Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: ऐन पावसाळ्याच्या सुरवातीला कोकण रेल्वे मार्गावर धावणार एकेरी विशेष गाडी; विस्टाडोम कोचही जोडण्यात येणार

   Follow us on        
Konkan Railway: कोकणचे पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य प्रवाशांना अनुभवता यावे यासाठी कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने एक एकेरी विशेष गाडीची घोषणा केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर दिनांक १४/०६/२०२५ रोजी रेल्वे प्रशासनाने एक एकेरी One Way ही विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. चेअर कार,  सेकंड सीटिंग या डब्यांसोबत निसर्गसौदर्य पाहण्यासाठी या गाडीला एक विस्टाडोम कोचही जोडण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक ०११७१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन एकेरी विशेष गाडी दिनांक  १४/०६/२०२५ रोजी सकाळी ७:३५ वाजता मुंबई सीएसएमटीहून सुटेल  त्याच दिवशी रात्री १२:३० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचतील.
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना: एकूण १६ एलएचबी कोच: व्हिस्टा डोम – ०१ कोच, चेअर कार – ०३ कोच, सेकंड सीटिंग – १० कोच, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१.

Konkan Railway: खुशखबर! यंदाच्या गणेशचतुर्थीला रेल्वेने कार सुद्धा नेता येईल; कोकण रेल्वे नवीन सुविधा सुरु करण्याच्या तयारीत

   Follow us on        
Car RoRo Serviice on Konkan Railway: कोकण मार्गावर कारसाठी रोरो सेवा चालू करण्याचा आपला प्रयत्न असून या उपक्रमाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभल्यास ही सेवा यांच्या गणेश चतुर्थीला चालू करण्यात येणार असल्याची माहिती कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे चेअरमेन आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी मंगळवारी बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या प्रधान कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. एका फेरीत किमान ४० गाड्यांची वाहतूक करण्यासाठी बुकिंग केल्यास ही सेवा चालू करता येईल असे ते पुढे म्हणालेत.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीय मोठ्या संख्येने चारचाकी वाहनांसह गावाकडे जातात, पण खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कोकण रेल्वे आता प्रवासी गाड्यांबरोबर हलक्या वाहनांसाठी रो-रो सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. यामुळे कोकणवासीयांच्या कार आणि इतर हलकी वाहने रेल्वे मार्गे गावापर्यंत पोहोचवता येतील. कोकण रेल्वेला ट्रकच्या रो-रो आणि मालवाहतूक सेवेतून सर्वाधिक उत्पन्न मिळते. आता हलक्या वाहनांसाठी ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा फायदा होईल.
मुंबई ते कोकण रस्त्याची स्थिती गेल्या अनेक दशकांपासून सुधारलेली नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनते. रो-रो सेवेमुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन प्रवास सुलभ होईल. मुंबईतील कोकणी व्यक्ती रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे रेल्वेला प्राधान्य देतात आणि आता रो-रो सेवेमुळे गाड्या असणाऱ्यांना अधिक सोय मिळेल. कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संतोष कुमार झा यांनी सांगितले की, रो-रो सेवेचा आराखडा पूर्ण झाल्यानंतर किती वाहने वाहून नेली जाऊ शकतील, याबाबत स्पष्टता येईल.
कोकण रेल्वेला प्रवासी सेवेपेक्षा मालवाहतूक आणि रो-रो सेवेतून अधिक उत्पन्न मिळते. हलक्या वाहनांसाठी ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना आणि रेल्वेला दोघांनाही फायदा होईल. ही सेवा विशेषतः सणांच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी बनवेल. रो-रो सेवेमुळे रस्त्यावरील ताण कमी होईल आणि कोकणवासीयांना त्यांच्या गावी जाण्यासाठी एक नवीन, सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.

Konkan Railway: पावसाळ्यात मुंबई गोवा वंदेभारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढविणे अशक्य – मध्य रेल्वे

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून सहा दिवस धावणारी २२२२९/३० मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस पावसाळयात आठवड्यातून तीनच दिवस धावते. तर आठवड्यातून चार दिवस धावणारी ११०९९/१११०० एलटीटी मडगाव एक्सप्रेस पावसाळ्यात दोनच दिवस धावते. जास्त मागणी असणाऱ्या या दोन्ही गाड्यांच्या फेऱ्यांत कपात केल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना खासकरून खेड, कणकवली, सावंतवाडी, थिवीम इत्यादी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या गाड्यांच्या फेऱ्यात कपात करू नये अशी विनंती कोकण विकास समितीतर्फे मध्य रेल्वे प्रशासनाला ई-मेल द्वारे दिलेल्या निवेदनात करण्यात आली होती.
 २२२२९/३० मुंबई – मडगाव एक्सप्रेस या गाडीला अतिरिक्त रेक उपलब्ध करून देऊन पावसाळ्यात सुद्धा ही गाडी आठवड्यातून सहा दिवस चालविण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती. मात्र हा अतिरिक्त रेक उभा करून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेने आपल्या उत्तरात कळविले आहे. (Due to stabling constraints it is not feasible) तर ११०९९/१११०० एलटीटी मडगाव एक्सप्रेस ही गाडी पावसाळ्यात आठवड्यातून चार दिवस चालविणे ही मागणी पूर्ण करणे कोकण रेल्वे च्या कक्षेत येते असे उत्तर देण्यात आले आहे. (Increase is frequency of this train during mansoon, matter pertains to Konkan Railway)
पावसाळ्यात फेऱ्यांत कपात करण्यात येणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या 
वेळापत्रक बदलल्या मुळे रेक अभावी काही गाड्यांच्या फेऱ्या कमी कराव्या लागतात. जसे की सकाळी सीएसएमटी वरून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा तोच रेक दुपारी मडगाव वरून सीएसएमटी साठी वापरला जातो. मात्र पावसाळी हंगामात गाड्यांचा वेग धीमा होत असल्याने तोच रेक समान दिवशी वापरता येत नाही. साहजिकच दुसऱ्या दिवशी मडगाव वरून सीएसएमटी साठी  तो रेक वापरला जातो. या कारणामुळे आठवड्यातून ६ दिवस धावणारी  ही गाडी पावसाळी हंगामात फक्त तीनच दिवस चालविण्यात येणार आहे. या कारणाने अजून काही  गाड्यांच्या फेऱ्यात कपात केली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे.
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
३) 22229 /22230  Mumbai CSMT – Madgaon – Mumbai CSMT Vande Bharat Express
22229 CSMT MADGAON VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे.
22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका एक्सप्रेस गाडीच्या संरचनेत बदल करण्यात आला असल्याची माहीत कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ट्रेन क्रमांक १६३३६ / १६३३५ नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल साप्ताहिक एक्सप्रेसच्या रचनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही गाडी सध्या २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, जनरल – ०४, पॅन्ट्री कार -०१,जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१ असे मिळून एकूण २२ एलएचबी डब्यांसहित धावत आहे. मात्र या गाडीचा एक स्लीपर डबा कमी करून त्या जागी २ टियर एसी श्रेणीचा एक डबा जोडला जाणार आहे. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची सुधारित रचना खालील प्रमाणे असेल
२ टियर एसी – ०२ , ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०७, जनरल – ०४, पॅन्ट्री कार -०१,जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ एलएचबी डबे.
दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ पासून ही गाडी सुधारित संरचनेसह धावणार आहे.

Konkan Railway: कमी गाड्यांपासून अधिक उत्पन्न! सावंतवाडी स्थानकावर अधिक गाड्यांना थांबे मिळणे गरजेचे, प्रवासी संघटनेचे खासदारांना निवेदन

   Follow us on        
सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी टर्मिनस या स्थानकावर १२१३३/३४ मुंबई मंगुळुरु एक्सप्रेसला थांबा मिळावा आणि सावंतवाडी टर्मिनसचा ‘अमृत भारत स्थानक योजना’  अंतर्गत विकास करावा या मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने (सावंतवाडी) लोकसभा खासदार रवींद्र वायकर यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवले आहे.
सावंतवाडी हे कोकण रेल्वे मार्गावरील एक महत्वाचे स्थानक आहे. या स्थानकावरून प्रतिदिवसी सरासरी २१०० प्रवासी प्रवास करतात. मात्र येथील प्रस्तावित टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे काम निधीअभावी अपूर्ण असून येथे सध्याची गरज पाहता खूपच कमी गाडयांना थांबे देण्यात आले आहेत. टर्मिनसचे काम पूर्ण करून या टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार कै. प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्याची मागणीही दुर्लक्षित राहिली आहे..
या स्थानकावर सध्या अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि टर्मिनस लाईनची गरज आहे. तसेच निवारा शेड, पाण्याची व्यवस्था, प्लॅटफॉर्मवरील बैठक व्यवस्था, पुरेशी प्रकाश योजना तसेच फूटओव्हर ब्रिज या सुविधांची गरज आहे. या स्थानकाचा ‘अमृत भारत स्थानक योजनेत सहभाग केला गेल्यास या सुविधा प्राप्त होण्यास अडचण येणार नाही. त्यामुळे या मागणीचा विचार करण्यात यावा अशी विनंती प्रवासी संघटनेकडडून करण्यात आली आहे.
कमी गाड्यांपासून जास्त उत्त्पन्न
या स्थानकावर गर्दीच्या वेळी म्हणजे संध्याकाळी आणि रात्री (मुंबईच्या दिशेने जाताना) फक्त २ दैनिक आणि  ३ साप्ताहिक गाडयांना थांबे देण्यात आले आहेत. या वेळेत इथे अधिक गाडयांना थांबे असणे आवश्यक आहे. तुतारी एक्सप्रेस आणि कोकणकन्या एक्सप्रेस या दोन दैनिक गाड्या या वेळेत मुंबईच्या दिशेने रवाना होतात.  आकडेवारी पाहता या दोन्ही गाड्यांना या स्थानकापासून खूप चांगले उत्त्पन्न मिळते. तुतारी एक्सपेसला  या गाडीला मिळणार्‍या एकूण उत्पन्नाच्या २२% उत्त्पन्न तर कोकणकन्या एक्सप्रेसला तिच्या एकूण उत्पन्नाच्या १५% उत्त्पन्न सावंतवाडी स्थानकापासून प्राप्त होते. माहितीच्या आकडेवारीनुसार मिळवण्यात आलेल्या माहितीनुसार सावंतवाडी स्थानकावरून स्लीपर श्रेणीतून ५०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरासाठी प्रत्येक गाडीत प्रतिदिन ४० प्रवासी प्रवास करतात. रेल्वे स्थानकांचे व्यावसायिक स्वरूप ठरविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिनांक १६.०६.२००५ च्या दिलेल्या कसोटीनुसार Criteria ही संख्या जास्त आहे.
ही आकडेवारी या स्थानकाचे महत्व सांगून जाते, तसेच ईथे अधिक गाड्यांना थांबा असण्याची गरज देखील अधोरेखित करते. माननीय खासदारांनी या गोष्टी विचारात घेऊन आपल्या या मागणीला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. pacer height=”20px”]

Konkan Railway: चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या उन्हाळी विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        
Konkan Railway: उन्हाळी हंगामासाठी गावी गेलेले चाकरमानी आता परतीच्या मार्गाला लागले आहेत. मात्र प्रवाशांचा ओघ वाढल्याने गर्दी होऊन त्यांचा प्रवास त्रासदायक होत आहे. ही गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणाऱ्या एका साप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी विशेष गाडी म्हणून कोकण रेल्वे मार्गावर  धावणाऱ्या गाडी क्रमांक गाडी क्र. ०११०४ / ०११०३  मडगाव  – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव उन्हाळी विशेष या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधी धावत असलेल्या वेळापत्रकानुसार आणि डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.
गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक २५/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला आता ०८ जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर रविवारी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (टी) -मडगाव साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक २६/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला आता ०९ जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर सोमवारी एलटीटी वरुन ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:४० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३ कोच, थ्री टायर इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

Konkan Railway: राजापूर रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबे मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री पुढे सरसावले

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबे मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे सरसावले आहेत. गाडी क्रमांक 12051/12052 जन्मशताब्दी एक्सप्रेस आणि 16345/16346 नेत्रावती एक्सप्रेस या दोन गाड्यांना राजापूर स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी केली होती. या मागणीला बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन गाडयांना या स्थानकावर थांबा देण्याची मागणी करणारे निवेदन केंदीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना लिहून पाठवले आहे.

मुख्यमंत्री या निवेदनात लिहितात….

विषय: राजापूर रोड रेल्वे स्टेशन, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र येथे गाड्यांना थांबा मंजूर करण्याची विनंती.

प्रिय श्री. अश्विनी वैष्णव जी,

कोकण रेल्वेवरील राजापूर रोड रेल्वे स्टेशन हे कोकणातील नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेल्या भागांच्या जवळ आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एक अत्यंत लोकसंख्येच्या क्षेत्राला सेवा देत आहे. हे स्टेशन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, आंबा आणि काजू व्यापाऱ्यांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे.

सांगली जिल्ह्यातील आमदार सदाभाऊ खोत यांनी खालील गाड्यांमध्ये गाड्यांना राजापूर येथे थांबा देण्याची मागणी केली आहे.

१. १२०५१ /१२०५२ मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस

२. १६३४५ /१६३४६ नेत्रावती एक्सप्रेस

मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही राजापूर रोड रेल्वे स्थानकावरील थांब्याच्या या मागणीवर विचार करण्यासाठी रेल्वे बोर्डाला सूचना द्याव्यात.

हार्दिक शुभेच्छा,

आपला विनम्र.

(देवेंद्र फडणवीस)

Sindhudurg: जिल्ह्यात ४३ गावांत दरडी कोसळण्याचा धोका, कोकण रेल्वे, राज्य, राष्ट्रीय महामार्गावर मार्गावरील ही ठिकाणेही धोकादायक

   Follow us on        
सिंधुदुर्ग : आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामार्फत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार एकूण ४३ गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय कोकण रेल्वे मार्ग व राज्य, राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी दरड कोसळते, अशी ठिकाणेही प्रशासनाने निश्चित केली आहे.
यात सावंतवाडी तालुक्यातील गाळेल इन्सुली, आंबोली, मळेवाड, वेत्ये, कणकवली तालुक्यात रांजणगाव, खुर्द, कुंभवडे, फोडा, वैभववाडी तालुक्यात नाध वडे, करुळ-भट्टीवाडी, दिंडवणेवाडी-धनगरवाडी, वेंगुर्ले तालुक्यात तुळस काजरमळी, तुळस रेवटीवाडी, तुळस वाघोसेवाडी, वायंगणी डोमवाडी, म्हापण, कोचरा, मोचेमाड घाट, तुळस, रामघाट रोड, बडखोल, निवती मेढा, देवगड तालुक्यातील मोर्वे, नारिग्रे, दहिबाव, पाळेकरवाडी, पोयरे, मुणगे, खुडी, कुवळे, तोरसोळे, सादशी, गढीताम्हाणे, कुडाळ तालुक्यातील वालावल, कवठी, नेरुर कर्याद नारुर, घोटगे, दुर्गानगर, भरणी, मालवण, वरचीवाडी, गावठणवाडी, खालची गावडेवाडी, अशा एकूण ४३ गावांचा समावेश आहे. सर्वेक्षणानुसार या गावांत दरड कोसळण्याची शक्यता आहे.
राज्य, राष्ट्रीय महामार्गावरील दरड प्रवण ठिकाणे 
देवगड उपविभाग-विजयदुर्ग, पडेल जामसंडे, कुणकेश्वर आचरा-मालवण-रेवस रेवंडी रस्ता (प्रमुख राज्यमार्ग) देवगड निपाणी रस्ता राक्षस घाटी (राज्यमार्ग) वैभववाडी उपविभाग-गगनबावडा, मुईबावडा खारेपाटण रस्ता भुईबावडा घाट (राज्यमार्ग) पडेल वाघोटण तळेरे गगनबावडा कोल्हापूर रस्ता-करुळ घाट (राष्ट्रीय महामार्ग), कणकवली उपविभाग-देवगड निपाणी रस्ता फोंडाघाट पडेल वाघोटन तळेरे रस्ता (राज्यमार्ग) सावंतवाडी उपविभाग वेंगुर्ले-सावंतवाडी-आंबोली बेळगाव-आंबोली घाट (राष्ट्रीय महामार्ग.)
कोकण रेल्वे मार्गावरील दरडग्रस्त ठिकाणे 
वैभववाडी-लाडवाडी अॅप्रोच कटिंग, गोपालवाडी अॅप्रोच डिप कटिंग, चिंचवली डिप कटिंग, बेर्ले टनेल, वैभववाडी आणि देवगड-नापणे कटिंग, देवगड आणि कणकवली-बेळणा, कणकवली आणि कुडाळ-बोर्डवे कटिंग, सावंतवाडी-नेमळे. सद्यस्थितीत या ठिकाणी दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, अति पाऊस झाल्यास या ठिकाणी दरड पडण्याचा धोका संभवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला मुदतवाढ 

   Follow us on        
Konkan Railway: उन्हाळी हंगामासाठी विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या गाडी  क्रमांक ०७३११/०७३१२ वास्को द गामा – मुझफ्फरपूर – वास्को द गामा  या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधी धावत असलेल्या वेळापत्रकानुसार आणि डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.
आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या गाडीची मुदत दिनांक ०५ जून २०२५ रोजी संपत होती तिला आता २६ जून  २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक ०२/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २३/०६/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर – वास्को द गामा साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक ०५/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २६/०६/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल ०९/०६/२०२५ ते २३/०६/२०२५ पर्यंत दर सोमवारी वास्को द गामा येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२:३० वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर जंक्शन – वास्को द गामा साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल. १२/०६/२०२५ ते २६/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी १४:४५ वाजता मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १४:५५ वाजता वास्को द गामाला पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, छे इथं थांबेल. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

कोकण रेल्वेचे विलीनीकरण, दुपदरीकरण आणि इतर विषयांसाठी खासदार रवींद्र वायकर यांची रेल्वे मंत्र्यांशी भेट

   Follow us on        
Konkan Railway:कोकण रेल्वेचे विलीनीकरण, दुपदरीकरण आणि इतर विषयांसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी काल  केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री.अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलून जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ स्टेशन करण्याबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत निवेदन दिले.
याचबरोबर त्यांनी अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत गोरेगाव स्थानकाचा विकास करण्यात यावा तसेच कोकण रेल्वे बोर्डाचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याविषयी चर्चा केली.

खासदार रवींद्र वायकर यांनी दिलेली निवेदने

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search