Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार कोईमतूर – हरिद्वार विशेष एक्सप्रेस

 

   Follow us on        

रत्नागिरी: ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने कोईमतूर – हरिद्वार – कोईमतूर दरम्यान विशेष एक्स्प्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी कोकण रेल्वे मार्गावरून धावणार असल्याने महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रवाशांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.

गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

गाडी क्र. ०६०४३ कोईमतूर – हरिद्वार विशेष: ही ट्रेन बुधवार, २४ डिसेंबर २०२५ रोजी कोईमतूर येथून सकाळी ११:१५ वाजता सुटेल आणि चौथ्या दिवशी म्हणजेच २७ डिसेंबर (शनिवार) रोजी मध्यरात्री ००:०५ वाजता हरिद्वारला पोहोचेल.

गाडी क्र. ०६०४४ हरिद्वार – कोईमतूर विशेष: ही ट्रेन मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजी हरिद्वार येथून रात्री २२:३० वाजता सुटेल आणि चौथ्या दिवशी म्हणजेच ०२ जानेवारी २०२६ (शुक्रवार) रोजी पहाटे ०४:०० वाजता कोईमतूरला पोहोचेल.

प्रमुख थांबे:

ही गाडी प्रवासादरम्यान पालघाट, शोरनूर, कोझिकोड, कन्नूर, मंगळुरू जंक्शन, उडुपी, कुंदापुरा, मुकांबिका रोड बिंदूर, कारवार, मडगाव जंक्शन, थिवी, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, वसई रोड, उधना, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, मथुरा, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद आणि रुरकी या स्थानकांवर थांबेल.

गाडीची संरचना (Composition):

या विशेष ट्रेनला एकूण १८ एलएचबी (LHB) कोच असतील, ज्यामध्ये:

  • ३ टायर एसी: १० डबे
  • ३ टायर एसी इकॉनॉमी: ०२ डबे
  • स्लीपर क्लास: ०४ डबे
  • जनरेटर कार: ०१
  • एसएलआर (SLR/D): ०१

प्रवाशांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

तत्काळ बुकिंगला आता ‘OTP’ अनिवार्य; कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन गाड्यांसाठी नियम लागु

   Follow us on        

Southern Railway: भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे (Southern Railway) विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि दलालांकडून होणारा तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता दक्षिण रेल्वेतून सुटणाऱ्या ३० प्रमुख गाड्यांच्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ‘ओटीपी’ (OTP) पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.

​काय आहे नवीन नियम?

​आतापर्यंत ऑनलाइन तत्काळ बुकिंगसाठी काही प्रमाणात सुरक्षितता होती, मात्र आता आरक्षण खिडकी (PRS Counter) आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म या दोन्ही ठिकाणी हा नियम लागू असेल.

​जेव्हा प्रवासी तिकीट बुक करतील, तेव्हा त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.

​हा ओटीपी सांगितल्याशिवाय किंवा सिस्टममध्ये एंटर केल्याशिवाय तिकीट कन्फर्म होणार नाही.

​हा नियम दलालांना रोखण्यासाठी आणि खऱ्या प्रवाशांना तिकिटे उपलब्ध करून देण्यासाठी लागू करण्यात आला आहे.

​या ३० गाड्यांमध्ये होणार बदल (प्रमुख गाड्या):

१. १२००७ एमजीआर शताब्दी चेन्नई सेंट्रल

२. १२०२७ चेन्नई – बेंगळुरू शताब्दी चेन्नई सेंट्रल

३. १२२२४ एर्नाकुलम – एलटीटी दुरंतो एर्नाकुलम

४. १२२४३ चेन्नई – कोईमतूर शताब्दी चेन्नई सेंट्रल

५. १२२४४ कोईमतूर – चेन्नई शताब्दी कोईमतूर

६. १२२९० चेन्नई – निझामुद्दीन दुरंतो चेन्नई सेंट्रल

७. १२२९३ एर्नाकुलम – नांदेड दुरंतो एर्नाकुलम

८. १२४३१ राजधानी एक्सप्रेस तिरुवनंतपुरम सेंट्रल

९. १२४३३ चेन्नई – निझामुद्दीन राजधानी चेन्नई सेंट्रल

१०. २०६०७ म्हैसूर वंदे भारत चेन्नई सेंट्रल

११. २०६२७ चेन्नई – नागरकोइल वंदे भारत चेन्नई एगमोर

१२. २०६२९ नागरकोइल – चेन्नई वंदे भारत नागरकोइल

१३. २०६३१ मंगळुरू – तिरुवनंतपुरम वंदे भारत मंगळुरू सेंट्रल

१४. २०६३२ तिरुवनंतपुरम – मंगळुरू वंदे भारत तिरुवनंतपुरम सेंट्रल

१५. २०६३३ तिरुवनंतपुरम – कासारगोड वंदे भारत कासारगोड

१६. २०६३४ कासारगोड – तिरुवनंतपुरम वंदे भारत तिरुवनंतपुरम सेंट्रल

१७. २०६४२ बेंगळुरू – कोईमतूर वंदे भारत कोईमतूर

१८. २०६४३ कोईमतूर – चेन्नई वंदे भारत चेन्नई सेंट्रल

१९. २०६४४ चेन्नई – कोईमतूर वंदे भारत कोईमतूर

२०. २०६४६ मंगळुरू – चेन्नई वंदे भारत चेन्नई सेंट्रल

२१. २०९६४ म्हैसूर वंदे भारत चेन्नई सेंट्रल

२२. २०९६५ तिरुनेलवेली वंदे भारत चेन्नई एगमोर

२३. २०९६८ चेन्नई वंदे भारत तिरुनेलवेली

२४. २२६१७ मदुराई – बेंगळुरू वंदे भारत मदुराई

२५. २२६७७ मंगळुरू वंदे भारत चेन्नई सेंट्रल

२६. २२२९७ तिरुवनंतपुरम एसी सुपरफास्ट चेन्नई सेंट्रल

२७. २२२९८ चेन्नई एसी सुपरफास्ट तिरुवनंतपुरम सेंट्रल

२८. २२६७१ तेजस एक्सप्रेस (TLGBS) चेन्नई एगमोर

२९. २२९७२ तेजस एक्सप्रेस (TLGBS) मदुराई

३०. २०६५२ बेंगळुरू वंदे भारत

या गाड्यां मध्ये कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांपैकी १२२२४ (दुरंतो) आणि १२४३१ (राजधानी) या  प्रमुख गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावतात.

मुंबईचा चाकरमानी ‘वेटिंग’वरच! महापालिका निवडणुकीत कोकण रेल्वेच्या अन्यायाचा हिशोब होणार?

”आम्ही मुंबई घडवली, पण गावी जाताना आम्हालाच वाली कोणी नाही. निवडणुकीत मत मागण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना आता आम्ही जाब विचारणार आहोत.” – एक चाकरमानी

   Follow us on        

मुंबई/रत्नागिरी: गणपती असो वा होळी, कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या तिकिटांसाठी मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्याची होणारी ओढाताण काही नवीन नाही. मात्र, आता हा प्रश्न केवळ प्रवासापुरता मर्यादित न राहता राजकीय वळण घेताना दिसत आहे. “स्वतःच्या हक्काच्या मातीत आणि हक्काच्या रेल्वेत जागा का नाही?” असा संतप्त सवाल आता चाकरमानी विचारू लागला आहे.

जनावरांसारखा प्रवास आणि प्रशासकीय अनास्था

दरवर्षी सणासुदीला कोकण रेल्वेची तिकिटे काही सेकंदात ‘हाऊसफुल्ल’ होतात. परिणामी, हजारो चाकरमान्यांना आपल्या बायका-मुलांसह जनरल डब्यात अक्षरशः कोंबून, जनावरांसारखा प्रवास करावा लागतो. आरक्षित तिकीट न मिळाल्याने आणि खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडल्याने, रेल्वेचा हा ‘कष्टप्रद’ प्रवास चाकरमान्यांच्या पाचवीलाच पुजला आहे.

या निवडणुकीत ‘कोकण कार्ड’ चालणार?

मुंबईत कोकणी मतदारांचा टक्का मोठा असून अनेक प्रभागांमध्ये ते किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. आतापर्यंत केवळ ‘भावी नगरसेवक’ म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांना चाकरमान्यांच्या या डोळ्यातील पाण्याची जाणीव होणार का?

जो आमच्या प्रवासाची सोय करेल, त्यालाच आमचे मत,” अशी भूमिका अनेक चाकरमानी संघटनांनी घेतल्याचे समजते. मात्र हीच भावना सर्वच चाकरमान्यांचा मनात रुजणे गरजेचे आहे.

प्रमुख प्रश्न जे आजही अनुत्तरित आहेत:

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण संथ गतीने का सुरू आहे?

सणासुदीला जाहीर होणाऱ्या स्पेशल गाड्यांचे नियोजन ऐनवेळी का केले जाते?

कोकणकरांना त्यांचे हक्काचे टर्मिनस कधी भेटणार?

दक्षिणेकडील राज्यात जाणार्‍या गाड्यांत खूपच कमी कोटा उपलब्ध होत आहे. कोकणात टर्मिनस नसल्याने कोकणातील जनतेच्या हक्काच्या गाड्या मिळत नाहीत. त्यामुळे अजूनही त्यांना कोकणातील आपल्या गावी जाताना खूप हालअपेष्टा सहन करून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे टर्मिनस होणे ही तमाम कोकण करांची ईच्छा आहे.

सावंतवाडी टर्मिनसचे अस्तित्व नाकारणाऱ्या झा यांचा धिक्कार! टर्मिनससाठी कोकण रेल्वे संस्थापकीय सदस्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

मराठी माणसाला आणि नेत्यांना याची चीड का येत नाही?”

   Follow us on        

बेलापूर/सावंतवाडी: कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक (CMD) संतोष कुमार झा यांनी सावंतवाडी टर्मिनसच्या अस्तित्वाबाबत दिलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः कोकणात संतापाची लाट उसळली आहे. “सावंतवाडी टर्मिनस अस्तित्वातच नाही,” असे विधान करून झा यांनी केवळ कोकणवासीयांचाच नव्हे, तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केल्याचा आरोप होत आहे.

नेमका वाद काय?
नुकत्याच एका मुलाखतीत संतोष कुमार झा यांनी सावंतवाडी टर्मिनसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या टर्मिनसचे उद्घाटन स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, त्याबद्दल असे विधान करणे हा राजकीय नेतृत्वाचा आणि कोकण रेल्वेसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे बोलले जात आहे.

या संदर्भात संताप व्यक्त करताना कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री सुरेंद्र नेमळेकर म्हणाले की, “ज्या कोकण रेल्वेसाठी महाराष्ट्राने जमिनी दिल्या, ज्यांच्या पैशावर ही रेल्वे उभी राहिली, तिथेच परप्रांतीय अधिकारी येऊन महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. मराठी माणसाला आणि नेत्यांना याची चीड का येत नाही?”

प्रमुख मागण्या आणि आरोपांचे स्वरूप:
अधिकारी शाहीचा उद्धटपणा: परप्रांतीय अधिकारी महाराष्ट्रात येऊन येथील प्रकल्पांना नाकारत आहेत, हा महाराष्ट्राच्या विद्वत्तेचा आणि अस्मितेचा अपमान आहे.

नोकरभरतीत अन्याय: कोकण रेल्वेमध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांची भरती केली जात असून महाराष्ट्राला गाड्यांच्या बाबतीतही सापत्न वागणूक मिळत आहे.

सावंतवाडी टर्मिनसचे नामकरण: दिवंगत मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सावंतवाडी टर्मिनसचे नाव ‘मधु दंडवते टर्मिनस’ करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी.

२६ जानेवारीला आमरण उपोषणाचे हत्यार
संतोष कुमार झा यांच्या विधानाचा निषेध म्हणून आणि सावंतवाडी टर्मिनसच्या मागणीसाठी श्री नेमळेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

“जर २१ जानेवारी २०२६ पर्यंत सावंतवाडी टर्मिनसचे काम प्रत्यक्ष सुरू झाले नाही, तर २६ जानेवारीला बेलापूर येथील कोकण रेल्वे भवनासमोर मी आमरण उपोषणाला बसणार आहे.”

ज्येष्ठ नागरिक आणि मधु दंडवते यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांनी सर्व राजकीय पक्ष, प्रवासी संघटना आणि मराठी माणसाला या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “मंत्र्यांना झोपायचे असेल तर झोपू द्या, पण एक नागरिक म्हणून अन्यायाविरुद्ध एकत्र या,” अशी साद यावेळी घालण्यात आली आहे.

सोशल मीडियावर मोहिमेचे आवाहन
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी हा संदेश जास्तीत जास्त व्हायरल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून उपोषणाची वेळ येण्यापूर्वीच सरकार आणि रेल्वे प्रशासन खडबडून जागे होईल.

तब्बल २७ बोगदे असलेल्या कोकण रेल्वेसारख्या अजून एका रेल्वेमार्गाला गती मिळणार

   Follow us on        

Sindhudurg: तब्बल 28 कि.मी. लांबीचे एकूण 27 बोगदे आणि रस्त्यावरील 55 उड्डाणपूल असणाऱ्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करा, असे आदेश गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून होणार्‍या या मार्गासाठी राज्य सरकारच्या हिश्श्याची तरतूद करा, असेही आदेश त्यांनी दिले. या निर्णयामुळे पावणेदहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या मार्गाला अखेर चालना मिळाली आहे.

निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा मार्ग आहे. सर्वात मोठा बोगदा 3.96 कि.मी. लांबीचा आहे. 2 कि.मी.पेक्षा जादा लांबीचे 3, तर त्यापेक्षा कमी लांबीचे 24 बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील 55 उड्डाणपूल, रस्त्याखालील 68 पूल असतील. यासह छोटे पूल 74, तर मोठे पूल 55 असतील. या मार्गावर एकूण 10 स्थानकेही प्रस्तावित केली आहेत.

विधानभवनातील मंत्री परिषदेच्या सभागृहात बंदरे विकास विभागाची आढावा बैठक झाली, या बैठकीत कोकणातील जयगड, आंग्रे, रेडी व विजयदुर्ग या बंदरांचा विकास करण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाची गरज आहे, असे सांगत फडणवीस म्हणाले, हा रेल्वे मार्ग केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून उभारला जाणार आहे. याकरिता या मार्गासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाची तरतूदही करा, असेही आदेश त्यांनी दिले. बैठकीस मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आदींसह अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या निर्णयाची माहिती मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. हा निर्णय केवळ कोकणासाठी नव्हे, तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या रेल्वे मार्गामुळे विकासाची असंख्य दालने उघडणार आहेत. प्रामुख्याने कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या वाहतुकीला चालना मिळेल. पर्यटनात वाढ, पूर आणि भूस्खलनाच्या काळात दळणवळणाची पर्यायी सुविधा म्हणून हा मार्ग उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

27 बोगदे, 55 उड्डाणपूल

या मार्गावर 28 कि.मी. लांबीचे एकूण 27 बोगदे असतील. यासह रस्त्यावरील 55 उड्डाणपूल आहेत. निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा मार्ग आहे. सर्वात मोठा बोगदा 3.96 कि.मी. लांबीचा आहे. 2 कि.मी.पेक्षा जादा लांबीचे 3, तर त्यापेक्षा कमी लांबीचे 24 बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील 55 उड्डाणपूल, रस्त्याखालील 68 पूल असतील. यासह छोटे पूल 74, तर मोठे पूल 55 असतील. या मार्गावर एकूण 10 स्थानकेही प्रस्तावित केली आहेत.

Christmas Special: कोकण रेल्वे मार्गावर अजून एका गाडीची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेशी समन्वय साधून खालील विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत:

​गाडी क्र. ०८२४१ / ०८२४२ बिलासपूर – मडगाव जं. – बिलासपूर एक्स्प्रेस स्पेशल

​गाडी क्र. ०८२४१ बिलासपूर – मडगाव जं. एक्स्प्रेस स्पेशल

​प्रस्थान: बिलासपूर येथून दर शनिवारी दुपारी १४:४५ वाजता.

​प्रवासाच्या तारखा: २० आणि २७ डिसेंबर २०२५, तसेच ०३ आणि १० जानेवारी २०२६.

​पोहोचणार: मडगाव जंक्शन येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ०२:१५ वाजता.

​गाडी क्र. ०८२४२ मडगाव जं. – बिलासपूर एक्स्प्रेस स्पेशल

​प्रस्थान: मडगाव जंक्शन येथून दर सोमवारी पहाटे ०५:३० वाजता.

​प्रवासाच्या तारखा: २२ आणि २९ डिसेंबर २०२५, तसेच ०५ आणि १२ जानेवारी २०२६.

​पोहोचणार: बिलासपूर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी १६:०० वाजता.

थांबे (महाराष्ट्र आणि कोकण भागातील महत्त्वाचे):

​गाडी क्र. ०८२४१ आणि ०८२४२ चे महत्त्वाचे थांबे खालीलप्रमाणे आहेत:

​०८२४१ (बिलासपूर – मडगाव): नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी स्थानके.

​०८२४२ (मडगाव – बिलासपूर): वरील सर्व स्थानके आणि इगतपुरी स्थानकावर अतिरिक्त थांबा असेल.

​डब्यांची रचना (Composition):

​एकूण १८ LHB डब्बे:

​एसी २ टायर: ०१

​एसी ३ टायर: ०८

​एसी ३ टायर इकोनॉमी: ०२

​स्लीपर: ०२

​जनरल: ०३

​SLR/D: ०१

​जनरेटर कार: ०१

​तिकिट आरक्षण:

​गाडी क्र. ०८२४२ साठीचे आरक्षण १४/१२/२०२५ रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार डॉ. आंबेडकर नगर – ठोकूर विशेष एक्सप्रेस

   Follow us on        

Konkan Railway: ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने डॉ. आंबेडकर नगर (DADN) आणि ठोकूर (TOK) (मंगळूर जवळ) दरम्यान विशेष भाड्यावर विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या या विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

ट्रेन क्र. ०९३०४: डॉ. आंबेडकर नगर – ठोकूर विशेष

​प्रस्थान: रविवार, २१ आणि २८ डिसेंबर २०२५ रोजी.

​वेळ: डॉ. आंबेडकर नगर येथून संध्याकाळी १६:३० वाजता सुटणार.

​आगमन: ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ०३:०० वाजता ठोकरू येथे पोहोचेल.

ट्रेन क्र. ०९३०३: ठोकूर – डॉ. आंबेडकर नगर विशेष

​प्रस्थान: मंगळवार, २३ आणि ३० डिसेंबर २०२५ रोजी.

​वेळ: ठोकूर येथून सकाळी ०४:४५ वाजता सुटणार.

​आगमन: ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १५:३० वाजता डॉ. आंबेडकर नगर येथे पोहोचेल.

​महत्त्वाचे थांबे 

​प्रवाशांच्या सोयीसाठी, ही विशेष एक्स्प्रेस दोन्ही दिशांना खालील प्रमुख स्थानकांवर थांबेल:

​इंदूर जं., देवास, उज्जैन जं., नागदा जं., रतलाम जं., वडोदरा जं., भरूच जं., सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव जं., काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकर, मूकांबिका रोड बायंदूर (हॉल्ट), कुंदापुरा, उडुपी, मुलकी आणि सुरतकल.​

गाडीची रचना (Composition)

​या विशेष गाडीमध्ये प्रवाशांसाठी एकूण २२ एलएचबी (LHB) डबे असणार आहेत,

ज्यामध्ये: ​वातानुकूलित ३ टायर (AC 3 Tier) – १९ डबे, ​वातानुकूलित ३ टायर इकोनॉमी (AC 3 Tier Economy) – ०१ डबा, ​जनरेटर कार (Generator Car) – ०२ डबे

​प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

कोकण रेल्वेचा ‘फुकट्या प्रवाशांना’ दणका: एका महिन्यात २.३३ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल!

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी मोहीम (Ticket Checking Drive) मोठ्या प्रमाणात तीव्र करण्यात आली असून, विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. नोव्हेंबर २०२५ या एका महिन्यात, या मोहिमेतून २.३३ कोटी रुपये दंड आणि भाड्यापोटी वसूल करण्यात आले आहेत.

मोहिमेतील प्रमुख आकडेवारी (नोव्हेंबर २०२५)

​कोकण रेल्वेने नोव्हेंबर २०२५ मध्ये केलेल्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​विशेष तिकीट तपासणी मोहिमा: १,०७०

​अनधिकृत/अनियमित प्रवासी: ४२,९६५

​वसूल झालेली एकूण रक्कम (भाडे आणि दंड): २.३३ कोटी रुपये

​कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून भाडे आणि दंड अशा स्वरूपात ही रक्कम वसूल करण्यात आली आहे.

KRCL चा प्रवाशांना इशारा

​रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी योग्य तिकीट किंवा पास सोबत ठेवावा, अन्यथा तिकीट तपासणी दरम्यान कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा कोकण रेल्वेने दिला आहे. प्रवाशांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.

​प्रवाशांना अधिक चांगल्या आणि सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी कोकण रेल्वेची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणार वडोदरा – कोट्टायम विशेष एक्सपेस

   Follow us on        

Konkan Railway: ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

१) गाडी क्र. 09124 / 09123 वडोदरा जं. – कोट्टायम विशेष गाडी (विशेष भाड्यावर):

गाडी क्र. 09124 (वडोदरा जं. – कोट्टायम स्पेशल)

​प्रस्थान: ही गाडी वडोदरा जं. येथून दर शनिवारी सकाळी ०६:०५ वाजता सुटेल.

​आगमन: कोट्टायम येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:५० वाजता पोहोचेल.

​धावण्याच्या तारखा:

​डिसेंबर २०२५: २० आणि २७

​जानेवारी २०२६: ०३ आणि १०

गाडी क्र. 09123 (कोट्टायम – वडोदरा जं. स्पेशल)

​प्रस्थान: ही गाडी कोट्टायम येथून दर रविवारी रात्री २१:०० वाजता सुटेल.

​आगमन: वडोदरा जं. येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०६:०० वाजता पोहोचेल.

​धावण्याच्या तारखा:

​डिसेंबर २०२५: २१ आणि २८

​जानेवारी २०२६: ०४ आणि ११

महत्वाचे थांबे (दोन्ही दिशांना):

​सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी, मडगाव जं., कारवार, कुमटा, मुरुडेश्वर, भटळ, मूकांबिका रोड बायंदूर (ह), कुंदापुरा, उडुपी, सुरथकल, मंगळूर जं., कासारगोड, कन्नूर, तेलिचेरी, कोझिकोडे, तिरूर, शोरानूर जं., त्रिशूर, आलुवा आणि एरणाकुलम टाऊन स्थानकांवर गाडी थांबेल.

गाडीची रचना (Composition):

​गाडीमध्ये एकूण २१ एलएचबी (LHB) डबे असतील, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​प्रथम श्रेणी वातानुकूलित (First AC) – ०१ डबा

​द्वितीय श्रेणी वातानुकूलित (2 Tier AC) – ०२ डबे

​तृतीय श्रेणी वातानुकूलित (3 Tier AC) – ०६ डबे

​शयनयान (Sleeper) – ०६ डबे

​सामान्य (General) – ०४ डबे

​एसएलआर/डी (SLR/D) – ०१ डबा

​जनरेटर कार (Generator Car) – ०१ डबा

सावंतवाडी टर्मिनस प्रकरणी कोकण रेल्वे सीएमडींच्या वक्तव्याने नव्याने वाद

   Follow us on        

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाला ‘टर्मिनस’चा दर्जा देण्याच्या दीर्घकाळ रखडलेल्या प्रकल्पात आता नव्याने वाद निर्माण झाला आहे. कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (CMD) संतोष कुमार झा यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत “हे स्थानक टर्मिनस नसून फक्त वे-साईड स्टेशन आहे. ‘टर्मिनस’ हे नाव कसे पडले? याचा पुरावा द्या,” अशी थेट मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

सावंतवाडी टर्मिनसच्या कामातील विलंब आणि सुविधांबाबत सतत पाठपुरावा करणारे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे नेते मिहीर मठकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अलीकडेच संतोष कुमार झा यांची भेट घेतली होती. या चर्चेदरम्यान स्थानकाच्या दर्जा, कामातील उशीर आणि पुढील कार्यवाही यावर बोलताना झा यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यामुळे स्थानकाच्या नावाचा दर्जा, प्रकल्प रेंगाळण्याची कारणे आणि प्रशासकीय दृष्टिकोनावरून नव्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.

या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त करत मिहीर मठकर यांनी म्हटले आहे, “वरिष्ठ अधिकारीच अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील तर सामान्य नागरिकांनी काय अपेक्षा ठेवाव्या? हा प्रकल्प वर्षानुवर्षे रखडला आहे, आणि आता दर्जाच नाकारला जातोय.” तसेच, पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पार्श्वभूमी:

कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड स्थानकाला टर्मिनस म्हणून विकसित करण्याची योजना २०१५ पासून आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत भूमिपूजनही झाले होते. मात्र, भूसंपादन, निधी आणि इतर कारणांमुळे काम रखडले आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांसाठी अतिरिक्त थांबे, मेंटेनन्स सुविधा आणि इतर सोयी अपेक्षित आहेत. कोकण रेल्वेच्या काही अधिकृत जुन्या घोषणांमध्ये याला ‘टर्मिनस’ म्हणून उल्लेख आहे, पण सध्याच्या विकासात ते मधले स्थानक (मिड-स्टेशन) म्हणूनच विकसित झाल्याचे सांगितले जाते.

हा वाद आता रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. स्थानिक खासदार-आमदार आणि संघटनांकडून पाठपुरावा वाढवला जाणार असून, लवकरच आंदोलनाची रूपरेषा आखली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search