Category Archives: महाराष्ट्र

Railway Updates: सामान्य प्रवाशांना दिलासा; तब्बल २६ गाड्यांच्या डब्यांत वाढ. यादी इथे वाचा

   Follow us on        

Railway Updates: सामान्य डब्यांत होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्याच्या हेतूने मध्य रेल्वे प्रशासनाने आपल्या विभागातील तबबले २६ गाड्यांच्या सामान्य श्रेणीच्या डब्यांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासन फक्त प्रीमियम दर्जाच्या गाड्या सुरू करून फक्त उच्च वर्गातील प्रवाशांकडे लक्ष देत असल्याचा आरोप होत होता. या पार्श्‍वभूमीवर रेल्वे मंत्र्यांनी  एकूण १०,००० सामान्य डबे गाड्यांना लवकरच जोडले जातील अशी ग्वाही दिली होती. सामान्य प्रवाशांचा प्रवास सोयीच्या व्हावा या हेतूने प्रत्येक गाडीला किमान ४ डबे सामान्य श्रेणीचे असावेत अशी दक्षता घेतली जात आहे. त्याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकानुसार खालील गाडयांना कायमस्वरूपी ४ सामान्य दर्जाचे डबे जोडले जाणार आहेत.

Sr.no Train no With effect o­n – Station & Date
1 11001 CSMT- Balharshah Nandigram Express Ex CSMT o­n 05.09.2025
2 11002 Balharshah – CSMT Nandigram Express Ex Balharshah o­n 07.09.2025
3 11027 Dadar – Satara Express Ex Dadar o­n 05.09.2025
4 11028 Satara – Dadar Express Ex Satara o­n 06.09.2025
5 11041 Dadar – Sainagar Shirdi Express Ex Dadar o­n 06.09.2025
6 11042 Sainagar Shirdi – Dadar Express Ex Sainagar shirdi o­n 07.09.2025
7 22157 CSMT – Chennai Express Ex CSMT o­n 05.09.2025
8 22158 Chennai – CSMT Express Ex Chennai o­n 08.09.2025
9 11029 CSMT – Kolhapur Koyna Express Ex CSMT o­n 07.05.2025
10 11030 Kohapur – CSMT Koyna Express Ex Kolhapur o­n 05.09.2025
11 11139 CSMT – Hosapete Express Ex CSMT o­n 05.09.2025
12 11140 Hosapete- CSMT Express Ex Hosapete o­n 06.09.2025
13 11005 Dadar – Puducherry Express Ex Dadar o­n 07.05.2025
14 11006 Puducherry – Dadar Express Ex Puducherry o­n 09.09.2025
15 11021 Dadar – Tirunelveli Express Ex Dadar o­n 09.09.2025
16 11022 Tirunelveli – Dadar Express Ex Tirunelveli o­n 11.09.2025
17 11035 Dadar – Mysuru Sharavati Express Ex Dadar o­n 11.09.2025
18 11036 Mysuru – Dadar Sharavati Express Ex Mysuru o­n 14.09.2025
19 01025 Dadar – Balia Special Express Ex Dadaron 08.09.2025
20 01026 Balia – Dadar Special Express Ex Balia o­n 10.09.2025
21 01027 Dadar – Gorakhpur Special Express Ex Dadaron 06.09.2025
22 01028 Gorakhpur – Dadar Special Express Ex Gorakhpur o­n 08.09.2025
23 12135 Pune – Nagpur Express Ex Nagpur o­n 06.09.2025
24 12136 Nagpur – Pune Express Ex Pune o­n07.09.2025
25 11403 Kolhapur – Nagpur Express Ex Kolhapur o­n 05.09.2025
26 11404 Nagpur – Kolhapur Express Ex Nagpur o­n 06.09.2025

Pandharpur Special Train: आषाढी एकादशी निमित्त गोव्याहून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे धावणार

   Follow us on        

गोवा: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता गोव्यातून रेल्वेने थेट पंढरपूरला जाणे अधिक सोपे झाले आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेने कॅसल-रॉक येथून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कॅसलरॉक-मिरज एक्सप्रेस (गाडी क्रमांक १७३३४) ही रेल्वे ४ ते ९ जुलै या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात पंढरपूरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गोव्यातून निघणाऱ्या भाविकांना आता थेट पंढरपूरला रेल्वेने पोहोचणे शक्य होणार आहे. विशेषतः आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भाविकांसाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे.

रेल्वेने आजपर्यंत कोकण रेल्वे मार्गे पंढरपूरला जाणारी गाडी सोडलेली नाही!

कोकणातूनही बरेच भाविक आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीला जातात. या भाविकांमध्ये वयस्कर नागरिक मोठ्या प्रमाणात असतात. कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी घाटमार्गावरील प्रवासामुळे वेळ अधिक लागतो त्यांचा प्रवास त्रासदायक होतो. रेल्वेने गेल्यास आरामदायक प्रवास होऊ शकतो. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देवून दिनांक १ जुलै, २०२५ ते १० जुलै, २०२५ पर्यंत सावंतवाडी – पंढरपूर मार्गावर विशेष गाड्या सोडाव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली होती. मात्र यावेळीही या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

MSRTC Updates: आगाऊ आरक्षण केल्यास १५ टक्के सूट! एसटीच्या नवीन सवलतीची आजपासून अंबलबजावणी

   Follow us on        

एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी. पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभघ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

१ जुनला एस टी च्या ७७ व्या वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये १५ टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.

येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात १५ टक्के सवलत उद्यापासून (१जुलै) लागू होत आहे. तथापि जादा बसेस साठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.

मराठी भाषा वाचली! पहिलीपासून तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचा निर्णय अखेर रद्द

   Follow us on        

मुंबई: तमाम मराठी भाषा प्रेमींसाठी खुशखबर आहे. तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचा निर्णय अखेर महायुती सरकारने रद्द केला आहे. वाढता विरोध आणि संभाव्य मोर्चे तसेच निदर्शने लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत ठाकरे गट, मराठी संघटना आणि जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विशेषतः ५ जुलै रोजी ठाकरे बंधूकडून हिंदी सक्तीविरोधी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याआधीच सरकारने यावर पुनर्विचार करत निर्णय रद्द केल्याची घोषणा केली.

आज महायुतीच्या मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी सक्तीच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यानंतर सरकारी स्तरावर जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री सुमारे १५ मिनिटे याबाबत चर्चा झाली होती.

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाबाबत मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय

   Follow us on        

Shaktipeeth Expressway: पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या दरम्यान बांधण्यात येणार्‍या राज्यातील साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाईसहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी 20 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

कोणताही प्रकल्प भूसंपादनाअभावी रखडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते.

या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील 27 हजार 500  एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना  जोडणार आहे.  पुढे तो कोकण द्रूतगती महामार्गास गोवा-महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहुर, तुळजापूर आणि कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.  तसेच संतांची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबेजोगाईस्थित मुकूंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच 12 ज्योर्तिलिंगापैकी 2 औंढानागनाथ आणि परळी वैजनाथ, महाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, यासह कारंजा-लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरूंची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.  या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे 18 तासांच्या प्रवासाचे अंतर 8 तासांवर येणार आहे.

Mumbai Local: ‘एम इंडिकेटर’ आणि ‘युटीएस’ ठरत आहेत फुकट्या प्रवाशांसाठी वरदान

   Follow us on    

 

 

Mumbai Local: मुंबई उपनगरीय लोकलचे टाईमटेबल पाहण्यासाठी एम इंडिकेटर हे लोकप्रिय अँप आहे. या अँप मध्ये ग्रुप चॅटिंगचीही सोय आहे. मात्र या चॅटिंगचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. काही प्रवासी  या ग्रुप चॅटिंगमध्ये एखाद्या ठिकाणी टीसी आहे अशी माहिती देत असतात. त्यामुळे टीसी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवासी सावध होतात  आणि ते टीसीच्या हाती लागत नाहीत.
प्रत्येक स्टेशन्सवर UTS अँपवरून तिकीट काढण्यासाठी क्यु आर कोर्ड असतो. पण काही प्रवासी या क्युआर कोडचा फोटो काढून कुठूनही तिकीट काढतात. यामुळेही विनातिकीट प्रवासी टीसीला पाहून दूरुनच तिकीट काढतात आणि दंड देण्यापासून वाचतात.
मुंबई लोकलमधून लाखो लोक प्रवासी करतात. अनेक प्रवासी विना तिकीट किंवा विना पास प्रवास करतात. लोकलने प्रवास करताना लाखो प्रवासी लोकलची वेळ कळावी म्हणून एम इंडिकेटर हे अँप वापरतात. या अँपमध्ये ग्रुप चॅटिंगची सोय आहे. कुठली गाडी कुठे आहे, गाड्या वेळेवर आहेत का, गाड्या रद्द तर झाल्या नाही ना याचे अपडेट्स प्रवासी एकमेकांना देत असतात. पण अनेक प्रवासी विशिष्ट ठिकाणी टीसी आहे याची माहिती देतात. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी सतर्क होतात. त्यामुळे रेल्वेचे नुकसान होतं. या बाबत ‘एम इंडिकेटर’ अँप चालवणारे सचिन टेके म्हणाले की अँपमध्ये अश्लील आणि वादग्रस्त चॅट असेल तर ते हटवता येतात. प्रवासी एकमेकांना टीसीबाबत माहिती देत असतील त्यात काहीच करता येत नाही असे टेके म्हणाले.
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने UTS अँप बनवले आहे. या अँपमधून प्रवशांना आपल्या मोबाईलमध्येच तिकीट किंवा पास काढता येतात. हे तिकीट प्रवासी स्टेशनवरूनही काढू शकता. त्यासाठी रेल्वेने स्टेशन्सवर क्यु आर कोड लावले आहेत. अनेक प्रवाशांनी या क्यु आर कोडचे फोटो काढून ठेवले आहेत. टीसी असल्याचे कळताच हे प्रवासी कुठल्याही स्थानकावरून तिकीट काढतात. त्यामुळे त्यांना दंड भरावा लागत नाही.

आजरा ते बांदा अंतर येणार २० मिनिटांवर! आंबोलीजवळ बनणार देशातील सर्वात लांब बोगदा

   Follow us on    

 

 

Shakteepith Expressway: राज्यातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासंबधी काही महत्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत. आजरा ते बांदा हे अंतर जलद गतीने पार करण्यासाठी या महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात आंबोलीजवळ पश्चिम घाटाखाली २ बोगदे मोठे बोगदे बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही बोगद्यांची एकूण लांबी २१.९ किलोमीटर असणार आहे. केवळ महाराष्ट्रच नाही, तर हा कदाचित देशातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे.

आंबोली घाटातून आजरा ते बांदा प्रवास करण्यासाठी सुमारे १.५ तास लागतात. डीपीआरनुसार, आजरा ते बांदा या पॅकेजच्या संपूर्ण ३९ किलोमीटर लांबीचा प्रवास करण्यासाठी लागणारा प्रवास वेळ फक्त २० मिनिटे असणार आहे. तर या टप्प्यात वेगमर्यादा १२० किमी प्रतितास असणार आहे.

नागपूर आणि गोवा यांना जोडणारा हा नवीन द्रुतगती मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) विकसित करीत आहे. या एक्स्प्रेसवेमुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. ज्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. नागपूर आणि गोवा यांना जोडणाऱ्या नवीन द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ, १८ ते २० तासांवरून केवळ ८ ते १० तासांवर येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनालाही चालना मिळेल. या मोठ्या प्रकल्पाची अंदाजीत किंमत ८६,००० कोटी रुपये आहे. हा द्रुतगती मार्ग १२ जिल्ह्यांना जोडून प्रादेशिक विकासासाठी उपयुक्त ठरेल. नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग, वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेजवळ पत्रादेवी येथे संपेल. हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी आणि सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे.

Important Notice: कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना.

   Follow us on        

Konkan Railway: पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे पावसाळी वेळापत्रक १५ जून २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू केले जाणार आहे.

प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट NTES म्हणजेच enquiry.indianrail.gov.in किंवा ऑल इंडिया रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर ट्रेनच्या वेळा तपासाव्यात.

कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटते आणि तुमच्या सहकार्याबद्दल आणि समजुतीबद्दल धन्यवाद.

कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड (KRCL)

Loading

Samruddi Expressway: आता बोगद्यांमध्ये सुद्धा फुल्ल मोबाईल नेटवर्क मिळणार

   Follow us on    

 

 

कल्याण : महामार्गावरील बोगद्यांमधून प्रवास करत असताना मोबाईलवरून बोलत असताना प्रवाशांचे संभाषण मोबाईल नेटवर्क अभावी अचानक खंडित होते. प्रवाशांची ही अडचण विचारात घेऊन बोगद्यांमध्ये आणि महामार्गावर कोणत्याही भागात मोबाईल सुरू राहावेत यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावरील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात प
बोगद्यांच्या बाहेर आणि महामार्गाच्या अन्य भागात मोबाईल मनोरे आणि बोगद्यांमध्ये आवश्यक मोबाईल जाळे उभारणीचा निर्णय घेतला आहे.
शहापूर तालुक्यातील समृध्दी महामार्गाचा भाग हा १२ किलोमीटर लांबीच्या कसारा घाट डोंगर रांगांमधून गेला आहे. या घाट मार्गावरील शहापूर ते इगतपुरी डोंगर रांगांमध्ये सर्वाधिक बोगदे आहेत. खर्डी गाव परिसरातील फुगाळे ते वाशाळा गाव हद्दीतील डोंगर रांगांमधील आठ किलोमीटरचा बोगदा हा या महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी समृध्दी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे (भिवंडी) या ७६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे लोकार्पण करण्यात आले.
मुंबई ते नागपूर राज्याच्या नऊ जिल्ह्यांमधून गेलेल्या समृध्दी महामार्गाला तालुका, जिल्ह्याप्रमाणे महामार्गावरून बाहेर पडण्यासाठी बाह्यवळणे आहेत. कमी वेळात सुसाट वेगाने प्रवास करण्यासाठी नागरिक या महामार्गाला पसंती देत आहेत.प्रवासात बहुतांशी प्रवासी मोबाईलवर संभाषण सुरू करतात. हे प्रवासी ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील डोंगर रांगांमध्ये, कसारा, इगतपुरी घाट मार्गावरील बोगद्यांमधून जात असताना काही ठिकाणी, बोगद्यांमध्ये मोबाईलवरील मोबाईल जाळ्यांअभावी खंडित (डिसकनेक्ट) होत होते. समृध्दीवरील बोगद्यांमध्ये वाहन गेल्यावर मोबाईलचे जाळे (नेटवर्क) गायब होत होते. याविषयी अनेक जागरूक प्रवाशांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या.
प्रवाशांच्या सूचनांची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाने शहापूर तालुक्यातील समृध्दीच्या बोगदे असलेल्या भागात, महामार्गावर ज्याठिकाणी मोबाईल जाळ्याच्या अडचणी आहेत तेथे मोबाईल मनोरे उभारणीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहापूर, कसारा, इगतपुरी परिसरातील पाचही बोगद्यांमधून जात असताना प्रवाशांना मोबाईल खंडित होण्याचा अनुभव येऊ नये यासाठी बोगद्यांमध्ये ठराविक अंतराने राऊटर, कनेक्टर बसविण्यात येणार आहेत. लिकी केबल्सच्या माध्यमातून बिनतारी संदेशवहन यंत्रणा बोगद्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. राऊटरला रेंज येण्यासाठी एक्सटेंडर, बुस्टर सुविधा बसविण्यात येणार आहे, असे एमएमआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Vande Bharat Express: महाराष्ट्रातील अजून दोन जिल्ह्य़ांना मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची सेवा

   Follow us on    

 

 

मुंबई : राज्यभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात असून प्रत्येक जिल्ह्यात वंदे भारत धावण्यासाठी तिचे विस्तारीकरण केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे. तसेच या गाडीला परभणी रेल्वे स्थानकात थांबा दिला आहे. त्यामुळे ही वंदे भारत आणखीन दोन जिल्ह्यांना जोडली जाणार आहे.
मुंबईत ये-जा करण्यासाठी, प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी, प्रवाशांना आरामदायी सेवा पुरविण्यासाठी राज्यासह देशभरातील महत्त्वाची ठिकाणे वंदे भारतने जोडली जात आहेत. गांधीनगर, शिर्डी, सोलापूर, मडगाव या धार्मिक, व्यावसायिक, शैक्षणिक स्थळांना वंदे भारत जोडली आहे. तसेच मुंबई ते जालना या वंदे भारतमुळे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना जोडली आहे.
आता या मार्गाचा विस्तार झाल्याने परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईत येण्यासाठी पर्यायी सोय उपलब्ध झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस हुजूर साहिब नांदेड या रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्याची मागणी होती. प्रवाशांच्या मागणीवर विचार करून रेल्वे मंडळाने १२ जून रोजी विस्तारीकरणाला मंजुरी दिली आहे.
स्थानक – स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दुपारी १.१० वाजता
  • दादर – दुपारी १.१७ वाजता / दुपारी १.१९ वाजता
  • ठाणे – दुपारी १.४० वाजता / दुपारी १.४२ वाजता
  • कल्याण – दुपारी २.०४ वाजता / २.०६ वाजता –
  • नाशिक रोड – दुपारी ४.१८ वाजता / दुपारी ४.२० वाजता
  • मनमाड जंक्शन – सायंकाळी ५.१८ वाजता / सायंकाळी ५.२० वाजता –
  • अंकाई – सायंकाळी ५.५० वाजता –
  • छत्रपती संभाजीनगर – सायंकाळी ७.०५ वाजता / सायंकाळी ७.१० वाजता –
  • जालना – रात्री ८.५० वाजता / रात्री ८.०७ वाजता
  • परभणी – रात्री ९.४३ वाजता / रात्री ९.४५ वाजता
  • हुजूर साहिब नांदेड – रात्री ११.५० वाजता
स्थानक – स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ
  • हुजुर साहिब नांदेड – पहाटे ५.०० वाजता
  • परभणी – पहाटे ५.४० वाजता / पहाटे ५.४२ वाजता –
  • जालना – सकाळी ७.२० वाजता / सकाळी ७.२२ वाजता –
  • छत्रपती संभाजीनगर – सकाळी ८.१३ वाजता / पहाटे ८.१५ वाजता
  • अंकाई – सकाळी ९.४० वाजता
  • मनमाड जंक्शन – सकाळी ९.५८ वाजता / सकाळी १०.०३ वाजता –
  • नाशिक रोड – सकाळी ११ वाजता / सकाळी ११.०२ वाजता
  • कल्याण जंक्शन – दुपारी १.२० वाजता / दुपारी १.२२ वाजता
  • ठाणे – दुपारी १.४० वाजता / दुपारी १.४२ वाजता
  • दादर – दुपारी २.०८ वाजता / दुपारी २.१० वाजता –
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दुपारी २.२५ वाजता
दोन्ही दिशेकडून येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड अंकाई, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथे थांबे देण्यात आले आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search