सावंतवाडी: नाकर्त्या प्रशासनाचा अजून एक बळी

   Follow us on        

सावंतवाडी: रविवारी चराठे-ओटवणे रस्त्यावर झालेल्या अपघतात कारिवडे गावातील ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाजारातून दुचाकीवरून घरी जात असताना येथील एका वळणावर त्याचा दुचाकीवरून ताबा सुटून ती एका मोठ्या दगडावर आढळली. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या रुग्णालयात गंभीर जखमी रुग्णांना उपचार करण्याची सोय नसल्याने रुग्णालय प्रशासनाने त्याला बांबुळी येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले.

मात्र तिथे कोणतीही रुग्णवाहिका नसल्याने नातेवाईकांना रुग्णवाहिका शोधण्यासाठी पळापळ करावी लागली. १०८ वरून मागवलेली रुग्णवाहिका बांद्यावरून जवळपास सव्वा ते दिड तासाने आली. रुग्णाला घेऊन ती रुग्णवाहिका निघाली खरी मात्र बांबुळी रुग्णालयात पोहोचेपर्यंत परशुरामची प्राणज्योत मालवली.

वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती आणि परशुरामवर वेळेत उपचार चालू झाले असते तर त्याचा जीव वाचवता आला असता. मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा जीव गेला. असे अजून किती बळी प्रशासन घेणार असा प्रश्न विचारला जात आहे. L

सावंतवाडी तालुक्यात मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे ही मागणी खूप वर्षांपासून केली जात आहे. मात्र प्रखर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी ते अजून काही वर्षे होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. मात्र ते होईपर्यंत किमान गंभीर जखमी रुग्णांना गोवा राज्यात जलद गतीने नेण्यासाठी रुग्णवाहिका तरी उपलब्ध करून द्यावी. येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी रुग्णाला गोव्यातील बांबुळी येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देऊन सरळ आपले हात वर करतात. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांचा रुग्णवाहिकेचा शोध घ्यावा लागतो. साहजिकच याबाबत त्यांना कल्पना नसल्याने खूप वेळ वाया जातो. येथील प्रशासन अशा गंभीर जखमी रुग्णांना दुसरीकडे हलविण्यासाठी एक-दोन रुग्णवाहिका का ठेवू शकत नाही हा पण एक प्रश्नच आहे.
सावंतवाडीतील प्रस्तावित मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल चे काय झाले?
१६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेताना या हॉस्पिटलच्या कामास गती देण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे स्पष्टपणे सांगितले होते. दरम्यान, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत यांनी या हॉस्पिटलसाठीची जागा सध्याच्या कुटीर रुग्णालयाच्या परिसरातच असावी, अशी भूमिका घेतली आहे. मात्र काही राजकीय मंडळी हा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते अमोल टेंबकर यांनी सावंतवाडीतील ‘यशराज मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल’ या पर्यायी प्रकल्पाला महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की जागेचा वाद सुटला तरी हॉस्पिटल उभारणीस किमान तीन वर्षे लागतील. त्यामुळे सध्या या प्रकल्पाची वाटचाल ठप्प झाली असून अद्याप कोणतेही ठोस पाऊल पुढे पडलेले नाही.

सावंतवाडी आणि आजूबाजूचा परिसर अजूनही अशा प्रकारच्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी गोवा राज्यावर अवलंबून आहे. सावंतवाडीत एक सुसज्ज मल्टिस्पेशालिटी हॉस्पटिल व्हावे ही मागणी राजकीय इच्छा शक्ती अभावी पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत.

Facebook Comments Box

०७ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 14:29:59 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 14:02:14 पर्यंत
  • करण-तैेतिल – 14:29:59 पर्यंत, गर – 26:26:19 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-विश्कुम्भ – 06:42:28 पर्यंत, प्रीति – 29:38:50 पर्यंत
  • वार-गुरूवार
  • सूर्योदय- 06:20
  • सूर्यास्त- 19:09
  • चन्द्र-राशि-धनु – 20:12:05 पर्यंत
  • चंद्रोदय- 17:53:59
  • चंद्रास्त- 29:03:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • राष्ट्रीय हातमाग दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1789 : यूएस सरकारच्या युद्ध विभागाची स्थापना झाली.
  • 1942 : दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्य पॅसिफिक महासागरातील ग्वाडालकॅनल कालव्यावर उतरले आणि द्वितीय विश्वयुद्धातील सर्वात भयंकर लढाई खेळली गेली. या घटनेपासून जपानची माघार सुरू झाली.
  • 1947 : मुंबई महानगरपालिकेने बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कंपनी ताब्यात घेतली.
  • 1947 : थोर हेयरडाहल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोन टिकी नावाच्या बाल्सा वुड राफ्टमधून 101 दिवसांत प्रशांत महासागर ओलांडून 7,000 किमी प्रवास केला.
  • 1981 : वॉशिंग्टन स्टार वृत्तपत्र सलग 128 वर्षांच्या प्रकाशनानंतर बंद झाले.
  • 1985 : ताकाओ डोई, मोमोरू मोहोरी आणि चिकी मुकाई यांची जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून निवड झाली.
  • 1987 : लिन कॉक्स अमेरिकेतून सोव्हिएत युनियनमध्ये पोहणारी पहिली व्यक्ती ठरली.
  • 1990 : आखाती युद्धासाठी अमेरिकेचे पहिले सैन्य सौदी अरेबियात आले.
  • 1991 : पृथ्वीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • 1997 : चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावावर असलेला व्हिटोरियो डी सिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 2000 : ब्रिटीश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या संकल्प मोडवालने नऊ वर्षांखालील गटात संयुक्त विजेतेपद पटकावले.
  • 2020 : एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 1344 ने भारतातील केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी ओव्हरशूट केली आणि क्रॅश झाला, त्यात 190 पैकी 21 जणांचा मृत्यू झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1702 : ‘नसीरुद्दीन मुहम्मद शाह’ – मुघल सम्राट जन्म
  • 1871 : ‘अवनींद्रनाथ टागोर’ – जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका यांचा जन्म. (मृत्यू : 5 डिसेंबर 1951)
  • 1876 : ‘माता हारी’ – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑक्टोबर 1917)
  • 1912 : ‘केशवराव कृष्णराव दाते’ – हृदयरोगतज्ञ यांचा जन्म.
  • 1925 : ‘एम. एस. स्वामीनाथन’ – पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री यांचा जन्म.
  • 1935 : ‘राजमोहन गांधी’ – भारतीय चरित्रकार, इतिहासकार, महात्मा गांधींचे नातू यांचा जन्म.
  • 1936 : ‘डॉ. आनंद कर्वे’ – दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते यांचा जन्म.
  • 1948 : ‘ग्रेग चॅपेल’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1966 : ‘जिमी वेल्स’ – विकिपीडियाचे सह-संस्थापक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1934 : ‘जोसेफ मॅरी जाकॉर्ड’ – जॅक्वार्ड लूम चे शोधक यांचे निधन. (जन्म : 7 जुलै 1752)
  • 1848 : ‘जेकब बर्झेलिअस’ – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 20 ऑगस्ट 1779)
  • 1941 : ‘रवींद्रनाथ टागोर’ – भारतीय कवी, शिक्षणतज्ञ, पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यांचे निधन. (जन्म : 7 मे 1861)
  • 1974 : ‘अंजनीबाई मालपेकर’ – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचे निधन.
  • 2018 : ‘एम.करुणानिधी’ – तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

०६ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 14:10:33 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 13:00:53 पर्यंत
  • करण-बालव – 14:10:33 पर्यंत, कौलव – 26:24:49 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वैधृति – 07:17:42 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:19
  • सूर्यास्त- 19:10
  • चन्द्र-राशि-धनु
  • चंद्रोदय- 17:03:00
  • चंद्रास्त- 28:03:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय स्कुबा दिवस
  • जागतिक हिरोशिमा दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1914 : पहिले महायुद्ध – सर्बियाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले आणि ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1926 : गर्ट्रूड एडरली ही इंग्लिश चॅनेल ओलांडणारी पहिली महिला ठरली.
  • 1940 : सोव्हिएत युनियनने बेकायदेशीरपणे एस्टोनियाचा ताबा घेतला.
  • 1945 : अमेरिकेने हिरोशिमा, जपानवर अणुबॉम्ब टाकला. इतिहासात प्रथमच अणुबॉम्बचा वापर करण्यात आला.
  • 1952 : राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना.
  • 1960 : अमेरिकेच्या निर्बंधाला प्रतिसाद म्हणून, क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
  • 1962 : जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  • 1990 : संयुक्त राष्ट्रांनी कुवेतला जोडण्यासाठी इराकवर व्यापार निर्बंध लादले.
  • 1994 : डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 1997 : कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने 6 बाद 952 धावा केल्या. त्यात सनथ जयसूर्याने 340 धावा केल्या.
  • 2010 : भारताच्या जम्मू आणि काश्मीर प्रदेशात भीषण पूर.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1809 : ‘लॉर्ड टेनिसन’ – इंग्लिश कवी यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1892)
  • 1881 : ‘अलेक्झांडर फ्लेमिंग’ – पेनिसिलीन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 11 मार्च 1955)
  • 1900 : ‘सीसिल हॉवर्ड ग्रीन’ – टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 11 एप्रिल 2003)
  • 1925 : ‘योगिनी जोगळेकर’ – लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 1 नोव्हेंबर 2005)
  • 1933 : ‘ए जी कृपाल सिंग’ – भारतीय कसोटी क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1959 : ‘राजेंद्र सिंग’ – भारतीय पर्यावरणवादी यांचा जन्म.
  • 1965 : ‘विशाल भारद्वाज’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1970 : ‘एम. नाईट श्यामलन’ – भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1925 : ‘सुरेंद्रनाथ बॅनर्जी’ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक , राष्ट्रगुरू यांचे निधन. (जन्म : 10 नोव्हेंबर 1848)
  • 1965 : ‘वसंत पवार’ – संगीतकार यांचे निधन.
  • 1991 : ‘शापूर बख्तियार’ – ईराणचे 74 वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 26 जून 1914)
  • 1997 : ‘वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1924)
  • 1999 : ‘कल्पनाथ राय’ – केन्द्रीय मंत्री, काँग्रेसचे नेते यांचे निधन. (जन्म : 4 जानेवारी 1941)
  • 2001 : ‘कुमार चॅटर्जी’ – भारतीय नौदल प्रमुख आधार यांचे निधन.
  • 2019 : ‘सुषमा स्वराज’ – भारतीय महिला राजकारणी आणि भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या १८ विशेष गाड्या

   Follow us on        

मुंबई | ५ ऑगस्ट २०२५

रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिनाच्या काळात प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण १८ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि मडगाव या मार्गांवर धावणार आहेत. विशेषतः  दीर्घ सुट्टीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.

. या विशेष गाड्या खालील मार्गांवर धावणार आहेत:

  • सीएसएमटी (मुंबई) ते नागपूर – सहा (६) फेऱ्या
  • एलटीटी (मुंबई) ते मडगाव – चार (४) फेऱ्या
  • सीएसएमटी (मुंबई) ते कोल्हापूर – दोन (२) फेऱ्या
  • पुणे ते नागपूर – सहा (६) फेऱ्या

विशेष गाड्यांचा तपशील:

१) सीएसएमटी – नागपूर (दोन [२] फेऱ्या):

०११२३ विशेष गाडी ०९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२.२० वा. मुंबई सीएसएमटी येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वा. नागपूरला पोहोचेल.

०११२४ विशेष गाडी १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० वा. नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५.२५ वा. मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल

 सीएसएमटी – नागपूर (चार [४] फेऱ्या):

०२१३९ विशेष गाडी १५ आणि १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२.२० वा. सीएसएमटी येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वा. नागपूरला पोहोचेल.

०२१४० विशेष गाडी १५ आणि १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.०० वा. नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वा. मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, माळखेड, शेगाव, अकोला, मुरतिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा

डब्यांची रचना: दोन एसी-३ टियर, बारा स्लीपर, सहा जनरल, दोन ब्रेक व्हॅन

 

२) सीएसएमटी – कोल्हापूर (दोन [२] फेऱ्या):

०१४१७ विशेष गाडी ०८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.३० वा. सीएसएमटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१५ वा. कोल्हापूरला पोहोचेल.

०१४१८ विशेष गाडी १० ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ४.४० वा. कोल्हापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.४५ वा. सीएसएमटी येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेऊरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज

डब्यांची रचना: दोन एसी-३ टियर, बारा स्लीपर, सहा जनरल, दोन ब्रेक व्हॅन

 

३) एलटीटी – मडगाव (चार [४] फेऱ्या):

०११२५ विशेष गाडी १४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.१५ वा. एलटीटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वा. मडगाव येथे पोहोचेल.

०११२६ विशेष गाडी १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.४० वा. मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वा. एलटीटी येथे पोहोचेल.

०११२७ विशेष गाडी १६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.१५ वा. एलटीटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वा. मडगाव येथे पोहोचेल.

०११२८ विशेष गाडी १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.४० वा. मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वा. एलटीटी येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी

डब्यांची रचना: एक एसी-१ टियर, तीन एसी-२ टियर, सात एसी-३ टियर, आठ स्लीपर, एक पँट्री कार, एक जनरेटर कार

 

४) पुणे – नागपूर (सहा [६] फेऱ्या):

विशेष गाडी क्रमांक ०१४६९ ही ०८.०८.२०२५ रोजी पुणे येथून सायंकाळी १९.५५ वाजता प्रस्थान करेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १४.४५ वाजता आगमन करेल. (एक फेरफटका)

विशेष गाडी क्रमांक ०१४७० ही १०.०८.२०२५ रोजी नागपूर येथून दुपारी १३.०० वाजता प्रस्थान करेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.२० वाजता आगमन करेल. (एक फेरफटका)

थांबे: दौंड चोर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, माळकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा.

रचना: दोन एसी-३ टियर डबे, १२ स्लीपर क्लास डबे, ६ सामान्य दुसऱ्या वर्गाचे डबे आणि २ द्वितीय आसन व गार्ड ब्रेक व्हॅन.

 

 आरक्षण माहिती:

०७ ऑगस्ट २०२५ पासून पुढील गाड्यांसाठी आरक्षण सुरू होईल:

०११२३, ०११२४, ०१४१७, ०१४१८, ०१४६९ आणि ०१४७०

०९ ऑगस्ट २०२५ पासून पुढील गाड्यांसाठी आरक्षण सुरू होईल:

०२१३९, ०२१४०, ०१४३९, ०१४४०, ०११२५ आणि ०११२७

प्रवाशांनी www.irctc.co.in या अधिकृत वेबसाइटवर किंवा जवळच्या संगणकीकृत आरक्षण केंद्रात जाऊन तिकीट आरक्षित करावे.

Facebook Comments Box

Konkan Railway: कार-ऑन-ट्रेन सेवेला आता कोकणातही ‘हॉल्ट’

 

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे महामंडळाने कोलाड (महाराष्ट्र) ते वेर्णा (गोवा) दरम्यान सुरू केलेल्या रो-रो (Ro-Ro) कार ट्रान्सपोर्टेशन सेवेला आता नवा थांबा मिळाला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सोयीसाठी नांदगाव रोड स्थानकावर या सेवेसाठी अतिरिक्त थांबा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे कार मालकांसाठी ही सेवा अधिक लवचिक आणि उपयोगी ठरणार आहे. आता प्रवासी कोलाड, नांदगाव रोड किंवा वेर्णा या कोणत्याही स्थानकावरून कार लोड आणि अनलोड करू शकतील.

या सेवेसाठी नोंदणीची अंतिम मुदत १८ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. कोलाड ते वेर्णा दरम्यान एका कारसाठी भाडे ₹७८७५/- (५% GST सहित) आहे, तर कोलाड ते नांदगाव दरम्यानचे भाडे ₹५४६०/- इतके आहे. प्रत्येक कारसाठी ₹४०००/- नोंदणी शुल्क आकारले जाईल, जे सेवेसाठी पात्र ठरल्यास अंतिम भाड्यातून वजा केले जाईल. मात्र, जर १६ हून कमी बुकिंग्स प्राप्त झाल्या तर सेवा रद्द करण्यात येईल आणि नोंदणी शुल्क परत करण्यात येईल.

कार लोड झाल्यानंतर चालक किंवा सहप्रवाशांना कारमध्ये बसून प्रवास करण्याची परवानगी नसेल. त्याऐवजी प्रवाशांनी रेल्वेच्या कोचमध्ये 3AC किंवा 2S वर्गात तिकिट काढून प्रवास करावा लागेल. एका कार बुकिंगवर ३ प्रवासी (२ जण 3AC आणि १ जण 2S) प्रवास करू शकतात. अतिरिक्त प्रवासी केवळ रिक्त जागा उपलब्ध असल्यासच प्रवास करू शकतील.

या नव्या थांब्यामुळे वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. कोलाडहून वेर्णाकडे जाणारी सेवा दुपारी ३ वाजता सुटेल आणि नांदगाव रोडवर रात्री १० वाजता पोहोचेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता वेर्णा स्थानकात आगमन होईल. वेर्णाहून परतीच्या प्रवासात गाडी दुपारी ३ वाजता सुटेल, नांदगावला रात्री ८ वाजता पोहोचेल आणि कोलाडला दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोहोचेल.

नोंदणीसाठी कोलाड, वेर्णा किंवा कणकवली (नांदगावसाठी) स्थानकावर संपर्क करता येईल. अधिक माहितीसाठी आणि अटी व शर्तींसाठी अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

०५ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 13:14:33 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – 11:23:53 पर्यंत
  • करण-विष्टि – 13:14:33 पर्यंत, भाव – 25:47:05 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-इंद्रा – 07:24:26 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:19
  • सूर्यास्त- 19:10
  • चन्द्र-राशि-वृश्चिक – 11:23:53 पर्यंत
  • चंद्रोदय- 16:08:59
  • चंद्रास्त- 27:06:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1861 : अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा पद्धत रद्द करण्यात आली.
  • 1914 : ओहायोमध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले.
  • 1962 : नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर 1990 मध्ये त्यांची सुटका झाली.
  • 1962 : कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
  • 1965 : पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.
  • 1994 : इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेचे संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.
  • 1997 : दोन रशियन अंतराळवीरांना घेऊन एक सोयुझ-यू अंतराळयान मीर अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले.
  • 1997 : फ्रेंच ओपन लॉन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावणाऱ्या महेश भूपतीला क्रीडा विभागाकडून 2 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • 2024 : बांगलादेश प्रधानमंत्री शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावे लागले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1858 : ‘वासुदेव वामन खरे’ – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जून 1924)
  • 1890 : ‘महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार’ – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1979)
  • 1930 : ‘नील आर्मस्ट्राँग’ – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑगस्ट 2012)
  • 1933 : ‘विजया राजाध्यक्ष’ – लेखिका व समीक्षिका यांचा जन्म.
  • 1950 : ‘महेंद्र कर्मा’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 मे 2013)
  • 1969 : ‘वेंकटेश प्रसाद’ – जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1972 : ‘अकिब जावेद’ – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1974 : ‘काजोल’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1987 : ‘जेनेलिया डिसोझा’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 882 : 882ई.पुर्व : ‘लुई (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन.
  • 1962 : ‘मेरिलीन मन्‍रो’ – अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 1 जून 1926)
  • 1984 : ‘रिचर्ड बर्टन’ – अभिनेता यांचे निधन. (जन्म : 10 नोव्हेंबर 1925)
  • 1991 : ‘सुइचिरो होंडा’ – होंडा कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 17 नोव्हेंबर 1906)
  • 1992 : ‘अच्युतराव पटवर्धन’ – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1905)
  • 1997 : ‘के. पी. आर. गोपालन’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
  • 2000 : ‘लाला अमरनाथ भारद्वाज’ – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व भारताचे पहिले शतकवीर यांचे निधन.
  • 2001 : ‘ज्योत्स्‍ना भोळे’ – गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 11 मे 1914)
  • 2014 : ‘चापमॅन पिंचर’ – भारतीय-इंग्रजी इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 29 मार्च 1914)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

०४ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 11:43:52 पर्यंत
  • नक्षत्र-अनुराधा – 09:13:31 पर्यंत
  • करण-गर – 11:43:52 पर्यंत, वणिज – 24:33:17 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-ब्रह्म – 07:04:59 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:19
  • सूर्यास्त- 19:11
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 15:13:59
  • चंद्रास्त- 26:11:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय घुबड जागरूकता दिन
  • आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1854 : हिनोमारा ध्वज जपानी जहाजांनी अधिकृतपणे वापरण्यास सुरुवात केली.
  • 1914 : पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर आक्रमण केले. प्रत्युत्तर म्हणून, युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले. अमेरिकेने तटस्थता जाहीर केली.
  • 1924 : सोव्हिएत युनियन आणि मेक्सिको यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • 1947 : जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • 1956 : अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी भाभा अणुऊर्जा केंद्र तुर्भे येथे कार्यान्वित झाली.
  • 1983 : थॉमस संकरा हे अपर व्होल्टाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • 1984 : अप्पर व्होल्टाचे नाव बुर्किना फासो करण्यात आले.
  • 1993 : पुण्यातील राजेंद्र खंडेलवाल या अपंग पण दृढ साहसी व्यक्तीने कायनेटिक होंडा वर चार सहकाऱ्यांसह समुद्रसपाटीपासून 18,383 फूट उंचीवरील खारदुंग ला खिंड पार केली. त्यांच्या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.
  • 1998 : फिलीपिन्सचे माजी राष्ट्रपती कोरेझोन अक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 2001 : मृत्यूनंतर त्वचा दान करणारी भारतातील पहिली स्किन बँक मुंबईतील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात आली.
  • 2007 : नासाचे फिनिक्स अंतराळयान प्रक्षेपित झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1730 : ‘सदाशिवराव भाऊ’ – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती यांचा जन्म. (मृत्यू : 14 जानेवारी 1761)
  • 1821 : ‘लुई व्हिटोन’ – लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 27 फेब्रुवारी 1892)
  • 1834 : ‘जॉन वेन’ – ब्रिटिश गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1923)
  • 1845 : ‘सर फिरोजशहा मेहता’ – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 5 नोव्हेंबर 1915)
  • 1863 : ‘महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर’ – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान यांचा जन्म.
  • 1894 : ‘नारायण सीताराम फडके’ – साहित्यिक व वक्ते यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑक्टोबर 1978)
  • 1929 : ‘वेल्लोर जी. रामभद्रन’ – तामिळनाडूमधील मृदंगम कलाकार यांचा जन्म.
  • 1929 : ‘किशोर कुमार’ – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑक्टोबर 1987)
  • 1931 : ‘नरेन ताम्हाणे’ – यष्टीरक्षक आणि फलंदाज यांचा जन्म. (मृत्यू : 19 मार्च 2002)
  • 1950 : ‘एन. रंगास्वामी’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1961 : ‘बराक ओबामा’ – अमेरिकेचे 44 वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म.
  • 1965 : ‘विशाल भारद्वाज’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि संगीतकार यांचा जन्म.
  • 1978 : ‘संदीप नाईक’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 221 : ‘लेडी जेन’ – चीनी सम्राज्ञी यांचे निधन. (जन्म : 26 जानेवारी 183)
  • 1060 : ‘हेन्‍री (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 4 मे 1008)
  • 1875 : ‘हान्स अँडरसन’ – डॅनिश परिकथालेखक यांचे निधन. (जन्म : 2 एप्रिल 1805)
  • 1937 : ‘डॉ. काशीप्रसाद जायस्वाल’ – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 नोव्हेंबर 1881)
  • 1977 : ‘एडगर अॅड्रियन’ – नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट यांचे निधन. (जन्म : 30 नोव्हेंबर 1889)
  • 1997 : ‘जीन काल्मेंट’ – 122 वर्षे आणि 164 दिवस जगलेली फ्रेन्च महिला यांचे निधन. (मृत्यू : 21 फेब्रुवारी 1875)
  • 2003 : ‘फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स’ – नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ यांचे निधन. (जन्म : 25 ऑगस्ट 1916)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

कोकण रेल्वेच्या समस्या आणि उपाययोजना: सागर तळवडेकर यांची अभ्यासपूर्ण मांडणी

   Follow us on        

सावंतवाडी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण रेल्वे संदर्भात गेल्या काही वर्षांत झालेली जनजागृती वाखाणण्याजोगी असून, युवकांच्या सहभागातून कोकण रेल्वे संदर्भातील विविध प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष व अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे संपर्क प्रमुख श्री. सागर तळवडेकर यांनी “कोकण रेल्वे समस्या आणि निवारण – माझ्या नजरेतून” या शीर्षकाखाली तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत सरकारला प्रश्न विचारले आहेत.

“कोकण रेल्वे समस्या आणि निवारण.
माझ्या नजरेतून..

नमस्कार मंडळी, काही वर्षापासून कोकण रेल्वे संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंबहुना तळकोकणात जी जनजागृती झालीत ती खरच वाखण्याजोगे आहे. याआपल्या माहिती साठी सांगतो की 2017 ते 2020 पर्यंत सावंतवाडीचे कै. डी के सावंत यांनी जी रेल्वे संदर्भात मुहूर्त बांधली ती आता कुठे रंगू लागली आहे. कोरोना काळात कोणालाही न कळता सावंतवाडी आणि कणकवली स्थानकावरून गाड्या कमी करण्यात आल्या, परंतु तेव्हा याचा विरोध कोणी केला नव्हता, त्यात सावंतवाडी येथील प्रस्तावित टर्मिनसचे काम देखील ठप्प पडले होते.
‎दरम्यानच्या काळात सावंतवाडीतील काही तरुणांनी बॅनर लावून केलेली रेल्वे प्रशासनाची थट्टा पूर्ण जिल्हाभर गाजली होती.आणि येथूनच या सिंधुदुर्गात कोकण रेल्वे महामंडळाविरोधात कोकणवासीयांची नकारात्मकता दिसून यायला लागली.
‎वर्षं 2022, जेव्हा कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली आणि सावंतवाडी स्थानकातून काढण्यात आलेले थांबे कर्नाटक राज्यातील स्थानकांना देण्यात आले तेव्हा सावंतवाडीतील काही युवकांच्या मनात पाल चुकचुकली. आणि इथूनच काल पर्यंत झालेले आंदोलन हे त्याचेच फळ. आणि हो कोकणातील अजून स्थानकांवर पुढेही आंदोलने होतील..!! 

समस्या क्र. १.- कोकण रेल्वे नेमकी कोणाची..??

‎बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस या महनीय व्यक्तींमुळे रेल्वे कोकणात आली खरी, परंतु फायदा कोकणाला काही झालाच नाही. मुळात कोकण रेल्वे हे एक महामंडळ असल्याकारणाने याला अर्थसंकल्पीय तरतूदच नाही. त्यामुळे प्रवासी, मालवाहतूक, आदी उत्पन्नावर या महामंडळाला आपला कारभार हाकावा लागतो.
‎उपाय- या महामंडळाचे भारतीय रेल्वे मध्ये विलिनीकरण करणे.आणि कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग मध्य रेल्वे कडे हस्तांतरित करणे. यासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांनी आपली संमती देणे आवश्यक आहे.
‎महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केलीय. त्यासाठी आम्ही युवकांनी मेल मोहीम करून हा मुद्दा खासदार धैर्यशील मोहिते, सुनील तटकरे, नरेश म्हस्के, रविंद्र वाईकर आदींकडून लोकसभेत आणि राज्यसभेत उपस्थित केला.(त्यांनी मांडलेला मजकूर आणि आम्ही केलेली मेल मोहिमेतील मजकूर यात १०० टक्के साधर्म्य होते) १ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील मुंबई प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद घेऊन या विषयाला महाराष्ट्राच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोचवले होते.

समस्या क्र. २.- कोकणी माणसांना तिकिटे, नवीन गाड्या कधी मिळणार..?? खरंच टर्मिनसची आवश्यकता असते का??

‎कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्या ह्या बारामाही फुल धावतात, त्यामुळे आपला कोकणी माणूस हा वेटींग वरच राहतो.याला मूळ कारण काय असावे बरे..?? काही लोक म्हणतील एजंट..!!परंतु मी म्हणतो याला एजंट कारणीभूत नाही, एजंट हे तांत्रिक कारण असूच शकत नाही. मूळ कारण हे टर्मिनस सुविधा आहे.
‎कोकणात टर्मिनस नसल्याकारणाने येथून गाड्या सोडण्यावर निर्बंध येतात.त्यामुळे कोकणसाठी नवीन गाडी सोडायची म्हटल्यावर ती गोव्यातील मडगाव स्थानकापर्यंत सोडली जाते,आणि इथेच सगळा खेळ होऊन जातो. कारण गोव्यात बाराही महिने पर्यटकांचा भरणा चालू असतो, गोव्यातील मडगाव आणि थिवी हे स्थानक प्रवासी संख्या आणि उत्पन्नात अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणून गाडी जर गोव्यापर्यंत गेली तर सर्वात जास्त तिकीट कोटा ही तेथील स्थानकांना अधिक मिळतो आणि आपली कोकणी जनता वेटींग वर मूग गिळून गप्प राहते आणि आपला रोष एजंट वर काढते.
‎उपाय – कोकणाला जर कोकणमर्यादित गाड्या हव्या असतील, पुरेसा तिकीट कोटा हवा असेल तर कोकणात स्वतंत्र टर्मिनसची नितांत आवश्यकता आहे.
त्यासाठी तत्कालीन रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे टर्मिनस मंजूर केले खरे परंतु कोकणवासीयांचा निद्रस्त भूमिकेमुळे हे टर्मिनस गेले १० वर्ष रखडले.
सावंतवाडीत जर टर्मिनस आणि कोचिंग डेपो झाला तर त्याचा फायदा फक्त सावंतवाडीला होणार नसून तर संपूर्ण कोकणला त्याचा फायदा होईल. ज्या प्रमाणे तुतारी एक्सप्रेस मध्ये फक्त कोकणी मनुष्य मुंबई पर्यंतचा प्रवास करतो तसाच प्रवास अजून काही गाड्या सावंतवाडी वरून सुरू झाल्यास होईल. त्यासाठी परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनस आणि कोचिंग डेपोची आवश्यकता आहे.

समस्या क्र. ३.- कोकण रेल्वे महामार्गाचे दुहेरीकरण कधी..??वाढीव थांबे कधी मिळणार..??सिंधुदुर्गात १५ गाड्या का थांबत नाहीत??येथील प्रवासी सुविधांचे काय..??

‎कोकण रेल्वे हे केंद्राचा रेल्वे मंत्रालय संलग्न महामंडळ आहे,ज्या मध्ये ४ राज्यांची हिस्सेदारी आहे. आणि सदर महामंडळ सध्या कर्जाच्या खाईत आहे, आजमितीस या महामंडळावर हजारो कोटीच्या घरात कर्ज आहे.
‎उपाय – आजचा घडीला कोकण रेल्वे मार्गाचे संपूर्ण दुहेरीकरण करण्यासाठी किमान ४० हजार कोटींची गरज आहे.जे एका महामंडळाला झेपण्यासारखे नाही. याचकारणाने सध्या या मार्गाचे दुहेरीकरण होणे शक्य नाही.या महामंडळाने टप्पा दुहेरीकरणाचा प्रस्ताव प्रत्येक राज्यसरकारला पाठवला होता परंतु त्याचे घोडे पुढे धावलेच नाहीत.
‎थांब्यासंदर्भात बोलायचे झाले तर त्याला मोठा जन लढा उभारावा लागतो कारण जो पर्यंत मागणी करत नाही तो पर्यंत त्याचा वर कारवाई होत नाही. मी एक रेल्वेचा अभ्यासक म्हणून हा मुद्दा उपस्थित केला होता परंतु तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.त्याचे एक कारण म्हणजे आपली उदासीनता.त्यामुळेच कदाचित सिंधुदुर्गात एकूण १५ गाड्या थांबत नाहीत, त्यात सावंतवाडी स्थानकातून काढण्यात आलेली राजधानी एक्सप्रेस व गरीब रथ एक्सप्रेस आणि कणकवली स्थानकातून काढलेली हिसार कोइंबतूर एक्सप्रेसचा देखील समावेश आहे.

‎येथील प्रवासी सुविधासंदर्भात बोलायचे झाले तर आम्ही सिंधुदुर्गातील तरुण युवक गेले दोन वर्षे याचा पाठपुरावा करत आहोत याचे फलित म्हणजे वैभववाडी येथे पादचारी पूलचे काम सुरू आहे ( ओंकार लाड व टीम चे प्रयत्न), कणकवली येथे प्लॅटफॉर्म २ वर २५० मीटरचा COP ( कव्हर ऑन प्लॅटफॉर्म) म्हणजेच निवारा शेड, व खाली जाणारा सरकता जिना.(सुनीत चव्हाण आणि टीम). सिंधुदुर्ग येथे PRS सुविधा, वांद्रे मडगाव एक्स्प्रेसचा थांबा (शुभम परब आणि टीम).
सावंतवाडी येथे अप्रोच रोडचे काम ९० टक्के पूर्ण, PRS सुविधा पूर्णवेळ सुरू, वांद्रे – मडगाव व नागपूर मडगाव एक्स्प्रेसचे थांबे मिळाले, प्लॅटफॉर्म ३ वर १७० मीटरचा COP आणि लिफ्ट प्रस्तावित/ मंजूर. (सागर, मिहिर, भूषण आणि टीम) आदी.
मंडळी, या काही महत्त्वाचा समस्या जे मला वाटतात. याव्यतिरिक्त आपल्या काही समस्या असतील आणि माझ्याकडून काही चुकल्या असतील.तर त्या तुम्ही माझ्यापर्यंत पोचवू शकता. मी आणि माझी संपूर्ण टीम त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करू.‎‎आपल्या सूचनांचे नक्कीच स्वागत करून मी थांबतो.”


‎- ‎सागर तळवडेकर
‎उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.
‎संपर्क प्रमुख, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र.

Facebook Comments Box

सावंतवाडी: दुचाकी अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी, ता.०३ –

चराठा-नमसवाडी रस्त्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृताचे नाव परशुराम प्रकाश पोखरे (वय ३२) असे आहे. हा अपघात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम पोखरे हे म्हापसा येथील एका कंपनीत नोकरी करत होते. रविवारी सुट्टीमुळे ते काही कामानिमित्त गावी आले होते. चराठा येथे चिकन घेऊन ते आपल्या घरी परत जात होते. दरम्यान, ओटवणे रस्त्यावर ग्रामपंचायतीपासून सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या नमसवाडी येथील चढावावर त्यांच्या दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी बाजूच्या दगडाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की, परशुराम गाडीसह रस्त्यावर आपटले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती खूप गंभीर असल्याने त्यांना तातडीने गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय झाला. मात्र दुर्दैवाने रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Facebook Comments Box

०3 ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 09:44:13 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 06:35:57 पर्यंत
  • करण-कौलव – 09:44:13 पर्यंत, तैतुल – 22:47:08 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुक्ल – 06:24:22 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:18
  • सूर्यास्त- 19:11
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 14:20:00
  • चंद्रास्त- 25:23:59
  • ऋतु- वर्षा

महत्त्वाच्या घटना :

  • 1678 : अमेरिकेने बनवलेले पहिले जहाज ग्रीफॉन लाँच करण्यात आले.
  • 1783 : जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडले.
  • 1900 : द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.
  • 1914 : हिटलरने बव्हेरियाचा राजा लुडविग यांच्याकडे सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला आणि त्याला नियुक्त करण्यात आले.
  • 1936 : आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
  • 1948 : भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली.
  • 1960 : नायजेरियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1994 : संगीतकार अनिल बिस्वास यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार जाहीर केला.
  • 1994 : साध्या आणि गोड कविता आणि सूक्ष्म आणि मार्मिक वर्णनात्मक लेखांच्या माध्यमातून हिंदी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारने विशेष पुरस्कार जाहीर केला आहे.
  • 2000 : मल्याळम दिग्दर्शक शाजी एन करुण यांना फ्रेंच सरकारने नाइट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
  • 2004 : राज्यपाल मुहम्मद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1984 : ‘सुनील छेत्री’ – भारतीय फुटबॉलपटू यांचा जन्म.
  • 1886 : ‘मैथिलिशरण गुप्त’ – हिंदी कवी यांचा जन्म. (मृत्यू : 12 डिसेंबर 1964)
  • 1898 : ‘उदयशंकर भट्ट’ – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 28 फेब्रुवारी 1966)
  • 1900 : ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 6 डिसेंबर 1976)
  • 1916 : ‘शकील बदायूँनी’ – गीतकार आणि शायर यांचा जन्म. (मृत्यू : 20 एप्रिल 1970 – मुंबई)
  • 1924 : ‘लिऑन युरिस’ – अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 21 जून 2003)
  • 1939 : ‘अपूर्व सेनगुप्ता’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1955 : ‘चंद्रशेखरन मोहन’ – भारतीय वंशाचे अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1956 : ‘बलविंदरसिंग संधू’ – 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1960 : ‘गोपाल शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1977 : ‘सुनील ग्रोव्हर’ – भारतीय अभिनेता आणि कॉमेडियन यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1929 : ‘एमिल बर्लिनर’ – फोनोग्राफ चे शोधक यांचे निधन. (जन्म : 20 मे 1851)
  • 1930 : ‘व्यंकटेश बापूजी केतकर’ – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1854)
  • 1957 : ‘देवदास गांधी’ – पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1900 – दरबान, दक्षिण अफ्रिका)
  • 1993 : ‘स्वामी चिन्मयानंद सरस्वती’ – अध्यात्मिक गुरू यांचे निधन. (जन्म : 8 मे 1916)
  • 2007 : ‘सरोजिनी वैद्य’ – लेखिका यांचे निधन. (जन्म : 15 जून 1933)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search