Category Archives: सिंधुदुर्ग

Remote control lifebuoy: पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणाऱ्या यंत्राचे नवबाग येथे प्रात्यक्षिक

   Follow us on        
सिंधुदुर्ग: समुद्र किनारपट्टीवर पाण्याचा अंदाज न आल्याने नागरिक बुडण्याच्या घटना घडत असतात. अशा बुडणाऱ्या व्यक्तींना मनुष्याचा सहभाग न घेता रिमोट द्वारे वाचविण्याचे यंत्र पुणे येथील एका कंपनी द्वारे बनवण्यात आले आहे. समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणारे “रिमोट कार्स्ट फॉर लाइफ सेव्हिंग युनिट” (दूरनियंत्रित जीवन रक्षक यंत्र) रिमोट द्वारे नियंत्रित करून बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवते.  पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार वेंगुर्ले नवाबाग समुद्र किनारी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणारे “रिमोट कार्स्ट फॉर लाइफ सेव्हिंग युनिट” (दूरनियंत्रित जीवन रक्षक यंत्र) या यंत्राचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.
स्वतः जिल्हाधिकारी यांनीही रिमोट द्वारे या यंत्राची माहिती घेऊन कृतीद्वारे अनुभव प्रात्यक्षिक अनुभवले. कंपनीचे पुणे येथील भूषण चिंचोले यांनी वेंगुर्ले नवाबाग समुद्रात या यंत्राचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी यांना करून दाखविले. यावेळी रिमोट वर चालणाऱ्या या यंत्राचे प्रात्यक्षिक बघितल्या नंतर जिल्हाधिकारी यांनी त्याच स्वतः वापरून प्रात्यक्षिक केले आणि सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, तहसीलदार ओंकार ओतारी, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, मंडळ अधिकारी विनायक कोदे, तलाठी सायली आदुर्लेकर, भाजप वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पप्पू परब, मच्छीमार नेते वसंत तांडेल, तसेच पोलीस पाटील, कोतवाल, नागरिक उपस्थित होते.
हे यंत्र समुद्रात दीड किलो मीटर पर्यंत बुडणाऱ्या व्यक्ती पर्यंत जाऊ शकते. एका वेळी तीन व्यक्तींना समुद्राच्या पाण्यावर आपल्या सोबत तरंगत ठेऊ शकते. तसेच एक व्यक्ती बुडत असेल तर त्या व्यक्तीला तरंगत पकडून किनाऱ्यापर्यंत आणू शकते.

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर मोठे भगदाड; वाहतुकीस धोका निर्माण

   Follow us on        
Mumbai Goa Highway: मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील इन्सुली कुड़व टेंब येथे एक भला मोठा भगदाड, असा खड्डा पडल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे माती खचल्याने हा खड्डा पडल्याची माहिती मिळाली आहे. या खड्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हा खड्डा दिसणे कठीण असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गांवर प्रवास करताना नागरिकांनी सतर्क राहुन आपला प्रवास करावा.
निगुडे येथील माजी सरपंच झेवियर फर्नांडीस यांनी या गंभीर समस्येकडे महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी तात्काळ यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्ती काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.

Amboli: सिंधुदुर्ग-चौकुळ येथील पाणवठ्यात पट्टेरी वाघाचे दर्शन

   Follow us on        
आंबोली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ गावात एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. या गावातील जांभळ्याचे कोंड नदीतील एका पाणवठ्यात हा वाघ खडकावर बसून पाणी पिताना आढळून आला. याचे फोटो आणि व्हिडिओ स्थानिक युवकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
आंबोली वनविभागाशी या घटनेबाबत  संपर्क साधला असता त्यांनी या परिसरात पट्टेरी वाघांचे अस्तित्व मान्य केले. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो याच वाघाचे आहेत की नाही? याबाबत निश्चितपणे सांगता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वनखात्याकडे उपलब्ध असलेल्या अधिकृत नोंदीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्टयात एकूण आठ पट्टेरी वाघ आहेत. यामध्ये पाच मादी आणि तीन नर वाघांचा समावेश आहे. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृत नोंद वनविभागाच्या दप्तरी झाली आहे. वनविभागाने यापूर्वीच वाघांचे अस्तित्व मान्य केले होते आणि त्यानंतर बऱ्याचदा आंबोली-चौकुळ भागात वाघ दिसून आला होता. काही महिन्यांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील भेकुर्ली येथे दिवसाढवळ्या वाघ आढळला होता.
वनविभागाच्या नोंदीनुसार आंबोली ते मांगेली हा वाघांचा प्रमुख भ्रमणमार्ग आहे. काही दिवसांपूर्वी दाभिळमधील जंगल भागातील विहिरीत मृत पट्टेरी वाघीण आढळून आली होती. जी वनविभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाली होती. आणि आता पुन्हा चौकुळ येथे पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने या पट्टयातील वाघांचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Yetav App: आता ‘ओला’, ‘उबेर’ प्रमाणे घरबसल्या रिक्षा आणि कार बुकिंग करता येणे शक्य; ‘येतंव अ‍ॅप’ कसे वापरावे?

   Follow us on        
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता रिक्षा प्रवाशांना महानगरातील ‘ओला’, ‘उबेर’ प्रमाणेच प्रवासासाठी घरबसल्या रिक्षा बुकिंग करता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने ‘येतंव’ हे प्रवासी रिक्षा अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. ‘येतंव’ अ‍ॅप रिक्षा चालक व प्रवाशांसाठी मोफत आहे.सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने व कणकवली तालुका व्यापारी संघाच्या समन्वयाने सोल्युशन प्रा.लि.यांच्या सहकार्याने हे अ‍ॅप विकसित केले आहे. कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते या अ‍ॅपचे रविवारी लोकार्पण झाले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, माजी जिल्हाध्यक्ष विजय वळंजू, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, रिक्षा संघटना कोकण विभागाचे अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष नागेश ओरोसकर, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, झॅपअ‍ॅप सोल्यूशन प्रा.लि. कंपनीचे सुबोध मेस्त्री, आनंद वामनसे आदी उपस्थित होते.
ऱिक्षा चालकांनी असे वापरावे अ‍ॅप
रिक्षाचालकांनी या अ‍ॅपवर प्रथम लोकेशन टाकावे. यामुळे प्रवाशांना सर्च केल्यावर त्यांचे नाव व मोबाईल नंबर दिसणार आहेत. या अ‍ॅपद्वारे प्रवाशी रिक्षा कोठेही बोलवू शकतात. रेल्वे स्थानकावर थेट रिक्षाचालकांशी संपर्क साधता येणार आहे.
5300 जणांनी डाऊनलोड केले अ‍ॅप
गेल्या सव्वा महिन्यात 5300 जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले असून 220 रिक्षाचालकांनी नोंदणी केली आहे. पैकी रिक्षाचालकांना या अ‍ॅपवर 1914 कॉल आले आहेत.
‘येतंव’ कसे वापरावे
प्रवाशांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर या अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांना जवळच्या दोन कि.मी. परिसरातील रिक्षा किंवा चारचाकी गाडी हवी असल्यास त्याची उपलब्धता व संपर्क क्रमांक मिळू शकेल. यामध्ये भाडे ठरवण्याची पद्धत पूर्वीप्रमाणेच असून प्रवासी व रिक्षाचालक परस्पर संवादाद्वारे किंवा व्हॉटस् अ‍ॅप मॅसेजवरून भाडे निश्चित करू शकतात. त्यात अ‍ॅप कोणताही हस्तक्षेप करणार नाही. स्मार्ट फोन नसलेल्या रिक्षाचालक कोणत्याही फोनवरून महासंघाने दिलेल्या 9082408882 क्रमांकावर व्हॉटस् अ‍ॅपद्वारे नोंदणी करू शकतात.
हे अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक

Kudal: डंपरची एसटी बसला जोरदार धडक बसून अपघात

   Follow us on        
चौके: कुडाळ येथून मालवणच्या दिशेने दुपारी 12.30 वाजता सुटणारी कुडाळ मालवण एसटी बस आणि चौके वरून धामापूरच्या दिशेने जाणाऱ्या डंपर यांच्यात चौके नारायण वाडी या ठिकाणी मंगळवारी दुपारी समोरासमोर जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा चालक व प्रवासी सुदैवाने बचावले मात्र एसटी बसच्या चालकाच्या बाजूने दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
मालवण डेपोची एसटी बस (MH-14 BT-3063) मंगळवारी दुपारी कुडाळ वरून मालवणच्या दिशेला येत असताना चौके नारायण वाडी येथे एसटी बस आणि चौके वरून धमापुरच्या दिशेने जाणाऱ्या डंपर (MH-07- AJ-2810) यांच्यामध्ये एसटी चालकाच्या बाजूने जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा चालक किरकोळ जखमी होऊन सुदैवाने बचावला. बसमधील प्रवाशांनाही किरकोळ दुखापती झाल्या.. मात्र झालेल्या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले. चालक वाहक आणि किरकोळ जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. बसचालक आणि वाहक यांनी अपघाताची खबर मालवण एसटी आगारात दिली असून एसटी प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया चालू आहे.

Malvan: ८३ फूट उंच, 23 फूट लांबीची तलवार! राजकोट येथील शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

   Follow us on        
मालवणः जगभरातील शिवप्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा ८३ फूट उंच पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (११ मे) करण्यात आले. तब्बल ८३ फूट उंच असलेल्या या पुतळ्याला तब्बल १०० वर्षांची गॅरंटी देण्यात आली आहे. यामुळे हा पुतळा भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.
या भव्य उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे राज्यातील अनेक मंत्री तसंच शिवभक्त उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, २६ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या दुर्घटनेत वादळी वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने तातडीने समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाचा व वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करत नव्यानं पुतळा उभारला आहे.
नवीन पुतळा ८३ फूट उंच आहे. शिवरायांच्या हातातील तलवार २३ फूट लांब आहे. या पुतळ्याचे वजन ८५ टन असून, तलवारीचे वजन २.३ टन आहे. हवामानाचा अंदाज घेत हा पुतळा बनवण्यात आला आहे. या पुतळ्याला तब्बल १०० वर्षांची गॅरंटी देण्यात आली आहे. राज्यातील आणि विशेषतः कोकणातील शिवप्रेमींसाठी हा क्षण अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे.

सावंतवाडी आगारातून बोरिवली, पुणे बस सुविधा सुरु

   Follow us on        
सावंतवाडी: उन्हाळी सुट्टीच्या हंगामात सिंधुदुर्गात येणारे चाकरमानी व प्रवाशांच्या सोयीसाठी सावंतवाडी आगार सज्ज झाले असून आगाराने ज्यादा एसटी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे मुंबई, बोरिवली व पुणे या भागातून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सावंतवाडी आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
एसटी आगाराला अलीकडेच नवीन पाच बीएस-सिक्स बसेस मिळाल्या आहेत. या बसेस ४० सीट असलेल्या पूश बँक, आरामदायी आहेत. चार्जिंग पोर्ट अशा बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सोडण्यात येतील, अशी माहिती आगार व्यवस्थापक नीलेश गावित व स्थानकप्रमुख राजाराम राऊळ यांनी दिली. प्रवाशांनी या बसचे आरक्षण करून लाभ घ्यावा, असे आवाहनही आगारातर्फे करण्यात आले आहे.
सावंतवाडी आगारातून सावंतवाडी-पुणे ही एसटी बस सकाळी सात वाजता सुटणार आहे. आगारातून बांदा-बोरिवली ही बस सोडण्यात येणार आहे. ही बस आगारातून दुपारी तीन वाजता बांदा येथे जाईल. तेथून चार वाजता ती सुटून पुन्हा सावंतवाडीत येणार आहे. त्यानंतर साडेचार वाजता बोरिवलीला मार्गस्थ होणार आहे. प्रवाशांनी या दोन्ही बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
येत्या आठ दिवसांत चाकरमान्यांची वाढती गर्दी व आरक्षण पाहता, आणखी ज्यादा गाड्या मुंबई-बोरिवली व पुणे या मार्गावर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी आगाराच्या ताफ्यात नव्याने पाच एसटी बसेस उपलब्ध झाल्याने बसेसची संख्या ८३ झाली आहे. या बसच्या माध्यमातून सर्व मार्गावर वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यास मदत झाली आहे. प्रवासी उपलब्धतेनुसार ज्यादा बसेसही सोडण्यात येणार आहेत.. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेतली जाणार आहे. नव्याने मिळालेल्या नवीन पाच बसेस या विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. सोडण्यात येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Vaibhavwadi Railway Station: चांगले उत्त्पन्न मिळत असून सुद्धा कोकण रेल्वेचे वैभववाडी स्थानकाकडे दुर्लक्ष

   Follow us on        
Vaibhavwadi Railway Station:  कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाला लागलेले समस्यांचे ग्रहण सुटायला तयार नाही. या स्थानकापासून रेल्वे प्रशासनाला चांगले उत्त्पन्न भेटत असताना सुद्धा या स्थानकावरील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत होत असल्याचा आरोप येथील प्रवाशांकडून होत आहे.
गेल्यावर्षी म्हणजेच २०२४-२५ ला या स्थानकावरून कोकण रेल्वेला ७ कोटी २२ लाख इतके उत्पन्न भेटले असल्याचे माहिती रेल्वे अभ्यासक श्री ओंकार लाड यांनी माहिती अधिकारातून प्राप्त केली आहे. २०२३-२४ या वर्षाच्या उत्पन्नाशी तुलना करता गेल्या वर्षीच्या उत्पन्नात जवळपास ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्पन्नाच्या बाबतीत हे स्थानक  कोकण रेल्वेच्या पहिल्या १५ स्थानकामध्ये मोडत आहे. असे असून देखील या स्थानकांवर मूलभूत सुविधांची मारामारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या स्थानकावर प्लॅटफॉर्मवर बसायला नीट जागा नाही. ऊन्ह आणि पावसासाठी छप्पर नाही. ५ वर्षे होत आली; तरी आरक्षण खिडकी उघडायला तयार नाही, एकाही जलद गाडीला थांबा नाही. अशा अनेक समस्यांनी वैभववाडी रेल्वे स्थानकाला ग्रासलेले आहे. परंतु, या समस्या सोडविण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती काहीशी कोमेजून गेलेली दिसते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर मध्यवर्ती रेल्वे स्थानक वैभववाडी आहे. त्यामुळे रत्नागिरीतून थेट कुडाळ सावंतवाडीत थांबणाऱ्या काही सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना वैभववाडीत थांबा मिळावा ही रेल्वे प्रवाशांची खूप वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु, या मागणीला राजकीय पाठबळ देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. वैभववाडी तालुक्यासह कणकवली तालुक्यातील नांदगाव, तळेरे खारेपाटण पट्टा तसेच देवगड तालुक्यातील शिरगाव पासून विजयदुर्ग पर्यंतच्या आणि घाटमाथ्यावरील गगनबावडा तालुक्यालाही वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाचा मोठा आधार आहे. या स्थानकातून दररोज हजारो प्रवाशाची ये-जा सुरु आहे. तरीही येथे दिवा, मांडवी, तुतारी आणि कोकणकन्या या चारच रेल्वेगाड्यांना थांबा आहे. यामध्ये मागील १५ नियमित गाडीच्या थांब्याची वाढ होऊ शकलेली नाही. यांचे मूळ राजकीय उदासीनता हेच आहे.

Kudal: साळगाव शाळा क्र.१ च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त मोफत महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

   Follow us on        

कुडाळ: पुढील वर्षी 1 जून 2026 रोजी शाळा साळगाव क्र. 1 या शाळेला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. 2025-26 हे वर्ष शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्ताने साळगाव मित्रमंडळ व शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समिती यांनी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. रविवार 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते 11वा. पर्यंत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा साळगाव क्र.1 (ग्रामपंचायत कार्यालय नजीक, साळगाव, ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग ) येथे हे महा आरोग्य शिबीर आहे.

या शिबिरासाठी जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर डॉ. जी. टी.राणे (प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ), डॉ. अनिकेत वजराटकर (शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. मोनालिसा वजराटकर (शस्त्रक्रिया – स्त्रीरोग तज्ञ), डॉ. नेहा पावसकर -कोल्हे (नेत्ररोग – शस्त्रक्रिया तज्ञ ), डॉ. सौरभ पाटील (अस्थिरोग – शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. प्रियांका कासार _ पाटील (स्त्रीरोग – शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. नितेश साळगावकर (बालरोग तज्ञ ), डॉ. स्वप्नाली साळगावकर (आयुर्वेद आणि पंचकर्म), डॉ. चेतन परब (आयुर्वेद आणि पंचकर्म), डॉ. दत्तात्रय मडवळ (होमिओपॅथी उपचार), डॉ. राहुल गव्हाणकर (MD आयुर्वेद )हे डॉक्टर तपासणी साठी उपलब्ध असणार आहेत तसेच काही विशिष्ट आजारा बाबतीत मार्गदर्शन पण करण्यात येईल.

शिबिरात करण्यात येणाऱ्या चाचण्या – ई.सी.जी, रक्तातील साखरेची तपासणी ( डायबेटिस), रक्तदाब तपासणी, नेत्रविकार तपासणी (मोतीबिंदू व तत्सम डोळ्याचे आजार), मूळव्याध -भगेंदर अश्या दुर्धर आजाराची तपासणी, स्त्रियांच्या आजाराची तपासणी (गर्भपिशवी / मासिक पाळी / स्तनाचे आजार अशा संबंधित तपासणी), संधिवात/ आमवात किंवा हाडाच्या कुठल्याही आजार संबंधित तपासणी, लहान मुलांच्या आजार संबंधित तपासणी, इत्यादी तपासण्या करण्यात येणार आहेत. तरी साळगाव पारिसरातील ग्रामस्थानी या भव्य मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन साळगाव मित्रमंडळ व शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

मालवण – राजकोट किल्ला येथे उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे लोकार्पण १ मे रोजी?

   Follow us on        
मालवण :राजकोट किल्ला येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे लोकार्पण १ मे रोजी महाराष्ट्र दिनी करण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम २५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने १ मे रोजी पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवपुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा असणार आहे. चबुतरा १० मीटर उंचीचा बनविण्यात आला आहे. त्यावर ६० फूट उंचीचा शिवपुतळा आणि शिवपुतळ्याच्या हातातील तलवार तब्बल २३ फूट उंचीची असणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search