Category Archives: कोकण

”..वैभव नाईक घटनास्थळी पंधरा मिनिटांत दाखल कसे?” निलेश राणे यांचा गंभीर आरोप

   Follow us on        

सिंधुदुर्ग: माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना (उबाठा) आमदार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसे पोहोचू शकतात? असा प्रश्न विचारून मालवणला जे घडले ते जाणूनबुजून राजकीय फायद्यासाठी घडवून आणण्यात आले आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

काल रात्री उशिरा त्यांनी एक्स X वर पोस्ट करून हे आरोप केले आहेत.

आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो??? 

जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी.” असे ते या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

आधीच येथील वातावरण तापलेले असताना निलेश राणे यांच्या या पोस्टमुळे नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading

Bandra – Madgaon Express: बिगर पावसाळी वेळापत्रकात ही गाडी अधिक सोयीची – सागर तळवडेकर

   Follow us on        

सावंतवाडी: नुकतेच रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी कायमस्वरुपी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली असून या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, सिंधुदुर्ग,आणि कणकवली या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.

नवीन सुरू झालेली गाडी ही कोकणासाठी नक्कीच गरजेची आहे, मुंबई पासून कोकणापर्यंत सर्वच रेल्वे प्रवासी संघटनांनी या गाडी साठी प्रयत्न केले होते.परंतु सध्या या गाडीचे वेळापत्रक बघता ही गाडी काही अंशी गैरसोयीची असेल असे काही रेल्वे अभ्यासकांना वाटते. त्यामुळे सदर रेल्वेचे वेळापत्रक नियमित वेळापत्रकात (सध्या पावसाळी वेळापत्रक लागू आहे)बदल करावा असे अभ्यासक आणि प्रवासी सांगत आहेत.

ही गाडी सुरू व्हावी म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने अथक प्रयत्न केले होते. त्यासाठी संघटनेने पत्र व्यवहार आणि हजारो मेल प्रशासनाला केलेले होते. संघटनेने ही गाडी बोरिवली – वसई – सावंतवाडी अशी सुरू करावी या साठी प्रयत्न केले होते. परंतु सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनस हे अपूर्ण असल्याकारणाने सध्या सावंतवाडी स्थानकात गाड्यांचे प्रायमरी मेंटेनन्स होत नसल्याने ही गाडी मडगाव पर्यंत धावणार आहे. कारण कोकण रेल्वे मार्गावर फक्त मडगाव येथे प्रायमरी मेंटेनन्स होते.आणि अशी सुविधा भविष्यात सावंतवाडी स्थानकात देखील उभी राहावी यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी प्रयत्नशील आहे आणि सदरचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीचे संपर्क प्रमुख सागर तळवडेकर यांनी दिली.

ही गाडी सुरू होण्यासाठी प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल, खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्ह्याचे पालक मंत्री रविन्द्र चव्हाण साहेब, आमदार सुनील राणे, माजी खासदार श्री विनायक राऊत यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले असून या गाडीचा लाभ वसई, भिवंडी, बोरिवली येथे राहणाऱ्या चाकरमान्यांना नक्की होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

Loading

दुर्लक्षित स्थानकांना न्याय देण्याची संधी कोकण रेल्वेने वाया घालवली

   Follow us on        

Konkan Railway :वांद्रे मडगाव एक्सप्रेस ही नवीन गाडी कोकण रेल्वे मार्गावर पुढच्या आठवड्यापासून धावणार आहे. पाश्चिम रेल्वे मार्गावरून खास कोकणी जनतेसाठी सोडण्यात आलेल्या या गाडीचे कोकणकरांनी स्वागत केले असले तरी या गाडीच्या विचित्र वेळापत्रकामुळे तसेच अनेक प्रमुख स्थानकांना थांब्यांच्या यादीतून वगळण्याने काही प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक वर्षांनी कोकण रेल्वेला दुर्लक्षित स्थानकांना न्याय देण्याची संधी उपलब्ध झाली होती. पण ती वाया गेलेली पाहताना अतीव दुःख होत आहे. या गाडीला प्रत्येक तालुक्यात किमान १ ते २ थांबे देण्यात यावेत यासाठी रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाला ईमेल द्वारे एक निवेदन दिले आहे.

निवेदन:

बोरिवली – वसई – सावंतवाडी नियमित गाडी सुरु व्हावी यासाठी महाराष्ट्रातील अनेक प्रवासी संघटनांनी गेली १० ते १५ वर्षे सतत प्रयत्न केले. एक प्रकारचा लढा उभारून हा निवडणुकीचा मुद्दा केला. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे लवकरच १०११५/१०११६ मडगाव वांद्रे मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस सुरु होत आहे.

आजच रेल्वे बोर्डाचे पत्र सर्वांना मिळाले आहे. त्यात नमूद केल्यानुसार ही गाडी केवळ बोरिवली, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थीवी आणि करमळीला थांबणार आहे. ही मोठी निराशा असून बहुतांश कोकणवासीयांचा हिरमोड झाला आहे.

पेण, माणगाव, खेड, संगमेश्वर, लांजा (विलवडे), राजापूर, वैभववाडी अशा ७ तालुक्यांत तर कुडाळसारख्या महत्वाच्या स्थानकावर तसेच नागोठणे, सापे-वामने, करंजाडी, सावर्डा, आरवली रोड, आडवली, झाराप, मडुरे यांसारख्या इतर स्थानकांतही वाढीव गाड्यांची आवश्यकता असताना थांबे दिलेले नाहीत.

१०११५/१०११६ वांद्रे मडगाव एक्सप्रेसचा सरासरी वेग ताशी ३८ ते ४० किमीच्या दरम्यान आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आणि ५०१०३/५०१०४ रत्नागिरी दिवा पॅसेंजरचा वेगही तेवढाच आहे. परंतु दिवा सावंतवाडीला पनवेल व सावंतवाडी दरम्यान ३०, दिवा रत्नागिरीला पनवेल व रत्नागिरी दरम्यान २६ थांबे आहेत तर नव्याने सुरु होत असणाऱ्या गाडीला केवळ ७ थांबे आहेत. एवढ्या संथ गाडीला अपेक्षेप्रमाणे थांबे न दिल्यामुळे बहुतांश महाराष्ट्राला या गाडीचा फायदा होणार नाही. कोणतीही मागणी न करता गोव्याला थिवी आणि करमळी या केवळ १५ किलोमीटरवर असणाऱ्या दोन्ही स्थानकांवर थांबणारी गाडी दिली. परंतु, तीच गाडी महाराष्ट्रात पनवेल-रोहा ७५ किमी, वीर-चिपळूण ९८ किमी, चिपळूण-रत्नागिरी ७५ किमी, रत्नागिरी ते कणकवली १११ किमी अशा मोठ्या अंतरावर कुठेही थांबणार नाही. अनेक वर्षांनी कोकण रेल्वेला दुर्लक्षित स्थानकांना न्याय देण्याची संधी उपलब्ध झाली होती. पण ती वाया गेलेली पाहताना अतीव दुःख होत आहे.

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर पश्चिम रेल्वेवरून नियमित गाडी सुरु होत असल्यामुळे त्या गाडीला मध्य रेल्वेमार्गावरून कोकण रेल्वेवर सुरु झालेली पहिली गाडी दिवा सावंतवाडी प्रमाणे जास्तीत जास्त थांबे मिळणे आवश्यक आहे. तरी, १०११५/१०११६ मडगाव वांद्रे एक्सप्रेस या गाडीला अंधेरी, पेण, नागोठणे, माणगाव, सापे-वामने, करंजाडी, दिवाणखवटी, खेड, अंजनी, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, आडवली, वेरवली, विलवडे, सौंदळ, राजापूर रोड, खारेपाटण रोड, वैभववाडी रोड, कुडाळ, झाराप आणि मडूरे येथे वाढीव थांबे देण्यात यावेत ही विनंती. प्रत्येक तालुक्यात किमान एक किंवा दोन थांबे मिळाल्याशिवाय या गाडीचा म्हणावा तसा उपयोग होणार नाही व गाडी लोकप्रिय होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

एकदा गाडी सुरु झाल्यानंतर नव्याने थांबे मिळवणे किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे गाडी सुरु होण्याआधीच रेल्वे बोर्डला सुधारित प्रस्ताव पाठवून वाढीव थांबे मंजूर करण्यात यावेत, ही विनंती.

Loading

वांद्रे – मडगाव दरम्यान उद्या धावणार शुभारंभ विशेष एक्सप्रेस; आरक्षण आजपासून सुरू

   Follow us on        

मुंबई: वांद्रे – मडगाव दरम्यान धावणाऱ्या नवीन गाडीचा शुभारंभ उद्या दिनांक २९ ऑगस्ट रोजी बोरिवली येथे होणार आहे. त्यासाठी शुभारंभ Inaurgual विशेष गाडीला दुपारी १.२५ वाजता बोरिवली येथे हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. या सोहळ्याला कोकणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर मुंबई भाजप पक्षातर्फे करण्यात आले आहे.

गुरुवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी १.२५ वाजता बोरीवली वरून कोकणात जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या ट्रेनचा नं ०९१६७ असून त्याचे आरक्षण बुधवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन पीआरएस आणि आरक्षण खिडक्यांवर सुरु होणार आहे.

ही गाडी टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०२, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०१, स्लीपर – ०६, जनरल – ०३, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१ असे मिळून एकूण १५ एलएचबी डब्यांसहित चालविण्यात येणार आहे.

शुभारंभ विशेष गाडीचे वेळापत्रक 

  • बोरिवली – १३.२५ (गुरुवार)
  • वसई – १४.१०
  • भिवंडी – १५.०५
  • पनवेल – १६.०७
  • रोहा – १७.३०
  • वीर – १८.००
  • चिपळूण – १९.२५
  • रत्नागिरी – २१.३५
  • कणकवली – ००.०१ (शुक्रवार)
  • सिंधुदुर्ग – ००.२०
  • सावंतवाडी – ०१.००
  • थिवी – २.००
  • करमाळी – २.३०
  • मडगाव – ०४.००

हीच गाडी वेगळ्या वेळापत्रकावर आणि २० डब्यांच्या संरचनेसह पुढील आठवड्यापासून दर बुधवार व शुक्रवार वान्द्रे – मडगाव (गाडी नं १०११५) एक्सप्रेस आणि दर मंगळवार व गुरुवार मडगाव – वान्द्रे एक्सप्रेस (गाडी नं १०११६) एक्सप्रेस अशी चालविण्यात येणार आहे.

 

 

 

Loading

खुशखबर! वांद्रे – मडगाव एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी; कणकवलीत थांबा मंजूर

   Follow us on        
Konkan Railway: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नाने चालू होणाऱ्या वांद्रे – मडगाव या  गाडीचा प्रस्ताव आणि कच्चा आराखडा कोकण रेल्वे तर्फे दिनांक २१ ऑगस्ट रोजी पाश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला आज रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे.
ही मजुरी मिळाल्याने आता फक्त कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही गाडी जाहीर करण्याची औपचारिकता बाकी आहे.
या गाडीची माहिती खालीलप्रमाणे
Train No. 10116 Madgaon – Bandra (T) Express 
मडगाव ते बांद्रा दरम्यान धावताना ही गाडी आठवड्यात दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सुटणार असून वांद्रे येथे रात्री २३.४० वाजता पोहोचणार आहे. तर
Train No. 10115 Bandra (T) – Madgaon Express 
बांद्रा ते मडगाव दरम्यान धावताना ही गाडी बांद्रा येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी पहाटे ६.५० वाजता सुटून मडगाव येथे रात्री २२.०० वाजता पोहोचणार आहे.
या गाडीच्या प्रास्तावित थांब्या व्यतिरिक्त कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीचे अंतिम थांबे – करमाळी, थिवी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, वीर, रोहा, पनवेल, भिवंडी रोड, वसई रोड आणि बोरिवली
या गाडीला एकूण २० LHB स्वरूपाचे डबे असणार असून त्यात सेकंड स्लीपर ८ डबे, थ्री टायर एसीचे ३ डबे, थ्री टायर एसी इकॉनॉमीचे २ डबे, टू टायर एसीचा १ डबा,  जनरल – ०४ डबे, एसएलआर – ०१, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०१ समावेश आहे.

Loading

कोकण रेल्वेभरती : नेहमीप्रमाणे कोरेने प्रकल्पग्रस्तांना दिल्या वाटाण्याच्या अक्षता- कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती

   Follow us on        
रत्नागिरी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या विविध श्रेणीच्या पदांसाठी अधिसूचना क्र. CO/P-R/01/2024 दिनांक 16/08/2024 रोजी जाहीर झालेली झाली आहे. अधिसूचनेनुसार दिनांक 16/09/2024 पासून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत व अर्ज करण्याची शेवटची तारीख 06/10/2024 रोजी रात्री 11.59 पर्यंत आहे. परंतु सदरच्या अधिसूचनेचे अवलोकन करता एकिकडे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना प्रथम प्राधान्य देऊ असे आवाहन केले जाते आणि दुसरीकडे प्रकल्पग्रस्तेतर उमेदवार याना अर्ज करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. याचाच अर्थ कोकण रेल्वे भरती अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या नियुक्ती प्रक्रियेसंबंधी प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आणि कोकण रेल्वे प्रशासनावरचा अविश्वास दृढ झाला आहे अशी प्रतिक्रिया कृती समितीचे अध्यक्ष श्री. संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. विनय मुकादम, सचीव श्री. अमोल सावंत आणि सहसचीव श्री. प्रभाकर हातणकर यांनी व्यक्त केली आहे.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी या सन 1989-90 मध्ये कवडीमोल भावाने म्हणजेच रु. 150/- प्रति गुंठा या भावाने विकत घेतल्या गेल्या आहेत. आता त्या जमिनीची सदर किंमत प्रति गुंठा दहा लाख रुपये आहे. त्या वेळेला तेव्हाचे अर्थमंत्री माननीय मधु दंडवते साहेब व रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस साहेब यांनी जेव्हा कोकण रेल्वे प्रकल्पास मंजूरी देऊन स्वतंत्र कोकण रेल्वे महामंडळ स्थापन केले तेव्हा ज्या भुमिपुत्रानी कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत, त्यांना प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस विनाअट कोकण रेल्वेमध्ये नोकरीत घेतली जाईल अशी घोषणा केली होती व तसे त्यांचे स्वप्नही होते. परंतु आजतागायत तसे झालेले नाही. सदर पॉलिसी 1996 पर्यंत लागू होती. परंतु त्यानंतर आलेले व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी सदर पॉलिसी संबंधित भरती अधिकाऱ्यांनी त्यांच्या सहमतीने काढून टाकली. ह्याचाच अर्थ परप्रांतीय अधिकाऱ्यांमुळेच आजतागायत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे हे स्पष्ट होत आहे.
कोकण रेल्वेमध्ये नोकरीसाठी फक्त प्रकल्पग्रस्तांचाच विचार करणेसाठी आम्ही अनेक वर्षांपासून वेळोवेळी पत्रव्यवहार, समक्ष भेटीत कोकण रेल्वे च्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्मिक अधिकारी यांचेशी चर्चाही केली आहे. त्याही पेक्षा दिनांक 27/02/2024 रोजी आम्ही आमच्या मागण्यांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करणेसाठी संयुक्त बैठक लावणेबाबत कळविले होते. परंतु ह्यावर कोकण रेल्वेकडून कृती समितीकडे कोणताच पत्रव्यवहार वा चर्चा झालेली नाही. ही बाब दुर्देवाची आहे अशी खंत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यानी व्यक्त केली आहे.
सदर भरती प्रक्रियेसाठी कोकण रेल्वेचे अधिकृत नियुक्ती मंडळ आहे ते संपूर्णतः भ्रष्टाचाराने माखलेले आहे. तसेच जमीन घोटाळ्यामध्ये, नोकरभरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाने माखलेले आहे. तरी सदर भरती प्रक्रियेसाठी नेमलेले मंडळ बरखास्त करून नवीन नेमण्यात यावे आणि त्यावर कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचा एक सदस्य त्या मंडळावर नेमावा अशी आम्ही पूर्वीपासून मागणी करीत आलो आहोत. त्यानंतरच भरती प्रक्रिया राबवावी. सदर भरती प्रक्रिया ही भ्रष्टाचाराने झालेली आहे आणि ती पूर्वीच्या भरती मंडळाच्या आपल्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. याचे सबळ पुरावे माहितीच्या अधिकाराखाली कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीकडे आहेत. त्याचप्रमाणे हे पुरावे आपल्या मुख्य कार्यालयातील तत्कालिन मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय गुप्ता साहेब तसेच मुख्य कार्मिक अधिकारी श्री. के. के. ठाकूर यांचेसमोर सादर केले असता त्यांनी मान्यही केले होते. तसेच सदर भरती प्रक्रियेमध्ये शंभर टक्के प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले पाहिजे यासंदर्भात कोकणचे जेष्ठ नेते आणि मा. खासदार श्री नारायण राणे साहेब यांनाही कल्पना देण्यात आली आहे. तरी याबाबत त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा कोकण भूमी प्रकल्पग्रस्त शेतकरी रेल्वे ट्रॅक वरती आंदोलनात उतरेल व त्याच्या परिणामाला जबाबदार म्हणून व्यवस्थापकीय संचालक या नात्याने आपण असाल. तरी असा प्रकार होऊ नये याची आपण पूर्णतः दखल घ्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. असे कृती समितीच्या वतीने कोकण रेल्वे व्यवस्थापनाला लवकरच कळविण्यात येत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून अनेक रेल्वे गाड्या भारताच्या उत्तरेच्या टोकाकडून दक्षिणेकडे धावत आहेत आणि हजारो किलोमिटरचे अंतर कमी झाल्याने अनेक भारतीयांचा वेळ आणि पैसा वाचतो आहे. हे श्रेय नक्कीच कोकण रेल्वेचे उद्गाते कै. मा. मधु दंडवते साहेब आणि जॉर्ज फर्नांडिस साहेबांना द्यायला हवे. ह्या महान द्वयींचे एक मोठे स्वप्न होते की कोकण रेल्वेसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमीनीच्या मालकांना कोकण रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे. काही अंशी कोकण रेल्वेने ते पाळले मात्र आज आमचे तिन्ही जिल्ह्यातील अनेक प्रकल्पग्रस्त कोकण रेल्वेमध्ये आपल्याला नोकरी मिळेल ह्या आशेवर जगत आहेत. ही वाट पहाता पहाता त्यांची वयेही उलटून गेली आहेत.
आजवर अनेक प्रकल्पगग्रस्त शिक्षित, उच्चशिक्षित, तांत्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेले असतानाही बऱ्याच जणांना काही ना काही क्षुल्लक कारणाने डावलून अन्य आसामींना नोकरीत सामावून घेतले आहे. ह्याबाबाबत आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी अनेक बाबी पुराव्यानिशी स्पष्ट केलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याबाबत त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याबाबत, त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना ग्रुप ‘डी’ व तत्सम पदांसाठी परीक्षा न घेता प्रकल्पग्रस्त उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि शारिरिक चाचणी यांचेवर आधारित प्रतिक्षा यादी तयार करून त्याप्रमाणे नोकरीत सामावून घेण्याबाबत आम्ही वारंवार अर्ज विनंत्या तसेच मा. मुख्य कार्मिक अधिकारी यांचेशी समक्ष चर्चाही केल्या आहेत.
कोकणातील जनसामान्यांमध्ये तसेच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबामध्ये कोकण रेल्वे भरती प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
• ज्या भुमिपुत्रांनी कवडीमोल भावाने कोकण रेल्वेसाठी जमीनी दिल्या त्या भुमिपुत्रांना, गोरगरीब प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वे मध्ये नोकरी का देऊ शकत नाही. फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच अधिसूचना काढण्यात येत नाही? प्रकल्पग्रस्तांमध्ये पात्र मुले असताना देखील त्यांना क्षुल्लक कारणांनी डावलले जात आहे. प्रकल्पग्रस्त मुलांची पात्र यादी कोकण रेल्वेला देऊन देखील पदभरती किंवा कंत्राटी भरती यात प्रथम प्राधान्य एक ते दोन टक्के आहे.
• कोकण रेल्वे मध्ये निघालेल्या भरती मध्ये प्रथम प्राधान्य हे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना देणार असे म्हटले असले तरी प्रत्यक्ष तसे होताना दिसत नाही. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात नाहीये. त्रयस्थ कंपनीला नोकरभरतीचे कंत्राट देऊन ही प्रक्रिया राबवली जाते. पण प्रत्यकक्षात भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त दिसत नाहीत.
• याही पुढे जाऊन जे कंत्राटदार कोकण रेल्वेने नियुक्त केले आहेत.ते देखील प्रकल्पग्रस्त मुलांना डावलून पर जिल्हयातील मुले भरत आहेत.
कोकण रेल्वेच्या जमीनी कवडीमोलाने अधिग्रहित करुन आज सुमारे 36 वर्षे झाली तरी आज कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतलेले नाही ही शोकांतिका आहे. आम्ही कोकण रेल्वेचे प्रकल्पग्रस्त कोकण रेल्वेमध्ये नोकरीत सामावून न घेतल्याने वैफल्यग्रस्त झालो आहोत. कोकण रेल्वेमुळे आज सुमारे 4500 प्रकल्पग्रस्तेतर कर्मचारी व त्यांची कुटुंबे जगतायत परंतु आमचेवर मात्र अन्याय होतोच अशी आम्हा प्रकल्पग्रस्तांची मानसिकता झाली आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांसमोर नोकऱ्यात सामावून न घेतल्यामुळे असूयेपोटी अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वेच्या अनेक भुमिपुत्रांकडून होत आहे. त्याचप्रमाणे आम्हा प्रकल्पग्रस्तांनी कोकण रेल्वेला जमिनी दिल्या परंतु आज आमची घरे जमीनदोस्त होऊन बेघर झालो आहोत. बेरोजगारीमुळे त्रस्त झालो आहोत. आम्हा प्रकल्पग्रस्तांना काही क्षुल्लक कारणाने डावलल्याने नियुक्तीअभावी वय वाढत चालले आहे. त्यामुळे नोकरी आवेदनासाठी वयाची मर्यादा 45 वर्षे करणेसाठी आम्ही वारंवार कोकण रेल्वेकडे विनंती करीत आलो आहोत. मात्र कोकण रेल्वे  ह्यासाठी रेल्वे बोर्डाची मंजूरी आवश्यक असल्याचे कारण सांगून हेतुपुरस्सर नाकारत आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. अशाही प्रतिक्रिया को. रे. प्रकल्पगग्रस्तांमधून व्यक्त करण्यात येत आहेत.
एकंदीत कोकण रेल्वे भरती प्रक्रिया अधिकाऱ्यांकडून कोकण रेल्वेच्या भुमिपुत्रांना दुजाभाव देऊन निव्वळ आपल्याच अधिकारातील उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिने आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने कृती समितीमार्फत सदरहू अधिसूचना रद्द करुन ती फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच असावी ह्याबाबत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने खालीलप्रमाणे मागण्या करण्यात येणार आहेत :
1. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची कोणतीही परीक्षा न घेता ग्रुप डी व ग्रुप सी साठी योग्य असे  प्रशिक्षण (ट्रेनिंग) देऊन  त्यांना कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त म्हणून या पदांवरती नियुक्ती करावी.
2. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी ह्यापूर्वी परीक्षा दिल्या होत्या परंतु अनेक उमेदवारांना कागदपत्रांच्या छाननीमध्ये व इतर किरकोळ कारणाने डावलण्यात आलेले आहे, कागदपत्रे मुदतीत सादर करुनही नोकरीत सामावून घेण्यात आलेले नव्हते व अनेक उमेदवारांच्या फिजिकल, मेडिकल उत्तीर्ण झालेले आहेत परंतु प्रतिक्षायादीत समाविष्ट आहेत अशा उमेदवारांची नियुक्ती त्वरित करावी. तसेच अधिसूचना 5/2018 डी ग्रुपसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना तीस ते पन्नास सेकंदासाठी अनुत्तीर्ण केलेल्यांना त्वरित घ्यावे. (ह्या संदर्भात कोकण रेल्वे मुख्य कार्यालयात अनेक वेळा चर्चा केलेली आहे).
3. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची वयोमर्यादा वय वर्ष 45 एवढी करण्यात यावी. (अनेक प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी ह्यापूर्वी ग्रुप-डी व ग्रुप-सी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. परंतु कागदपत्र पूर्ततेमध्ये क्षुल्लक कारणावरून सदरहू उमेदवारांना डावलण्यात आले होते. गेल्या पाच वर्षात अशा पदांची भरती न झाल्याने ह्या उमेदवारांची निर्धारित वयोमर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे. ह्याचा विचार करुन फक्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेचा निकष ठेवून तो 45 वर्षे ठेवावा).
4. प्रकल्पग्रस्तांच्या कागदपत्रांच्या छाननी करताना 12/2 च्या नोटीसीमागे एक उमेदवार अशी नियुक्ती करण्यात यावी.
5. यापूर्वी कोकण रेल्वे विरुध्द कोर्टामध्ये अनेक उमेदवारांनी केसेस दाखल केल्या होत्या आणि त्या केस निकाली लागून त्यांना भरती करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. परंतु त्या उमेदवारांना अद्याप कोकण रेल्वेमध्ये सामावून घेतलेले नाही व बरीच वर्षे केसेस चालू राहिल्यामुळे तसेच अधिसूचना न आल्यामुळे त्यांचे वय वाढले आहे. अशा उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भात समितीसमवेत आपली चर्चा व्हावी ही विनंती.
दिनांक 9 मे 2018 रोजी झालेल्या बैठकीत आणि डिसेंबर 2018 मधील कोकण रेल्वे च्या अधिकाऱ्यांच्या संपन्न झालेल1या बैठकीत क्षुल्लक कारणावरून डावलेल्या कृती समीतीच्या नोंदीत उमेदवारांचा आम्ही पुनश्च विचार करू आणि पुढील भरतीत सामावून घेऊ असे तत्कालिन सीएमडी मा. गुप्ता साहेब आणि मुख्य कार्मिक अधिकारी श्री. के. के. ठाकूर साहेब यांनी आश्वासन दिले होते. सदर प्रकरणावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सदरबाबत आम्ही लेखी पुरावेही सादर केलेले होते व त्यास त्यांनी मान्यताही दिली होती.  अशा उमेदवारांची व प्रतिक्षायादीत असलेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण घेऊन नेमणुक होणेबाबत कृती समितीची आग्रहाची मागणी आहे.
ह्याबाबत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कोकणातील जनतेची व्यथा जाणून घेणारे एकमेव जेष्ठ नेते आणि खासदार मा. ना. नारायण राणे साहेब यांना ह्यामध्ये योग्य तो मार्ग काढून प्रकगल्पग्रस्तांना वरील मागण्या मान्य करणेसाठी मे. कोकण रेल्वे व्यवस्थापनाकडे चर्चा करणेसाठी आग्रहाची विनंती करण्यात येणार आहे. याबाबत कृती समितीचे पदाधिकारी गोरगरीब कोकण रेल्वेचे भुमिपुत्र ह्यावेळी आवर्जुन उपस्थित राहून आपल्या व्यथा कथन करणार असल्याचे कृती समितीचे कार्याध्यक्ष श्री. विनय मुकादम यांनी सांगितले आहे.
त्याचप्रमाणे कोकण रेल्वे प्रकल्प्रस्तांच्या व्यथां मांडताना कृती समितीचे वतीने, सन 2027 पर्यंत सुमारे 2500 पदे रिक्त होणार असल्यामुळे कोकण रेल्वे आधी भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण न करता ही पदे प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातूनच भरावीत जेणेकरुन ही भरती म्हणजे कोकण रेल्वेचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करणाऱ्या कै. मा. मधु दंडवते व मा. जॉर्ज फर्नांडिस साहेब यांना आदरांजली ठरेल असे वक्तव्य कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त आणि कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे

Loading

Konkan Railway: ‘मोदी एक्सप्रेस’ यंदाही धावणार

   Follow us on        
कणकवली: दरवर्षीप्रमाणे भाजप पक्षातर्फे चालविण्यात येणारी मोदी एक्सप्रेस यावर्षीही चालविण्यात येणार असल्याची माहिती कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे यांनी आज दिली. दिनाक ०४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईवरून ही गाडी कोकणसाठी रवाना होणार आहे. या गाडीच्या तिकीट बुकिंगसाठी दिनांक २८, २९ आणि ३० ऑगस्ट भारतीय जनता पक्षाच्या देवगड, कणकवली आणि वैभववाडी मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी चाकरमान्यांना केले आहे.
भाजपतर्फे तळकोकणतील जनतेचा विचार नाही?
भाजपतर्फे सोडण्यात येणारी ‘भाजप एक्सप्रेस’ कुडाळपर्यंत चालविण्यात येते. तर ‘मोदी  एक्सप्रेस’ फक्त कणकवली मतदारसंघातील चाकरमान्यांसाठी मर्यादित असते. या दोन्ही गाड्या तळकोकणातील सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या तालुक्यातील प्रवाशांसाठी नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Loading

रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावे ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ मध्ये समाविष्ट

   Follow us on        
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कुणाच्या हरकती असल्यास ६० दिवसांत हरकती सादर कराव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाच्या पर्यावरण , वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्धीसाठी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर या पाच तालुक्यांतील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केली आहे. या मसुदा अधिसूचनेत नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवासी यांची यासाठी हरकत आहे, त्यांनी साठ दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली- ११०००३ यांच्याकडे हरकत नोंदविणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूरचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडील केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाचे अधिसूचना पत्रासह प्राप्त झाले आहे. त्यानुसार चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार चिपळूण, खेड, लांजा, राजापूर व संगमेश्वर यांना ही अधिसूचना स्थानिक पातळीवर प्रसिद्ध करून अधिसूचनेबाबत हरकतीचा अहवाल सादर करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
कोणत्या तालुक्यात किती गावे?
या ३११ गावांमध्ये चिपळूण तालुक्यातील ४४ गावांचा, खेड तालुक्यातील ८५ गावांचा, राजापूर तालुक्यातील ५१ गावांचा, संगमेश्वर तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे.

Loading

गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

   Follow us on        

मुंबई: गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा एक मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील मुंबई ते सावंतवाडी दरम्यान जड वाहनांना बंदी असणार आहे.

ही बंदी तीन टप्प्यांत असणार आहे. 

गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 8 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे.

5 व 7 दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवासासाठी 11 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून ते 13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

अनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणेशमूर्तीचे विसर्जन, परतीच्या प्रवासाकरिता 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 18 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी राहील.

सर्व वाहनांना 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेनंतर नियमित वाहतुकीस परवानगी राहील.

हे निर्बंध दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही.

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रस्ता रूंदीकरण, रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने – आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी.

Loading

Konkan Railway: वांद्रे – मडगाव एक्सप्रेसचा मुहुर्त ठरला; या दिवशी दाखवला जाणार हिरवा कंदील

   Follow us on        

मुंबई: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नातून नव्याने चालू करण्यात येणाऱ्या वांद्रे – मडगाव या गाडीचे उद्घाटन दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी होणार असून त्यादिवसापासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे अशी माहिती बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी दिली आहे.

या पूर्वी ही गाडी दिनांक २४ ऑगस्टपासून प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे पक्ष कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले होते. या गाडीचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड आणि रेल्वेच्या इतर विभागांना मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यात वेळ लागत असल्याने या गाडीचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक दीड वाजता ही गाडी बोरिवली येथून मडगावसाठी मार्गस्थ करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

त्यानंतर ही २० डब्यांची गाडी वांद्रे – मडगाव दरम्यान आठवड्यातुन दोन दिवस चालविण्यात येणार आहे. आठवड्यात दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सुटणार असून वांद्रे येथे रात्री २३.४० वाजता पोहोचणार आहे. तर वांद्रे येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी पहाटे ६.५० वाजता सुटून मडगाव येथे रात्री २२.०० वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या उद्घाटन सोहोळ्यास उत्तर मतदारसंघातील कोकणकरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पक्षाच्या वतीने सुनील राणे यांनी केले आहे.

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search