Konkan Railway | “सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण झाले असते तर…….”

   Follow us on        
सिंधुदुर्ग :मागील ९ वर्ष सावंतवाडी टर्मिनसचे काम रखडले आहे. किती जनआंदोलने झालीत तरी रेल्वे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी यात रस दाखवला नाही. टर्मिनस म्हणुन भूमिपूजन झाले असतानाही रेल्वे आपल्या रेकॉर्डमध्ये जाणून बुजून या स्थानकाचे नाव ”सावंतवाडी रोड” असेच दाखवत आले आहे. परवा तर हद्द पार झाली आणि सुशोभीकरणा दरम्यान प्रवेशद्वारावर लावलेल्या फलकावर ”सावंतवाडी रोड” अशा नावाचा फलक लावण्यात आला. हेच जर करायचे होते तर टर्मिनस म्हणुन भूमिपूजन फक्त मते मिळविण्यासाठी केले का? असा संतप्त सवाल कोकणी जनतेकडून विचारला जात आहे.
नियतीला कदाचित हे पटले नसावे म्हणा की अन्य काहीही म्हणा, सावंतवाडी येथे टर्मिनस का असावे हे तिने या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी दाखवले. पेडणे येथील एका बोगद्यातून पाण्याचा मोठा पाझर फुटून तेथील मार्ग बंद झाला आणि कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली. 30 तास झाले तरी हा बोगदा वाहतुकीसाठी चालू झाला नाही. त्यामुळे अनेक गाड्या रखडल्या. मार्ग बंद झाल्याने अनेक गाड्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानकांवर उभ्या करून ठेवण्यात आल्यात. अनेक गाड्या रद्द झाल्यात, कित्येक प्रवासी अडकून पडलेत यात प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
जर सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण झाले असते तर… 
जर सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण झाले असते तर खूप मोठा फरक पडला असता. परवा दिनांक ०९ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हय़ात अडकलेल्या गाड्या निदान सावंतवाडी स्थानकापर्यंत चालविता आल्या असत्या आणि तेथूनच दुसर्‍या दिवशी मुंबईच्या दिशेने पाठवता येवू शकल्या असत्या. टर्मिनसच्या अपुर्‍या कामामुळे फक्त 1/2  गाड्या येथून परस्पर सोडता आल्या असत्या. काल संध्याकाळ पासून संध्याकाळपासून पनवेल ते सावंतवाडी मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. अनेक गाड्या सावंतवाडी स्थानकापर्यंत चालवणे शक्य झाले असते आणि प्रवाशांचे हाल वाचवता आले असते.
कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्ग सुद्धा तितकाच महत्वाचा.. 
सावंतवाडी टर्मिनस प्रमाणेच केंदीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकीर्दीत मंजूर झालेले आणि रखडलेले दुसरे काम म्हणजे कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्ग. पाश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा हा रेल्वेमार्ग सुरेश प्रभू केंदीय रेल्वे मंत्री असताना मंजूर झाला होता. मात्र त्याचीही गत सावंतवाडी टर्मिनसच्या कामासारखी झाली. सुरेश प्रभू यांचा केंदीय रेल्वे मंत्री पदावरून पायउतार होताच हे कामही रखडले. त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही अर्थसंकल्पात या मार्गासाठी तरतुद केली जात नसल्याने त्याचे काम थांबले आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास आणीबाणीच्या काळात कोकण रेल्वे मार्गाला एक पर्यायी मार्ग म्हणून हा मार्ग वापरता येवू शकतो.
माजी केंदीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केलेली ही दोन महत्त्वाची कामे रखडली आहेत…या मागे कोणतीही कारणे असूद्यात ..सध्या कोकणातील प्रवाशांना कोणी वाली नाही हे जवळपास अधोरेखित झाले आहे.

Loading

Facebook Comments Box

Mumbai Goa Highway | आजपासून तीन दिवस मुंबई गोवा महामार्गावर ब्लॉक, पर्यायी मार्ग कोणते?

   Follow us on        
Mumbai-Goa highway Block: कोकणकरांसाठी एक मह्त्वाची बातमी आहे. आजपासून मुंबई गोवा महामार्गावर सलग तीन दिवसांचा (११ जुलै-१३ जुलै) ब्लॉक घेतला जाणार आहे. कोलाड जवळील पूई येथे नवीन पूलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतला जाणार आहे.महत्त्वाचे म्हणजे, हा ब्लॉक सकाळी ६-८ वा. आणि दुपारी २-४ वा. अशा दोन टप्प्यात असणार आहे. वाहतूक विभाग अप्पर महासंचालकांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता मार्गी लावली जाणार आहे. याच कामाचा भाग म्हणून कोलाड जवळील पूई येथील नवीन पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या पुलाच्या कामादरम्यान वाहतूक बंद ठेवणे गरजेचे असल्याने मुंबई – गोवा महामार्गावर तीन दिवस चार तासांचे ब्लॉक घेण्यात आला आहे. याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक बंद ठेवली जाणार असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे. वाहतूक विभाग अप्पर पोलीस माहसंचालक कार्यालयातील पोलीस अधिक्षक अरविंद साळवे याबाबतची वाहतूक प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी केली आहे.
मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग
– वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा- कालाड मार्गे.
– वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड मार्गे किंवा पाली-रवाळजे- निजामपुर-माणगांव मार्गे.
– खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव मार्गे.
गोव्याहून मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग
– कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड- वाकण फाटा मार्गे
– कोलाड येथून रवाळजे-पाली वरून वळवून वाकण- पाली- खोपोली राष्ट्रीय महामार्गे
– कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटा वरून वळवून मुंबई गोवा महामार्गे
महत्त्वाचे म्हणजे, हा ब्लॉक तीन दिवसांत अवघ्या चार तासांसाठी असेल. इतर वेळेत मुंबई- गोवा महामार्ग वाहतुकीसाठी खुला असेल, याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी.

Loading

Facebook Comments Box

KR Updates | कोकणकन्या आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस सावंतवाडी पर्यंतच, अजून काही गाड्या रद्द, यादी ईथे वाचा

   Follow us on        

Konkan Railway Updates: दिनांक 10.07.2024 मडुरे – पेडणे विभागादरम्यानच्या पेडणे येथे बोगद्यामध्ये पाणी भरल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे ह्याआधी काही गाड्या रद्द केल्याचे तसेच काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यात अजून काही गाड्यांची भर पडली आहे.

कोकण रेल्वेने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार खालील गाड्या रद्द, शॉर्ट टर्मिनेटेड आणि अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत

गाडी क्र. 12449 मडगाव जं. – 10/07/2024 रोजी सुरू होणारा चंदीगड एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. 12620 मंगळुरु सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) 10/07/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. 12134 मंगळुरु जं. – 10/07/2024 रोजी सुरू होणारा मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. 50107 सावंतवाडी टर्मिनस – मडगाव जं. 10/07/2024 रोजी सुरू होणारा प्रवासी प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन आणि आंशिक रद्द केलेल्या गाड्या. 

दिनांक 09/07/2024 रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. 20111 मुंबई सीएसएमटी – मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी टर्मिनस येथे समाप्त करण्यात आला आहे

दिनांक 09/07/2024 रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. 12619 लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी टर्मिनस येथे समाप्त करण्यात आला आहे.

 

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway Updates: कोकण रेल्वे मार्गावर अडकलेल्या गाडय़ा मागे फिरवून पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या

Konkan Railway Updates : आताच हाती आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील अडकलेल्या गाड्या मागे फिरवून पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

अधिक माहिती खालील प्रमाणे 

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. २२११३ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली एक्स्प्रेस सिंधुदुर्ग स्थानकावरून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे वळविण्यात आली आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. १२४३२ ह. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस राजापूर रोड येथून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे मागे वळवली आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. 19260 भावनगर – कोचुवेली एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकावरून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे मागे वळवली आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र.१२२२३ लोकमान्य टिळक (टी) – एर्नाकुलम एक्स्प्रेस चिपळूण येथून मागे फिरवून पनवेल-पुणे जंक्शन- सोलापूर जंक्शन मार्गे वळविण्यात आला आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. 20932 इंदूर जं. – कोचुवेली एक्स्प्रेसचा प्रवास सुरत – जळगाव – बडनेरा जं. – वर्धा जं. – बल्हारशाह – वारंगळ – विजयवाडा जं. – रेनिगुंटा जं. – काटपाडी जं. आणि कोईम्बतूर मार्गे वळविण्यात आला आहे.

Loading

Facebook Comments Box

Breaking: कोकण रेल्वे ठप्प; अनेक गाड्या रद्द तर लांब पल्ल्याच्या गाडय़ा पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या

   Follow us on         Kokan Railway Stopped :काल दिनांक 09/07/2024 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास कोकण रेल्वेच्या कारवार विभागातील मडूरे-पेडणे विभागादरम्यानच्या बोगद्यात पाण्याच्या फुटलेल्या मोठ्या पाझरामुळे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल जमा झाला होता. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतुक ठप्प झाली होती. रात्री 10 वाजून 13 मिनिटांनी कोकण रेल्वेने मोठ्या शर्थीने प्रयत्न करून हा बोगदा वाहतुकीसाठी योग्य केला आणि वाहतुक सुरू केली होती मात्र आज(10/07/2024) पहाटे 3 वाजताच्या सुमारास पुन्हा मोठा पाझर फुटला आणि बोगद्यात पुन्हा पाणी जमा झाले असल्याची माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.

अनेक गाड्या रद्द
या घटनेमुळे कोकण रेल्वेने या मार्गावरील अनेक गाड्या रद्द केल्या असून तर काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविल्या आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार खालील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्रमांक २२२२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. जनशताब्दी एक्स्प्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. मांडवी एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १२१३३ मुंबई सीएसएमटी – मंगळुरु एक्सप्रेसचा ०९/०७/२०२४ रोजी सुरु होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १०१०४ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेसचा – दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. ५०१०८ मडगाव जं. – सावंतवाडी दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवासी प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक २२१२० मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी – जनशताब्दी एक्स्प्रेसचा १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड -दिवा एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

खालील गाड्या पर्यायी मार्गाने चालविण्यात येणार आहेत.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र. १२६१८ एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. मंगला पनवेल – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव मार्गे चालविण्यात येणार आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्स्प्रेसचा प्रवास शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र. १६३३६ नागरकोइल – गांधीधाम एक्स्प्रेसचा शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १२२८३ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन शोरानूर जंक्शन मार्गे वळवली जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक १०/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र.गाडी क्र. २२६५५ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक १०/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र.गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसचा प्रवास तिरुअनंतपुरम सेंट्रल येथून 16:55 वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात आला आणि शोरानूर जंक्शन मार्गे वळवण्यात आला आहे – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

 

More Information Awaited…… 

Loading

Facebook Comments Box

पेडण्यात रुळांवर पाणी; कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत

Konkan Railway Stopped: तळकोकणात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे मालपे (पेडणे) येथील बोगद्यात रूळांवर पाणी साचल्याने कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे.

पाणी साचल्याने मार्ग पूर्ण झाला असून दक्षिणेकडून मुंबईच्या दिशेने येणार्‍या गाड्या गोवा राज्यातील स्थानकांवर तर दक्षिणेला जाणार्‍या गाड्या सिंधुदुर्गातील स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. गाड्यांची सद्यस्थिती पाहता (08:00 PM) गोव्याचा दिशेने जाणार्‍या गाड्यांपैकी तेजस एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा एक्सप्रेस अजुनहि सावंतवाडी स्थानकावर पोहोचल्या नाही आहेत. तर मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर आहे.

रेल्वेकडून प्रवाशांसाठी याबाबत अजूनही कोणती माहिती आली नसली तरी रेल्वे कर्मचारी त्या बोगद्याकडे पोहोचले असून लवकरच याबाबत सविस्तर माहिती जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.

Loading

Facebook Comments Box

मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतरास विधानसभेत अखेर मंजूरी; अशी असतील नवीन नावे.

   Follow us on        

मुंबई : ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या नावे मुंबई उपनगरातील अनेक स्थानकांना मिळाली होती. इतकी वर्षे ही नावे या रेल्वे स्थानकांची ओळख बनली होती. आता या स्थानकांच्या नावांना स्थानिक परिसरातील ओळखीनूसार नावे देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावा राज्य विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनात अखेर मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे या स्थानकांची जुनी ओळख पुसली जाणार आहे. आता यापुढे इंग्रजी नावे जाऊन नवीन मराठी नावे स्थानकांना मिळणार आहेत. त्यामुळे आता मरीन लाईन्स मुंबादेवी असे त्या परिसराला साजेसे असे नाव मिळणार आहे. तर करीरोडला काय नाव मिळणार आहे. ? ते पाहूयात….

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव आज विधानसभेत अखेर मंजूर करण्यात आला आहे. आता हा ठराव केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. त्यानंतर रितसर नावं बदलण्यात येणार आहेत. आता करी रोड – लालबाग रेल्वे स्थानक म्हटले जाणार आहे. तर पुढील बदल अनुक्रमे सँडहर्स्ट रोड – डोंगरी रेल्वे स्थानक, मरीन लाईन्स – मुंबादेवी, चर्नी रोड – गिरगाव, कॉटन ग्रीन – काळाचौकी, डॉकयार्ड रोड – माझगाव रेल्वे स्थानक, किंग सर्कल – तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक अशी नावे देण्यात आली आहेत.

मुंबई सेंट्रस स्थानकाला मुंबईचे शिल्पकार समाजसेवक नाना शंकर शेठ असे नाव देण्यात यावे अशी मागणी नामदार जगन्नाथ ( शंकर ) शेठ प्रतिष्ठान गेली कित्येक वर्षे करीत आहे. परंतू या स्थानकाचे नाव बदलण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नाना शंकर शेठ यांना आशियातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावली होती. या जीआपीआर रेल्वे कंपनीचे कार्यालयच नाना शंकर शेठ यांच्या घरात उघडण्यात आले होते. व्हीक्टोरीया टर्मिनस या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव देण्याची मागणी 90 च्या दशकात कॉंग्रेसने केली होती.

Loading

Facebook Comments Box

मुंबई ठाण्यातील क्रिकेट प्रेमींना खुशखबर: 50 एकर मध्ये लवकरच उभारले जाणार राज्यातील सर्वात मोठे स्टेडियम

   Follow us on        

मुंबई : 2023 विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईत ठेवण्याचा बेत होता. मात्र वानखेडे स्टेडियम च्या कमी प्रेक्षक संख्येचे कारण देवून तो सामना गुजरात राज्यातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात आला. क्रिकेटप्रेमी मुंबईकरांना याचे मोठे दुःख झाले होते. मात्र आता मुंबईजवळ लवकरच 1 लाख आसन क्षमतेचं स्टेडियम उभारलं जाणार आहे. हे स्टेडियम आसन क्षमते बाबतीत राज्यातील पाहिले तर देशातील दुसर्‍या क्रमांकाचे स्टेडियम ठरणार आहे.

पाहिल्या मुंबईमध्ये वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईत डी.वाय.पाटील ही आंतरराष्ट्रीय स्डेटियम असताना आता मुंबईला आणखी एक अद्ययावत आणि 1 लाख क्षमता असलेलं स्टेडियम मिळणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपासून 68 किमी अंतरावर आणि ठाण्यापासून 26 किमी अंतरावर हे स्टेडियम उभारलं जाणार आहे. कल्याणच्या जवळ अमाने गावामध्ये हे स्टेडियम उभारलं जाईल. 50 एकर जमिनीवर हे स्टेडियम उभारलं जाईल.

ही जमीन विकत घेण्यासाठी एमसीएने एमएसआरडीसीने काढलेली खुली निविदा भरली आहे. महाराष्ट्र सरकारकडून स्टेडियम उभारणीला परवानगी मिळावी, याची एमसीए वाट पाहत आहे. मुंबईमध्ये एवढं मोठं स्टेडियम उभारण्याचं दिवंगत एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांचं स्वप्न होतं. मागच्याच महिन्यात अमोल काळे यांचं 47व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.

Loading

Facebook Comments Box

सावंतवाडी टर्मिनसच्या प्रवेशद्वारावर स्थानकाच्या नावाचा चुकीचा फलक; प्रवासी संघटना आक्रमक

   Follow us on        
सिंधुदुर्ग: सावंतवाडी टर्मिनसच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र सुशोभीकरणात प्रवेशद्वारावर स्थानकाच्या नावाचा चुकीचा बोर्ड लावल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रवेशद्वारावर “सांवतवाडी टर्मिनस” असा बोर्ड न लावता “सावंतवाडी रोड” असा बोर्ड लावल्याने तळकोकणातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराबद्दल प्रवासी रेल्वे संघटना देखील सक्रिय झाल्या असून याबद्दल त्यांनी आपला निषेधही नोंदविला आहे. प्रशासनाने त्वरीत हा बोर्ड हटवून सावंतवाडी टर्मिनस असा बोर्ड लावावा अशी मागणी केली आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे भूमिपूजन 9 वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले होते. मात्र मा. सुरेश प्रभू यांचा केंद्रीय रेल्वेमंत्रिपदावरून पायउतार होताच हे काम रखडले ते आजतायगत पूर्ण झाले नाही. रेल्वे प्रवासी संघटनांनी या दरम्यान कित्येकदा आवाज उठवला, मात्र त्याच्या हाती पोकळ आश्वासनांशिवाय काहीच आले नाही. आता तर स्थानकाच्या नावातून “टर्मिनस” हा शब्द कायमचा हटवण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे सावंतवाडी टर्मिनस चे भूमिपूजन ज्या सरकारच्या कार्यकाळात झाले होते तेच सरकार आता सत्तेत असताना हा प्रकार होत असल्याने तळकोकणातील प्रवाशांच्या मनात सरकारविषयी आणि  लोकप्रतिनिधींविषयी चीड निर्माण होत आहे.
टर्मिनस समस्त कोकणकरांसाठी फायद्याचे
सावंतवाडी टर्मिनस होणे हे फक्त सावंतवाडी पंचक्रोशीतील प्रवाशांसाठीच नाही तर समस्त कोकण प्रवाशांसाठी फायद्याचे ठरणार आहे. कारण हे टर्मिनस झाले तर वसई/बोरिवली  – सावंतवाडी, पुणे – सावंतवाडी, कल्याण – सावंतवाडी या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या गाड्या सोडणे शक्य होणार आहे . त्याचबरोबर गणेश चतुर्थी, होळी या सारख्या सणांसाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्या दक्षिणेकडे न पाठवता सावंतवाडी पर्यंत मर्यादित करणे शक्य झाले असते. त्यामुळे सध्या गुरं ढोरांसारखा प्रवास करण्याऱ्या कोकणकरांचा प्रवास चांगल्या प्रमाणात सुखकर झाला असता.
   Follow us on        

Loading

Facebook Comments Box

Heavy rain in Mumbai: मुंबईतील मुसळधार पावसाचा कोकणरेल्वेच्या गाड्यांवर परिणाम

   Follow us on        
मुंबई: मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर झाला आहे. रुळांवर पाणी साचल्याने मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या ४ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहे. आज सकाळी सीएसएमटी वरून कोकणात जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकांवर झाला आहे.
सीएसएमटी वरून सुटणारी मांडवी एक्सप्रेस सुमारे ४ तास उशिराने सकाळी सोडण्यात आली आहे. तर जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या वेळेवर सुटल्या असल्या तरी सुमारे २ ते अडीच तास उशिराने धावत आहे.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search