धक्कादायक: सरपंच होता यावे यासाठी स्वतःच्या मुलीचा जीव घेतला!

   Follow us on        

नांदेड जिल्ह्यातील केरूर गावात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. २८ वर्षीय पांडुरंग कोंडमंगले याने आपल्या ६ वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी एका मुलीला – प्राचीला – ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे सर्व केवळ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी उभे राहण्यासाठी!

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात दोन मुलांपेक्षा जास्त मुल असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी करता येत नाही. पांडुरंगकडे एक मुलगा आणि जुळ्या दोन मुली अशी तीन मुले असल्याने तो सरपंचपदासाठी अपात्र ठरत होता. जून २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी तो सरपंच होण्यास आतुर होता.त्याने गावातील सरपंच गणेश शिंदे यांच्याशी सल्लामसलत केली. दोघे मित्र असल्याने त्यांनी कट रचला आणि जुळ्या मुलींपैकी मोठी मुलगी प्राचीला काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

२९ जानेवारी २०२६ रोजी पांडुरंगने प्राचीला मोटारसायकलवर बसवून शेजारील तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील निजामसागर कालव्याजवळ नेले. तिथे त्याने मुलीला कालव्यात ढकलून दिले आणि पळ काढला.कालव्यातील शेतकरी आणि स्थानिकांनी पाण्यात पडण्याचा आवाज ऐकून धाव घेतली, पण मुलगी पोहता येत नसल्याने तिचा मृत्यू झाला. नंतर शव ओळख पटली आणि तपास सुरू झाला. पांडुरंगने गुन्हा कबूल केला. त्याच्यासोबत सरपंच गणेश शिंदे यालाही अटक करण्यात आली आहे.पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जन्म नोंदी बदलणे किंवा दत्तक देण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर हा अत्यंत क्रूर मार्ग निवडण्यात आला.

या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, मुलीच्या जीवितासाठी राजकीय स्वार्थ इतका खोलवर जाऊ शकतो याचे हे दुःखद उदाहरण ठरले आहे.

 

 

Facebook Comments Box

आजही जिवंत आहे माणुसकी! हरवलेले पाकीट प्रामाणिक हातांनी परत

   Follow us on        

संदेश सुरेश जिमन: या काळात स्वार्थ, संशय आणि बेपर्वाई वाढत असताना, संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे परिसरात घडलेली एक छोटीशी घटना माणुसकीवरचा विश्वास पुन्हा जागा करणारी ठरली आहे.

अंत्रवली मालपवाडी गावातील नितेश गंगाराम मालप हे कलंबस्ते येथे प्रवास करत असताना त्यांचे पाकीट हरवले. त्या पाकिटात केवळ पैसे नव्हते, तर त्यांच्या ओळखीचा आधार असलेली लायसन्स, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड आणि गाडीची मूळ कागदपत्रे होती. पाकीट हरवल्याचे लक्षात येताच चिंता, अस्वस्थता आणि भीती स्वाभाविकच होती.

मात्र हे पाकीट तेलेवाडी येथील ग्रामस्थ सुरेश उर्फ बाबू बावधाणे यांना सापडले आणि इथूनच माणुसकीचा खरा चेहरा समोर आला. कोणताही लोभ न धरता, कुठलीही अपेक्षा न ठेवता, त्यांनी प्रामाणिकपणाने ते पाकीट मूळ मालक नितेश मालप यांना शोधून काढून सुरक्षितपणे परत केले.

आज जिथे अनेकदा हरवलेली वस्तू परत मिळेल याची आशा मावळते, तिथे सुरेश उर्फ बाबू बावधाणे यांच्या या स्तुत्य कृतीने समाजाला प्रामाणिकपणाचा आणि माणुसकीचा दीप उजळून दाखवला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: आंगणेवाडी जत्रेनिमित्त आणखी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; आजपासून आरक्षण सुरू

   Follow us on        

सावंतवाडी: कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि सावंतवाडी रोड दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे मुंबई व कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक ०१२१७ (लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी )

ही विशेष गाडी गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ आणि शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री २०:२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२१८ (सावंतवाडी – लोकमान्य टिळक टर्मिनस)

ही परतीची विशेष गाडी शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ आणि रविवार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी १७:३० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दाखल होईल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

आरक्षणाबाबत महत्त्वाची सूचना:

रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झालेली नसली तरी, वेळापत्रकानुसार

गाडी क्र. ०१२१७ चे आरक्षण ५ फेब्रुवारी २०२६ सकाळी ८ वाजता,

तर गाडी क्र. ०१२१८ चे आरक्षण ५ किंवा ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होण्याची शक्यता आहे.

Facebook Comments Box

रोहा-दिवा मेमू गाड्यांच्या विलंबाने प्रवासी हैराण; ‘रोहा रेल्वे प्रवासी समिती’ आक्रमक

   Follow us on        

रोहा (प्रतिनिधी):रोहा-दिवा-रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू (MEMU) गाड्यांच्या सततच्या विलंबामुळे चाकरमानी आणि विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रोहा रेल्वे प्रवासी समिती’ने रेल्वे प्रशासनाला साकडे घातले असून, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना आणि पनवेल स्टेशन मास्तरांना लेखी तक्रार सादर केली आहे.

नेमकी अडचण काय?

गेल्या अनेक आठवड्यांपासून ६१०१०/६१०११, ६१०१५/६१०१६, आणि ६१०१२/६१०१३ या गाड्या नियमितपणे विलंबाने धावत आहेत. रोहा आणि दिवा दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी या गाड्या जीवनवाहिनी आहेत.  महत्त्वाच्या भेटी आणि कामाचे वेळापत्रक कोलमडत आहे.

मात्र गाड्यांच्या सततच्या अनिश्चिततेमुळे प्रवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नोकरीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर पोहोचता न आल्याने कामाचे मोठे नुकसान होत असून, अनेकांच्या पगारावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. वेळेत गंतव्यस्थानी न पोहोचल्यामुळे महत्त्वाच्या बैठका, अपॉइंटमेंट्स तसेच कामांचे नियोजन पूर्णपणे कोलमडत आहे. या सर्व परिस्थितीमुळे प्रवाशांना मानसिक तणाव आणि प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर समितीने रेल्वे प्रशासनाकडे ठोस मागण्या केल्या आहेत. गाड्या उशिरा धावण्यामागील नेमकी कारणे शोधून त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, संबंधित गाड्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाईल याची खात्री द्यावी तसेच प्रवाशांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना शक्य तितक्या लवकर दिलासा द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.

या निवेदनाची प्रत पनवेल स्टेशन मास्तरांनी स्वीकारली असून, त्यावर रेल्वे प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे संकेतही प्रवाशांकडून मिळत आहेत.

Facebook Comments Box

धक्कादायक: ऑनलाईन गेमच्या नादात तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींची नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

   Follow us on        

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे बुधवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. भारत सिटी या निवासी संकुलात राहणाऱ्या तीन अल्पवयीन बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पाखी (१२), प्राची (१४) आणि विशिका (१६) अशी त्यांची नावे असून त्या चेतन कुमार यांच्या मुली आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, या तिन्ही बहिणी कोविड काळात ऑनलाइन गेम्समध्ये गुंतल्या होत्या आणि एका कोरियन टास्क-बेस्ड गेममध्ये व्यसनाधीन झाल्या होत्या. त्यांनी स्वतःला कोरियन नावे दिली होती आणि शाळेत जाणे त्यांनी कमी केले होते. घटनेच्या वेळी मुलींनी खोली आतून बंद करून एकामागोमाग खिडकीतून उडी मारली. आवाज ऐकून सुरक्षा रक्षक व शेजाऱ्यांना धक्का बसला. कुटुंबीयांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत मुली खाली पडल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेपूर्वी मुलींनी आठ पानांचे आत्महत्येचे पत्र लिहिले होते, ज्यात त्यांनी पालकांची माफी मागितली आणि डायरी वाचण्याची विनंती केली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार सिंह यांनी सांगितले की, तिन्ही मुलींचा मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही घटना ऑनलाइन गेम्सच्या व्यसनामुळे होणाऱ्या मानसिक परिणामांचा गंभीर इशारा मानली जात आहे.

Facebook Comments Box

रोहा-पनवेल रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; ‘रेल वन’ ॲपवर आता पास सुविधेचा मार्ग मोकळा

   Follow us on        

रोहा रेल्वे प्रवासी समितीच्या पाठपुराव्याला यश; प्रवाशांचा वेळ आणि त्रास वाचणार

रोहा: रोहा आणि पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला ‘रेल वन’ (Rail ONE) मोबाईल ॲपवरून रेल्वे पास काढण्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. रोहा रेल्वे प्रवासी समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, आता प्रवाशांना घरबसल्या आपला रेल्वे पास नूतनीकरण करता येणार आहे.

नेमका प्रश्न काय होता?

मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या सीमेवर रोहा स्थानक येत असल्याने तांत्रिक कारणांमुळे ‘रेल वन’ आणि इतर डिजिटल माध्यमांतून पास काढताना प्रवाशांना अनेक अडचणी येत होत्या. अनेकदा रोहा ते पनवेल हा मार्ग ॲपवर दिसत नसे किंवा पेमेंटमध्ये तांत्रिक अडथळे येत. परिणामी, प्रवाशांना तासन् तास तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहावे लागत होते.

प्रवासी समितीचा लढा

या त्रासातून सुटका मिळावी यासाठी रोहा रेल्वे प्रवासी समितीने आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांची वारंवार भेट घेऊन प्रवाशांच्या समस्या थेट मांडल्या. डिजिटल इंडियाच्या युगातही ग्रामीण भागातील प्रवाशांना का डावलले जात आहे, असा थेट सवाल उपस्थित करत रेल्वे प्रशासनाचे लक्ष या गंभीर मुद्द्याकडे वेधण्यात आले. तसेच, तिकीट प्रणालीतील तांत्रिक त्रुटी आणि त्यातून होणारा अन्याय स्पष्ट करणारे पुरावे सादर करत रेल्वे प्रशासनाशी सविस्तर पत्रव्यवहारही करण्यात आला, ज्यामुळे या प्रश्नावर ठोस कारवाईची मागणी जोरकसपणे करण्यात आली.

प्रवाशांना होणारे फायदे

या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेची मोठी बचत होणार असून तिकीट खिडकीवरील लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. तसेच कॅशलेस व्यवहारामुळे सुट्या पैशांच्या कटकटीतून प्रवाशांची कायमची मुक्तता होईल. याशिवाय मोबाईलवरच प्रवास पास उपलब्ध असल्याने प्रवासादरम्यान प्रत्यक्ष पास हरवण्याची भीतीही उरणार नाही, त्यामुळे प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

“प्रवाशांची गैरसोय दूर करणे हेच आमचे मुख्य ध्येय होते. रेल्वे प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन तांत्रिक अडथळे दूर केले आहेत.” – फैसल अधिकारी/ गणेश मासक

Facebook Comments Box

Konkan Railway:आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway:आंगणेवाडी जत्रा २०२६ दरम्यान होणारी प्रचंड प्रवासी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई–पुणे व कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांना आणि प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.

कोकण रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार, आंगणेवाडी यात्रेच्या कालावधीत अतिरिक्त प्रवासी ताण कमी करण्यासाठी मडगाव–लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव या मार्गावर विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्यात येणार आहेत.

विशेष गाड्यांचा तपशील

गाडी क्रमांक 01004 – मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक (टी) विशेष

ही गाडी मडगाव जंक्शन येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटेल.

दिनांक: ७ फेब्रुवारी २०२६ आणि ९ फेब्रुवारी २०२६

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ही गाडी पुढील दिवशी सकाळी ५.५० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01003 – लोकमान्य टिळक (टी) ते मडगाव जंक्शन विशेष

ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ७.५५ वाजता सुटेल.

दिनांक: ८ फेब्रुवारी २०२६ आणि १० फेब्रुवारी २०२६

मडगाव जंक्शन येथे गाडी त्याच दिवशी रात्री १०.०० वाजता पोहोचेल.

या गाड्यांचे थांबे

या विशेष गाड्या कार्मळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अदवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल व ठाणे या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहेत.

डब्यांची रचना

या गाड्यांना एकूण २२ डबे असतील.

▪️ स्लीपर कोच – २०

▪️ एसएलआर – २

आरक्षण माहिती

गाडी क्रमांक 01004 साठी आरक्षण ४ फेब्रुवारी २०२६ पासून पीआरएस काऊंटर, इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर खुले होणार आहे. प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वेचे दुहेरीकरण कधी? रेल्वे मंत्र्याकडून मोठी माहिती समोर

   Follow us on        

नवी दिल्ली: कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असून, यामुळे कोकणातील प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी व मालवाहतुकीची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून तत्त्वतः सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती केंदीय रेल्वे मंत्र्यानी दिली आहे.

रुळ अपग्रेड, बोगदे बंद, क्षमतेत वाढ

दुहेरीकरणाच्या या प्रस्तावांतर्गत कोकण रेल्वे मार्गावरील रुळांचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या काही जुन्या बोगद्यांना बंद करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवीन बोगदे उभारण्याचा विचार आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीचा वेग वाढणार असून, सुरक्षिततेतही लक्षणीय सुधारणा होणार आहे.

दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवता येणार आहे. सध्या एकेरी मार्गामुळे अनेक गाड्यांना क्रॉसिंगसाठी थांबावे लागते, मात्र दुहेरी मार्गामुळे ही अडचण दूर होणार आहे.

प्रवासी आणि मालवाहतुकीला फायदा

या प्रकल्पामुळे प्रवासी गाड्यांसह मालवाहतुकीची क्षमता वाढणार आहे. विशेषतः कोकणातील आंबा, काजू, मासे तसेच औद्योगिक मालाची वाहतूक अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. परिणामी, कोकणातील व्यापार, पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

 

Facebook Comments Box

जिल्हा परिषद निवडणुकीत सावंतवाडी टर्मिनसचा ‘पाणी’ मुद्दा निर्णायक

   Follow us on        

सावंतवाडी : रेल्वे प्रकल्प हा जरी केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असला, तरी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली पाणीपुरवठा योजना ही पूर्णतः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळेच हा विषय केवळ प्रशासकीय न राहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी थेट जोडला गेला आहे.

तिलारी धरणातून रेल्वे टर्मिनससाठी पाणीपुरवठा करण्याची योजना सावंतवाडी पंचायत समितीने तयार केली असून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने ती मंजुरीसाठी पुढे पाठवली आहे. या योजनेची अंमलबजावणी, पाठपुरावा, निधी मिळवणे आणि काम वेळेत पूर्ण करणे ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवरच आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती किती सक्षमपणे हा विषय हाताळतात, यावरच टर्मिनस प्रत्यक्षात सुरू होणार की नाही, हे ठरणार आहे.

याच कारणामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागरिक आता केवळ आश्वासनांवर समाधानी न राहता, या पाणीपुरवठा योजनेला निधी मिळवून देण्यासाठी कोणता लोकप्रतिनिधी ठोस पाठपुरावा करतो, याकडे लक्ष ठेवून आहेत.

विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ केवळ सावंतवाडी रेल्वे टर्मिनसपुरता मर्यादित नसून मळगाव, कुंभार्ली आणि ब्राह्मणपाट या गावांतील नागरिकांनाही शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे हा प्रश्न विकास, सुविधा आणि लोकजीवनाशी थेट निगडित असल्याने तो स्थानिक निवडणुकांतील प्रमुख मुद्दा ठरला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी समितीचे पदाधिकारी सागर तळवडेकर यांनी माहिती देताना सांगितले की, रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारच्या अखत्यारित असला तरी सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी आवश्यक असलेली पाणीपुरवठा योजना ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील आहे. त्यामुळे या योजनेचा पाठपुरावा करणे, निधी मिळवून देणे आणि अंमलबजावणी सुनिश्चित करणे ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांचीच आहे.

तळवडेकर पुढे म्हणाले की, याच कारणामुळे हा मुद्दा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांशी थेट जोडला गेला असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी या विषयावर ठोस भूमिका घेणाऱ्या उमेदवारांकडे लक्ष द्यावे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटल्याशिवाय टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू होणे शक्य नसून, हा प्रश्न केवळ रेल्वेपुरता न राहता संपूर्ण परिसराच्या विकासाशी संबंधित आहे.

Facebook Comments Box

पुढील ५ ते १० वर्षात महाराष्ट्रात ५,७०० किमीच्या २२ एक्स्प्रेसवेचे महाजाळे; जाणून घ्या सर्व प्रकल्पांची सद्यस्थिती

]block id=”google-news”]

मुंबई: महाराष्ट्र राज्य सध्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशाचे ‘इंजिन’ म्हणून उदयास येत आहे. रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात एकूण ५,७५९.५ किलोमीटर लांबीच्या २२ एक्स्प्रेसवेचे काम विविध टप्प्यांवर सुरू आहे. ‘इन्फ्रा न्यूज इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील दळणवळण केवळ वेगवान होणार नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळणार आहे.

समृद्धीनंतर आता ‘शक्तीपीठ’ आणि ‘उत्तर महाराष्ट्र’ एक्स्प्रेसवेचा बोलबाला
मुंबई-पुणे आणि समृद्धी महामार्गाच्या यशानंतर आता राज्य सरकारचे लक्ष मोठ्या प्रकल्पांकडे आहे.

शक्तीपीठ एक्स्प्रेसवे (८५६ किमी): नागपूर ते गोवा (पावनार ते पात्रादेवी) दरम्यानचा हा महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार आहे. याचा सुधारित डीपीआर (DPR) तयार असून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.

उत्तर महाराष्ट्र एक्स्प्रेसवे (६४५ किमी): नाशिक-जळगाव-नागपूर हा मार्ग उत्तर महाराष्ट्राला थेट विदर्भाशी जोडेल.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा कायापालट

कोकणच्या पर्यटन आणि आर्थिक विकासासाठी बलवली-पात्रादेवी कोकण एक्स्प्रेसवे (३८९ किमी) हा गेमचेंजर ठरेल. याशिवाय, पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे आउटर रिंग रोड (१७३ किमी) चे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.

हे एक्स्प्रेसवे केवळ प्रवासाचा वेळ वाचवणार नाहीत, तर त्यांच्या बाजूने ‘इंडस्ट्रियल क्लस्टर्स’ विकसित केले जाणार आहेत. शेतमालाची वाहतूक जलद झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील मागास जिल्ह्यांना या महाजाळ्याचा मोठा फायदा होणार आहे.

या २२ प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्पांची जबाबदारी MSRDC (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) कडे आहे. तर NHAI (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) दिल्ली-मुंबई आणि पुणे-बेंगळुरू सारखे राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सांभाळत आहे. नागपूर शहरासाठी NMRDA द्वारे आउटर रिंग रोडचे नियोजन पूर्ण झाले आहे.

येणाऱ्या ५ ते १० वर्षांत जेव्हा हे २२ मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होतील, तेव्हा महाराष्ट्र हे रस्ते कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत जगातील सर्वोत्तम राज्यांच्या पंक्तीत जाऊन बसेल. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि राज्याचे ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल.

महाराष्ट्रातील द्रुतगती मार्गांची संपूर्ण यादी आणि सद्यस्थिती

महामार्गाचे नाव लांबी (Km) लेन (Lanes) सद्यस्थिती (Status)
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 94.5 6 कार्यरत (Operational)
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग 701 6 कार्यरत (Operational)
जालना-नांदेड एक्सप्रेसवे 179 6
बांधकाम सुरू (Under construction)
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे (महा. टप्पा) 170 8
बांधकाम सुरू (Under construction)
पुणे आउटर रिंग रोड 173 6
बांधकाम सुरू (Under construction)
नागपूर-गोवा (शक्तीपीठ) एक्सप्रेसवे 856 6 अंतिम मंजुरी प्रलंबित
बलावली-पत्रादेवी कोकण एक्सप्रेसवे 389 6 अंतिम मंजुरी प्रलंबित
पुणे-शिरूर-संभाजीनगर एक्सप्रेसवे 220 6 निविदा प्रक्रिया/DPR सुधारणा
पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवे (महा. टप्पा) 204 6
केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा
विरार-अलिबाग मल्टि मॉडेल कॉरिडॉर 126 8
फेर-निविदा प्रक्रिया (Retendered)
नागपूर-भंडारा-गोंदिया एक्सप्रेसवे 141 4/6 कंत्राट लवकरच दिले जाईल
नागपूर-चंद्रपूर एक्सप्रेसवे 204 4 कंत्राट लवकरच दिले जाईल
भंडारा-गडचिरोली एक्सप्रेसवे 116 4 कंत्राट लवकरच दिले जाईल
पुणे-नाशिक एक्सप्रेसवे 210 6 भूसंपादन अधिसूचना जारी
सुरत-नाशिक-चेन्नई कॉरिडॉर 400 6
फेर-निविदा प्रक्रिया (BOT मॉडेल)
पागोठे-चौक एक्सप्रेसवे 29 6
निविदा प्रक्रिया सुरू (Under bidding)
समृद्धी-वाढवण बंदर कनेक्टर 104 6 मंजूर (भूसंपादन लवकरच)
शेगाव कनेक्टर (समृद्धी महामार्ग) 109 4 मंजूर
नाशिक-जळगाव-नागपूर एक्सप्रेसवे 645 6 प्रस्तावित
जळगाव-नंदुरबार एक्सप्रेसवे 150 4 प्रस्तावित
कल्याण-लातूर एक्सप्रेसवे 445 6
DPR तयार करण्याचे काम सुरू
नागपूर आउटर रिंग रोड 148 6 मंजूर
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search