सिंधुदुर्ग | सिंधुनगरीत काल रविवारी सायंकाळी प्रशासकीय संकुलानजीक असलेल्या बीएसएनएलच्या टॉवरला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत टॉवरवरील केबल व दूरसंचार विभागाचे स्क्रॅप मटेरियल जळून खाक झाले.
टॉवरच्या खाली वाढलेल्या गवतामुळे टॉवरला आग.
प्रशासकीय संकुलानजीकच बीएसएनएलचा टॉवर व कार्यालयीन इमारत तसेच निवासस्थाने आहेत. सध्या बीएसएनएल विभागाने ही मालमत्ता दुर्लक्षित केल्यामुळे वाढलेल्या गवतास रविवारी (दि. २८) सायंकाळी सव्वा ७ च्या दरम्यान लागलेली आग बीएसएनएलच्या टॉवरपर्यंत पोहोचली. या आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान कुडाळ एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुडाळ नगरपंचायतीचे अग्निशमन दल पोहचले. या आगीत बीएसएनएलच्या स्क्रॅप मटेरियलचे हे फार मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे बीएसएनएल विभागाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा निदर्शनास आला आहे. या टॉवरच्या खाली वाढलेले गवत आधीच साफ केले असते तर ही आग टॉवरपर्यंत पोहोचली नसती.
Konkan Railway News | मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस बद्दल एक महत्त्वाची बातमी आहे. चेन्नई येथील कोच फॅक्टरी मधून आठ डब्यांचा वंदे भारतचा नवा कोरा रेक आज मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे. हा नवा रेक काल 27 मे ला रात्री साडेदहा वाजता उडपी स्थानक सोडून मडगाव रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला होता.
मुंबई गोवा रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी झाल्याने या मार्गावर ही एक्सप्रेस चालू होणार आहे हे निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव स्थानकावर या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत या सोहोळ्याला उपस्थितीत राहणार आहेत. कोकण रेल्वे मार्ग धावणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही उद्घाटनाच्या फेरीवेळी केवळ निमंत्रितांना घेऊन धावणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या आधी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीचे उद्घाटन मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होणार आहे असे सांगण्यात आले होते. मात्र सद्यस्थिती पाहता हे उद्घाटन जून महिन्यात होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी – बारसू येथील रिफायनरीला होणारा विरोध काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. हल्लीच येथे जमिनीचा सर्व्हे करताना विरोधकांचा खूप मोठा विरोध पाहावयास मिळाला. त्यानंतर आंदोलने, उपोषण मोर्चा या मार्गाने कमी अधिक प्रमाणात विरोध होत होता. मात्र आता विरोधकांनी विरोध करण्यासाठी एका वेगळ्याच प्रकारचा अवलंब केला आहे.
ज्याठिकाणी मातीपरीक्षण करण्यासाठी खोदले होते नेमक्या त्याच ठिकाणी ग्रामस्थांनी सरकारचे श्राद्ध मांडले होते. त्यासाठी ग्रामस्थांनी चक्क मुंडण करून सरकारच्या नावाने बोंब मारली आहे.
सरकारने येथे जी दडपशाही चालवली आहे त्याविरोधात आम्ही सरकारचे श्राद्ध मांडून पिंडदान केले आहे. सरकारची दडपशाही अशीच चालू राहिली तर एकेदिवशी सरकारचे खरे श्राद्ध घातल्याशिवाय येथील शेतकरी स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी सरकारला दिला आहे.
Konkan Railway News |कोकण रेल्वेमार्गाचे १००% विद्युतीकरण झाले असून जवळपास सर्व गाड्या विद्युत इंजिनसह धावत आहेत. मात्र विद्युत इंजिनाचा तुटवडा निर्माण झाल्याने या मार्गावरील तिन गाड्या डिझेल लोको जोडून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाला घ्यावा लागला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर चालवल्या जाणाऱ्या मुंबई सीएसएमटी ते मडगाव (10103/20104) मांडवी एक्सप्रेस तसेच दिवा सावंतवाडी एक्सप्रेस (10105/10106) तसेच 50107/50108) सावंतवाडी- मडगाव -सावंतवाडी या तीन गाड्या दिनांक 27 मे रोजी च्या फेरीपासून इलेक्ट्रिक ऐवजी डिझेल लोको जोडून चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. इलेक्ट्रिक लोकोचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रेल्वेवर ही वेळ आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या आता पुन्हा एकदा डिझेल इंजिनसह धावणार आहेत. रेल्वेने हा निर्णय पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात घेतला आहे.
कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण झाल्यामुलळे इंधनाची बचत होत असून प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होत आहे.
Mansoon Updates |भारतीय हवामान विभागाने मान्सून देशभरात कधी पसरणार आहे, याची माहितीच जारी केली आहे. राज्यात १६ जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होणार आहे.
हवामान विभागाने मान्सूनचा चार आठवड्यांचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार देशात काही भागात २६ मे पासून मान्सूनची प्रगती दाखवली आहे.
कोकणात मान्सूनचे आगमन ९ जूनला होणार आहे. कोल्हापूर सातारा जिल्हय़ात याचवेळी तो पोचणार असला तरी तिथे जोर कमी राहणार आहे.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मान्सून १६ जूनपासून आगमन करणार आहे. तसेच याच कालावधीत तो देशातील उत्तर भागात पोहोचणार आहे.
शुक्रवारचा पाऊस मान्सून नव्हे
शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे वाळवाच्या पावसाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. वळवाचा पाऊस मान्सून दाखल होण्यापूर्वी आलेला असतो. यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
सध्या कुठे आहे मान्सून
सध्या मान्सूनचे वारेही कमकुवत राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पोर्ट ब्लेअरपासून 425 किमी अंतरावर असलेल्या नानकोवरी बेटावर मान्सून अडकला आहे. त्यामुळे मान्सून चार ते पाच दिवसांच्या विलंबाने देशात पोहोचू शकतो. केरळमध्ये साधारणपणे १ जून रोजी मान्सून दाखल होतो, परंतु यंदा तो ५ जून दरम्यान दाखल होऊ शकतो.
25 May 2023, The extended range forecast for coming 4 weeks for all India rainfall by IMD. pic.twitter.com/505KP0sGa2
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 25, 2023

Vision Abroad
