Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        

Konkan Railway: यंदा उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एका विशेष गाडीला मुदतवाढ दिली आहे.

०११०३/ ०११०४ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष गाडीला मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक ०४/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला २५/०५/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही दर रविवारी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (टी) -मडगाव साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक ०५/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला २६/०५/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर सोमवारी एलटीटी वरुन ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:४० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.

ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३ कोच, थ्री टायर इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

Konkan Railway: १०० कोटी उत्त्पन्न मिळवून देण्याची क्षमता असणाऱ्या जिल्ह्याच्या पदरी उपेक्षाच!

   Follow us on        
Kokanai Exclusive: कोकण रेल्वेच्या गेल्या वर्षीच्या म्हणजे २४-२५ उत्पन्नात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थानकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होऊन ते ९८ कोटी ६२ लाख झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन स्थानके म्हणजे कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी कोकण रेल्वेला सर्वात जास्त उत्पन्न  मिळवून देणाऱ्या पहिल्या १० स्थानकांमध्ये मोडत आहेत. तर जिल्ह्यातून पूर्ण वर्षात जवळपास ४८ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.  कणकवली आणि कुडाळ स्थानकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊन ते प्रत्येकी ३४ कोटीच्या घरात पोहोचले आहे. ही दोन्ही स्थानके उत्पन्नात संपूर्ण कोकण रेल्वे क्षेत्रात अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. सावंतवाडी स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात सुद्धा जवळपास ९ ते १० टक्क्याने वाढ होऊन ते १६ कोटीच्या घरात गेले असून संपूर्ण कोकण रेल्वे क्षेत्रात दहाव्या क्रमांकावर आहे. वैभववाडी (७ कोटी) सिंधदुर्ग (५.६० कोटी)  ही स्थानके सुद्धा रेल्वे ला चांगले उत्त्पन्न मिळवून देत आहेत.
असे असताना रेल्वे प्रशासनाकडून या जिल्ह्याच्या पदरी उपेक्षाच पडत असल्याचे दिसत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एकूण १५ गाडयांना या जिल्ह्यात एकही स्थानकावर थांबा नाही आहे. खर ते महाराष्ट्र सरकारने या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले असताना या जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रत्येक गाडीला जिल्हातील स्थानकांवर आलटून पालटून थांबे देणे गरजेचे होते. मात्र प्रवाशी संघटनांनी वारंवार मागणी करून सुद्धा रेल्वे प्रशासन हे थांबे देत नाही आहे.
सावंतवाडी स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाढीस वाव 
सावंतवाडी पंचक्रोशीमध्ये येणारे तालुके आणि गावे पाहता या स्थानकाचा विकास करून इथे महत्वाच्या गाडयांना थांबे दिले जावेत, उदघाटन झालेल्या टर्मिनस चे काम पूर्ण करण्यात यावे यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी ने विविध माध्यमातून आंदोलन छेडले आहे. टर्मिनस चे काम पूर्ण झाल्यानंतर आणि अधिक गाडयांना थांबे दिल्यावर या स्थानकावरून रेल्वे ला मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीने वाढ होण्याचा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
वैभववाडी आणि सिंधुदुर्ग स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ होत असूनही येथे आरक्षण सुविधा, पादचारी पूल आणि इतर मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्यास रेल्वे प्रशासन अयशस्वी ठरत आहे. खरे तर वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन येथे या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा नसणाऱ्या गाड्या
१) १२२०१/०२ – कोचुवेली लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस
२) १२४३१ /१२४३२ त्रिवंद्रम राजधानी एक्सप्रेस
३) १२२२४/२३ एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस
४) १२२८३/८४  – हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस
५) १२४४९/५०  गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस
६) १२२१७/१८ – केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस
७) १२९७७/७८  – मारुसागर सुपरफास्ट एक्सप्रेस
८) १९५७७/७८ जामनगर तिरुनेलवेली एक्सप्रेस
९) १२४८३/८४ अमृतसर कोचुवेली साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
१०) २२६५९/६० ऋषिकेश कोचुवली सुपरफास्ट एक्सप्रेस
११ २२४७५/७६ कोईमतूर हिसार एसी सुपरफास्ट एक्सप्रेस
१२) २०९२३/२४  गांधीधाम तिरुनवेली हमसफर एक्स्प्रेस
१३) २०९०९/१० कोचुवेली पोरबंदर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
१४) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस
१५) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम  सुपरफास्ट एक्सप्रेस

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांचा स्लीपर डब्यांत मोठी कपात

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या रेकचे रूपांतर आधुनिक दर्जाच्या एलएचबी रेक मध्ये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र ही सुधारणा करताना या गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल करण्यात आला असून सामान्य प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या स्लीपर डब्यांत कपात करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपशील खालीलप्रमाणे
१) २२१४९/२२१५०  पुणे जंक्शन – एर्नाकुलम – द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी दिनांक ६ जुलै २०२५ पासून  सुधारित एलएचबी कोचसहित धावणार आहे.
२ ) ११०९७/११०९८  पुणे जंक्शन – एर्नाकुलम – पुणे जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी दिनांक ५ जुलै २०२५ पासून सुधारित एलएचबी कोचसहित धावणार आहे.
या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची सध्याची आणि सुधारित संरचना खालीलप्रमाणे असणार आहे.
सध्याची संरचना सुधारित संरचना
२ टियर एसी – ०१
२ टियर एसी – ०२
३ टियर एसी – ०४
३ टियर एसी – ०४
स्लीपर – ११ स्लीपर – ०७
जनरल – ०३ जनरल – ०४
पॅन्ट्री कार – ०१ पॅन्ट्री कार – ०१
एसएलआर – ०२ एसएलआर – ०२
एकूण – २२ आयसीएफ कोच
एकूण – २० एलएचबी कोच
LHB मध्ये अपग्रेड करताना दोन्ही या गाड्यांचे तब्बल ४ स्लीपर डबे कमी करण्यात आले आहेत. एकिकडे कोकण रेल्वे मार्गावर स्लीपर आणि जनरल डब्यांमध्ये मोठी गर्दी होत असताना या गाड्यांचे हे डबे कमी केल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Konkan Railway: अखेर ‘त्या’ तीन गाड्यांचे पावसाळी आरक्षण सुरु; फेऱ्यांमध्ये मात्र कपात

   Follow us on        
Konkan Railway News: दरवर्षीप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. मात्र दोन महिन्याचे आगाऊ आरक्षण चालू झाले असताना त्यात वंदे भारत एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि एलटीटी मडगाव एक्सप्रेस या गाड्यांची नावे दिसत नसल्याने आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या संभ्रम निर्माण झाला होता. या गाड्यांची सेवा पावसाळी हंगामात बंद राहणार कि काय अशी शंका निर्माण झाली होती. मात्र आता या गाड्यांचे आरक्षण आयआरसीटीसी संकेतस्थळावर दिसत असल्याने या शंकेचे निरसन झाले आहे. मात्र या गाड्यांच्या फेऱ्यात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.
रेक्स च्या कमतरतेमुळे कपात
वेळापत्रक बदलल्या मुळे रेक अभावी काही गाड्यांच्या फेऱ्या कमी कराव्या लागतात. जसे की सकाळी सीएसएमटी वरून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा तोच रेक दुपारी मडगाव वरून सीएसएमटी साठी वापरला जातो. मात्र पावसाळी हंगामात गाड्यांचा वेग धीमा होत असल्याने तोच रेक समान दिवशी वापरता येत नाही. साहजिकच दुसऱ्या दिवशी मडगाव वरून सीएसएमटी साठी  तो रेक वापरला जातो. या कारणामुळे आठवड्यातून ६ दिवस धावणारी  ही गाडी पावसाळी हंगामात फक्त तीनच दिवस चालविण्यात येणार आहे. या कारणाने अजून काही  गाड्यांच्या फेऱ्यात कपात केली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे.
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
३) 22229 /22230  Mumbai CSMT – Madgaon – Mumbai CSMT Vande Bharat Express
22229 CSMT MADGAON VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे.
22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.

Vaibhavwadi Railway Station: चांगले उत्त्पन्न मिळत असून सुद्धा कोकण रेल्वेचे वैभववाडी स्थानकाकडे दुर्लक्ष

   Follow us on        
Vaibhavwadi Railway Station:  कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाला लागलेले समस्यांचे ग्रहण सुटायला तयार नाही. या स्थानकापासून रेल्वे प्रशासनाला चांगले उत्त्पन्न भेटत असताना सुद्धा या स्थानकावरील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत होत असल्याचा आरोप येथील प्रवाशांकडून होत आहे.
गेल्यावर्षी म्हणजेच २०२४-२५ ला या स्थानकावरून कोकण रेल्वेला ७ कोटी २२ लाख इतके उत्पन्न भेटले असल्याचे माहिती रेल्वे अभ्यासक श्री ओंकार लाड यांनी माहिती अधिकारातून प्राप्त केली आहे. २०२३-२४ या वर्षाच्या उत्पन्नाशी तुलना करता गेल्या वर्षीच्या उत्पन्नात जवळपास ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्पन्नाच्या बाबतीत हे स्थानक  कोकण रेल्वेच्या पहिल्या १५ स्थानकामध्ये मोडत आहे. असे असून देखील या स्थानकांवर मूलभूत सुविधांची मारामारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या स्थानकावर प्लॅटफॉर्मवर बसायला नीट जागा नाही. ऊन्ह आणि पावसासाठी छप्पर नाही. ५ वर्षे होत आली; तरी आरक्षण खिडकी उघडायला तयार नाही, एकाही जलद गाडीला थांबा नाही. अशा अनेक समस्यांनी वैभववाडी रेल्वे स्थानकाला ग्रासलेले आहे. परंतु, या समस्या सोडविण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती काहीशी कोमेजून गेलेली दिसते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर मध्यवर्ती रेल्वे स्थानक वैभववाडी आहे. त्यामुळे रत्नागिरीतून थेट कुडाळ सावंतवाडीत थांबणाऱ्या काही सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना वैभववाडीत थांबा मिळावा ही रेल्वे प्रवाशांची खूप वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु, या मागणीला राजकीय पाठबळ देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. वैभववाडी तालुक्यासह कणकवली तालुक्यातील नांदगाव, तळेरे खारेपाटण पट्टा तसेच देवगड तालुक्यातील शिरगाव पासून विजयदुर्ग पर्यंतच्या आणि घाटमाथ्यावरील गगनबावडा तालुक्यालाही वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाचा मोठा आधार आहे. या स्थानकातून दररोज हजारो प्रवाशाची ये-जा सुरु आहे. तरीही येथे दिवा, मांडवी, तुतारी आणि कोकणकन्या या चारच रेल्वेगाड्यांना थांबा आहे. यामध्ये मागील १५ नियमित गाडीच्या थांब्याची वाढ होऊ शकलेली नाही. यांचे मूळ राजकीय उदासीनता हेच आहे.

कोकण रेल्वेला विक्रमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या संगमेश्वर रोड स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

   Follow us on        

Konkan Railway: संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील २०२३-२०२४ चे वार्षिक उत्पन्न हे ५ कोटी ३७ लाख ९७ हजार ७८७ रुपये एवढे होते. १ एप्रिल २०२४- मार्च २०२५ यावर्षीचे उत्पन्न ५ कोटी ८५ लाख १३ हजार ६४६ रुपयांची विक्रमी वाढ झाली. या स्थानकावरून प्रवास करणार्‍या दररोजच्या प्रवाशांची संख्येत वाढ होत असताना प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुविधेकडे जाणून बुजून पाठ फिरवली जात असल्याचा आरोप येथील प्रवाशांकडून होत आहे.

संगमेश्वर रेल्वे स्थानकातून काही अंतरावर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या छावा या हिंदी चित्रपटाने हे स्मारकस्थळ बहुचर्चित झाले आहे. पर्यटकांची झुंबड संगमेश्वर येथे दाखल होते.त्यात रेल्वेचा प्रवास केलेले पर्यटक पुन्हा रेल्वे प्रवास नको! असा नाराजीचा सूर आळवितात.

कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक होणार यासाठी निधी पुरवला जाणार! पर्यटनाला वाव मिळणार! गोवा,केरळ याच धर्तीवर आपल्या संगमेश्वराकडेही पर्यटकआकर्षित होणार! हे खरे असले तरी आताचा कोकण रेल्वेचा प्रवास हा खच्चून भरलेल्या कोंबड्या बकऱ्यांसारखा करावा लागतो आहे. मग या स्थानकांवर मडगाव , जामनगर, पोरबंदर या तीन एक्स्प्रेसला थांबा देऊन हा प्रवाशी भार नक्कीच हलका करता येईल.

गेल्या दिड वर्षात सतत पाठपुरावा करणारी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुकवरही संघटना, कायम कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत असते. गतवर्षीचे आणि यावर्षीचे वार्षिक उत्पन्न दाखवून ही डोळेझाक का? असा प्रश्न विचारला जातो आहे.

हाच विचार ध्यानात ठेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी, जनसामान्यांनी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात राजधानी एक्सप्रेस अडवून निषेध नोंदविण्याचा विचार केला. तसे निवेदन कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला दिले. त्या पत्राचीही म्हणावी तशी दखल घेतली नाही.

आमदार शेखर निकम, खासदार नारायण राणे यांच्यासज्ञ काही राजकीय नेत्यांनी आपापली पत्रे कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला दिली. पण अद्याप सुस्त यंत्रणा वेग धरीत नाही.

संगमेश्वर तालुक्यातील जनसामान्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका! केवळ राजकीय पोळी, श्रेय लाटण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची पोकळ अस्मिता दाखवू नका. खरोखरच संगमेश्वर तालुक्यात जगविख्यात स्मारक उभारायचे असेल तर या मातीचे ऐतिहासिक महत्व ध्यानात घ्यावे. केरळ, गोवा, या राज्यांतील पर्यटनाला गतिमान करण्याच्या नादात संगमेश्वरच्या ऐतिहासिक महत्त्वाला कमी लेखू नका!

-रुपेश मनोहर कदम/सायले  

Konkan Railway: वंदेभारत एक्सप्रेससह तीन गाड्यांची सेवा पावसाळी हंगामात बंद राहणार?

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सीएसएमटी – मडगाव वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस आणि एलटीटी – मडगाव एक्स्प्रेसचे या गाड्यांचे आरक्षण इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) या ऑनलाईन पोर्टल वर दाखवत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.  या गाड्यांची सेवा पावसाळी हंगामात बंद ठेवण्यात येणार कि काय अशी शंका प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे.
गाडी क्रमांक २२२२९ / २२२३० सीएसएमटी – मडगाव – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२११९ / २२१२० सीएसएमटी – मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस यांसारख्या प्रीमियम रेल्वेगाड्यांसह गाडी क्रमांक ११०९९ / १११०० लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचे १५ जूननंतरचे आरक्षण करताना प्रवाशांना अडचणी येत आहे.
अनेक प्रवाशांनी आयआरसीटीसी संकेतस्थळावरून वंदे भारत, तेजस, एलटीटी-मडगाव एक्स्प्रेसचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळू शकले नाही. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी रेल्वेगाड्यांचे तिकीट काढावे लागत आहे. तसेच पावसाळ्यात कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस, एलटीटी – मडगाव एक्स्प्रेस धावणार की नाही याबाबत प्रवासी संभ्रमात आहेत.
या वर्षीच्या कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून अजून काही माहिती उपलब्ध  झाली नाही आहे. तथापि, सामान्यतः कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत लागू केले जाते, कारण या काळात दरडी कोसळणे आणि पाणी साचणे यासारख्या समस्या उद्भवतात. या कालावधीत गाड्यांचा वेग कमी केला जातो, ज्यामुळे वेळापत्रकात बदल केले जातात

सावंतवाडी स्थानकापासून मिळणार्‍या उत्पन्नात वाढ; सुविधांच्या नावाने मात्र बोंब

   Follow us on        

सावंतवाडी: निसर्गरम्य कोकणातील सावंतवाडी शहर हे नेहमीच पर्यटनासाठी ओळखले जाते, येथील गंजिफा, लाकडी खेळणी ही देशातच नाही तर विदेशात ही प्रसिद्ध आहेत. या शहराच्या जवळच असणारे शिरोडा बीच, आंबोली हिलस्टेशन, वेंगुर्ला बंदर ई. तसेच धार्मिक स्थळे ही देशभरात प्रसिद्ध आहेत, म्हणूनच संस्थानकालीन वारसा असणाऱ्या या ऐतिहासिक शहराला कोकण रेल्वे जोडली गेल्याने या शहराची ओळख ही संपूर्ण देशात पसरली.

तळकोकण म्हणजे कोकणातील दक्षिणेकडील भाग त्यात प्रामुख्याने दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी हे प्रमुख तालुके गणले जातात. या भागात रेल्वेने जायचे असल्यास सावंतवाडी रेल्वे स्थानक हे या भागातील प्रमुख स्थानक, जे सावंतवाडी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. या स्थानकात २०१५ साली तत्कालीन रेल्वे मंत्री श्री सुरेशजी प्रभू, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, आमदार श्री दीपकभाई केसरकरजी आदींचा उपस्थितीत रेल्वे टर्मिनस होण्याकरिता भूमिपूजन करण्यात आले. परंतु आजतागायत टर्मिनस प्रती असणारी राजकीय इच्छाशक्ती आणि कोकण रेल्वे महामंडळाची सावंतवाडी प्रति असणारी सापत्निक वागणूक ही परिपूर्ण टर्मिनस न होण्यामागची कारणे असावीत असे सध्याच्या परिस्थिती नुसार दिसत आहे. परंतु असे असताना प्रवासी वर्ग मात्र या स्थानकातून रेल्वे महामंडळाला कोटींच्या घरात उत्पन्न मिळवून देत आहे असे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे.

गेल्यावर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२३ – २४ मध्ये सावंतवाडी स्थानकाचे वार्षिक उत्पन्न हे १४ कोटी ६८ लाख एवढे होते, आणि या स्थानकातील एकूण प्रवासी संख्या ही ७ लाख ७९ हजार इतकी होती, याचा अर्थ असा की प्रतिदिन सरासरी २१३४ प्रवाशांनी या स्थानकाचा वापर आपल्या प्रवासासाठी केला. यावर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२४ – २५ मध्ये सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न हे १६ कोटी १६ लाख एवढे आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात वाढ ही १०.९२ टक्के एवढी आहे. या आर्थिक वर्षी या स्थानकाचा वापर एकूण ७ लाख ९९ हजार ७२७ म्हणजेच जेमतेम ८ लाख प्रवाशांनी केला. मागच्या वर्षीचा तुलनेत ही वाढ ४.५७ टक्के एवढी आहे. एकूण सरासरी प्रवासी संख्या ही प्रतिदिन ५७ ने वाढून २१९१ एवढी झाली आहे.

वरील माहितीद्वारे एवढे नक्की आहे की सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक हे उत्पन्नाचा बाबतीत सरस आहे. असे असून देखील कोकण रेल्वे महामंडळ या ठिकाणी प्रवाश्यांना हव्या त्या सुविधा देण्यास टाळाटाळ का करत आहे असा प्रश्न येथील प्रवाशांना नक्की पडत आहे,

म्हणूनच कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी या प्रवासी संघटनेने गेल्या वर्षभरात अनेक आंदोलने केली, भेटी गाठी घेतल्या, पाठपुरावा केला त्याचे फलित म्हणून या स्थानकात वांद्रे – मडगाव द्विसाप्ताहिक एक्सप्रेस चा थांबा आणि नागपूर – मडगाव एक्सप्रेस चा थांबा पूर्ववत केला गेला, याठिकाणी पीआरएस सुविधा पूर्णवेळ करून घेतली. टर्मिनस करिता लागणारा अप्रोच रोड आता पूर्ण रूप घेत आहे. वर्षभरात येथील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून एवढी कामे मंजूर करून घेतल्यानंतर देखील संघटनेने कोकण रेल्वेच्या १७ मार्च २०२५ च्या बैठकीत सावंतवाडी स्थानकात लिफ्ट, प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर १७० मीटर लांबीची निवारा शेड, एक्झिक्युटिव लाँन्ज आणि प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म वर डिजिटल इंडिकेटर बसवण्यासाठी परिपूर्ण चर्चा केली गेली आणि ही कामे त्याच दिवशी रेल्वे अधिकाऱ्यांनी मंजूर केली गेली. काही कामांचे टेंडर देखील निघाले आहे.

नवीन थांबे नाहीच..

सावंतवाडी स्थानकातून कोरोना काळात काढून घेण्यात आलेले राजधानी एक्सप्रेस आणि गरीबरथ एक्सप्रेसचे थांबे अजून पूर्वरत न होणे हे या ठिकाणच्या प्रवाशांवर अन्याय नाही का असा सवाल उपस्थित होतोय. कोकण रेल्वेच्या १२ जुलै च्या पत्रानुसार या ठिकाणी काही गाड्यांचे थांबे हे कोकण रेल्वेने सावंतवाडी स्थानकासाठी मंजूर केले होते आणि तसा प्रस्ताव केंद्रातील रेल्वे बोर्डाकडे पाठवला देखील होता, परंतु रेल्वे बोर्डाने तो प्रस्ताव लालफितीत का गुंडाळला हे कोडे अजून ही सुटत नाही. कोकण रेल्वे मार्गावर इतर ठिकाणी थांबे मिळत असताना सावंतवाडी स्थानक मात्र उपेक्षितच राहिले. परंतु वरील उत्पन्न आणि प्रवासी संख्या पाहता आतातरी कोकण रेल्वे महामंडळ आणि रेल्वे बोर्ड सावंतवाडीला न्याय देईल का अशी भाबडी आशा येथील जनतेत निर्माण झालीय.

सागर तळवडेकर 

उपाध्यक्ष – कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.

Konkan Railway: प्रवाशांच्या सोयीचा विचार करून मुंबई ते चिपळूण दरम्यान विशेष गाडी चालविण्यात यावी

   Follow us on        

Konkan Railway: सद्यस्थितीत सण-उत्सव किंवा सुट्ट्यांदरम्यान चालविण्यात येणाऱ्या विशेष गाड्या प्रामुख्याने गोवा व सिंधुदुर्ग भागासाठी सोडल्या आहेत. त्यामुळे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, महाड, माणगाव, रोहा, पेण व अन्य स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जागा मिळवणे अत्यंत कठीण होते, कारण या गाड्या आधीच भरलेल्या असतात. अनेकदा आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाही गाडीत चढता येत नाही. मोठ्या कष्टाने चढायला मिळालेच तर आपल्या जागेपर्यंत पोहोचता येत नाही. यामुळे अबालवृद्धांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. तिकीट तपासनीस, रेल्वे सुरक्षा बल यांचीही मदत वेळेवर मिळत नाही. कोकण रेल्वे व मध्य रेल्वेच्या हद्दीच्या वादात बऱ्याचदा चिपळूण/खेडला तक्रार केली तरी थेट पनवेलला तिकीट तपासनीस व पोलीस येतात. तोपर्यंत अर्धे प्रवासी उतरलेले असतात. त्यामुळे खेड, महाड, माणगाव येथील प्रवाशांमध्ये आरक्षण करूनही काही उपयोग होत नाही अशी भावना वाढीस लागली आहे.

 

रेल्वे प्रशासनातर्फे चिपळूण गाडी सोडताना पनवेलहून सोडली जाते. परंतु, मुंबईतील लालबाग, गिरगाव, परळ, माहीम, वरळी, अंधेरी, सांताक्रूझ, बोरिवली तर पुढे घाटकोपर, भांडुप, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, विरार, वसई, नालासोपारा येथील प्रवाशांना पनवेल स्थानक अजिबात सोयीचे नाही. तसेच, लहान मुले, वृद्ध नागरिक यांना आणि बरेचसे सामान सोबत घेऊन दोन-तीन गाड्या बदलत प्रवास करण्यास सांगणे म्हणजे एकप्रकारची क्रूरता आहे असे आम्ही मानतो. म्हणूनच, खेड/चिपळूण सारख्या मुंबईपासून तुलनेने कमी अंतरावर असणाऱ्या स्थानकांवर जाणाऱ्या गाडीला दादर आणि ठाणे हे थांबे आवश्यकच आहेत. मुंबईपासून कमाल २०० किलोमीटरच्या प्रवासासाठी ६० किलोमीटरवर पनवेलला गाडी बदलण्यास प्रवासी उत्सुक नसतात. तसेच परंपरेनुसार या पनवेल चिपळूण गाडीला एकही आरक्षित डबा नसल्यामुळे वेळेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना गाडीत जागा मिळण्याबाबत अनिश्चितता असते.

याकरिता, खालील स्थानकांवर थांबा असलेली आणि चिपळूणपर्यंत धावणारी विशेष गाडी सुरू करण्याची विनंती कोकण विकास समिती तर्फे संस्थापक अध्यक्ष जयवंत शंकरराव दरेकर यांनी ईमेलद्वारे रेल्वे प्रशासनाला केली आहे.

 

या गाडीसाठी सुचविलेला मार्ग आणि थांबे:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ दादर – ठाणे – पनवेल – पेण – नागोठणे – रोहा – कोलाड – इंदापूर – माणगाव – गोरेगाव रोड – वीर – सापे वामने – करंजाडी – विन्हेरे – दिवाणखवटी – कळंबणी बुद्रुक – खेड – अंजनी – चिपळूण

 

सुचविलेले वेळापत्रक:

प्रस्थान: पहाटे ४:५० किंवा सकाळी ७:५०/८ वाजता मुंबईहून

परतीचा प्रवास: दुपारी चिपळूणहून

 

डब्यांची रचना:

सामान्य द्वितीय श्रेणी (अनारक्षित)

द्वितीय श्रेणी आरक्षित (सिटिंग)वा

तानुकूलित चेअर कार (AC Chair Car)

ही गाडी विशेषतः खालील प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल:

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबईकडे येणारे विद्यार्थी, नोकरदार व पर्यटक

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आपल्या गावी जाणारे व परत येणारे नागरिक

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर ‘मान्सून वेळापत्रक’ नकोच!

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर गेल्या दोन दशकांपासून पावसाळ्यात म्हणजेच 10 जून ते 30 ऑक्टोबर दरम्यान मान्सून वेळापत्रक अंगिकारले जाते. मात्र या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू ठेवण्यामागील तर्कावर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नेटवर्कमधील रेल्वे प्रवासी संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दुहेरी वेळापत्रकामुळे गाड्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होतो आणि जनतेचे तसेच रेल्वेचे नुकसान होते असा दावा त्यांनी केला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर  २२ जून २००३ रोजी वैभववाडी येथे आणि १६ जून २००४ रोजी करंजडी येथे भूस्खलनामुळे झालेल्या दोन अपघातांनंतर, कोकण रेल्वे प्रशासनाने १० जून २००५ पासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये गाड्या कमी वेगाने धावतात. दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत मान्सून वेळापत्रक लागू केले जाते.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे CRS चे निर्देश
मुंबईस्थित वेस्टर्न इंडिया पॅसेंजर असोसिएशनचे सरचिटणीस थॉमस सायमन म्हणाले की, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CRS) केआरसीएलला कायमस्वरूपी उपाययोजना लागू होईपर्यंत फक्त मुसळधार पावसात काही वेगाचे निर्बंध लादण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर महामंडळाने भूस्खलन रोखण्यासाठी व्यापक भू-तांत्रिक कामे करण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या मेलमध्ये, श्री. सायमन म्हणाले की, मुंबई येथील सेंट्रल सर्कलच्या CRS ने २०१८ मध्ये WIPA प्रतिनिधींना सांगितले होते की आयुक्तांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन KRCL किंवा इतर संस्थांना मान्सून वेळापत्रक कायम सुरू ठेवण्याचे निर्देश दिले नव्हते, तरीपण हे मान्सून वेळापत्रक कोकण रेल्वेमार्गावर अंगिकारले जात आहे. कोकण रेल्वे मार्गावर दुहेरी वेळापत्रक न अंगिकारता एकच वेळापत्रक कायम ठेवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
श्री. सायमन यांच्या मते मान्सून वेळापत्रक केआर नेटवर्कवरील प्रत्येक ट्रेनसाठी दोन मार्ग आणि वेळेचे संच तयार करते ज्यामुळे गाड्यांची कृत्रिम कमतरता निर्माण होते, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आणि रेल्वेचे नुकसान होते. केआरसीएलवरील प्रत्येक ट्रेनला मान्सून आणि मान्सून नसलेल्या कालावधीसाठी दोन वेगवेगळे मार्ग दिले पाहिजेत ज्यामुळे एक स्लॉट कायमचा रिकामा राहील. कोकण रेल्वे २४ तासांच्या दिवसात सुमारे २४ गाड्या चालवते. प्रत्यक्षात जर मान्सून वेळापत्रक नसेल तर ते दर १० मिनिटांनी एक ट्रेन चालवू शकते.
मान्सून वेळापत्रक रद्द केल्यास, कोकण रेल्वे (केआर) नेटवर्कद्वारे अधिक गाड्या चालवता येतील; १२० किमी प्रतितास वेगाची परवानगी, मुंबई ते तिरुवनंतपुरम पर्यंत पूर्ण विद्युतीकरण आणि मुंबई एलटीटी ते वीर दरम्यान १७१ किमी दुहेरी ट्रॅकसह, तिप्पट जास्त गाड्या धावू शकतात, असा त्यांनी युक्तिवाद केला आहे. गेल्या काही वर्षांत केआर नेटवर्कवर कोणतेही मोठे भूस्खलन झालेले नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर तिरुअनंतपुरम ते नवी दिल्ली या नेटवर्क दरम्यानच्या  गाड्या चालविण्यात येतात. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरी वेळापत्रकाचा परिणाम संपूर्ण भारतात  होतो असेही  ते म्हणालेत.
वेग निर्बंध
WIPA ने वारंवार असे सुचवले होते की गरज पडल्यास रत्नागिरी आणि आडवली दरम्यान गाड्या कायमस्वरूपी गतीने चालवता येतील. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे जवळजवळ दरवर्षी भूस्खलन, पूर इत्यादी घटना घडतात मात्र तरीही तिथे पावसाळ्याचे वेगळे वेळापत्रक नाही आहे. कुंडापुरा रेल्वे प्रयत्न समितीचे गौतम शेट्टी म्हणाले की, उत्तर भारतात दरवर्षी दाट धुके पडत असले तरी तिथे हिवाळ्यातील वेळापत्रक नाही आहे.
पावसाळ्याचे वेळापत्रक अनावश्यकपणे संसाधने वाया जात आहेत. केवळ जेथे धोका जास्त आहे अशा  ठिकाणी मुसळधार पावसातच हे निर्बंध लादले जावेत असे मत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्राचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी मांडले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search