BF7 Variant Threat :चीनमध्ये कोव्हिडची तिसरी लाट आणणाऱ्या कोरोना व्हायरसच्या BF.7 या व्हेरियंटचे व्हेरियंटचे 3 रुग्ण भारतात आढळल्याची बातमी NDTV वृत्तवाहिनीने PTI वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिली.भारतात गुजरातमध्ये दोन तर ओडिशात एक रुग्ण सापडला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबद्दल एक बैठक घेतली आणि जगातील अनेक देशांमध्ये सध्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
Follow us on
मांडविया म्हणाले, काही देशांमध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांच्या वाढत्या संख्येला पाहाता आज तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोव्हिड अद्याप संपलेला नाही. या संदर्भातील सर्व घटकांना सतर्क राहून लक्ष ठेवण्याचे आदेश मी दिले आहेत. कोणतीही स्थिती हाताळण्यास आम्ही तयार आहोत
Konkan Railway News : ख्रिसमस सण साजरा करण्यासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी कोंकणरेल्वेने या मार्गावर अजून काही अतिरिक्त गाड्या सोडायचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या ह्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
Train no. 01461 / 01462 मुंबई सीएसएमटी – कन्याकुमारी – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ह्या गाड्या मुंबई सीएसएमटी ते कन्याकुमारी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01461 मुंबई सीएसएमटी – कन्याकुमारी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 22/12/2022 रोजी गुरुवारी ही गाडी मुंबई सीएसएमटी ह्या स्थानकावरुन संध्याकाळी 15.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 23.20 वाजता कन्याकुमारी स्थानकावर पोहोचेल
Train No 01462 कन्याकुमारी – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 24/12/2022 रोजी शनिवारी ही गाडी कन्याकुमारी ह्या स्थानकावरुन संध्याकाळी 14.15 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 23.00 वाजता मुंबई सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल.
Konkan Railway News : कोंकण रेल्वेने कोंकण मार्गावरील काही गाडयांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. 20923/20924 गांधीधाम – तिरुनवेल्ली – गांधीधाम वीकली एक्सप्रेस हि गाडी जी ह्या आधी २१ LBH डब्यांसहित चालविण्यात येत होती ती आता २२ LBH डब्यांसहित चालविण्यात येणार आहे. १ स्लीपर कोच कायमस्वरूपी ह्या गाडीला जोडण्यात येणार आहे.
ट्रेन नंबर 20924 गांधीधाम – तिरुनवेल्ली वीकली एक्सप्रेस हि गाडी दिनांक ०२/०१/२०२३ पासून तर 20923 तिरुनवेल्ली – गांधीधाम वीकली एक्सप्रेस हि गाडी ०५/०१/२०२३ पासून ह्या अतिरिक्त डब्यासहीत चालविण्यात येणार आहे.
मागील 12 वर्षांपासुन रखडलेल्या मुंबई-गोवा मार्गाच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुढे आले आहेत.
Mumbai-Goa Highway News:कोकणाच्या समृद्धीसाठी ‘मुंबई-गोवा महामार्ग’ सुस्थितीत आणायलाच हवा ह्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांच्याशी आज चर्चा केली. लवकरच रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून कामाच्या सद्यस्थितीबाबत माहिती मिळेल. अशा आशयाचे ट्विट राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केले आहे.
Follow us on
आपण ह्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा केली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत पण बोलणे झाले. समृद्धी महामार्ग जर कमी वेळात पूर्ण होऊ शकतो तर मुंबई गोवा महामार्गाच्या कामात काय अडथळे येत आहेत असे असा सवाल त्यांनी नितीन गडकरी यांना केला. तुम्ही वैयक्तिकरीत्या लक्ष घातल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही म्हणुन तुम्ही लक्ष घालून हे काम पूर्णत्वास न्या या माझ्या विनंतीवर गडकरी यांनी आठ ते दहा दिवसांत ह्या प्रश्नावर तोडगा काढू असे आश्वासन दिले असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
कोकणाच्या समृद्धीसाठी 'मुंबई-गोवा महामार्ग' सुस्थितीत आणायलाच हवा ह्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis ह्यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय मंत्री @nitin_gadkari ह्यांच्याशी आज चर्चा केली. लवकरच रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून कामाच्या सद्यस्थितीबाबत माहिती मिळेल. pic.twitter.com/uQ8PjmaOK9
सिंधुदुर्ग, दि. 21/12/2022 : आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुणे येथून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या केळकर ट्रॅव्हल्स कंपनीच्या चालत्या लक्झरी बसला आग लागली. सुदैवाने ह्या अपघातात जिवितहानी झाली नाही पण बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लक्झरी मधून ३५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले .
Follow us on
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदत कार्य केले. कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला तत्काळ पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी ती वाहतूक सुरळीत केली.
Mumbai News:मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालय दंत विविध संवर्गात कंत्राटी तत्वावर पदे भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर आहे. नियुक्त उमेदवारांना पालिकेच्या नियमानुसार वेतन दिले जाईल.
पुढील पदांकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
डाटा ऑपरेटर : एकूण पदे ५
शैक्षणिक अर्हता : बारावी उत्तीर्ण, मराठी व इंग्रजी टंकलेखन उत्तीर्ण,
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष
एक्स रे टेक्निशियन : १ पद
शैक्षणिक अर्हता : बारावीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवला जाणारा क्ष किरण विषयातील बीपीएमटी हा पूर्णवेळ ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम व सहा महिन्यांची इंटर्नशीप,
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष
अधिपरिचारीका : ४ पदे
शैक्षणिक अर्हता : बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग अधिक मिडवायफरी डिप्लोमा धारक असावा कंवा साडेतीन वर्षाँचा कालावधी पूर्ण झालेला अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण झालेला असावा तसेच उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असावा
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
बहुउद्देशीय कामगार : १२ पदे
शैक्षणिक अर्हता : इयत्ता आठवी उत्तीर्ण असावा, मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता यावी.
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
सुतार (कारपेंटर) : १ पद
शैक्षणिक अर्हता: आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा त्याबाबतचा अनुभव असल्यास प्राधान्य
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
नळ कारागीर (प्लंबर) : १ पद
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा त्यासंदर्भातील अनुभव असल्यास प्राधान्य
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
एसी टेक्निशियन : १ पद
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्ल्यूडी परवाना बंधनकारक
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
इलेक्ट्रीशियन : १ पद
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्लूडी परवाना बंधनकारक
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
वायरमन कम लिफ्टमन
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्लूडी परवाना बंधनकारक
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
इलेक्ट्रीकल हेल्पर
शैक्षणिक अर्हता : किमान आठवी पास व विद्युत कामाचा अनुभव असणे आवश्यक, मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे
वयाची अट : १८ ते ३८
Mumbai-Goa Highway :मुंबई गोवा महामार्ग गेल्या १२ वर्षांपासून रखडला आहे. ह्याविषयी कोकणवासियांकडून वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त होताना दिसत आहे. हाच आक्रोश आता एका भजनातून-गजरातून व्यत्क्त केला गेला आहे. श्री म.प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) प्रासादिक भजन मंडळद्वारे हा गजर YOUTUBE ह्या माध्यमावर प्रसिद्ध केला आहे.
ह्या गजराचे शब्दांकन केले आहे श्री बाबाजी हरिचंद्र आमडोस्कर (हरि सुत), तर बुवा:- श्री. प्रमोद ना. धुरी यांनी ह्या गजराला संगीत दिले आहे. त्यांना साथ दिली आहे……
Konkan Railway News :कोकणरेल्वेच्या आणखी चार एक्सप्रेस गाड्या विद्युत इंजिनावर धावणार आहेत. कोकण रेल्वेचं १००% विद्युतीकरण करण्याचा निर्धार केला गेला आहे. ह्या आधी बहुतेक गाड्यांचे विद्युतीकरण करण्यात आलेले आहे.त्यात भर म्हणून खालील गाड्यांचे विद्युतीकरण करण्यात आलेले आहे.
Follow us on
मत्स्यगंधा एक्सप्रेस (१२६२०/१२६१९) ही दिनांक १८ डिसेंबरपासून पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे.
तिरुअनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणारी साप्ताहिक एक्सप्रेस गाडी (२२६५३/२२६५४) ही दिनांक १७ डिसेंबर पासून पासून विद्युत इंजिन जोडून चालवली जाणार आहे.
तिरुअनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (२२६३३/२२६३४) दिनांक २१ डिसेंबर पासून पासून विजेवर धावणार आहे.
कोचुवेली ते योगनगरी ऋषिकेश दरम्यान धावणारी साप्ताहिक एक्सप्रेस(२२६५९/२२६६० ) आहे. ही गाडी २३ डिसेंबरपासून विजेवर धावणार आहे.
सिंधुदुर्ग: देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीने देवगड येथे कातळशिल्प सहलीचे आयोजन केले आहे. दिनांक ८ जानेवारी २०२३ ला हि सहल आयोजित केली गेली आहे. ह्या सहलीत देवगड विविध ठिकाणाची १८ कातळशिल्प दाखवली जातील.
ह्या सहलीसाठी ४५० रुपये आकारण्यात येणार आहेत त्यामध्ये प्रवास भाडे, सकाळचा चहा, नाश्ता आणि दुपारी शाकाहारी जेवण समाविष्ट असेल. पर्यटक स्वतःची गाडी पण या सहलीसाठी आणू शकतात. अशा पर्यटकांना सवलत दिली जाईल.
Follow us on
सहलीची रूपरेषा
दिनांक – रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी 8:00 वाजता देवगड स्टॅन्ड वरून प्रवासाला सुरवात होणार आहे. वाघोटन येथील कातळशिल्प व ऐतिहासिक वास्तू पाहून त्यानंतर बापर्डे,वानिवडे,तळेबाजार, दाभोळे येथील पोखरबावं येथील कातळशिल्पे पाहून माघारी फिरुन देवगडला सहल समाप्त होईल. या पूर्ण सहलीत 15 ते 18 सुबक कातळ शिल्पे पाहायला मिळतील.
कातळशिल्पे म्हणजे काय?
नवाश्मयुगीन माणसाने जांभा खडकावर म्हणजेच कातळावर जी चित्रे कोरली त्यालाच आपण कातळशिल्प असे म्हणतो. कातळशिल्प जगात काही मोजक्या ठिकाणीच आढळतात ब्राझील, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या ठिकाणी आढळून आली आहेत. पण भारतातील कोकणात फार मोठ्या प्रमाणात ती आढळतात आणि याचंच भान राखून देवगड इतिहास संशोधन मंडळाने कातळशिल्प शोध मोहीम व ती सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना साथ म्हणून ह्या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या सहलीबद्दल अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी श्री अजित टाककर ,मोबाईल नंबर -9689163017 यांच्याशी संपर्क साधावा.