Category Archives: महाराष्ट्र

मुंबई आणि ठाण्यात लवकरच दिसणार केबल टॅक्सी

   Follow us on        

मुंबई: रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जबरदस्त प्लान बनवत आहेत. मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात रस्ते वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी एमएमआर क्षेत्रात भविष्यात केबल टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. केबल टॅक्सी प्रकल्प हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सध्या युरोपियन देशांमध्ये केबल टॅक्सी सेवा सुरू आहे. बंगळुरूतील रोप वे वाहतुकीचा अभ्यास करुन अहवाल तयार केला जाणार आहे. याच्या मदतीनेच मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात कुठेही केबल टॅक्सी कुठेच सुरु नाही. केबल बोर्न टॅक्सी ही रोप वे प्रमाणे काम करेल. यामध्ये एका वेळी 15-20 प्रवाशांची वाहतूक करता येईल. हा प्रकल्प मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमएमआरडीए) च्या अंतर्गत नसून राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या अंतर्गत असेल असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आपण मेट्रो चालवू शकलो तर केबल टॅक्सी चालवायला काहीच हरकत नाही, कारण रोप वे बांधण्यासाठी आपल्याला जास्त जमीन लागणार नाही असेही असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

सरनाईक यांच्या आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही केबल टॅक्सी हे वाहतुकीचे उत्तम साधन असल्याचे सांगितले होते. केबल टॅक्सी पॉड टॅक्सी म्हणूनही ओळखली जाते. केबल टॅक्सी वीज आणि सोलर एनर्जीवर चालते. हे वाहतुकीचे अतिशय पर्यावरणपूरक साधन आहे.

 

 

 

Per Capita Income: राज्यात कोकणच ‘श्रीमंत’

   Follow us on        
Per Capita Income: दरडोई उत्पन्नात कोकण विभागाने नेहमीप्रमाणे आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. २०२३-२४ वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
कोकण प्रदेशात सर्वाधिक दरडोई उत्पन्न ३,६४,६६८ रुपये एवढे आहे, जे इतर प्रदेशांच्या तुलनेत लक्षणीयरित्या जास्त आहे. मुंबई आणि ठाणे यासारख्या शहरांच्या समावेशामुळे या भागात दरडोई उत्त्पन्न जास्त आहे.
तर पुणे २,७७,४५३ रुपये दरडोई उत्पनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर नागपूर विभाग २,२५,७५५ रुपये दरडोई उत्पन्नासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही दोन्ही महाराष्ट्रातील प्रमुख नागरी आणि औद्योगिक केंद्रे आहेत.
महाराष्ट्रातील प्रदेशांमध्ये लक्षणीय आर्थिक असमानता आहे. पश्चिमी प्रदेश (कोकण, पुणे) साधारणपणे जास्त उत्पन्न दाखवतात नाशिकचे  दरडोई उत्पन्न १,९७,२२७ रुपये ईतके आहे तर अमरावती विभागातील दरडोई उत्पन्न  तुलनेने कमी म्हणजे १,४५,९१७ रुपये आहे. संभाजीनगर १,७३,५३३ रुपये उत्पन्नासह मध्यम श्रेणीत आहे.

कोकण विभागात जास्त दरडोई उत्पन्न दाखवत असले तरी येथेही जिल्ह्या जिल्ह्यांत मोठी असमानता आहे. मुंबई आणि मुंबईला चिटकून असलेले जिल्ह्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र जस जसे तळकोकणच्या दिशेने जायला लागलो तर हा विकास कमी कमी होत झालेला लक्षात येतो.

Ladki Bahin Yojana : खुशखबर ,लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात

   Follow us on        

Ladki Bahin Yojana Installment: मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार या वर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणं सहावा हप्ता मिळणार आहे.

डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिना अखेर मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणं अधिवेशन संपल्यानंतर 1500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आला आहे.

किती महिलांना मिळणार लाभ मिळणार? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्यानं ती पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल.

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर महायुतीनं मोठी घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणं मिळणार आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल, अशी स्थिती आहे.

नवनिर्वाचित मंत्र्यांना दालनांचे आणि बंगल्यांचे वाटप.. कोणाला कुठला बंगला? यादी वाचा….

 

   Follow us on        

मुंबई : फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्याबरोबर दालनांचे वाटपही लगोलग करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयातील दालने नेमून दिली आहेत.

फडणवीस सरकारचा १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार झाला असून मंत्रिमंडळात एकूण ३३ मंत्री आणि ६ राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री, राज्यमंत्र्यांना खालीलप्रमाणे कार्यालयीन वाटप करण्यात आले आहे.

कुणाला कुठला बंगला

 

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप अखेर जाहीर, गृहखाते अखेर कोणाकडे? पाहा संपूर्ण यादी

   Follow us on        

नागपूर: आताची मोठी बातमी समोर येत आहे, अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडेच गृहमंत्रालय असणार आहे. . तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व गृह निर्माण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

कोणाला कोणतं खातं?

देवेंद्र फडणवीस – गृह

अजित पवार – अर्थ

एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

गणेश नाईक – वन मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा

पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा

दादा भुसे – शालेय शिक्षण

गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

संजय राठोड – मृद व जलसंधारण

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

जयकुमार रावल – विपणन, शिष्टाचार

अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण

अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक

शंभुराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

माणिकराव कोकाटे – कृषी

दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

संजय सावकारे – कापड

संजय शिरसाट – सामाजिक न्याय

प्रताप सरनाईक – वाहतूक

भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन

मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

आकाश फुंडकर – कामगार

बाबासाहेब पाटील – सहकार

प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

योगेश कदम – गृहराज्य शहर

पंकज भोयर – गृहनिर्माण

Mumbai Breaking News: मुंबईहून एलिफंटाकडे जाणारी बोट समुद्रात उलटली!

   Follow us on        

Mumbai Boat Collapse Incident : मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथून एलिफंटा लेण्यांकडे निघालेली निलकमल बोट खोल समुद्रात उलटल्याची धक्कादायक घटना घडलीय. नौदलाच्या स्पीड बोटीने नीलकमल बोटीला थेट धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. बोटीत एकूण 100 हून अधिक पर्यटक प्रवास करत होतो. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर 101 जणांचा जीव वाचवण्यात यश आलंय. या घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाकडून तातडीनं बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. मृतांमध्ये तीन नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असून इतर 10 जण नीलकमल बोटीतील प्रवासी असल्याचं समजते. तर मृतांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून प्रवाशांनी भरगच्च भरलेली बोट एलिफंटाला निघाली होती. बोट एलिफंटाच्या दिशेनं जात असताना भारतीय नौदलाची एक स्पीड बोट समुद्रात सुसाट फेऱ्या मारत होती. ही बोट समुद्रातून वेगाने जात असताना पुन्हा यु टर्न घेऊन मागच्या दिशेने आली. त्याचदरम्यान समुद्रात प्रवास करत असलेल्या या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिली आणि हे भयानक दृष्य कॅमेरात कैद झाले.

 

 

“राणेंना संपवता संपवता…..” नितेश राणे यांच्या शपथविधीनंतर निलेश राणे यांची ती पोस्ट चर्चेत

   Follow us on        

नागपुर:महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सत्ताधारी महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा आजच पार पाडला. अपेक्षेप्रमाणे कणकवली मतदारसंघातील भाजपचे आमदार यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी एक पोस्ट ‘एक्स’ माध्यमावर पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय आहे ती पोस्ट?    

तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली.

राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा…

आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल.

जय महाराष्ट्र!

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश? कोकणाला किती मंत्रीपदे? वाचा यादी!

   Follow us on        

Maharashtra Cabinet list: नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज (15 डिसेंबर) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये शपधविधी सोहळा पार पडलाा. ज्यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ज्यामध्ये भाजपच्या 20, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली

भाजपचे मंत्री

देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री

  1. चंद्रशेखर बावनकुळे
  2. राधाकृष्ण विखे-पाटील
  3. चंद्रकांत पाटील
  4. गिरीश महाजन
  5. गणेश नाईक
  6. मंगलप्रभात लोढा
  7. जयकुमार रावल
  8. पंकजा मुंडे
  9. अतुल सावे
  10. अशोक उईके
  11. आशिष शेलार
  12. शिवेंद्रराजे भोसले
  13. जयकुमार गोरे
  14. संजय सावकारे
  15. नितेश राणे
  16. आकाश फुंडकर
  17. माधुरी मिसाळ (राज्यमंत्री)
  18. पंकज भोयर (राज्यमंत्री)
  19. मेघना बोर्डिकर (राज्यमंत्री)

शिवसेनेचे मंत्री

एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री

  1. गुलाबराव पाटील
  2. दादा भुसे
  3. संजय राठोड
  4. उदय सामंत
  5. शंभूराज देसाई
  6. संजय शिरसाट
  7. प्रताप सरनाईक
  8. भरतशेठ गोगावले
  9. प्रकाश आबिटकर
  10. आशिष जैस्वाल (राज्यमंत्री)
  11. योगेश कदम (राज्यमंत्री)

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री

अजित पवार – उपमुख्यमंत्री

  1. हसन मुश्रीफ
  2. धनंजय मुंडे
  3. दत्तात्रय भरणे
  4. आदिती तटकरे
  5. माणिकराव कोकाटे
  6. नरहरी झिरवाळ
  7. मकरंद पाटील
  8. बाबासाहेब पाटील
  9. इंद्रनील नाईक (राज्यमंत्री)

कोकणाला ५ मंत्रीपदे
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोकणातील ५ आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली आहेत. उदय सामंत, नितेश राणे, भरत गोगावले, आदिती तटकरे, योगेश कदम यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची आज सावंतवाडीत महत्त्वाची बैठक

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीची आज महत्त्वाची बैठक सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदीर, सावंतवाडी येथे सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानकातील समस्या, अपूर्ण अवस्थेत असलेले सावंतवाडी टर्मिनस, प्रवाश्यांच्या समस्या आदी विषयांवर चर्चा होणार असून या बैठकीत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी अध्यक्ष/सचिव यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

Mumbai Goa Highway: महामार्गाची डेडलाईन पुन्हा घसरली

   Follow us on        

पळस्पे ते इंदापुर डीसेबंर २०२४ अखेरपर्यंत शक्य नाही पुलाचे कामही बंद

रायगड प्रतिनीधी:-गणेश नवगरे: महाराष्ट्र राज्यातिल लोकसभा निडणुकीपुर्वी मुबंई गोवा राष्ट्रिय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत २०२४ पर्यंत पुर्ण हो़ईल व महामार्गाचे काम हे युध्दपातळीवर सुरू असल्याचे आश्वासने कोकणातील सर्व पक्षाच्या नेते मंडळीनीं आपल्या भाषणशैलीतुन जनतेला दिली होती.माञ सध्या सुरू असेले महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असुन या संदर्भमार्गावरील अनेक पुलांची कामे अध्याप अपुर्णच आहेत या महामार्गवरील कामे पुर्ण होण्यास कमीत कमी तीन ते चार वर्ष लागण्याची शक्यता दिसुन येत आहे.

मुबंई गोवा महामार्गावरील वडखळ पर्यंतचे काम पुर्ण झाले आहे: माञ नागेठणे, कोलाड, पुई,माणगाव येथील प्रमुख पुलांचें काम अर्धवट आहे. पळस्पे ते इंदापुर हा तब्बल ८४ किलोमीटरचा रस्ता सर्वात तापदायक होता.याचे दोन टप्प्यात विभाजन केल्यानतंर पळस्पे ते कासू पर्यंत काम होत आले आहे. माञ त्या नतंर काम पुर्ण ठप्प झाले आहे.

माणगाव बायपासचे काम न केल्याने ठेकेदार ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामादरम्यान १०० वॉर्डन्स लावण्यासदंर्भात राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे.त्याच्या पुढच्या रसत्याचे काम हे एल एन टीकडे असुन बहुतांश काम पुर्ण झाले आहे.

मुबंई गोवा महामार्गाचे काम हे २०१० पासुन संथ गतीने सुरू आहे. ठेकेदारांच्या निष्काळजीमुळे महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाचे काम होण्यासाठी कोकणकरांच्या जनआक्रोष समितीने माणगाव येथेआमरणऊपोषण केले होते याची दख़्खल प्रशासनानी घेतली होती,तसेत माणगाव येथे प्रशासकिय कार्यालयाला पञ देऊन दिंडीही काढण्यात आली होती.विषेश बाब म्हणजे स्वता बांधकाम मंञी रविंद्र चव्हाण यांनी तब्बल ५ वेळा पहाणी दौराही केला होता त्याच बरोबर कोकणकरांना दिलासा देण्यासाठी निवडणुकी पूर्वी स्वता मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनीही माणगाव पर्यंत पहाणी केली होती. जनआक्रोष या महामार्गाबाबत सतत पाठपुरावा करत असुन मिळतात फक्त खोट्या डेडलाईन ञस्त कोकणकर पुन्हा आंदोलनाच्या मार्गावर असुन पुढिल नियोजना बाबत सद्या जनआक्रोषची चर्चा सुरू आहे.या बाबत जनआक्रोष कडुन वारंवार सांगण्यात

येत आहे कि रोज आपघात होत आहेत परंतु अपघात ग्रस्तांना शासनाची कुठलिही मदत त्या परीवाराला मिळत नाही. दळवणालाही मोठा फटका बसतआहे. सुरूवातिला मुबंई गोवा महामार्ग हा ‘बिओटी तत्वावर बांधला जाणार होता; माञ प्रधानमंञी नरेद्रं मोदी हे पंतप्रधान झाल्यानतंर या महामार्गासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करुन दिला आहे परंतु दोन चार ठेकेदारांनी पळ काढल्याने महामार्गाचे काम रखडले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मंञ्यानी अनेकदा खंत व्यक्त केली आहे.

इंदापुरपर्यंत महामार्ग मार्च महीण्यापर्यंत पुर्ण होईल यासाठी आमचा प्रयत्न राहील ८४ किलोमिटर मार्गावरील १० किलोमिटरचे काम शिल्लक आहे हे काम प्रगतीपथावर आहे आमटेम,नागोठणे,कोलाड, पुई, आणि पुढे इंदापूर येथिल काही कामच्या टप्प्याचा समावेश आहे. महामार्गासाठी निधीही पुरेसा उपलब्ध आहे.”

-श्री यशवंत घोटकर-प्रकल्प संचालक,राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search