मुंबई गोवा महामार्गावर मोठा अपघात; तिघांचा मृत्यू

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथील वीर स्थानकाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी आहेत. त्यांना महाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.गाडीतील डिझेल संपल्याने स्कॉर्पिओ जीप वीर स्थानकाजवळ बंद पडली होती. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला लावून प्रवासी गाडी शेजारी उभे होते. यावेळी मागून आलेल्या भरधाव टोईंग व्हॅनने बंद पडलेल्या स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. यात गाडी शेजारी असलेले सहा जण गंभीर जखमी झाले.

टोईंग व्हँनची धडक इतकी जोरात होती, की स्कॉर्पिओ गाडी पन्नास फूट लांब जाऊन सर्व्हिस रोडच्या पलीकडे असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. या दुर्घटनेत सूर्यकांत मोरे, साहिल शेलार (वय वर्ष २५) आणि प्रसाद नातेकर (वय वर्ष२५) सर्व रहाणार कुंभार आळी, महाड यांचा मृत्यू झाला. तर समिप मिंडे (वय वर्ष ३५) रहाणार दासगाव, सुरज नलावडे (वय वर्ष ३४) रहाणार चांभार खिंड आणि शुभम माटल (वय वर्ष २६) शिरगाव हे जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, तसेच स्थानिक बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जखमींना महाड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापुर्वी तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी टोईंग व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

Facebook Comments Box

३ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 23:41:41 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 22:22:30 पर्यंत
  • करण-वणिज – 12:27:33 पर्यंत, विष्टि – 23:41:41 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वज्र – 12:36:59 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:15
  • सूर्यास्त- 18:12
  • चन्द्र-राशि-मकर – 10:48:19 पर्यंत
  • चंद्रोदय- 09:58:00
  • चंद्रास्त- 21:37:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • जागतिक अ‍ॅक्युप्रेशर थेरपी दिन
  • मूलभूत कर्तव्यपालन दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १४९६: लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.
  • १९२५: बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.
  • १९४३: पहिल्यांदा टीवी वर हरविलेल्या व्यक्तींविषयी सूचना सुरु करण्यात आली.
  • १९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
  • १९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.
  • १९५२: स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
  • १९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
  • १९९४: रवींद्रनाथ टागोर यांनी शांती निकेतन ला पुष्प जत्रेचे उद्घाटन केले.
  • १९९७: या दिवशी इटली चे अभिनेते आणि लेखक डारिओ फो यांना नोबेल पारितोषका ने सन्मानित करण्यात आले.
  • २००४: नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८३१: सावित्रीबाई फुले – समाजसेविका (मृत्यू: १० मार्च १८९७)
  • १८८२: प्रसिद्ध कलाकार नंदलाल बोस यांचा जन्म.
  • १८८३: क्लेमंट अ‍ॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: ८ आक्टोबर १९६७)
  • १९२१: चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू: ६ जुलै १९९७)
  • १९२२: सिंधी साहित्यिक किरट बाबाणी यांचा जन्म.
  • १९२७: ओडीसा चे माजी मुख्यमंत्री बल्लभ पटनायक यांचा जन्म.
  • १९३१: य. दि. फडके – लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक (मृत्यू: ११ जानेवारी २००८)
  • १९४१: भारतीय अभिनेता संजय खान यांचा जन्म.
  • १९८१: भारतीय हॉकी खेळाडू तसेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित खेळाडू सूरज लता देवी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९०३: अ‍ॅलॉइस हिटलर – अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील (जन्म: ७ जून १८३७)
  • १९७२: ला प्रसिद्ध नाटककार मोहन राकेश यांचे निधन.
  • १९७५: बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन. त्यांच्या हत्येचे गूढ अजुनही उलगडलेले नाही. (जन्म: २ फेब्रुवारी १९२३)
  • १९७८: ला विद्वान संशोधक परशुराम चतुर्वेदी यांचे निधन.
  • १९९४: अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक (जन्म:
  • १९९८: प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्यगोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९)
  • २०००: डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
  • २००२: सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (जन्म: २५ सप्टेंबर १९२०)
  • २००५: भारतीय नेते जे. एन. दिक्षित यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

नागपूर – मडगाव एक्सप्रेसचे सावंतवाडीत जोरदार स्वागत

   Follow us on        
सावंतवाडी: नागपूर – मडगाव एक्सप्रेस  या गाडीला मुदतवाढ देताना रेल्वे प्रशासनाने तिला सावंतवाडी येथे थांबा मंजूर केला.  कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या लढ्याला यश मिळताना दिसत असून त्याचाचं एक भाग म्हणून नागपूर – मडगाव एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे थांबा देण्यात आला. आज कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) च्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी स्थानकावर या गाडीचे जोरदार स्वागत केले.
आज ही ट्रेन पहिल्यांदाच सावंतवाडी स्थानकात थांबली, या एक्सप्रेस गाडीचे आज सायंकाळी सावंतवाडी रेल्वे येथे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या वतीने गाडी समोर श्रीफळ फोडून मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले. यावेळी मोटरमनसह उपस्थित प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.या ट्रेनला सावंतवाडीत थांबा मिळाल्यामुळे आता सावंतवाडी तालुक्यासह वेंगुर्ले, दोडामार्ग येथील प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या श्री क्षेत्र शेगावला जाण्यासाठी कोकणवासीयांना या गाडीचा फायदा होणार आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे थांबा मंजूर होताचं क्षणी माडखोल येथील रेल्वे प्रेमी प्रितेश भागवत यांनी सावंतवाडी स्थानकातून शेगाव दौऱ्यासाठी ३० तिकीटे बुक करुन या गाड्याच्या सावंतवाडीतील थांब्याबाबत रेल्वेचे आभार मानले.
आज झालेल्या मडगाव-नागपूर एक्सप्रेस च्या स्वागतासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे पदाधिकारी सागर तळवडेकर, मिहीर मठकर, नंदू तारी, सुभाष शिरसाट, गोविंद परब, मेहुल रेडीज, साहील नाईक, राशी परब, विहांग गोठोस्कर, तेसज पोयेकर, राज पवार, शुभम सावंत, रुपेश रेडीज यांच्यासह सावंतवाडी रिक्षा संघटना पदाधिकारी रेल्वेप्रेमी प्रितेश भागवत, नितेश तेली, नितिन गावडे उपस्थित होते.
सावंतवाडी थांबा मिळण्याबाबत संघटनेच्या प्रयत्नांना पाठबळ देणाऱ्या खासदार मा. श्री. नारायण राणे, आमदार मा.श्री. दिपक केसरकर, माजी केंद्रीय मंत्री मा.श्री. सुरेश प्रभू व माजी खासदार श्री. विनायक राउत यांचे यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेकडून जाहीर आभार मानण्यात आले.
Facebook Comments Box

२ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 25:10:39 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 23:11:21 पर्यंत
  • करण-तैतिल – 13:50:27 पर्यंत, गर – 25:10:39 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-हर्शण – 14:57:30 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:14
  • सूर्यास्त- 18:11
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 09:15:00
  • चंद्रास्त- 20:37:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
  • १८३९: लुई दागुएरे यांनी चंद्राचा पहिला फोटो प्रदर्शित केला होता.
  • १८८१: लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.
  • १८८५: पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.
  • १९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.
  • १९३६: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना
  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.
  • १९४५: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
  • १९५४: राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्‍न’ पुरस्कारांची स्थापना केली.
  • १९८५: पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.
  • १९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या
  • १९९१: तिरुअनंतपुरम च्या विमानतळाला आंतराष्ट्रीय चा दर्जा देण्यात आला.
  • १९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान
  • १९९९: अमेरिकेत हिमवादळात मिल वॉकीमध्ये१४ इंच टर शिकोगामध्ये १९ इंच हिम पडला. शिकागोचे तापमान -‌‍१३°F इतके कमी झाले.
  • २०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
  • २०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८७८: भारताचे पद्मभूषण पुरस्कार विजेते मन्नत्तु पद्मनाभन यांचा जन्म.
  • १९०५: भारताचे पद्मभूषण पुरस्कार विजेते जैनेंद्र कुमार यांचा जन्म.
  • १९०६: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी. एन. खुरोदे यांचा जन्म.
  • १९२०: आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (मृत्यू: ६ एप्रिल १९९२)
  • १९३२: हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५)
  • १९३२: भारतीय चित्रपट निर्माते जॉनी बक्षी यांचा जन्म.
  • १९४०: अमेरिकी-भारतीय वैज्ञानिक एस. आर.श्रीनिवास वर्धन यांचा जन्म.
  • १९५९: किर्ती आझाद – क्रिकेटपटू आणि खासदार
  • १९६०: रमण लांबा – क्रिकेटपटू (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९८)
  • १९७०: स्विमर बुला चौधरी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १३१६: अल्लाउद्दीन खिलजी – दिल्लीचा सुलतान (जन्म: ? ? ????)
  • १९३५: मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील (जन्म: १९ ऑगस्ट १८८६)
  • १९४३: हुतात्मा वीर भाई कोतवाल (जन्म: ? ? ????)
  • १९४४: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (जन्म: २३ एप्रिल १८७३)
  • १९५०: समाज सेविका तसेच स्वातंत्र्य सैनिकांमधील एक डॉ.राधाबाई यांचे निधन.
  • १९५२: व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन.
  • १९८८: भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार अन्वर हुसेन यांचे निधन.
  • १९८९: सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार (जन्म: १२ एप्रिल १९५४)
  • १९९९: विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????)
  • २००२: अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी (जन्म: ? ? १९४७)
  • २०१०: गुजराती कवी राजेंद्र शहा यांचे निधन.
  • २०१५: भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

समोर वाकलेला रूळ… मोटारमेनचे प्रसंगावधान; लोकल ट्रेनचा मोठा अपघात होता होता टळला

   Follow us on        

Mumbai: विरारहून मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट लाईनच्या अप मार्गावर काल मंगळवारी रेल्वे रुळ वाकल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे विरार चर्चगेट एसी ट्रेनचा जागच्या जागी ब्रेक मारल्यानं वेस्टर्न लाईनवर मोठा अनर्थ टळलाय. ट्रेनचा मोटरमन रुळावर लक्ष ठेवून होता आणि त्याला वाकलेला ट्रॅक दिसताच त्याने गाडी थांबवली. पुढील दुर्घटना होऊ नये म्हणून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित कळवले. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. परंतू ट्रॅक नक्की कशामुळे वाकला? याचे नेमके कारण स्पष्ट होऊ न शकल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

मंगळवारी दुपारी 12.45 ला विरारहून सुटलेली एसी लोकल विरार-नालासोपारा स्थानकादरम्यान आली असता मोटरमनच्या लक्षात वाकलेला रेल्वे रुळ आला. त्याने तत्काळ लोकल थांबवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर मागून येणाऱ्या जनरल लोकललाही थांबवण्यात आले. दोन्ही लोकल थांबल्याने अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरून पायी नालासोपारा स्थानक गाठले. रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत फास्ट ट्रॅकवरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वाकलेला रुळ पूर्णपणे बदलला, त्यानंतर फास्ट लाईनवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, ट्रॅक वाकण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

या घटनेमुळे प्रवाशांना काही काळ गैरसोय सहन करावी लागली. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप राहिले. त्याच्या वेगवान निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवाशांनी मोटरमनचे आभार मानले असून, त्यांच्या सतर्कतेची प्रशंसा केली आहे. रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, ट्रॅक वाकण्याचे कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी रेल्वे ट्रॅकच्या देखभालीवर अधिक भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. मोटरमनच्या निर्णयामुळे एका मोठ्या दुर्घटनेची टांगती तलवार टळली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाकडून अधिक मजबूत सुरक्षा उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Facebook Comments Box

समृद्धी महामार्गावर एकाच वेळी २० हून अधिक वाहने पंक्चर; कारण काय?

   Follow us on        

मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाशिम येथे रविवारी २० हून अधिक वाहने टायर पंक्चर झाल्याने बंद पडली. काही समाजकंटक समृद्धी महामार्गावर खिळे टाकून वाहने पंक्चर करीत असल्याचा आरोप यानिमित्ताने होत होता. मात्र, हा आरोप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) फेटाळून लावला आहे. समृद्धी महामार्गावर कोणीही खिळे टाकलेले नाही. समृद्धी महामार्गावर वाशिम येथे रविवारी रात्री एक अतिशय वजनदार पत्रा पडला होता. या लोखंडी पत्र्यावरून वाहने गेल्यामुळे टायर पंक्चर झाल्याचे उघडकीस आले आहे.

समृद्धी महामार्गामुळे नागपूर-इगतपुरी प्रवास अतिवेगवान झाला आहे. मात्र, त्याच वेळी वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाशिम येथे समृद्धी महामार्गावर रविवारी रात्री वाहने बंद पडण्यास सुरुवात झाली. काही मिनिटांतच २० हून अधिक वाहनांचे टायर पंक्चर झाल्याचे निदर्शनास आले. ही सर्व वाहने महामार्गाच्या एका बाजूला लावण्यात आली. यासंबंधीची माहिती मिळताच संंबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाशिममधील पॅकेज ५ मधील साखळी क्रमांक २२२/५२० येथे ही घटना घडली. येथून जाणाऱ्या एका ट्रकमधील वजनदार लोखंडी पत्रा येथे पडला होता. त्यावरून गेलेली वाहने पंक्चर झाल्याचे निष्षन्न झाले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी तत्काळ रस्तारोधक उभारून घटनास्थळाचा भाग वाहतुकीसाठी बंद केला. त्यानंतर मालेगाव पथकर नाक्यावरून क्रेन मागवून पत्रा हटविण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली. टायर पंक्चर झालेल्या वाहनांचे वाहनचालक आणि प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची सोय करून त्यांना सुरक्षित ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला बसविण्यात आले. तसेच, वाहनांची योग्य ती दुरुस्ती करून देण्यात आली.

Facebook Comments Box

१ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 26:26:25 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 23:46:54 पर्यंत
  • करण-बालव – 14:57:55 पर्यंत, कौलव – 26:26:25 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्याघात – 17:06:01 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:11:46
  • सूर्यास्त- 18:12:09
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 08:26:00
  • चंद्रास्त- 19:37:00
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • नववर्ष दिन
  • जागतिक शांतता दिन
  • जागतिक कौटुंबिक दिवस
महत्त्वाच्या घटना:
  • १७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.
  • १७८५: डेली यूनिवर्सल रजिस्टर म्हणजेच टाईम्स ऑफ लंडन ने आजच्या दिवशी पहिला अंक प्रकाशित केला होता.
  • १८०८: यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
  • १८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.
  • १८४२: बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले. नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले.
  • १८४८: महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
  • १८६२: इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
  • १८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे ’न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.
  • १८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना
  • १८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
  • १९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
  • १९०८: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ’ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.
  • १९१२: याच दिवशी रिपब्लिक ऑफ चायना ची स्थापना झाली होती.
  • १९१५: ला महात्मा गांधी यांना केसर ये हिंद चा पुरस्कार व्हायसरॉय यांच्या हातून मिळाला.
  • १९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
  • १९२०: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांनी छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ’शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे.
  • १९२३: ला चित्तरंजन दास आणि जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली.
  • १९३२: डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले.
  • १९६४: मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत अभियानाला सुरुवात केली.
  • १९७२: वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडल्या गेले.
  • १९७३: मानेकशॉ यांना फ़ील्ड मार्शल नियुक्त केल्या गेले.
  • १९९५: WTO ची स्थापना झाली.
  • २०००: ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.
  • २००१: कलकत्ता ला अधिकृत रित्या कोलकत्ता म्हणून ओळखल्या जाऊ लागले.
  • २००४: चेकोस्लोवाकिया चे राष्ट्रपती व्हॅकलाव हवेली यांना गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती /वाढदिवस:
  • १६६२: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा (मृत्यू: १२ एप्रिल १७२०)
  • १८७९: इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू: ७ जून १९७०)
  • १८९२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)
  • १८९४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)
  • १९००: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४)
  • १९०२: कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)
  • १९१८: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)
  • १९२३: उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३)
  • १९२८: डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८)
  • १९३५: ला भारतीय अभिनेत्री शकीला यांचा जन्म.
  • १९३६: राजा राजवाडे – साहित्यिक (मृत्यू: २१ जुलै १९९७)
  • १९४१: गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार
  • १९४३: रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण
  • १९५०: दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका
  • १९५१: नाना पाटेकर – अभिनेता
  • १९५३: ला भारताचे माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद यांचा जन्म.
  • १९६१: ला मणिपूर चे माजी मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांचा जन्म.
  • १९७१: संसद चे माजी सदस्य ज्योतिरादित्य सिंधिया यांचा जन्म.
  • १९७५: भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा जन्म.
  • १९७९: भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री विद्या बालन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५१५: लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २७ जून १४६२)
  • १७४८: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ जुलै १६६७)
  • १८९४: हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
  • १९४४: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म: २९ मार्च १८६९)
  • १९५५: डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४)
  • १९७५: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. (जन्म: ८ आक्टोबर १८९१)
  • १९८३: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी.एन.खुरोदे यांचे निधन.
  • १९८९: दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार
  • २००८: ला भारताचे प्रसिद्ध लेखक प्रतापचंद्र चंदर यांचे निधन.
  • २००९: रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

३१ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 27:24:15 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 24:04:19 पर्यंत
  • करण-किन्स्तुघ्ना – 15:44:43 पर्यंत, भाव – 27:24:15 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-घ्रुव – 18:58:44 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:14
  • सूर्यास्त- 18:10
  • चन्द्र-राशि-धनु – 30:01:57 पर्यंत
  • चंद्रोदय- 07:33:59
  • चंद्रास्त- 18:34:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना
  • १७८१: अमेरिकेमध्ये अमेरिकेची पहिली बँक ऑफ उत्तर अमेरिका उघडली.
  • १८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.
  • १८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
  • १९२९: महात्मा गांधी आणि कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी लाहोर मध्ये पूर्ण स्वराज साठी आंदोलनाला सुरुवात केली.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९५५: जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.
  • १९९७: मोहम्मद रफ़ीक तरार पाकिस्तान चे नववे राष्ट्रपती बनले.
  • १९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.
  • १९८४: राजीव गांधी हे भारताचे सातवे प्रधान मंत्री बनले.
  • १९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • १९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
  • २००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ – १०१ या इमारतीचे उद्‍घाटन झाले.
  • २००८: ईश्वरदास रोहिणी यांना दुसऱ्यांना मध्य प्रदेश च्या विधानसभेचे अध्यक्ष बनविण्याची घोषणा करण्यात आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८७१: गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद (मृत्यू: २५ मे १९५४)
  • १९१०: पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)
  • १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०११)
  • १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म.
  • १९३७: अँथनी हॉपकिन्स – वेल्श अभिनेता
  • १९४७: सुप्रीम कोर्टचे माजी न्यायाधीश स्वातंत्र कुमार यांचा जन्म.
  • १९४८: डोना समर – अमेरिकन गायिका (मृत्यू: १७ मे २०१२)
  • १९५१: लोकसभेचे सदस्य अरविंद सावंत यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८८६: केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन.
  • १८९८: बिहार चे माजी मुख्यमंत्री कृष्णा बल्लभ सहाय यांचा जन्म.
  • ????: शाहीर पिराजीराव सरनाईक (जन्म: ? ? ????)
  • १९२६: वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (जन्म: १२ जुलै १८६३)
  • १९५६: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री यांचे निधन
  • १९७१: डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)
  • १९८६: राजनारायण – केंद्रीय आरोग्य मंत्री (जन्म: ? ? १९१७)
  • १९९३: जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९३९)
  • १९९७: ’स्वरराज’ छोटा गंधर्व (जन्म: १० मार्च १९१८)
  • २००१: भारतीय लेखक टी. एम. चिदंबरा रघुनाथन यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

३० डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अमावस्या – 27:58:36 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 23:58:04 पर्यंत
  • करण-चतुष्पाद – 16:05:10 पर्यंत, नागा – 27:58:36 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वृद्वि – 20:31:30 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:13
  • सूर्यास्त- 18:09
  • चन्द्र-राशि-धनु
  • चंद्रोदय- चंद्रोदय नाही
  • चंद्रास्त- 17:34:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • ०: रोमन सम्राट टायटस यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर ८१)
  • १८०३: ला ब्रिटन च्या इस्ट इंडिया कंपनी ने दिल्ली,आग्रा आणि भरूच वर आपले नियंत्रण सुरु केले.
  • १९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.
  • १९२४: एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.
  • १९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला
  • १९७९: ला पश्चिम आफ्रिकेतील एका देशाने संविधानाला स्विकार केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • ३९: टायटस – रोमन सम्राट (मृत्यू: १३ सप्टेंबर ८१)
  • १८६५: रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (मृत्यू: १८ जानेवारी १९३६)
  • १८७९: वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय तत्त्ववेत्ते (मृत्यू: १४ एप्रिल १९५०)
  • १८८७: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’चे संस्थापक (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१)
  • १९०२: डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार, वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार (मृत्यू: १४ मे १९६३)
  • १९२३: भारतीय शैक्षणिक व राजकारणी प्रकाश केर शास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९७७)
  • १९३४: हबल स्पेस टेलिस्कोप चे सहनिर्माते जॉन एन. बाहॅकल यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट २००५)
  • १९३५: प्रथम भारतीय चेस मास्टर मॅन्युअल आरोन यांचा जन्म.
  • १९५०: सी + + प्रोग्रामिंग भाषाचे जनक बर्जनी स्ट्रास्ट्रुप यांचा जन्म.
  • १९५०: भारतीय समज सेवक डॉ. हनुमाप्पा सुदर्शन यांचा जन्म.
  • १९८३: इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक केविन सिस्ट्रम यांचा जन्म.
  • १९८९: भारतीय क्रिकेटपटू सौरभ तिवारी चा जन्म.
  • १९९२: भारताच्या युवा बॅडमिंटन खेळाडू सौरभ वर्मा यांचा जन्म.
  • १९९४: भारताच्या आर्चर आणि अर्जुन पुरस्कार विजेता रजत चौहान चा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६९१: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २५ जानेवारी १६२७)
  • १९४४: रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (जन्म: २९ जानेवारी १८६६)
  • १९७१: डॉ. विक्रम साराभाई – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)
  • १९७४: आचार्य शंकरराव देव – गांधीवादी कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)
  • १९८२: दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (सतीची पुण्याई, धाकटी मेहुणी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इ. अनेक चित्रपट) (जन्म: २ डिसेंबर १९१३ – कोल्हापूर)
  • १९८७: दत्ता नाईक ऊर्फ ’एन. दत्ता’ – संगीतकार (जन्म: ? ? ????)
  • १९९०: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक रघुवीर सहाय यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १९२९)
  • २००६: इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी (जन्म: २८ एप्रिल १९३७)
  • २०१५: भारतीय कवी, नाटककार, आणि अनुवादक मंगेश पाडगावकर यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९२९)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

३१ डिसेंबरला ‘पेग लिमिट’ चा नियम; जास्तीत जास्त किती पेग घेता येणार?

   Follow us on        
मुंबई: नवं वर्ष सुरू होण्यासाठी अगदी मोजकेच दिवस शिल्लक आहेत, मात्र आतापासूनच अनेकांनी नववर्षाच्या स्वागताचं नियोजन करण्यास सुरुवात केले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी  मात्र मस्त हॉटेलमध्ये जाऊन दारूचे ग्लास रिचवत नवं वर्षाचं सेलिब्रेशन करण्याच्या बेतात असलेल्या एक महत्वाची बातमी  आहे. नव्या नियमांनुसार नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जे हॉटेल किंवा बारमध्ये 31 डिसेंबरला जाणार आहेत, अशा मद्यपींना केवळ चार पेग एवढीच दारू मिळणार आहे.
चार पेगपेक्षा अधिक दारू यावेळी कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही. याबाबत हॉटेल असोसिएशनकडून माहिती देण्यात आली आहे. नव्या वर्षाचं सेलीब्रेशन करण्यासाठी अनेक जण हॉटेलमध्ये येतात. ते प्रमाणाबाहेर दारू पितात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होतो. प्रमाणाबाहेर दारू पिल्यास अपघाताचा धोका असतो. जेव्हा लोक दारू पिऊन आपल्या गाडीनं घरी जातात तेव्हा अनेक अपघात होतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या वर्षी नव वर्षाच्या स्वागताला हा नियम बनवण्यात आल्याचं हॉटेल असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे.
चालकाची व्यवस्था करणार
सरकारकडून नव वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व हॉटेल आणि बारसाठी नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे. कोणत्याही ग्राहकाला दारू देण्यापूर्वी त्याच्या वयाबाबत खात्री करून घ्यावी. त्याच्या वयाचा पुरावा त्याच्याकडे मागावा. अल्पवयीन असेल तर दारू देऊ नये. तसेच दारू पिल्यामुळे जर त्याला घरी जाण्यास समस्या असेल तर अशा व्यक्तींसाठी चालकाची सोय करावी. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला सकाळी पाच वाजेपर्यंत सर्व हॉटेल आणि बार सुरू राहणार आहेत, तशी परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासोबतच हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांना दारूच्या लिमीटचं बंधन देखील घालण्यात आलं आहे.
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search