Category Archives: कोकण रेल्वे

कोकणवासीयांना गणेशोत्सवाची मोठी भेट! नवी मुंबई ते चिपी विमानसेवा लवकरच….

   Follow us on        

मुंबई: मुंबईत राहणाऱ्या तमाम कोकणवासीयांसाठी यंदाचा गणेशोत्सव अधिक आनंददायी ठरणार आहे. मुंबई किंवा नवी मुंबईतून कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी प्रवाशांना सध्या रस्ते किंवा रेल्वेने तब्बल ७ ते ८ तासांचा खडतर प्रवास करावा लागतो. मात्र, आता हा प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार असून प्रवासी फक्त १ तासात थेट कोकणात पोहोचू शकणार आहेत. आगामी १५ ऑगस्टपासून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट विमानसेवा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

​आमदार नितेश राणे यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत अधिकृत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, १५ ऑगस्टपूर्वी ‘फ्लाय ९१’ (Fly91) ही विमान कंपनी चिपी ते नवी मुंबई या मार्गावर आपली सेवा सुरू करणार आहे. या सेवेच्या यशानंतर, लवकरच ‘इंडिगो’ (IndiGo) विमान कंपनीची सेवाही या मार्गावर उपलब्ध करून दिली जाईल. गेल्या दोन वर्षांपासून मुंबई ते सिंधुदुर्ग ही थेट विमानसेवा तांत्रिक कारणांमुळे बंद होती. त्यामुळे मुंबई-ठाण्यात राहणाऱ्या चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी केवळ रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागत होते. आता थेट नवी मुंबईतून सेवा सुरू होत असल्याने प्रवाशांचा मोठा त्रास वाचणार आहे.

​नवी मुंबई विमानतळावरून सिंधुदुर्गसाठी विमानसेवा सुरू झाल्याने प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे, ज्याचा थेट फायदा स्थानिक चाकरमान्यांसह पर्यटकांनाही होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अथांग समुद्रकिनारे, सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग यांसारखे ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि मालवणच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. तसेच, कोकणात नवीन उद्योग आणि गुंतवणूक आणण्यासाठी उद्योजकांचा वेळ वाचेल, ज्यामुळे स्थानिक रोजगाराला मोठी गती मिळेल.

मडगाव-वेलंकणी एक्सप्रेस मडगाव ऐवजी सावंतवाडीतून सुरू करावी

   Follow us on        

वेंगुर्ले:

मडगाव-वेळांकणी एक्सप्रेस (गाडी क्र. १७३१५) ही रेल्वे मडगावऐवजी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी भाजपचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, पूर्वीप्रमाणे सावंतवाडी रोड स्थानकावर या गाडीला अतिरिक्त डबे जोडण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यात यावी.

​आठवड्यातून एकदा धावणारी ही गाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या वेळांकणी येथील यात्रेसाठी सिंधुदुर्गातून हजारो भाविक जात असतात. मात्र, २०२२ पासून सावंतवाडी स्थानकावर अतिरिक्त डबे जोडण्याची सुविधा बंद करण्यात आल्यामुळे सध्या भाविकांना मडगावपर्यंत जाऊन ही ट्रेन पकडावी लागते. यामुळे त्यांचा वेळ, पैसा वाया जात असून मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी ही रेल्वे सावंतवाडीतूनच सुरू करावी किंवा पूर्वीसारखी डबे जोडण्याची सोय करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देताना विष्णू उर्फ पप्पू परब यांच्यासोबत सायमन आल्मेडा उपस्थित होते.

Konkan Railway: तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेसची सीएसएमटी ‘वापसी’ ची प्रतिक्षा वाढली

   Follow us on        

मुंबई:

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या महत्त्वपूर्ण कामामुळे मध्य रेल्वेने काही प्रमुख गाड्यांच्या ‘शॉर्ट टर्मिनेशन’ (नियोजित स्थानकापूर्वीच प्रवास संपवणे) कालावधीत ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या विकासकामांचा थेट परिणाम मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांवर होणार आहे.

​या बदलांनुसार, गाडी संख्या २२१२० मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी ‘तेजस एक्स्प्रेस’ (Tejas Express) २ ऑगस्ट २०२६ पर्यंत सीएसएमटीऐवजी दादर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल, म्हणजेच ही गाडी दादरपर्यंतच धावेल. यासोबतच, गाडी संख्या १२१३४ मंगळुरू जंक्शन ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ४ ऑगस्ट २०२६ पर्यंत ठाणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार असून, प्रवाशांना ठाणे स्थानकावरच उतरावे लागेल.

​मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, या पायाभूत सुविधांच्या विकासकामामुळे प्रवाशांना होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी या बदलांची योग्य नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या तीन गाड्यांच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ

   Follow us on        

मुंबई:

कोकण आणि दक्षिण भारताकडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे (Permanent Augmentation of Coaches) जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

​या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार असून, त्यांना आरक्षणासाठी जादा जागा उपलब्ध होणार आहेत.

​कोणत्या गाड्यांमध्ये आणि कधीपासून होणार बदल?

१. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – मडगाव जंक्शन – एक्सप्रेस (गाडी क्र. ११0९९ / १११००)

​बदल: या गाडीत एक ‘३ टियर एसी’ (3 Tier AC) डबा वाढवण्यात आला आहे. यामुळे आता गाडीमधील एकूण डब्यांची संख्या २२ वरून २३ झाली आहे.

​कधीपासून लागू?

​गाडी क्र. ११0९९ (LTT ते मडगाव) – १७ जुलै २०२६ पासून.

​गाडी क्र. १११०० (मडगाव ते LTT) – १८ जुलै २०२६ पासून.

​२. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – करमळी – एक्सप्रेस (गाडी क्र. २२११५ / २२११६)

​बदल: या गाडीत देखील एक ‘३ टियर एसी’ (3 Tier AC) डबा वाढवून एकूण डब्यांची संख्या २२ वरून २३ करण्यात आली आहे.

​कधीपासून लागू?

​गाडी क्र. २२११५ (LTT ते करमळी) – २३ जुलै २०२६ पासून.

​गाडी क्र. २२११६ (करमळी ते LTT) – २३ जुलै २०२६ पासून.

​३. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – एरनाकुलम जंक्शन – दुरंतो एक्सप्रेस (गाडी क्र. १२२२३ / १२२२४)

​बदल: या अतिवेगवान गाडीत एक ‘२ टियर एसी’ (2 Tier AC) आणि एक ‘३ टियर एसी’ (3 Tier AC) असे एकूण २ अतिरिक्त डबे वाढवण्यात आले आहेत. यामुळे गाडीची एकूण डब्यांची क्षमता २२ वरून थेट २४ झाली आहे.

​कधीपासून लागू?

​गाडी क्र. १२२२३ (LTT ते एरनाकुलम) – १८ जुलै २०२६ पासून.

​गाडी क्र. १२२२४ (एरनाकुलम ते LTT) – १९ जुलै २०२६ पासून.

प्रवाशांनी या गाड्यांच्या सुधारित वेळेसाठी आणि थांब्यांच्या सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी. तसेच कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी ‘KR Mirror App’ डाऊनलोड करावे, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Konkan Railway: आरपीएफची मोठी कारवाई; सीसीटीव्हीच्या मदतीने ३.५ लाखांच्या मुद्देमालासह तीन चोरट्यांना अटक

   Follow us on        

गोवा:

कोकण रेल्वेच्या थिविम रेल्वे स्टेशनवर रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. स्टेशन परिसरात संशयास्पद रित्या फिरणाऱ्या तीन आरोपींना आरपीएफ जवानांनी तत्परता दाखवत रंगेहात ताब्यात घेतले. या आरोपींकडून तब्बल १५ महागडे मोबाईल फोन आणि ५ लॅपटॉप असा एकूण ३.५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. थिविम हे गोव्यातील एक अत्यंत महत्त्वाचे स्टेशन असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आरपीएफच्या चोख नजरतेमुळे या चोरांचा डाव उधळून लावण्यात यश आले.

​मंगळवारी स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना आरपीएफ कर्मचाऱ्यांना काही जणांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. या आरोपींकडे चोरीच्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याचे कॅमेऱ्यात स्पष्ट झाल्यानंतर, आरपीएफ आउटपोस्टच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना वेढा घातला आणि पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिघांनाही अटक केली. या धडक कारवाईनंतर आरपीएफने पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी तीनही आरोपींना जप्त केलेल्या मालासह अंजुना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सध्या अंजुना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या टोळीची कसून चौकशी सुरू आहे.

​कोकण रेल्वे प्रशासनाने आरपीएफ जवानांच्या या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे. आरपीएफच्या ‘#सदारसेवा’ या उपक्रमांतर्गत रेल्वे क्षेत्रातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अशा कारवाया सातत्याने केल्या जात आहेत. सीसीटीव्ही तंत्रज्ञान आणि जवानांची सतर्कता यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, प्रवाशांनीही प्रवास करताना आपल्या साहित्याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

गणेशोत्सव २०२६: यावर्षी कोकण रेल्वेने गावी जाणार असाल तर ही बातमी वाचाच

   Follow us on        

गणेशोत्सव हा संपूर्ण कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो. दरवर्षी लाखो चाकरमानी बाप्पाच्या आणि गौरीच्या उत्सवासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून न चुकता आपल्या कुटुंबासह गावी जात असतात. यंदा २०२६ मध्ये सोमवार, १४ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वे मार्गावरील ‘कोकणकन्या एक्सप्रेस’, ‘मांडवी एक्सप्रेस’, ‘तुतारी’ आणि ‘मत्स्यगंधा’ यांसारख्या नियमित गाड्यांचे आगाऊ तिकीट आरक्षण चालू झाले आहे. नियमित गाड्यांचे तिकीट मिळवण्यासाठी दरवर्षी मोठी चुरस पाहायला मिळत असल्याने चाकरमान्यांना आतापासूनच तयारी करावी लागणार आहे.

​यंदा शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी श्रावणी अमावस्या सकाळी ८:५६ वाजता संपत आहे, त्यामुळे चाकरमानी मोठ्या संख्येने याच रात्री गावाकडे निघण्याची शक्यता आहे. या ११ सप्टेंबरच्या प्रवासासाठीचे रेल्वे आरक्षण १३ जुलै रोजी सकाळी सुरू होणार आहे. त्यानंतर १२ आणि १३ सप्टेंबर (शनिवार व रविवार) रोजीच्या प्रवासासाठी नियमित गाड्यांचे तिकीट आरक्षण अनुक्रमे १४ जुलै आणि १५ जुलै रोजी खुले केले जाईल. रेल्वेचे हे आरक्षण प्रवासाच्या ६० दिवस आधी उपलब्ध होत असल्याने प्रवाशांना वेळेत तिकीट बुक करावे लागेल.

​यासोबतच, कोकणात गौरीच्या सणासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्याही खूप मोठी असते. यंदा गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी गौरी आगमन असून शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी गौरीपूजन आहे. त्यामुळे १८ सप्टेंबरच्या महत्त्वाच्या दिवशी गावात पोहोचण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या नियमित गाड्यांच्या आरक्षणासाठी प्रवाशांची मोठी झुंबड उडण्याची चिन्हे आहेत. या १७ सप्टेंबरच्या प्रवासाचे आरक्षण १९ जुलै रोजी सुरू होणार आहे. जर प्रवाशांना या नियमित गाड्यांचे तिकीट मिळाले नाही, तर त्यांना नंतर मध्य व कोकण रेल्वेकडून सोडल्या जाणाऱ्या विशेष (स्पेशल) गाड्यांवर अवलंबून राहावे लागेल. म्हणूनच कोकणवासीयांनी आरक्षणाच्या या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवून वेळेत आपले नियोजन करणे फायदेशीर ठरेल.

खुशखबर! मुंबई – मंगुळुरु एक्सप्रेससह सावंतवाडी स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मंजूर

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना अखेर यश!

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

कोकणातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आता ३ प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांना नवीन थांबा (Stoppage) मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातील मंजुरी दिली असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

‘या’ ३ गाड्यांना मिळाला थांबा:

सावंतवाडी रोड स्थानकावर आता खालील गाड्या थांबतील:

१. गाडी संख्या १२१३३/१२१३४: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – मंगळुरू एक्स्प्रेस

२. गाडी संख्या १२४३१/१२४३२: तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस

३. गाडी संख्या १२२०१/१२२०२: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्स्प्रेस

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

जनसामान्यांच्या सुविधेसाठी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांना थांबा मिळवा, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च २०२६ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पत्राद्वारे विनंती केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने ७ जुलै २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी करून या तिन्ही गाड्यांच्या थांब्याला मंजुरी दिली आहे.

संघटनेच्या विविध माध्यमांतील प्रयत्नांना अखेर यश!

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रमुख गाड्या थांबवण्यात याव्यात, यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) ने विविध माध्यमातून मोठा पाठपुरावा केला होता. संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली, विविध स्तरांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना मागण्यांची निवेदनेही देण्यात आली होती. यासोबतच, या मागणीला जनआंदोलनाचे रूप देण्यासाठी समितीने सोशल मीडियाचाही पुरेपूर वापर करून प्रवाशांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला. संघटनेच्या याच चौफेर प्रयत्नांची आणि जनभावनेची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली आहे.

कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या हितासाठी मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या वतीने परिसरातील सर्व सन्माननीय खासदार, आमदार आणि पालकमंत्री यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधींच्या खंबीर पाठपुराव्यामुळेच प्रवाशांच्या मागण्यांना यश आले असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

​या यशाबद्दल खासदार श्री. नारायण राणे साहेब, श्री. श्रीकांत शिंदे, श्री. नरेश म्हस्के, आणि श्रीमती मेधाताई कुलकर्णी, पालकमंत्री श्री. नितेश राणे, आमदार श्री. दीपक केसरकर, आमदार श्री. रवींद्र चव्हाण, आमदार श्रीमती सुलभा गायकवाड ताई, आमदार श्री. कुमार आयलानी, आणि आमदार श्री. बाळा नर आदींचे संघटनेच्या वतीने लोकप्रतिनिधींचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

​”आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे. भविष्यातही प्रवासी बांधवांच्या हितासाठी आणि हक्कासाठी आपले असेच मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत राहील, हा विश्वास आहे.”

— कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी

​या यशस्वी प्रयत्नांमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून या लोकप्रतिनिधींचे कौतुक होत आहे.

 

Konkan Railway: पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत; प्रवाशांचे मोठे हाल

   Follow us on        

Konkan Railway:गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या बहुतांश एक्सप्रेस गाड्या तीन ते सहा तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विलंबाचा सर्वाधिक फटका ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ला बसला आहे. ही गाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल सात तास उशिराने पोहोचली असून, गेल्या आठ दिवसांपासून तिचे उशिरा धावणे सुरूच आहे. याव्यतिरिक्त तुतारी एक्सप्रेस (५ तास), मांडवी एक्सप्रेस (५ तास) आणि दिवा एक्सप्रेस (६ तास) या गाड्याही मोठ्या विलंबाने धावत आहेत. या गाड्या रात्री उशिरा कोकणातील स्थानकांवर पोहोचणार असल्याने, पुढील प्रवासासाठी प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे.

या प्रमुख गाड्यांसोबतच वंदे भारत, जनशताब्दी, कोचुवेली, नेत्रावती, आणि मंगला एक्सप्रेस यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही अडीच ते साडेपाच तासांचा विलंब होत आहे. मात्र, या सर्व गोंधळात प्रवाशांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला असणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम झालेला नाही. मुंबईकडे जाणारी तुतारी, जनशताब्दी, कोकणकन्या, मडगाव-एलटीटी आणि दिल्लीला जाणारी मंगला एक्सप्रेस या सर्व गाड्या आपल्या निर्धारित वेळेनुसारच धावत आहेत.

Vaibhavwadi Kolhapur Railway Line: डेडलाईन धोक्यात; भूसंपादन अजूनही कागदावरच!

   Follow us on        

विशेष प्रतिनिधी, कोल्हापूर:

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे प्रकल्प’ सध्या प्रशासकीय लालफितीच्या कारभारामुळे पूर्णपणे रखडला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून साकारल्या जाणाऱ्या या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या डिसेंबर अखेरीस दिले होते. मात्र, या आदेशाला तब्बल सात महिने उलटून गेले तरी प्रत्यक्ष जमिनीवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या प्रकल्पाची २०२८ ची डेडलाईन केवळ कागदावरच राहणार का, असा संतप्त सवाल स्थानिक जनतेतून विचारला जात आहे.

​ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि निधीची मंजुरी:

या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाचा विचार कोकण रेल्वेच्या उभारणीच्या काळापासूनच सुरू होता. २०१६ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मिरज येथील परिषदेत या मार्गावर एकमत झाले. त्यांनी ३,२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची घोषणा करत २०१७ च्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूदही केली होती. त्यानंतर अनेक वर्षे हा प्रकल्प थंड बस्त्यात होता. अखेर २०२३ मध्ये ‘पीएम गतिशक्ती’ उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठी ३,४११ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी मिळाली. मात्र, निधी आणि मंजुरी उपलब्ध होऊनही प्रशासकीय पातळीवरील कमालीच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प पुढे सरकलेला नाही.

​रेल्वे मार्गाचे स्वरूप आणि स्थानके:

१०७ किलोमीटर लांबीचा हा नियोजित रेल्वेमार्ग सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या गावांना जोडणारा आहे. हा मार्ग वैभववाडी रेल्वे स्थानक, सोनाळी, कुसूर, कुंभारी, उंबर्डे, मांगवली, उपळे, ऐनारी या सिंधुदुर्गातील गावांमधून पुढे सैतवडे, कळे, भुये, कसबा बावडा, मार्केटयार्ड मार्गे कोल्हापूर असा असेल. या संपूर्ण मार्गावर एकूण १० स्थानके, ५ उड्डाणपूल आणि २६ बोगदे असणार आहेत. परंतु, रेल्वेमार्ग नेमका कुठून जाणार आणि स्थानके कुठे असतील, याबाबत प्रशासनाकडून अद्याप स्पष्टता न मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

​आर्थिक क्रांतीला ब्रेक आणि विकासाला फटका:

हा लोहमार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची आवक स्वस्त होईल. तसेच कोकणातील हापूस आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि मत्स्य उत्पादनांची थेट व जलद वाहतूक पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत करणे सुलभ होणार आहे. यामुळे वैभववाडी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या व्यापार-उदीमात मोठी क्रांती घडू शकते आणि पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. परंतु, सध्याच्या कूर्मगती कारभारामुळे स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला मोठी खीळ बसली असून, प्रशासनाने आता वेळ न घालवता तातडीने भूसंपादन सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

Konkan Railway: महिला राखीव डब्यात हुल्लडबाजी करणार्‍या तरुणांवर खेड स्थानकावर आरपीएफची कारवाई

   Follow us on        

Konkan Railway: एर्नाकुलम–हजरत निजामुद्दीन मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसच्या (गाडी क्रमांक १२६१८) महिला राखीव डब्यात बेकायदेशीरपणे प्रवेश करून हुल्लडबाजी करणाऱ्या हुल्लडबाज तरुणांविरोधात कोकण रेल्वे प्रशासनाने खेड रेल्वे स्थानकावर तातडीने मोठी धडक कारवाई केली आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) मदतीने संबंधित तरुणांना डब्यातून बाहेर काढून त्यांच्यावर रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​प्राथमिक माहितीनुसार, काही तरुणांनी महिला राखीव डब्यात बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. हे तरुण डब्यात सिगारेट ओढत होते आणि गुटखा खाऊन धूर व दुर्गंधी पसरवत होते. या हुल्लडबाजीमुळे आणि त्रासामुळे डब्यातील महिला प्रवाशांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा गंभीर प्रकार समोर आला.

​या घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी तातडीने दखल घेत रेल्वे सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधला. ट्रेन रोहा स्थानक पार करून पुढे निघून गेल्यामुळे, पुढील प्रमुख स्थानक असलेल्या खेड रेल्वे स्थानकावर कारवाईची आखणी करण्यात आली. गाडी खेड स्थानकात दाखल होताच तेथे आधीपासूनच सज्ज असलेल्या रेल्वे पोलिसांच्या पथकाने महिला डब्याला चहुबाजूने वेढा घातला.

​पोलिसांना पाहताच डब्यातील काही हुल्लडबाजांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी सर्वांना जागीच ताब्यात घेतले. या वेळेवर झालेल्या धडक कारवाईमुळे संभाव्य अनुचित प्रकार टळला असून महिला प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला असून, तत्परतेने पावले उचलणाऱ्या पोलीस प्रशासनाचे आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search