Category Archives: महाराष्ट्र
Konkan Railway News : आज दिनांक ०२ सप्टेंबर रोजी लोकमतने “गणेशोत्सवात रेल्वेने ५० रूपयांत चिपळूण : – पनवेलहून ३० सप्टेंबरपर्यंत थेट सेवा ” अशा आशयाची बातमी प्रसारित केली होती. या बातमीला कोंकण रेल्वे प्रशासनाने आक्षेप घेतला असून अशा ट्रेन चालवण्याबाबत रेल्वेकडून कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच “प्रकाशित बातम्या खोट्या आणि चुकीच्या आहेत” असे सांगून उद्याच्या लोकमत मुंबई वृत्तपत्रात, आजच्या “लोकमत ऑनलाइन” मध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.
अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्यांमुळे अफवा पसरतील आणि सर्वसामान्यांमध्ये चुकीच्या बातम्या पसरतील वातावरण निर्माण होईल. तसेच तुमच्या रिपोर्टरला कळवावे की कोकण रेल्वेशी संबंधित बातम्या कोकण रेल्वेच्या प्रवक्त्याशी खात्री केल्याशिवाय प्रकाशित करू नये अशी विनंती पण करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे तर्फे लोकमतला पाठविण्यात आलेले पत्र 👇🏻
The Editor
Lokmat
Mumbai
Subject: Rejoinder with regard to article on 02/09/2023 regarding “ गणेशोत्सवात रेल्वेने ५० रूपयांत चिपळूण : – पनवेलहून ३० सप्टेंबरपर्यंत थेट सेवा ”.
Ref : News article published in Lokmat dated 02/09/2023.
Find attached herewith news clipping about Konkan Railway published in the Lokmat Mumbai edition dated 02/09/2023 regarding running of DEMU train between Panvel & Chiplun from 04/09/2023. It is clarified that there is no such notification issued by the Railways regarding running of such train. Such kind of incorrect news will spread rumors and create a panic among general public.
You are requested to issue immediate rejoinder stating that “the published news is false & incorrect” in tomorrow’s Lokmat Mumbai newspaper, also in today’s “Lokmat Online” and on social media platforms to avoid unnecessary panic. Also your reporter should be informed that news related to Konkan Railway should not be published without confirming with Konkan Railway’s spokespersons.
Thanking you,
With Regards,
Chief Public Relations Officer
Konkan Railway Corporation Ltd.

मुंबई :जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी लाठीमार आणि हवेत गोळीबार ही केला. या घटनेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मत मांडले असून यात त्यांनी सरकारची चुकी दाखवली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो.
ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती.
अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित.
राहता राहिला प्रश्न ह्या संवेदनशील विषयाचा, तर ह्याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? (इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं).
मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं ह्या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत.
काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे.
माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि ह्यापुढे पण राहील.

याला म्हणतात जुमला!
गॅस सिलेंडर स्वस्त. आनंद झाला असेल. थांबा ✋सरकारनं फेब्रुवारी २०२१ पासून सिलेंडरची १३ वेळा किंमत वाढवून ३७९.५० रुपयांनी महाग केला. दर कमी झाला २०० रुपयांनी. तरीही १७९.५० रुपयांनी महागच! याला म्हणतात जुमला! #Cylinder pic.twitter.com/e96ZcE8icw
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 29, 2023
Library in Train: आधुनिकीकरणामुळे आताच्या जगात पुस्तकांची जागा स्मार्टफोन ने घेतली आहे. आताच्या पिढीत पुस्तक वाचनाची आवड कमी होत असताना पंचवटी एक्सप्रेसमध्ये सध्या वाचनालय सुरू करण्याची अनोखी संकल्पना रेल्वेच्या प्रवाशांनी राबवली आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोकसहभागातून एमएसटी कोचमध्ये नवीन कपाट आणून त्या ठिकाणी पुस्तके जमा करायला सुरवात केली आहे.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.नाशिकहून सकाळी सव्वासातला पंचवटी एक्स्प्रेस निघते. अकराला ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोचते. त्यानंतर सव्वासहाला पुन्हा सीएसटीहून निघते, तर रात्री साडेनऊला प्रवाशांना नाशिकमध्ये सोडते. या प्रवासात काही नियमित प्रवासी असून प्रवासादरम्यान मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याच्या हेतूने हे वाचनालय सुरू करण्याची अनोखी संकल्पना अमलात आणली आहे.
या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असून, हिंदी, मराठी, इंग्रजी पुस्तकांचा खजिना या एमएसटी कोचमध्ये असणार आहे.वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि प्रवाशांना नवनवीन पुस्तकांची ओळख व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. प्रवासी ही पुस्तके घरी घेऊन जाऊ शकतात. प्रत्येक प्रवाशाने काही महत्त्वाची पुस्तके दान करण्याचे ठरवले असून, या वाचनालयात दिवसेंदिवस पुस्तकांची वाढ होत आहे.
मुंबई :ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज दुःखद निधन झाले आहे त्या ८१ वर्षांच्या होत्या. सीमा देव यांच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
यंदा कर्तव्य आहे,माझी आई, सुवासिनी, मोलकरीण, पाहू रे किती वाट अशा चित्रपटात त्या महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. सालस, सोशिक अशा बहुढंगी भूमिकेतून सीमा देव यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. जगाच्या पाठीवर चित्रपटात त्या आंधळ्या मुलीच्या भूमिकेत दिसल्या. आनंद सारख्या हिंदी चित्रपटातही त्या आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसल्या. सीमा देव गेल्या काही वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रासलेल्या होत्या. रमेश देव हयातीत असतानाही त्या त्यांना ओळखत नव्हत्या. रमेश देव यांचे निधन झाले हेही त्यांना ठाऊक नव्हते. आपल्या मुलांना सुनानाही त्या ओळखत नसत. त्यामुळे अशा दिवसांत मुलगा अजिंक्य देव आपल्या आईची योग्य ती काळजी घेत असे.
सिंधुदुर्ग : भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर ) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौदलाच्यावतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री तसेच विविध मान्यवर या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने आवश्यक बाबींचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र नौसेना क्षेत्राचे ध्वज अधिकारी रियर ॲडमिरल ए.एन.प्रमोद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर- पाटणकर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात
या वर्षीचा नौसेना दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. त्याचवेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझ पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.
कोल्हापुर :सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. उद्या बुधवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तर किशोर तावडे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणुन नेमणूक करण्यात आली आहे.
के. मंजूलक्ष्मी हे सध्या सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून ते सिंधुदुर्ग मध्ये सर्वाधिक प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. ते सिंधुदुर्ग येथे दोन वर्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तीन वर्ष जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.के.मंजुलक्ष्मी ह्या ९ फेब्रुवारी २०१८ ला सिंधुदुर्ग मध्ये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झाल्या त्यानंतर दोन वर्षानी २० मे २०२० रोजी त्यांची जिल्हाधिकारी पदी शासनाने नियुक्ती केली होती. कोरोना काळात त्यांनी जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट काम केले होते.तर सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ भारतमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आला होता यामुळे त्यांचा दिल्लीत सत्कार ही झाला होता .











