Ratnagiri News :कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम आता मार्गी लागणार आहे. गेली पाच वर्षे राखलेल्या ह्या कामाच्या भूसंपादनासह सर्व अडथळे दूर झाले आहेत. डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
ह्या कामासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. ह्या कामासाठी 2 हजार 114 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. एकूण 134 कि.मी. रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता 667.13 हेक्टर जमीन आवश्यक आहे. यापैकी बहुतांश जमीन संपादित करण्यात आली आहे. हा महामार्ग पूर्वी शहरातून जात होता. आता केर्ली बायपास काढण्यात आला आहे. केर्ली-शिये-चोकाकमार्गे रत्नागिरी-नागपूर या महामार्गास जोडला जाणार आहे.
Konkan Railway News : पर्यटनाचा हंगाम, तळकोंकणातील जत्रेचा हंगाम तसेच कोकण मार्गावरील गाडयांना गर्दी होत असल्याने कोंकण रेल्वेने ह्यावर उपाय म्हणून कोंकण मार्गावरील काही गाडयांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक माहितीसाठी ww.enquiry.indianrail.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्यात यावी. प्रवाशांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनामार्फत केले गेले आहे.
मुंबई :देशाच्या स्वराज्याच्या आणि स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये कोकण प्रदेशाचे मोठे योगदान आहे. संपूर्ण भारत देशाचे दैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची राजधानी कोकणात म्हणजे रायगड किल्ल्यावर केली. , सरखेल कानोजी आंग्रे ,नरवीर तानाजी मालुसरे, सरसेनापती नेताजी पालकर, महान सेनानी बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक , महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके , मातृशक्तीचे देशातील सर्वात मोठे प्रतीक झाशीची राणी लक्ष्मीबाई भारतरत्न विनोबा भावे ,भारतरत्न महर्षी कर्वे अशी अनेक नररत्न या देशाला कोकण प्रदेशाने दिली. या महान व्यक्तिमत्त्वांना राष्ट्रपुरुषांना मानवंदनादेण्यासाठी भव्य स्वराज्य भूमी कोकण महोत्सव आणि अभियान कोकण बिझनेस फोरम व मी मुंबई तर्फे आयोजित करण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणिउपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे विशेष सहकार्य या अभियानाला मिळणार आहे. कोकणचे सुपुत्र मुंबई प्रदेश भाजपा अध्यक्ष आमदार आशिषजी शेलार हे या अभियानाचे अध्यक्ष आहेत, विधान परिषदेतील मा. प्रवीण दरेकर याचे संयोजक आहेत.यावेळी भव्य उद्योग प्रदर्शन , सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे
कोकणातील इतिहास संस्कृती परंपरा लोककला उद्योग यांचा भव्य महोत्सव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. देशाचे उद्योग मंत्री नारायणराव राणे आणि त्यांचे एमएसएमई मंत्रालय या उपक्रमाला विशेष सहकार्य करत आहेत. राज्याच्या उद्योग मंत्री उदय जी सामंत या महोत्सवात सहभागी झाले आहेत. आत्मनिर्भर कोकण अंतर्गत कोकणातील तरुणांना कोकणात उद्योग उभारण्यासाठी विशेष मार्गदर्शन आणि समन्वय याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे. यासाठी भव्य परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता आमदार प्रसादजी लाड यांनी पुढाकार घेतला आहे. कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडेवरेकर यांची संपूर्ण टीम या उपक्रमात सहभागी झाली आहे.
स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा
कालावधी :६ ते ९ डिसेंबर
स्थळ : नेस्को कॉम्प्लेक्स ,वेस्टन एक्सप्रेस हायवे गोरेगाव
कार्यक्रमपत्रिका
६ डिसेंबर
सकाळी ८-३०. भव्य उद्घाटन
प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटक
माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, माननीय केंद्रीयमंत्री नारायणराव राणे साहेब, महोत्सव प्रमुख, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय पर्यटन मंत्री मंगल प्रभातजी लोढा साहेब
संध्याकाळी ४ ते ६
स्वराज्यभूमी मंथन परिषद
प्रमुख अतिथी रघुजीराजे आंग्रे , सरखेल कान्होजी आंग्रे यांची वंशज. व अन्य प्रमुख व्यक्तिमत्वांचे वंशज
संध्याकाळी ६ ते ९
आंबा काजू उद्योग परिषद
प्रमुख अतिथी. माननीय गिरीशजी महाजन, ग्राम विकास मंत्री, महाराष्ट्र
सचिव, / व्यवस्थापकीय संचालक. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ
दिनांक ७ डिसेंबर
सकाळी ११ ते दुपारी ४
कोकण मत्स्य उद्योग परिषद आणि निसर्ग संवर्धन परिषद
प्रमुख उपस्थिती वन आणि मत्स्य उद्योग मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब , सचिव- मत्स्य उद्योग विभाग / सचिव -वनविभाग
संध्याकाळी चार ते आठ
स्वराज्यभूमी सागरी परिषद
प्रमुख अतिथी. माननीय दादाजी भुसे बंदर विकास मंत्री महाराष्ट्र शासन
सचिव बंदर विकास, सी ई ओ महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड
गुरुवार दिनांक 8 डिसेंबर
सकाळी दहा ते दुपारी चार
स्वराज्य भूमी कोकण पायाभूत सुविधा व उद्योग विकास परिषद
प्रमुख उपस्थिती.
सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रवींद्र जी चव्हाण साहेब.
एम एम आर डी ए , सिडको , एमएसआरडीसी ,कोकण रेल्वे विविध विभागाचे प्रमुख.
एम एस एम इ , खादी ग्रामोद्योग, नाबार्ड, अण्णासाहेब पाटील महामंडळ उद्योग संचालनालय विविध उद्योग विकासाच्या योजना आणि त्या विभागाचे प्रमुख.
संध्याकाळी चार ते आठ
स्वराज्यभुमी सीएसआर परिषद
कोकणातील मोठे उद्योग समूह आणि कोकणातील मोठ्या सामाजिक ग्रामीण विकास शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांचे स्नेहसंमेलन.
प्रमुख उपस्थिती
राज्याचे उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत साहेब
शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर
स्वराज्यभूमी पर्यटन उद्योग विकास परिषद
प्रमुख उपस्थिती मा. मंगल प्रभात लोढा साहेब, पर्यटन मंत्री, सचिव पर्यटन विभागसं, चालक पर्यटन संचनालय
संध्याकाळी सहा वाजता भव्य समारोप
प्रमुख उपस्थिती महोत्सव प्रमुख आणि केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री मा नारायणराव राणे साहेब
निमंत्रक /शब्दांकन : माननीय संजय यादवराव, संयोजक आणि समन्वयक
Konkan Railway News :मुंबई गोवा महामार्ग गेल्या १२ वर्षांपासून रखडला आहे, अनेक ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने ह्या महामार्गाने वाहतूक करणे खूपच गैरसोयीचे झाले आहे. ह्या सर्वात कोकणातील उद्योजकांना कोकण रेल्वेने एक दिलासादायक बातमी दिली आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदरापासून रत्नागिरीपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून कंटेनर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरक्षित प्रवास आणि वेळेची बचत असा दृष्टिकोन रेल्वेने ठेवला असून पहिली कंटेनर ट्रेन २९ नोव्हेंबर २०२२ रोजी रत्नागिरी स्थानकातून सोडण्यात येणार आहे. या सुविधेचा व्यापाऱ्यांकडून लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून केले गेले आहे. ह्या सुविधेंचा लाभ कोकणातील स्थानिक उद्योजकांना होणार आहे. मालाची वाहतूक अधिक वेगवान आणि कमी खर्चात करण्यासाठी ह्या सेवेचा लाभ घेता येईल. कोकणात उत्पादित उत्पादने मुंबईतील जेएनपीटी बंदरातून जगाच्या विविध भागात निर्यात केली जातात. येथील उत्पादनेही त्यांच्या गुणांसाठी ओळखले जातात. त्यामुळेच जगभरात प्रचंड मागणी असते. मुंबई गोवा हायवे वाहतुकीस योग्य नाही आहे. त्यावरुन वाहतूक करताना दमछाक होते आणि वेळही अधिक लागतो. रस्ते अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जेएनपीटी आणि रत्नागिरी दरम्यानचा हा प्रवास सुरळीत करण्यासाठी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागाने कंटेनर ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनमध्ये चाळीस फूट आणि वीस फूट लांबीचे कंटेनर मालाच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. निर्यातीसाठी वातानुकूलीत आणि कोरडे कंटेनरही यामध्ये वापरले जाणार आहेत. मालाची वाहतूक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी कोकण रेल्वेची ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. कोकणातून होणाऱ्या व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
पेण: आपल्या विविध मागण्याकरिता आणि पेण रेल्वे स्थानकात सध्याच्या गैरसोयी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून आणून देण्यासाठी माझं पेण आणि रेल्वे प्रवासी सन्मान समिती तर्फे पुढील महिन्यात ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
ह्या मागण्यांमध्ये मुख्य मागणी म्हणजे ह्या स्थानकाला काही गाड्यांचे थांबे मिळवणे हि असली तरी अजून काही मागण्या आहेत. पेण तालुका हा जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून त्याची लोकसंख्या सुमारे २ लाखापेक्षा जास्त आहे. पेण तालुक्यातून मुंबई,नवी मुंबई, पनवेल, माणगाव, रोहा आणि इतर ठिकाणी नोकरी, शिक्षण तसेच व्यापाराच्या कारणासाठी नियमित प्रवास करतात. त्याचप्रमाणे काही मोठ्या कंपन्या पण तालुक्यात आहेत. सुबक मूर्तीसाठी पेण तालुका पूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे. हे रेल्वे स्थानक मुंबई गोवा हायवे च्या जवळ आहे. ह्या सर्व गोष्टी अनुकूल असताना पेण ह्या रेल्वे स्थानकाला रेल्वे प्रशासनाकडून योग्य सन्मान भेटत नाही आहे अशी ह्या समितीची तक्रार आहे.
१. कोरोना पूर्व काळात पेण स्थानकात थांबणारी दिवा-सावंतवाडी-दिवा (१०१०५/१०१०६) ह्या गाडीला पेण, कासू, नागोठणे, रोहा येथे पूर्ववत थांबा मिळावा.
२. कोरोना काळात सामान्य Passenger गाडयांना लावलेले अधिक तिकीट दर पूर्ववत करण्यात यावेत.
३. रोहा – पनवेल – रोहा या मार्गावर मेमू गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात आणि त्या नियमित वेळापत्रकानुसार असाव्यात.
४. पेण दिवा पेण मेमू शनिवार आणि रविवार देखील सुरु राहावी.
५ यादीतील किमान ५ एक्सप्रेस गाडयांना पेण येथे थांबा देण्यात यावा.
याचप्रमाणे स्थानकावर अतिरिक्त तिकीट खिडकी, तिकीट तपासणीस नेमण्यात यावा असे रेल्वेच्या हितासाठी काही मागण्या पण आहेत.
ह्या सर्व मागण्या दिनांक १०.१२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात नाहीतर दिनांक ११.१२.२०२२ रोजी सकाळी ११ वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा “माझं पेण” आणि “रेल्वे प्रवासी सन्मान समिती” ने दिला आहे.
Konkan Railway News :१२०५१/१२०५२ मुंबई सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस हि चाकरमान्यांना मुंबईमधून कोकणात आणि कोकणातून मुंबईला कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचवणारी एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. एवढेच नाही तर ह्या एक्सप्रेस ने त्याच दिवशी कोकणात जाऊन पुन्हा मुंबईला येते असे ह्या गाडीचे वेळापत्रक आहे. सकाळी मुंबई सीएसमटी स्थानकावरून सकाळी ५.१० वाजता सुटणारी हि एक्सप्रेस मडगावला त्याच दिवशी दुपारी १४.१० ला पोचते. परतीच्या प्रवासात हि गाडी मडगाव स्थानकावरून १४.४० ला सुटून ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे २३.३० ला पोहोचते. त्यामुळे ह्या गाडीला कोकणवासीयांची पहिली पसंदी आहे.
पण अलीकडच्या काही दिवसात हि गाडी नेहमीच उशिरा धावत असल्याचे दिसत आहे. कोकणातून मुंबईला येताना प्रवाशांना खूप मनस्ताप करावा लागत आहे. ठाणे, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हि गाडी रात्री १.३० / २.०० च्या दरम्यान पोचत असल्याने उपनगरीय लोकल्स ने पुढचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. कारण ह्या वेळेला उपनगरीय रेल्वे गाड्या बंद असतात, त्यामुळे दूर जाणाऱ्या प्रवाशांना सकाळच्या पहिल्या ट्रेन चे प्रतीक्षा करावी लागते किंवा इतर महागड्या पर्याय निवडावा लागतो.
पावसाळी वेळापत्रक होते तेव्हा कोकण रेल्वे दोन स्वतंत्र गाड्या ह्या मार्गावर चालवीत असे, त्यामळे हि समस्या येत नसे. हि गाडी वेळेवर असे. आता १२०५१ जी गाडी दुपारी १४.१० ला पोहोचते तीच गाडी १४.४० ला १२०५२ परतीच्या प्रवासाला सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई वरून मडगाव ला जाणारी गाडी जर उशिरा गेली तर त्याचा परिणाम तेथून मुंबईसाठी सुटणाऱ्या १२०५२ गाडी वर होतो आणि उगमस्थानावरूनच हि गाडी उशिरा निघते. त्यामुळे दोन स्वतंत्र गाड्या वापरण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.
Konkan Railway News :कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटली आहे.यामुळे मध्यरात्रीपासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सर्व गाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर धावत असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या.
मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या. पण अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आलं. त्यानंतर कोकणकन्या एक्सप्रेस मार्गस्थ झाली. कोकण रेल्वे प्रशासनाकडून इलेक्ट्रिकऐवजी डिझेल इंजिनची उपलब्धता करून हळूहळू एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात येत आहेत. तरीही अद्यापही कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिरानंच सुरु आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या तीन ते चार तास उशिरानं धावत आहेत. कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिरानं धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सावंतवाडी : गव्याच्या हल्ल्यात सावंतवाडी तालुक्यात एका शेतकर्याचा मृत्यू झाला आहे. चौकुळ केगदवाडी येथील ७० वर्षीय शेतकरी सोनू साबा परब असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे., बुधवारी (दि.२३) रात्री उशिरा ही दुर्देवी घटना घडली.सोनू परब हे काही कामानिमित्त बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास जंगलाच्या दिशेने गेले होते. परंतु रात्री उशिरापर्यंत ते घरी परतलेच नाहीत. यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान परब यांचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत खालचा भाटला तळीकडे आढळून आला. याबाबत पोलीस व वनकर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली.
वनकर्मचाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर परब यांचा मृत्यू गव्याच्या हल्ल्यात झाल्याचे निर्दशनास आले. यानंतर वनविभागाचे आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके-कांबळे व कर्मचाऱ्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी पाठवला. परब यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गवा रेड्यांचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले आहे. रात्री जंगल दाटी प्रदेशातून प्रवास करणे खूप धोक्याचे बनले आहे त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
मुंबई :आज दिनांक-20.11.2022 रोजी दादर मुंबई येथे जनआक्रोश सभा कोकणकरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सभा आयोजकांनी सदर सभेला 25 सामाजिक प्रतिष्ठान, संस्था, संघटना यांनी पाठींबा दिला आहे असे अशी माहिती दिली आहे. याच 25 संघटनेचे सभासद अंदाजित 01 लाखाच्या वर असून नक्कीच याचा फायदा जनआक्रोश आंदोलनाला होईल.तसेच 180 कोकणकर या सभेला उपस्थित राहिले.या सभेला कोकणकरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर सभेत जे काही शेवटी निर्णय घेण्यात आले त्यांची माहिती खालील प्रमाणे-
1. मुंबई गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समिती अस नाव विचारात आणले आहे.
2. विविध 12 प्रकारच्या कमिटी असून ज्या सदस्यांना कोणत्याही कमिटीवर काम करावयाचा इच्छा असेल तर उद्या पाठविण्यात येणारा फॉर्म व्यवस्थितरित्या भरून सादर करावा यामधून नियुक्ती लवकरात लवकर करण्यात येईल.
3.ऑनलाईन पोर्टलद्वारे विविध माध्यमातून पत्र पाठविण्यात येतील.
4. गडकरी साहेब,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री,आमदार,खासदार यांना पत्रव्यवहार करून अधिवेशन मध्ये मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गस्थ लावणे.
5.अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना सरकारकडून मदत जाहीर करणे व यापुढे खराब महामार्गमुळे एखादा अपघात झाला तर प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करणे.
6.जर हे महामार्ग 2023 मध्ये पूर्ण झाले नाही तर लोकप्रतिनिधी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशा आशयचे पत्र देऊन त्यांच्याकडून पोचपावती घेणे.
7. यापुढे कोकणातील कोणतेही लोकप्रतिनिधी ट्रेन, विमानने कोकणात जाण्यासाठी वापर करीत असतील तर त्यांना अडवून महामार्गानेच प्रवास करावे अन्यथा जनआक्रोशच्या वतीने निषेध म्हणून आक्रमक भूमिका घेण्यात येईल.
8. जो पर्यंत पनवेल ते झारप 471 किलोमीटरचा रस्ता वापरण्यायोग्य व 100% काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल आकारू नये.
9. बनविण्यात येणारा रस्त्या हा 10 वर्षात एकही खड्डा पडणार नाही अशी लेखी हमी देऊन नियमावली बनविण्यात यावी जेणेकरून बनणारा रस्त्या उत्तम दर्जाचा असेल.
10.जनजागृतीकरीता ठिकठिकाणी सभा आयोजित करून याबाबत जनआक्रोश कशासाठी आहे यासाठी माहिती देणे.
11. या वरील विषयात सरकार कडून दिरंगाई दिसत असेल किंवा 01 मे 2023 पर्यंत काम पूर्ण होईल अशा पद्धतीचे स्वरूप दिसत नसेल तर आझाद मैदान ते मंत्रालय असा जनआक्रोश आंदोलन उभारून मंत्रालयाला घेराव घालणे.
12.जो पर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व कोकणकरांच्या वतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल यासाठी गावागावात जाऊन जनजागृती करण्यात येईल.
यांसारख्या अनेक विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. सदर सभेतील चर्चा खालील लिंक वर बघू शकता.
मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
श्री. मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.