Category Archives: कोकण

होळीसाठी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जाण्याचा बेत आहे? मग ही बातमी वाचाच…

   Follow us on        
Mumbai Goa Highway: कोकणातील दुसरा मोठा सण म्हणून ओळखला जाणारा शिमगोत्सवास अगदी काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत. पुढील आठवडय़ात मुंबई पुण्याहून चाकरमानी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी निघतील. कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गचा पर्याय निवडणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी सध्या या महामार्गाची परिस्थिती कशी आहे याबाबत अभ्यास करून मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार बहुतेक ठिकाणी काम अपूर्ण असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

समितीचा अहवाल काय सांगतो ?

मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील १७ वर्षांपासून रखडलेले असून सद्याची कामाची परिस्थिती अत्यंत बिकट असून धीमी गतीने काम चालु आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत राज्य सरकार कडून वाढवून मागण्यात आली होती व आता डिसेंबर  २०२५ कामाची डेडलाईन देण्यात आलेली आहे. परंतु सद्यस्थितीत कामाची प्रगती पाहता दिलेल्या तारखेला देखील महामार्ग होणार नाही हे आमचे मागील ०६ वर्षाचे अनुभव आहेत व जनआक्रोश समितीने २० फेब्रुवारी २०२५,२२ व २३ मार्च २०२५ आणि ०१ व ०२ मार्च २०२५ रोजी केलेल्या पाहणीनुसार अधोरेखिल केले आहे. कारण २०१९ साली मा.श्री.चंद्रकांत पाटील साहेब यानी महामार्गाची डेडलाईन दिलेली होती,यानंतर मा.श्री.अशोक चव्हाण साहेब यानी २०२० पर्यंत काम पूर्ण करू असे आश्वासन दिले होते यानंतर मा.श्री.रविंद्र चव्हाण साहेब यानी ०४ वेळा डेडलाईन दिली व आता नव्याने दिलेली डेडलाइन सुद्द्धा एक आश्वासन आहे हे महामार्गाची परिस्थिती पाहता लक्षात येत आहे व आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.
टप्पा-०१ पनवेल ते कासु -००/०० किमी ४२ किमी (४२ किमी)-
सदर टप्याची वर्क ऑर्डर २८ मार्च २०२३ रोजी देण्यात आलेली असून ३१ डिसेंबर २०२३ काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती.  सदर टप्प्यात ३८ किमी कॉन्क्रीट पूर्ण झालेली असून नित्कृष्ठ दर्जाचे काम करण्यात आलेले आहे.तर अद्यापही साईट पट्टी,दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावणे,ड्रेनेज लाईन,सूचना फलक यांसारखी कामे अद्यापही अपूर्ण आहेत व  सदर टप्प्यात  ०६ महिन्याच्या आतमध्ये खड्डे महामार्गाला पडलेले आहेत.सदर टप्पा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु  अद्यापही हे काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची शाश्वती आम्हा कोकणवासीयांना नाही.
टप्पा-०२ कासु ते इंदापुर -४२ किमी ते ८४ किमी  (४२ किमी)-
सदर टप्याची वर्क ऑर्डर ऑक्टोबर २०२२ रोजी देण्यात आलेली असून ३१ मे २०२४ पर्यंत  काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती.सदर टप्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे.अद्यापही या टप्प्याची एक मार्गिका झालेली नाही.कासू ते वाकण महामार्ग नसून पायवाट झालेली आहे.महामार्गाला पेव्हर ब्लॉकदिसत आहेत.सदर टप्याचे काम दिवसाला १०० मीटर होत आहे यानुसार अंदाज लावल्यास हा महामार्ग पूर्ण होईल याची शाश्वती आम्हा कोकणकरांना नाही. तसेच या टप्यातील सर्व उड्डाणपुलाचे काम बाकी आहे,जनावरे,वहानांसाठीभुयारी मार्ग,साईटपट्टीचे काम बाकी आहे तर  अद्यापही जमिनी ताब्यात घेतलेल्या नाहीत व अतिक्रमण हटावलेला नाही.या टप्प्यातील १२ किमी मध्ये ११ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे काम १५-२० टक्के झालेला आहे तर नागोठणे येथील पुलाचे काम २०-२५ टक्के पूर्ण करण्यात आलेला आहे.याठिकाणी पेव्हर ब्लॉक असून वर खाली झाल्याने अपघाताला निमंत्रण देत आहेत.सदर टप्प्याचे काम २००५ साली बनविण्यात आलेल्या आराखडयानुसार होत असून २००५ साली वाहनांची संख्या व लोकसंख्या कमी होती व त्याआधारे काम चालू असल्याने भुयारी मार्ग अडचण ठरत आहेत.तसेच महामार्गावर भराव टाकल्याने शेतकऱ्यांची जमीन नुकसान होत आहे.
टप्पा-०३ इंदापुर ते वडपाले-८४ किमी ते ११० (२६.७५ किमी)-
सदर टप्प्यात इंदापूर व माणगाव हे दोन बायपास येत असून सदर बायपासचे काम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे  अधिकारी वर्गाकडून ०४ जुलै २०२३ रोजी माणगाव येथे करण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान आश्वासन देण्यात आलेले होते परंतु अद्यापही या दोन्ही बायपासचीही अवस्था बिकट आहे.सर्व अडचणी सुटल्या असून काम धीम्या गतीने का चालू आहे याबाबत कोकणकर संभ्रमात आहेत. सदर  ठिकाणी जनआक्रोश समितीच्यावतीने पाहणी केली असता सद्यस्थितीत पूर्णता काम बंद असून नवीन ठेकेदार निवडण्यात येणार आहेत अशी माहिती मिळत असून याबाबत काय नियोजन आहे याची माहिती मिळावी.आपण स्वतः निरिक्षण केले असल्यास माणगांव शहरात दररोज वाहनांच्या ०४-०५  किलोमीटरच्या रांगा पहावयास मिळत असतील परिणामी सदर ठिकाणी कोकणकर व स्थानिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार अवजड वाहतूक ईतर मार्गाने वळविणे व माणगाव बायपास आहे त्या स्थितीत वापरण्यास देणे अशी मागणी होत आहे.
लोणेरे येथील ब्रिजचे काम एप्रिल-मे पर्यंत पूर्ण करण्याचा दावा ठेकेदाराकडून करण्यात येणार आहे परंतु ०२ महिन्यात कशा पद्धतीने काम पूर्ण करण्यात येणार आहे याचा आराखडा मिळावा जेणेकरून त्यानुसार काम चालु आहे का याची पाहणी कोकणकरांच्या वतीने जनआक्रोश समितीकडून करण्यात येईल.
टप्पा-०४-वडपाले ते भोगाव(११० किमी ते १४९ किमी)
सदर टप्प्यात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे करण्यात आलेली आहेत.महाड मधील टोल जवळील आंबेतकडे जाणाऱ्या अंडरपास धोकादायक आहे.याठिकाणी सर्व्हिस रोडचे तीन मार्ग खुले असून एक मार्गाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. सदर ठिकाणी फ़ॉरेस्ट डिपार्टमेंटचा अडथळा असल्याचे स्थानिकांकडून कळाले. परंतु शासनाच्या अंतर्गत वादामुळे अनेक अपघात सदर ठिकाणी घडत आहेत. महाडकडे वाहनांना जायचं झाल्यास उलट बाजूने महामार्गांवर प्रवेश करावा लागत आहे.
प्रत्येक गावाजवळ अंडरपास देणे अपेक्षित होते कारण महामार्गाच्या अलीकडे गाव तर पलीकडे शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय, शेती असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महामार्ग ओलांडताना अनेक अपघात घडत आहेत यामध्ये चांभारखिंड येथे अंडरपास तर पोलादपूर येथे स्कायवॉल्क असणे गरजेचं आहे.
टप्पा-०५ – भोगाव १४९ किमी ते कशेडी १६१ किमी –
एका बोगद्याचे काम झालेले असून पहिल्याच पावसात गळती पहायला मिळाली व सदर परिस्थिती अद्यापही तशीच आहे.तर दुसऱ्या बोगद्याचे काम डिसेंबर  २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु अद्यापही बोगदा व त्यापुढील ब्रिजचे काम बाकी आहे.
टप्पा-०६ – कशेडी १६१ किमी ते परशुराम घाट २०५ किमी-  
सदर टप्प्यात खेड रेल्वे स्थानक येथील ब्रिजचे काम अपूर्ण असून परशुराम घाटातील परिस्थिति बिकट आहे,सदर घाट क्षेत्रात योग्यरित्या व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काम अपेक्षित आहे.सदर ठिकाणी ०२ मार्च २०२५ रोजी पाहणी करण्यात आली असता अद्यापही बरेचसे काम बाकी आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे याबाबतचा आराखडा मिळावा व या पावसाळ्यात नेहमीप्रमाणे संरक्षण भिंत कोसळणार नाही यासाठी कोणते नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहेत याबाबत आवगद करावे.
टप्पा-०७ – परशुराम घाट २०५ किमी  ते आरवली २४१ किमी-
सदर टप्प्यातील चिपळून येथील ब्रिज दुर्घटना घडली व यानंतर सदर ब्रिज तोडण्यात आले व नव्याने सदर ब्रिजचे काम चालु आहे.महामार्गावर एवढी मोठी दुर्घटना घडलेली असताना अद्यापही सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात येत नाही. सूचना फलक नसल्याने व पूर्वसूचना न देता अचानक कुठेतरी कामाला सुरुवात केल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.
टप्पा-०८ व ०९ -आरवली ते वाकेड –
सदर टप्यातील ३५% काम झालेले असून उर्वरित सर्व काम रखडलेला आहे व सदर कामाची किलोमीटरनुसार परिस्थिति दर्शवीत आहोत.तरी सदर कामाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.
लांजा-
लांजा शहरांत उड्डाणपुलाचे काम चालु असून अंदाजित ०३ ते ३.५ किमी लांबीचे हे उड्डाणपुल आहे. सदर उड्डाणपुलामुळे शहराचे दोन भाग होत आहेत. यामुळे सदर उड्डाणपुलाचे काम ४५० मी ते ५०० मिटरने वाढविल्यास प्रशासकीय कार्यालय,शाळा यांना एकत्रित जोडले जाईल. तसेच या उड्डाणपुलाचे काम अतिशय धिम्या गतीने चालु असून दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड किमान प्रवासासाठी डांबरी असावेत जेणेकरून प्रवासाला अडथळे निर्माण होणार नाहीत परंतु मातीचा रोड असल्याने धुळीचा सामना स्थानिकांना करावा लागत आहे. यावर पाणि मारणे हे उपाय नसून सदर सर्व्हिस रोड किमान डांबरी करावेत.
देवधे-
देवधे येथे देखील गाव अलीकडे तर शाळा,शेती पलीकडे असल्याने सदर ठिकाणी देखील अंडरबायपास असणे आवश्यक आहे. तसेच ईतर गावातून महामार्गाला जोडलेल्या रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने जलद गतीने महामार्गांवर वाहनांचा प्रवेश होतो परिणामी अपघात घडू शकतात सदर ठिकाणी सर्व्हिस रोडचे काम चालु असून ०५-०६ फुटाचे खड्डे मारले असून सुरक्षेच्यादृष्टीने काहीही काळजी घेण्यात आलेली नाही. रात्री अपरात्री सदर ठिकाणी अपघात घडू शकतो.
चरवेली –
सदर गावाला अंडरपासची आवश्यकता आहे. सदर ठिकाणी काम पूर्ण झालेला असून महामार्ग लगत अंडरपास किंवा बॅरिकेट नसल्याने गुरे रस्त्यावर येत असतात यामूळे सतत अपघात घडत आहेत. १५ दिवसापूर्वीच वाहनाच्या धडकेत ०२ बैल अपघातात मृत्युमुखी पडले तर वाहन चालकाचा अतिशय नुकसान झाला आहे. बस स्टॉप,शेती यांसारख्या कामासाठी महामार्ग ओलांडताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
पाली –
पाली येथील उड्डाणपुलाचे फक्त खांब उभे करण्यात आलेले आहेत. सदर ठिकाणी ०१ व ०२ मार्च रोजी पाहणी केली असता ०१ JCB व ०४ कामगार काम करताना दिसत आहेत. जर काम अशाच पद्धतीने चालु राहिल्यास सदर उड्डाणपुल पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची शाश्वती नाही.हे काम कशा पद्धतीने व किती महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे याबाबतचा आराखडा मिळावा.
हातखांबा-
हातखांबा येथे देखील उड्डाणपुलाच्या कामाची गती अतिशय धिमी आहे. ठेकेदाराला मनुष्यबळ व यंत्रणा वाढविणे अपेक्षित आहे. हातखांबा येथील गुरववाडी येथे महामार्ग हा ०६ फूट उंच असून गुरववाडी गावातील जोडणारा रस्ता ०६ फूट खोल असल्याने या महामार्गांवर प्रवेश करणे कठीण आहे यासाठी सदर उतार किमान ५०० मिटर पासून केल्यास गावातील रस्ता व महामार्ग समान अंतरावर येतील.याठिकाणी ठळक दिशादर्शक फलक नसल्याने मुंबईतून येणारा पर्यटक गोवा येथे जाण्याच्या बदल्यात थेट कोल्हापूर येथे पोहचेल कारण सर्वच ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव आहे.
निवळी-
निवळी येथे होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची अशीच परिस्थिती आहे. सदर उड्डाणपुल बाजारपेठेत उतरत असताना खांब असणे अपेक्षित असताना भराव टाकल्याने महामार्गावर बाजारपेठेत दूतर्फा परिस्थिती निर्माण होत आहे.सदर उड्डाणपुलाचे काम कधी पूर्ण करण्यात येईल याबाबतचा आराखडा मिळावा.
बावनदी उड्डाणपुल –
सदर कामाला गती दिसत असून अशाच पद्धतीने काम चालु राहिल्यास लवकरच पूर्ण होऊ शकतो. स्थानिक व सदर ठिकाणी काम करीत असलेल्या कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते मे पर्यंत काम पूर्ण होण्याचा कालावधी सांगण्यात येत आहेत.या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचा आराखडा व दिवसाला प्रत्यक्षात होत असलेला काम याबाबतचा (DPR – DAILY PROGRESS REPORT) मिळावा.
वांद्री अंडरपास-
वांद्री येथे अंडरपासच्या कामाला ०८ दिवसापूर्वी सुरुवात करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी दिनांक- ०२ मार्च रोजी पाहणी केली असता हे काम यावर्षी पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. अद्यापही अंडरपास व महामार्गाचे काम बरेचसे बाकी आहे.यामुळेच यंत्रणा वाढवून कामाला गती देण्यात यावी.
संगमेश्वर उड्डाणपुल-
सदर उड्डाणपुलाचे काम अतिशय धिम्या गतीने चालु असून ०४ कामगार काम करीत आहेत.सदर ठिकाणी स्थानिकांसोबत चर्चा केल्यानंतर दररोज अशाच पद्धतीने काम चालु आहे असे सांगण्यात आले.
संगमेश्वर येथे अगदी सकाळपासून ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. सावित्री नदीवरील पुल जर ०६ महिन्यात पूर्ण होऊ शकतो तर संगमेश्वर मधील उड्डाणपुलाचे काम का होऊ शकत नाही असा प्रश्न स्थानिकांचा आहे. तरी या ठिकाणी यंत्रणा वाढवून या ०३ महिन्यात काम पूर्ण करण्यात यावा किंवा किमान ०१ बाजू चालु करण्यात यावी.
आरवली-
आरवली येथे सर्व्हिस रोडचे काम चालु असून ०५-०६ फूट खोल ड्रेनेज लाईन खोदकाम करण्यात आलेले आहे. परंतु याठिकाणी सुरक्षा वाऱ्यावर असून आतापर्यंत ०३ अपघात झाले आहेत.
वर दर्शविल्याप्रमाणे महामार्गाची स्थिती असून सुरक्षा,दिशादर्शक फलक यांची कमतरता आहे.तसेच वरील टप्प्यात चाललेल्या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराचे नाव,कामाचा कालावधी , सुरक्षा अधिकारी संपर्क व ठेकेदार यांचा संपर्क असावा हि आपणास विनंती.

Konkan Railway: आरक्षणाची झंझट नाही! होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘अनारक्षित विशेष’ गाड्या

   Follow us on        

Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर अनारक्षित विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या दादर ते रत्नागिरी आठवड्यातुन तीन दिवस धावणार आहेत. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे.

गाडी क्रमांक ०११३१/०११३२ दादर-रत्नागिरी दादर त्रि-साप्ताहिक विशेष 

गाडी क्रमांक ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी १४:५० ला सुटून रात्री २३:४० ला रत्नागिरीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३२ रत्नागिरी दादर होळी विशेष गाडी १२, १४ आणि १७ मार्च, २०२५ पहाटे ४:३० ला सुटून दुपारी १३:२५ ला दादरला पोहोचेल.

या गाडीचे थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

डब्यांची संरचना: जनरल – १४, एसएलआर – ०२ असे मिळून एकूण १६ आयसिएफ कोच

 

मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मंगळुरु पर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू.

   Follow us on        

Konkan Railway: जलद, आरामदायी आणि अनेक आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेली वंदेभारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. भारत सरकारने देशातील बहुतेक महत्त्वाच्या शहरांदरम्यान या गाड्या सुरू केल्या असून काही अपवाद वगळता सर्व गाड्या यशस्वी ठरल्या आहेत. मुंबई मडगाव मार्गावर सुरू करण्यात आलेली गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदेभारत एक्सप्रेसची या यशस्वी गाडय़ांमध्ये गणना होत आहे. या गाडीचा मंगळुरू पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी आता होताना दिसत आहे.

सध्या कोकण रेल्वे मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस चालत आहेत. गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मुंबई मडगाव दरम्यान तर 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मडगाव मंगळुरू दरम्यान चालविण्यात येत आहेत. मुंबई मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेस यशस्वी ठरत असताना मडगाव – मंगळुरू दरम्यान धावणारी वंदेभारत तितकीशी यशस्वी ठरलेली दिसत नाही आहे.

मुंबई ते मंगळुरू अशी अखंड वंदेभारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी कर्नाटक राज्यातून होत आहे. मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (22229/30) हीच गाडी पुढे मंगळुरू पर्यंत विस्तारित करावी. ही गाडी विस्तारित केल्यास तिला सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे धावण्यासाठी जो अतिरिक्त रेक लागेल तो गाडी क्रमांक 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल ही गाडी बंद करून तिचा रेक वापरण्यात यावा. असे केल्याने अतिरिक्त रेक न वापरता आहे त्या गाड्यांमध्ये हा बदल करून कर्नाटकातील प्रवाशांना मुंबई साठी जलद प्रवासाचा एक पर्याय उपलब्ध होईल असा युक्तिवाद करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातील प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधींनी विविध माध्यमांतून ही मागणी जोर लावून धरल्याची बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्रातील प्रवासी संघटनांचा विरोध.

सध्या मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आपल्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. मुंबई कर्नाटक दरम्यान गरज पडल्यास नवीन गाडी मागावी. –अखंड कोकण रेल्वे प्रवासी समिती

आम्ही तुम्हाला कर्नाटकसाठी नवीन रेकची मागणी करण्याची विनंती करतो. सध्याची सीएसएमटी-मडगाव वंदे भारत आधीच १०० टक्के पूर्ण क्षमतेने धावत आहे, नवीन ट्रेन सुरू झाल्यास महाराष्ट्र, गोवा कर्नाटकातील प्रवाशांना अधिक फायदा होईल. सध्या आम्ही या विस्ताराच्या विरोधात आहोत. –रोहा रेल्वे प्रवासी समिती

मुंबई गोवा वंदे भारत मंगळुरूपर्यंत नेण्याची मागणी कर्नाटकातून होत आहे. तेथील खासदारांनी तसे प्रयत्नही सुरू केले आहेत. आपण जोरदार विरोध करणे आवश्यक आहे. अन्यथा कोकणकन्याचा भार कमी व्हावा म्हणून सुरू केलेल्या १२१३३/१२१३४ मुंबई कारवार एक्सप्रेसप्रमाणे आपल्याला वंदे भारतलाही मुकावे लागेल. मंगळुरूच्या नवीन गाडीला विरोध नाही. परंतु आपली गाडी पुढे वाढवून नाही, तर स्वतंत्र गाडी सुरू व्हावी. तसेच, त्या गाडीला सर्व स्थानाकांना समान कोटा मिळावा व महाराष्ट्रात पुरेसे थांबे मिळावेत.-श्री. अक्षय म्हापदी, रेल्वे अभ्यासक

Loading

तुतारी एक्सप्रेससह राज्यातील एकूण ११ एक्सप्रेस गाडयांना ‘एलएचबी कोच’ जोडणे गरजेचे

 

LHBfication of Trains:रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेगाड्यांचा वेग वाढवा यासाठी रेल्वे प्रशासन जुन्या प्रकारातील, पारंपरिक पद्धतीमधील डब्यांऐवजी लिंके हॉफमन बुश (एलएचबी) प्रकारातील डबे जोडण्यात येत आहेत. काही वर्षांपूर्वी रेल्वेचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षित असलेले ‘एलएचबी कोच’ तातडीने जोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र महाराष्ट्र राज्यातील काही महत्वाच्या गाड्या ज्यांना आधुकीकरण करण्याची खरी गरज असताना अजूनही जुन्या प्रकारातील आयसीएफ रेक सह चालविण्यात येत आहेत.
कोकण विकास समितीने याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना अनेकदा पायाभूत सुविधांच्या सुधारणांमध्ये कमी प्राधान्य दिले असल्याचा आरोपही समितीने केला आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी  ई-मेल द्वारे या एक्सप्रेस गाड्यांची यादी प्रशासनाला पाठवली असून या गाड्यांचे रूपांतर लवकरात लवकर एलएचबी स्वरूपात करावे अशी मागणी केली आहे.

कोणत्या आहेत या गाड्या?

  • ११००३/११००४  दादर – सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस (२ रेक)
  • ११०२९/११०३०  कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस (३ रेक)
  • ११०३९/११०४०  कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस / ०१०२३/०१०२४ कोल्हापूर – पुणे एक्सप्रेस (५ रेक)
  • १७६१७/१७६१८ नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस / १७६८७/१७६८८ मराठवाडा एक्सप्रेस (३ रेक)
  • १७६११/१७६१२ नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस (२ रेक)
  • २२१५५/२२१५६ कोल्हापूर – कलबुर्गी एक्सप्रेस (१ रेक)
  • ११४०१/११४०२ (०१.०३.२०२५ पासून ११००१/११००२ या नावाने पुनर्क्रमित करा) मुंबई – बल्हारशाह नंदीग्राम एक्सप्रेस (3 रेक)
  • ११०२७/११०२८ दादर – सातारा एक्सप्रेस (पुणे-पंढरपूर मार्गे) / ११०४१/११०४२ दादर – शिर्डी एक्सप्रेस (पुणे मार्गे) (2 रेक)
  • १२१३१/१२१३२ दादर – शिर्डी एक्सप्रेस (मनमाड मार्गे) / २२१४७/२२१४८ दादर – शिर्डी एक्सप्रेस (मनमाड मार्गे) (१ रेक)
  • ०११३९/०११४० नागपूर – मडगाव एक्सप्रेस (१ रेक)
  • ११४०३/११४०४ कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस (१ रेक)
या गाड्या मध्य आणि दक्षिण रेल्वे विभागाच्या अखत्यारीत आहेत. या गाड्यांचे महत्व आणि प्रवाशांकडून होणारी गर्दी पाहता या गाडयांना ‘एलएचबी कोच’ तातडीने जोडण्यात यावेत अशी समितीने मागणी  केली आहे.

दोडामार्ग भेडशी गावची सुकन्या साक्षी गावडेची गोवा रणजी क्रिकेट संघात निवड

 

मुंबई: दोडामार्ग तालुक्यातील भेडशी खानयाळ गावची सुकन्या आणि सद्यस्थितीत मुंबई-दहिसर येथे स्थायिक असलेल्या साक्षी बंड्या गावडे हिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून दिनांक २८ फेब्रुवारी रोजी निवड झाली असून तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. साक्षी हिने मास मीडिया मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. इयत्ता सातवी पासून लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेत आहे. तिचे वडील बंड्या गावडे यांना क्रिकेटची फार आवड. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिची यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये १६ आणि १९ वर्षाखालील महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिचा परफॉर्मन्स पाहून गोवा क्रिकेट अकॅडमीने तिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी ऑलराऊंडर म्हणून निवड केली आहे. सध्या ती गोवा येथे रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील अशोक नारायण परब (मांजरेकर) यांची ती नात असून रणजी संघामध्ये झालेल्या निवडीबद्दल तिच्या मामेगावी कलंबिस्त येथे तिचे कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत, निलेश पास्ते, अशोक राऊळ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Konkan Railway: दोन्ही गाड्या दादर पर्यंत नेण्यासाठी शिवसेनेकडून रेल्वेला वाढीव अवधी; होळीआधी मागणी पूर्ण न झाल्यास ‘रेल रोको’ चा इशारा

   Follow us on        

मुंबई: दादरहून कोकणात जाणाऱ्या रत्नागिरी व सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अचानक बंद केल्यामुळे शिवसेनेने पुकारलेले (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शनिवारचे ‘रेल रोको’ आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

कोकणी जनतेची गैरसोय करणाऱ्या मध्य रेल्वेला आठवडाभरापूर्वी शिवसेनेने उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. दादर-रत्नागिरी आणि दादर- सावंतवाडी पॅसेंजर होळीआधी सुरू करा, नाहीतर १ मार्चला दादर स्थानकात तीव्र ‘रेल रोको’ करू, दादरहून गोरखपूर व बरेलीला जाणाऱ्या ट्रेन सुटूच देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला होता. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस बाबी देव, संजय जोशी, विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी २० फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिले होते. त्याचवेळी दोन्ही पॅसेंजर दादरवरून कशा सोडता येईल, या ट्रेनचा इतर गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबत रेल्वे कामगार सेनेचे संजय जोशी, बाबी देव यांनी अभ्यासपूर्ण म्हणणे मांडले होते. मध्य रेल्वे प्रशासनाने आपण दादर ते दिवा मार्गाचा पाहणी करून ही गाडी पुन्हा दादर पर्यंत कशी नेता येईल याबाबत अभ्यास करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे शिवसेनेने रेल्वेला यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला असून हे आंदोलन स्थगित केले असल्याचे सांगितले आहे.

होळीआधी ट्रेन सुरू झाली नाही तर ‘रेल रोको

दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या दोन्ही पॅसेंजर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून तातडीने सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाकडून होळीआधी योग्य ती कार्यवाही न झाल्यास दादरवरून गोरखपूर आणि बरेलीला जाणाऱ्या ट्रेनसमोर कोणत्याही क्षणी ‘रेल रोको’ आंदोलन केले जाईल. दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली या गाड्या दादरवरून सुटू देणार नाही, असा इशारा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.

पवनार-पत्रादेवी द्रुतगती महामार्गाला कोल्हापुरच्या पाच तालुक्यातील शेतकर्‍यांचा ‘सशर्त’ पाठींबा

   Follow us on        

Shaktipeeth Expressway Updates:राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या पवनार पत्रादेवी (नागपूर – गोवा) महामार्गा संबधित एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी, आजरा, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शेतकर्‍यांनी सशर्त पाठिंबा दर्शविला आहे. येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या 5 पट बाजारभाव मोबदल्याच्या बदल्यात पवनार पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला पाठिंबा दर्शवला आहे.

प्रत्यक्षात भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी यापूर्वीच अधिकाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र दिले असून त्यांनी या तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी विशेष विकास पॅकेजची मागणी केली आहे.

पवनार – पत्रादेवी एक्स्प्रेस वे ८०२ किलोमीटर लांबीचा आहे. या द्रुतगती मार्गाला सहा लेन कॉरिडॉर आहेत. नागपूर आणि गोवा यांना जोडणारा नवीन द्रुतगती मार्ग हा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) विकसित करीत आहे. या एक्स्प्रेसवेमुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. ज्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. नागपूर आणि गोवा यांना जोडणाऱ्या नवीन द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ, १८ ते २० तासांवरून केवळ ८ ते १० तासांवर येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

Konkan Railway | होळी आणि उन्हाळी हंगामासाठी पाश्चिम रेल्वेच्या विशेष गाडीची घोषणा; एकूण ७० फेर्‍या

   Follow us on        
Konkan Railway News: या वर्षी होळीला आणि उन्हाळी सुट्टीत कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या वर्षी उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पाश्चिम रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष द्वि-साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल ही गाडी उधना जंक्शन येथून दिनांक  ०२/०३/२०२५  ते २९/०६/२०२५ पर्यंत दर बुधवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल आणि मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण ३५ फेर्‍या होणार आहेत.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल  ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून दिनांक  ०३/०३/२०२५  ते ३०/०६/२०२५ पर्यंत गुरुवारी आणि सोमवारी रात्री १०.१० वाजता मंगळुरु जं. येथून निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २३:०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण ३५ फेर्‍या होणार आहेत.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ आयसिएफ कोच = टू टियर एसी –  ०१ कोच, थ्री टियर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरल – ०२ कोच,  एसएलआर – ०२.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Konkan Railway: होळीसाठी कोकणरेल्वे मार्गावर अजून एका गाडीची घोषणा

   Follow us on        
Konkan  Railway: होळीसाठी कोकणात जाणाऱ्या  प्रवाशांसाठी खुशखबर आहे. होळी सण २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने अजून एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे,
गाडी क्र. ०१०६३/०१०६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष: 
गाडी क्र. ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुअनंतपुरम उत्तर वीकली विशेष ही विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून गुरुवार दिनांक  ०६/०३/२०२५ आणि १३/०३/२०२५ रोजी १६;०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुअनंतपुरम उत्तरला पोहोचेल.
गाडी क्र. ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष ही विशेष गाडी  तिरुअनंतपुरम उत्तर येथून शनिवार, दिनांक ०८/०३/२०२५ आणि १५/०३/२०२५ रोजी १६:२० वाजता सुटेल आणि  लोकमान्य टिळक (टी) येथे तिसऱ्या दिवशी ००:४५  वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी , थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका, सुरेंद्र रोड, सुरेंद्र रोड, उंबरनाथ रोड मंगळुरू जं, कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकावर थांबणार आहे.
डब्यांची रचना: एकूण 22 एलएचबी कोच: टू टायर एसी –  ०१ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९  कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




Traffic block at CSMT: कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या १० गाड्यांवर परिणाम होणार

   Follow us on        

Megablock on Central Railway: मुंबई सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या कामासाठी मध्यरेल्वे या स्थानकावर या आठवड्यात एक ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे या स्थानकावरून सुटणार्‍या काही गाड्यांच्या आरंभ आणि अंतिम स्थानकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्यांचा समावेश असून याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे.

आरंभ स्थानकांमध्ये बदल करण्यात आलेल्या गाड्या

दिनांक ०१ मार्च रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस ही गाडी आपला प्रवास पनवेल या स्थानकावरून या स्थानकावरील नियोजित वेळेत सुरु जाणार आहे.

दिनांक ०२ मार्च रोजी सुटणारी गाडी क्रमांक १२०५१ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२२२९ मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२११९ मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस या गाड्या दादरवरून या स्थानकावरील नियोजित वेळेत आपला प्रवास सुरु करणार आहेत. तर गाडी क्रमांक १०१०३ सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस ही गाडी आपला प्रवास पनवेल स्थानकावरून पनवेल स्थानकावरील नियोजित वेळेत सुरु करणार आहे.

 

अंतिम स्थानकांत बदल करण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्रमांक २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२०५२ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांचा प्रवास दिनांक २६ फेब्रुवारी ते ०१ मार्च दरम्यान दादरला तर  गाडी क्रमांक १२१३४ मंगलोर मुंबई एक्सप्रेस या गाडीचा प्रवास ठाण्याला संपविण्यात येणार आहे.

दिनांक ०१ मार्च रोजी गाडी क्रमांक २०११२ मडगाव -सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस, गाडी क्रमांक १०१०४ मडगाव -सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस-या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search