Amboli Waterfall: वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आंबोली धबधब्याबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय

   Follow us on        
Amboli Waterfall: आंबोली पर्यटन स्थळी वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर मुख्य धबधबा बंद करण्यात येणार आहे.
मुख्य धबधब्यावरील पर्यटकांना खाली उतरवून धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना मज्जाव करण्यात येणार असून सायंकाळी पाच वाजल्यानंतर मुख्य धबधबा बंद करण्यात येणार आहे. पावसाळ्यात आंबोलीतील मुख्य धबधबा परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मुख्य धबधबा, हिरण्यकेशी, कावळेसाद, महादेवगड पॉईंट या ठिकाणी आता शनिवार आणि रविवार सायंकाळी 5 नंतर प्रवेशास मज्जाव असणार आहे. 5 वाजता धबधबा परिसरात असलेल्या पर्यटकांना खाली उतरवण्यात येणार आहे आणि नवीन पर्यटकांना वर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. सर्व स्टॉलही 5 वाजता बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पावसामुळे आंबोली घाटात सुरु झालेल्या धबधब्यामुळे परिसरात दृश्यमानता कमी होते. त्यामुळे ज्या भागात दृश्यमानता कमी असेल अशा भागात पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला असून परिस्थितीनुरुप पुढील निर्देश केले जातील असे आदेश पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितलं.
Facebook Comments Box

“फ्लाय९१” ची मान्सून हंगामासाठी विशेष ऑफर; सिंधुदुर्ग-पुणे, हैदराबाद आणि बंगळूरुसाठीच्या मार्गावरही लागू

   Follow us on        
सिंधुदुर्ग: गोवास्थित प्रादेशिक विमान कंपनी “फ्लाय९१” ने मान्सून हंगामासाठी विशेष ऑफर जाहीर केली आहे. ज्या अंतर्गत कंपनीच्या २० मार्गावर तिकिटांवर ₹ ३०० पर्यंत सवलत दिली जाईल. या सवलतीमध्ये गोव्याला जोडणारे पाच प्रमुख मार्ग समाविष्ट आहेत. तसेच सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावरून पुणे, हैदराबाद आणि बंगळूरुसाठीच्या मार्गावरही ही सवलत लागू असेल, ज्यामुळे सिंधुदुर्गमधील प्रवाशांना मोठा लाभ मिळेल.
ही ऑफर केवळ १ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू आहे आणि त्या तिकिटांवर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रवास करता येईल. गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अलीकडेच घेतलेल्या बैठकीत, पावसाळी हंगामात गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विमान कंपन्या आणि ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सींनी प्रवाशांना आकर्षित करणारे उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत फ्लाय९१ ने ही खास सवलतीची योजना जाहीर केली आहे. या सवलतीमध्ये गोवा (GOX) येथून हैदराबाद (HYD), जळगाव (JLG), अगत्ती (AGX), पुणे (PNQ), सिंधुदुर्ग (SDW) आणि सोलापूर (SSE) या मार्गांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पुणे-सिंधुदुर्ग, बेंगळूरु-सिंधुदुर्ग, हैदराबाद-सिंधुदुर्ग, जळगाव-हैदराबाद, जळगाव-पुणे आणि गोवा-सोलापूर या मार्गावर देखील ही ऑफर लागू होईल.
फ्लाय९१ चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले की, पावसाळ्यात पर्यटनसंख्या कमी होत असल्याने, या काळात प्रादेशिक हवाई प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. गोव्यातील पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या धोरणाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत ही योजना आखली आहे. फ्लाय९१ ही गोवा स्थित विमान सेवा असून, सध्या पुणे, हैदराबाद, सिंधुदुर्ग, जळगाव आणि लक्षद्वीपमधील अगत्ती यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर नियमित उड्डाणे चालवते. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (GOX) वरून कार्यरत असलेली ही सेवा, एटीआर ७२-६०० प्रकारच्या अत्याधुनिक विमानांनी प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देते. पुढील पाच वर्षांत, फ्लाय९१ देशभरात ५० हून अधिक शहरांशी कनेक्ट होण्याच्या महत्वाकांक्षी ध्येयासह प्रादेशिक पर्यटनाला चालना देण्यासोबतच, शेवटच्या टप्प्यांतील भागांमध्येही कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर भर देणार आहे.
Facebook Comments Box

०१ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि- षष्ठी – 20:02:33 पर्यंत
  • नक्षत्र- आश्लेषा – 21:37:38 पर्यंत
  • करण- कौलव – 08:03:58 पर्यंत, तैतुल – 20:02:33 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग- घ्रुव – 09:11:07 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:00:12
  • सूर्यास्त- 19:12:17
  • चन्द्र राशि- कर्क – 21:37:38 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:01:00
  • चंद्रास्त- 24:11:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जागतिक पालक दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1792 : केंटकी अमेरिकेचे 15 वे राज्य बनले.
  • 1796 : टेनेसी हे अमेरिकेचे 16 वे राज्य बनले.
  • 1831 : सर जेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.
  • 1929 : विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम आणि केशवराव धायबर यांनी कोल्हापुरात प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली.
  • 1930 : दख्खनची राणी डेक्कन क्वीन ट्रेन मुंबई-पुणे दरम्यान सुरू झाली.
  • 1945 : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना झाली.
  • 1959 : द. जा. कर्वे हे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.
  • 1961 : यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने जगातील पहिल्या स्टिरिओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी दिली.
  • 1996 : भारताचे 11वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.
  • 2001 : नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.
  • 2003 : चीनमधील भव्य थ्री गॉर्जेस धरणात पाणीसाठा सुरू झाला.
  • 2004 : रमेशचंद्र लाहोटी यांनी भारताचे 35 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1842 : ‘सत्येंद्रनाथ टागोर’ – पहिले भारतीय सनदी अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू : 9 जानेवारी 1923)
  • 1843 : ‘हेन्री फॉल्स’ – फिंगरप्रिंटिंग चे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 24 मार्च 1930)
  • 1872 : ‘नारायण मुरलीधर गुप्ते’ ऊर्फ कवी बी – मराठी कवी यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1947)
  • 1907 : ‘फ्रँक व्हाईट’ – जेट इंजिन विकसित करणारे यांचा जन्म. (मृत्यू : 9 ऑगस्ट 1996)
  • 1926 : ‘मेरिलीन मन्रो’ – अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑगस्ट 1962)
  • 1929 : ‘फातिमा रशिद’ ऊर्फ ‘नर्गिस दत्त’ – हिन्दी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 3 मे 1981)
  • 1947 : ‘रॉन डेनिस’ – मॅक्लारेन ग्रुप चे संस्थापक यांचा जन्म.
  • 1965 : ‘नायगेल शॉर्ट’ – इंग्लिश बुद्धिबळपटू यांचा जन्म.
  • 1970 : ‘आर. माधवन’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1985 : ‘दिनेश कार्तिक’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1830 : ‘स्वामीनारायण’ – भारतीय धार्मिक नेते यांचे निधन. (जन्म : 3 एप्रिल 1781)
  • 1868 : ‘जेम्स बुकॅनन’ – अमेरिकेचे 15 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1791)
  • 1872 : ‘जेम्स गॉर्डन बेनेट’ – न्यूयॉर्क हेरॉल्ड चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 1 सप्टेंबर 1795)
  • 1934 : ‘श्रीपादकृष्ण कोल्हटकर’ – प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक यांचे निधन. (जन्म : 29 जून 1871)
  • 1944 : ‘महादेव विश्वनाथ धुरंधर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार यांचे निधन. (जन्म : 18 मार्च 1867)
  • 1960 : ‘पॉड हिटलर’ – जर्मन-ऑस्ट्रियन बहीण यांचे निधन. (जन्म : 21 जानेवारी 1896)
  • 1962 : ‘अ‍ॅडॉल्फ आइकमॅन’ – दुसर्‍या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्‍या या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.
  • 1968 : ‘हेलन केलर’ – अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका यांचे निधन. (जन्म : 27 जून 1880)
  • 1984 : ‘नाना पळशीकर’ – हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन.
  • 1987 : ‘के.ए. अब्बास’ – दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 7 जून 1914)
  • 1996 : ‘नीलमसंजीव रेड्डी’ – भारताचे 6वे राष्ट्रपती, लोकसभेचे 4 थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 19 मे 1913 – इलुरू, तामिळनाडू)
  • 1998 : ‘गो. नी. दांडेकर’ – ज्येष्ठ साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 8 जुलै 1916)
  • 1999 : ‘ख्रिस्तोफर कॉकेरेल’ – होव्हर्क्राफ्ट चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 4 जून 1910)
  • 2000 : ‘मधुकर महादेव टिल्लू’ – एकपात्री कलाकार यांचे निधन.
  • 2001 : नेपाळचे राजे ‘वीरेन्द्र’ यांची हत्या. (जन्म : 28 डिसेंबर 1945)
  • 2002 : ‘हॅन्सी क्रोनिए’ – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान यांचे विमान अपघातात निधन. (जन्म : 25 सप्टेंबर 1969)
  • 2006 : ‘माधव गडकरी’ – लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Konkan Railway: कमी गाड्यांपासून अधिक उत्पन्न! सावंतवाडी स्थानकावर अधिक गाड्यांना थांबे मिळणे गरजेचे, प्रवासी संघटनेचे खासदारांना निवेदन

   Follow us on        
सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी टर्मिनस या स्थानकावर १२१३३/३४ मुंबई मंगुळुरु एक्सप्रेसला थांबा मिळावा आणि सावंतवाडी टर्मिनसचा ‘अमृत भारत स्थानक योजना’  अंतर्गत विकास करावा या मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने (सावंतवाडी) लोकसभा खासदार रवींद्र वायकर यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवले आहे.
सावंतवाडी हे कोकण रेल्वे मार्गावरील एक महत्वाचे स्थानक आहे. या स्थानकावरून प्रतिदिवसी सरासरी २१०० प्रवासी प्रवास करतात. मात्र येथील प्रस्तावित टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे काम निधीअभावी अपूर्ण असून येथे सध्याची गरज पाहता खूपच कमी गाडयांना थांबे देण्यात आले आहेत. टर्मिनसचे काम पूर्ण करून या टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार कै. प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्याची मागणीही दुर्लक्षित राहिली आहे..
या स्थानकावर सध्या अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि टर्मिनस लाईनची गरज आहे. तसेच निवारा शेड, पाण्याची व्यवस्था, प्लॅटफॉर्मवरील बैठक व्यवस्था, पुरेशी प्रकाश योजना तसेच फूटओव्हर ब्रिज या सुविधांची गरज आहे. या स्थानकाचा ‘अमृत भारत स्थानक योजनेत सहभाग केला गेल्यास या सुविधा प्राप्त होण्यास अडचण येणार नाही. त्यामुळे या मागणीचा विचार करण्यात यावा अशी विनंती प्रवासी संघटनेकडडून करण्यात आली आहे.
कमी गाड्यांपासून जास्त उत्त्पन्न
या स्थानकावर गर्दीच्या वेळी म्हणजे संध्याकाळी आणि रात्री (मुंबईच्या दिशेने जाताना) फक्त २ दैनिक आणि  ३ साप्ताहिक गाडयांना थांबे देण्यात आले आहेत. या वेळेत इथे अधिक गाडयांना थांबे असणे आवश्यक आहे. तुतारी एक्सप्रेस आणि कोकणकन्या एक्सप्रेस या दोन दैनिक गाड्या या वेळेत मुंबईच्या दिशेने रवाना होतात.  आकडेवारी पाहता या दोन्ही गाड्यांना या स्थानकापासून खूप चांगले उत्त्पन्न मिळते. तुतारी एक्सपेसला  या गाडीला मिळणार्‍या एकूण उत्पन्नाच्या २२% उत्त्पन्न तर कोकणकन्या एक्सप्रेसला तिच्या एकूण उत्पन्नाच्या १५% उत्त्पन्न सावंतवाडी स्थानकापासून प्राप्त होते. माहितीच्या आकडेवारीनुसार मिळवण्यात आलेल्या माहितीनुसार सावंतवाडी स्थानकावरून स्लीपर श्रेणीतून ५०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरासाठी प्रत्येक गाडीत प्रतिदिन ४० प्रवासी प्रवास करतात. रेल्वे स्थानकांचे व्यावसायिक स्वरूप ठरविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिनांक १६.०६.२००५ च्या दिलेल्या कसोटीनुसार Criteria ही संख्या जास्त आहे.
ही आकडेवारी या स्थानकाचे महत्व सांगून जाते, तसेच ईथे अधिक गाड्यांना थांबा असण्याची गरज देखील अधोरेखित करते. माननीय खासदारांनी या गोष्टी विचारात घेऊन आपल्या या मागणीला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. pacer height=”20px”]
Facebook Comments Box

Mumbai Goa Highway: चिपळुणात १७ लाखांचा गुटखा जप्त; सावंतवाडीच्या तरुणाला अटक

   Follow us on        
चिपळूण: मुंबई गोवा महामार्गावर कापसाळ येथे अवैध गुटखा वाहतूक आणि विक्री विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथे तब्बल 16 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या गुटख्याची वाहतूक करणारा बोलेरो टेम्पो चिपळूण पोलिसांनी सापळा रचत पकडल्याची घटना गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली हा गुटखा चिपळूण येथे आणला जात असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणी टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर टेम्पोचालक सावंतवाडी येथे राहणारा आहे.. गुरुवारी परजिह्यातून बोलेरो टेम्पो भरुन तब्बल 16 लाख 94 हजार किंमतीचा गुटखा चिपळूण येथे आणला जात असल्याची गोपनीय माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंग, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार, प्रमोद कदम, कृष्णा दराडे आदींच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथे सापळा रचला. यावेळी महामार्गावरुन आलेला बोलेरो टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याने भरलेली मोठ-मोठी पोती असल्याचे आढळले. त्यात 16 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या विविध प्रकारच्या गुटख्याचा समावेश आहे. या प्रकरणी सज्जन निवेगी याला पोलिसांनी अटक केली तसेच गुटख्यासह लाखाचा टेम्पो असा 23 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सज्जन निवेगी पाला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईमुळे पानटपरीवर बिनधास्तपणे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परजिह्यातून आणलेला हा गुटखा चिपळुणात नेमका कोणाला दिला जाणार होता, शिवाय यामागे अन्य कोणाचा समावेश आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
Facebook Comments Box

३१ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-पंचमी – 20:18:24 पर्यंत
  • नक्षत्र-पुष्य – 21:08:34 पर्यंत
  • करण-भाव – 08:45:49 पर्यंत, बालव – 20:18:24 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-वृद्वि – 10:43:23 पर्यंत
  • वार-शनिवार
  • सूर्योदय-06:03
  • सूर्यास्त-19:10
  • चन्द्र राशि-कर्क
  • चंद्रोदय-10:01:59
  • चंद्रास्त-23:32:00
  • ऋतु-ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जागतिक तंबाखू विरोधी दिन
  •  वेब डिझायनर दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1727 : फ्रान्स, ब्रिटन आणि नेदरलँड्सने पॅरिसच्या करारावर स्वाक्षरी केली.
  • 1774 : ब्रिटीश भारतात पहिले पोस्ट सेवा कार्यालय स्थापन झाले.
  • 1790 : अमेरिकेत 1790 चा कॉपीराइट कायदा लागू झाला.
  • 1910 : दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले.
  • 1935 : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथे ७.७ तीव्रतेच्या भूकंपात अनेक लोक मारले गेले.
  • 1942 : दुसरे महायुद्ध – जपानी पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ल्यांची मालिका सुरू केली.
  • 1952 : संगीत नाटक अकादमीची स्थापना.
  • 1959- तिबेटमधून निर्वासित झाल्यानंतर बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना भारतात आश्रय देण्यात आला.
  • 1961 : दक्षिण अफ्रिका प्रजासत्ताक बनले.
  • 1970 : पेरू देशातील 7.9 तीव्रतेच्या भूकंपामुळे अनेक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले.
  • 1973 : इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट 440 दिल्लीतील पालम विमानतळाजवळ कोसळले, दुर्घटनेत  अनेक लोके मारले गेले.
  • 1990 : नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 1992 : प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना मध्य प्रदेश सरकारने 1991 चा कबीर सन्मान प्रदान केला.
  • 2008 : जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टने 100 मीटर शर्यत 9.72 सेकंदात पूर्ण करून विश्वविक्रम केला.
  • 2010 : भारतातील प्रत्येक मान्यताप्राप्त खाजगी शाळेत गरीब मुलांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी कायदा करण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1683 : ‘जीन पियरे क्रिस्टिन’ – सेल्सियस थर्मामीटरचे शोध लावणारे यांचा जन्म. (मृत्यू: 19 जानेवारी 1755)
  • 1725 : महाराणी ‘अहिल्याबाई होळकर’ – यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑगस्ट 1795)
  • 1910 : भास्कर रामचंद्र तथा ‘भा. रा. भागवत’ – बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार यांचा जन्म. (मृत्यू: 27 ऑक्टोबर 2001)
  • 1921 : ‘सुरेश हरिप्रसाद जोशी’ – आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी यांचा जन्म.
  • 1928 : ‘पंकज रॉय’ – क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 4 फेब्रुवारी 2001)
  • 1930 : ‘क्लिंट इस्टवूड’ – अमेरिकन अभिनेता व दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1938 : ‘विश्वनाथ भालचंद्र’ तथा ‘वि. भा. देशपांडे’ – नाट्यसमीक्षक यांचा जन्म.
  • 1966 : ‘रोशन महानामा’ – श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1874 : ‘रामकृष्ण विठ्ठल’ तथा ‘भाऊ दाजी लाड’ प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 7 सप्टेंबर 1822 – मांजरे, पेडणे, गोवा)
  • 1910 : ‘डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल’ – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर यांचे निधन. (जन्म: 3 फेब्रुवारी 1821)
  • 1973 : ‘दिवाकर कृष्ण केळकर’ तथा ‘दिवाकर कृष्ण’ – कथालेखक यांचे निधन. (जन्म: 19 ऑक्टोबर 1902 – गुंटकल, अनंतपूर, आंध्र प्रदेश)
  • 1994 : ‘पंडित सामताप्रसाद’ – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक यांचे निधन. (जन्म: 20 जुलै 1921 – वाराणसी)
  • 2002 : ‘सुभाष गुप्ते’ – लेग स्पिनर यांचे निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1929)
  • 2003 : ‘अनिल बिस्वास’ – प्रतिभासंपन्न संगीतकार यांचे निधन. (जन्म: 7 जुलै 1914)
  • 2009 : ‘कमला दास’ – केरळ साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय इंग्रजी भाषिक कवी तसचं, भारतातील केरळ राज्यातील मल्याळम भाषिक लेखिका यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Konkan Railway: चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या उन्हाळी विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        
Konkan Railway: उन्हाळी हंगामासाठी गावी गेलेले चाकरमानी आता परतीच्या मार्गाला लागले आहेत. मात्र प्रवाशांचा ओघ वाढल्याने गर्दी होऊन त्यांचा प्रवास त्रासदायक होत आहे. ही गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणाऱ्या एका साप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी विशेष गाडी म्हणून कोकण रेल्वे मार्गावर  धावणाऱ्या गाडी क्रमांक गाडी क्र. ०११०४ / ०११०३  मडगाव  – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव उन्हाळी विशेष या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधी धावत असलेल्या वेळापत्रकानुसार आणि डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.
गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक २५/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला आता ०८ जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर रविवारी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (टी) -मडगाव साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक २६/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला आता ०९ जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर सोमवारी एलटीटी वरुन ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:४० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३ कोच, थ्री टायर इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.
Facebook Comments Box

३० मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि- चतुर्थी – 21:25:52 पर्यंत
  • नक्षत्र- पुनर्वसु – 21:30:29 पर्यंत
  • करण- वणिज – 10:17:57 पर्यंत, विष्टि – 21:25:52 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग- गण्ड – 12:56:27 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:03
  • सूर्यास्त- 19:10
  • चन्द्र राशि- मिथुन – 15:43:38 पर्यंत
  • चंद्रोदय- 08:58:59
  • चंद्रास्त- 22:45:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1574 : हेन्री (तृतीय) फ्रान्सचा राजा झाला.
  • 1631 : पहिले फ्रेंच वृत्तपत्र, गॅझेट डी फ्रान्स प्रकाशित झाले.
  • 1858 : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी तात्याटोपेच्या मदतीने ग्वाल्हेरवर आक्रमण केले.
  • 1919 : जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी सर ही पदवी परत केली.
  • 1922 : वॉशिंग्टन डीसीमध्ये लिंकन मेमोरियल समर्पित करण्यात आले.
  • 1934 : मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात.
  • 1942 : दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या 1000 विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.
  • 1974 : एअरबस ए-300 विमान सेवेत दाखल.
  • 1975 : युरोपियन स्पेस एजन्सीची स्थापना झाली.
  • 1987 : गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला.
  • 1993 : पु. ल. देशपांडे यांना त्रिदल’ संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
  • 1998 : अफगाणिस्तान मधील 6.5 मेगावॅट क्षमतील भूकंपात 4000 ते 4500 लोक ठार झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1894 : ‘डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर’ – इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 जुलै 1969)
  • 1916 : ‘दीनानाथ दलाल’ – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 15 जानेवारी 1971 – मुंबई)
  • 1947 : ‘व्ही. नारायणसामी’ – पुडुचेरीचे 10 वे मुख्यमंत्री.
  • 1949 : ‘बॉब विलीस’ – इंग्लिश जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1950 : ‘परेश रावल’ – अभिनेते यांचा जन्म.
  • 1983 : अभिषेक शर्मा उर्फ ‘कृष्णा अभिषेक’ – भारतीय अभिनेता, विनोदकार, दूरचित्रवाणी प्रस्तुतकर्ता आणि निर्माता यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1574 : फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचे निधन. (जन्म : 27 जून 1550)
  • 1778 : ‘व्होल्टेअर’ – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक यांचे निधन. (जन्म : 21 नोव्हेंबर 1694)
  • 1912 : ‘विल्बर राईट’ – आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते यांचे निधन. (जन्म : 16 एप्रिल 1867)
  • 1941 : थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचे निधन. (जन्म : 8 नोव्हेंबर 1893)
  • 1950 : ‘दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर’ – प्राच्यविद्या संशोधक यांचे निधन.
  • 1955 : ‘नारायण मल्हार जोशी’ – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक यांचे निधन. (जन्म : 5 जून 1879)
  • 1968 : ‘सावळाराम लक्ष्मण हळदणकर’ – चित्रकार यांचे निधन. (जन्म : 25 नोव्हेंबर 1882)
  • 1981 : ‘झिया उर रहमान’ – बांगलादेशचे 7 वे राष्ट्राध्यक्ष यांची हत्या. (जन्म : 19 जानेवारी 1936)
  • 1989 : ‘दर्शनसिंहजी महाराज’ – शिख संतकवी यांचे निधन. (जन्म : 14 सप्टेंबर 1921)
  • 1989 : ‘वीर बहादूर सिंग’ – भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशचे 14 वे मुख्यमंत्री यांचे निधन.
  • 2007 : ‘गुंटूर सेशंदर शर्मा’ – भारतीय कवी आणि समीक्षक यांचे निधन. (जन्म : 20 ऑक्टोबर 1927)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Konkan Railway: राजापूर रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबे मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री पुढे सरसावले

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबे मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे सरसावले आहेत. गाडी क्रमांक 12051/12052 जन्मशताब्दी एक्सप्रेस आणि 16345/16346 नेत्रावती एक्सप्रेस या दोन गाड्यांना राजापूर स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी केली होती. या मागणीला बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन गाडयांना या स्थानकावर थांबा देण्याची मागणी करणारे निवेदन केंदीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना लिहून पाठवले आहे.

मुख्यमंत्री या निवेदनात लिहितात….

विषय: राजापूर रोड रेल्वे स्टेशन, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र येथे गाड्यांना थांबा मंजूर करण्याची विनंती.

प्रिय श्री. अश्विनी वैष्णव जी,

कोकण रेल्वेवरील राजापूर रोड रेल्वे स्टेशन हे कोकणातील नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेल्या भागांच्या जवळ आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एक अत्यंत लोकसंख्येच्या क्षेत्राला सेवा देत आहे. हे स्टेशन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, आंबा आणि काजू व्यापाऱ्यांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे.

सांगली जिल्ह्यातील आमदार सदाभाऊ खोत यांनी खालील गाड्यांमध्ये गाड्यांना राजापूर येथे थांबा देण्याची मागणी केली आहे.

१. १२०५१ /१२०५२ मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस

२. १६३४५ /१६३४६ नेत्रावती एक्सप्रेस

मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही राजापूर रोड रेल्वे स्थानकावरील थांब्याच्या या मागणीवर विचार करण्यासाठी रेल्वे बोर्डाला सूचना द्याव्यात.

हार्दिक शुभेच्छा,

आपला विनम्र.

(देवेंद्र फडणवीस)

Facebook Comments Box

Dodamarg: दोन कार समोरासमोर धडकल्याने अपघात

   Follow us on        

दोडामार्ग: कसई दोडामार्ग केळीच टेंब येथे दोन गाड्या समोरासमोर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात सकाळी १०:०० च्या सुमारास घडला. अपघातात दोन्ही गाडीतील प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमीना उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांना अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबूळी हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळेदोडामार्ग ते तिलारी या राज्यमार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search