Category Archives: महाराष्ट्र

औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता “छत्रपती संभाजीनगर”

   Follow us on        

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील “औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव अधिकृतपणे बदलून “छत्रपती संभाजीनगर” असे करण्यात आले आहे. या बदलास केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून स्थानकाचा नवीन कोड CPSN असा असणार आहे.

आता पुढे “औरंगाबाद” ऐवजी सर्व रेल्वे फलक, आरक्षण तिकीट प्रणाली आणि घोषणांमध्ये “छत्रपती संभाजीनगर” हे नाव वापरले जाईल. रेल्वे प्रवाशांना आणि नागरिकांना याबाबत दक्षिण मध्य रेल्वेकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे ऐतिहासिक शहराच्या नावात बदल करत “छत्रपती संभाजीनगर” हे नाव अधिकृतपणे भारतीय रेल्वेच्या नोंदीत समाविष्ट झाले आहे.

Konkan Railway: सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे चार गाड्यांना थांबे मंजूर

नवी दिल्ली | 17 ऑक्टोबर 2025

   Follow us on        

रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) नवीन आदेश जाहीर करत चार महत्त्वाच्या गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा थांबा प्रायोगिक तत्त्वावर (Experimental Basis) देण्यात आला असून, तो लवकरच अमलात येणार आहे.

या आदेशानुसार खालील गाड्यांना थांबा मिळणार आहे:

22655/22656 Ernakulam – Hazrat Nizamuddin Express – थांबा: सिंधुदुर्ग

12977/12978 Ernakulam – Ajmer Marusagar Express – थांबा: सिंधुदुर्ग

22475/22476 Hisar – Coimbatore Express – थांबा: कणकवली

16335/16336 Gandhidham – Nagercoil Express – थांबा: कणकवली

 

 

सावंतवाडीतील चिमुकल्या ‘नृत्या’ला जीवनदानाची गरज – उपचारासाठी १५ लाखांची आवश्यकता, समाजातील दानशूरांकडून मदतीचे आवाहन

   Follow us on        

सावंतवाडी, ता. ९ : सावंतवाडीतील अवघी तीन वर्षांची चिमुरडी ‘नृत्या’ सध्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. निमोनियाच्या गंभीर प्रकारामुळे तिला कोल्हापूर येथील साई स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचारासाठी तब्बल १० ते १५ लाख रुपयांची आवश्यकता आहे.

‘नृत्या’ ही सावंतवाडीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर महेश जांभोरे यांची कन्या आहे. जन्मापासूनच विविध आरोग्य समस्यांशी ती लढत आहे. आतापर्यंत जांभोरे यांनी आपली सर्व जमापुंजी खर्च करून मुलीवर उपचार सुरू ठेवले, मात्र सध्याच्या परिस्थितीत उपचारांचा खर्च परवडणं कठीण झालं आहे.

आठवडाभरापूर्वी ताप व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांमधून तिला कोल्हापूर येथे हलविण्यात आलं. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

त्यासाठी प्रवीण कुबल (7066415169) या नंबरवर संपर्क साधावा. तसेच ज्या दात्यांना आर्थिक मदत द्यायची असेल त्यांनी या बँक अकाउंटवर IFSC :- SBIN0000476, Account no :- 20300618631 किंवा गुगल पे महेश जांभोरे (9545472152) वर आपली मदत पाठवावी.

नृत्याच्या उपचारांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन तिच्या मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे.

 

 

Konkan Railway: रेल्वेचा गलथान कारभार! आरक्षित असलेला डब्बा न जोडताच गाडी रवाना

   Follow us on        

मुंबई, दि. ८ ऑक्टोबर : मुंबईवरून मडगावकडे जाणाऱ्या १२०५१ जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांमध्ये आज तीव्र संतापाची लाट उसळली. प्रवाशांकडे  कन्फर्म तिकीटे असलेला DL-1 डबा गाडीला लावण्यातच आलेला नव्हता.

या अनपेक्षित घटनेमुळे गाडीत गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांना जागा न मिळाल्याने प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला. परिस्थिती हाताळताना रेल्वेतील टीसी आणि कर्मचारी देखील अडचणीत सापडले.

टीसींनी प्रवाशांना या प्रकरणाची तक्रार रेल्वे प्रशासनाकडे नोंदविण्याचा सल्ला दिला असून, प्रवाशांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. रेल्वेच्या या गलथान कारभारामुळे प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रवाशांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली असून, हा प्रकार रेल्वेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे

पीएसआय परिक्षेत अव्वल ठरलेल्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यात हळहळ

   Follow us on    

 

 

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील रहिवासी अश्विनी केदारी (वय ३०) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतलेल्या २०२३ च्या पीएसआय परीक्षेत मुलींत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अश्विनीचा २८ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात गंभीर भाजल्याने मृत्यू झाला.

२८ ऑगस्टच्या सकाळी अभ्यास करताना तिने बाथरूममधील गिझर सुरू करून पाणी गरम केले होते. पाण्याचे तापमान पाहण्यासाठी गेल्यावर तिला विजेचा धक्का बसला आणि अंगावर उकळते पाणी ओतले गेले. यात ती ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात भाजली.

तिला तात्काळ पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या उपचारासाठी समाजातील अनेकांनी आर्थिक मदतही केली. मात्र, काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शेतकरी कुटुंबातील अश्विनीने स्वतःच्या कष्टावर यश मिळवले होते. जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते. तिच्या निधनाने खेड तालुक्यासह तिचे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्पर्धा परीक्षेतील अभ्यासकांवर दुःखाचे सावट पसरले आहे

रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या १८ विशेष गाड्या

   Follow us on    

 

 

मुंबई | ५ ऑगस्ट २०२५

रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिनाच्या काळात प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण १८ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि मडगाव या मार्गांवर धावणार आहेत. विशेषतः  दीर्घ सुट्टीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.

. या विशेष गाड्या खालील मार्गांवर धावणार आहेत:

  • सीएसएमटी (मुंबई) ते नागपूर – सहा (६) फेऱ्या
  • एलटीटी (मुंबई) ते मडगाव – चार (४) फेऱ्या
  • सीएसएमटी (मुंबई) ते कोल्हापूर – दोन (२) फेऱ्या
  • पुणे ते नागपूर – सहा (६) फेऱ्या

विशेष गाड्यांचा तपशील:

१) सीएसएमटी – नागपूर (दोन [२] फेऱ्या):

०११२३ विशेष गाडी ०९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२.२० वा. मुंबई सीएसएमटी येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वा. नागपूरला पोहोचेल.

०११२४ विशेष गाडी १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० वा. नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५.२५ वा. मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल

 सीएसएमटी – नागपूर (चार [४] फेऱ्या):

०२१३९ विशेष गाडी १५ आणि १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२.२० वा. सीएसएमटी येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वा. नागपूरला पोहोचेल.

०२१४० विशेष गाडी १५ आणि १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.०० वा. नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वा. मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, माळखेड, शेगाव, अकोला, मुरतिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा

डब्यांची रचना: दोन एसी-३ टियर, बारा स्लीपर, सहा जनरल, दोन ब्रेक व्हॅन

 

२) सीएसएमटी – कोल्हापूर (दोन [२] फेऱ्या):

०१४१७ विशेष गाडी ०८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.३० वा. सीएसएमटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१५ वा. कोल्हापूरला पोहोचेल.

०१४१८ विशेष गाडी १० ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ४.४० वा. कोल्हापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.४५ वा. सीएसएमटी येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेऊरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज

डब्यांची रचना: दोन एसी-३ टियर, बारा स्लीपर, सहा जनरल, दोन ब्रेक व्हॅन

 

३) एलटीटी – मडगाव (चार [४] फेऱ्या):

०११२५ विशेष गाडी १४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.१५ वा. एलटीटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वा. मडगाव येथे पोहोचेल.

०११२६ विशेष गाडी १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.४० वा. मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वा. एलटीटी येथे पोहोचेल.

०११२७ विशेष गाडी १६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.१५ वा. एलटीटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वा. मडगाव येथे पोहोचेल.

०११२८ विशेष गाडी १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.४० वा. मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वा. एलटीटी येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी

डब्यांची रचना: एक एसी-१ टियर, तीन एसी-२ टियर, सात एसी-३ टियर, आठ स्लीपर, एक पँट्री कार, एक जनरेटर कार

 

४) पुणे – नागपूर (सहा [६] फेऱ्या):

विशेष गाडी क्रमांक ०१४६९ ही ०८.०८.२०२५ रोजी पुणे येथून सायंकाळी १९.५५ वाजता प्रस्थान करेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १४.४५ वाजता आगमन करेल. (एक फेरफटका)

विशेष गाडी क्रमांक ०१४७० ही १०.०८.२०२५ रोजी नागपूर येथून दुपारी १३.०० वाजता प्रस्थान करेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.२० वाजता आगमन करेल. (एक फेरफटका)

थांबे: दौंड चोर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, माळकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा.

रचना: दोन एसी-३ टियर डबे, १२ स्लीपर क्लास डबे, ६ सामान्य दुसऱ्या वर्गाचे डबे आणि २ द्वितीय आसन व गार्ड ब्रेक व्हॅन.

 

 आरक्षण माहिती:

०७ ऑगस्ट २०२५ पासून पुढील गाड्यांसाठी आरक्षण सुरू होईल:

०११२३, ०११२४, ०१४१७, ०१४१८, ०१४६९ आणि ०१४७०

०९ ऑगस्ट २०२५ पासून पुढील गाड्यांसाठी आरक्षण सुरू होईल:

०२१३९, ०२१४०, ०१४३९, ०१४४०, ०११२५ आणि ०११२७

प्रवाशांनी www.irctc.co.in या अधिकृत वेबसाइटवर किंवा जवळच्या संगणकीकृत आरक्षण केंद्रात जाऊन तिकीट आरक्षित करावे.

Weather Updates: पुढील २४ तास महत्त्वाचे! मुंबईसह कोकणातील किनारपट्टी जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी

   Follow us on    

 

 

Weather Update: पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट दिला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.

किनारपट्टी भागात उंच लाटांचा इशारा

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांच्याकडून महाराष्ट्रातील विविध किनारपट्टी जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा हवामानविषयक इशारा जारी करण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार, २४ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजल्यापासून ते २६ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत समुद्रात लाटांची उंची सुमारे ३.८ मीटर ते ४.७ मीटर पर्यंत असू शकते.

हा इशारा विशेषतः ठाणे, मुंबई शहर व उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील किनारपट्टी भागांसाठी लागू आहे. समुद्रात निर्माण होणाऱ्या उंच लाटा आणि संभाव्य वादळवाऱ्यांमुळे समुद्र परिस्थिती अतिशय अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे, लहान होड्यांचे मालक, मासेमारी करणारे आणि किनारपट्टीवरील रहिवासी यांना खबरदारीचे उपाय घेण्याचे आणि या कालावधीत समुद्रात न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडूनही स्थानिक पातळीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, समुद्र किनारी जाणाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

 

 

Mumbai: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वनराणी’ पुन्हा धावणार

   Follow us on    

 

 

मुंबई: बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहान-मोठ्यांना आकर्षित करणारी ‘वनराणी’ धावणार आहे. मे 2021 मध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर बंद पडलेली मिनी ट्रॉय ट्रेन आता पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. ऑगस्टपासून ही ट्रॉय ट्रेन पर्यटकांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा, नौकाविहार, वाघ-सिंह सफारी, निसर्ग माहिती केंद्र आदींबरोबरच ‘वनराणी’ ही देखील पर्यटकांचे आकर्षण होती. मुलांबरोबरच त्याचे पालकही ‘वनराणी’ या मिनी टॉय ट्रेन’ मधून उद्यानाची सफर करत मजा लुटत होते. मात्र, 2021 मध्ये आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळात राष्ट्रीय उद्यानात शेकडो वृक्षांची पडझड झाली. तसेच अनेक रस्ते देखील उखडले गेले. तेव्हा ‘वनराणी’च्या एका वळणावर झाडे पडल्याने रुळांसह स्लीपर्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ही ट्रॉय ट्रेन बंद झाली होती.

Loading

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टप्प्यातील संरेखनात बदल; नवीन आराखडा असा असेल.

   Follow us on    

 

 

सावंतवाडी: बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित आखणीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आंबोली येथील संवेदनशील परिसरातील पर्यावरणावर होणारा परिणाम टाळण्यासाठी आणि ३० किलोमीटर लांबीचा भव्य बोगदा खोदण्याची आवश्यकता टाळण्यासाठी आता केसरी-फणसवडे या पर्यायी मार्गाचा वापर केला जाणार आहे. यामुळे केवळ १० किलोमीटर लांबीचा बोगदा खोदून हा महामार्ग थेट मळगावला जोडला जाणार आहे.

या बदलामुळे आंबोलीतील इको सेन्सिटिव्ह भाग आणि बागायती क्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गाची गरज टळणार आहे. ज्यामुळे स्थानिक पर्यावरण आणि कृषी क्षेत्राचे संरक्षण होईल.

आमदार दीपक केसरकर यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, “शक्तीपीठ” महामार्गाच्या प्रस्तावित आखणीत बदल करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आंबोली येथील इको सेन्सिटिव्ह आणि बागायतीच्या भागातून जाणारा महामार्ग आता अन्य भागातून वळवण्यात येणार आहे. यामुळे केसरी-फणसवडे या मार्गाचा वापर केला जाणार असून, आंबोलीतील तब्बल ३० किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्याची गरज लागणार नाही. त्याऐवजी फक्त १० किलोमीटर लांबीचा बोगदा खोदून हा महामार्ग मळगावला जोडला जाईल.” या बदलामुळे प्रकल्पाच्या खर्चातही बचत होण्याची शक्यता आहे, तसेच पर्यावरणीयदृष्ट्या अधिक शाश्वत पर्याय निवडला गेल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. शक्तीपीठ महामार्गाचे काम आता अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे.

Vande Bharat Express: मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस मुहूर्त ठरला

No block ID is set

Vande Bharat Express: नांदेडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबई ते नांदेड या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. पुढील महिन्यापासून मुंबई ते नांदेड असा प्रवास करता येणार आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. ही ट्रेन मुंबई ते नांदेडदरम्यान (Mumbai to Nanded) 771 किलोमीटरचं अंतर तब्बल 8 तासात पूर्ण करणार असल्याची माहिती आहे.

मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस मुहूर्त ठरला असून 26 ऑगस्ट 2025 पासून ही एक्स्प्रेस सुरू होणार आहे. दरम्यान मुंबई-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्वागतासाठी नांदेडकर सज्ज झाले असल्याचं अशोक चव्हाण यांनी ट्विट केलं आहे. याशिवाय त्यां मोदी सरकारचे आभारही मानले.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search