०४ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 20:15:39 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 29:21:33 पर्यंत
  • करण-गर – 08:54:48 पर्यंत, वणिज – 20:15:39 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शोभन – 21:44:53 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:32
  • सूर्यास्त- 18:51
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 11:22:00
  • चंद्रास्त- 25:19:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिवस
  • आंतरराष्ट्रीय गाजर दिवस
  • व्हिटॅमिन सी दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1882 : ब्रिटनची पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडनमध्ये उघडली.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – ब्रिटीश आणि अमेरिकन सैन्याने बुखारेस्ट, रोमानियावर बॉम्ब टाकला आणि 3,000 नागरिक ठार झाले.
  • 1949 : 11 पश्चिम युरोपीय देश आणि अमेरिकेसह 12 देशांनी नाटो (NATO) ची स्थापना केली.
  • 1968 : जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.
  • 1968 : नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले.
  • 1990 : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1823 : ‘सर कार्ल विल्हेम सीमेन्स’ – जर्मन-ब्रिटिश विद्युत अभियंता यांचा जन्म. (मृत्यू: 19 नोव्हेंबर 1883)
  • 1842 : ‘एडवर्ड लुकास’ – फ्रेंच गणिती यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑक्टोबर 1891)
  • 1893 : ‘चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन’ – पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 3 जुलै 1985)
  • 1906 : ‘एवेरी फिशर’ – फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 फेब्रुवारी 1994)
  • 1902 : ‘पं नारायणराव व्यास’ – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 1984)
  • 1932 : ‘जयंती पटनायक’ – राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा( (मृत्यू: 28 सप्टेंबर 2022)
  • 1933 : ‘बापू नाडकर्णी’ – डावखुरे मंदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1938 : ‘आनंद मोहन चक्रबर्ती’ – भारतीय अमेरिकन सूक्ष्मजीव वैज्ञानिक (मृत्यू: 10 जुलै 2020)
  • 1973 : ‘चंद्र शेखर येलेती’ – भारतीय संचालक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1617 : ‘जॉन नेपिअर’ – स्कॉटिश गणितज्ञ आणि लॉगॅरिथम सारणीचे जनक यांचे निधन.
  • 1892 : ‘जोस मारिया कास्त्रो मैड्रिज़’ – कोस्टा रिका चे पहले आणि पाचवे राष्ट्रपति (जन्म: 1 सप्टेंबर १८१८)
  • 1923 : ‘जॉन वेन’ – ब्रिटिश गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1834)
  • 1929 : ‘कार्ल बेन्झ’ – मर्सिडीज-बेंझ कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 25 नोव्हेंबर 1844)
  • 1931 : ‘आंद्रे मिचेलिन’ – फ्रेन्च उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 16 जानेवारी 1853)
  • 1968 : ‘मार्टिन ल्यूथर किंग’ (ज्युनियर) – नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या झाली. (जन्म: 15 जानेवारी 1929)
  • 1979 : ‘झुल्फिकार अली भत्तो’ – पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 5 जानेवारी 1928)
  • 1987 : सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार यांचे निधन. (जन्म: 7 मार्च 1911)
  • 1996 : ‘आनंद साधले’ – संस्कृत आणि मराठी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 5 जुलै 1920)
  • 2000 : ‘वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर’ – कलादिग्दर्शक यांचे निधन.
  • 2016 : ‘पी. ए. संगमा’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 1 सप्टेंबर 1947)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार इरोड – बारमेर विशेष गाडी

   Follow us on        
Konkan Railway: उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उन्हाळी हंगाम – २०२५ मध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीचा तपशील खालील प्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०६०९७ / ०६०९८ इरोड जंक्शन – बारमेर – इरोड जंक्शन साप्ताहिक विशेष:
गाडी क्रमांक ०६०९७ इरोड जंक्शन – बारमेर साप्ताहिक विशेष ही गाडी दर मंगळवारी, ०८/०४/२०२५ ते १०/०६/२०२५ पर्यंत इरोड जंक्शन येथून सकाळी ०६:२० वाजता सुटेल आणि गाडी तिसऱ्या दिवशी ०४:३० वाजता बारमेरला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०६०९८ बाडमेर – इरोड जंक्शन साप्ताहिक विशेष ही गाडी दर शुक्रवारी, ११/०४/२०२५ ते १३/०६/२०२५ पर्यंत बाडमेरहून रात्री २२:५० वाजता सुटेल आणि इरोड जंक्शन येथे तिसऱ्या दिवशी २०:१५ वाजता पोहोचेल.
ही गाडी तिरुपूर,पोदनूर जंक्शन, पलक्कड, शोरानूर जं., तिरूर. कोझिकोड, कन्नूर, कासारगोड, मंगळुरु जं., उडुपी, कुंदापूर, मुकांबिका रोड बयंदूर (एच), भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, अंकोला, कारवार, मडगाव जं., करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली , वैभववाडी रोड, राजापूर रोड. रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड, पालघर, वापी, सुरत, भरुच जं., वडोदरा जं., नडियाद जं., साबरमती, भिलडी जं., राणीवरा, मारवाड भीनमाळ, मोदरण, जालोर, मोक्लधारी, जं. आणि बायतु स्टेशनला थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ कोच : थ्री टायर एसी – ०२ कोच, स्लीपर – १४ कोच, जनरल – ०४ कोच, एसएलआर – ०२.
Facebook Comments Box

०३ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 21:44:19 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 07:03:22 पर्यंत, मृगशिरा – 29:52:11 पर्यंत
  • करण-कौलव – 10:43:46 पर्यंत, तैतुल – 21:44:19 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सौभाग्य – 24:00:59 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:33
  • सूर्यास्त- 18:51
  • चन्द्र-राशि-वृषभ – 18:22:55 पर्यंत
  • चंद्रोदय- 10:20:59
  • चंद्रास्त- 24:21:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिवस :
  • जागतिक जलचर प्राणी दिवस World Aquatic Animal Day
  • राष्ट्रीय चालण्याचा दिवस National Walking Day
  • जागतिक पार्टी दिवस World Party Day
  • राष्ट्रीय बायोमेकॅनिक्स दिवस National Biomechanics Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1948: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 1973: मोटोरोलाचे संशोधक मार्टिन कूपर यांनी जगातील पहिला मोबाईल कॉल केला.
  • 1975 : बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यानंतर अनातोली कार्पोव्ह जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला.
  • 1984 : राकेश शर्मा, पहिले भारतीय अंतराळवीर, यांनी सोयुझ टी-11 अंतराळयानातून उड्डाण केले. ते 7 दिवस 21 तास 40 मिनिटे अंतराळात होते.
  • 2000 : आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
  • 2010: ऍपल कंपनीने आयपॅड टॅबलेट संगणकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली.
  • 2016: पनामा पेपर्स या कायदेशीर दस्तऐवजाने सुमारे 2,14,488 कंपन्यांची गोपनीय माहिती उघड केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1781 : ‘स्वामीनारायण’ – हिंदू धर्माच्या स्वामीनारायण संप्रदाय संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1830)
  • 1882 : ‘नाथमाधव’ – सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 21 जून 1928)
  • 1898 : ‘हेन्री लुस’ – टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 28 फेब्रुवारी 1967)
  • 1903 : ‘कमलादेवी चट्टोपाध्याय’ – मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑक्टोबर 1988)
  • 1904: ‘रामनाथ गोएंका’ – इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑक्टोबर 1991)
  • 1914 : ‘सॅम माणेकशा’ – फील्ड मार्शल यांचा जन्म. (मृत्यू: 27 जून 2008)
  • 1930 : ‘हेल्मुट कोल्ह’ – जर्मन चॅन्सेलर यांचा जन्म.
  • 1934 : ‘जेन गुडॉल’ – इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1942 : ‘आदि गोदरेज’ – भारतातील प्रसिद्ध उद्योगपति आणि प्रसिद्ध औद्योगिक घराने गोदरेज समूह उद्योगाचे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1949 : ‘रामा नारायणन’ – भारतीय दिग्दर्शक व निर्माते यांचा जन्म.
  • 1955 : ‘हरिहरन’ – सुप्रसिद्ध गायक यांचा जन्म.
  • 1962 : ‘जयाप्रदा’ – चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य यांचा जन्म.
  • 1965 : ‘नाझिया हसन’ – पाकिस्तानी पॉप गायिका यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०००)
  • 1973 : ‘निलेश कुलकर्णी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1680 : छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे निधन. (जन्म: 19 फेब्रुवारी 1630)
  • 1891 : ‘एडवर्ड लूकास’ – फ्रेन्च गणिती यांचे निधन. (जन्म: 4 एप्रिल 1842)
  • 1981 : ‘जुआन त्रिप्प’ – पॅन अमेरिकन वर्ल्ड एरलाईन्स चे स्थापक यांचे निधन.(जन्म: 27 जून 1899)
  • 1985 : ‘डॉ. वासुदेव विष्णू मिराशी’ – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक यांचे निधन. (जन्म: 13 मार्च 1893)
  • 1998 : ‘मेरी कार्टराइट’ – इंग्लिश गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 17 डिसेंबर 1900)
  • 1998 : ‘हरकिसन मेहता’ – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार यांचे निधन.
  • 2012 : ‘गोविंद नारायण’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म: 5 मे 1916)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

०२ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 23:52:35 पर्यंत
  • नक्षत्र-कृत्तिका – 08:50:45 पर्यंत
  • करण-भाव – 13:10:01 पर्यंत, बालव – 23:52:35 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-आयुष्मान – 26:49:28 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:34
  • सूर्यास्त- 18:51
  • चन्द्र-राशि-वृषभ
  • चंद्रोदय- 09:24:00
  • चंद्रास्त- 23:15:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस World Autism Awareness Day
  • बालचित्र पुस्तक दिन Children’s Picture Book Day
  • नॅशनल फेरेट डे National Ferret Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1870: ‘गणेश वासुदेव जोशी’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची ( पब्लिक असेंब्लीची) स्थापना झाली.
  • 1982: फॉकलंड युद्ध – अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे ताब्यात घेतली.
  • 1894: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
  • 1989 : तणावग्रस्त संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह हवाना, क्युबा येथे आले.
  • 1990 : भारतीय लघु उद्योग विकास बैंक (Small Industries Development Bank of India (SIDBI)) स्थापना झाली.
  • 1998 : निजामुद्दीन तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस कोकण रेल्वेवर धावू लागली.
  • 2011: भारताने 28 वर्षांनी क्रिकेट विश्वचषक जिंकला
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1618 : ‘फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी’ – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1805 : ‘हान्स अँडरसन’ – डॅनिश परिकथालेखक यांचा जन्म.
  • 1875 : ‘वॉल्टर ख्राइसलर’ – ख्राइसलर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 18 ऑगस्ट 1940)
  • 1898 : ‘हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय’ – हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू यांचा जन्म. (मृत्यू: 23 जून 1990)
  • 1902 : पतियाळा घराण्याचे गायक बडे गुलाम अली खाँ यांचा जन्म. (मृत्यू: 25 एप्रिल 1968)
  • 1926 : कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1979)
  • 1942 : भारतीय इंग्रजी-अभिनेते रोशन सेठ यांचा जन्म.
  • 1969 : हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण यांचा जन्म.
  • 1972 : भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा जन्म.
  • 1981 : भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन कपिल शर्मा यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1872 : ‘सॅम्युअल मोर्स’ – मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1791)
  • 1933 : महाराजा के. एस. रणजितसिंह – क्रिकेट खेळाडू यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1791)
  • 1992: आगाजान बेग ऊर्फ आगा – हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते यांचे निधन.
  • 2005 : पोप जॉन पॉल (दुसरा) यांचे निधन. (जन्म: 18 मे 1920)
  • 2009 : गजाननराव वाटवे – गायक आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म: 8 जून 1917)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

सीमावर्ती भागातील मराठी जनतेवर कोकण रेल्वेचा अन्याय

   Follow us on        

Konkan Railway:सीमावर्ती भागातील मराठी जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना आता कोकण रेल्वे प्रशासन सुद्धा त्यांच्यावर अन्याय करत असल्याचे सिद्ध झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर पूर्वी चालणारी कारवार- रत्नागिरी गाडी बंद करून कोकण रेल्वेने कारवारच्या मराठी माणसावर अन्याय केला असल्याची खंत कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी व्यक्त केली आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसचा अतिरिक्त भार कमी व्हावा म्हणून या गाडीला समांतर अशी दुसरी गाडी असावी अशी वारंवार मागणी व्हायला लागली व कोकणकन्याला पर्याय म्हणून कारवार ते मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस (आताची मुंबई-मंगळुरू एक्सप्रेस) सुरू करण्यात आली होती. परंतु सुरेश कलमाडी रेल्वेमंत्री झाल्यानंतर  या गाडीचा थेट मेंगलोर पर्यंत या गाडीचा विस्तार केला गेला.

कारवार या शहरांमध्ये 80 टक्के मराठी लोक राहतात त्यांची मूळ कुलदैवता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. जसे गोव्यामध्ये मराठी तसेच कारवार मधले मराठी हे मूळचे मराठीच आहेत. मेंगलोर पर्यंत विस्तार केला गेलेल्या या गाडीचा कारवार वासियांना कोणताही फायदा होत नाही कारण मेंगलोर पासून कारवारला गाडी येईपर्यंत त्याची जनरल डबे फुल झालेले असतात. इथे पण “केला तुका झाला माका” अशी परिस्थिती आहे.

या गाडीला दक्षिणेकडे मेंगलोर पर्यंत आता दोन थांबे वाढवले परंतु सावंतवाडीला मात्र थांबा दिला जात नाही इथेही अन्याय. ही गाडी मराठी माणसांचीच होती ती थेट मेंगलोरला नेली आहे. मुळात कोकण रेल्वे ही सुद्धा महाराष्ट्रापुरती सीमित होती परंतु जॉर्ज फर्नांडिस यांच्या दूरदर्शी विचारांमुळे कोकण रेल्वेचा मेंगलोर पर्यंत विस्तार करण्यात आला. पण त्यामुळे ज्या महाराष्ट्राने कोकण रेल्वेसाठी पन्नास वर्षे वाट बघितली त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना अनेक सीमावर्ती मराठी माणसांच्या तोंडाला आता कोकण रेल्वेने पाने पुसल्यासारखीच आहेत. आता सीएसटी मेंगलोर गाडीला कारवार साठी स्वतंत्र डबा जोडण्यात यावा व सीमावर्ती कारवारच्या मराठी लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर पत्रकाद्वारे केली आहे.

 

 

Facebook Comments Box

०१ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 26:35:13 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 11:07:41 पर्यंत
  • करण-वणिज – 16:07:15 पर्यंत, विष्टि – 26:35:13 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-विश्कुम्भ – 09:47:34 पर्यंत, प्रीति – 30:06:45 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:32
  • सूर्यास्त- 18:50
  • चन्द्र-राशि-मेष – 16:31:07 पर्यंत
  • चंद्रोदय- 08:31:00
  • चंद्रास्त- 22:08:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • एप्रिल फूल डे April Fools Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1887 : मुंबई अग्निशमन दलाची स्थापना.
  • 1895 : भारतीय सैन्याची स्थापना.
  • 1924 : रॉयल कॅनेडियन हवाई दलाची स्थापना झाली.
  • 1928 : पुणे वेधशाळेचे काम सुरू झाले.
  • 1933 : कराची येथे भारतीय वायुसेनेचे पहिले उड्डाण.
  • 1935 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) स्थापना.
  • 1936 : ओरिसा राज्याची स्थापना.
  • 1937 : रॉयल न्यूझीलंड हवाई दलाची स्थापना.
  • 1955 : गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.
  • 1957 : भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.
  • 1973 : कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर प्रकल्प सुरू करण्यात आला.
  • 1976 : ऍपल इंक. (Apple Inc.) कंपनी ची स्थापना झाली.
  • 1990 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्‍न प्रदान.
  • 2004 : गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1578 : ‘विल्यम हार्वी’ – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 3 जून 1657)
  • 1621 : ‘गुरू तेग बहादूर’ – शिखांचे नववे गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 24 नोव्हेंबर 1675)
  • 1815 : जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1898)
  • 1889 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म. (मृत्यू: 21 जून 1940)
  • 1907 : भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी यांचा जन्म.
  • 1912 : हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर यांचा जन्म. (मृत्यू: 26 सप्टेंबर 1988)
  • 1936 : आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा जन्म.
  • 1941 : भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1984 : ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन. (जन्म: 4 एप्रिल 1902)
  • 1989 : समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव जोशी यांचे निधन. (जन्म: 12 नोव्हेंबर 1904)
  • 1999 : भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन.
  • 2000 : कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन. (जन्म: 14 फेब्रुवारी 1916)
  • 2003 : गायक आणि नट प्रकाश घांग्रेकर यांचे निधन.
  • 2006 : बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर याचं निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1925)
  • 2012 : भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे याचं निधन. (जन्म: 18 मार्च 1921)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

सावंतवाडी – सांगेली येथे अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

   Follow us on        

सावंतवाडी  : सांगेली खालचीवाडी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. या मुलाचे नाव निशांत धोंडिबा नार्वेकर असून त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, निशांत नार्वेकर हा आपल्या आई-वडिलांसोबत सांगेली खालचीवाडी येथे राहत होता. तो स्थानिक हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीत शिकत होता.सोमवारी त्याच्या घरी आई-वडील नसल्याने तो एकटाच होता. याच संधीचा गैरफायदा घेत त्याने आपल्या राहत्या घरातील खोलीचा दरवाजा बंद करून वाशाला दोरीने गळफास घेतला. ही घटना निशांतचा मामे भाऊ दर्श पोतदार याला समजताच त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार मनोज राऊत आणि पोलीस शिपाई संतोष गलोले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: खुशखबर! उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर अजून एका विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसोबत पालक पिकनिकचं प्लानिंग करतात. तर अनेक पालक हे आपल्या मुलांसोबत गावी जात असतात. यामुळे दैनंदिन रेल्वे सेवेवर अधिक भार येतो आणि गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होते. उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेने  कोकण रेल्वे मार्गावर अजून काही उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

१) गाडी क्रमांक ०११०४ / ०११०३ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष:

गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष ०६/०४/२०२५ ते ०४/०५/२०२५ पर्यंत दर रविवारी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन. साप्ताहिक विशेषांक लोकमान्य टिळक (टी) येथून ०७/०४/२०२५ ते ०५/०५/२०२५ पर्यंत दर सोमवारी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 21:40 वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.

ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३ कोच, थ्री टायर इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

आरक्षण

गाडी क्रमांक ०११०४ चे आरक्षण दिनांक ०२/०४/२०२५ रोजी सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (PRS), इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल.

Facebook Comments Box

Weather Update: पुढील पाच दिवस राज्याला अवकाळी पावसाचा इशारा; वाचा कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस पडणार

   Follow us on        
Weather update:महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक महत्वाची  बातमी आहे. भारतीय हवामान केंद्राने गुढीपाडव्यापासून आता संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसाचे इशारे दिले आहेत.
दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून अवकाळी पावसाला आजपासून सुरुवात होणार आहे. मार्चच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मार्चला  ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. येलो अलर्ट नसला तरी पुण्यासह मध्य महाराष्ट्र कोकण व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 1 एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय. 2 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रला अवकाळी पाऊस झोडपणार आहे.
अवकाळी पाऊस कशामुळे येतोय?
हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांवर आहे. या चकरावाताचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या अंदमान समुद्रासह आजूबाजूच्या परिसरात कायम आहे परिणामी महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
31 मार्च: ठाणे पालघर नाशिक नगर धुळे नंदुरबार सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट.
– रायगड रत्नागिरी पुणे सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव पावसाची शक्यता
1 एप्रिल: ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक, नगर जळगाव छत्रपती संभाजी नगर बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट.
– पालघर सोलापूर धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली नंदुरबार धुळे जिल्ह्यांना पावसाचा इशारा
2 एप्रिल: संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट
Facebook Comments Box

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी वाद….नेमके प्रकरण काय? 

 

   Follow us on        

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हे एक वादग्रस्त प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे., जे ऐतिहासिक सत्यता आणि सांस्कृतिक भावनांभोवती फिरते. ही समाधी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ आहे आणि ती वाघ्या नावाच्या कुत्र्याची असल्याचे मानले जाते. लोककथेनुसार, वाघ्या हा शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा होता, ज्याने १६८० मध्ये महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या चितेत उडी मारून प्राण त्यागले. ही कथा निष्ठेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे, विशेषत: राम गणेश गडकरी यांच्या “राजसंन्यास” नाटकामुळे, ज्यामध्ये या घटनेचा उल्लेख आहे.

प्रकरणाची मुळे अशी आहेत की, १९२७ मध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतर सुमारे १०-१२ वर्षांनी, म्हणजे १९३६ मध्ये, रायगड स्मारक समितीने गडकरींच्या नाटकाला आधार मानून वाघ्याचा पुतळा आणि समाधी उभारली. पण या कथेला ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नाही. शिवकालीन दस्तऐवज किंवा समकालीन नोंदींमध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याचा किंवा अशा घटनेचा उल्लेख सापडत नाही. भारतीय पुरातत्व विभागानेही (ASI) असा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या समाधीवरून वाद का आहे? काही इतिहासकार आणि शिवप्रेमी, जसे की संभाजीराजे छत्रपती, यांचे म्हणणे आहे की ही समाधी कपोलकल्पित आहे आणि शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ अशी संरचना असणे हा त्यांच्या स्मृतीचा अपमान आहे. संभाजीराजे यांनी २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही समाधी ३१ मेपर्यंत हटवण्याची मागणी केली, कारण ती ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध नसलेली आणि रायगडावरील अतिक्रमण आहे. याउलट, काही लोकांना ही समाधी सांस्कृतिक आणि भावनिक मूल्य असलेली वाटते, कारण ती निष्ठेचे प्रतीक म्हणून पाहिली जाते.

दुसरीकडे, संभाजी भिडे यांनी वाघ्याची कथा सत्य असल्याचा दावा केला आहे आणि संभाजीराजेंच्या विधानाला विरोध दर्शवला आहे. त्यांनी ही कथा लोकपरंपरेतून आल्याचे सांगितले, परंतु ठोस पुराव्यांऐवजी त्यांचा भर भावनिक आणि पारंपरिक विश्वासांवर आहे.

भारतीय पुरातत्व विभागानेही असा खुलासा केला आहे की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे ऐतिहासिक महत्त्व सिद्ध करणारी कोणतीही माहिती किंवा पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत.

या वादात अनेक बाजू आहेत:

ऐतिहासिक सत्यतेचा मुद्दा: वाघ्याची कथा लोककथा असू शकते, पण ती सिद्ध करणारे ठोस पुरावे नाहीत. काहींच्या मते, समाधी उभारताना सापडलेली हाडे उद-मांजराची होती, कुत्र्याची नव्हे.

सांस्कृतिक महत्त्व: काही समुदाय, उदा. धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके, यांनी समाधी हटवण्यास विरोध केला आहे, कारण त्यांना ती परंपरेचा भाग वाटते.

राजकीय आणि सामाजिक आयाम: हा वाद औरंगजेबाच्या कबरीसारख्या इतर प्रकरणांशी जोडला गेला असून, काहींनी याला राजकीय रंग दिला आहे.

थोडक्यात, वाघ्या कुत्र्याची समाधी ही एका कथेवर आधारित आहे, ज्याला ऐतिहासिक आधार नाही, पण ती सांस्कृतिक प्रतीक म्हणून टिकून आहे. सध्या, संभाजीराजे आणि समर्थक ती हटवण्याची मागणी करत आहेत, तर काहींना ती ठेवायची आहे. हे प्रकरण ऐतिहासिक अचूकता आणि भावनिक मूल्यांमधील संघर्षाचे उदाहरण आहे…

 

 

 

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search