Category Archives: आवाज कोकणचा

मागितले एक; दिले भलतेच.. वांद्रे-मडगाव एक्सप्रेसबाबत कोकणकरांची नाराजी

   Follow us on         मुंबई: वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने पश्चिम रेल्वेवरून नेहमीसाठी व रात्रीची वसई सावंतवाडी पॅसेंजर किंवा स्लो मधू दंडवते एक्सप्रेस सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला.यासाठी कोकण रेल्वे,मध्य रेल्वे,पश्चिम रेल्वे प्रशासन,रेल्वे बोर्ड व लोकप्रतिनिधी यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला होता . मात्र आत्ताच नव्याने सुरू करण्यात आलेल्या वांद्रे मडगाव एक्सप्रेसच्या थांब्या बाबत, वेळापत्रकाबाबत संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

आम्ही कोकणासाठी पॅसेजर मागतोय तुम्ही सुपरफास्ट देताय,आम्ही रात्रीसाठी रेल्वे मागतोय तुम्ही दिवसाला देताय,आम्ही कोकणासाठी रेल्वे मागतोय तर तुम्ही गोव्यासाठी देताय? कोकणातील फक्त सात रेल्वे स्थानकावर थांबणारी सुपरफास्ट एक्सप्रेस देऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकणी माणसाच्या जखमेवर मिठ चोळलेय अशा शब्दात संघटनेने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

कोकण रेल्वेच्या प्रकल्पात ज्या महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक २२% गुंतवणूक केली त्याच्या वाटयाला मध्यरेल्वेच्या फक्त तीनच रेल्वे आल्या,त्यामुळे पश्चिम रेल्वेवरून चालू झालेली नवीन रेल्वेही वांद्रे ते वसईमार्गे सावंतवाडीपर्यत पॅसेंजर किंवा स्लो एक्सप्रेस चालवावी म्हणजे किमान कोकणातील प्रत्येक तालुक्याला एकतरी हॉल्ट मिळेल अशी मागणी करणाऱ्या प्रवासी संघटनेची धारणा होती.मात्र कोकण रेल्वेने बोरीवली मार्गे सुटणारी स्लो रेल्वे न देता बोरीवली ते मडगाव दरम्याने धावपारी सुपरफास्ट एक्सप्रेस १०११५/१६ देऊन काय साध्य केले?

कोकणातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हातील तब्बल ३४ रेल्वे स्थानकांवर हया पश्चिम रेल्वेवरून सुरू झालेल्या नवीन रेल्वेला हॉल्टच दिला नाही.यामध्ये १)आपटे २) जिते ३) पेण ४) कासू ५) नागोठणे ६) कोलाड ७) इंदापूर ८) माणगाव ९) गोरेगाव रोड ८) सापे वामने ९) करंजडी १०) विन्हेरे ११) दिवाणखवटी १२) कलंबनी बु. १३) खेड १४) अंजनी १५) कामथे १६) सावर्डा १७) आरवली रोड १८) कडवई १९) संगमेश्वर रोड २०) उक्षी २१) भोके २२) निवसर २३) आडवली २४ ) वेरवली २५) विलवडे २६) सौंदळ २७) राजापूर रोड २८) खारेपाटण रोड २९) वैभववाडी रोड ३०) आचरणे ३१) नांदगाव रोड ३२) सिंधुदुर्ग ३३) कुडाळ ३४) झाराप ह्या स्टेशनवरील चाकरमनी मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये राहत नाहीत का?असा संतप्त सवाल कोकणातील चाकरमनी विचारत आहेत.

लोकसभा प्रचाराच्या वेळी मंत्री पियुष गोयल यांनी मला मतदान करा मी कोकणाला नेहमीसाठी रेल्वे सुरू करून देतो असे आश्वासन दिले होते स्वाभिमानी कोकणी माणसाने गोयल यांना भरभरून मतदानही केले पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पियुष गोयल हे सर्वाधिक मताधिक्याने निवडूनही आले, कोकणी माणसामुळे साहेब पुढे कॅबिनेट मंत्रीही झाले व पुढे जाऊन द्विसाप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस कोकणा ऐवजी गोव्यासाठी सोडण्याचे प्रयोजन मंत्री महोदयांनी केले त्यामुळे ही सुपरफास्ट एक्सप्रेस नेमकी कोकणासाठी की गोव्यासाठी असा सवाल श्री.यशवंत जडयार यांनी विचारला आहे.

पश्चिम रेल्वेवरून नवीन सुरू होणाऱ्या बांद्रे ते मडगाव सुपरफास्ट एक्सप्रेसला फक्त बोरीवली,वसई,पनवेल,रोहा,विर,चिपळूण,रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग,सावंतवाडी,थिवीम,करमळी हे थांबे देण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. प्रवासी संघटना ह्या रेल्वेची रात्रीसाठी मागणी करीत आहे तरीही ती दिवसाची दिल्याने ती तळकोकणात रात्री १०.३५ च्या दरम्याने पोहोचतेय.म्हणजे कोकणातील लोकांनी मुंबईतून ३०० रू.मध्ये रेल्वेने जायचे आणि तेथे उतरल्यावर १५०० रू.ची रिक्षा करून घरी जायचे.

प्रवासी संघटनेच्या वतीने पश्चिम रेल्वेवरून वसईमार्गे कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी मागील १o वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे यासाठी वसई विरारमध्ये फक्त एका महिन्यामध्ये १८ हजार सहयांचे क्याम्पीयनही राबवले,कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कार्यालयासमोर उपोषण,वसई रोड येथे रेल्वे आंदोलन,सावंतवाडी रोड येथे लाक्षणिक उपोषण केले तर माजी खासदार श्री.विनायक राऊत,श्री.राजेद्र गावीत,श्री.गोपाळ शेट्टी तर विद्यमान खासदार श्री.नारायण राणे,श्री.पियुष गोयल,श्री.अरविंद सावंत,श्रीम.सुप्रिया सुळे व रेल्वे प्रशासन यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला आहे.त्यामुळे फक्त कोकणासाठी स्वतंत्र्य रेल्वे मिळणे अपेक्षित होते,मात्र प्रवासी संघटनेने पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष ही नवीन रेल्वे सोडताना कोकण रेल्वे प्रशासनाने ह्या प्रवासी संघटनांशी संपर्क न साधता वेळापत्रक परस्परच जाहिर केले.

पश्चिम उपनगरातील कोकणातील प्रवाशांनी मागील १० वर्षे ही रेल्वे मिळवण्यासाठी संघर्ष केला आत्ता पुढील १० वर्ष त्याचे हॉल्ट मिळवण्यासाठी कोकणकरांनी आंदोलने / उपोषण करत राहायची का? असा सवाल कोकणातील चाकरमनी विचारत आहेत.

वांद्रे मडगाव एक्सप्रेस नेहमीसाठी सुरू करून त्यातील एक जनरल कोच वसई रोड स्टेशनला राखीव ठेवावा व किमान माणगाव,खेड,संगमेश्वर रोड,विलवडे,राजापूर रोड,वैभववाडी रोड व कुडाळ ह्या तालुक्याच्या ठिकाणी जादाचे हॉल्ट मिळावेत अन्यथा प्रवासी संघटना आपल्या मूळच्या वसई सावंतवाडी पॅसेंजरच्या मागणीवर ठाम असल्याचे प्रवासी संघटनेने सांगितले.

आज पश्चिम रेल्वेच्या वसईमार्गे दक्षिणेतील राज्यामध्ये दिवसाला साधारण ५ सुपरफास्ट एक्सप्रेस जात आहेत,त्यामुळे कोकणाला सुपर फास्ट एक्सप्रेसची आवश्यकताच नाही आहे. दिव्यावरून सावंतवाडी पर्यत पॅसेंजर किंवा स्लो एक्सप्रेस जाऊ शकते तर वांद्रे ते सावंतवाडी पॅसेंजर का शक्य नाही? नवीन सुपर फास्ट एक्सप्रेस कोकणाच्या नावाखाली गोव्याला देण्यापेक्षा कोकण रेल्वे प्रशासनाने ती उरलेल्या ३४ स्टेशनवर थांबवावी असे श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले.

Loading

”…. नाहीतर कोकणात येणारा एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही” जनआक्रोश समितीचा ईशारा

   Follow us on        

रायगड – १७ वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातच पावसाळ्यात झालेली दुरावस्था याकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्याकरिता जनआक्रोश समितीने माणगाव येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून आधी हा महामार्ग पूर्ण करा नाहीतर कोकणात येणारा एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही, असा इशाराच राज्य सरकारला कोकणवासियांनी दिला आहे.

माणगावमध्ये समितीच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये माणगावसह कोकणातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निघालेल्या रॅलीमध्ये सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरण्यात आल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर महामार्गावरील आंदोलन स्थगित करत नियोजित जागेवरती आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

हा महामार्ग केव्हा पूर्ण होईल याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कसलेही आर्थिक सहाय्य केले जात नाही, अपघातात जखमी झालेल्यांना सहाय्य केले जात नाही याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कोकणातील नागरिकांची उपजीविका पर्यटनावरती अवलंबून आहे मात्र रस्ता खराब असल्याने पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली आहे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असल्याने त्याची नुकसान भरपाई राज्य सरकारने करून द्यावी, यासह विविध चौदा मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

संजय यादवराव, रुपेश दर्गे, अजय यादव, संजय जंगम,पराग लाड, सुरेंद्र पवार, प्रशिल लाड, आशिष बने, अनिल जोशी यांनी या आंदोलनाची हाक दिली असून त्यास मावळ प्रतिष्ठान, बजरंगदलसह अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब साबळे, उद्योजक शेखर गोडबोले यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणास उपस्थित राहून पाठींबा व्यक्त केला.

नवीन महामार्ग होऊ देणार नाही – यादवराव

गणेशोत्सव आणि शिमगा हे कोकणवासियांचे प्रमुख सण आहेत. या सणाला कोकणी माणूस यायला निघाला की सरकार सल्ला देते पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जा, अरे आम्ही आमच्या हक्काच्या रस्त्याने जायचे नाही तर किती वर्षे दुसर्‍यांच्या दारातून घरी जायचे हे यापुढे जमणार नाही, आधी आमचा रस्ता पूर्ण करा. जोपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत कोकणासाठी घोषणा होत असलेल्यापैकी एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिला.

 

 

Loading

Mumbai Goa Highway: बाप्पा आता तूच वाचव! महामार्गावर १०६ ठिकाणी गंभीर स्वरूपाचे खड्डे

   Follow us on         Mumbai Goa Highway: कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रेल्वेचे आरक्षण आधीच फुल झाल्याने मोठ्या उत्साहाने कोकणात गावी जाणाऱ्या कित्येक गणेश भाविकांकडे रस्ते वाहतुकीचा पर्याय राहिला आहे. साहजिक दरवर्षीप्रमाणे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्याप्रमाणात गणेश चतुर्थी दरम्यान वाहतूक होणार आहे. मात्र सध्याची महामार्गाची परिस्थिती पाहता गणेशोत्सवात प्रवास करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. महामार्गाच्या या परिस्थितीकडे कोंकण विकास समिती व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी महामार्गाच्या दुर्दशेच्या फोटो पुराव्यासहित पत्रव्यवहार केला आहे.

“आपण मुंबई गोवा हायवे दुर्दशेबाबत स्वतःहून लक्ष घालून सहयाद्री अतिथी गृह येथे बैठक घेऊन नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तसेच राष्ट्रीय महामार्ग (सा.बा.) चे अधिकारी यांना खड्डे बुजविने तसेच खड्डे बुजविणेसाठी कोणत्या प्रतीचे मटेरियल वापरावे याबाबत स्पष्ट आदेश देवूनही पूर्तता होत नसलेने एकंदरीत मुंबई गोवा हायवे संबंधात आपणाकडून स्पष्ट आदेश होऊनही पूर्तता होत नसलेने कोंकणात लवकरच साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव उत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन आपण मुंबई गोवा हायवे पाहणी दौरा करावा अशी नम्र विनंती आहे. कोंकण विकास समितीचे सदस्य व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे सह सचिव श्री चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांनी स्वखर्चाने तसेच कोंकण विकास समितीचे सदस्य श्री अक्षय मधुकर महापदी तसेच श्री सुधीर सापळे यांनी दिनांक २८.०७.२०२४ ते ०७.०८.२०२४ रोजी केलेले पाहणीत तसेच सोबत जोडलेले पीडीएफ मधील फोटो वरून दिसत आहे. या पाहणीत कासू ते माणगाव मार्गावर ४७ तर कासू ते पळस्पे मार्गावर ६९ ठिकाणी गंभीर स्वरूपाचे खड्डे आढळले” अशा आशयाचे पत्र ई-मेल द्वारे संबधीत लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आले आहे.

Loading

मालवण: बांदिवडे त्रिंबक रस्त्याची अवस्था झाली दयनीय

   Follow us on        

मालवण: तालुक्यातील बांदिवडे ते त्रिंबक रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. पाऊस अजून सुरू झाला नसताना रस्त्याची ही अवस्था असेल तर पुढील दोन महिन्यांत रस्ता खूपच धोकादायक बनणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेण्याची विनंती बांदिवडे ग्रामस्थांनी केली आहे.

बांदिवडे गावातील शाळेतील मुलांना तसेच ग्रामस्थांना रस्ता खराब असल्याने त्याचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे. आजारी व्यक्तिंना आचरा किंवा मालवण येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व लोक नेत्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती येथील बांदिवडे, पालयेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. रमाकांत घाडीगावकर यांनी केली आहे.

Loading

चिपळूणसाठी स्वतंत्र गणपती विशेष गाडी सोडण्यात यावी – जल फॉउंडेशनची रेल्वेकडे मागणी

   Follow us on        
रत्नागिरी, आवाज कोकणचा: चिपळूण, खेड, महाड, माणगाव विभागातील प्रवाशांना स्वतंत्र गाडी नसल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये गर्दी होऊन सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागतो. तर गावातून मुंबईला येताना आतील प्रवाशांनी दरवाजे आतून बंद केल्यामुळे खेड व त्यापुढील प्रवाशांना गाडीत चढताच येत नाही. काही वेळेस आरक्षण असलेल्या प्रवाशांची गाडीही चुकते. गणेशोत्सवात तर हा त्रास आणखी वाढतो. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून दादर व चिपळूण दरम्यान स्वतंत्र गाडी सोडण्याची मागणी होत आहे. तिकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासन केवळ गणेशोत्सव व होळीच्या काळात पनवेलवरून चिपळूण गाडी सोडत आहे. परंतु खेड/चिपळूणचे मुंबईपासूनचे अंतर रत्नागिरी/सावंतवाडीच्या तुलनेत कमी असल्यामुळे व पनवेल किंवा दिव्याला पोहोचणे त्रासदायक असल्यामुळे अति गर्दीचे दिवस वगळता प्रवासी त्या गाडीने प्रवास करण्यास उत्सुक नसतात.



हेच लक्षात घेता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव, मंगळुरुप्रमाणेच चिपळूणसाठीही स्वतंत्र गणपती विशेष गाडी सोडावी अशी मागणी जल फाउंडेशनने रेल्वे मंत्री, मध्य रेल्वे व कोंकण रेल्वेकडे केली आहे.
मागील काही वर्षांत खेड, माणगाव, रोहा येथे अति गर्दीमुळे प्रवाशांमध्ये झालेले वाद, गाडीवर दगडफेक यांसारखे प्रकार लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे जल फौंडेशच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
-श्री. अक्षय म्हापदी
रेल्वे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते 

Loading

कौल जनतेचा | रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मैदान कोण मारणार?

   Follow us on        

कौल जनतेचा

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मैदान कोण मारणार?

*नारायण राणे* की *विनायक राऊत*

आपला उमेदवार मागे ईथेही मागे पडता नये… खालील लिंक वर क्लिक करून आपले मत नोंदवा…

Loading

कोकणात टर्मिनस नसल्याने गणपतीबाप्पा कोकणात अन गणपती स्पेशल रेल्वे गोवा,कर्नाटक व केरळात

सावंतवाडी रोड स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे अशी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने कोकण रेल्वेकडे केली मागणी

   Follow us on        
आवाज कोकणचा : कोकण रेल्वेला नुकतीच २५ वर्ष पूर्ण झाली.कोकण रेल्वेचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोकणातील भूमिपुत्रांनी आपल्या स्वतःच्या जमिनी या बहाल केल्या, मात्र कोकण रेल्वेतून कोकणातील भूमिपुत्राला काय मिळाले हा प्रश्न आजही निरूत्तरीतच आहे, या ठिकाणी भूमिपुत्रांना अपेक्षित असणारा सुलभ आणि सोयीस्कर प्रवासा आजही होताना दिसत नाही, यासाठीच कोकणात सावंतवाडी रोड येथे सुसज्ज टर्मिनस बनवावे व त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते यांचे नाव दयावे अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
गणेश उत्सवाच्या दरम्याने सर्व कोकण रेल्वे प्रवासी संघटना साधारण ३०० ते ३५० रेल्वेच्या फेऱ्यांची मागणी करतात मात्र कोकणात सुसज्ज टर्मिनस नसल्याने गणपतीबाप्पा कोकणात आणि सर्व गणपती स्पेशल ट्रेन दक्षिणेतील गोवा,कर्नाटक, केरळ व तामिळनाडू राज्यात न्याव्या लागतात. त्यामुळे गणपतीस्पेशल रेल्वे सोडूनही अर्धा रिझर्वेशन कोटा हा दक्षिणेतील राज्यांना मिळतो व खरा लाभार्थी वेटींगलिस्टमध्येच राहतो. त्यामुळे कोकणातील भूमिपुत्रांना कोकण रेल्वेचा काहीच फायदा होताना दिसत नाही.
सावंतवाडी स्टेशन येथे फेज एक मध्ये फक्त प्याटफॉर्म व ब्रिजचे काम करण्यात आले मात्र टर्मिनस म्हणून आवश्यक असणारे मुबलक पाणी, ट्रेन सरव्हिसींग व मेंटेनसचे काम येथे होत नसल्याने या कामासाठी पुढील राज्यांचा आधार घ्यावा लागतो.परिणामी कोकणातील प्रवाशांना कोकण रेल्वेच्या सेवेचा अपेक्षित फायदा घेता येत नाही.सावंतवाडी येथे सुसज्ज टर्मिनस झाल्यास प्रतिक्षेत असलेल्या वसई सावंतवाडी पॅसेंजर,कल्याण सावंतवाडी पॅसेंजर,दादर चिपळूण मेमू व सिएसएमटी रत्नागिरी इंटरसिरी एक्सप्रेस अशा कोकणाच्या हक्काच्या कमी अंतराच्या रेल्वे चालवल्या जातील त्याचा फायदा कोकणातील भूमिपुत्रांना होईल,अशी प्रवासी संघटनेची धारणा आहे.
सावंतवाडी रोड टर्मिनसच्या कामाला गती मिळावी यासाठी १६ मे २०२३ रोजी सावंतवाडी रोड स्टेशन मास्तर यांना वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले तर २६ जाने.२०२४ रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने स्थानिक भूमिपुत्रांच्या सहकार्याने लाक्षणिक उपोषणही करण्यात आले.
म्हणूनच सावंतवाडी रोड स्टेशन ला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
-अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती- मुंबई
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

उत्पन्नाच्या बाबतीतही सावंतवाडी रेल्वे स्थानक सरस.. 

   Follow us on        

आवाज कोकणचा | सागर तळवडेकर : गेल्या वर्षी मी लिहिलेला मालवणी माणूस आणि रेल्वे हा उत्पन्नासंदर्भात लेख प्रचंड व्हायरल झाला होता त्याबद्दल सर्वांचे अजूनही आभार.

त्याच प्रमाणे आज मी कोकण रेल्वे मार्गावरील आर्थिक वर्ष २०२३-२४ चे प्रत्येक स्थानकाचे प्रवासी उत्पन्न आणि प्रवासी संख्या या ठिकाणी मांडणार आहे. हा सर्व डाटा माझा नसून माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून मिळविलेला आहे. प्रत्येक स्थानकावर प्रवासी सुविधा ही त्या स्टेशनच्या वापरावर अवलंबून असते. ज्या ठिकाणी जास्त प्रवासी वर्दळ आणि त्यापासून मिळालेले उत्पन्न,त्या ठिकाणी जास्त सुविधा.

आज मी ह्या माहितीच्या आधारे काही तथ्य मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला काही यातील जास्त माहिती नाहीय परंतु जेवढे समजते तेवढे मांडण्याचा नक्की प्रयत्न करतोय.

सावंतवाडी स्थानकाचे मागील आर्थिक वर्षी म्हणजेच २०२२-२३ ला १३ कोटी ४२ लाख एवढे होते.आणि एकूण प्रवासी संख्या ही ०६ लाख ९४ हजार एवढी होती. म्हणजेच प्रतिदिन सरासरी १९०२ प्रवाशांनी या स्थानकाचा वापर प्रवासासाठी केला.

या वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२३-२४ ला सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न हे १४ कोटी ६८ लाख एवढे आहे. येथील प्रवासी संख्या ही ०७ लाख ७९ हजार एवढी आहे. आणि प्रतिदिन सरासरी २१३४ प्रवाशांनी या स्थानकाचा वापर प्रवासासाठी केला. या माहितीच्या आधारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुलनेत १.२६ कोटीने रुपयांनी वाढले,आणि एकूण प्रवास करणारे प्रवासी ८५ हजार ने वाढले म्हणजेच प्रवासी संख्या सरासरी प्रतिदिन २३२ ने वाढली देखील. परंतु या असे असताना देखील या स्थानकात नवीन एकही गाडीचा थांबा देण्यात आला नाही. कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या त्रिवेंद्रम राजधानी एक्स्प्रेस आणि कोचिवेली गरीबरथ एक्स्प्रेस चा थांबा देखील पुन्हा देण्यात आला नाही. आता अजून स्पष्ट समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख ३ स्थानके अनुक्रमे कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी.

कुडाळ स्थानकाचे उत्पन्न हे ३१ कोटी ६३ लाख एवढे आहे. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत ३.१ कोटी रुपयांनी ते वाढले. या ठिकाणी एकूण १६ गाड्या म्हणजेच ७ दैनिक, एक प्रीमियम गाडी तेजस एक्स्प्रेस, जी आठवड्यातून ५ दिवस धावते, अजून एक प्रीमियम गाडी मडगाव राजधानी,जी आठवड्यातून २ दिवस धावते,५ साप्ताहिक गाड्या आणि २ स्पेशल गाड्या ज्या बरीच वर्षे स्पेशल म्हणून धावतात त्या मधे नागपूर मडगाव एक्स्प्रेस आणि जबलपूर कोइंबतूर एक्स्प्रेस चा समावेश आहे. ह्या गाड्या अप आणि डाऊन अश्या दोन्ही बाजूला धावत असल्याने त्यांचा एकूण फेऱ्या एका आठवड्यात ह्या १२८ एवढ्या आहेत.

कणकवली स्थानकाचा विचार केल्यास ह्या वर्षी कणकवली स्थानकाचे उत्पन्न हे ३० कोटी ६५ लाख एवढे आहे. मागच्या वर्षीचा तुलनेत हे ०४.५२ कोटी रुपयांनी हे वाढले या ठिकाणी एकूण १५ गाड्या (वंदे भारत पकडुन) थांबतात. या मध्ये ७ दैनिक, एक प्रिमियम गाडी वंदे भारत, एक आठवड्यातून ४ वेळा धावणारी (पावसाळ्यात आठवड्यातून दोन वेळा), २ गाड्या आठवड्यातून दोन वेळा धावणाऱ्या, आणि २ साप्ताहिक व दोन स्पेशल गाड्या (कुडाळ ला थांबतात त्याच) थांबतात. या गाड्यांचा दोन्ही बाजूने फेऱ्या असल्याने या ठिकाणी आठवड्यातून एकूण १२४ फेऱ्या (वंदे भारत वगळून, कारण या ठिकाणी ही ट्रेन नवीन सुरू केली असून वंदे भारतच्या वर्ष भरात केवळ १८० फेऱ्या झाल्यात. त्या पकडल्या तर कुडाळ पेक्षा जास्त फेऱ्या होतील.)

सावंतवाडी स्थानकाचा विचार केल्यास या ठिकाणी एका आठवड्यात एकूण ९२ (८८ – ९२ फेऱ्या, त्यातील एक गाडी पावसाळ्यात आठवड्यातून २ दिवस धावते आणि इतर वेळी ४ दिवस धावते) फेऱ्या होतात. आणि या ठिकाणी एकाही प्रीमियम दर्जाच्या गाडीला थांबा नाही.

असे असताना देखील येथील प्रवासी संख्या आणि उत्पन्न हे कमालीचे वाढले आणि भविष्यात ते वाढत जाईल. या ठिकाणी अजून एखादी नवीन दैनिक गाडी, एक प्रिमियम दर्जाची गाडी आणि एक साप्ताहिक गाडी चा थांबा दिल्यास आताच्या उत्पन्नात अधिक भर पडेल हे नक्कीच..

परंतु कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्ड थांबे देण्यासाठी आणि थांबे काढून घेण्यासाठी फक्त सावंतवाडी साठी असा कोणता निकष लावते ते माझ्या तरी समजण्याचा पलीकडे आहे. आम्ही गेल्या वर्ष भरात या ठिकाणी मंगलोर एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आणि नागपूर मडगाव एक्स्प्रेस किंवा दिल्ली ला जाणाऱ्या एर्नाकुलम – निजामुद्दीन एक्स्प्रेसचा थांबा मिळावा म्हणून कृतिशील पणे कोकण रेल्वे महामंडळ, खासदार, आमदार, मंत्री, केंद्रीय मंत्री आणि रेल्वे बोर्डाकडे सतत पाठपुरावा करतच आहोत तरी देखील आम्हाला यश आले नाही. आंदोलन करून देखील थांब्यासंदर्भात काही हालचाल होताना दिसत नाही.

परंतु आम्ही देखील हार मानणारे नाहीत. आमच्या हक्काचे एकूण तीन थांबे या स्थानकातून हया नाहीतर त्या कारणाने काढून घेण्यात आले, आम्ही देखील तीन थांबे मिळवण्यासाठी मेहनत घेऊच. रेल्वे जर बिझनेस बघते तर तो सावंतवाडीला आहे.

परंतु सावंतवाडीकडे रेल्वे का बघत नाही हाच माझ्या समोर मोठ्ठा प्रश्न आहे.येणाऱ्या काळात सावंतवाडीकरांचा भावनांचा उद्रेक नक्कीच होईल हे लक्षात असूद्या.आपल्याला जर हा लेख आवडला असेल तर शेअर नक्की करा.धन्यवाद.

सागर तळवडेकर

उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.

Loading

कोकण रेल्वेचा HDN आणि HUN यादीत समावेश नसणे हे अनेक समस्यांचे कारण. -सागर तळवडेकर 

कोकण विकास समितीचे रेल्वे अभ्यासक अक्षय मधुकर महापदी यांनी आर टी आय मधून एक माहिती मिळवलेली आहे. या माहितीत भारतीय रेल्वाच्या अति महत्त्वाचे, अति मागणीचे आणि व्यस्त असलेले मार्ग High Density Network (HDN) आणि Highly Utilized Network (HUN) रेल्वे मार्गाची यादी दिलेली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत क्षमेतपेक्षा जास्त वापर असेलेल्या कोकण रेल्वेचा समावेश नाही आहे.
   Follow us on        
आवाज कोकणचा: आपल्या गावाला टंचाई असेल आणि टँकर सुरू करायचा असेल तर आपल्या गावचं नाव टंचाईच्या यादीत असणं गरजेचं असतं. जर हे नाव टंचाईचे यादीत असेल तर आपल्याला शासनाकडून टँकर उपलब्ध केला जातो.
तसेच भारतीय रेल्वेच्या वतीने अति महत्त्वाचे, अति मागणीचे आणि व्यस्त असलेले मार्ग High Density Network (HDN) आणि Highly Utilized Network (HUN) या दोन याद्यांमध्ये सूचीबद्ध झालेले आहेत. भारतीय रेल्वे या मार्गावर चांगल्या प्रकारे लक्ष देऊन अनेक नवनवीन प्रकल्प, दुहेरीकरण, गती-शक्ती सारख्या माध्यमातून क्षमतावृद्धीचे प्रयत्न करत आहे. याकडे रेल्वे मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे विशेष लक्ष असते.पण या यादीमध्ये अतिशय व्यस्त असलेला कोकण रेल्वे मार्ग (एकूण क्षमतेच्या १६८% वापर असूनही) स्थान घेऊ शकला नाही कारण कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये त्याला स्थान नाही.जर या यादीमध्ये कोकण रेल्वे मार्गाची नोंद झाली तर या ठिकाणी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करून प्रवाशांना वाढीव सोयी सुविधा व गाड्या पुरवल्या जाऊ शकतात.
त्यामुळेच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण झालेच पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील मार्ग मध्य रेल्वेच्या ताब्यात जायला हवा.
आतापर्यंत कोकणातील खासदारांनी याचा विचार केला नाही पण आता निवडून येणाऱ्या खासदारांनी संसदेत विषय चर्चेत घेऊन लवकरात लवकर मार्गी लावावा.

श्री. सागर तळवडेकर 
सामाजिक कार्यकर्ते व रेल्वे अभ्यासक
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Voice Of Konkan | ‘या’ १५ एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा का नाही?

   Follow us on        
सिंधुदुर्ग: कोकण रेल्वेच्या स्थापनेवेळी रेल्वे सेवा फक्त सावंतवाडी पर्यंत देण्यात येणार होती. परंतु नंतर ती ठोकूर पर्यंत नेवून दक्षिण रेल्वेला नेवून पोहोचवली.  त्यामुळे केरळ तामिळनाडू आणि कर्नाटक कारवार पासून पुढचा  आठ तासाचा प्रवासाचा वेळ वाचला. दक्षिणेकडील राज्यांपेक्षा महाराष्ट्राने कोकण रेल्वेच्या स्थापनेत मोठा वाटा उचलला होता. कित्येक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी यासाठी दिल्यात. मात्र ही वस्तुस्तिथी असताना महाराष्ट्र राज्यातील जनतेला किती लाभ मिळाला याबाबत नेहमीच प्रश्न उठवले जात आहेत. त्याची कारणेही आहेत.
उदाहरण द्यायचे झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हयाचे देता येईल. राज्यातील पहिला आणि एकमेव पर्यटन जिल्हा जाहीर झालेल्या या जिल्ह्यातून एक दोन नाही  तर तब्बल १५ गाड्या (दोन्ही बाजूने विचार केल्यास एकूण ३० गाड्या) येथे थांबत नाहीत. वेळोवेळी मागणी करूनही येथे थांबे देण्यात येत नाहीत. मुंबई ते सिंधुदुर्ग अंतर ४५०/५०० किलोमीटर आहे. येथे सुपरफास्ट गाडयांना थांबे देणे गरजेचे असूनही वारंवार या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा नसणाऱ्या गाड्या
१) १२२०१/०२ – कोचुवेली लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
२) १२४३१ /१२४३२ त्रिवंद्रम राजधानी एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
३) १२२२४/२३ एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
४) १२२८३/८४  – हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
५) १२४४९/५०  गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
६) १२२१७/१८ – केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
७) १२९७७/७८  – मारुसागर सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – वीर
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
८) १९५७७/७८ जामनगर तिरुनेलवेली एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
९) १२४८३/८४ अमृतसर कोचुवेली साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – चिपळूण, रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१०) २२६५९/६० ऋषिकेश कोचुवली सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
११ २२४७५/७६ कोईमतूर हिसार एसी सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- चिपळूण, रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१२) २०९२३/२४  गांधीधाम तिरुनवेली हमसफर एक्स्प्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१३) २०९०९/१० कोचुवेली पोरबंदर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१४) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१५) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम  सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
 सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर 
संस्थापक सदस्य, कोकण रेल्वे

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search