Category Archives: महाराष्ट्र

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकींच्या वेळापत्रकात बदल

   Follow us on        

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर मतमोजणी ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल.

यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित #निवडणूक कार्यक्रमाची सूचना ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करतील. आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता होईल. संबंधित ठिकाणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

दुःखद बातमी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली असून, राज्य सरकारने अधिकृतपणे दुखवटा जाहीर केला आहे.

​सामान्य प्रशासन विभागाने (प्रोटोकॉल विभाग) जारी केलेल्या परिपत्रकानुसार खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:

​तीन दिवसांचा राज्य दुखवटा: दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जाईल.

​राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरणार: या तीन दिवसांच्या काळात ज्या शासकीय इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, तिथे तो अर्ध्यावर उतरवण्यात (Half Mast) येईल.

​आज शासकीय सुट्टी: उपमुख्यमंत्र्यांच्या निधनाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आज, बुधवार २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

​अधिकृत कार्यक्रम रद्द: दुखवटा कालावधीत कोणताही अधिकृत शासकीय करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.

​शासनाच्या वतीने अंडर सेक्रेटरी एच. पी. बाविस्कर यांनी हे आदेश जारी केले असून, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि विभागीय आयुक्तांना याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

धक्कादायक! बारामतीत लँडिंगदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात

   Follow us on        

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामतीमध्ये लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीला चार जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी निघाले होते. मात्र, बारामती विमानतळावर उतरत असताना त्यांचे विमान धावपट्टीवरून घसरले आणि बाजूला जाऊन कोसळले. या विमानात अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा कर्मचारीही उपस्थित होते.

​बारामती विमानतळाचे व्यवस्थापक शिवाजी तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘Lear Jet 45’ (VT SSK) या भाड्याने घेतलेल्या विमानाने लँडिंगचा प्रयत्न केला असता, ते धावपट्टीच्या कडेला जाऊन आदळले आणि त्यानंतर विमानाचा स्फोट झाला. या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून सध्या बचावकार्य सुरू असून संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे हादरला आहे. या प्रकरणाचे अधिक तपशील येणे अद्याप बाकी आहे.

शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा तयार; आता १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार महामार्ग, लांबीही वाढली

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित संरेखनाचा (Revised Alignment) प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या नवीन आराखड्यानुसार महामार्गाची लांबी वाढली असून, आता हा मार्ग १२ ऐवजी १३ जिल्ह्यांमधून जाणार आहे.

​मुख्य बदल आणि वैशिष्ट्ये:

​१. लांबीत वाढ: सुरुवातीला हा महामार्ग ८०३ किमीचा प्रस्तावित होता. मात्र, स्थानिक विरोध आणि भौगोलिक बदलांमुळे आता तो ८५६ किमी लांबीचा असेल.

२. सातारा जिल्ह्याचा समावेश: यापूर्वी हा मार्ग १२ जिल्ह्यांमधून जाणार होता. आता यात सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

३. बाधित जिल्हे: वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे.

४. गावांची संख्या: महामार्ग आता एकूण ३९५ गावांतून जाणार आहे. यापूर्वी ही संख्या ३५० च्या आसपास होती.

​विरोधामुळे आराखड्यात बदल:

​कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला आणि भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवला होता. आंदोलने आणि जनआक्रोश लक्षात घेऊन राज्य सरकारने एमएसआरडीसीला जिथे विरोध आहे, तिथे पर्यायी मार्ग शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, ज्या ठिकाणी जास्त विरोध होता, तिथून महामार्गाला ‘वळसा’ देण्यात आला आहे. या बदलामुळे काही महत्त्वाची शक्तीपीठे महामार्गापासून काहीशी दूर गेली असली, तरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

​या सुधारित आराखड्यामुळे भूसंपादनाच्या क्षेत्रातही वाढ झाली असून, आता एकूण ८,५०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. जिथे शेतकऱ्यांचा विरोध जास्त होता, तिथे महामार्गाला वळसा देण्यात आला आहे, ज्यामुळे काही धार्मिक स्थळे किंवा शक्तीपीठे महामार्गापासून काही अंतरावर गेली आहेत. दरम्यान, ज्या ठिकाणी विरोध नाही अशा १४६ गावांमध्ये जमिनीची मोजणी आधीच पूर्ण झाली असून, उर्वरित गावांमध्ये सरकारची मंजुरी मिळताच कामाला सुरुवात केली जाईल. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर बांधण्यात येणारा हा प्रकल्प दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Republic Day 2026: महाराष्ट्रातील ८९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर; संपूर्ण यादी ईथे वाचा

   Follow us on        

नवी दिल्ली, २५ : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण ८९ अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’ (GM), उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी दिले जाणारे ‘राष्ट्रपती पदक’ (PSM) पोलीस दलातील ४ अधिकारी आणि सुधारात्मक सेवा विभागातील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवेसाठी (MSM) महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील ४०, अग्निशमन सेवेसाठी ४, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतील ३, सुधारात्मक सेवेतील ५ या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत दरवर्षी पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील कार्यासाठी शौर्य आणि सेवा पदके दिली जातात.

महाराष्ट्राला मिळालेल्या विविध श्रेणीतील पदक प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी

वीरता पदक (GM)-पोलीस सेवा

१. अमोल नानासाहेब फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,

 

२. वासुदेव राजम मडावी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,

 

३. मधुकर पोचाय्या नैताम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकए

 

४. संतोष वसंतराव नैताम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल ज

 

५. कै.सुधाकर बिताजी वेलादी नाईक पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)

 

६. विलास मारोती पोर्तेट नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

७. विश्वनाथ सन्यासी सदमेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

८. ज्ञानेश्वर सदाशिव फाडणे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

९. दिलीप वासुदेव सद्मेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

१०. रामसू देवू नरोटे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

११. आनंदराव बाजीराव उसेंडी,नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

१२. राजू पंडित चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

१३. अरुण कैलास मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल

 

१४. नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल

 

१५. मोहन लच्छू उसेंडी, पोलीस कॉन्स्टेबल

 

१६. संदिप गणपत वसाके, पोलीस कॉन्स्टेबल

 

१७. कैलास देवू कोवासे ,पोलीस कॉन्स्टेबल

 

१८. हरिदास महारू कुलयेती, पोलीस कॉन्स्टेबल

 

१९. किशोर चंती तलांडे, पोलीस कॉन्स्टेबल

 

२०. अनिल रघुपती आलम, पोलीस कॉन्स्टेबल

 

२१. नरेंद्र दशरथ मडावी, पोलीस कॉन्स्टेबल

 

२२. आकाश अशोक उईके, पोलीस कॉन्स्टेबल

 

२३. स्वर्गीय करे इरपा आत्राम, पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)

 

२४. राजू मासा पुसाळी, पोलीस कॉन्स्टेबल

 

२५. महेश दत्तूजी जकेवार, पोलीस कॉन्स्टेबल

 

२६. रुपेश रमेश कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल

 

२७. मुकेश शंकर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल

 

२८. योगेंद्रराव उपेंद्रराव सदमेक, पोलीस कॉन्स्टेबल

 

२९. घिस्सू वांजा आत्राम, पोलिस कॉन्स्टेबल

 

३०. अतुल भगवान मडावी पोलीस कॉन्स्टेबल

 

३१. विश्वनाथ लक्ष्मण मडावी पोलीस कॉन्स्टेबल

 

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM)

१. श्री महेश उदाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र

 

२. श्री बाळकृष्ण मोतीराम यादव, पोलीस उपायुक्त, महाराष्ट्र

 

३. श्री सायरस बोमन इराणी, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

 

४. श्री विठ्ठल खंडुजी कुबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

 

सुधारात्मक सेवा

१. श्री विजय बाबाजी परब, सुभेदार

 

२. श्री राजू विठ्ठलराव हेटे, हवालदार

 

उत्कृष्ट सेवेसाठी पदक (एमएसएम)

१. श्री राजीव वीरेंद्र कुमार जैन, पोलीस महानिरीक्षक

 

२. श्री सुधीर कल्ल्या हिरेमठ, पोलीस महानिरीक्षक

 

३. श्रीमती शीला दिनकर साहिल, पोलीस अधीक्षक

 

४. श्री मोहन मुरलीधर दहीकर, पोलीस अधीक्षक

 

५. श्री पुरुषोतम नारायण कराड, पोलीस अधीक्षक

 

६. श्रीमती. किरण जितेंद्रसिंह पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

 

७. श्रीमती. नीलम प्रशांत वाव्हळ, पोलीस उपअधीक्षक

 

८. श्री अविनाश शंकरराव शिळीमकर, निरीक्षक (पीए)

 

९. श्री गजानन रामराव शेळके, पोलीस उपअधीक्षक

 

१०. श्री महेश रमेश तावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त

 

११. श्री विजय मारोतीराव माहुलकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

 

१२. श्री समीर नारायण साळुंके, सहाय्यक पोलीस आयुक्त

 

१३. श्री पराग बापूराव पोटे, पोलीस उपअधीक्षक

 

१४. श्री दयानंद सदाशिव गावडे, पोलीस उपअधीक्षक

 

१५. श्रीमती. पुष्पलता राजाराम दिघे, पोलीस उपअधीक्षक,

 

१६. श्री सुनील शंकर शिंदे, निरीक्षक (PH)

 

१७. श्रीमती. सुवर्णा उमेश शिंदे, निरीक्षक (पीए)

 

१८. श्री अनंत ज्ञानेश्वर माळी, पोलीस उपअधीक्षक

 

१९. श्री महेंद्र दत्तात्रय कोरे, निरीक्षक/आरओ/आरएम

 

२०. श्री कैलाश रामजी बाराभाई, निरीक्षक/आरओ/आरएम

 

२१. श्री विजय गोपाळ मोहिते, उपनिरीक्षक

 

२२. श्री भारत रावसाहेब सावंत, इन्स्पेक्टर/एआरएमआर

 

२३. श्री नरेंद्र सखाराम राऊत, सहाय्यक उपनिरीक्षक

 

२४. श्री सतीश जनार्दन निंबाळकर, उपनिरीक्षक

 

२५. श्री अफजल खान शहेजादे खान पठाण, सहाय्यक उपनिरीक्षक

 

२६.श्री प्रदिप साहेबराव सावंत, सहाय्यक उपनिरीक्षक

 

२७. श्री सुभाष वामन साळवी, उपनिरीक्षक

 

२८. श्री प्रमोद रोहिदास वाघमारे, निरीक्षक (पीए)

 

२९. श्री विजयकुमार शंकर शिंदे, उपनिरीक्षक

 

३०. श्री विक्रम व्यंकटराव नवरखेडे, उपनिरीक्षक

 

३१. श्री विजय प्रभाकर देवरे, उपनिरीक्षक

 

३२. श्री मनोज यशवंत गुजर, उपनिरीक्षक

 

३३. श्री अजय मनोहर सावंत, उपनिरीक्षक

 

३४. श्री गंगाधर रामचंद्र घुमरे, उपनिरीक्षक

 

३५. श्री संजय एकनाथ शेलार, उपनिरीक्षक

 

३६. श्री महादेव मधुकर खंडारे, निरीक्षक/एआरएमआर

 

३७. श्री राजकुमार चनवीरप्पा टोळनुरे, उपनिरीक्षक

 

३८. श्री बाबासाहेब नाथा ढाकणे, उपनिरीक्षक

 

३९. श्री शिवदास दत्तात्रय फुटाणे, उपनिरीक्षक

 

४०. श्री सुरेश साहेबराव सोनवणे, उपनिरीक्षक

 

अग्निशमन सेवा

१. श्री हरिश्चंद्र वसंत गिरकर, उप. मुख्य अग्निशमन अधिकारी,

 

२. श्री दामोदर वनगड, अग्निशमन अधिकारी

 

३. श्री कांचन बंडू पाटील, ड्रायव्हर ऑपरेटर

 

४. श्री काशिनाथ राजनाथ मिश्रा, अग्रगण्य फायरमन

 

नागरी संरक्षण व होमगार्ड

१. श्री गंगाधर वखाजी वुरकुड, प्लाटून कमांडर

 

२. श्री राजेंद्र मधुकरराव बन्सोड, प्लाटून कमांडर

 

३. श्री नागेश्वरराव अल्कोंदिया पोडदाली, प्लाटून कमांडर

 

सुधारात्मक सेवा

१. श्री अशोक शिवराम करकर, अधीक्षक

 

२. श्री गोविंद केशव राठोड, अतिरिक्त अधीक्षक

 

३. श्री राजेंद्र भाऊसाहेब धनगर, हवालदार

 

४. श्री सुनील भाऊसो लांडे, हवालदार

 

५. श्री प्रल्हाद महिपती शिंदे, हवालदार

एसटी विश्रामगृहात सापडल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या; प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या चालकांविरोधात परिवहन मंत्र्यांच्या कडक निर्णय

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या चालक आणि इतर कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारे गय न करता त्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान, विश्रांतीगृहामध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि काही कर्मचाऱ्यांकडून येणारी दुर्गंधी पाहून मंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “अशा प्रकारचे कृत्य केवळ शिस्तभंग नसून प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा धोकादायक प्रकार आहे,” अशा शब्दांत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सुनावले.

​यापुढे एसटी महामंडळाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची, विशेषतः चालकांची, कर्तव्यावर जाण्यापूर्वी ब्रेथ ॲनालायझरद्वारे (Breath Analyzer) चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या चाचणीत दोषी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केले जाईल. तसेच, अशा गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सुरक्षा व दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांचीही विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत. परळ बसस्थानकातील अस्वच्छता आणि गैरव्यवस्थापनाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसुविधांसाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असून, प्राप्त अहवालाच्या आधारे दोषींवर बडतर्फीपर्यंतची कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर दिसणार महाराष्ट्राचा दिमाखदार चित्ररथ; ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ संकल्पनेचे सादरीकरण

   Follow us on        

नवी दिल्ली :भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्र राज्याचा आकर्षक आणि आशयघन चित्ररथ सज्ज झाला आहे. यंदा महाराष्ट्राच्या वतीने ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार असून, राज्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, सामाजिक एकात्मता आणि वाढते आर्थिक सामर्थ्य यांचे प्रभावी दर्शन या चित्ररथातून घडवण्यात येणार आहे.

या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सादर होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ जागतिक स्तरावर राज्याची ओळख अधिक भक्कम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

चित्ररथाच्या मध्यवर्ती संकल्पनेत गणेशोत्सवाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्माण होणारी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार, रंगकाम करणारे कलाकार, सजावट व्यावसायिक, प्रकाश व ध्वनी तंत्रज्ञ, वाहतूक, फुलव्यवसाय, पर्यावरणपूरक साहित्य निर्माते अशा असंख्य घटकांना मिळणारा शाश्वत रोजगार या संपूर्ण आर्थिक साखळीचे प्रभावी चित्रण या चित्ररथात करण्यात आले आहे.

चित्ररथावर गणपती बाप्पांची भव्य मूर्ती, पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करणारे कलाकार, लेझीम, फुगडी यांसारखे लोकनृत्यप्रकार, तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख दर्शवणारे पोशाख आणि रंगसंगती पाहायला मिळणार आहेत. या माध्यमातून ‘लोकसहभागातून आत्मनिर्भरता’ ही संकल्पना ठळकपणे मांडण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे, महाराष्ट्र शासनाने २०२५ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’चा दर्जा दिला आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव न राहता, पर्यावरणपूरक उपक्रम, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा उत्सव म्हणून अधिक व्यापक स्वरूपात साजरा होत आहे. शाडू मातीच्या मूर्ती, कृत्रिम विसर्जन तलाव, पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचाही चित्ररथात समावेश करण्यात आला आहे.

एकूणच, महाराष्ट्राचा हा चित्ररथ परंपरा आणि प्रगती यांचा सुरेख संगम साधणारा असून, भारताच्या सांस्कृतिक वैविध्यात महाराष्ट्राचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे देशासह जगाला दाखवून देणारा ठरणार आहे.

गाबीत समाज विकास मंडळ, पुणे यांचा दिमाखदार स्नेह मेळावा संपन्न

   Follow us on        

पुणे: गाबीत समाज विकास मंडळ, पुणे यांचा दिमाखदार स्नेह मेळावा संपन्न झाला. गोवा,कारवारसह तळ कोकणातील गाबीत समाज बांधव ज्या उद्देशाने एकत्रित येऊन रोप लावले. त्यांचे रूपांतर आज वटवृक्षात झाले .असे कार्यक्रमाचे अध्यक्ष विठोबा तथा आबा झिलू कोळंबकर यांनी चिंचवड ,पुणे येथे गाबीत समाज वार्षिक स्नेहमेळावा २०२६ आयोजित सोहळ्यात ज्ञाती बांधवांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले.

प्रारंभी दिपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, प्रा. डॉ. नंदा संतोष हरम, मंडळाचे अध्यक्ष नागेश साळगांवकर, महिला अध्यक्षा सौ. चंदन प्रसाद भाबल आदी प्रभृतीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्ष आबा कोळंबकर म्हणाले की, आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा, सोबतच व्यक्त व्हावं हाच हेतू कार्यकर्त्यांनी मंडळ निर्माण केला तोच वारसा पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी नमूद केले. प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांनी सांगितले की, आपलं गाव सोडून पुण्यासारख्या शहरात आलात.पण आपली संस्कृती टिकून ठेवत असताना ,सामाजाविषयी असलेली बांधिलकी अबाधित राखण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहात हेच आजच्या कार्यक्रमातून अधोरेखित होतं आहे. त्यामुळे असेच जोमाने कार्यरत रहा आणि मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करा असे सांगितले. प्रा. डॉ. नंदा संतोष हरम यांनी ” लहान मुलांना वाढवताना” या विषयावर बोलताना सांगितले की,खरंच आपली मुले सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित करून यांचा विचार गांभीर्याने पालकांनी करण्याची वेळ आल्याचे नमूद करताना बालपणी मुलांचा व्यक्तीमत्व विकास घडतं असतो. त्यांना सोशल मीडिया पासून दूर ठेवता येणे गरजेचे असून आईवडिलांनी सुद्धा किती वेळ भ्रमणध्वनी वापरायचा यांचाही विचार व्हावा! त्यापेक्षा मुलांना इतिहासिक ठिकाणे, वारी म्हणजे काय? गड किल्ले यांची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा. त्यांना स्वावलंबन शिकवा तरच सजगतेने पालकत्व निभावलं जाईल असे सांगितले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष नागेश साळगांवकर, महिला अध्यक्षा सौ. चंदन प्रसाद भाबल यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून खजिनदार शशिकांत धुरी आणि प्रसाद भाबल यांना विशेष सन्मानित करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक चिटणीस हेमंत आचरेकर यांनी करून आढावा घेतला. तर मागील वर्षीचा ताळेबंद वाचन खजिनदार शशिकांत धुरी यांनी केले.उपस्थित पाहुण्यांचा परिचय राजाराम गांवकर यांनी करून दिला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात मालवणी दशावतार “एक लोपावत असलेली कला” आणि सौ. मेधा नंदकिशोर सनये लिखित “वय हरले जिद्द जिंकली” या दुहेरी एकांकिका सद्यस्थितीवर भाष्य करण्याऱ्या ठरल्या त्याला उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली. तर कित्येक पारितोषिके प्राप्त झाली. या कार्यक्रमासाठी लेखक कवी डॉ. उदय माळगावकर, साहित्यिक गोपाळकृष्ण तथा बाबा मुणगेकर, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या रंगतदार स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन सुदवा देऊलकर आणि शुभम नंदकिशोर सनये संयुक्तपणे केले. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्यकारी मंडळ व सदस्य कार्यकारी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. विविध कार्यक्रमांनी सांगता करण्यात आली.

प्रवाशांना दिलासा! मुंबईहून मडगाव आणि नागपूरसाठी धावणार विशेष गाड्या

   Follow us on        

मुंबई: प्रजासत्ताक दिनी सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवासाच्या वाढत्या मागणीचा विचार करून मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव दरम्यान ४ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

​या गाड्यांचे आरक्षण २३ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे.

१. मुंबई – नागपूर – मुंबई विशेष (०२ सेवा)

​नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी ही विशेष गाडी चालवण्यात येणार आहे.

​गाडी क्र. ०२१३९ विशेष: शनिवार, दिनांक २५.०१.२०२६ रोजी CSMT येथून मध्यरात्री ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५.३० वाजता नागपूरला पोहोचेल.

​गाडी क्र. ०२१४० विशेष: शनिवार, दिनांक २५.०१.२०२६ रोजी नागपूर येथून रात्री २०.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १३.३० वाजता CSMT मुंबईला पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा:

दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

​गाडीची रचना (LHB कोचेस):

१ वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, ६ वातानुकुलीत तृतीय श्रेणी, ९ शयनयान (Sleeper), ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ जनरेटर/गार्ड व्हॅन.

​२. मुंबई – मडगाव – मुंबई विशेष (०२ सेवा)

​कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही विशेष गाडी उपयुक्त ठरेल.

​गाडी क्र. ०११२९ विशेष: रविवार, दिनांक २५.०१.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून पहाटे ०१.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.०० वाजता मडगावला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११३० विशेष: रविवार, दिनांक २५.०१.२०२६ रोजी मडगाव येथून दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.०५ वाजता LTT ला पोहोचेल.

​या स्थानकांवर असेल थांबा:

ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

​गाडीची रचना (ICF कोचेस):

१ वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, ३ वातानुकुलीत तृतीय श्रेणी, ८ शयनयान (Sleeper), ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ गार्ड ब्रेक व्हॅन.

​आरक्षण आणि तिकीट विक्री

​गाडी क्रमांक ०२१३९, ०२१४० आणि ०११२९ चे आरक्षण २३ जानेवारी २०२६ पासून सर्व संगणकीकृत केंद्रांवर आणि IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.irctc.co.in) उपलब्ध होईल.

​अनरक्षित डब्यांसाठी प्रवासी UTS मोबाइल ॲप किंवा तिकीट खिडकीवरून सामान्य दरात तिकीट घेऊ शकतील.

मोठी बातमी: २९ महापालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर; मुंबई, पुणे, नागपूरसह ‘या’ शहरांत महिला राज!

   Follow us on        

मुंबई: महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत अखेर आज जाहीर झाली आहे. मंत्रालयातील परिषद सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. या आरक्षणामुळे अनेक शहरांतील राजकीय समीकरणे बदलणार असून, दिग्गजांच्या नजरा आता आपल्या प्रभागातील गणितांकडे लागल्या आहेत.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांसाठी ही सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि खुला प्रवर्ग (Open) अशा विविध प्रवर्गांसाठी पदे आरक्षित करण्यात आली आहेत.

​प्रमुख शहरांतील आरक्षणाची स्थिती

​१. महिलांसाठी आरक्षित महापालिका (खुला प्रवर्ग):

राज्यातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी मुंबई महानगरपालिका यंदा महिलांसाठी आरक्षित झाली आहे. यासोबतच खालील शहरांतही महिला महापौर विराजमान होतील:

​मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, नांदेड, धुळे, मालेगाव आणि मीरा-भाईंदर.

​२. अनुसूचित जाती आणि जमाती (SC/ST):

​कल्याण-डोंबिवली: अनुसूचित जमाती (ST) – सर्वसाधारण.

​ठाणे: अनुसूचित जाती (SC) – सर्वसाधारण.

​जालना आणि लातूर: अनुसूचित जाती (SC) – महिला.

​३. इतर मागास प्रवर्ग (OBC):

​पनवेल, उल्हासनगर, कोल्हापूर, इचलकरंजी: ओबीसी – सर्वसाधारण.

​अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव: ओबीसी – महिला.

राजकीय हालचालींना वेग

​आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे, तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांत महिला आरक्षण आल्यामुळे राजकीय पक्षांना आता महिला उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे.

​पुढील काही दिवसांत या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीला वेग येईल, हे निश्चित.

महानगरपालिका नुसार आरक्षण यादी 

महापालिका आरक्षणाचा प्रवर्ग

  1. मुंबई सर्वसाधारण (महिला)
  2. पुणे सर्वसाधारण (महिला)
  3. नागपूर सर्वसाधारण (महिला)
  4. पिंपरी चिंचवड सर्वसाधारण (महिला / पुरुष)
  5. ठाणे अनुसूचित जाती (महिला / पुरुष)
  6. नाशिक सर्वसाधारण (महिला)
  7. कल्याण डोंबिवली अनुसूचित जमाती (महिला / पुरुष)
  8. छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  9. वसई विरार सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  10. सोलापूर सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  11. नवी मुंबई सर्वसाधारण (महिला)
  12. मिरा भाईंदर सर्वसाधारण (महिला)
  13. अमरावती सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  14. पनवेल ओबीसी- (महिला / पुरुष)
  15. भिवंडी- निजामपूर सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  16. नांदेड- वाघाळा सर्वसाधारण (महिला)
  17. अकोला ओबीसी (महिला)
  18. मालेगाव सर्वसाधारण (महिला)
  19. कोल्हापूर ओबीसी- (महिला / पुरुष)
  20. सांगली- मिरज- कुपवाड सर्वसाधारण खुला
  21. जळगाव ओबीसी (महिला)
  22. धुळे सर्वसाधारण (महिला)
  23. उल्हासनगर ओबीसी- (महिला / पुरुष)
  24. लातूर अनुसूचित जाती (महिला)
  25. अहिल्यानगर ओबीसी (महिला)
  26. चंद्रपूर ओबीसी (महिला)
  27. परभणी सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  28. इचलकरंजी ओबीसी (महिला / पुरुष)
  29. जालना अनुसूचित जाती (एससी महिला)

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search