मुख्यमंत्र्यांचे राज्यातील शेतकऱ्यांना ‘भावनिक पत्र’

राज्यात शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्या आपल्याला खूप दुःख होत आहे. तुम्ही आत्महत्या करू नका तुम्हाला अस्मानी संकटातून, सावकारी दृष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशा आशयाचे भावनिक आवाहन त्यांनी आज एका पत्राद्वारे केले आहे. त्यांनी लिहिलेले पत्र खाली वाचा त्यांचाच शब्दात.

महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे, तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत, जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचेच नव्हे, तर उभा महाराष्ट्र देशाची भूक भागवण्याचेही काम करत आहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचं असेल तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे.

परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जाते, तुमच्यातील काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवून आत्त्महत्येचा मार्ग पत्करतात.. हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषन्न होऊन जातं….वाटतं, कि आपल्याच घरातील कुणी आपण गमावलंय…..

लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे…..तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही आहे. तुम्ही आमची संपत्ती आहात, माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना नेहमी म्हणायचे कि, ”रडायचं नाही लढायचं”

शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका….आत्महत्या करू नका…मी तुमच्यासारखा रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात, काळजाला भिडतात. या आस्मानी संकटातून, या सावकारी दृष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचे लखलखते यश सामावलेले असते……

मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा…जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेंकाना….

चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधुयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया….

जय महाराष्ट्र!

 

Loading

Facebook Comments Box

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे बांधकाममंत्री रविन्द्र चव्हाण यांचे आदेश.

 

मुंबई गोवा महामार्गाबाबत सह्याद्री अतिथीगृहात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत आज बांधकाममंत्री रविन्द्र चव्हाण यांनी आज एक बैठक आयोजित केली होती.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावीत. पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना बांधकाममंत्री रविन्द्र चव्हाण यांनी या बैठकीत दिल्या.

प्रत्येक जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीचे काम करणाऱ्या एजन्सीज वाढवून येत्या आठवड्यात प्रामुख्याने खड्डे भरण्याचे काम पूर्ण करणार तसेच याबाबत कोकणातल्या लोकप्रतिनिधींना घेऊनच ते स्वतः सदर कामाच्या प्रगतीचा आढावा प्रत्यक्ष स्थळावर जाऊनच घेणार असे ते बोलले.

याच बरोबर संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी जास्तीत जास्त ट्रॅफिक वॉर्डन तैनात करून वाहतुक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे आदेशही या बैठकी दरम्यान वाहतूक विभागाला दिले आहेत असे त्यांनी पुढे सांगितले.

या बैठकीत शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, खासदार सुनील तटकरे, खासदार विनायक राऊत, आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगवले, नितेश राणे, वैभव नाईक,आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस. एस. साळुंखे, सचिव (बांधकाम) पी. डी. नवघरे, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, कोकण विभागाचे मुख्य अभियंता एस. एन. राजभोग, रायगडच्या वरिष्ठ अभियंता श्रीमती सुषमा गायकवाड, रत्नागिरीच्या वरिष्ठ अभियंता श्रीमती नाईक, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) श्री. जाधव आदी उपस्थित होते.

कालच माध्यमांवर सर्वत्र मुंबई गोवा महामार्गाच्या काही भागाचा खड्ड्यांमुळे झालेल्या अवस्थेचा विडिओ व्हायरल झाला होता. पुढच्याच आठवडय़ात गणेशोत्सवासाठी ह्या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात रहदारी होणार आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आल्याचे समजते.

Related कोकणात गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍या चाकरमान्यांचे हाल… मुंबई – गोवा महामार्गावर अक्षरशः खड्ड्यांची रांगोळी….

 

Loading

Facebook Comments Box

माझ्या माता-बहिणींवर केसेस न पडण्यासाठी मी हात जोडले- निलेश राणे – माजी खासदार

रत्नागिरी : कालची बातमी मीडियाकडून चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली आहे. जनतेला घटनास्थळी नेमके काय घडले होते हे सांगण्यासाठी मी हा विडिओ पोस्ट करत आहे असे  आज माजी खासदार निलेश राणे हे म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या बोलण्याच्या पूर्ण विडिओ आज ट्विटर वर पोस्ट केला आहे.

आंदोलनकर्त्यांचा आरोप होता कि माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्याने शिवी घातली, कदाचित अनावधानाने असा प्रकार घडला असेल त्यामुळे मी माफी मागितली. मी माघार घेतली कारण ती सर्व आपलीच माणसे होती आणि काही अनुचित प्रकार घडू नये आणि प्रकरण हाताबाहेर जाऊ नये आम्ही थोडे नमते घेतले, कारण काही विपरीत घडले असते तर माझ्या त्या आई बहिणींवर केसेस पडल्या असत्या आणि मला ते नको होते, म्हणून मी हात जोडलेत. एवढेच नाही तर मी त्यांना तुम्ही मला बोलवाल तिथे मी चर्चेसाठी यायला तयार आहे. त्यांचे ते आंदोलन यशश्वी झाले असून पूर्ण देशभर पोहोचले आहे त्यामुळे आता त्यांनी हे आंदोलन थांबवावे ह्यासाठी मी त्यांना विनंती केली होती. पण हि सर्व बातमी काहीश्या चुकीच्या पद्धतीने मीडिया वर दाखवली गेली होती त्यामुळे मला हा विडिओ पोस्ट करावा लागला आहे असे ते म्हणाले आहेत.

Loading

Facebook Comments Box

१ सप्टेंबर रोजी सर्व रेशनधारकांची पडताळणी होणार, चुकीच्या माहिती दिलेली आढळल्यास कारवाई होणार

सरकारद्वारे रास्त दराने दिले जाणारे रेशनकार्ड वरील धान्य घेणारी व्यक्ती खरोखर गरजू आहे का, त्याचे उपन्न त्या कसोटी मध्ये बसत आहे का नाही ह्याची पडताळणी पुढच्या महिन्यात होणार आहे. उत्पन्न वाढलेल्या धारकाचे रेशनवरील धान्य ह्या पडताळणीनंतर बंद करण्यात येणार आहे.

कमी उत्त्पन्न गटामध्ये मोडत असलेली गरीब जनता उपाशी राहू नये म्हणून सरकराद्वारे गरीब कुटुंबाना स्वस्त  दरात रेशन दिले जाते. मात्र काही लोकांचे उत्पन्न वाढले तरी त्यांचे ह्या सुविधेमध्ये नाव असल्याने त्याचा दुरुपयोग होताना दिसत आहे. काही लोक हेच धान्य त्यांना मिळालेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विकून ह्या सुविधेचा गैरवापर करत आहेत. काही लोक तर चक्क जनावरांना हे धान्य खायला घालत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

ह्या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व प्रत्येक रेशनधारकांची धान्य निरीक्षकांमार्फत पडताळणी होणार आहे. वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. खोट्या माहितीद्वारे कमी उत्पन्न दाखवून जर कोणी ह्या सुविधेचा दुरुपयोग केला असेल तर त्यांच्याकडून मागील धान्याची किंमत वसूल केली जाणार आहे.

 

Loading

Facebook Comments Box

कोकणात गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍या चाकरमान्यांचे हाल… मुंबई – गोवा महामार्गावर अक्षरशः खड्ड्यांची रांगोळी….

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे, गणेश चतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या उत्साह वाढत चालला आहे. मागील २ वर्षाप्रमाणे काही निर्बंध नसल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जाणार आहेत. कोकण रेल्वेच्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. दुसरा पर्याय आहे तो म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग. पण ह्या महामार्गाची आताची अवस्था पाहता ह्या मार्गे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत.

ह्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांची रांगोळी तयार झाली आहे. हि सर्व परिस्थती खूपच चीड निर्माण करणारी आहे. गणेशोत्सव काळात ह्या रस्त्यावर किती रहदारी असते ह्याची कल्पना असून सुद्धा ह्यावर उपाय होत नाही आहे. दरवर्षीचे हे रडगाणे झाले आहे. मुंबई – गोवा महामार्ग तयार होण्याचा कमला पण कमालीची दिरंगाई होताना दिसत आहे.

याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा विषय विधानसभेमध्ये मांडला. कोकणातील सर्वच आमदारांनी या विषयावरुन सरकारला प्रश्न विचारमाऱ्या जाधव यांची पाठराखण केली. अखेर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या महामार्गाचं काम २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलं.

सध्या या रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवून तात्पुरत्या स्वरूपात हा महामार्ग वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी होत आहे.

 

 

 

Loading

Facebook Comments Box

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर अजून ६ विशेष गाड्या

यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकण मार्गावर नियमित फेऱ्यांशिवाय काही विशेष गाड्या ह्या आधीच सोल्डल्या आहेत. त्या गाड्यांचे आरक्षण जवळपास फुल झाले आहे. प्रवासाचा वाढत प्रतिसाद पाहता कोकण रेल्वेने ह्या कालावधी साठी आजून काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे

LTT MAJN AC SPL (01173)

दिनांक २४.०८.२०२२, ३१.०८.२०२२ आणि ०७.०९.२०२२ रोजी बुधवारी हि गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरु दरम्यान चालवली जाईल. ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

S.N. Station Name Departure Time Day
1 LOKMANYATILAK T 20:50 1
2 THANE 21:15 1
3 PANVEL 22:00 1
4 ROHA 23:20 1
5 MANGAON 23:52 1
6 KHED 00:56 2
7 CHIPLUN 01:34 2
8 SAVARDA 02:06 2
9 SANGMESHWAR 02:32 2
10 RATNAGIRI 03:15 2
11 ADAVALI 03:52 2
12 VILAVADE 04:12 2
13 RAJAPUR ROAD 04:50 2
14 VAIBHAVWADI RD 05:12 2
15 KANKAVALI 05:42 2
16 SINDHUDURG 06:12 2
17 KUDAL 06:24 2
18 SAWANTWADI ROAD 07:02 2
19 THIVIM 07:32 2
20 KARMALI 07:52 2
21 MADGAON 09:20 2
22 CANCONA 09:58 2
23 KARWAR 10:32 2
24 ANKOLA 11:02 2
25 GOKARNA ROAD 11:12 2
26 KUMTA 11:32 2
27 HONNAVAR 11:46 2
28 MURDESHWAR 12:12 2
29 BHATKAL 12:30 2
30 MOOKAMBIKA ROAD 12:50 2
31 KUNDAPURA 13:22 2
32 UDUPI 14:04 2
33 MULKI 15:02 2
34 SURATHKAL 15:22 2
35 MANGALURU JN 17:05 2

MAJN LTT AC SPL (01174)

दिनांक २५.०८.२०२२, ०१.०९.२०२२ आणि ०८.०९.२०२२ रोजी गुरुवारी हि गाडी मंगळुरु ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान चालवली जाईल. ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

S.N. Station Name Departure Time Day
1 MANGALURU JN 20:15 1
2 SURATHKAL 21:11 1
3 MULKI 21:21 1
4 UDUPI 22:12 1
5 KUNDAPURA 22:52 1
6 MOOKAMBIKA ROAD 23:20 1
7 BHATKAL 23:38 1
8 MURDESHWAR 23:58 1
9 HONNAVAR 00:20 2
10 KUMTA 00:36 2
11 GOKARNA ROAD 00:58 2
12 ANKOLA 01:12 2
13 KARWAR 01:42 2
14 CANCONA 02:12 2
15 MADGAON 03:25 2
16 KARMALI 04:02 2
17 THIVIM 04:22 2
18 SAWANTWADI ROAD 05:02 2
19 KUDAL 05:22 2
20 SINDHUDURG 05:34 2
21 KANKAVALI 05:52 2
22 VAIBHAVWADI RD 06:52 2
23 RAJAPUR ROAD 07:22 2
24 VILAVADE 07:42 2
25 ADAVALI 08:02 2
26 RATNAGIRI 09:36 2
27 SANGMESHWAR 10:12 2
28 SAVARDA 10:52 2
29 CHIPLUN 11:32 2
30 KHED 11:52 2
31 MANGAON 13:32 2
32 ROHA 14:35 2
33 PANVEL 15:45 2
34 THANE 16:25 2
35 LOKMANYATILAK T 17:30 2

डब्यांची स्थिती – FIRST AC – 01 COACH + 2 TIER AC – 03 COACHES + 3 TIER AC – 15 COACHES + PANTRY CAR- 01 + GENERATOR CAR – 02

 

ह्या गाड्यांचे आरक्षण आणि अधिक माहितीसाठी https://enquiry.indianrail.gov.in ह्या संकेतस्थळास भेट द्या.

 

Loading

Facebook Comments Box

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अभिनव टीमच्यावतीने कुडाळ, सिंधुदुर्ग येथे भव्य शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन.

कुडाळ :मराठी माणसं व्यवसाय करत नाहीत, व्यवसायात करण्यात कमी पडतात. मागे पडतात आणि म्हणुन दुसर्‍या राज्यातील लोक ईथे येऊन उद्योगधंदे करतात हे कुठे तरी थांबले पाहीजे म्हणुन सगळेच बोलतात, लिहीतात आणि जोरदार टिका पण करतात पण ह्यात बदल घडवून आणायचा असेल तर फक्त बोलून लिहून नाही चालणार तर गरज आहे प्रत्यक्षात कृती करण्याची आणि आपल्या मातीतल्या उद्योजकांना साथ देण्याची.

आपल्या मालवणी, कोकणी, मराठी माणसांना व्यावसायिक बनवण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला प्रसिद्धी देण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी, मार्केट उपलब्ध करुन देण्यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनी सतत वेगवेगळे उपक्रम राबवत आहे.

गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमीवर अभिनवच्या टीमने कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक व्यावसायिकांचा भव्य शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित केला आहे.

कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल परिसरात हा शॉपिंग फेस्टिव्हल 26-27-28-29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत असणार आहे.

ह्या परीसरातील प्रत्येकाने या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि आपल्या स्थानिक लोकांकडून खरेदी करावी, त्यांना प्रोत्साहन द्यावे

Loading

Facebook Comments Box

आमच्या रेग्युलर लोकल्स बंद करून त्या AC लोकल्स मध्ये परावर्तित करू नका.. कळवा आंदोलन…

ठाणे : तुम्हाला AC लोकल्स वाढवायच्या असतिल तर खुशाल वाढवा, पण त्यासाठी आमच्या रेग्युलर लोकल बंद करून त्या AC लोकल्स मध्ये परावर्तित करू नका असे सामान्य लोकल प्रवाशांचे म्हणने आहे. आधीच मध्य रेल्वेच्या 56 रेग्युलर गाड्या AC लोकल्स मध्ये परावर्तित केलेल्या होत्या आणि ह्या आठवड्यात आजून 10 सामान्य गाड्या AC लोकल्स मध्ये परावर्तित करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला त्यामुळे आज कळवा येथे AC लोकल्स थांबवून प्रवाशांनी आंदोलन केले.

सव्वा आठची कळवा कारशेड मधून सुटणारी ठाणे- सीएसमटी लोकल आहे. जी पूर्वी साधी होती. त्यामुळे कळव्यातील अनेक प्रवासी या गाडीतून कारशेडने प्रवास करत होते. आता ही लोकल एसी केल्याने प्रवाशांना लोकल मिळाली नाही. त्यामुळे कारशेडजवळ सुमारे पाऊण तास लोकल थांबवून ठेवली होती.

Related news: मध्य रेल्वेच्या ‘ह्या’ गाड्या AC Locals मध्ये परावर्तित होणार.

संतप्त प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकल रोखली होती. मात्र त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत प्रवाशांना तिथून हटवलं. यानंतर लोकल वाहतूक पूर्ववत केली गेली. याशिवाय, रेल्वे पोलिसांनी काही प्रवाशांना ताब्यात देखील घेतले आहे.

राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांची ट्विट

राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर च्या माध्यमातून सामान्य लोकल्स AC लोकल्स मध्ये परावर्तित केल्याचा विरोध केला आहे.

Loading

Facebook Comments Box

‘सुपर वासुकी’ देशातील सर्वात लांबीची मालगाडी..

देशातील सर्वात लांबीची मालगाडी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेद्वारे चालवली जात असून ती देशातील सर्वात लांबीची मालगाडी मानली जाते. हि मालगाडी छत्तीसगडमधील बिलासपूर सेक्शनमध्ये भिलाई ते कोर्बा ह्या स्टेशन दरम्यान चालवली जाते. ह्या मार्गाची लांबी सुमारे २२४ किलोमीटर आहे.

ह्या मालगाडी ला एकूण २९५ डबे आहेत तर एकूण ६ इंजिन्स जोडली आहेत. ह्या मलगाडीची लांबी सुमारे ३.५ किलोमीटर आहे. हि गाडी सुमारे २७००० टन कोळसा एकावेळी वाहून नेते. ह्या मालगाडीचे नाव ‘सुपर वासुकी’ असे देण्यात आले आहे.

ही मालगाडी सुरू करून आपण वेळ, पैसे आणि मनुष्यबळाची बचत केली आहे असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. एवढ्या लांबीची मालगाडी चालवणे हे एक प्रकारे आव्हान होते. अनेक तांत्रिक बाबी पहाव्या लागल्या आहेत, तसेच सुरक्षिततेच्या बाजूने पण विचार करण्यात आलेला आहे.

संपूर्ण जगाचा विचार करता आतापर्यंत ऑस्ट्रेलिया येथील The Australian BHP Iron Ore .हि सर्वात लांब मालगाडी म्हणून नोंद केली गेली आहे. हि मालगाडी ७.३५३ किलोमीटर लांबीची असून त्याला ६८२ डबे आहेत.

Loading

Facebook Comments Box

निष्ठेचे प्रमाणपत्र हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले मला खोक्याची गरज नाही.. आमदार राजन साळवी

राजापूर:शिवसेनेचा कोकणातील आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी कालपासून जोर धरला होता. शिंदे गटात जाऊ शकणारा हा शिवसेनेचा आमदार दुसरा-तिसरा कोणी नसून राजन साळवी हे आहेत ह्या आशयाच्या बातम्या काल प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेला अजून एक धक्का बसतो की काय अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. अधिवेशन सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस आणि राजन साळवी यांची भेट झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राजन साळवी आता शिंदे गटात प्रवेश करतील, या चर्चेने जोर धरला होता.

पण आज ट्विटर च्या माध्यमातून ह्या बातम्या खोट्या आहेत असे जाहीर केले आहे. ”आमची निष्ठा मातोश्री कायम चरणी….काल आज व उद्या फक्त आमची निष्ठा शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे फक्त… ”

”निष्ठेचे प्रमाणपत्र दि.15 ऑक्टोबर 2002 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले मला खोक्याची गरज नाही….” ह्या ट्विट सोबत त्यांनी स्व. बाळासाहेबांसोबतचा आपला फोटो पोस्ट केला आहे.

राजन साळवी हे कोकणातील लांजा-राजापूर-साखरपा ह्या मतदार संघातून सलग 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search