Category Archives: कोकण

Konkan Railway: ‘मोदी एक्सप्रेस’ यंदाही धावणार

   Follow us on        
कणकवली: दरवर्षीप्रमाणे भाजप पक्षातर्फे चालविण्यात येणारी मोदी एक्सप्रेस यावर्षीही चालविण्यात येणार असल्याची माहिती कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे यांनी आज दिली. दिनाक ०४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईवरून ही गाडी कोकणसाठी रवाना होणार आहे. या गाडीच्या तिकीट बुकिंगसाठी दिनांक २८, २९ आणि ३० ऑगस्ट भारतीय जनता पक्षाच्या देवगड, कणकवली आणि वैभववाडी मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी चाकरमान्यांना केले आहे.
भाजपतर्फे तळकोकणतील जनतेचा विचार नाही?
भाजपतर्फे सोडण्यात येणारी ‘भाजप एक्सप्रेस’ कुडाळपर्यंत चालविण्यात येते. तर ‘मोदी  एक्सप्रेस’ फक्त कणकवली मतदारसंघातील चाकरमान्यांसाठी मर्यादित असते. या दोन्ही गाड्या तळकोकणातील सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या तालुक्यातील प्रवाशांसाठी नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Loading

रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावे ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ मध्ये समाविष्ट

   Follow us on        
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कुणाच्या हरकती असल्यास ६० दिवसांत हरकती सादर कराव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाच्या पर्यावरण , वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्धीसाठी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर या पाच तालुक्यांतील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केली आहे. या मसुदा अधिसूचनेत नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवासी यांची यासाठी हरकत आहे, त्यांनी साठ दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली- ११०००३ यांच्याकडे हरकत नोंदविणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूरचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडील केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाचे अधिसूचना पत्रासह प्राप्त झाले आहे. त्यानुसार चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार चिपळूण, खेड, लांजा, राजापूर व संगमेश्वर यांना ही अधिसूचना स्थानिक पातळीवर प्रसिद्ध करून अधिसूचनेबाबत हरकतीचा अहवाल सादर करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
कोणत्या तालुक्यात किती गावे?
या ३११ गावांमध्ये चिपळूण तालुक्यातील ४४ गावांचा, खेड तालुक्यातील ८५ गावांचा, राजापूर तालुक्यातील ५१ गावांचा, संगमेश्वर तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे.

Loading

गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

   Follow us on        

मुंबई: गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा एक मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील मुंबई ते सावंतवाडी दरम्यान जड वाहनांना बंदी असणार आहे.

ही बंदी तीन टप्प्यांत असणार आहे. 

गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 8 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे.

5 व 7 दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवासासाठी 11 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून ते 13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

अनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणेशमूर्तीचे विसर्जन, परतीच्या प्रवासाकरिता 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 18 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी राहील.

सर्व वाहनांना 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेनंतर नियमित वाहतुकीस परवानगी राहील.

हे निर्बंध दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही.

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रस्ता रूंदीकरण, रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने – आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी.

Loading

Konkan Railway: वांद्रे – मडगाव एक्सप्रेसचा मुहुर्त ठरला; या दिवशी दाखवला जाणार हिरवा कंदील

   Follow us on        

मुंबई: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नातून नव्याने चालू करण्यात येणाऱ्या वांद्रे – मडगाव या गाडीचे उद्घाटन दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी होणार असून त्यादिवसापासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे अशी माहिती बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी दिली आहे.

या पूर्वी ही गाडी दिनांक २४ ऑगस्टपासून प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे पक्ष कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले होते. या गाडीचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड आणि रेल्वेच्या इतर विभागांना मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यात वेळ लागत असल्याने या गाडीचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक दीड वाजता ही गाडी बोरिवली येथून मडगावसाठी मार्गस्थ करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

त्यानंतर ही २० डब्यांची गाडी वांद्रे – मडगाव दरम्यान आठवड्यातुन दोन दिवस चालविण्यात येणार आहे. आठवड्यात दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सुटणार असून वांद्रे येथे रात्री २३.४० वाजता पोहोचणार आहे. तर वांद्रे येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी पहाटे ६.५० वाजता सुटून मडगाव येथे रात्री २२.०० वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या उद्घाटन सोहोळ्यास उत्तर मतदारसंघातील कोकणकरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पक्षाच्या वतीने सुनील राणे यांनी केले आहे.

 

Loading

Breaking: अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

   Follow us on        

राजापूर, दि. २४ ऑगस्ट: अणुस्कुरा घाटात आज शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घाटातील दरड हटवण्याचे काम सुरू आहे. दरड कोसळल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

पहाटे ५ वाजताच्या सुमारास मातीचा भला मोठा भराव रस्तावर आल्याने हा मार्ग पूर्ण बंद झाला आहे. सुदैवाने पहाटेचा सुमार असल्याने, वाहनांची जास्त वर्दळ नसल्याने जिवितहानी झाली नाही. मात्र या घाट मार्गावर वारंवार कोसळणार्‍या दरडीमुळे येथील हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याचा प्रकार घडला आहे.

Loading

कोकण रेल्वे बेळगावला जोडण्यासाठी प्रयत्न सुरू; बेळगाव,चंदगड,आंबोलीसह एकूण 9 स्थानकांची निश्चिती

   Follow us on        
कोल्हापूर: मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या बेळगाव-चंदगड-सावंतवाडी या रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे यासाठी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी अलीकडेच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांची भेट घेतली होती. त्यांना शाहू महाराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लगोलग त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून या प्रकल्पासाठी त्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. खासदार नारायण राणे यांनीही या प्रकल्पासाठी आपले पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले आहे. तसेच आपण संयुक्तपणे रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करू असेही सांगितले. त्यामुळे हा रेल्वे मार्ग लवकरच अस्तित्त्वात येण्याची आशा निर्माण झाली आहे.
११४ किलोमीटर अंतर असलेल्या बेळगाव-चंदगड-सावंतवाडी या रेल्वे मार्गाचा पहिला सर्वे १९७० रोजी झाला होता. त्यानंतर २०१८ रोजी साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या अधिकार्‍यांनी या मार्गाचा पुनः सर्वे करून आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सुपूर्त केला होता.  मात्र त्या नंतर योग्य पाठपुरावा झाला नसल्याने हा रेल्वे मार्ग प्रस्ताव रेंगाळला. अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांनी दिली. बेळगाव, कुद्रेमनी, माडवळे, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, कानूर, आंबोलीमार्गे सावंतवाडी असा हा लोहमार्ग आहे.बेळगाव-सावंतवाडी मार्गाने दक्षिण रेल्वे आणि कोकण रेल्वे जोडली जाणार आहे. बेळगाव भागातील भाजीपाला कोकण-गोव्यात तर कोकणातील मासे दक्षिण कर्नाटकासह पश्चिम महाराष्ट्रात पोहोचण्यास मदत होणार आहे.
या मार्गात बेळगाव, चंदगड, आंबोलीसह एकूण 9 स्टेशन्स निश्चित केली आहेत. या लोहमार्गाचा अपेक्षित खर्च 1805.09 कोटी ऊपये असून निश्चितच तो भारतीय रेल्वेला परवडणारा आहे. या लोहमार्गामुळे होणारा आणखी एक प्रमुख लाभ म्हणजे जेव्हा कधी कोकण रेल्वेच्या मार्गात दरडी कोसळून मार्ग बंद पडतो, त्यावेळी कोकण रेल्वेची वाहतूक बेळगावमार्गे वळविता येणे शक्य होणार आहे. शिवाय सध्याचे बेळगावहून खानापूर, लोंढा, कॅसलरॉक, मडगाव, करमळी, पेडणेमार्गे सावंतवाडी हे अंतर 279 कि.मी. आहे. बेळगाव-सावंतवाडी लोहमार्ग झाल्यास हे अंतर 114.60 कि.मी. होऊन 165 कि.मी. सध्यापेक्षा रेल्वेमार्गाने बेळगावला सावंतवाडी जवळ होणार आहे, असा सकारात्मक अहवाल बेंगळूरचे मुख्य इंजिनिअर राम गोपाल यांनी रेल्वे मंत्रालयास पाठवला आहे.  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होणाऱ्या खासदाराने बेळगाव आणि सिंधुदुर्गच्या खासदारांच्या मदतीने स्वत: कॅप्टनशीप करून बेळगाव-सावंतवाडी लोहमार्गाचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यामुळे चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील तसेच कोकणातील चौकुळ आणि आंबोली भागातील लोक रेल्वेच्या कक्षेत येतील. या भागातील प्रवासी पंढरपूर, मुंबईला रेल्वेने जाऊ शकतील. त्यामुळे या भागाच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल. स्वातंत्र्यानंतरही रेल्वेच्या प्रतीक्षेत दिवस कंठणाऱ्या वंचित भागाच्या विकासाची परिमाणे बदलू शकतील
खासदार शाहू महाराज यांनी आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करून तो पूर्ण करून घेवू असे आश्वासन दिले होते

Loading

बांद्रा- बोरिवलीवरून कोकणात जाणाऱ्या नवीन गाडीसाठी हालचाली सुरु

   Follow us on        
Konkan Railway Updates: पाश्चिम उपनगरीय क्षेत्रातील कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक स्वतंत्र आणि नियमित गाडी असावी असे स्वप्न असलेल्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मडगाव ते बांद्रा टर्मिनस अशी आठवड्यातून दोन दिवस धावणारी धावणारी नवीन रेल्वे गाडी लवकरच कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गाडीचा प्रस्ताव आणि कच्चा आराखडा कोकण रेल्वे तर्फे दिनांक २१ ऑगस्ट रोजी पाश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
या गाडीचा प्रस्तावित मार्ग बांद्रा – बोरिवली – वसई – रोहा – मडगाव असा नमूद करण्यात आला आहे. या गाडीला एकूण २० LHB स्वरूपाचे डबे असणार असून त्यात सेकंड स्लीपर/सीटींगचे ६ डबे, थ्री टायर एसी/थ्री टायर एसी इकॉनॉमीचे ५ डबे, टू टायर एसीचे २ डबे,  जनरल – ०४ डबे, एसएलआर – ०१, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०१ समावेश आहे.
या प्रस्तावानुसार ही गाडी आठवड्यात दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सुटणार असून वांद्रे येथे रात्री २३.४० वाजता पोहोचणार आहे. तर वांद्रे येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी पहाटे ६.५० वाजता सुटून मडगाव येथे रात्री २२.०० वाजता पोहोचणार आहे. या गाडीचे थांबे अजून या प्रस्तावात नमूद केले नाही आहेत. मात्र गाडीचे सध्या दिलेले वेळापत्रक पाहता या गाडीला दिवा सावंतवाडी एक्सप्रेस 10105/10106 या गाडीच्या धर्तीवर थांबे मिळण्याची शक्यता आहे.
कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी गाडीचा हा कच्चा प्रस्ताव असून त्यात रेल्वेच्या तिन्ही विभागाच्या सूचनांची बदल होणार आहेत अशी माहिती दिली आहे. या गाडीची घोषणा लवकरात लवकर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Loading

Konkan Railway: ऐन गणेशचतुर्थीत रेल्वेचा ब्लॉक; कोकणरेल्वे सेवेवर परिणाम

   Follow us on        

Konkan Railway Updates: उत्तर व दक्षिण भारतात लोहमार्ग देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून त्याचा pकोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांवरही होणार आहे. काही गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

गाडी क्रमांक १२४५० चंदीगड मडगाव एक्सप्रेस ७, ९, १४ आणि १६ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२४४९ मडगाव-चंदीगड एक्सप्रेस १०, ११, १७ व १८ सप्टेंबर रोजी धावणार नाही.

चंदीगड कोचुवेली एक्सप्रेस ६, ११ व १३ सप्टेंबर रोजी आदर्शनगर, दिल्ली कांट, रेवारी, अलवार, मथुरामार्गे वळवण्यात आली आहे. याच मार्गाने कोचुवेली चंदीगड एक्सप्रेस ७, ९ व १४ सप्टेंबर रोजी धावेल. कोचुवेली-अमृतसर आणि अमृतसर-कोचुवेली एक्सप्रेस, एर्नाकुलम-निजामुद्दीन व निजामुद्दीन-एर्नाकुलम या गाड्याही या मार्गावरून धावणार आहेत.

मडगावहून १६ सप्टेंबर रोजी सुटणारी राजधानी एक्सप्रेस (२२४१३) ४ तास ४० मिनिटे उशिराने म्हणजे दुपारी १२.४० वाजता सुटणार आहे. १० सप्टेंबरची एर्नाकुलम निजामुद्दीन एक्सप्रेस उत्तर मध्य रेल्वेच्या विभागात अर्धा तास थांबवली जाणार आहे.

Loading

बोरिवली – सावंतवाडी गाडीचे थांबे निश्चित करताना ‘या’ बाबींचा विचार करण्यात यावा – कोकण विकास समिती

   Follow us on        

केंद्रीयमंत्री आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदार पियुष गोयल यांनी बोरिवलीतून कोकणात जाणारी रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दोन दिवसांपूर्वी बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी ही गाडी दिनांक २४ ऑगस्ट पासून सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे . यासाठी कोकण विकास समितीने ईमेलद्वारे पियुष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6191739074070790" crossorigin="anonymous"></script> <!-- new display --> <ins class="adsbygoogle" style="display: block;" data-ad-client="ca-pub-6191739074070790" data-ad-slot="8284357421" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true"></ins> <script> (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); </script>

पाश्चिम उपनगरीय रेल्वे क्षेत्रातील प्रवाशांसाठी या गाडीने कोकणात जाण्यासाठी एक सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र या गाडीचे थांबे निश्चित करताना या क्षेत्रातील सर्व कोकणवासियांचा विचार करणे गरजेचे आहे. 10105/10106 दिवा सावंतवाडी एक्सप्रेसच्या च्या धर्तीवर या गाडीला थांबे मिळाल्यास या गाडीचा मोठा फायदा प्रवाशांना होऊ शकतो. गरज असलेल्या स्थानकांवर नंतर थांबे मिळविण्यास खूप अडचणीचे जाते, त्यामुळे या स्थानकांवर सुरवातीलाच थांबे देण्याचा विचार करावा आशयाचे निवेदन कोकण रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना ईमेलद्वारे दिले आहे.

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6191739074070790" crossorigin="anonymous"></script> <ins class="adsbygoogle" style="display: block;" data-ad-format="fluid" data-ad-layout-key="-64+c2-1f-2z+tg" data-ad-client="ca-pub-6191739074070790" data-ad-slot="4639791735"></ins> <script> (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); </script>

10105/10106 दिवा सावंतवाडी एक्सप्रेसचे थांबे 

  • दिवा
  • कळंबोली
  • पनवेल जंक्शन
  • आपटा
  • जिते
  • रोहे
  • माणगांव
  • गोरेगांव रोड
  • वीर
  • सापेवामणे
  • करंजाड़ी
  • विन्हेरे
  • खेड़
  • चिपळूण
  • सावर्डा
  • आरवली रोड
  • संगमेश्वर रोड
  • रत्नागिरी
  • निवसर
  • आडवली
  • वेरावली
  • विलवडे
  • सौंदल
  • राजापुर रोड
  • खारेपाटण रोड
  • वैभववाडी रोड
  • अचिर्णे
  • नांदगाव रोड
  • कणकवली
  • सिंधुदुर्ग
  • कुडाळ
  • झाराप
  • सावंतवाडी रोड

Loading

कोकणकरांनो ही संधी गमावू नका, कोकणरेल्वेत विविध पदांसाठी मोठी भरती, भूमिपुत्रांना प्राधान्य मिळणार 




KRCL Recruitment: कोकण रेल्वेत नोकरी करण्याची ईच्छा असणाऱ्या कोकणकरांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. कोकण रेल्वेने KRCL विविध स्तरावरील पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने विविध पदांसाठी आणि  एकूण १९० जागांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत या पदांसाठी स्थानिकांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
जाहीर केलेल्या पदांसाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२४ ते ०६ ओक्टोम्बर २०२४ अशी अर्ज करण्याची मुदत असणार आहे. लेवल १ ते ७ पदांसाठी ही भरती असणार असून वेतन श्रेणी १८००० ते ४४९०० प्रति महिना असणार आहे. तर वयोमर्यादा १८ ते ३६ अशी आहे. विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून वयाच्या अटी नियमाप्रमाणे शिथिल केल्या आहेत.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच स्थानिकांसाठी प्राधान्य 
 या भरतीत प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे. पहिले प्राधान्य महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या राज्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी देण्यात येईल. त्यानंतर कोकण रेल्वे मार्ग या तिन्ही राज्यातून ज्या भागातून गेला त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना देण्यात येईल. तिसरे प्राधान्य महाराष्ट्र, गोवा आणि  कर्नाटक या तिन्ही राज्यातील उमेदवारांना तर त्यानंतर सध्या कोकण रेल्वेच्या सेवेत असलेल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे
.
अधिक माहितीकरिता खालील जाहिरात वाचावी



Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search