Category Archives: कोकण

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मोठी नोकरभरती.

सिंधुदुर्ग: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधिनिस्त वैद्यकीय अधिकारी आणि इतर असे एकूण १५ पदांच्या  ८५ जागा  कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. 
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ ओक्टोम्बर २०२२ आहे.  इच्छुक उमेदवारांनी दिनांक १४/१०/२०२२ ते २७/१०/२०२२ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ५ ह्या वेळेत ह्या बातमीसोबत जोडलेल्या जाहिरातीतील अर्ज भरून सीआरयु कक्ष(टपाल शाखा) मुख्य प्रशाकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM , SINDHUDURG ), व पदाच्या नावाचे स्पष्ट उल्लेख करून सादर करावेत. 
ह्या पदांसाठी पात्रता,अटी,वेतनश्रेणी आणि इतर माहितीसाठी खालील जाहिरात डाउनलोड करावी.
   Click here to download>>>>>>>>>>    जाहिरात आणि अर्ज  






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

राणेंविरुद्ध टीका भास्कर जाधवांच्या अंगलट अंगलट, ‘ह्या’ कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल.

सिंधुदुर्ग :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. कुडाळमधील सभेत राणेंवर अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.  

गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 505 (1) (क), 500, 504 कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात राणेंवर घणाघाती टीका केली.

काय म्हणाले होते भास्कर जाधव? 

नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचं सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रंदेखील विचारत नाही. भास्कर जाधव यांनी मध्यम, लघु, सुक्ष्म खातं म्हणत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या तिघांवर टीका केली. शिवसेनेने काही केले नाही, असं नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भदरात होता? अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडलं. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचं सांगितलं. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की, केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी राणेंची मिमिक्री करत टीकास्त्र सोडलं होते.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

दिवाळीसाठी कोकण रेल्वेमार्गावरील ‘ह्या’ दोन गाड्या अतिरिक्त कोच सहित धावणार.

रत्नागिरी : खास दिवाळीसाठी या आधी काही विशेष गाड्या  कोकण रेल्वेमार्गावर  सोडल्या आहेत. आता प्रवासी संख्या वाढल्याने कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

कोकण रेल्वेमार्गे धावणार्‍या हापा -मडगाव (22908/22907) तसेच पोरबंदर कोचुवेली (20910/20909) या दोन नियमित एक्स्प्रेस गाड्यांना स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्यात आला आहे. यातील हापा-मडगाव गाडीला दि. 19 ऑक्टोबरच्या फेरीपासून तर पोरबंदर – कोचुवेली या गाडीच्या दि. 20 ऑक्टोबर 2022 पासून अतिरिक्त डबा जोडण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.

 

दसर्‍या दिवाळीपासून कोकण रेल्वे मार्गावर नियमित गाड्यांव्यतिरिक्त फेस्टीवल स्पेशल गाड्यांच्या फेर्‍या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागपूर, सुरत, उधना तसेच मुंबईतून देखील कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी रेल्वेच्या अतिरिक्त गाड्या करण्यात आल्या आहे. 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

ग्रामपंचायत निवडणुक : दीपक केसरकर यांना धक्का..

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात एकूण चार  ग्रामपंचायतीचे निकाल आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात भाजपने जोर लावल्याचे दिसून आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील. झरे दोन ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाजपा पक्षाच्या श्रुती विठ्ठल देसाई तर पाटये पूर्नवसन येथे भाजपचे प्रविण पांडुरंग गवस सरपंचपदी विजयी झाले आहेत. भाजपने दोन्ही ग्रामपंचायतवर झेंडा फडकवल्यानंतर जल्लोष केला.

 देवगड तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत वर भाजप झेंडा फडकवला आहे. पडवणे ग्रामपंचायत वर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने झेंडा फडकविला आहे.

बाळासाहेबांच्या शिवसेनेला जिल्ह्यात आमदार मंत्री असताना एकही ग्रामपंचायत राखता आलेली नाही.

राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी 74 टक्के मतदान झालं ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा आज निकाल आहे

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

गोव्यात दारू महाग होणार….

गोवा : राज्य सरकारने बिअर वरच्या उत्पादन शुल्क करामध्ये (Excise Duty) वाढ करायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोव्यात बिअर च्या किमती वाढणार आहेत. हि वाढ प्रति बल्क लिटर मागे १० ते १२ रुपये असेल. इतर मद्यावरच्या उत्पादन शुल्कात सध्यातरी कोणताही बदल करण्यात येणार नाही असे सरकारने म्हंटले आहे.

गोवा हे एक पर्यटन राज्य म्हणून प्रसिद्ध आहे. इथे पूर्ण जगभरातून पर्यटक येतात. पर्यटनाला चालना देण्याचा एक भाग म्हणून गोवा सरकारने राज्यात मद्यावर इतर राज्यापेक्षा कमीत कमी कर लावले आहेत त्यामुळे इथे मद्य  जवळ जवळ ५०% कमी  किंमतीत  भेटते.

पण ह्या सर्वच फायदा सीमेलगत राज्यातील काही तस्कर घेत असल्याचे प्रकार वाढत चालले होते. हल्लीच महाराष्ट्राच्या नवीन सरकारने अशा तस्करीला आळा घालण्यासाठी अशा तस्करांना कडक कारवाई करण्यासाठी ‘मोक्का’ या कायद्यानुसार कारवाई करता येईल यासंबधी विचार करत असल्याचे जाहीर केले होते. महाराष्ट्र सरकारच्या हा निर्णयाच्या धर्तीवर गोवा सरकार किंमतील फरक कमी करण्यासाठी पाऊले उचलत आहे.

ह्याआधी नॉर्मल बिअर जिला ३० रुपये उत्पादन शुल्क कर होता तो आता ४२ रुपये प्रति बल्क लिटर झाला आहे. स्ट्रॉग बिअर चा उप्तादन शुल्क आता ६० रुपये करण्यात आले आहे, ह्या आधी हे शुल्क ५० रुपये एवढे होते.

 

  

 

 

दिवाळी दरम्यान कोकणरेल्वे मार्गावरील ‘ह्या’ गाड्या अतिरिक्त कोच सहित धावणार.

रत्नागिरी:दिवाळीसाठी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या काही काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

खालील गाड्या आता 4 अतिरिक्त AC3 कोच सहित चालविण्यात येणार आहे. ह्या आधी ह्या गाड्या आधी 12 डब्यां सहित चालविण्यात येत होत्या त्या आता 16 कोचसहित खालील कालावधीसाठी चालविण्यात येणार आहेत.

Train no. 11099 Ex. Lokmanya Tilak (T) दि

नांक 15/10/2022 ते 29/10/2022 प्रत्येक शनिवारी. 

 

Train no. 11100 Ex. Madgaon Jn.  

दिनांक 16/10/2022 ते 30/10/2022 प्रत्येक रविवारी. 

Train no 11085 Ex. Lokmanya Tilak (T) 

दिनांक 17/10/2022 ते 31/10/2022 प्रत्येक सोमवारी आणि बुधवारी. 

Train no. 11086 Ex. Madgaon Jn.

दिनांक 18/10/2022 to 01/11/2022 प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी 

 

Related : दिवाळीसाठी कोकणरेल्वेची विशेष गाडी… आरक्षण 14 ऑक्टोबर पासून…







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

दिवाळीसाठी कोकणरेल्वेची विशेष गाडी… आरक्षण 14 ऑक्टोबर पासून…

रत्नागिरी : दिवाळीसाठी सुरत ते करमाळी अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष गाडीची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. ही गाडी दि. 25 ऑक्टोबर रोजी धावणार आहे. ही गाडी स्पेशल फेअरसह चालवली जाणार आहे.पश्चिम रेल्वेच्या सहयोगाने कोकण रेल्वेने या गाडीचे नियोजन केले आहे.

Train no. 09193 Surat – Karmali Weekly

ही गाडी दि. 25 ऑक्टोबर रोजी सुरत येथून सायंकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सुटून दुसर्‍या दिवशी गोव्यात करमाळीला ती दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी पोहचेल.

Train no. 09194 Karmali – Surat Weekly

परतीच्या प्रवासात ही गाडी (01994) करमाळीहून दि. 26 रोजी दुपारी 2.30 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजता ती सुरतला पोहचेल.

ही गाडी खालील स्टेशन वर थांबेल 

वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी स्थानकावर थांबणार आहे.

डब्यांची स्थिती

एकूण सतरा डब्यांची या गाडीची कोच रचना वातानुकूलित चेअरकार 1, सेकंड सीटींग 14, एसएलआर 2 अशी असणार आहे.

आरक्षण

ह्या गाड्यांची बूकिंग दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सर्व तिकीट खिडक्यांवर आणि IRCTC ह्या वेबसाईटवर चालू होणार आहे.

RELATED : दिवाळी दरम्यान कोकणरेल्वे मार्गावरील ‘ह्या’ गाड्या अतिरिक्त कोच सहित धावणार.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अलिबाग मधे ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार…दीडपट पैशाच्या अमीषाने हजारो कंगाल, करोडोंचा गंडा

अलिबाग: अलिबाग तालुक्यात एक सामुदायिक फसवणुकीचा प्रकार घडला आहे. अलिबागमधील चार हजारांहून अधिक नागरिकांना २५ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. नॅसडॅक या अमेरिकन शेअर मार्केटमधील नावाजलेल्या कंपनीचा वापर करून हा हायटेक गंडा घालण्यात आला. सुरुवातीला ५०० रुपयांच्या बदल्यात १,२०० रुपये घेतल्यानंतर लोकांचा विश्‍वास बसला आणि त्‍यांनी जास्‍त गुंतवणूक केली. चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून या कंपनीने १४ दिवसांत १ लाखांवर २ लाख ४० हजार परतीची योजना काढली. अनेकांनी दागिणे गहाण ठेवून पैसे गुंतवले आणि काही दिवसातच कंपनीने वेब पोर्टल बंद झाले.

फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी अलिबाग पोलिस ठाण्यात येत सामुहीक तक्रार दाखल केली; मात्र, पोलिसांसमोर या हायटेक फसवणुकीचा गुंता सोडविण्याचे मोठे आव्हान आहे. फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वेब पोर्टलचा आय पी ऍड्रेसहा कॅलिफोर्नियामधील आहे, तर गुंतवणुकीसाठी जे संपर्क क्रमांक वापरले होते, ते बंद आहे. बहुतांश वेळा व्हॉट्‌सॲप आणि चॅटिंगद्वारे गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्यात आला होता. आता कोणीही त्यास प्रतिसाद देत नसल्याने गुंतवणुकदारांना हवालदिल झाले आहेत.

अशाच प्रकारे नॅशडॅक कंपनीच्या नावाचा वापर करून नाशिक, शिक्रापूर, पुणे, डोंबिवली आणि आता अलिबागमध्ये फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. आश्‍चर्याची गोष्‍ट म्हणजे फसवणूक झालेल्यांपैकी अनेकांना ही बोगस कंपनी आहे, हे माहिती होते. मात्र हमखास मोबदल्‍याच्या मोहाने त्‍यांचा घात केला. अनेकांनी दागिने, उसनवारी आणि इतर ठिकाणी केलेली गुंतवणूक काढून या कंपनीत पैसे टाकले. शिवाय मित्र, नातेवाइकांनाही पैसे गुंतवण्यास सांगितले. केवळ तीन महिन्यात २५ कोटी रुपयांचा गंडा या बोगस कंपनीने घातला.

गुंतवणुकदारांशी संपर्क साधण्यासाठी ५०० जणांचा एक व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला होता. अलिबाग तालुक्यातील एकट्या कुरूळ गावामध्ये असे चार ग्रुप कार्यरत होते. या गावातील लोकांनी लगतच्या गावातील आपले नातेवाईक, मित्रमंडळींनाही गुंतवणूक करण्यास सांगितले. आपल्‍यासह तिघांना सहभागी केल्‍यावर पहिल्या लेवलसाठी १ हजार रुपये, सहा जणांना सहभागी करून घेतल्यानंतर दोन हजार रुपये, मासिक पगार सुरू केल्यानंतर जास्तीत जास्त गुंतवणुकदारांना सहभागी करून घेण्याची चढाओढ पंचक्रोशीत सुरू होती. तीन महिन्यात या स्कीममध्ये अलिबाग तालुक्यात ५ हजारांहून अधिक लोकांनी पैसे गुंतवल्याचे उघड होत आहे.

दोनच दिवसात दुसरा वेब पोर्टल कार्यान्वित
फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला गुगल पे वरून थेट पैसे ट्रान्स्फर करता यायचे. परंतु त्यानंतर युटीआर पासवर्ड वापरावा लागत असे. यासाठी दररोज संध्याकाळी बोनस जाहीर केला जायचा, व्हॉट्‌सॲपवरून मॅसेज करून कंपनीच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली जायची. नॅशडॅक कंपनीच्या नावाने सुरू केलेला वेबपोर्टल बंद केल्यानंतर हीच पद्धत वापरून फसवणूक करण्यासाठी एनवायएससी नावाचा नवा वेबपोर्टल सुरू करण्यात आला आहे. त्याच्या वेबलिंक येथील नागरिकांच्या मोबाईलवर येऊ लागल्या आहेत.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

धक्कादायक:युवा दशावतारी कलाकार शांती कलिंगण यांचे अकाली निधन

सिंधुदर्ग :जिल्ह्यातील युवा दशावतारी कलाकार ओंकार रामचंद्र उर्फ शांती कलिंगण (वय ३० वर्षे) यांचे आज गोवा येथील बांबुळी रुग्णालयात सोमवारी सकाळी उपचार चालू असताना निधन झाले. त्यांचा अकाली निधनाने दशावतार क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 
विनोदी आशयाचा खलनायक अशी त्यांची ओळख होती. कलेश्वर दशावतारी ह्या त्यांचा नाट्यमंडळात ते कार्यरत होते. नेरूर  येथील देसाईवाडा येथील ते रहिवासी होते. कैलासवासी बाबी कलिंगण यांचे ते नातू होते. अलीकडेच शांती कलिंगण यांचे काका सुधीर कलिंगण यांचे निधन झाले होते त्या धक्क्यातून सावरत असताना कलिंगण कुटुंबाला अजून एक धक्का लागला आहे. त्यांचा जाण्याने कोकणातील दशावतार क्षेत्राचे  मोठे नुकसान झाले आहे  

सिंधुदुर्गातील उद्योजकांसाठी महत्वाची बातमी – महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे (2022) कुडाळ येथे आयोजन

सिंधुदुर्ग :महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ च्या उद्धिष्टपुर्तीचा एक भाग म्हणून तळागाळातील नाव उद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या राज्यस्तरीय उपक्रमाचे एकदिवशीय प्रशिक्षण शिबीर आणि सादरीकरण सत्र (BOOTCAMP ) १३ ओक्टोम्बर रोजी कुडाळ येथे संत राऊळ महाराज महाविद्यालयात संपन्न होणार आहे. या उपराक्रमात नवउद्योजकांना तज्ञ् मार्गदर्शन, प्रोत्साहन, निधी व पाठबळ या संबधी आवश्यक ती माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येईल. तरी या उपक्रमात नवसंकल्पना असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन तसेच शिबिराच्या दिवशी ऑफलाईन नावनोंदणी करून सहभागी होण्यासाठी शासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे.
अधिक माहितीकरिता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. 
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेची ठळक वैशिष्टे:-
महाराष्ट्रातील तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यनपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. नवसंकल्पनाना तसेच सुरुवातीच्या टप्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे. राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे.  महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कल्पना असणारे सर्व नागरिक या यात्रेत सहभागी होण्यास पात्र असतील.
प्रत्येक जिल्हयामधून अव्वल 3 विजेते घोषित केले जाणार आहेत यामध्ये रु 10,000/- ते 1,00,000 पर्यंतचे पारितोषिक रक्कम अदा करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व क्षेत्रांचा(sector) समावेश असेल उदा. कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास(sustainability),smart Infrastructure &mobility), इ. प्रशासन आणि इतर कुठलाही उपाय अथवा समाधान जो नाविन्यपूर्ण आहे इत्यादी. 
राज्यस्तरीय विजेत्यांना रोख अनुदान तसेच इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल निधीसाठी सहाय, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींची मार्गदर्शन सत्रे तसेच सॉप्टवेअर क्रेडीटस, क्लाऊड केडीटस,क्लाऊड क्रेडीटस सारखे इतर लाभ पुरविण्यात येतील. 






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search