HSC & SSC Results | दहावी आणि बारावीच्या निकालांच्या तारखांबाबत मोठी अपडेट

   Follow us on        

HSC and SSC result 2024 : दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 6 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात देण्यात आली आहे.

उत्तर पत्रिका तपासण्याचे काम जोरात चालू असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच निकालाची नेमकी तारीख जाहीर करणार असून बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 06 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन बघू शकतात.

दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. बारावीच्या परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल्या. दुसरीकडे दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. मंडळाकडून या परीक्षेची जोरदार तयारी करण्यात आली. काॅपीमुक्त परीक्षा करण्यासाठी मंडळाने अगोदरच कंबर कसल्याचे देखील यंदा बघायला मिळाले.

Loading

Facebook Comments Box

मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध असलेला नांदगाव येथील श्री देव कोळंबा देवाचा जत्रोत्सव पुढील आठवड्यात

   Follow us on        
नांदगाव, दि. २८ एप्रिल : मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध असलेला नांदगाव येथील श्री देव कोळंबा देवाचा जत्रोत्सव येत्या रविवारी (दि. ०५ मे) होणार आहे. राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या या उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होते.
‘कोळंब्याचा चाळा’ म्हणून महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्ध असणारा आणि विशेष करून मुक्या प्राण्यांचा रक्षणकर्ता म्हणून कोळंबा देवाची सर्वदूर ख्याती आहे. श्री देव कोळंबाचा नवस फेडण्यासाठी श्रीफळासह कोंबड्या, बकरीचा बळी देण्याची व मटण भाकरीच्या प्रसादासाठीची जत्रा म्हणून याची ओळख आहे.
येथे हजारो वर्षांपासून श्रीदेव महादेवाचे निराकाररुपी लिंग गर्द अशा झाडीत होते. याच लिंगरुपी पाषाणाला स्थानिक ग्रामस्थ ‘श्री देव कोळंबा’, या नावाने गावाचा रक्षणकर्ता म्हणून पूजाअर्चा करतात. ‘‘आपल्या घराचे-गावाचे रक्षण कर, सांभाळ कर’’, असे म्हणून श्रद्धेने देवाच्या चाळ्याला कोंबडा व देवाला श्रीफळ अर्पण करतात. याच्या श्रद्धेची प्रचिती आल्याने आज लाखाहून अधिक श्री देव कोळंबाचे भक्त आहेत. पूर्वी जत्रेला शे-दीडशे भाविक दर्शनास येत. त्यांची संख्या आता लाखाच्या घरात पोचली असून प्रत्येक भक्ताला अनुभूती मिळत आहे. यानिमित्त सकाळी ८ ते ९ पूजाविधी, ९ ते २ नवस फेडणे, दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे आणि सायंकाळी चारनंतर महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम होणार आहेत.

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वेचा HDN आणि HUN यादीत समावेश नसणे हे अनेक समस्यांचे कारण. -सागर तळवडेकर 

कोकण विकास समितीचे रेल्वे अभ्यासक अक्षय मधुकर महापदी यांनी आर टी आय मधून एक माहिती मिळवलेली आहे. या माहितीत भारतीय रेल्वाच्या अति महत्त्वाचे, अति मागणीचे आणि व्यस्त असलेले मार्ग High Density Network (HDN) आणि Highly Utilized Network (HUN) रेल्वे मार्गाची यादी दिलेली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत क्षमेतपेक्षा जास्त वापर असेलेल्या कोकण रेल्वेचा समावेश नाही आहे.
   Follow us on        
आवाज कोकणचा: आपल्या गावाला टंचाई असेल आणि टँकर सुरू करायचा असेल तर आपल्या गावचं नाव टंचाईच्या यादीत असणं गरजेचं असतं. जर हे नाव टंचाईचे यादीत असेल तर आपल्याला शासनाकडून टँकर उपलब्ध केला जातो.
तसेच भारतीय रेल्वेच्या वतीने अति महत्त्वाचे, अति मागणीचे आणि व्यस्त असलेले मार्ग High Density Network (HDN) आणि Highly Utilized Network (HUN) या दोन याद्यांमध्ये सूचीबद्ध झालेले आहेत. भारतीय रेल्वे या मार्गावर चांगल्या प्रकारे लक्ष देऊन अनेक नवनवीन प्रकल्प, दुहेरीकरण, गती-शक्ती सारख्या माध्यमातून क्षमतावृद्धीचे प्रयत्न करत आहे. याकडे रेल्वे मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे विशेष लक्ष असते.पण या यादीमध्ये अतिशय व्यस्त असलेला कोकण रेल्वे मार्ग (एकूण क्षमतेच्या १६८% वापर असूनही) स्थान घेऊ शकला नाही कारण कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये त्याला स्थान नाही.जर या यादीमध्ये कोकण रेल्वे मार्गाची नोंद झाली तर या ठिकाणी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करून प्रवाशांना वाढीव सोयी सुविधा व गाड्या पुरवल्या जाऊ शकतात.
त्यामुळेच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण झालेच पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील मार्ग मध्य रेल्वेच्या ताब्यात जायला हवा.
आतापर्यंत कोकणातील खासदारांनी याचा विचार केला नाही पण आता निवडून येणाऱ्या खासदारांनी संसदेत विषय चर्चेत घेऊन लवकरात लवकर मार्गी लावावा.

श्री. सागर तळवडेकर 
सामाजिक कार्यकर्ते व रेल्वे अभ्यासक
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Facebook Comments Box

नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला कोकणात निर्माण झाला सर्वात मोठा अडथळा

   Follow us on        
सावंतवाडी: प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेतील विघ्ने वाढत चालली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला मोठया प्रमाणावर विरोध केला आहे. आता तर तळकोकणातही ज्या पट्ट्यातून हा महामार्ग जात आहे तो पट्टा ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’  क्षेत्र Eco Sensitive Zone जाहीर करण्याचे आदेश उच्च न्यायालायने सरकारला दिले असल्याने या महामार्गासमोरील सर्वात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
प्रस्तावित महामार्ग आंबोली, कीतवडे,गेळे,वेर्ले, पारपोली, नेने, फणसवडे, उदेली, घारपी, फुकेरी,असनिये, तांबोळी, डेगवे, बांदा या गावातून जाणार आहे. मात्र यातील फणसवडे, उडेली, घारपी, फुकेरी,असनिये, तांबोळी ही गावे या इको सेन्सेटिव्ह झोन ESZ मध्ये येत आहेत. येथे वृक्षतोड करणे आणि महामार्ग बांधकामास मर्यादा येणार आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या वाटेवरील अडचणी वाढल्या आहेत. या महार्गासाठी   या भागातून नेण्यास मंजुरी मिळवणे खूप कठीण होणार आहे.
सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यातील २५ गावांच्या क्षेत्राला ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’  क्षेत्र Eco Sensitive Zone ESZ जाहीर करण्यात  यावे असेच आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य सरकार व केंद्र सरकारने २७ सप्टेंबर २०१३ मध्ये कॉरिडॉरचा हा भाग ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ भाग म्हणून जाहीर करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले होते. मात्र गेल्या ११ वर्षात या आदेशांचे पालन झाले नसल्याने  केंद्र व राज्य सरकारने केवळ न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला नाही तर कर्तव्य पार पाडण्यातही ते अपयशी ठरल्याचे म्हणत न्यायालयाने ताशेरे ओढले होते.आता मात्र उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सहा महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. राज्य सरकारने  चार महिन्यांत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा. केंद्र सरकारने पुढील दोन महिन्यांत अंतिम अधिसूचना काढावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
सवांवाडी दोडामार्ग कॉरिडॉर दरम्यान २५ गावे येतात. सिंधदुर्गतील केसरी, फणसवडे , उडेली, दाभील- नेवली, सरंबळे, ओटावणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवळ, कुंब्रल, पांतुर्ली, भिके कोनाळ, कळणे, उगडे, पडवे माजगाव ही २५ गावे या कॉरिडॉर मध्ये मोडतात.या मार्गिकेतून अनेक वन्य प्राणी येजा करतात. याठिकाणी मोठ्याप्रमाणात जैवविविधता आहे. तसेच वनस्पतींच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आहेत. मात्र या भागातून असे महामार्ग बनवताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन जैवविविधतेची मोठी हानी होऊ शकते. या महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असल्याने येथील जनतेने याला विरोध केला पाहिजे, असे वनशक्ती संस्थेच्या स्टॅलिन दयानंद यांनी मत मांडले आहे.

Loading

Facebook Comments Box

मोठी बातमी: बळवली-पत्रादेवी कोकण द्रुतगती मार्गाच्या संरेखनात बदल होणार; नवीन डीपीआर येणार..कारण काय?

   Follow us on        
सिंधुदुर्ग, दि. २६ एप्रिल:बळवली पत्रादेवी कोकण द्रुतगती मार्गाबद्दल एक महत्वाची बातमी समोर येत आहे. या मार्गाच्या डीपीआरमध्ये सुधारणा केली जात असल्याची माहिती आहे, या पूर्वीच्या संरेखनाप्रमाणे हा महामार्ग सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ Eco-Sensitive  झोनमधून जात होता. या कारणांमुळे या महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी समस्या निर्माण होणार असल्याने त्यात बदल करण्यात येणार आहे.
अलीकडेच उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला तळकोकणातील २५ गावांचा समावेश इको-सेन्सिटिव्ह झोन मध्ये करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे येथील भागातील वृक्षतोडीवर, जंगलतोडीवर मर्यादा येणार आहेत. या कारणांमुळे या महामार्गासाठी पर्यावरणीय मंजुरी मिळवणे कठीण जाणार आहे.
हा एक्स्प्रेस वे तयार झाल्यावर, शिवडी, मुंबई ते पणजी, गोवा असा प्रवास ६ तासांपेक्षा कमी वेळेत करता येणार आहे  कारण अटल सेतू आणि विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर या एक्स्प्रेसवेशी अखंडपणे जोडले जाणार आहेत. कोकण द्रुतगती महामार्ग हा रायगड जिह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा तसेच रत्नागिरी जिह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी असा जाणार आहे. महामार्ग पेण जिह्यातल्या बलवली गावातून सुरू होईल आणि एकूण ४ टप्प्यात या महामार्गाचे बांधकाम करण्यात येईल. या महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते कोकण अगदी कमी वेळामध्ये पार करता येणार आहे. त्याच बरोबर मुंबई गोवा महामार्गावरील ताण कमी होईल.

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway | ‘त्या’ तीन गाड्यांचे पावसाळी हंगामाचे आरक्षण अखेर सुरु; मात्र फेऱ्यांमध्ये कपात

   Follow us on        

Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील तीन नियमित गाडया रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत १० जून नंतर रद्द (Train  Cancelled )दाखवत होत्या. रेल्वेने या संदर्भात कोणतेही प्रसिद्ध जाहीर केले नसल्याने असल्यामुळे आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. एलटीटी मडगाव एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत रद्द दाखवत गेल्या होत्या. काही दिवसानंतरच गणेश चतुर्थीचे आरक्षण सुरु होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर या गाड्या आरक्षण प्रणालीत ऍक्टिव्ह दाखवाव्यात अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने या गाड्यांचे आरक्षण या प्रणालीत दाखवले आहे. मात्र पावसाळी हंगामात या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे.

अधिक तपशील खालीलप्रमाणे
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे. 
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे. 
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express 
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express 
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे. 
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express 
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे. 
३) 22229 /22230  Mumbai CSMT – Madgaon – Mumbai CSMT Vande Bharat Express
22229 CSMT MADGAON VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे.
22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.
या सर्व गाड्यांचे वेळापत्रकही बदलून पावसाळी वेळापत्रकानुसार या गाड्या चावलेण्यात येणार आहेत.
टीप: सदर माहिती अंतिम स्वरूपाची नसून रेल्वे प्रशासनातर्फे काही बदल केला जाऊ शकतो. आपल्या प्रवासाची योजना आखताना कृपया रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी किंवा रेल्वे चौकशीच्या इतर पर्यायाचा वापर करावा ही विनंती 

Loading

Facebook Comments Box

अंबरनाथ – बदलापूरात पुढील दोन दिवस पाण्याचे ‘वांदे’

   Follow us on        

बदलापूर दि. २५ एप्रिल : बदलापुर आणि अंबरनाथ येथील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात उद्या शुक्रवारी नवीन पंपिंग यंत्रणा आणि विद्युत पुरवठा सुधारणा करण्याच्या कामासाठी १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार २६ एप्रिल सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. तसेच शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांना दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

गेल्याच आठवड्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला होता. त्यात तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. त्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून उंच भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच येत्या शुक्रवारी उल्हास नदी किनारच्या खरवई येथील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत तातडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. येथे नवी पाणी उपसा यंत्रणा आणि विद्युत पुरवठ्यातील सुधारणा करण्यासाठी आवश्यक कामे केली जाणार आहे. त्यासाठी १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या काळात अंबरनाथ आणि बदलापूर शहरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा बंद असेल.

 

 

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून विशेष गाडी; एकूण ३६ फेऱ्या

   Follow us on        
Konkan Railway News: कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी  एक खुशखबर आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामातील वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने TOD (Train on Demand) तत्वावर या कोकण रेल्वे मार्गावर  लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी या दरम्यान एक एसी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
१) ०१०१७/०१०१८ एलटीटी  – थिवी – एलटीटी ट्राय वीकली विशेष. 
०१०१७ लोकमान्य टिळक टर्मिनसहून २६.०४.२०२४ ते ०४.०६.२०२४ पर्यंत प्रत्येक मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी रात्री २२:१५ ला सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९:५० ला थिवीला पोहोचेल. या गाडीच्या एकूण १८ फेऱ्या होणार आहेत.
०१०१८ थिवीहून २७.०४.२०२४ ते ०५.०६.२०२४ पर्यंत प्रत्येक शनिवार, सोमवार आणि बुधवारी संध्याकाळी १६:३५ ला सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ ला लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीच्या एकूण १८ फेऱ्या होणार आहेत.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड
डब्यांची सरंचना : १५ एसी थ्री टायर इकॉनॉमी, २ जनरेटर व्हॅन

 

Loading

Facebook Comments Box

प्रवाशांसाठी खुशखबर! रेल्वे देत आहे फक्त २० रुपयांत जेवण

   Follow us on        
Indian Railway News:आरक्षण डब्यात आणि एसी डब्यांमध्ये जेवण आणि पाणी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोरपोरेशन (आयआरसीटीसी) दिले जाते. परंतु जनरल डब्यात काहीच मिळत नाही. रेल्वेन जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार केला आहे. जनरल डब्यात स्वस्तात जेवण आणि पाणी दिले जाणार आहे. 20 आणि 50 रुपयांत जेवण दिले जाणार असून तीन रुपयांत पाण्याचा ग्लास दिला जाणार आहे.
उन्हाळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोरपोरेशनच्या मदतीने जनरल डब्ब्यामध्ये स्वस्त दरामध्ये जेवण आणि नास्ता दिला जाणार आहे. रेल्वेत परवडणारे जेवण 20 रुपयांत असणार आहे. तसेच 50 रुपयांत जेवण मिळणार आहे.
जेवणात काय काय असणार?
सर्वसामान्य डब्यांजवळ रेल्वे स्थानकावर असलेल्या काउंटरवर हे जेवण मिळणार आहे. त्यात
20 रुपयांमध्ये मिळणाऱ्या इकोनॉमी जेवणात सात पुऱ्या (175 ग्रॅम), बटाट्याची भाजी (150 ग्रॅम) आणि लोणचे देणार आहे. तर 50 रुपयांत (कॉम्बो पॅक) मिळणाऱ्या जेवणाच्या पाकिटात राजमा, छोले, भात, खिचडी, पावभाजी, मसाले डोसा दिले जाणार आहे. 350 ग्रॅम हे जेवण असणार आहे. सर्वसाधारण प्रवाशांना परवडणाऱ्या या जेवणाची गुणवत्ता आणि स्वच्छतेकडे लक्ष दिले जाणार आहे.

Loading

Facebook Comments Box

सावधान: रत्नागिरी जिल्हय़ात बनावट नोटा चलनात; फसवणूक टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्याल?

   Follow us on        

खेड दि. २४ एप्रिल: खेड बाजारपेठेत बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी भरणे येथील पेट्रोल पंपावर 500 रुपयाच्या तीन नोटा आढळून आल्या. मात्र या नोटा कोणाकडून आल्यात हे समजले नाही आहे. अशा अजुन बनावट नोटा चलनात असून पैसे घेताना नोटा व्यवस्थित तपासून न घेतल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. जेव्हा ती नोट दुकानात किंवा बँकेत दिली जाईल तेव्हाच समोराचा जर तुम्हाला म्हणाला तर ती खोटी आहे तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे योग्य काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नोटा खऱ्या की खोट्या त्या कशा ओळखाल? 

500 रुपयांच्या नोटा कशा ओळखायच्या याबाबत RBI ने काही खाणाखुणा सांगितल्या आहेत. 21 वेगवेगळ्या गोष्टी पडताळून तुम्ही नोट खरी आहे की नाही याची माहिती घेऊ शकता. यामध्ये अगदी छोटं अंतर असतं पण ते कळणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं.

2000 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांची सत्यता तपासण्यासाठी तुम्ही या पायऱ्या फॉलो करू शकता:

वॉटरमार्क पहा: नोट प्रकाशापर्यंत धरून ठेवा आणि टिपेच्या दोन्ही बाजूंनी दिसणारा वेगळा वॉटरमार्क तपासा.

सुरक्षा थ्रेड सत्यापित करा: प्रत्येक नोटमध्ये एक सुरक्षा थ्रेड एम्बेड केलेला असतो. नोट प्रकाशापर्यंत धरा आणि सुरक्षा धागा दृश्यमान आणि अखंड असल्याची खात्री करा.

रंग बदलणारी शाई तपासा: नोटांच्या काही भागांमध्ये रंग बदलणारी शाई असते जी झुकल्यावर रंग बदलते. सत्यता सुनिश्चित करण्यासाठी हे वैशिष्ट्य सत्यापित करा.

पोत अनुभवा: अस्सल नोट्समध्ये एक वेगळा पोत असतो जो पृष्ठभागावर तुमची बोटे चालवून जाणवू शकतो.

खालील 21 गोष्टी तुम्हाला बनावट नोट आणि खरी नोट यातील फरक ओळखायला मदत करेल. 

1 मूल्यवर्ग Denomination क्रमांकासह नोंदणी

2 मूल्यवर्ग संख्या असलेली अव्यक्त प्रतिमा

3 देवनागरी मधील मूल्यवर्ग अंक

4 मध्यभागी महात्मा गांधींचे छायाचित्र

5 नोटेच्या डाव्या बाजूला ‘RBI’ आणि Rs 2000′ अशी सूक्ष्म अक्षरे

6 देवनागरी, RBI मधील शिलालेख ‘भारत’ आणि कलर शिफ्टसह अंकांसह विंडो सुरक्षा धागा. नोट वाकलेली असताना थ्रेडचा रंग हिरव्या ते निळ्यामध्ये बदलतो

७ गॅरंटी क्लॉज, प्रॉमिस क्लॉजसह गव्हर्नरची स्वाक्षरी आणि उजवीकडे RBI चिन्ह

८ महात्मा गांधींचे पोर्ट्रेट आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क

9 संख्या पॅनेल ज्यामध्ये वरच्या डाव्या बाजूला आणि खालच्या उजव्या बाजूला लहान ते मोठ्या संख्येपर्यंत वाढत आहेत

10 रुपयाच्या चिन्हासह मूल्यवर्ग अंक, खाली उजवीकडे रंग बदलणारी शाई (हिरवा ते निळा)

11 उजवीकडे अशोक स्तंभाचे प्रतीक

12 उजवीकडे 2000 रु.च्या वरच्या प्रिंटसह क्षैतिज आयत

13 उचललेल्या प्रिंटमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला सात कोनीय ब्लीड रेषा

14 डावीकडे नोट छापण्याचे वर्ष

15 स्लोगनसह स्वच्छ भारत लोगो

16 भाषा पॅनेल मध्यभागी

17 मंगळयानचे आकृतिबंध

18 उजवीकडे देवनागरीमधील मूल्यवर्ग संख्या

19 उजवीकडे 500 रुपये वाढवलेले प्रिंट असलेले वर्तुळ

20 उंचावलेल्या प्रिंटमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला पाच कोनीय ब्लीड रेषा

21 लाल किल्ला: भारतीय ध्वजासह भारतीय वारसास्थळाची प्रतिमा

ही माहिती शक्य असेल तेवढी शेअर करा जेणेकरून अशा बनावट नोटांद्वारे सामान्य नागरिकांची फसवणूक टाळता येईल.

 

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search