Category Archives: महाराष्ट्र

Rain Alert : कोकणसह राज्यात पुढील चार दिवस पाऊस सक्रिय होणार

Rain Alert : राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. राज्यातील बहुतेक जिल्हय़ात पुढच्या ४/५ दिवसात पाउस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने येत्या ४८ तासात तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे त्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत कोकण गोव्यात मेघगर्जनेसह हलका-मध्यम पाऊस , तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज दिनांक ०४ सप्टेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात तर दिनांक ०५ ते ०७ सप्टेंबर पर्यंत कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

दिनांक ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात पावसाची शक्यता आहे.

Loading

उद्या होणारी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी; विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई : मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला असल्याने उद्या होणारी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचा मुख्य सचिवांकडे केली आहे. याबाबत माहिती त्यांनी समाज माध्यमातून जनतेला दिली आहे. 

काय म्हणालेत विजय वडेट्टीवार? 

राज्यात उद्या तलाठी परीक्षा आहे, ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला आहे.

उमेदवारांना परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागणार आहे. मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस सरकारने बंद केल्या आहे त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भार वाढून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षेच्या परीक्षार्थींना फटका बसू नये ,म्हणून ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याची घोषणा सरकारने करावी.

Loading

सनातन धर्माची मच्छरांशी तुलना करणार्‍या उदयनिधीं विरोधात मुख्यमंत्र्यांची कडक शब्दात प्रतिक्रिया

मुंबई :तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्मा विषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विविध स्तरावरून याचा निषेध केला जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदयनिधीचा कठोर शब्दात समाचार घेतला आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री? 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली आहे.

हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे ‘इंडी’आघाडीचा खरा, हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे. कॉंग्रेसने तर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेसचा राम मंदिराला विरोध होता. हिंदू दहशत वाद हा शब्दप्रयोग त्यांनीच शोधून काढला. चिदंबरम पुत्राने मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीला धरूनच आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारत उभारणीचं काम सुरू आहे. परदेशात भारताचा जयजयकार होतोय. पण देशाचा विकास, प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपतंय. त्यामुळे अशा पद्धतीने विष कालवण्याचं काम ते करत आहेत.

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेचे ‘उद्योग’ बघून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. खरं तर उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करायला हवा. त्यांना तसं करायचं नसेल तर आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याही गळ्यात गळे घालून पुन्हा फोटो काढायलाही हरकत नाही. कारण त्यांनीसुध्दा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटून हिंदू विरोधकांच्या गळ्यात गळा घातलेला आहे.

आज इंडिया आघाडीचा बुरखा फाटला असून हिंदूविरोधी विचार रुजविण्याचे आणि धर्म संपवण्याचे त्यांचे मनसुबे उघड झाले आहेत. मात्र अशा शेकडो आघाड्या एकत्र आल्या तरी ना तर धर्म संपवू शकणार ना हिंदू संस्कृती. ती भारतीयांच्या रक्तात आहे, डीएनएमध्ये आहे, हे समजण्याची कुवत असायला हवी.

नेमके काय बोलले उदयनिधी? 

तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांना द्रमुक (DMK) पक्षाचे भवितव्य समजले जाते. उदयनिधी यांनी पत्रकार परिषदेत सनातन धर्मावर केलेल्या एका विधानामुळे ते सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सनातन धर्म आणि हिंदुत्वाची शिकवण हे डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगासमान आहेत, असे विधान उदयनिधी यांनी चेन्नई येथे शनिवारी (दि. २ सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. भाजपाकडून आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून या विधानावर जोरदार टीकास्र सोडण्यात आले. त्यानंतर उदयनिधी यांनी काहीशी सावध भूमिका घेत भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे आरोप फेटाळून लावले. “सनातन धर्मामुळे जाती आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जाते, त्यामुळे अशा धर्माचे उच्चाटन करायला हवे” या आपल्या वक्तव्यावर ते ठाम असल्याचे म्हणाले. मात्र अमित मालवीय यांनी नरसंहाराचा दिलेला संदर्भ चुकीचा असून आपण नरसंहाराबाबत काही बोललो नाही, असे ते म्हणाले.

“मी माझ्या वक्तव्याचा महत्त्वाचा भाग पुन्हा उद्धृत करतो. ज्याप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव होतो किंवा डासांमुळे डेंग्यू आणि मलेरिया सारखे रोग पसरतात, त्याप्रमाणे सनातन धर्मदेखील अनेक सामाजिक समस्या निर्माण करण्यास जबाबदार आहे”, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी ट्विटरवर दिले आहे.

Loading

मराठा आंदोलन – ताज्या घडामोडी | जालना लाठीमारप्रकरणी अधीक्षकांवर कारवाई

०३/०९/२०२३ | १८:०० जालना लाठीमारप्रकरणी पोलीस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपपोलीस अधीक्षक यांना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले आहे. उच्चस्तरीय चौकशीनंतर निलंबनाची कारवाई केली जाईल. या प्रकरणी प्रसंगी न्यायिक चौकशीही करू, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री 

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. अपर पोलीस अधिक्षक व उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना दिल्या आहेत 

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत  करण्यात येईल, चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही. आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल.

मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण मिळावे यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असून त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय होईल. 


 

Loading

सिंधुदुर्ग : गावठी बॉम्ब घेत आहेत पाळीव प्राण्यांचे बळी; मळेवाड येथे गावठी बॉम्बमुळे वासराचा मृत्यू

सिंधुदुर्ग: वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी पेरून ठेवलेले गावठी बॉम्ब पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोकादायक ठरत आहेत. असाच एक गावठी बॉम्ब खाल्ल्यामुळे सावंतवाडी माळेवाड येथील प्रवीण दत्ताराम नाईक यांच्या म्हशीच्या वासराचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संबंधित शेतकऱ्यांसह स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
मळेवाड परिसरात शिकारीसाठी गावठी बॉम्ब ठेवण्यात येत आहे. त्यामुळे गुरांना तसेच पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला. प्रवीण नाईक यांनी गुरे चरावयास सोडली होती. याच भागात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब ठेवले होते. ते बॉम्ब खाल्ल्याने वासराचा मृत्यू झाला. याबाबत वनखात्याने सखोल चौकशी करावी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Loading

“गणेशोत्सवात रेल्वेने ५० रूपयांत चिपळूण” ही चुकीची बातमी; कोंकण रेल्वेचा बातमीवर आक्षेप

Konkan Railway News : आज दिनांक ०२ सप्टेंबर रोजी लोकमतने “गणेशोत्सवात रेल्वेने ५० रूपयांत चिपळूण : – पनवेलहून ३० सप्टेंबरपर्यंत थेट सेवा ” अशा आशयाची बातमी प्रसारित केली होती. या बातमीला कोंकण रेल्वे प्रशासनाने आक्षेप घेतला असून अशा ट्रेन चालवण्याबाबत रेल्वेकडून कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच “प्रकाशित बातम्या खोट्या आणि चुकीच्या आहेत” असे सांगून उद्याच्या लोकमत मुंबई वृत्तपत्रात, आजच्या “लोकमत ऑनलाइन” मध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे. 

अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्यांमुळे अफवा पसरतील आणि सर्वसामान्यांमध्ये चुकीच्या बातम्या पसरतील वातावरण निर्माण होईल. तसेच तुमच्या रिपोर्टरला कळवावे की कोकण रेल्वेशी संबंधित बातम्या कोकण रेल्वेच्या प्रवक्त्याशी खात्री केल्याशिवाय प्रकाशित करू नये अशी विनंती पण करण्यात आली आहे.

 

कोकण रेल्वे तर्फे लोकमतला पाठविण्यात आलेले पत्र 👇🏻

The Editor
Lokmat
Mumbai

Subject: Rejoinder with regard to article on 02/09/2023 regarding “ गणेशोत्सवात रेल्वेने ५० रूपयांत चिपळूण : – पनवेलहून ३० सप्टेंबरपर्यंत थेट सेवा ”.

Ref : News article published in Lokmat dated 02/09/2023.

Find attached herewith news clipping about Konkan Railway published in the Lokmat Mumbai edition dated 02/09/2023 regarding running of DEMU train between Panvel & Chiplun from 04/09/2023. It is clarified that there is no such notification issued by the Railways regarding running of such train. Such kind of incorrect news will spread rumors and create a panic among general public.

You are requested to issue immediate rejoinder stating that “the published news is false & incorrect” in tomorrow’s Lokmat Mumbai newspaper, also in today’s “Lokmat Online” and on social media platforms to avoid unnecessary panic. Also your reporter should be informed that news related to Konkan Railway should not be published without confirming with Konkan Railway’s spokespersons.

Thanking you,

With Regards,

Chief Public Relations Officer
Konkan Railway Corporation Ltd.

 

Loading

जालना लाठीमार : “इथे सरकारचं चुकलं” राज ठाकरेंची सरकारवर टीका

मुंबई :जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी लाठीमार आणि हवेत गोळीबार ही केला. या घटनेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मत मांडले असून यात त्यांनी सरकारची चुकी दाखवली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो. 

ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. 

अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित. 

राहता राहिला प्रश्न ह्या संवेदनशील विषयाचा, तर ह्याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? (इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं). 

मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं ह्या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत. 

काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे. 

माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि ह्यापुढे पण राहील. 

Loading

“…तरीही गॅस सिलेंडर १७९.५० रुपयाने महागच; याला म्हणतात जुमला!”; दरकपातीनंतर विरोधकांनी मांडला पूर्ण हिशोब

मुंबई :विद्यमान सरकारने आजच घरगुती गॅस सिलिंडर दरात २०० रुपयाने मोठी कपात करण्याचा सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. या निर्णयाविषयी जाणते कडून तसेच विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. ३१ मार्च २०१४ ला सिलिंडर ४१० रुपये होती. निवडणुकीच्या तोंडावर जनतेला खुश करण्यासाठी या निर्णय घेण्यात आला आहे.  खरेतर ही दरकपात यापूर्वीच करायला हवी होती. रशिया युक्रेन युद्धामुळे रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल दिले. त्याचा फायदा ग्राहकाला मिळाला नाही. फेब्रुवारी २०२१ पासून सिलिंडर दारात १३ वेळा वाढ करण्यात आली. एकूण वाढ ३७९.५० झाली; त्यामुळे दरकपात होऊनही सिलिंडर १७९.५० रुपयाने महागच आहे. 

Loading

Library in Train: प्रवाशांनी चक्क एक्सप्रेस मध्येच सुरू केले वाचनालय…

Library in Train: आधुनिकीकरणामुळे आताच्या जगात पुस्तकांची जागा स्मार्टफोन ने घेतली आहे. आताच्या पिढीत पुस्तक वाचनाची आवड कमी होत असताना पंचवटी एक्सप्रेसमध्ये सध्या वाचनालय सुरू करण्याची अनोखी संकल्पना रेल्वेच्या प्रवाशांनी राबवली आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोकसहभागातून एमएसटी कोचमध्ये नवीन कपाट आणून त्या ठिकाणी पुस्तके जमा करायला सुरवात केली आहे.

या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.नाशिकहून सकाळी सव्वासातला पंचवटी एक्स्प्रेस निघते. अकराला ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोचते. त्यानंतर सव्वासहाला पुन्हा सीएसटीहून निघते, तर रात्री साडेनऊला प्रवाशांना नाशिकमध्ये सोडते. या प्रवासात काही नियमित प्रवासी असून प्रवासादरम्यान मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याच्या हेतूने हे वाचनालय सुरू करण्याची अनोखी संकल्पना अमलात आणली आहे.

या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असून, हिंदी, मराठी, इंग्रजी पुस्तकांचा खजिना या एमएसटी कोचमध्ये असणार आहे.वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि प्रवाशांना नवनवीन पुस्तकांची ओळख व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. प्रवासी ही पुस्तके घरी घेऊन जाऊ शकतात. प्रत्येक प्रवाशाने काही महत्त्वाची पुस्तके दान करण्याचे ठरवले असून, या वाचनालयात दिवसेंदिवस पुस्तकांची वाढ होत आहे.

Loading

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड

मुंबई :ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज दुःखद निधन झाले आहे त्या ८१ वर्षांच्या होत्या. सीमा देव यांच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

 

यंदा कर्तव्य आहे,माझी आई, सुवासिनी, मोलकरीण, पाहू रे किती वाट अशा चित्रपटात त्या महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. सालस, सोशिक अशा बहुढंगी भूमिकेतून सीमा देव यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. जगाच्या पाठीवर चित्रपटात त्या आंधळ्या मुलीच्या भूमिकेत दिसल्या. आनंद सारख्या हिंदी चित्रपटातही त्या आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसल्या. सीमा देव गेल्या काही वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रासलेल्या होत्या. रमेश देव हयातीत असतानाही त्या त्यांना ओळखत नव्हत्या. रमेश देव यांचे निधन झाले हेही त्यांना ठाऊक नव्हते. आपल्या मुलांना सुनानाही त्या ओळखत नसत. त्यामुळे अशा दिवसांत मुलगा अजिंक्य देव आपल्या आईची योग्य ती काळजी घेत असे.

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search