Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway Merger: कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाचा अट्टाहास, सामान्य युवकांच्या लढाईला मुख्यमंत्र्यांची साथ..!!

– ‎अवघ्या २० महिन्यात केलेल्या कामांना थेट मुख्यमंत्र्यांकडून पोच.

   Follow us on        

‎सुरुवात ऑगस्ट २०२३, ज्या प्रकारे सावंतवाडी टर्मिनस संदर्भात सावंतवाडीतील काही तरुणांनी आवाज उठवायला सुरुवात केली होती त्याच वेळी कोकणातील इतर ठिकाणी ही कोकण रेल्वेत असणाऱ्या गैरसुविधांबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती, कारण होते तिकिटांचा काळाबाजार, गाड्यांना होणारा ३ ते ४ तासाचा विलंब आणि गणेशोत्सव काळात उडणारा रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार, कोकणात टर्मिनस नसल्याने बाप्पा जरी कोकणात येत असला तरी गाड्या मात्र उत्तरेत गुजरातला आणि दक्षिणेत मंगलोर पर्यंत सोडल्या जात होत्या आणि आहेत. कोकणी चाकरमानी रेल्वेने आपल्या गावी येताना असंख्य त्रासाला सामोरे जायचा.कोकणी माणसाने या प्रकल्पासाठी आपली जमीन कवडीमोलाने दिली खरी परंतु त्याचा बदलीला मिळाले काय तर फक्त शेळ्या मेंढरा सारखा प्रवास..

‎जसा टर्मिनस संदर्भातील आवाज वाढत गेला तसा टर्मिनस उभारण्याकरिता कोकण रेल्वे कडे निधी नाही ही वास्तविकता समोर आली, फक्त टर्मिनसच नाही तर काही ठिकाणी दोन प्लॅटफॉर्म जोडणारे ब्रीज (FOB) नाहीत, तर काही ठिकाणी निवारा शेडच नाही, छोट्या स्थानकांवर तर प्लॅटफॉर्म देखील नाहीत. दरवर्षी रेल्वे करिता हजारो कोटींचा निधी अर्थसंकल्पात जाहीर होत असताना कोकणात ह्या साध्या साध्या परंतु आवश्यक असणाऱ्या गोष्टींकडे रेल्वे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष कोकणी माणसाला पचनी पडत नव्हते, यावेळी मात्र मुंबईतील व कोकणातील काही युवकांकडून सोशल मीडियावर प्रशासनाला विचारणा करण्यात आली, परंतु याचे खरे कारण काही कळत नव्हते.पुढे माहितीच्या अधिकाराचा वापर करून या युवकांनी याबाबतची पुरेपूर माहिती गोळा केली,व थेट कोकण रेल्वेच्या जन्मापर्यंत येऊन पोचले. तेच म्हणजे “बांधा वापरा आणि हस्तांतरित करा”.

कोकण रेल्वे मार्गावर असणाऱ्या या असुविधांबद्दल एक ठोस कारण निघाले ते म्हणजे कोकण रेल्वे महामंडळ. संपूर्ण देशात असणारी रेल्वे आणि कोकणात असणारी रेल्वे ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत हे प्रथमदर्शनी लक्षात आले,संपूर्ण देशात धावणारी रेल्वे ही भारतीय रेल्वेचा भाग असून कोकणातील रेल्वे ही ४ राज्ये आणि रेल्वे मंत्रालयाने मिळून बनविलेल्या महामंडळाच्या अधिकाराने चालते हे समजले, त्यात अती महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशाच्या अर्थसंकल्पात कोकण रेल्वे महामंडळाला निधीची थेट तरतूद होत नाही हे स्पष्ट झाले.सबब त्याचा परिणाम कोकणातील रेल्वे संदर्भातील विकासकामांवर पडला, त्याच कारणाने सावंतवाडी टर्मिनस तब्बल १० वर्षे अर्धवट स्थितीत रखडले आहे.खरे कारण कळल्यावर हे महामंडळ कोकण विकासाच्या उरावर तर बसले नाही ना असा सवाल कोकणी जनतेला पडू लागला. त्यातच केंद्राने अमृत भारत स्थानक योजना जाहीर केली.परंतु कोकणवासीयांचे दुर्दैव असे की कोकणातील एकाही स्थानकाचा समावेश या योजनेत केला गेला नाही.कारण होते हे महामंडळ, आणि त्याचा कारभार.

‎जेव्हा हे कळून चुकले की महामंडळ हे आपण तोट्यात आहे हे कारण दाखवून आपल्या जबाबदारीला टाळत आहे, या महामंडळावर ६ हजार कोटींचे कर्ज आहे हे समजल्यावर मात्र या युवकांनी अनेक प्रवासी संघटनांना जागे केले, सावंतवाडीतून कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे मिहिर मठकर, सागर तळवडेकर, भूषण बांदिवडेकर,मुंबईतून कोकण विकास समितीचे अक्षय महापदी, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे राजू कांबळे, महामार्ग जनआक्रोश चे संजय सावंत, कृती समितीचे मनोज सावंत,अखिल कोकणचे तानाजी परब, निसर्गरम्य संगमेश्वर चे संदेश जिमन आदी युवकांनी अनेक संघटनांना एकत्र करून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची स्थापना केली.

‎सावंतवाडी प्रवासी संघटनेकडून तत्कालीन शिक्षण मंत्री व आमदार श्री दीपक केसरकर यांची २६ डिसेंबर २०२३ रोजी भेट घेण्यात आली, त्याला प्रतिसाद म्हणून लगेच शिक्षणमंत्र्यांनी ही बाब रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेउन कानावर टाकली आणि विलीनीकरणाला वाचा फोडली, त्याच जोडीला तत्कालीन केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार श्री नारायण राणे साहेबांनी देखील ०३ जानेवारी २०२४ रोजी माध्यमांशी बोलताना हे महामंडळ कर्जाच्या खाईत आहे त्यामुळे कोकणातील रेल्वे विकास या महामंडळाकडून होऊ शकत नाही असे स्पष्ट केले, व याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हायला हवे अशी भूमिका जाहीर केली. त्यानंतर तत्कालीन खासदार श्री विनायक राऊत यांनी २०२४ सालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे अशी मागणी संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात केली. हीच ती वेळ जेव्हा कोकणातील तत्कालीन मंत्री, आमदार, खासदारांनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली होती. दरम्यान ०९ सप्टेंबर २०२३ व ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबईस्थित कोकण विकास समितीचे श्री अक्षय महापदी यांनी विलीनीकरण संदर्भात आवश्यक आणि अभ्यासपूर्ण असे निवेदन तयार करून ते रेल्वेमंत्री, वित्तमंत्री, मुख्यमंत्री आदींना पाठवले होते. २६ जानेवारी २०२४ रोजी सावंतवाडी संघटनेकडून सावंतवाडी स्थानकावर हजारो लोकांचा उपस्थितीत परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे यासाठी आंदोलन करण्यात आले, या आंदोलनाला कोकण रेल्वेचे विलिनीकरण व्हावे या मुद्द्यावर रेल्वे एम्प्लॉयीज युनियनच्या श्री उमेश गाळवणकर यांनी पाठिंबा दर्शविला.या आंदोलनाने कोकण रेल्वेचे विलीनीकरण का आवश्यक आहे हे कोकणवासीयांना समजले गेले.

‎यानंतर झालेली लोकसभा निवडणूक, पदवीधर निवडणुकीत देखील या युवकांनी सोशल मिडिया, वृत्तपत्रे, इतर प्रसार माध्यमांचा पुरेपूर वापर करून जनजागृती केली. त्यातच कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे श्री राजू कांबळे यांनी ठाणे येथे कोकण पदवीधर निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोकणासाठी विलीनीकरण का महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. त्यानंतर नवनियुक्त कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार श्री निरंजन डावखरे तसेच खासदार श्री रवींद्र वाईकर यांची अखिल कोकणच्या तानाजी परब यांनी भेट घेऊन विलीनीकरण हा विषय मार्गी लावा असे निवेदन दिले. दरम्यान महामार्ग जन आक्रोशच्या राजाराम कुंडेकर यांनी आमदार श्री फातर्पेकर यांची भेट घेऊन हा विषय त्यांचा समोर मांडला.
‎१२ जुलै २०२४ रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मार्फत भव्य मेल मोहीम आयोजित करण्यात आली, त्यात परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनस व कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण व्हावे हे दोन प्रमुख मुद्दे कोकणवासीयांचा मोबाईल मधून सर्व संबंधित मंत्री, खासदार, आमदार व शासकीय विभागांना मेल द्वारे पाठवण्यात आले.या मेल मोहिमेला एकूण ४५०० कोकणवासीयांनी प्रतिसाद दिला. तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला सोशल मिडियाची जोड देऊन अक्षय महापदी, सागर तळवडेकर, व मिहिर मठकर यांनी कोकणवासीयांमध्ये कोकण रेल्वे महामंडळाचे विलिनीकरण का महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.

‎१५ ऑगस्टला सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी स्थानकावर घंटानाद करण्यात आला, त्याआधी १४ तारखेला पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांचा जनता दरबारात देखील विलीनीकरणचा मुद्दा उपस्थित केला गेला. दोन्ही वेळी हा विषय नक्कीच कॅबिनेट मध्ये घेतला जाईल असे तत्कालीन पालकमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.पुढे ५ सप्टेंबर २०२४ रोजी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर तत्कालीन शिक्षणमंत्री श्री दीपक केसरकर यांचा अध्यक्षेखाली प्रवासी संघटना सावंतवाडी आणि कोकण रेल्वे अधिकाऱ्यांसोबत टर्मिनस संदर्भात बैठक झाली या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण रेल्वेवर ६ हजार कोटींचे कर्ज आहे, त्यामुळे हे महामंडळ टर्मिनस परिपूर्ण करू शकत नाही असे मंत्री केसरकर यांचा समोर स्पष्ट केले आणि हा विषय महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मधे घ्यावा अशी विनंती करण्यात आली. पुन्हा २७ सप्टेंबर २०२४ रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयोजित पालकमंत्र्यांचा जनता दरबारात देखील कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनस संदर्भात तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधण्यात आले.

‎कोकण रेल्वेचे विलिनीकरण व्हावे ही मागणी ज्या प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत होती त्याच प्रमाणे मुंबईत आणि संपूर्ण कोकणात देखील वाढावी ह्या हेतूने अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र या २२ संघटनाच्या शिखर समितीच्या माध्यमातून श्री अक्षय महापदी, श्री राजू कांबळे, श्री सागर तळवडेकर यांचा मेहनतीने १ ऑक्टोंबर २०२४ रोजी मुंबई प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली.या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पत्रकारांना आणि कोकणी जनतेला कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वेत का विलीन व्हावे आणि त्याचे फायदे आणि तोटे समजवण्यात आले.कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, उंच फलाट, शेड, सावंतवाडी टर्मिनस,आवश्यक तेथे पिट लाइन्स आदींसाठी फक्त निधीची आवश्यकता आहे आणि सद्यस्थितीत महामंडळ हे तोट्यात असल्याने हे फक्त अशक्य आहे हे उपस्थितांना समितीच्या वतीने पटवून देण्यात आले.या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्र राज्याचात वाट्यातील २२ टक्के (३९६ कोटींची) हिस्सेदारी केंद्राला हस्तांतरित करावायू किंवा महाराष्ट्र हद्दीतील रेल्वेला आवश्यक असणारी कामे आपण करावी अशी विनंती महाराष्ट्र राज्य शासनाला करण्यात आली. याला जोड म्हणून १४ ऑक्टोबर २०२४ रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्रच्या माध्यमातून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून कोलाड ते मडूरे (रत्नागिरी विभाग) हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्यासाठी भव्य ईमेल मोहीम राबवण्यात आली.या ईमेल मोहिमेचा प्रभाव एवढा पडला की ०२ डिसेंबर २०२४ रोजी हिवाळी अधिवेशनात खासदार श्री धैर्यशील पाटलांनी हा विषय राज्यसभेत मांडला.तसेच ०४ डिसेंबर रोजी वायव्य मुंबईचे खासदार श्री रवींद्र वाईकरांनी हा विषय लोकसभेत मांडला, याच बरोबर २९ मार्च २०२५ ला ठाण्याचे खासदार श्री नरेश म्हस्के यांनी देखील लोकसभेत विलीनीकरणाची मागणी केली.

‎८ नोव्हेंबर २०२४ रोजी दादर येथे संगमेश्वरचे संदेश जिमन आणि सावंतवाडीच्या विनोद नाईकांनी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली, स्थानिक विषयांसोबत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती वजा मागणी करण्यात आली. यानंतर श्री विनोद नाईक यांनी कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनस संदर्भात कल्याण पूर्व च्या आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट घेतली, त्याच दिवशी नवनियुक्त पालकमंत्री सिंधुदुर्ग श्री नितेश राणे यांची देखील भेट घेण्यात आली.आणि हा विषय त्यांचा देखील कानावर घालण्यात आला.

‎१४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी कडून आपले सरकार या महाराष्ट्र शासनाच्या तक्रार निवारण प्रणाली वर सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेच्या विलिणीकरणासंदर्भात असंख्य तक्रारी दाखल करण्यात आल्या.त्यालाच अनुसरून ११ मार्च २०२५ रोजी विधानपरिषदेचे आमदार श्री प्रवीण दरेकर यांनी कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करावे ही मागणी विधानपरिषदेत केली.त्याला प्रत्युत्तर म्हणून १९ मार्च रोजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मंजुरी असल्याची घोषणा विधानपरिषदेत केली. मुख्यमंत्री फक्त घोषणा करून थांबले नाहीत तर त्यांनी ११ एप्रिल रोजी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांचा समवेत झालेल्या पत्रकार परिषदेत याचा पुनरुच्चार केला. आणि तश्या आशयाचे पत्र पाठवून त्यावर शिक्कामोर्तब देखील केला.

‎जजो पर्यंत कोकण रेल्वेचे विलीनीकरण होत नाही तो पर्यंत कोकणात रेल्वेच्या माध्यमातून विकास होणार नाही, केंद्राचा रेल्वे विषयक योजना याठिकाणी येणार नाहीत, दुपदरीकरण, सावंतवाडी टर्मिनस आदींसारखे महत्त्वाचे विषय मार्गी लागणार नाहीत हे सत्य आहे.आणि हेच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी हेरले आणि त्यावर लगेच कार्यवाही देखील केली, यासाठी कोकणवासियांतर्फे मुख्यमंत्र्याचे आभार.

Konkan Railway: चाकरमान्यांचा परतीचा प्रवास ‘खडतर’

   Follow us on        

Konkan Railway: कोकणात उन्हाळी सुट्टीसाठी गावी गेलेले चाकरमानी आता परतीच्या मार्गाला लागले आहेत. मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे त्यांना हा प्रवास खडतर आणि त्रासदायक ठरत आहे.

अवकाळी पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला असून बर्‍याच गाड्या आपले वेळापत्रक सोडून धावत आहेत. त्यामुळे 9 ते 10 तासांचा प्रवास 13-14 किंवा त्यापेक्षा जास्त तासांवर आला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस सुमारे दोन ते तीन तास उशिराने तर आठवड्यातुन चार दिवस धावणारी  मडगाव – एलटीटी एक्सप्रेस उशीरा धावण्याचे आपलेच विक्रम मोडत आहे. मागच्या आठवड्यात तर दोन वेळा ही गाडी 8 ते 10 तास उशिराने (चालत?) धावत होती. या गाड्यांसाठी एकच रेक असल्याने, पेअरींग ट्रेन उशिरा आल्यास आरंभ स्थानकावरून गाड्या उशिराने सुटत आहेत. पुढे लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देवून या गाड्या अजून रखवडल्या जातात.

प्लॅटफॉर्म वर शेड नसल्याने त्रास

अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने प्रवाशांना पावसात भिजत गाडी पकडावी लागत आहे. गाडीची घोषणा झाल्यानंतर ती गाडी येईपर्यंत प्लॅटफॉर्म वर सामान सांभाळत गाडीची वाट पहावी लागत आहे. मुसळधार पावसात दोन्ही हातात सामान घेऊन भिजत भिजत गाडी पकडावी लागत आहे. कोकणातील स्थानकांना विमानतळांसारखे स्वरूप देण्यात आले पण प्लॅटफॉर्म शेड सारख्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष केले गेल्याने प्रवासी वर्ग नाराज आहे.

प्रवास ‘वेटिंग’ वरच
कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्यांचे कन्फर्म तिकीट भेटणे म्हणजे एक दिव्यच मानावे लागेल अशी परिस्थिती सध्या आहे. कोटा कमी, त्यात दलालांचा सुळसुळाट त्यामुळे सामान्य प्रवाशांना सहजासहजी आरक्षित तिकीट उपलब्ध होत नाही. त्यामुळे हा परतीचा प्रवास त्यांना सामान्य कोच मध्येच करावा लागत आहे.

Konkan Railway Merger: “कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे; मात्र ‘कोकण रेल्वे’ हे नाव…..” मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र

   Follow us on    

 

 

Konkan Railway Merger:कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अलीकडेच संमती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची संमती कळविण्यासाठी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी हे विलीनीकरण करताना ‘कोकण रेल्वे’ चे स्वत्रंत अस्तित्व टिकवण्यासाठी विलीनीकरणानंतर भारतीय रेल्वेला हस्तांतरित केलेल्या रेल्वे मार्गांसाठी “कोकण रेल्वे” हे नाव कायम ठेवण्यात यावे अशी विनंती केली आहे.
या  पत्राचा मजकूर  खालीलप्रमाणे 
प्रिय श्री. अश्विनी वैष्णव जी,
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना १९९० मध्ये पश्चिम घाटाच्या आव्हानात्मक भूभागावर रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी करण्यात आली. महाराष्ट्रातील रोहा ते केरळमधील मंगलोर पर्यंत पसरलेल्या प्रदेशात रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण आणि बांधकाम आणि रेल्वे सेवांचे संचालन करण्याची जबाबदारी या कॉर्पोरेशनवर सोपवण्यात आली होती. सुरुवातीला, त्याच्या भागधारक रचनेत भारत सरकार (५१%), महाराष्ट्र (२२%), कर्नाटक (१५%), गोवा आणि केरळ (प्रत्येकी ६%) राज्यांचा समावेश होता. नंतर ९ नोव्हेंबर २०११ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्याच्या भांडवल रचनेची पुनर्रचना करण्यात आली. महामंडळाने महाराष्ट्रातील रोहा आणि केरळमधील मंगलोर दरम्यान रेल्वे मार्गाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केले. सध्या ते या मार्गावर विशेष रेल्वे सेवा चालवत आहे, तर इतर विभागीय रेल्वे सेवा देखील या मार्गाचा फायदा घेत आहेत, ज्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांना सेवा मिळत आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे उत्पन्नाच्या मर्यादित स्रोतांमुळे, महामंडळ त्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यास किंवा वाढत्या मागण्या पूर्ण करण्यास असमर्थ आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर भागधारक राज्यांनी देखील या विलीनीकरणासाठी त्यांची संमती दिली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची संमती कळवताना मला आनंद होत आहे, ज्यासाठी महाराष्ट्राला ३९६.५४२४ कोटी रुपये परतफेड करावी लागेल, जे पूर्वी राज्याच्या या प्रकल्पामधील वाटा म्हणून महामंडळाला पाठवले गेले होते. याव्यतिरिक्त, विलीनीकरणानंतर भारतीय रेल्वेला हस्तांतरित केलेल्या रेल्वे मार्गांसाठी “कोकण रेल्वे” हे नाव कायम ठेवण्यात यावे, कारण त्यांच्या महत्त्वपूर्ण प्रादेशिक वारशाची दखल घेतली जाईल.
वर उल्लेख केल्याप्रमाणे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाला सूचना द्याव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो.

Konkan Railway: मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक विस्कळित

   Follow us on    

 

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर वेरवली स्थानका नजीक दरड कोसळून या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ही दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या वेळेस कोणतीही गाडी या ठिकाणावरून जात नव्हती त्यामुळे धोका टळला आहे.

ही दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. वाहतुक ठप्प झाल्याने अनेक गाड्या रखडल्या होत्या . मात्र आताच आलेल्या माहितीनुसार दरड बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. दोन्ही बाजूने वाहतुक सुरू करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून या मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ गाडीच्या नेहमीच्या ‘लेटमार्क’ मुळे प्रवासी नाराज

   Follow us on    

 

 

Konkan Railway: एलटीटी – मडगाव दरम्यान चालविण्यात येणारी ११०९९/ १११०० एलटीटी मडगाव एक्सप्रेस नेहमीच उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मध्यरात्री १२:४५ वाजता एलटीटी येथून सुटणारी मडगाव एक्सप्रेस मुळातच दोन तास उशिराने सुटते. त्यानंतर पुढे ढकलत ढकलत चालते. परिणामी दररोज चार ते पाच तास विलंबाने धावते. गावी जायची ओढ असल्यामुळे कोकणी माणूस निमूटपणे हा त्रास सहन करत आहे. या गाडीच्या नेहमीच्या लेटमार्क मुळे ८/१० तासांचा प्रवास १४ ते १६ तासांवर जातो. ही गाडी नेहमीच उशिराने चालवली जात असल्याने या गाडीची विश्वासहर्तता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. काहीच पर्याय नसल्याने कोकणकरांना या गाडीने प्रवास करावा लागत आहे.
या गाडीच्या लेटमार्कबद्दल अनेक चाकरमान्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या. पण फारसे गांभीयनि घेतले जात नाही. कोकणवासीयांना होणाऱ्या या त्रासाबद्दल सिंधुदुर्ग रत्नागिरीमधील राजकीय नेत्यांनीच नाही तर मुंबईत विविध पक्षात कार्यरत असलेल्या नेत्यांनीही कोकण रेल्वेसह मध्य रेल्वे प्रशासनाचे कोकणवासीयांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.  हे असे सुरू राहिले तर मग मात्र कोकणी माणूस रस्त्यावर उतरून रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याची चिन्हे आहेत.
मुंबई LTT मडगाव (अप आणि डाऊन) रेल्वेगाडी गेले आठवडाभर 5 ते 10 तास उशिराने धावत आहे. Where is my train app वर गेल्या 8 दिवसांचे वेळापत्रक आपण तपासून पाहू शकता. प्रवाशांना याचे मेसेज गाडी सुटायच्या वेळेवर येतात. त्यामुळे लोक सामान, बोजा आणि परिवारासोबत प्लॅटफॉर्मवर पोहोचलेले असतात व रात्रंदिवस ताटकळत गाडीची वाट पाहत राहतात. याठिकाणी प्रवाशांच्या वेळेचे मोल शून्य गृहीत धरले जातेय. रेल्वे प्रशासन कधी जागे होणार? विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करणारे रेल्वे प्रशासन मात्र स्वतःच्या चुकीवर प्रायश्चित्त घ्यायला किंवा शिक्षा भोगायला तयार आहे का? कोणत्याही वर्तमानपत्रात किंवा टीव्ही माध्यमांवर याविषयी बातमी नाही, याचेही मोठे आश्चर्य वाटते. या विलंबाचे कारण काय? यार्गावरील अन्य गाड्या मात्र थोड्या विलंबाने का होईना धावत आहेत.  याकरिता कोकणवासीयांसाठी सावंतवाडी टर्मिनस होणे फार गरजेचे आहे. कोकणी माणूस संयमी, समजूतदार व सहनशील असल्याने त्याचा हा छळ होत असेल तर जनआंदोलन उभे राहिल्यास आश्चर्य वाटायला नको.
– गणेश चमणकर, वेंगुर्ले   
मध्य रेल्वेची कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात बेभरवशाची १११०० मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आज (१८ मे, २०२५) मडगावहून तब्बल ९ तास ५६ मिनिटे उशिराने सुटली. मध्य रेल्वेने आता या गाडीला स्वतंत्र रेक उपलब्ध करावा. अन्यथा ही गाडी वेळेत चालणे शक्य नाही.
– अक्षय महापदी, कळवा  
मध्य आणि कोकण रेल्वे ११०९९/१११०० ही सेवा गेली दोन वर्षे नीट चालवत नाही. त्यांनी ही गाडी पश्चिम रेल्वेला चालविण्यास द्यावी १०११५/१०११६ व ११०९९/१११०० या दोन्ही गाड्या एकत्र करून एक नियमित गाडी संध्याकाळी ६ तें १० या वेळेत वांद्रे किंवा नवीन होणाऱ्या जोगेश्वरी टर्मिनस येथून सोडण्याबाबत विचार व्हावा.
– केशव नाईक, सावंतवाडी 

Konkan Railway: महत्वाची बातमी! कोकण रेल्वे मार्गावरील बहुतेक गाड्यांच्या ‘या’ स्थानकावरील वेळांत बदल

   Follow us on    

 

 

Konkan Railway: कोकणरेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बहुतेक गाड्यांचा कोकण रेल्वेच्या गाड्यांसाठी महत्वाचे स्थानक असलेल्या पनवेल स्थानकावरील आगमन आणि  निर्गमन वेळेत बदल करण्यात आले आहेत. मुंबई विभागात वेळेवर धावण्यासाठी आणि रेल्वेचे कामकाज सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वेने खालील गाड्यांच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई आणि वसईहुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या

गाडी क्र. विद्यमान सुधारित या तारखेपासून
12450 चंदीगड – मडगाव जं. एक्सप्रेस 00:40 / 00:45 00:32 / 00:35 12.05.2025
11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस 01:10 / 01:15 01:02 / 01:05 11.05.2025
11099 लोकमान्य टिळक (T)- मडगाव जं. एक्सप्रेस 01:50 / 01:55 01:42 / 01:45 16.05.2025
22115 लोकमान्य टिळक (टी) – करमाळी एक्सप्रेस 01:52 / 01:55 01:42 / 01:45 15.05.2025
12978 अजमेर – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस 05:35 / 05:40 05:22 / 05:25 16.05.2025
22229 मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेस 06:30 / 06:32 06:25 / 06:27 12.05.2025
12218 चंदीगड – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 07:35 / 07:40 07:27 / 07:30 14.05.2025
22660 योगनगरी ऋषिकेश – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 07:35 / 07:40 07:27 / 07:30 12.05.2025
12484 अमृतसर – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 07:35 / 07:40 07:27 / 07:30 11.05.2025
10115 वांद्रे (टी)- मडगाव जं. एक्सप्रेस 09:55 / 09:57 09:42 / 09:45 14.05.2025
19578 जामनगर – तिरुनेलवेली एक्सप्रेस 11:25 / 11:30 11:17 / 11:20 16.05.2025
20910 पोरबंदर – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 11:25 / 11:30 11:17 / 11:20 15.05.2025
20932 इंदूर – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 11:25 / 11:30 11:17 / 11:20 13.05.2025
22908 हापा – मडगाव जं. एक्सप्रेस 11:25 / 11:30 11:17 / 11:20 14.05.2025
12284 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम एक्सप्रेस 15:30 / 15:35 15:22 / 15:25 17.05.2025
16311 श्रीगंगानगर – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 15:30 / 15:35 15:22 / 15:25 13.05.2025
22475 हिसार – कोईम्बतूर एक्सप्रेस 15:30 / 15:35 15:22 / 15:25 14.05.2025
12619 लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंडा एक्सप्रेस 16:22 / 16:25 16:12 / 16:15 11.05.2025
20924 गांधीधाम – तिरुनेलवेली एक्सप्रेस 16:55 / 17:00 16:47 / 16:50 12.05.2025
22634 H. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस 16:55 / 17:00 16:47 / 16:50 16.05.2025
12432 एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस 23:05 / 23:10 22:57 / 23:00 11.05.2025
22414 H. निजामुद्दीन – मडगाव जं. राजधानी एक्सप्रेस 23:05 / 23:10 22:57 / 23:00 16.05.2025
16333 वेरावळ – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस 00:00 / 00:05 23:52 / 23:55 15.05.2025
16335 गांधीधाम – नागरकोइल एक्सप्रेस 00:00 / 00:05 23:52 / 23:55 16.05.2025
16337 ओखा – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस 00:00 / 00:05 23:52 / 23:55 12.05.2025
19260 भावनगर – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 00:00 / 00:05 23:52 / 23:55 13.05.2025
22654 H. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 00:26 / 00:31 00:17 / 00:20 12.05.2025
22656 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस 00:26 / 00:31 00:17 / 00:20 16.05.2025

गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या

गाडी क्र. विद्यमान सुधारित या तारखेपासून
22114 तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस 02:15 / 02:20 02:02 / 02:05 13.05.2025
22653 तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन एक्सप्रेस 02:50 / 02:55 02:37 / 02:40 16.05.2025
22655 एर्नाकुलम जंक्शन – एच. निजामुद्दीन एक्सप्रेस 02:50 / 02:55 02:37 / 02:40 14.05.2025
12134 मंगळुरु जं. – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस 03:07 / 03:10 02:47 / 02:50 11.05.2025
20112 मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस 03:55 / 04:00 03:42 / 03:45 11.05.2025
11004 सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस 04:45 / 04:50 04:27 / 04:30 11.05.2025
12620 मंगळुरु सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) मत्स्यगंधा एक्सप्रेस 05:01 / 05:05 04:47 / 04:50 11.05.2025
12741 वास्को दा गामा – पाटणा एक्सप्रेस 06:20 / 06:25 06:07 / 06:10 14.05.2025
12202 तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस 10:05 / 10:10 09:42 / 09:45 11.05.2025
12217 तिरुवनंतपुरम उत्तर – चंदीगड एक्सप्रेस 10:55 / 11:00 10:32 / 10:35 12.05.2025
12483 तिरुवनंतपुरम उत्तर – अमृतसर एक्सप्रेस 10:55 / 11:00 10:32 / 10:35 14.05.2025
22659 तिरुवनंतपुरम उत्तर – योग नगरी ऋषिकेश एक्सप्रेस 10:55 / 11:00 10:32 / 10:35 16.05.2025
12617 एर्नाकुलम जं. – एच. निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस 12:35 / 12:40 12:27 / 12:30 11.05.2025
19577 तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस 13:20 / 13:25 13:12 / 13:15 12.05.2025
20909 तिरुवनंतपुरम उत्तर – पोरबंदर एक्सप्रेस 13:20 / 13:25 13:12 / 13:15 11.05.2025
20931 तिरुवनंतपुरम उत्तर – इंदूर एक्सप्रेस 13:20 / 13:25 13:12 / 13:15 16.05.2025
22476 कोईम्बतूर – हिसार एक्सप्रेस 13:20 / 13:25 13:12 / 13:15 17.05.2025
22630 तिरुनेलवेली – दादर एक्सप्रेस 13:20 / 13:25 13:12 / 13:15 14.05.2025
20923 तिरुनेलवेली – गांधीधाम एक्सप्रेस 13:20 / 13:25 13:12 / 13:15 15.05.2025
12224 एर्नाकुलम जं. – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस 17:20 / 17:22 17:02 / 17:05 11.05.2025
12431 तिरुवनंतपुरम सेंट्रल- एच. निजामुद्दीन एक्सप्रेस 18:00 / 18:05 17:52 / 17:55 13.05.2025
22413 मडगाव जं. – एच. निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस 18:00 / 18:05 17:52 / 17:55 11.05.2025
22633 तिरुवनंतपुरम सेंट्रल- एच. निजामुद्दीन एक्सप्रेस 18:00 / 18:05 17:52 / 17:55 14.05.2025
10104 मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस 19:10 / 19:15 18:57 / 19:00 11.05.2025
10106 सावंतवाडी रोड – दिवा जंक्शन एक्सप्रेस 19:20 / 19:23 18:47 / 18:50 11.05.2025
12449 मडगाव जं. – चंदीगड एक्सप्रेस 19:45 / 19:48 19:37 / 19:40 13.05.2025
12977 एर्नाकुलम जं. – अजमेर एक्सप्रेस 19:45 / 19:48 19:37 / 19:40 11.05.2025
22907 मडगाव जं. – हापा एक्सप्रेस 19:45 / 19:48 19:37 / 19:40 16.05.2025
10116 मडगाव जं. – वांद्रे (टी) एक्सप्रेस 20:10 / 20:12 19:57 / 20:00 13.05.2025
22230 मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस 21:00 / 21:02 20:47 / 20:50 13.05.2025
16312 तिरुवनंतपुरम उत्तर – श्रीगंगानगर एक्सप्रेस 21:15 / 21:20 21:02 / 21:05 17.05.2025
16334 तिरुवनंतपुरम सेंट्रल – वेरावळ एक्सप्रेस 21:15 / 21:20 21:02 / 21:05 12.05.2025
16336 नगरकोइल – गांधीधाम एक्सप्रेस 21:15 / 21:20 21:02 / 21:05 13.05.2025
16338 एर्नाकुलम जं. – ओखा एक्सप्रेस 21:15 / 21:20 21:02 / 21:05 14.05.2025
19259 तिरुवनंतपुरम उत्तर – भावनगर एक्सप्रेस 21:15 / 21:20 21:02 / 21:05 15.05.2025
12283 एर्नाकुलम जं. – एच. निजामुद्दीन एक्सप्रेस 21:45 / 21:50 21:37 / 21:40 13.05.2025
11100 मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस 21:45 / 21:47 21:37 / 21:40 12.05.2025

 

 

Konkan Railway: चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on    

 

 

Konkan Railway: यंदा उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एका विशेष गाडीला मुदतवाढ दिली आहे.

०११०३/ ०११०४ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष गाडीला मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक ०४/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला २५/०५/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही दर रविवारी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (टी) -मडगाव साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक ०५/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला २६/०५/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर सोमवारी एलटीटी वरुन ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:४० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.

ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३ कोच, थ्री टायर इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

Konkan Railway: १०० कोटी उत्त्पन्न मिळवून देण्याची क्षमता असणाऱ्या जिल्ह्याच्या पदरी उपेक्षाच!

   Follow us on    

 

 

Kokanai Exclusive: कोकण रेल्वेच्या गेल्या वर्षीच्या म्हणजे २४-२५ उत्पन्नात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थानकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होऊन ते ९८ कोटी ६२ लाख झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन स्थानके म्हणजे कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी कोकण रेल्वेला सर्वात जास्त उत्पन्न  मिळवून देणाऱ्या पहिल्या १० स्थानकांमध्ये मोडत आहेत. तर जिल्ह्यातून पूर्ण वर्षात जवळपास ४८ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.  कणकवली आणि कुडाळ स्थानकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊन ते प्रत्येकी ३४ कोटीच्या घरात पोहोचले आहे. ही दोन्ही स्थानके उत्पन्नात संपूर्ण कोकण रेल्वे क्षेत्रात अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. सावंतवाडी स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात सुद्धा जवळपास ९ ते १० टक्क्याने वाढ होऊन ते १६ कोटीच्या घरात गेले असून संपूर्ण कोकण रेल्वे क्षेत्रात दहाव्या क्रमांकावर आहे. वैभववाडी (७ कोटी) सिंधदुर्ग (५.६० कोटी)  ही स्थानके सुद्धा रेल्वे ला चांगले उत्त्पन्न मिळवून देत आहेत.
असे असताना रेल्वे प्रशासनाकडून या जिल्ह्याच्या पदरी उपेक्षाच पडत असल्याचे दिसत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एकूण १५ गाडयांना या जिल्ह्यात एकही स्थानकावर थांबा नाही आहे. खर ते महाराष्ट्र सरकारने या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले असताना या जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रत्येक गाडीला जिल्हातील स्थानकांवर आलटून पालटून थांबे देणे गरजेचे होते. मात्र प्रवाशी संघटनांनी वारंवार मागणी करून सुद्धा रेल्वे प्रशासन हे थांबे देत नाही आहे.
सावंतवाडी स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाढीस वाव 
सावंतवाडी पंचक्रोशीमध्ये येणारे तालुके आणि गावे पाहता या स्थानकाचा विकास करून इथे महत्वाच्या गाडयांना थांबे दिले जावेत, उदघाटन झालेल्या टर्मिनस चे काम पूर्ण करण्यात यावे यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी ने विविध माध्यमातून आंदोलन छेडले आहे. टर्मिनस चे काम पूर्ण झाल्यानंतर आणि अधिक गाडयांना थांबे दिल्यावर या स्थानकावरून रेल्वे ला मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीने वाढ होण्याचा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
वैभववाडी आणि सिंधुदुर्ग स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ होत असूनही येथे आरक्षण सुविधा, पादचारी पूल आणि इतर मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्यास रेल्वे प्रशासन अयशस्वी ठरत आहे. खरे तर वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन येथे या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा नसणाऱ्या गाड्या
१) १२२०१/०२ – कोचुवेली लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस
२) १२४३१ /१२४३२ त्रिवंद्रम राजधानी एक्सप्रेस
३) १२२२४/२३ एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस
४) १२२८३/८४  – हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस
५) १२४४९/५०  गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस
६) १२२१७/१८ – केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस
७) १२९७७/७८  – मारुसागर सुपरफास्ट एक्सप्रेस
८) १९५७७/७८ जामनगर तिरुनेलवेली एक्सप्रेस
९) १२४८३/८४ अमृतसर कोचुवेली साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
१०) २२६५९/६० ऋषिकेश कोचुवली सुपरफास्ट एक्सप्रेस
११ २२४७५/७६ कोईमतूर हिसार एसी सुपरफास्ट एक्सप्रेस
१२) २०९२३/२४  गांधीधाम तिरुनवेली हमसफर एक्स्प्रेस
१३) २०९०९/१० कोचुवेली पोरबंदर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
१४) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस
१५) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम  सुपरफास्ट एक्सप्रेस

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांचा स्लीपर डब्यांत मोठी कपात

   Follow us on    

 

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या रेकचे रूपांतर आधुनिक दर्जाच्या एलएचबी रेक मध्ये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र ही सुधारणा करताना या गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल करण्यात आला असून सामान्य प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या स्लीपर डब्यांत कपात करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपशील खालीलप्रमाणे
१) २२१४९/२२१५०  पुणे जंक्शन – एर्नाकुलम – द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी दिनांक ६ जुलै २०२५ पासून  सुधारित एलएचबी कोचसहित धावणार आहे.
२ ) ११०९७/११०९८  पुणे जंक्शन – एर्नाकुलम – पुणे जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी दिनांक ५ जुलै २०२५ पासून सुधारित एलएचबी कोचसहित धावणार आहे.
या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची सध्याची आणि सुधारित संरचना खालीलप्रमाणे असणार आहे.
सध्याची संरचना सुधारित संरचना
२ टियर एसी – ०१
२ टियर एसी – ०२
३ टियर एसी – ०४
३ टियर एसी – ०४
स्लीपर – ११ स्लीपर – ०७
जनरल – ०३ जनरल – ०४
पॅन्ट्री कार – ०१ पॅन्ट्री कार – ०१
एसएलआर – ०२ एसएलआर – ०२
एकूण – २२ आयसीएफ कोच
एकूण – २० एलएचबी कोच
LHB मध्ये अपग्रेड करताना दोन्ही या गाड्यांचे तब्बल ४ स्लीपर डबे कमी करण्यात आले आहेत. एकिकडे कोकण रेल्वे मार्गावर स्लीपर आणि जनरल डब्यांमध्ये मोठी गर्दी होत असताना या गाड्यांचे हे डबे कमी केल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Konkan Railway: अखेर ‘त्या’ तीन गाड्यांचे पावसाळी आरक्षण सुरु; फेऱ्यांमध्ये मात्र कपात

   Follow us on    

 

 

Konkan Railway News: दरवर्षीप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. मात्र दोन महिन्याचे आगाऊ आरक्षण चालू झाले असताना त्यात वंदे भारत एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि एलटीटी मडगाव एक्सप्रेस या गाड्यांची नावे दिसत नसल्याने आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या संभ्रम निर्माण झाला होता. या गाड्यांची सेवा पावसाळी हंगामात बंद राहणार कि काय अशी शंका निर्माण झाली होती. मात्र आता या गाड्यांचे आरक्षण आयआरसीटीसी संकेतस्थळावर दिसत असल्याने या शंकेचे निरसन झाले आहे. मात्र या गाड्यांच्या फेऱ्यात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.
रेक्स च्या कमतरतेमुळे कपात
वेळापत्रक बदलल्या मुळे रेक अभावी काही गाड्यांच्या फेऱ्या कमी कराव्या लागतात. जसे की सकाळी सीएसएमटी वरून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा तोच रेक दुपारी मडगाव वरून सीएसएमटी साठी वापरला जातो. मात्र पावसाळी हंगामात गाड्यांचा वेग धीमा होत असल्याने तोच रेक समान दिवशी वापरता येत नाही. साहजिकच दुसऱ्या दिवशी मडगाव वरून सीएसएमटी साठी  तो रेक वापरला जातो. या कारणामुळे आठवड्यातून ६ दिवस धावणारी  ही गाडी पावसाळी हंगामात फक्त तीनच दिवस चालविण्यात येणार आहे. या कारणाने अजून काही  गाड्यांच्या फेऱ्यात कपात केली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे.
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
३) 22229 /22230  Mumbai CSMT – Madgaon – Mumbai CSMT Vande Bharat Express
22229 CSMT MADGAON VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे.
22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search