Category Archives: महाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पावर कडक वाहतूक नियम लागू

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन ‘कनेक्टिंग लिंक’ (मिसिंग लिंक) प्रकल्पावर वाहतूक नियमांची माहिती सर्व वाहनचालकांना दिली आहे.

१३.३ किलोमीटर लांबीच्या या आठ पदरी मार्गावर केवळ कार आणि बसेसनाच प्रवेश देण्यात येणार आहे. ट्रक, अवजड वाहने, ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारी वाहने तसेच ट्रेलर्स यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

१ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या नवीन मार्गामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. खंडाळा घाटातील धोकादायक  वळणे टाळून हा मार्ग तयार करण्यात आला असून, त्यामुळे प्रवास वेळ २० ते ३० मिनिटांनी कमी होईल.

एमएसआरडीसीने सुरक्षित, वेगवान आणि शिस्तबद्ध वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी हे नियम लागू केले आहेत. सर्व वाहनचालकांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे एमएसआरडीसीने आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

मिसिंग लिंकवर मराठी ‘मिसिंग’? प्रशासनाने स्पष्टीकरण दिले

   Follow us on        

लोणावळा: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी करणाऱ्या बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, या ऐतिहासिक सोहळ्यादरम्यान टनेलच्या प्रवेशद्वारावर दिसलेल्या एका डिजिटल पाटीमुळे सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

​नेमका वाद काय?

​प्रकल्पाच्या उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांचे लक्ष टनेलच्या दर्शनी भागावर असलेल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल पाटीकडे गेले. या पाटीवर “Missing Link Tunnel में आपका स्वागत है” असा हिंदी मजकूर झळकताना दिसला. महाराष्ट्र दिनीच राज्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पावर मराठीऐवजी हिंदी भाषेचा वापर केल्याचे पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.

​प्रशासनाचे स्पष्टीकरण

​सोशल मीडियावरील वाढती चर्चा आणि टीकेची दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “ती एक आधुनिक इलेक्ट्रॉनिक डिजिटल पाटी आहे. या पाटीवर माहिती केवळ एकाच भाषेत नसून ती मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये क्रमाने (Rotation) प्रदर्शित केली जाते. ज्यावेळी फोटो काढला गेला, त्यावेळी हिंदीतील संदेश स्क्रीनवर दिसत होता.”

​प्रवाशांच्या सोयीसाठी आणि माहितीसाठी या तिन्ही भाषांचा वापर करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

​प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

आशियातील सर्वात रुंद बोगदा

​वेळेची बचत: या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासातील २५ मिनिटे वाचणार असून ६ किमीचे अंतर कमी होणार आहे.

​प्रकल्प खर्च: सुमारे ₹६,६९५ कोटी खर्चून हा १३.३ किमीचा मार्ग तयार करण्यात आला आहे.

​जागतिक विक्रम: प्रकल्पातील ८.९ किमी लांबीचा आणि २२.३ मीटर रुंदीचा बोगदा हा ‘आशियातील सर्वात रुंद बोगदा’ ठरण्याची शक्यता असून, त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याचे संकेत आहेत.

​सुरक्षित प्रवास: खंडाळा घाटातील अवघड वळणे आणि दरड प्रवण क्षेत्राला हा मार्ग सक्षम पर्याय ठरणार आहे.

​मिसिंग लिंक प्रकल्पामुळे आता पुण्याहून मुंबईला जाणारा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित झाला असला, तरी उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या या भाषिक चर्चेने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दक्षिण मध्य रेल्वेची मराठवाड्याला ३ नवीन एक्सप्रेस गाड्या आणि १ नवीन पॅसेंजर गाडीची भेट

   Follow us on        

Railway Updates: ​मराठवाड्याच्या रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनाने आनंदाची बातमी दिली आहे. नांदेड मंडळांतर्गत तीन नवीन साप्ताहिक एक्सप्रेस, एक नवीन डेमू (DEMO) सवारी गाडी आणि एका विद्यमान गाडीच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे.

​या नवीन गाड्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

​१. नांदेड – तिरुचानूर – नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस (१७६३३/३४)

​प्रारंभ: ९ मे पासून प्रत्येक शनिवारी (नांदेडून).

​वेळ: शनिवारी दुपारी १६:४५ वाजता सुटून रविवारी दुपारी १२:२० वाजता तिरुचानूरला पोहोचेल.

​परतीचा प्रवास: १० मे पासून प्रत्येक रविवारी तिरुचानूरहून १९:४५ ला निघून सोमवारी १८:२० वाजता नांदेडला पोहोचेल.

​कोच: १६ कोच (१ AC फर्स्ट, १ AC टू-टियर, ४ AC थ्री-टियर, ६ स्लिपर, ४ जनरल).

​२. जालना – तिरुचानूर – जालना साप्ताहिक एक्सप्रेस (१७६२३/२४)

​प्रारंभ: ११ मे पासून प्रत्येक सोमवारी (जालन्याहून).

​वेळ: सोमवारी सकाळी ७:०० वाजता सुटून मंगळवारी दुपारी १२:०० वाजता तिरुचानूरला पोहोचेल.

​परतीचा प्रवास: १२ मे पासून प्रत्येक मंगळवारी तिरुचानूरहून १५:१५ ला निघून बुधवारी रात्री २१:०० वाजता जालन्याला पोहोचेल.

​कोच: २२ कोच (३ AC टू-टियर, ५ AC थ्री-टियर, १० स्लिपर, ४ जनरल).

३. तिरुपती – पंढरपूर – तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस (१७४३७/३८)

​प्रारंभ: १६ मे पासून प्रत्येक शनिवारी (तिरुपतीहून).

​वेळ: शनिवारी १६:०० वाजता सुटून रविवारी सायंकाळी १९:०० वाजता पंढरपूरला पोहोचेल.

​परतीचा प्रवास: १७ मे पासून प्रत्येक रविवारी रात्री २०:०० वाजता पंढरपूरहून निघून सोमवारी रात्री २३:३० ला तिरुपतीला पोहोचेल.

​प्रमुख थांबे: लातूर, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, बीदर.

​४. नवीन डेमू (DEMU) सवारी गाडी (७७६२३/२४)

​मार्ग: पूर्णा – जालना – हुजूर साहिब नांदेड.

​दिनांक: ४ मे पासून पूर्णेहून आणि ५ मे पासून जालन्याहून दररोज धावणार.

​कोच: ८ डबे (द्वितीय श्रेणी).

​५. रायचूर – परभणी गाडीचा जालन्यापर्यंत विस्तार (१७६६३/६४)

​रायचूर – परभणी आणि परभणी – जालना या गाड्यांचे एकत्रीकरण करून आता ही गाडी थेट रायचूर ते जालना दरम्यान चालवली जाईल. ही सेवा ५/६ मे पासून सुरू होत आहे. रायचूर ते परभणी दरम्यानच्या जुन्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ तातडीने सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला

   Follow us on        

लोणावळा:१ मे २०२६ रोजी सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या ओघामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. रणरणत्या उन्हामुळे एकापाठोपाठ १० ते १२ वाहने नादुरुस्त (ब्रेकडाउन) झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. या भीषण कोंडीचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह हजारो प्रवाशांना बसला असून, नागरिक तब्बल ३ ते ४ तास एकाच जागी अडकून पडले होते. विशेषतः लोणावळा आणि खोपोली परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

​या गंभीर परिस्थितीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. कोंडीत अडकलेल्या सर्व वाहनांकडून टोल न घेण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच, या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प (Missing Link Project) तातडीने सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

​वास्तविक हा प्रकल्प आज मध्यरात्रीनंतर लोकांसाठी खुला करण्याचे नियोजन होते. मात्र, घाटातील वाढती गर्दी आणि प्रवाशांचे हाल लक्षात घेता, उद्घाटन सोहळा संपताच हा मार्ग तात्काळ सुरू करण्यात आला आहे. या नवीन मार्गामुळे घाटातील प्रवासाचा वेळ वाचणार असून, रखडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या प्रशासनाकडून वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्र दिनानिमित्त युवासेनेतर्फे राज्यभरात ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण! चित्रपटगृहांची यादी ईथे तपासा

   Follow us on        

मुंबई: आज १ मे, महाराष्ट्र दिनाचा उत्साह संपूर्ण राज्यात ओसंडून वाहणार आहे. या मंगल दिनाचे औचित्य साधून युवासेनेच्या (शिंदे गट) वतीने महाराष्ट्रातील जनतेसाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवछत्रपतींचा दैदीप्यमान इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण राज्यभरात ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

​युवासेनेचे कार्याध्यक्ष मा. पूर्वेश सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती देत शिवप्रेमींना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

​प्रमुख शहरांमधील चित्रपटगृहे आणि वेळ

​या उपक्रमांतर्गत मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रमुख चित्रपटगृहात शो आयोजित करण्यात आले आहेत. काही महत्त्वाच्या ठिकाणच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत:

१. मुंबई आणि परिसर (Mumbai & Region)

​मुंबई शहर:

​INOX मेट्रो, मरीन लाईन्स – ३.०५ PM

​PVR फिनिक्स, लोअर परेल – ३.०५ PM

​प्लाझा, दादर – २.१५ PM

​जयहिंद मुक्ता A2, लालबाग – ३.४५ PM

​मुंबई उपनगर:

​PVR ओबेरॉय, गोरेगाव – २.०५ PM

​PVR स्काय मॉल, बोरिवली – २.०५ PM

​ठाणे:

​सिनेपोलिस लेक सिटी मॉल – १२.४५ PM

​मुव्हीमॅक्स इटर्निटी मॉल – ३.३० PM

​आनंद, ठाणे – ११.०० AM

​मिरा-भाईंदर:

​मुव्हीमॅक्स, मिरा रोड – ३.३० PM

​मॅक्सस, भाईंदर – १२.३० PM

​२. कोकण विभाग (Konkan Division)

​रायगड: पीजी सिटी, महाड – १२.०० PM

​रत्नागिरी: सिटी प्राईड – ३.१५ PM

​सिंधुदुर्ग: लक्ष्मी, कणकवली – २.३० PM

​३. पश्चिम महाराष्ट्र (West Maharashtra)

​पुणे: PVR आयकॉन पॅव्हेलियन – ३.०५ PM

​पिंपरी-चिंचवड: आयनॉक्स जय गणेश – २.३५ PM

​सातारा: सेव्हन स्टार – २.०० PM

​सांगली: मुक्ता A2 – २.३० PM

​कोल्हापूर: PVR DYP सिटी – २.३५ PM

​सोलापूर: ई-स्क्वेअर ओएसिस – ११.३० AM

​४. उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra)

​अहिल्यानगर (अहमदनगर): कॉनप्लेक्स – २.०० PM

​धुळे: ज्योती – १२.०० PM

​नंदुरबार: मिराज सिनेमा – ११.०० AM

​जळगाव: PVR मल्टिप्लेक्स – ३.४० PM

​५. विदर्भ (Vidarbha)

​नागपूर: सिनेपोलिस ट्रिनिटी मॉल – १२.४५ PM

​अमरावती: मिराज सिनेमा – ११.०० AM

​अकोला: मिराज सिनेमा – ३.०० PM

​बुलढाणा: एआरडी मल्टिप्लेक्स – ११.३० AM

​वाशिम: H2M मल्टिप्लेक्स – २.५५ PM

​यवतमाळ: एलिमेंट ई स्क्वेअर – १२.०० PM

​वर्धा: युरीच मॉल – १२.३० PM

​भंडारा: एआर सिनेमा – २.४० PM

​गडचिरोली: पिक्चर टाइम – १२.०० PM

​चंद्रपूर: मिराज सिनेमा – ११.०० AM

​गोंदिया: ईओएस मल्टिप्लेक्स – १२.०० PM

​६. मराठवाडा (Marathwada)

​छत्रपती संभाजीनगर: अंजली रत्नदीप थिएटर – १.४५ PM

​धाराशिव: सितारा सिनेप्लेक्स – ३.१५ PM

​लातूर: PVR सिनेमा – २.१० PM

​नांदेड: भारत स्क्वेअर – १२.३० PM

​बीड: तनिष्का थिएटर – २.०० PM

​परभणी: अनुसया स्क्वेअर – ११.३० AM

​हिंगोली: संस्कार थिएटर – ११.०० AM

​जालना: कृष्णा मल्टिप्लेक्स – २.३० PM

​’राजा शिवाजी’ चित्रपट आणि युवासेनेचा पुढाकार

​छत्रपती शिवाजी महाराज यांचा संघर्ष आणि स्वराज्याची गाथा मांडणारा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जास्तीत जास्त मराठी माणसाने, विशेषतः तरुणांनी हा ऐतिहासिक वारसा जवळून पाहावा, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेनेच्या नेतृत्वाखाली हे आयोजन करण्यात आले आहे.

​”जय महाराष्ट्र! जय शिवराय!” अशा घोषणा देत युवासेनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही यादी जाहीर केली असून, नागरिकांनी आपापल्या जवळील चित्रपटगृहात जाऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाची बातमी! महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार; ऑनलाईन कसा चेक कराल?

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) घेतलेल्या बारावीच्या (HSC) परीक्षेचा निकाल उद्या, २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. यासंदर्भात मंडळाने अधिकृत माहिती दिली असून, निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी उद्या सकाळी ११ वाजता बोर्डाची अधिकृत पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संकेतस्थळावर स्वतःचा निकाल पाहता येईल.

​विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी त्यांचा सीट नंबर (Seat Number) आणि आईचे नाव (Mother’s Name) ही माहिती जवळ ठेवणे आवश्यक आहे. निकाल पाहण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळांचा वापर करता येईल:

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

results.digilocker.gov.in

​यावर्षी बारावीची परीक्षा सुमारे १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका डाऊनलोड करता येईल, जी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी (Verification) करायची आहे किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, त्यांच्यासाठी रविवार, ३ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन विहित शुल्क भरून अर्ज करावा लागेल.

​महत्वाची टीप: पुनर्मूल्यांकनासाठी (Revaluation) अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

Konkan Railway: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर-मडगाव साप्ताहिक एक्सप्रेस आता कायमस्वरूपी धावणार

   Follow us on        

नागपूर:विदर्भ आणि कोकणला जोडणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागपूर-मडगाव-नागपूर या मार्गावर धावणारी विशेष रेल्वे (०११३९/०११४०) आता रेल्वे बोर्डाने नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे आता ११२०३/११२०४ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस या नवीन क्रमांकाने धावणार आहे.

​गाडीचे वेळापत्रक आणि दिवस:

ही रेल्वे गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे:

​१. गाडी क्र. ११२०३ (नागपूर ते मडगाव): ही गाडी दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी १५:०५ वाजता नागपूरहून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ६:४५ वाजता रोहा येथे पोहोचेल आणि सायंकाळी १७:४५ वाजता मडगावला पोहोचेल.

​२. गाडी क्र. ११२०४ (मडगाव ते नागपूर): ही गाडी मडगावहून दर गुरुवारी आणि रविवारी रात्री २०:०० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ५:१५ वाजता रोहा येथे येईल आणि रात्री २१:३० वाजता नागपूरला पोहोचेल.

प्रवाशांच्या सुविधेसाठी या गाडीला महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत:

​वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी.

​गाडीची संरचना:

ही गाडी एकूण २४ डब्यांची (ICF कोच) असेल. यामध्ये जनरल ५ डबे, स्लीपर ११ डबे, ३-टियर एसी ५ डबे, २-टियर एसी १ डबा आणि २ गार्ड/लगेज डबे असतील.

या गाडीची प्राथमिक देखभाल नागपूर येथे केली जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळ आणि पनवेल येथे गाडीत पाणी भरण्याची सोय केली जाईल. रेल्वे बोर्डाचे संचालक (कोचिंग) संजय आर. नीलम यांनी या संदर्भात आदेश जारी केले असून, ही सेवा लवकरच अधिकृत तारखेसह नियमितपणे सुरू केली जाणार आहे.

ही गाडी नियमित झाल्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेष रेल्वे म्हणून धावताना या गाडीचे तिकीट दर जास्त होते, मात्र आता नियमित एक्स्प्रेस झाल्यामुळे तिकीट दरात कपात होणार आहे. तसेच, या गाडीला आता कायमस्वरूपी वेळापत्रक मिळाल्याने ही गाडी अधिक वेळेवर धावण्यास मदत होईल, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि निश्चित वेळेत पूर्ण होईल.

 

मुळशी धरण परिसरातील दुर्गम गावांसाठी फेरी बोटसेवा सुरू; प्रवासाचे अंतर २० ते २५ किमीने कमी होणार

   Follow us on        

मुळशी: मुळशी धरण परिसरातील दुर्गम गावांच्या दळणवळणात मोठी भर घालत, मुळशी ते वाघवाडी दरम्यान प्रवासी ‘लाँच’ सेवेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ झाला. या उद्घाटन समारंभाला आमदार शंकर मांदेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सभापती मंदा शेळके, माजी आमदार शरद ढमाले, कृषी समिती सभापती अमोल नलावडे यांच्यासह अनेक स्थानिक प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

​या नवीन लाँच सेवेचा फायदा मुळशी धरणाच्या जलाशयाभोवती असलेल्या १६ गावांतील रहिवाशांना होणार आहे. ही गावे दीर्घकाळापासून खराब रस्ते आणि कनेक्टिव्हिटीच्या समस्यांशी झुंजत होती. थेट जलमार्ग उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना मुख्य रस्त्याने मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असे. आता या लाँच सेवेमुळे प्रवासाचे अंतर तब्बल २० ते २५ किलोमीटरने कमी होणार असून वेळेचीही मोठी बचत होणार आहे. वाघवाडी, शिरगाव, वडगाव, वदुस्ते, भदास खोंडा, निंबरवाडी, भोरकस आणि वांद्रे यांसारख्या गावांना या सेवेचा थेट लाभ मिळणार आहे.

​याप्रसंगी बोलताना आमदार शंकर मांदेकर यांनी सांगितले की, काही प्रशासकीय कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला होता, परंतु आता निवडणुका संपल्या असल्याने या भागातील विकासकामांना वेग येईल. तसेच मुळशी धरण परिसरातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी स्पष्ट केले की, ही सेवा नफा कमावण्यासाठी नसून केवळ देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च भागवण्यासाठी चालवली जाणार आहे.

​सध्या या सेवेसाठी प्रौढांना २० रुपये, मुलांना १० रुपये आणि मोटारसायकल वाहतुकीसाठी ५० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, अल्प उत्पन्न असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी आणि धरणग्रस्तांनी हे दर जास्त असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने भाडेरचनेत बदल करण्याबाबत फेरविचार करण्याचे आश्वासन दिले आहे. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील रहिवाशांना अत्यावश्यक सेवांपर्यंत पोहोचणे सोपे होणार असून त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठी सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस रुळांवरून घसरली

   Follow us on        

पुणे: पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करताना आज संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास २२२२५ सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. रेल्वे स्थानकातील ‘डायमंड क्रॉसिंग’वर ही दुर्घटना घडली असून, गाडीचा चौथा कोच डिरेल झाला. या कोचच्या ट्रॉलीचे (चाकांचे संयोजन) रुळावरून खाली उतरल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गाडीचा वेग कमी असल्याने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

​या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पांतर्गत संबंधित डायमंड क्रॉसिंगचे अपग्रेडेशन करण्याचे काम आधीच नियोजित होते, त्याच ठिकाणी हा अपघात झाल्याने तांत्रिक कारणांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने तातडीने पर्यायी रेकची व्यवस्था केली. या अपघातामुळे पुणे विभागातील रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, मुख्य स्थानकांवरील पायाभूत सुविधांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

View this post on Instagram

 

३५ संघटना आणि २ आजी-माजी खासदारांच्या उपस्थितीत दादरमध्ये ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ मोठ्या उत्साहात संपन्न

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि राज्यातील रेल्वेच्या विकासाला गती देण्यासाठी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ‘गतिमान महाराष्ट्र, समृद्ध कोकण’ हे महत्त्वपूर्ण ब्रीदवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत राज्यातील रेल्वे अभ्यासक, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांनी एकत्र येत प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर मंथन केले.

परिषदेतील प्रमुख घडामोडी आणि चर्चा:

चतुःसूत्रीवर आधारित थेट संवाद 

संपर्क, सुसंवाद, सतर्कता आणि समस्या निवारण या सूत्रांवर आधारित या परिषदेत प्रामुख्याने मुंबई-कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागातील रेल्वे प्रवासातील तांत्रिक अडचणी, गाड्यांची संख्या वाढवणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 एकजुटीचा निर्धार

रेल्वे प्रवाशांना येणाऱ्या दैनंदिन अडचणींचे निवारण करण्यासाठी सर्व प्रवासी संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्धार यावेळी करण्यात आला.

परिषदेत प्रशासनासमोर मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:

बंद गाड्या तातडीने पूर्ववत करणे:

कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजर, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मुंबई-विजापूर पॅसेंजर, पुणे-पनवेल पॅसेंजर यांसह इतर ३० गाड्या त्वरित पूर्ववत कराव्यात. नांदेड व हरंगुळ (लातूर) एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यंत वाढवणे, आदी.

प्रलंबित प्रकल्प पूर्ण करणे:

कोकणासाठी प्रस्तावित सावंतवाडी येथील स्वतंत्र टर्मिनस सुविधा गेली १० वर्षे रखडले, ते प्राधान्याने मार्गी लावावे.

तातडीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे तसेच संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे.

नव्या मार्गांना प्राधान्य:

सावंतवाडी-बेळगाव, छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव, मानवत रोड – परळी आणि जालना-जळगाव यांसारख्या रेल्वे मार्गांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.

प्रवासी सुरक्षा आणि सुविधा:

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ प्रवासासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात याव्यात.

तांत्रिक मागण्यांचा पाठपुरावा 

रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या तांत्रिक मागण्यांचा त्वरित पाठपुरावा करून त्या मार्गी लावाव्यात.

मान्यवरांची उपस्थिती आणि फलश्रुती

या परिषदेसाठी राज्याच्या विविध भागांतून रेल्वे प्रेमी आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादर येथील सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत रेल्वेच्या भविष्यातील वाटचालीवर अनेक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

या परिषदेमुळे रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना आता एक प्रबळ व्यासपीठ मिळाले असून, आगामी काळात रेल्वे प्रशासनाकडून या रास्त मागण्यांवर सकारात्मक निर्णयांची अपेक्षा सर्वच स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

सदर परिषदेला माजी खासदार विनायक राऊत व खासदार अरविंद सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली. दोघांनीही वरील सर्व मागण्यांना पाठिंबा दर्शवला असून रेल्वे मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे मान्य केले आहे. तसेच. श्री. अरविंद सावंत यांनी दादर रत्नागिरी, मुंबई सावंतवाडी, मुंबई पंढरपूर, नांदेड पुणे या गाड्यांसाठी मध्य रेल्वेला १० दिवसांची मुदत दिली असून ३ मे नंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याचा पुनरुच्चार केला.

सदर परिषदेला कोंकण विकास समिती, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ, मराठा ऑर्गनायझेशन, कोकण कृती समूह, जल फाउंडेशन, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबई, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी, वैभववाडी तालुका विकास मंच, रेल्वे प्रवासी संघटना बदलापूर, गडगडी धरण कृती समिती, मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती, रत्नागिरी सुवर्णदुर्ग विकास परिषद, राजापूर तालुका शेतकरी, मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती परभणी, रेल्वे प्रवासी मित्रमंडळ बदलापूर, सिंधुदुर्ग रहिवाशी हितवर्धक संघ पनवेल, आधार इंडिया, मराठी अभ्यास केंद्र, निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर, महाराष्ट्र राज्य प्रवासी प्रकोष्ठ, रेल्वे विकास समिती, गौरी गणपती उत्सव ठाणे, सिंधुदुर्ग मराठा विकास मंडळ ठाणे, नाना शंकरशेठ संघर्ष समिती, रेल्वे प्रवासी सेल बार्शी, कोल्हापूर जिल्हा प्रवासी संघ, शहीद अशोक कामटे बहुद्देशीय संस्था सांगोला, हिंद मजदूर किसान पंचायत, सिंधुदुर्ग जिल्हा सेवा समिती, कोकण रेल्वे प्रवासी संघटना वैभववाडी, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे, पश्चिम महाराष्ट्र रेल्वे, श्री समर्थ शक्ती प्रतिष्ठान या संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search