Category Archives: कोकण

Mumbai to Konkan RoRo Service : मांडवा -माझगाव ते रत्नागिरी -मालवण सागरी मार्गावर गणेशचतुर्थीपूर्वी रो रो सेवा सुरु करणार – मंत्री नितेश राणे

   Follow us on        
रत्नागिरी : राज्यातील रस्ते आणि रेल्वे मार्गासोबतच जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी लवकरच मांडवा, माझगाव ते रत्नागिरी आणि मालवण सागरी मार्गाद्वारे रो रो सेवा सुरु करण्यात येणार आहे, या निमित्ताने नवा अध्याय राज्यात सुरु होईल, असे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
रत्नागिरीच्या दौ-यावर असताना ते म्हणाले, राज्यात दळणवळण व्यवस्था भक्कम करण्यासाठी रस्ते आणि रेल्वे बरोबर जलवाहतूक वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या गणेशोत्सवापर्यंत मांडवा आणि माजगाव येथून रो रो जलसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. या रो रो जलसेवेमुळे रत्नागिरीपर्यंत तीन तासात तर मालवण, विजयदुर्गपर्यंत साडेचार ते पाच तासात पोहोचता येणार आहे.
या रो रो जलसेवेमध्ये जवळपास १०० गाड्या आणि ५०० प्रवासी घेऊन माजगाव येथून सोडणे शक्य होणार आहे. यासाठी लागणारी बोट किंवा क्रूज महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आली आहे. गणेश चतुर्थीच्यापूर्वी हि सेवा सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे नितेश राणे यावेळ पत्रकारांना सांगितले.

“संगमेश्वर स्थानकावर तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा” | शिष्टमंडळाने घेतली खासदार नारायण राणे यांची भेट.

   Follow us on        
संगमेश्वर | रुपेश मनोहर कदम/ सायले:  निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या पुढाकाराने संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव, जामनगर, पोरबंदर या तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा यासाठी गेल्या दीड वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधीं, सर्व सामान्य जनतेला सोबत घेऊन निवेदन, आंदोलन, उपोषण,असे  मार्ग अवलंबले.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, बेलापूर येथील कार्यालयात निवेदन दिली. प्रत्यक्षात संघटनेचे शिष्टमंडळ चर्चेसाठी को.रे. च्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटले. भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या संगमेश्वर रोड स्थानकावर अन्याय का? ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करुन थांबा मिळावा म्हणून वारंवार विनंती करण्यात आली परंतु नेहमी केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे बोट दाखवत त्यांच्याकडून मंजुरी मिळण्यास उशीर होत असल्याचे कोकण रेल्वेकडून वारंवार सांगण्यात येते होते.
अखेर हा विषय मांडण्यासाठी खासदार नारायण राणे यांची दिनांक २८ मे २०२५ रोजी मुंबई येथे शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी संघटनेतर्फे श्री. दीपक पवार, श्री. संतोष पाटणे, श्री. मुकुंद सनगरे व श्री अशोक मुंडेकर हे उपस्थित होते. आपण आठवड्यात दिल्ली येथे रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन मंजुरीचा मार्ग मोकळा करुन देण्याचे वचन नारायण राणे यांनी या भेटी दरम्यान शिष्टमंडळाला दिले असल्याने आता तीन गाड्यांच्या थांब्याच्या मागणीची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या संघटनेने सांगितले आहे.
आता लवकरच आपल्या मागण्या मान्य होणार! संगमेश्वर येथील रेल्वे प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार. असा विश्वास निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केला आहे.

Sindhudurg: शिवापूरच्या कन्येने पटकावले ”चल भावा सिटीत” शोचे विजेतेपद

   Follow us on        

मुंबई:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावची सुकन्या कु श्रृती शामसुंदर राऊळ हिला झी मराठी च्या “चल भावा सिटीत “या रिअॅलिटी शोमध्ये अंतिम सोहळ्यात विजेतेपद मिळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश चव्हाण या तिच्या सहकाऱ्यासह तिने हे यश मिळवले आहे. या यशने कुमारी श्रुतीने शिवापूर च्या इतिहासात कला क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे.
“चल भावा सिटीत” या रिअॅलिटी शोमध्ये गेली तीन महिने श्रृती शामसुंदर राऊळ ही यशस्वी टास्क करत होती. अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या होत्या. श्रृती राऊळ ने चल भावा सिटीत” या कार्यक्रमात अभिनेता श्रेयश तळपदे यांच्या अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या. यात तिला वडील शामसुंदर राऊळ, आई लता राऊळ यांचे मार्गदर्शन लाभले. श्रृती च्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. श्रृती हिने या पूर्वी गोवा सुंदरी विजेती ठरली होती.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका एक्सप्रेस गाडीच्या संरचनेत बदल करण्यात आला असल्याची माहीत कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ट्रेन क्रमांक १६३३६ / १६३३५ नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल साप्ताहिक एक्सप्रेसच्या रचनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही गाडी सध्या २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, जनरल – ०४, पॅन्ट्री कार -०१,जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१ असे मिळून एकूण २२ एलएचबी डब्यांसहित धावत आहे. मात्र या गाडीचा एक स्लीपर डबा कमी करून त्या जागी २ टियर एसी श्रेणीचा एक डबा जोडला जाणार आहे. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची सुधारित रचना खालील प्रमाणे असेल
२ टियर एसी – ०२ , ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०७, जनरल – ०४, पॅन्ट्री कार -०१,जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ एलएचबी डबे.
दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ पासून ही गाडी सुधारित संरचनेसह धावणार आहे.

Amboli Waterfall: वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आंबोली धबधब्याबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय

   Follow us on        
Amboli Waterfall: आंबोली पर्यटन स्थळी वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर मुख्य धबधबा बंद करण्यात येणार आहे.
मुख्य धबधब्यावरील पर्यटकांना खाली उतरवून धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना मज्जाव करण्यात येणार असून सायंकाळी पाच वाजल्यानंतर मुख्य धबधबा बंद करण्यात येणार आहे. पावसाळ्यात आंबोलीतील मुख्य धबधबा परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मुख्य धबधबा, हिरण्यकेशी, कावळेसाद, महादेवगड पॉईंट या ठिकाणी आता शनिवार आणि रविवार सायंकाळी 5 नंतर प्रवेशास मज्जाव असणार आहे. 5 वाजता धबधबा परिसरात असलेल्या पर्यटकांना खाली उतरवण्यात येणार आहे आणि नवीन पर्यटकांना वर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. सर्व स्टॉलही 5 वाजता बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पावसामुळे आंबोली घाटात सुरु झालेल्या धबधब्यामुळे परिसरात दृश्यमानता कमी होते. त्यामुळे ज्या भागात दृश्यमानता कमी असेल अशा भागात पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला असून परिस्थितीनुरुप पुढील निर्देश केले जातील असे आदेश पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितलं.

“फ्लाय९१” ची मान्सून हंगामासाठी विशेष ऑफर; सिंधुदुर्ग-पुणे, हैदराबाद आणि बंगळूरुसाठीच्या मार्गावरही लागू

   Follow us on        
सिंधुदुर्ग: गोवास्थित प्रादेशिक विमान कंपनी “फ्लाय९१” ने मान्सून हंगामासाठी विशेष ऑफर जाहीर केली आहे. ज्या अंतर्गत कंपनीच्या २० मार्गावर तिकिटांवर ₹ ३०० पर्यंत सवलत दिली जाईल. या सवलतीमध्ये गोव्याला जोडणारे पाच प्रमुख मार्ग समाविष्ट आहेत. तसेच सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावरून पुणे, हैदराबाद आणि बंगळूरुसाठीच्या मार्गावरही ही सवलत लागू असेल, ज्यामुळे सिंधुदुर्गमधील प्रवाशांना मोठा लाभ मिळेल.
ही ऑफर केवळ १ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू आहे आणि त्या तिकिटांवर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रवास करता येईल. गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अलीकडेच घेतलेल्या बैठकीत, पावसाळी हंगामात गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विमान कंपन्या आणि ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सींनी प्रवाशांना आकर्षित करणारे उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत फ्लाय९१ ने ही खास सवलतीची योजना जाहीर केली आहे. या सवलतीमध्ये गोवा (GOX) येथून हैदराबाद (HYD), जळगाव (JLG), अगत्ती (AGX), पुणे (PNQ), सिंधुदुर्ग (SDW) आणि सोलापूर (SSE) या मार्गांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पुणे-सिंधुदुर्ग, बेंगळूरु-सिंधुदुर्ग, हैदराबाद-सिंधुदुर्ग, जळगाव-हैदराबाद, जळगाव-पुणे आणि गोवा-सोलापूर या मार्गावर देखील ही ऑफर लागू होईल.
फ्लाय९१ चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले की, पावसाळ्यात पर्यटनसंख्या कमी होत असल्याने, या काळात प्रादेशिक हवाई प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. गोव्यातील पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या धोरणाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत ही योजना आखली आहे. फ्लाय९१ ही गोवा स्थित विमान सेवा असून, सध्या पुणे, हैदराबाद, सिंधुदुर्ग, जळगाव आणि लक्षद्वीपमधील अगत्ती यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर नियमित उड्डाणे चालवते. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (GOX) वरून कार्यरत असलेली ही सेवा, एटीआर ७२-६०० प्रकारच्या अत्याधुनिक विमानांनी प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देते. पुढील पाच वर्षांत, फ्लाय९१ देशभरात ५० हून अधिक शहरांशी कनेक्ट होण्याच्या महत्वाकांक्षी ध्येयासह प्रादेशिक पर्यटनाला चालना देण्यासोबतच, शेवटच्या टप्प्यांतील भागांमध्येही कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर भर देणार आहे.

Konkan Railway: कमी गाड्यांपासून अधिक उत्पन्न! सावंतवाडी स्थानकावर अधिक गाड्यांना थांबे मिळणे गरजेचे, प्रवासी संघटनेचे खासदारांना निवेदन

   Follow us on        
सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी टर्मिनस या स्थानकावर १२१३३/३४ मुंबई मंगुळुरु एक्सप्रेसला थांबा मिळावा आणि सावंतवाडी टर्मिनसचा ‘अमृत भारत स्थानक योजना’  अंतर्गत विकास करावा या मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने (सावंतवाडी) लोकसभा खासदार रवींद्र वायकर यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवले आहे.
सावंतवाडी हे कोकण रेल्वे मार्गावरील एक महत्वाचे स्थानक आहे. या स्थानकावरून प्रतिदिवसी सरासरी २१०० प्रवासी प्रवास करतात. मात्र येथील प्रस्तावित टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे काम निधीअभावी अपूर्ण असून येथे सध्याची गरज पाहता खूपच कमी गाडयांना थांबे देण्यात आले आहेत. टर्मिनसचे काम पूर्ण करून या टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार कै. प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्याची मागणीही दुर्लक्षित राहिली आहे..
या स्थानकावर सध्या अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि टर्मिनस लाईनची गरज आहे. तसेच निवारा शेड, पाण्याची व्यवस्था, प्लॅटफॉर्मवरील बैठक व्यवस्था, पुरेशी प्रकाश योजना तसेच फूटओव्हर ब्रिज या सुविधांची गरज आहे. या स्थानकाचा ‘अमृत भारत स्थानक योजनेत सहभाग केला गेल्यास या सुविधा प्राप्त होण्यास अडचण येणार नाही. त्यामुळे या मागणीचा विचार करण्यात यावा अशी विनंती प्रवासी संघटनेकडडून करण्यात आली आहे.
कमी गाड्यांपासून जास्त उत्त्पन्न
या स्थानकावर गर्दीच्या वेळी म्हणजे संध्याकाळी आणि रात्री (मुंबईच्या दिशेने जाताना) फक्त २ दैनिक आणि  ३ साप्ताहिक गाडयांना थांबे देण्यात आले आहेत. या वेळेत इथे अधिक गाडयांना थांबे असणे आवश्यक आहे. तुतारी एक्सप्रेस आणि कोकणकन्या एक्सप्रेस या दोन दैनिक गाड्या या वेळेत मुंबईच्या दिशेने रवाना होतात.  आकडेवारी पाहता या दोन्ही गाड्यांना या स्थानकापासून खूप चांगले उत्त्पन्न मिळते. तुतारी एक्सपेसला  या गाडीला मिळणार्‍या एकूण उत्पन्नाच्या २२% उत्त्पन्न तर कोकणकन्या एक्सप्रेसला तिच्या एकूण उत्पन्नाच्या १५% उत्त्पन्न सावंतवाडी स्थानकापासून प्राप्त होते. माहितीच्या आकडेवारीनुसार मिळवण्यात आलेल्या माहितीनुसार सावंतवाडी स्थानकावरून स्लीपर श्रेणीतून ५०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरासाठी प्रत्येक गाडीत प्रतिदिन ४० प्रवासी प्रवास करतात. रेल्वे स्थानकांचे व्यावसायिक स्वरूप ठरविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिनांक १६.०६.२००५ च्या दिलेल्या कसोटीनुसार Criteria ही संख्या जास्त आहे.
ही आकडेवारी या स्थानकाचे महत्व सांगून जाते, तसेच ईथे अधिक गाड्यांना थांबा असण्याची गरज देखील अधोरेखित करते. माननीय खासदारांनी या गोष्टी विचारात घेऊन आपल्या या मागणीला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. pacer height=”20px”]

Mumbai Goa Highway: चिपळुणात १७ लाखांचा गुटखा जप्त; सावंतवाडीच्या तरुणाला अटक

   Follow us on        
चिपळूण: मुंबई गोवा महामार्गावर कापसाळ येथे अवैध गुटखा वाहतूक आणि विक्री विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथे तब्बल 16 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या गुटख्याची वाहतूक करणारा बोलेरो टेम्पो चिपळूण पोलिसांनी सापळा रचत पकडल्याची घटना गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली हा गुटखा चिपळूण येथे आणला जात असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणी टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर टेम्पोचालक सावंतवाडी येथे राहणारा आहे.. गुरुवारी परजिह्यातून बोलेरो टेम्पो भरुन तब्बल 16 लाख 94 हजार किंमतीचा गुटखा चिपळूण येथे आणला जात असल्याची गोपनीय माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंग, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार, प्रमोद कदम, कृष्णा दराडे आदींच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथे सापळा रचला. यावेळी महामार्गावरुन आलेला बोलेरो टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याने भरलेली मोठ-मोठी पोती असल्याचे आढळले. त्यात 16 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या विविध प्रकारच्या गुटख्याचा समावेश आहे. या प्रकरणी सज्जन निवेगी याला पोलिसांनी अटक केली तसेच गुटख्यासह लाखाचा टेम्पो असा 23 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सज्जन निवेगी पाला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईमुळे पानटपरीवर बिनधास्तपणे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परजिह्यातून आणलेला हा गुटखा चिपळुणात नेमका कोणाला दिला जाणार होता, शिवाय यामागे अन्य कोणाचा समावेश आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search