाच्या माध्यमातून प्राप्त रक्कमेचा समाजोपयोगी विनियोग

   Follow us on        

साळगाव जांभरमळा येथील श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाने मे 2024 मध्ये क्रिकेट सामने आयोजित केले होते. जमा झालेल्या निधीतून या मंडळातील शाळकरी मुलांनी शैक्षणिक उपक्रम हाती घेतला. साळगाव जांभरमळा प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप करून या मंडळातील शाळकरी मुलांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. साळगाव पंचक्रोशी मध्ये या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या मंडळातील कु. चैतन्य हळदणकर, कु. स्वप्नील सामंत, कु. सर्वेश हळदणकर, कु. तुकाराम हळदणकर, कु. कुणाल पारकर, कु. अजिंक्य हळदणकर, कु. शंकर नागडे, कु. प्रथमेश डिचोलकर, कु. सोहम हळदणकर, कु. साहिल हळदणकर, कु. शुभम धुरी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकवर्गातून श्री. सुखानंद हळदणकर, श्री.निलेश सावंत, श्री.शुभम धुरी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. प्रशांत वेंगुर्लेकर सर, शिक्षक श्री. विनेश जाधव सर यांनी साळगाव जांभरमळा शाळेच्या वतीने श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाचे आभार व्यक्त केले

Facebook Comments Box

Konkan Railway | आजच्या रद्द, पुनर्नियोजित आणि उशिराने धावत असलेल्या गाड्या

   Follow us on        
रत्नागिरी दि.१६ जुलै: दिवाणखवटी जवळ रेल्वे मार्गावरील आलेला मोठा अडथळा बाजूला केला असून रेल्वे मार्गावरील वाहतूक काल संध्याकाळी चालू करण्यात आली आहे. मात्र संपूर्ण वाहतूक पूर्वपदावर येण्यास अजूनही काही अवधी लागेल. आज दिनांक १६ जुलै रोजी काही गाड्या आपले वेळापत्रक सोडून चालत असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार खालील गाड्या रद्द, पुनर्नियोजित आणि उशिराने चालविण्यात येत आहेत.
पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या

आज दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु जाणाऱ्या खालील गाड्या पूर्णतः रद्द काण्यात आल्या आहेत.

  • गाडी क्र. २०११२  मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी “कोकण कन्या” एक्सप्रेस
  • गाडी क्र. ११००४  सावंतवाडी रोड – दादर –  “तुतारी” एक्स्प्रेस
  • गाडी क्र. ५०१०४  रत्नागिरी – दिवा पॅसेंजर .
  • गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “जनशताब्दी” एक्सप्रेस
  • गाडी क्र. २२२३० मडगाव जं. – सीएसएमटी “वंदे भारत” एक्सप्रेस
  • गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. – सीएसएमटी एक्सप्रेस
दिनांक १७ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३४६  तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
दिनांक १८ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. १२२०२ कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
पुर्ननियोजीत Reschedule करण्यात करण्यात आलेल्या गाड्या  
  • दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३११ श्री गंगानगर – कोचुवेली एक्स्प्रेस दिनांक १७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता श्रीगंगानगर या स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
  • दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “तेजस” एक्स्प्रेस दिनांक १६ जुलै रोजी सकाळी 9 वाजता या सीएसएमटी स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
  • दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी  क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस तिरुनेलवेलीवरून आज सकाळी ०७:३५ वाजता प्रस्थान करणार आहे.
  • दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी  क्रमांक १८०४७ शालीमार – वास्को दा गामा एक्सप्रेस शालिमार येथून आज सकाळी ( दिनांक १६ जुलै रोजी) ०५:३० वाजता प्रस्थान करणार आहे.
उशिराने धावत असलेल्या गाड्या 
  • दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२६१७ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेस २४० मिनिटे उशिराने धावत आहे.
  • दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस ७४५  मिनिटे उशिराने धावत आहे.
  • दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११४  कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस प्रवास 845 मिनिटे उशिराने धावत आहे

 

 

Facebook Comments Box

१६ जुलै दिनविशेष – 16 July in History

१६ जुलै दिनविशेष – 16 July in History
महत्त्वाच्या घटना:
  • ६२२: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. चंद्रावर आधारित असलेल्या इस्लामिक (हिजरी) कॅलेंडरची या दिवसापासुन सुरूवात झाली.
  • १९४५: अमेरिकेने तयार केलेल्या अणूबॉम्बची न्यू मेक्सिकोमधील लास अलमॉस येथील वाळवंटात चाचणी
  • १९५१: ब्रिटन देशाने नेपाल देशाला स्वतंत्र घोषित केलं.
  • १९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.
  • १९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणार्‍या ’अपोलो-११’ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण
  • १९८१: भारताने अणुबॉम्ब ची चाचणी केली.
  • १९९२: भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. तत्पुर्वी ते उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
  • १९९८: गुजराथमधे शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याचा अधिकार आहे; असा निर्णय घेतल्याची माहिती गुजराथच्या शिक्षण राज्यमंत्री श्रीमती आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत दिली.
  • २००६: संयुक्त राष्ट्र परिषदेने कोरिया राष्ट्रावर बंदी घालण्याच्या ठरावास मंजूरी दिली.
  • २००७: बांगलादेशाच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीना वाजीद यांना भ्रष्ट्राचार प्रकरणी कैद करण्यात आलं.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७२३: सुप्रसिद्ध युरोपियन चित्रकार व रॉयल अकॅडमीच पहिले अध्यक्ष व्यंगचित्रकार सर  जोशुवा रेनाल्ड्स(Joshua Reynolds ) यांचा जन्मदिन.
  • १७७३: सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १७९२ – लंडन, इंग्लंड)
  • १८९६: नॉर्वे देशांतील प्रसिद्ध राजकीय राजकारणी, कामगार नेते सरकारी अधिकरी व लेखक तसचं, संयुक्त राष्ट्र संघाचे पहिले सरचिटणीस ट्रिग्वे हलवदान ली यांचा जन्मदिन.
  • १९०९: अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (मृत्यू: २९ जुलै १९९६)
  • १९२३: के. व्ही. कृष्णराव – भूदल प्रमुख, जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर व त्रिपूराचे राज्यपाल
  • १९१३: स्वामी शांतानंद सरस्वती – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ – अलाहाबाद, उत्तर प्रदेश)
  • १९१४: वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५)
  • १९१७: जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक (मृत्यू: १४ मे १९७८)
  • १९४३: प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (मृत्यू: ६ जानेवारी २०१०)
  • १९६८: धनराज पिल्ले – हॉकी पटू
  • १९७३: शॉन पोलॉक – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू
  • १९८३: ब्रिटीश वंशीय भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ यांचा जन्मदिन.
  • १९८४: कतरिना कैफ – चित्रपट कलाकार
  • अरुणा असफ अली
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १३४२: चार्ल्स (पहिला) – हंगेरीचा राजा (जन्म: ? ? १२८८)
  • १८८२: अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन(Abraham Lincoln) यांच्या पत्नी मेरी टॉड लिंकन(Mary Todd Lincoln) यांचे निधन.
  • १९८६: वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४)
  • १९९३: उस्ताद निसार हुसेन खाँ – पद्मभूषण (१९७०), रामपूर साहसवान घराण्याचे तराणा व ख्यालगायक, संगीत संशोधन अकादमीचे (SRA) निवासी शिक्षक, आकाशवाणी कलाकार, उस्ताद राशिद खाँ यांचे गुरू (जन्म: ? ? १९०९)
  • १९९४: नोबल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियन श्विन्गर(Julian Schwinger) यांचे निधन.
  • २००५: रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेता प्रसिद्ध भारतीय कन्नड भाषिक नाटककार आणि निनासम धर्म संस्था संस्थेचे संस्थापक के. वी. सुबन्ना यांचे निधन.
  • २००९: पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय कर्नाटिक संगीतकार व तमिळ चित्रपट पार्श्वगायिका दमल कृष्णस्वामी पट्टममल यांचे निधन.
  • २०१३: प्रसिद्ध भारतीय इतिहासकार व प्राध्यापक तसचं,  सोशल सेंटर फॉर स्टडीज इन सोशलचे संस्थापक-संचालक बरुण डी यांचे निधन.
Facebook Comments Box

सावंतवाडी: गरिबरथ एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या ७०० प्रवाशांच्या मदतीसाठी धावली रेल्वे प्रवासी संघटना

 

   Follow us on        

सावंतवाडी, दि. १५ जुलै :काल नातुवाडी (खेड) बोगद्याजवळ दरड कोसळल्याने पूर्ण कोकण रेल्वे ठप्प झाल्याने या मार्गावरील रेल्वे गाड्या ह्या विविध स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्यांत कित्येक प्रवासी अडकून पडले होते. १२२०२ गरीब रथ एक्स्प्रेस ही सावंतवाडी स्थानकात थांबवली होती. त्या गाडी ने प्रवास करणारे प्रवासी (एकूण प्रवासी ७०० पेक्षा अधिक) हे स्थानकावर असलेल्या अपुऱ्या खान -पानाच्या सुविधेमुळे त्रस्त झालेले होते, ट्रेन मधले पाणी देखील संपले होते, अशातच कोकण रेल्वे प्रवासी संघटना त्यांच्या मदतीला आली.

 

कोकण रेल्वे संघटना, सावंतवाडीचे  पदाधिकारी आणि कार्यकर्ते सावंतवाडी स्थानकावर पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. लगेचच त्यांनी कोकण रेल्वेच्या जन संपर्क अधिकाऱ्याला फोन करून गरीब रथ एक्स्प्रेस मधे पाणी भरायला लावले. लगेच अँब्युलन्सची देखील व्यवस्था संघटनेने केली. आणि सर्व लोकांना या प्रवाशांचा मदतीसाठी धावून या असे आवाहन देखील केले, त्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद देऊन जेमतेम रक्कम १०,००० रुपये जमा झाले.या  रक्कमेतून गरीबरथ एक्स्प्रेस मधील प्रवाशांसाठी ६०० पेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल्स (१ लिटर), बिस्किटे, आदी असे सुमारे ७०० लोकांना पुरणारे समान स्थानकावर जाऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी च्या पदाधिकाऱ्यांनी वाटप केले, त्यावेळी प्रवाशांना धीर देण्यात आला, संघटनेच्या कामाबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी संघटनेचे सचिव मिहिर मठकर, संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर, खजिनदार विहंग गोठोसकर,राज पवार आदी उपस्थित होते.

Facebook Comments Box

Konkan Railway on Track: अखेर कोकण रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत; TFC सर्टिफिकेट जारी

   Follow us on        
Konkan Railway on Track: कोकण रेल्वे ठप्प झाल्याने कालपासून कोकण रेल्वेमार्गावर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. तब्बल २४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथे आलेला मातीचा भराव दूर करण्यात आला असून रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने आताच दिलेल्या माहितीनुसार रेल्वे मार्ग वाहतूक सुरु करण्यासाठी योग्य असल्याचे सर्टिफिकेट Track Fit Certificate (TFC) आज ४:३० वाजता जारी करण्यात आले असून या मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search