Category Archives: कोकण

घर ते शाळा यांमधील अंतरामुळे शाळा सोडाव्या लागणाऱ्या गरजू मुलींना मोफत सायकल देणार – आ. नितेश राणे

सिंधुदुर्ग : घर ते शाळा यांमधील जास्त अंतर, वाहतुकीची सोय नाही या कारणामुळे अनेकदा पालक मुलींना शाळेत पाठवणे टाळतात. अशा मुलींसाठी आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात एक स्तुत्स्य उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील  प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या गरजू मुलींना मोफत सायकल प्रदान करणार असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 
पहिल्या टप्यात शाळेतील एकूण ३७९ मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिल रोजी ११० मुलींना मोफत सायकल देऊन शुभारंभ करण्यात येणार आहे. हा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी नसून कायम चालू राहणार आहे असे नितेश राणे म्हणाले आहेत. 
कणकवली देवगड आणि वैभववाडी या तालुक्यांमध्ये जेव्हा मुली शाळेकडे जातात.त्यांना शाळेत पोहचण्याची अडचण होते.काही शाळा दूर असल्याने पालक मुलींना लीं पाठवत नाहीत किंवा संध्याकाळी उशिरा होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने पाहून मुलींना शाळेत पाठवले जात नाही .माझ्या मतदार संघातील शिक्षणापासून एकही मुलगी वंचित राहू नये, यासाठीच कणकवली विधानसभा क्षेत्रातील शालेय मुलींनी असे नितेश राणे एका पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. 
प्राथमिक आणि माध्यमिक शाळांकडून अशा गरजू मुलींची यादी मागवली जाणार आहे. यादीप्रमाणे गरजू मुलींसाठी त्या शाळेला सायकल दिली जाणार आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलींना ही सायकल शाळेकडे पुन्हा द्यावी लागणार आहे. ती सायकल कंडिशन तपासून त्याच शाळेतील इतर गरजू मुलींना दिली जाईल. 

Loading

पुणे- एर्नाकुलम सुपरफास्ट गाडीसह अजून एक उन्हाळी विशेष गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावणार; आरक्षण १० एप्रिलपासून सुरु.

Konkan Railway News:  कोकण रेल्वेने मध्यरेल्वेच्या सहकार्याने उन्हाळी हंगामादरम्यान मुंबई पुण्यावरून अजून काही अतिरिक्त गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यआधी पण या मार्गावर काही विशेष गाड्या सोडल्या आहेत त्यात या अतिरिक्त गाड्यांमुळे भर पडणार आहे.

1) Train no. 01455 / 01456 Lokmanya Tilak (T) – Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly): 

Train no. 01455 Lokmanya Tilak (T) – Karmali
दिनांक १५/०४/२०२३ ते ०३/०६/२०२३ दरम्यान दर शनिवारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरुन रात्री ०१:१० वाजता सुटेल आणि दुपारी १४:३५ वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01456  Karmali – Lokmanya Tilak (T) 
दिनांक १५/०४/२०२३ ते ०३/०६/२०२३ दरम्यान दर शनिवारी ही गाडी वरुन संध्याकाळी करमाळी स्थानकावरून १६;२० वाजता सुटेल आणि पहाटे ०३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा,माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली,राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम
डब्यांची संरचना
एसएलआर – 01 + जेनेरेटर व्हॅन  – 01 + सेकंड सीटिंग – 02 + स्लीपर – 12 + थ्री टायर एसी – 04 + टू टायर एसी – 01  असे मिळून एकूण 21 LHB  डबे
वेळापत्रक
Train no. 01455 Day Station Name Train no. 01456  

Day

01:10 1 LOKMANYATILAK T 03:45 2
01:30 1 THANE 03:05 2
02:20 1 PANVEL 02:15 2
03:45 1 ROHA 01:05 2
04:10 1 MANGAON 23:32 1
05:12 1 KHED 22:10 1
05:44 1 CHIPLUN 21:42 1
06:10 1 SAVARDA 21:12 1
06:40 1 SANGMESHWAR 20:50 1
07:40 1 RATNAGIRI 20:05 1
08:22 1 ADAVALI 19:20 1
09:08 1 RAJAPUR ROAD 18:46 1
09:22 1 VAIBHAVWADI RD 18:30 1
10:13 1 KANKAVALI 18:02 1
10:34 1 SINDHUDURG 17:44 1
10:46 1 KUDAL 17:32 1
11:10 1 SAWANTWADI ROAD 17:10 1
12:10 1 THIVIM 16:40 1
14:35 1 KARMALI 16:20 1

2) Train No. 01049 Pune Jn. – Ernakulam Jn. Superfast & Train No, 01050 Ernakulam Jn. – Pune Jn.  Special (Weekly):

Train No. 01049 Pune Jn. – Ernakulam Jn. Special (Weekly):
दिनांक १३/०४/२०२३ ते २५/०५/२०२३ दरम्यान दर गुरुवारी ही गाडी पुणे या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १८:५० वाजता एर्नाकुलम या स्थानकावर पोहोचेल.
Train No, 01050 Ernakulam Jn. – Pune Jn.  Special (Weekly):
दिनांक १४/०४/२०२३ ते २६/०५/२०२३ दरम्यान दर शुक्रवारी ही गाडी एर्नाकुलम या स्थानकावरुन रात्री २३:२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री ०२:४५ वाजता पुणे या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
लोणावळा,पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड,मडगाव, कारवार, कुंदापूर, उडपी, मंगुळुरु, कासारगोड, कन्नूर, थालासेरी, कोचिकोडे, तिरुर, शोरानूर, थ्रिसूर
डब्यांची संरचना
एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – 06 + स्लीपर – 11 + थ्री टायर एसी – 02 + टू टायर एसी – 01  असे मिळून एकूण 22 LHB  डबे
आरक्षण
गाडी क्र. ०१४५६ करमाळी – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीचे आरक्षण दिनांक १०/०४/२०२३ रेल्वेच्या सर्व टिकेट्स खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर खुले होणार असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार्‍या उधना-मंगुळुरु विशेष गाडीचे आरक्षण आजपासून खुले.

Konkan Railway News :प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन  कोंकण रेल्वेमार्गावर पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने उधना ते मंगुळुरु दरम्यान एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचे आरक्षण आज दिनांक 10/04/2023 पासून सर्व तिकीट खिडक्यांवर आणि सर्व अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळावर खुले होणार आहेत.
Train no. 09057 / 09058 Udhana Jn  –  Mangaluru  Jn   – Udhana Jn Weekly Special on  Special Fare
Train no. 09057 Udhana Jn  –  Mangaluru  Jn
ही गाडी दिनांक  १२ एप्रिल ते ०७ जून पर्यंत दर बुधवारी उधाणा या स्थानकावरुन रात्री २०:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४० वाजता मंगळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09058  –  Mangaluru  Jn  – Udhana Jn
ही गाडी दिनांक  १३ एप्रिल ते ०८ जून पर्यंत दर गुरुवारी मंगळुरु या स्थानकावरुन रात्री २१:१० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:०५  वाजता उधाणा या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा (RN), माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकरण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैंदूर, कुंदापूर, उडुपी, मुल्की, सुरतकल, तोकुर
डब्यांची संरचना
एसएलआर – ०1 + जेनेरेटर वॅन – 01 + सेकंड सीटिंग – 03 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 06 + टू टायर एसी – 02 + फर्स्ट एसी – 01  असे मिळून एकूण LBH  22  डबे
Train no. 09057 Udhana Jn  –  Mangaluru  Jn या गाडीचे आरक्षण आज दिनांक 10/04/2023 पासून सर्व तिकीट खिडक्यांवर आणि सर्व अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.

Loading

शनिवारी धावणार मंगळुरू ते मुंबई विशेष एकेरीमार्गी गाडी

Konkan Railway News |  मंगळुरू ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस अशी वन-वे सुपरफास्ट विशेष गाडी शनिवार दि. ८ एप्रिल २०२३ रोजी सोडण्यात येणार आहे. 

गाडी क्रमांक ०६००७ मंगळुरु जं. – लोकमान्य टिळक (टी) वन वे सुपरफास्ट स्पेशल मंगळुरू जंक्शन येथून 08/04/2023, शनिवार रोजी 18:10 वाजता सुटणार असून ती ट लोकमान्य टिळक (टी) येथे दुसऱ्या दिवशी 13:15 वाजता पोहोचेल.

या गाडीचे थांबे 

सुरतकल, उडुपी, कुंदापुरा, मुकांबिका रोड बैदूर, भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, कारवार, काणकोण, मडगाव जंक्शन, करमाळी, थिविम, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल आणि ठाणे 

डब्यांची संरचना 

ही गाडी एकूण 19 कोचसह धावणार आहे. टू टियर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 01 कोच, स्लीपर – 06 कोच, जनरल – 09 डबे, SLR – 02. अशा डब्यांच्या रचनेसह धावणार आहे.

Loading

गोव्याप्रमाणे आता कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरसुद्धा ‘बीच शॅक्स’ दिसणार

रत्नागिरी –आता गोव्यातील समुद्र किनाऱ्याप्रमाणे कोकणातील  समुद्रकिनाऱ्यांवर ‘बीच शॅक्स’ अर्थात चौपाटी कुटी दिसणार आहेत. पर्यटन वाढविण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर ‘बीच शॅक्स’ उभारण्यासंदर्भातील धोरणास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तात्पुरत्या हंगामी स्वरुपाच्या असलेल्या या कुट्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड येथील समुद्र किनाऱ्यांवर उभारल्या जातील.
सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या आठ किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील. पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधीकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल.
चौपाटी कुटी चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाचे पुढील नियम असतील 
  • या चौपाटी कुटीस सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशा वेळेत सुरू ठेवता येईल. 
  • तसेच संगीताचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. 
  • प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरादेखील असेल.
  • एका चौपाटीवर कमाल १० कुट्या उभारता येतील.
  • यातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी ८० टक्के जागा राखीव असतील.
  • कालावधी – या कुट्यांचे तीन वर्षांकरिता वाटप करण्यात येईल.
  • आकार – त्यांचा आकार १५ फूट लांबी, १५ फूट रुंद आणि १२ फूट उंच असेल
  • बैठक –  गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी २० फूट लांब आणि १५ फूट रुंद छत टाकता येईल.
  • परवाना मूल्य – कुटी मिळणाऱ्या व्यक्तीला परवान्यासाठी १५ हजार रुपये अर्जाचे ना परतावा मूल्य असेल.
  • वार्षिक शुल्क – या कुटीसाठी पहिल्या वर्षी ४५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार, तिसऱ्या वर्षी ५५ हजार रुपये वार्षिक शुल्क राहील.
  • अनामत रक्कम – याशिवाय ३० हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल.

Loading

गोव्यात सापडलेल्या ‘काळ्या बिबट्याला’ ट्रॅकिंग डिव्हाईस लावून जंगलात सोडणार….

गोवा वार्ता – तळकोकणात अधून मधून काळे बिबटे दृष्टीस येत आहेत असे बोलले जात होते. तळकोकणत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेरी येथे रात्री एका नागरिकास काळा बिबटा दिसल्याची बातमी आली होती. परंतु या बातमीस काही जणांनी आक्षेप घेऊन ती बातमी खोटी असल्याचे दावे केले होते. मात्र जिल्ह्या लगतच्या गोवा राज्यातील  केपे तालुक्यातील बाळ्ळी येथे लोकवस्तीत फिरणाऱ्या काळ्या बिबट्याला (ब्लॅक पॅंथर) वनविभागाने 1 एप्रिल रोजी पिंजऱ्यात पकडले आहे. त्यामुळे तळकोकणत आणि लगतच्या गोवा राज्यात ब्लॅक पॅन्थर चा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. 
गोव्याच्या जंगलांमध्ये काळ्या बिबट्यांचा वावर होता, हे यापूर्वी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये सिद्ध झाले होते. आता बाळळी परिसरातील लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या सापडला आहे.
लक्ष ठेवण्याकरता ट्रॅकिंग डिव्हाईस
पकडण्यात आलेल्या बिबट्याला नेत्रावली च्या अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. तो पुन्हा मानवी वस्तीत जाऊ नये याची दक्षता घेतली जाणार आहे, म्हणूनच त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरता हे ट्रॅकिंग डिव्हाईस लावण्यात येत आहे. राज्यातला हा पहिलाच प्रयोग आहे, असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Loading

हत्ती परत आलेत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दोडामार्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्तींनी परत येवून  धुडगूस घालणे चालू केल्याने येथील नागरिकांमध्ये चिंतेचे अणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवस केर आणि मोर्ले या गावांतील बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करून त्यांनी आपला मोर्चा वायंगणतड या गावी वळवला आहे.

अचानक शेतात हत्तीं आल्याने वायंगणतड ग्रामस्थांनी शेतात घाव घेवून त्यांना हिसकावून लावण्याच्या प्रयत्न केला. मात्र हत्तींना त्यांच्या प्रयत्नांना दाद दिली नाही. त्यानंतर खबर मिळाल्यावर वन विभागाचे कर्मचारी हजर झाले. ग्रामस्थांनी आणि या कर्मचाऱ्यांनी कसेबसे त्यांना हिसकावून लावले. मात्र हत्तीं पुन्हा आल्याने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींकडून शेताची, बागायतीची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्याने हाता तोंडाशी आलेले शेती उत्पादन शेतकर्‍यांना गमावण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेलं तळकोकणातील दोडामार्ग मधील तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्ष हत्तीचं वास्तव्य असून शेती आणि बागायतींचं नुकसान करत आहेत. पावसाळा सुरु झाला की हे हत्ती घाटमाथ्यावर जातात आणि पुन्हा पावसाळा संपल्यानंतर परत येतात. पाच ते सहा हत्तींचा कळप तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्षे वावरत आहे. त्यामुळे या ठिकाणचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. उन्हाळी शेती, काजू, नारळ, सुपारी केळी या बागायतीचे हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. 

 

Loading

दोन ते तीन महिन्यांमध्ये नारायण राणे यांचं मंत्रीपद जाणार- आ. वैभव नाईक

सिंधुदुर्ग -ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल एक भाकीत केले आहे. .दोन ते तीन महिन्यांमध्ये नारायण राणे यांचं मंत्रीपद जाणार असल्याचं भाकीतच नाईक यांनी वर्तवलं आहे. हे भाकीत नसून वस्तुस्थिती आहे. असं देखील वैभव नाईक म्हणाले आहेत. नारायण राणे यांचं शिवसेनेवर टीका करण्याचं काम होतं. ते काम आता संपलेलं आहे त्यामुळे त्यांचं मंत्रीपद पुढील काही महिन्यांमध्ये जाणार आहे. असा दावा त्यांनी केला.तर पुढं म्हणाले की, नारायण राणेंना माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभं करायचं आहे. मात्र जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
तर शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांवर बोलताना म्हणाले, जे आमदार आमच्यातून शिंदे गटात गेले आहेत ते आमदार आमच्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येण्यास तयार आहेत. आमच्यातून गेलेल्या आमदारांना आता त्यांची खरी परिस्थिती कळालेली आहे. असा दावा देखील त्यांनी केला आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांना अतिरिक्त डबे

Konkan Railway News | कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हापा-मडगाव एक्सप्रेस तसेच पोरबंदर ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला प्रत्येकी एका फेरीसाठी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हापा मडगाव या गाडीला हापा येथून सुटताना 05 एप्रिल रोजी तर मडगाव ते हापा दरम्यान धावताना 07 एप्रिल रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढीव जोडला जाईल. याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेलीदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला पोरबंदर  येथून सुटताना 06 एप्रिल रोजी तर कोचुवेली येथून सुटताना 09 रोजी स्लीपर श्रेणीचा एक जादा डबा जोडला जाणार आहे. उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होऊ लागली आहे. यामुळे अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादी वाढू लागली आहे. रेल्वेने काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर रूळ ओलांडताना होणार्‍या अपघातांत वाढ; उपाययोजनांची गरज.

Konkan Railway News | कोकण रेल्वेमार्गाचे 100% विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. जवळपास या मार्गावरील सर्वच गाड्या आता विद्युत इंजिनसह धावत आहेत. विद्युत इंजिनामुळे इंधनावर होणार्‍या खर्चावर मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. त्यामुळे या वाचणार्‍या पैशांतून या मार्गावरील विकासाची कामे करणे रेल्वेला शक्य होणार आहे. त्याशिवाय डिझेल इंजिनामूळे मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदूषण टाळता येणार आहे.

पण या विद्युतीकरणामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. या मार्गावरील अनेक गावे रेल्वेरूळा मुळे दोन भागात विभागली आहेत. घर रूळाच्या एका बाजूला तर शाळा आणि शेती एका बाजूला. त्यामुळे रूळ ओलांडल्या शिवाय गावकर्‍यांकडे पर्याय नाही आहे. कारण या मार्गावर पलीकडे जाण्यासाठी ब्रिज नाही आहेत. असले तरी ते खूप अंतरावर आहेत. याआधी गाड्या डिझेल इंजिनावर धावत होत्या त्यामुळे गाड्यांचा मोठा आवाज येत असे. या आवाजामुळे ग्रामस्थ किंवा वन्य प्राणी सावध होत असत. पण आता त्याप्रमाणात आवाज येत नाही त्यामुळे रूळांवर अपघात वाढत असल्याचे दिसत आहेत. वन्य आणि पाळीव प्राणी तसेच नागरिकांचा बळी जाण्याच्या बातम्या आजकाल मोठ्या प्रमाणावर ऐकण्यास मिळत आहेत.

वन्यप्राणी रूळांवर येवू नये यासाठी रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस कुंपण बांधणे गरजेचे आहे. व्यवहार्य दृष्टीने पाहता सर्वच ठिकाणी पादचारी पूल बांधणे शक्य नाही पण ज्याठिकाणी जास्त प्रमाणात रूळ ओलांडले जाते अशा ठिकाणी असे पूल किंवा भुयारी मार्ग बांधणे गरजेचे आहे.

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search