
Konkan Railway | प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन उन्हाळी हंगामासाठी सोडलेल्या दोन विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.या गाडयांना सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिल्याने गणेशचतुर्थी दरम्यान गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना या गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.
1) 01139/01140 Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly)
आठवड्यातून दोन दिवशी धावणारी ही विशेष रेल्वे गाडी जून-२०२३ अखेरपर्यंत चालविण्यात येणार होती तिला मुदतवाढ देण्यात आली आहे.
01139 Nagpur – Madgaon Jn. Special – या गाडीला 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
01140 Madgaon Jn. – Nagpur Special – या गाडीला 01 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
2) Train no. 02198 / 02197 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातुन एकदा धावणारी ही विशेष रेल्वे गाडी जून-२०२३ अखेरपर्यंत चालविण्यात येणार होती तिला मुदतवाढ देण्यात आली आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Special – या गाडीला 29 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
02197 Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Special – या गाडीला 02 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या दोन्ही गाड्या या आधी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार (पावसाळी), स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहेत
Related News
प्रवाशांना खुशखबर; नागपूर-मडगाव या विशेष गाडीला मुदतवाढ
कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात येणार्या ‘या’ गाडीचा जुलैपर्यंत विस्तार..
नवी दिल्ली :सरकारने PAN आणि Aadhaar Card लिंक करणे अनिवार्य केले आहे. तुम्ही जर आतापर्यंत ही दोन्ही कागदपत्रं लिंक केली नसल्यास ३० जून २०२३ ही शेवटची तारीख आहे. ३० जून २०२३ पर्यंत आधार – पॅन लिंक न केल्यास पॅन कार्ड काम करणार नाही. असे पॅन कार्ड पुनः कार्यरत करण्यासाठी पुढील एक महिन्यासाठी अवधी भेटू शकतो मात्र मोठ्या रकमेचा दंड बसू शकतो. त्यामुळे आजच आपले आधार – पॅन लिंक करून निश्चित व्हा.
आधार – पॅन कार्ड लिंक करण्याची प्रोसेस खूपच सोपी असून, तुम्ही घरबसल्या मिनिटात हे करू शकता. यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही www.incometax.gov.in ला देखील ओपन करू शकता. वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला क्विक लिंकमध्ये Link Aadhaar या पर्यायावर जावे लागेल. हा पर्याय तुम्हाला वेबपेजच्या उजव्या बाजूला दिसेल. यावर टॅप केल्यानंतर पॅन नंबर, आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.
आता तुम्हाला लिंक आधार हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आधार व पॅन कार्ड लिंक होईल. जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल. तसेच, तुम्ही आधीच आधार कार्ड व पॅन लिंक करण्याची रिक्वेस्ट केली असल्यास उजव्या बाजूला दिलेल्या Link Aadhaar Status वर क्लिक करून माहिती पाहू शकता. यानंतर आधार व पॅन नंबर देवून View Link Aadhaar Status वर क्लिक करा. या प्रोसेसनंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. दरम्यान, PAN आणि Aadhaar Card लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.
रत्नागिरी :दापोली पालगडमध्ये एका व्यक्तीकडे 20 गावठी बॉम्ब पोलिसांना सापडले आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या अतिरिक्त माहितीनुसार, पोलीस उपविभागीय अधिकारी खेड राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतकर, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, घाडगे, बांगर, एएसआय मिलिंद चव्हाण, विकास पवार यांचा समावेश असलेल्या पथकाने सापळा रचून गावठी बॉम्ब घेऊन निघण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीचे नाव रमेश पवार असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांनी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी बॉम्ब शोध पथकाला पाचारण केले आहे.
बॉम्ब बनविण्याचे रॅकेट सक्रिय?
या आधी दापोली तालुक्यातील विसापूर येथील सोवेली दरम्यानच्या रस्त्यालगत पाच जिवंत बॉम्ब सापडले होते त्यामुळे तालुक्यात गावठी बॉम्ब बनवणारे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी केलेल्या आजच्या कारवाईमुळे हे बॉम्ब तयार करणारे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याशी याचे काही धागेदोरे असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
रत्नागिरी – प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणाला फायद्यापेक्षा तोटाच होणार आहे, कोकणातील पर्यावरणाची हानी होणार आहे त्यामुळे या प्रकल्पाच्या कोकणावरील होणाऱ्या दुष्परिणामाविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी Swaru Entertainment मधील कलाकार टीम एक समाजप्रबोधन पथनाट्य घेऊन आले आहे.
हे पथनाट्य शक्य तिथे सादर करून सोशल मीडियावर प्रसिद्ध करून त्याद्वारे कोकणात होणाऱ्या घातक रिफायनरी विरोधी समाजप्रबोधन केले जाईल असे या टीमचे म्हणणे आहे.
विडिओ पाहण्यासाठी
Facebook page –
https://fb.watch/l9inQxHINf/?mibextid=Nif5oz
YouTube channel –
Vande Bharat Express | सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा एक धक्कादायक विडिओ सध्या सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
वंदे भारत एक्सप्रेसच्या छताला गळती लागली असून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी गाडीत शिरत आहे आणि रेल्वेचे कर्मचारी हे पाणी भरून बाहेर टाकत असल्याचा एक विडिओ ट्विटर वर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे केरळ कोन्ग्रेस च्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वर हा विडिओ पोस्ट केला गेला आहे.
Farewell blankets, hello umbrellas: Vande Bharat redefines comfort. pic.twitter.com/8mTKeaqkYL
— Congress Kerala (@INCKerala) June 14, 2023
मंडणगड, प्रतिनीधी:-गणेश नवगरे | रविवार दिनांक ११.०६.२०२३ रोजी पालवणी गोसावीवाडी येथिल नवनाथ मंदिर मध्ये नवनाथांची पुजा आरथी व दरवर्षा प्रमाणे या वर्षिही भंडारा साजरा करण्यात आला. दरवर्षी मृग नक्षत्रात एका रविवारी भंडारा घालण्यात येतो. यासाठी गावातील नाथभक्तगण मंडळी आवर्जून उपस्थित राहतात. ह्या भंडाऱ्याचे निमित्ताने तेंडुलकर कुटुंबियांनी नाथ महाराजांकडे इच्छा दर्शवली होती त्याची परतफेड म्हणुन चांदीची नाग मूर्ती नाथ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली. भंडाऱ्याचे निमित्ताने महाराजांना गोडाचे नैवेद्य दाखवले जाते.
त्याचप्रमाणे नाथांच्या भंडाऱ्या सोबत बाजूला असलेल्या काळकाईमाता मंदिर मध्ये देवीला राखण सुद्धा दिली जाते. दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी होत असल्याने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की भंडारा म्हणजे राखणं चे तिखट जेवण. पण असे नाही.
सदरील कार्यक्रमासाठी महिला पुरुष लहान मुले दरवर्षी उपस्थित राहतात. आपण सर्व सुखी समाधानी राहावे. सर्व संकटे दूर जाओ. यासाठी प्रार्थना म्हणून देवाला विनवणी यामाध्यमातून केली जाते.
Vande Bharat Express | बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा सेमी-हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेस संबंधी एक नवी बातमी आली आहे. या एक्सप्रेसच्या उद्घाटनाची नवीन तारीख समोर आली आहे. मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन 26 जून रोजी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 जूनपासून मुंबई-गोवा मार्गावर बहुप्रतिक्षित सेमी-हाय-स्पीड वंदे भारत ट्रेन आणि देशातील अजून चार मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा सेमी-हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्धाटन ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे पुढे ढकलण्यात आले. 3 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी विडिओ कॉन्फरन्सच्या पद्धतीने या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार होते. त्यानंतर 05 जूनपासून ट्रेनची नियमित सेवा सुरू होणार होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाड्यांचे लोकार्पण करतील अशी अपेक्षा आहे. त्याच दिवशी ज्या इतर मार्गांवर गाड्या सोडल्या जातील त्या बेंगळुरू-हुबळी, पटना – रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर असतील. याआधी एका दिवसात जास्तीत जास्त दोन वंदे भारत एक्सप्रेसंना हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. आता 26 जून रोजी एकाच दिवशी 5 वंदे भारत एक्सप्रेसंना हिरवा झेंडा दाखविण्याची ही पाहिलीच वेळ असेल.
Content Protected! Please Share it instead.