Category Archives: महाराष्ट्र

दिलासादायक बातमी! मंगळवारपर्यंत मान्सूनची राज्यात हजेरी

   Follow us on        
Mansoon Arrivals 2024: प्रचंड उन्हाच्या कडाक्यामुळे राज्यातील नागरिकांचे हाल होत असून, बहुतांश शहरांतील कमाल तापमान चाळीशीपार नोंदवले जात आहे. मात्र हवामान खात्याने एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. आता लवकरच मॉन्सून येणार असून, तळकोकणात म्हणजे तो ४ जूनपर्यंत येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.





यंदा देशामध्ये १०६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज देण्यात आला आहे. तसेच मॉन्सून लवकर दाखल होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यात प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा येत आहेत. त्यामुळे मॉन्सून दाखल झाल्यानंतर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. येत्या ४ जून रोजी मॉन्सून तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज देण्यात आलेला आहे.’रेमल’ या चक्रीवादळाच्यामुळे बंगालच्या उपसागरावरील मॉन्सून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे मॉन्सूनाला कुठेही अडथळा येणार नाही. मॉन्सूनची केरळच्या पुढील वाटचाल चांगल्यारितीने होणार आहे. मॉन्सूनने यावर्षी अकरा दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारलेली आहे. मॉन्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा रविवारपासून (दि.२) अधिक बळकट होतील. परिणामी मॉन्सूनची वेग चांगला राहील, असा अंदाज देण्यात आला आहे. जून महिना सुरू झाल्याने या महिन्यात जो पाऊस पडेल, तो मॉन्सूनचा समजला जाईल. त्याची नोंद होणार आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबर दरम्यान जो पाऊस पडेल, त्यात आजपासून होणाऱ्या पावसाचा समावेश होईल. राज्यात काही भागात मॉन्सून पाेचलेला नसला तरी देखील तो पाऊस मॉन्सूनचा समजला जाईल. सध्या पं. बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मॉन्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यामध्ये ३ जून रोजी, तळकोकणात ४ जून रोजी तर मुंबई पुण्यात ६ जून रोजी दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

एसटीचे वेळापत्रक आता मोबाईलवर पाहता येणे शक्य; नवीन अँप्लिकेशन तयार

   Follow us on        

काही वेळा  एखाद्या अनोळखी गावी जायचा योग, स्वतःचे वाहन नसल्यास गाव खेड्याच्या भागात एसटी हे परवडणारे वाहतुकीचे साधन उपलब्ध असते. मात्र कित्येकदा आपल्याला त्या गावात जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक माहिती नसते, त्यामुळे मोठी गैरसोय होते. मात्र आता ही गैरसोय दूर होणार आहे. रेल्वेप्रमाणे एसटीचेही वेळापत्रक मोबाइल अँप्लिकेशनद्वारे चेक करता येणार आहे.

पियुष चौधरी यांनी एक मोबाइल अँप्लिकेशन बनवले आहे. या अँप्लिकेशनद्वारे वापरकर्त्यांना एसटी बसेसचे वेळापत्रक पाहता येणार आहे. हे अँप्लिकेशन गूगल प्ले स्टोर वर उप्लब्ध करण्यात आले आहे. मात्र अजूनही त्यात काही सुधारणा करण्यात येणार आहेत. आतापर्यंत १७२ बस स्थानकांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात भविष्यात वाढ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वेळापत्रकात बसेसच्या थांब्याचीही माहिती सामील करण्यात येणार आहे.



या अँप्लिकेशन मध्ये बस आगारांचे, मध्यवर्ती कार्यालय, वर्कशॉप, विभागीय कार्यालय आणि मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेचे संपर्क क्रमांक मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

खालील लिंकवर क्लिक वर करून हे अँप्लिकेशन डाउनलोड करता येईल.

ST Bus Time Table Maharashtra – Apps on Google Play



10th Result 2024: मराठी भाषा ‘नापास’ होत आहे

   Follow us on        
10th Result 2024: दोन दिवसांपूर्वीच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. मागच्या या वर्षी या परीक्षेचा एकूण निकाल 95.81% इतका लागला आहे. मागच्यावर्षी पेक्षा साधारण 1.98 % ने यामध्ये वाढ झाली असली तरीही या निकालात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे मराठीमध्ये नापास झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या मातृभाषेच्या विषयातच  हजारो विद्यार्थ्यांनी  गटांगळ्या खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर अधिक भर देण्याचं धोरण राबवलं जात असताना अशी स्थिती आहे.
प्रथम भाषा इंग्रजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याच इंग्रजीमध्ये नापास होण्याचं प्रमाण हे मराठी प्रथम भाषा निवडून नापास होणाऱ्यांपेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांनी मराठी या विषयाची परीक्षा दिली. त्यापैकी 10 लाख 55 हजार 715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच राज्यामध्ये 38 हजार 437 विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत.
वाचकांच्या प्रतिक्रिया 
“एक काळ होता जेव्हा परकीयांची इंग्रजी भाषा दहावी बारावी परीक्षा पास होण्याकरता सर्वात मोठा अडथळा ठरत होती. आता मात्र चित्र उलट दिसत आहे. मराठी भाषा परकी होत चाललेली दिसत आहे.”
श्री. दिगंबर गणपत राणे, माहीम 
“राज्य शिक्षण मंडळाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना मराठी विषय अवघड का जात आहे याबाबत सविस्तर विश्लेषण केले पाहिजे आणि त्यानुसार शिक्षणपद्धतीत बदल केला गेला पाहिजे.”
सौ. आश्विनी रा. गवस, विरार

IMD Alert | राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा.

   Follow us on        
IMD Alert: भारतीय हवामान खात्याने IMD  राज्यात पुढील चार/ पाच दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. खास करून दिनांक १२ आणि १३ मे या दोन दिवशी राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  तर दिनांक १४ आणि १५ मे या दोन दिवशी राज्यातील काही जिल्हे वगळता इतर भागाला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
दिनांक १२ मे रोजी नाशिक,अहमदनगर,पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर या भागात सावधानतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर पालघर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात सावधानतेचा येलो र्ट देण्यात आला आहे.
दिनांक १३ मे रोजी अहमदनगर,पुणे, औरंगाबाद, जालना,यवतमाळ, सांगली, चंद्रपूर, गडचिरोली  या भागात सावधानतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर पालघर व हिंगोली हे दोन जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात सावधानतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
दिनांक १४ आणि १५ मे या दोन दिवशी राज्यात सावधानतेचा ऑरेंज अलर्ट नसला तरी बहुतेक जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

ताडोबाच्या वाघांचे सह्याद्रीच्या अभयारण्यात स्थलांतर करण्यात येणार

   Follow us on        
रत्नागिरी : सहयाद्री टायगर रिझर्व (STR)मधील वाघांच्या लोकसंख्येचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्यातील वन विभागाने एक निर्णय घेतला आहे. वन विभाग लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे येथे  स्थलांतर करणार आहे. एसटीआरमधील सह्याद्री कोकण वन्यजीव कॉरिडॉर आणि गोवा, कर्नाटकमधील जंगले पुरेशी सुरक्षित आणि मानवी उपद्रवांपासून मुक्त असल्यामुळे प्रकल्पाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे तज्ज्ञांना वाटते.
उत्तर पश्चिम घाटात असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा(STR)ची स्थापना जानेवारी २०१० मध्ये झाली आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यांपर्यंत त्यांची हद्द पसरली. त्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो. शिकारी आणि बदलत्या अधिवासामुळे या प्रदेशात वाघांची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या कमी झाली आहे. एसटीआर राखीव अभयारण्य केल्यानंतरही वाघांची संख्या वाढली नाही, कारण प्रजनन करणाऱ्या वाघांनी राखीव भागात वसाहत केली नाही. एसटीआरच्या हद्दीत वाघांच्या उपस्थितीचे फोटो कमी आहेत आणि पद मार्गांच्या पुराव्याने सात ते आठ वाघांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाली आहे.
वाघांची लोकसंख्या वाढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एसटीआरच्या दक्षिणेकडे असलेल्या जंगलांमधून गोवा आणि कर्नाटकातील वाघांना इथे आणणे आहे. त्यामुळे वन्यजीव कॉरिडॉर मजबूत होऊ शकतो. परंतु वाघांच्या संख्येत वाढ होण्यास अनेक वर्षे लागू शकतात. परिणामी, अल्पकालीन परिणामांसाठी वाघांचे स्थलांतर निवडण्यात आले आहे.

Loksabha Election 2024: मतदानाच्या टक्केवारीत सावंतवाडी सरस | राज्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान.. जाणून घ्या मतदानाची पूर्ण आकडेवारी

   Follow us on        

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान आज पार पाडले. महाराष्ट्र राज्यात 54.98% एवढे मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (63.71%) झाले आहे तर सर्वात कमी मतदान माढा मतदारसंघात (47.84%) एवढे झाले आहे.

  • लातूर 55.38 %
  • सांगली 52.56 %
  • बारामती 47.84%
  • हातकणंगले 62.18%
  • कोल्हापूर 63.71%
  • माढा 50%
  • उस्मानाबाद 58.24%
  • रायगड 50.31%
  • रत्नागिरी  – सिंधुदुर्ग 53.75 %
  • सातारा 56.38 %
  • सोलापूर 49.17%

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 53.75% मतदान झाले आहे. या मतदारसंघात सावंतवाडीत सर्वाधिक 60.30% एवढे मतदान झाले असून राजापुरात सर्वात कमी 47.31% एवढे मतदान झाले आहे.

  • कुडाळ 59.09%
  • कणकवली 55.14%
  • सावंतवाडी 60.30%
  • राजापूर 47.31%
  • चिपळूण 52.62%
  • रत्नागिरी  49.83%

रायगड लोकसभा मतदारसंघात 50.31% मतदान झाले आहे. या मतदारसंघात दापोली येथे सर्वाधिक 59.12% एवढे मतदान झाले असून महाड मध्ये  सर्वात कमी 45.60%  एवढे मतदान झाले आहे.

  • अलिबाग 52.33%
  • दापोली 59.12%
  • गुहागर 53.77%
  • महाड 45.60%
  • पेण 51%
  • श्रीवर्धन 49.48 %

देशात आज निवडणूकीच्या तिसर्‍या टप्प्यात एकूण 61.60% एवढे मतदान झाले असून आसाम राज्यात सर्वाधिक सुमारे 75.30% एवढे मतदान झाले आहे तर महाराष्ट्र राज्य टक्केवारीत (54.98%) सर्वात मागे आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. मतदानाच्या टक्क्यावर वाढलेल्या तापमानाचा परिणाम झाला असून मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.

टीप : वरील आकडेवारी शासनाच्या अधिकृत माध्यमांतून उपलब्ध झाली असली तरी ती अंदाजित स्वरूपाची आहे. ही माहिती टप्प्याटप्प्याने येत असल्याने त्यात काहीशी वाढ अपेक्षित आहे. यात टपालाने केलेल्या मतांचा समावेश नाही आहे. 

Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

 

 

 

 

 

 

Election 2024 Voting Live Updates: राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५% टक्के मतदान; टक्केवारीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या मागे

   Follow us on        
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत  ३१.५५% मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (३८.४२%)  झाले आहे तर सर्वात कमी मतदान माढा मतदारसंघात (२६.६१%)झाले आहे.
लातूर – ३२.७१ %
सांगली २९.६५ %
बारामती २७.५५%
हातकणंगले ३६.१७%
कोल्हापूर ३८.४२%
माढा २६.६१%
उस्मानाबाद ३०.५४%
रायगड ३१.३४%
रत्नागिरी  – सिंधुदुर्ग ३३.९१ %
सातारा ३२.७८ %
सोलापूर २९.३२%
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.९१% मतदान झाले आहे. या मतदारसंघात चिपळूण येथे सर्वाधिक ३७.९० % एवढे मतदान झाले असून रत्नागिरीत सर्वात कमी २८% एवढे मतदान झाले आहे.
कुडाळ ३२.८८%
कणकवली ३१.५९%
सावंतवाडी ३६.६५%
राजापूर ३७.०५%
चिपळूण ३७.९०%
रत्नागिरी  २८%
रायगड मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.३४% मतदान झाले आहे. या मतदारसंघात गुहागर येथे सर्वाधिक ३९.००% एवढे मतदान झाले असून पेण मध्ये  सर्वात कमी २२.२०%  एवढे मतदान झाले आहे.
अलिबाग ३२.९०%
दापोली ३६.४५%
गुहागर ३९.००%
महाड ३२.००%
पेण २२.२०%
श्रीवर्धन २६.९४ %
देशात १ वाजेपर्यंत एकूण ३९.९२% एवढे मतदान झाले असून गोवा आणि पश्चिम बंगाल येथे सर्वाधिक सुमारे ४९% मतदान झाले आहे तर महाराष्ट्र राज्य टक्केवारीत सर्वात मागे आहे.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

राज्यात ११ वाजेपर्यंत १८.१८% टक्के मतदान; कोल्हापूर मतदारसंघात सर्वात जास्त मतदानाची नोंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती

   Follow us on        
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी  महाराष्ट्रात ११ वाजेपर्यंत  १८.१८% टक्के मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (२३.७७%)  झाले आहे तर सर्वात कमी मतदान बारामती मतदारसंघात ( १४.६४%)झाले आहे.
लातूर – २०.७४%
सांगली १६.६१%
बारामती १४.६४%
हातकणंगले २०.७४%
कोल्हापूर २३.७७%
माढा १५.११%
उस्मानाबाद १७.०६%
रायगड १७.१८%
रत्नागिरी  – सिंधुदुर्ग २१.१९%
सातारा १८.९४ %
सोलापूर १५.६९%
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात 11 वाजेपर्यंत  २१.१९%  मतदान झाले आहे. या मतदारसंघात चिपळूण येथे सर्वाधिक २४.१८% एवढे मतदान झाले असून रत्नागिरीत सर्वात कमी १५% एवढे मतदान झाले आहे.
कुडाळ २१.४०%
कणकवली २२.०९%
सावंतवाडी २१.७४%
राजापूर २३.६३%
चिपळूण २४.१८%
रत्नागिरी  १५.०० %
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

IMD Alert | मतदानाच्या दिवशी हे मतदारसंघ ‘तापणार’, कोणती काळजी घ्याल?

   Follow us on        

मुंबई :उद्या दिनांक ७ मे रोजी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील भागातील निवडणूक होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय हवामान खात्याने IMD महाराष्ट्रात ज्या भागात मतदान होणार आहे त्या भागातील हवामान अंदाज जाहीर केले आहेत.

IMD ने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर, वाडा, सांगली, सातारा आणि हातकंगाले या जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअस ही पातळी ओलांडणार आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकण भागात तापमान ३४ ते ३६ डिग्री सेल्सिअस च्या घरात राहणार आहे. कोल्हापूर जिल्हय़ात अधिकतम तापमान ३९ डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

कोणती काळजी घ्याल? 

शक्यतो सकाळी मतदानासाठी बाहेर पडावे. मतदान केंद्रावर गर्दी असल्यास उन्हातही मोठी रांग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडताना हातात छत्री घेऊनच बाहेर पडावे. सोबत पाण्याची मोठी बाटली घेऊन निघा. वेळोवेळी पाणी पीत रहा. तहान लागली नाही तरीही पाणी पित रहा. शक्य असेल तर ORS, लिंबू सरबत अशी घरगुती पेय सोबत घेतल्यास फायद्याचं ठरेल. हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं टोपी, रुमाल यांनी झाकावं. तुम्हाला चक्कर येत असेल, आजारी वाटत असेल तर हयगय न करता मतदानकेंद्रातील कर्मचाऱ्याकडून मदत मिळवा.

 

HSC & SSC Results | दहावी आणि बारावीच्या निकालांच्या तारखांबाबत मोठी अपडेट

   Follow us on        

HSC and SSC result 2024 : दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 6 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात देण्यात आली आहे.

उत्तर पत्रिका तपासण्याचे काम जोरात चालू असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच निकालाची नेमकी तारीख जाहीर करणार असून बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 06 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन बघू शकतात.

दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. बारावीच्या परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल्या. दुसरीकडे दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. मंडळाकडून या परीक्षेची जोरदार तयारी करण्यात आली. काॅपीमुक्त परीक्षा करण्यासाठी मंडळाने अगोदरच कंबर कसल्याचे देखील यंदा बघायला मिळाले.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search