ते म्हणाले :
मुंबई :संजय राऊतांच्या अटकेमुळे पत्रा चाळ जमीन घोटाळा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नेमकं काय आहे पत्रा चाळ प्रकरण आणि संजय राऊतांचं नावं ह्यामध्ये कसं आलं? सविस्तर जाणून घ्या ईथे..
.
गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी 12 वर्षापूर्वी येथील रहिवासी, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन आणि म्हाडा यांच्या मध्ये एक करार केला झाला होता. करारानुसार चाळीने व्यापलेली एकूण जमिनीचे 3 समान भाग केले जाणार होते. एका भागामध्ये रहिवाशांना सर्वात प्रथम 672 फ्लॅट बांधुन देण्याचे आणि म्हाडाला त्याच्या जागेत अशी सर्व मिळून 3000 पेक्षा अधिक घरे बांधुन गुरू आशिष कन्स्ट्रक्शने देणे असे ठरले गेले. ह्या मोबदल्यात गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला उरलेली 13 एकर जमीन मिळणार होती.
गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीनं कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसवणूक केल्याचं नंतर समोर आलं. गुरू आशिष कन्स्ट्रक्शननं ही जमीन 1,034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती.
या प्रकरणात ईडीनं प्रवीण राऊत यांना अटक केलेली. प्रवीण राऊत हे पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान यांच्यासह फर्मचे एक संचालक होते.
मार्च 2018 मध्ये म्हाडानं गुरु आशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला. फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊत यांना EOW (आर्थिक गुन्हे शाखा) ने अटक केली होती, तर सारंग वाधवान अटकेत होता. मार्च 2018 मध्ये म्हाडानं गुरु आशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला होता
फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊतला EOW ने अटक केली होती तर सारंग वाधवानला EOW ने त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये EOW ने अटक केली होती. त्यानंतर राऊत यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती.
ईडीनं या प्रकरणी ईसीआयआर नोंदवला आणि 1 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत आणि त्यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्या निवासस्थानांसह सुमारे सात ठिकाणी झडती घेतली. राऊत यांना 2 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती, तर पाटकरांचा जबाब ईडीनं नोंदवला होता.
प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र असून, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना त्यांचं नावही समोर आले होतं. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिल्याचं समोर आलं होतं. या कर्जाच्या रकमेतून राऊत कुटुंबानं दादरमध्ये फ्लॅट खरेदीसाठी केला होता. त्यानंतर ईडीने वर्षा आणि माधुरी राऊत यांचे जबाब नोंदवले होते.
ईडीतील सूत्रांच्या माहितीनुसार 2010 मध्ये प्रवीण राऊत यांना त्याच्या बँक खात्यात इक्विटी आणि जमीन व्यवहाराच्या नावाखाली 95 कोटी रुपये मिळाले होते, तरीही कंपनी प्रकल्प पूर्ण करू शकली नाही आणि कोणतेही उत्पन्न मिळाले नाही.
या प्रकरणात ईडीने ज्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली ते सुजित पाटकर हे प्रवीण राऊत यांचे सहकारी आहेत, तर संजय राऊत यांच्याशी जवळचे संबंध आहेत. पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलींसह वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये गेल्या वर्षभरापासून भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने यापूर्वी अलिबाग येथे संयुक्तपणे जमीन खरेदी केली होती.
काल राजस्थानी समजाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या एका विधानावर संपूर्ण राज्याने आपली नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्यातून गुजराती आणि मारवाडी गेलेत तर मुंबई मध्ये पैसा राहणार नाही असे ते म्हणाले होते.
राज्यपालांनी ह्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी होऊ लागली होती. आज दुपारी राज्यपालांनी ट्विटरवर ह्या संबंधी एक ट्विट टाकले आहे. ते म्हणाले की…
मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.
काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो.
मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही.
पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवार १ ऑगस्ट २०२२ रोजी निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यावेळी त्यांचे शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. तर १२ वाजता सावंतवाडी येथील गांधी चौक येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून या सभेला ते संबोधित करणार आहेत. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ३० नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमद्वारे आता गावातील पात्र मतदारांकडून पंचायतीच्या सरपंच पदाची थेट निवडणूक करण्याची पद्धती अवलंबिण्यात येणार आहे, असा अध्यादेश ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.
मुंबई: उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. ठाकरे घराण्याचा वारसदार असणारे निहार ठाकरे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. निहार ठाकरे यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. एवढेच नव्हे तर निहार ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आता राजकारणातही प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठाकरे घराण्यातील आणखी एका व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कितपत बदलणार, हे पाहावे लागेल.
बाळासाहेब ठाकरे यांना तीन चिरंजीव आहेत. त्यापैकी बिंदूमाधव हे थोरले चिरंजीव होते. त्यानंतर जयदेव ठाकरे हे मधले आणि उद्धव ठाकरे हे सर्वात लहान चिरंजीव आहेत. बिंदूमाधव यांचं 20 एप्रिल 1996 रोजी लोणावळा इथे एका मोटार अपघातात निधन झालं होतं. बिंदूमाधव यांच्या पश्चात त्यांचा मुलगा निहार ठाकरे हे आहेत. ते खरंतर व्यावसायिक आहेत. त्यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. पण ते आता राजकारणात जम बसवणार आहेत. त्यामुळेच त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. निहार हे बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात मोठे नातू मानले जातात. त्यामुळे बाळासाहेबांचे नातू निहार हे त्यांच्यासारखे राजकारणात हुकमी एक्के म्हणून नावाजले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. CBSE बोर्डमध्ये SSC च्या पहिल्या बॅचनं १०० टक्के निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे.
श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडीच्या SSC बॅचनं CBSE बोर्डात १०० टक्के निकालासह बाजी मारली आहे. प्रशालेची ही पहिलीच बॅच असून ३० विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करत जिल्ह्यातील टॉप विद्यार्थ्यांच्या यादीत आपलं नाव कोरल आहे.
प्रशालेमध्ये वेदीका विनायक परब हीन ९५.८३ % गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. देवाशीष प्रसाद महाले यान ९५. ६७ % प्राप्त करत द्वितीय तर देवांग राजेश फोंडेकर यान ९३.०० % गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. दिया साईनाथ वेटे या विद्यार्थ्यांनींन ८९.५० % गुण प्राप्त करून उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. इंग्रजी विषयात वेदीका परब, देवाशीष महाले यांनी १०० पैकी ९८ गुण, हिंदी विषयात देवाशीष महाले, देवांग फोंडेकर, दिया वेटे यांनी १०० पैकी ९९ गुण प्राप्त करत विक्रम रचला. गणित विषयात वेदीकान ९२ तर विज्ञान विषयात ९६, सामाजिक शास्त्रमध्ये ९८ तर IT मध्ये ९९ गुण प्राप्त केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये प्राचार्य व्यंकटेश बक्षी, शिक्षक प्रियांका डिसोझा, संदीप पेडणेकर, प्राची कुडतरकर, श्वेता खानोलकर, दिपीका कदम यांनी मोलाच मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक व कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा सौ. अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, व्यवस्थापक समन्वयक सुनेत्रा फाटक यांनी गुणवंत विद्यार्थ्यी, शिक्षकांसह पालकांचे अभिनंदन केले.
गणेशोत्सवादरम्यान कोकणमार्गावर २००+ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. त्याबरोबर जबलपुर – कोईम्बत्तूर सुपरफास्ट विशेष गाडी जी समर स्पेशल म्हणुन ह्या मार्गावर चालविण्यात आली होती ती गाडी गणेशोत्सवात चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
JBP CBE SPECIAL (02198)
दिनांक 05/08/2022 ते 30/09/2022 दरम्यान ही गाडी दर शुक्रवारी चालवली जाईल.
S.N. Station Name Time Day
1 JABALPUR 23:50 1
2 NARSINGHPUR 00:55 2
3 GADARWARA 01:30 2
4 PIPARIYA 02:05 2
5 ITARSI JN 03:45 2
6 HARDA 04:47 2
7 KHANDWA 06:48 2
8 BHUSAVAL JN 08:35 2
9 NASHIK ROAD 11:50 2
10 PANVEL 15:25 2
11 ROHA 16:50 2
12 KHED 18:20 2
13 CHIPLUN 18:54 2
14 RATNAGIRI 20:40 2
15 KANKAVALI 22:52 2
16 KUDAL 23:22 2
17 THIVIM 00:32 3
18 MADGAON 01:45 3
19 KARWAR 02:52 3
20 KUMTA 03:52 3
21 MOOKAMBIKA ROAD 05:02 3
22 KUNDAPURA 05:52 3
23 UDUPI 06:52 3
24 MULKI 07:52 3
25 MANGALURU JN 09:30 3
26 KASARAGOD 10:15 3
27 KANNUR 11:40 3
28 KOZHIKKODE 13:05 3
29 SHORANUR JN 14:30 3
30 PALAKKAD JN 15:20 3
31 COIMBATORE JN 17:10 3
CBE JBP SPECIAL (02197)
दिनांक 05/08/2022 ते 30/09/2022 दरम्यान ही गाडी दर सोमवारी चालवली जाईल.
S.N. Station Name TIME Day
1 COIMBATORE JN 15:25 1
2 PALAKKAD JN 16:35 1
3 SHORANUR JN 17:20 1
4 KOZHIKKODE 18:30 1
5 KANNUR 19:50 1
6 KASARAGOD 20:55 1
7 MANGALURU JN 23:10 1
8 MULKI 01:04 2
9 UDUPI 01:36 2
10 KUNDAPURA 02:02 2
11 MOOKAMBIKA ROAD 02:28 2
12 KUMTA 03:32 2
13 KARWAR 04:32 2
14 MADGAON 05:55 2
15 THIVIM 06:38 2
16 KUDAL 07:30 2
17 KANKAVALI 08:37 2
18 RATNAGIRI 10:55 2
19 CHIPLUN 13:02 2
20 KHED 13:32 2
21 ROHA 15:55 2
22 PANVEL 16:55 2
23 NASHIK ROAD 20:45 2
24 BHUSAVAL JN 00:30 3
25 KHANDWA 02:40 3
26 HARDA 03:55 3
27 ITARSI JN 05:15 3
28 PIPARIYA 06:17 3
29 GADARWARA 06:52 3
30 NARSINGHPUR 07:25 3
31 JABALPUR 08:45 3
डब्यांची स्थिती AC (1A) – 01 + AC (2A) – 02 + AC (3A) – 06 + Sleepr – 11 + General – 02 + SLR– 2 = Total 24
ह्या गाडीचे आरक्षण सुरु झाले असून सर्व आरक्षण तिकीट विंडो तसेच सर्व अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
सिंधुदुर्ग : कुडाळ आणि रत्नागिरी येथे फणस प्रक्रिया प्रशिक्षण च्या यशस्वी आयोजनानंतर मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी असलेल्या डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी वर विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे करण्यात आले आहे.
22-23-24 जुलै रोजी हे प्रशिक्षण कुडाळ येथील दुर्वांकुर सभागृहात संपन्न होणार आहे.
फळं, फुलं, भाज्या, मसाल्याचे पदार्थ, हंगामी पीके, मासे अशा अनेक वस्तू डिहायड्रेशन पद्धतीने कशा तयार करायच्या याचं सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षणात दिले जाणार आहे.
तंत्र एक आणि उद्योगाचे मंत्र अनेक असं डिहायड्रेशनचं महत्व असून आंबा, काजू, फणस, डाळिंब, चिकू, कोकम, नारळ, कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, कडिपत्ता, शेवगा, भोपळा अशा अनेक वस्तूंपासून विविध उत्पादने तयार करता येतात.
या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी कृपया 8767473919 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे करण्यात आलेले आहे.
निसर्गसंपन्न असलेलं कोकण नानाविध फळं, फुलं, भाज्या, औषधी वनस्पती, मासे आणि इतर अनेक गोष्टींनी समृद्ध आहे.अशा या वैभवशाली कोकणातील स्थानिक लोकांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरित करणे, त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देणे, व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, विविध उद्योग संधी कडे त्यांचे लक्ष वेधणे आणि त्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनी सातत्याने प्रयत्न करत आहे.
Content Protected! Please Share it instead.