Category Archives: कोकण

पालघर मालगाडी दुर्घटना: कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्या रखडणार

   Follow us on        

Palghar Train Derailment : पश्चिम रेल्वेच्या पालघर येथे यार्डात मालगाडी घसरल्याने सुरत ते मुंबई अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. मालगाडीत मोठ्या प्रमाणावर लोखंडी प्लेटची वाहतूक केली जात होती. या घटनेनंतर मालगाडीचा डबे उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे. या अपघातानंतर अनेक गाड्यांना शॉर्ट टर्मिनेट केले आहे तर काही गाड्यांना वळविण्यात आले आहे. मात्र या मार्गावरील धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाणार्‍या खालील दोन गाड्यांचा समावेश आहे.

आज दिनांक २८ मे या दिवशी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १२४३२ – हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस.

आज दिनांक २८ मे या दिवशी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १९२६०– कोचुवेली एक्सप्रेस.

पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर मालगाडीचे 7 डब्बे रुळावरून घसरले आहेत. डहाणूवरून मुंबईच्या दिशेने येणारी सर्व रेल्वे वाहतूक सेवा त्यामुळे ठप्प झाली आहे. लोखंडी कॉइल घेऊन गुजरातवरून मुंबईच्या अप दिशेने येणाऱ्या मालगाडीचे डबे पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर घसरले आहेत. रुळावर मालगाडीचे डब्बे तीन डबे घसल्याने, दोन्ही रेल्वे रुळावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. पालघर रेल्वेस्थानाकात एकूण चार रेल्वे मार्ग आहेत. सध्या मुंबई, विरारहून डहाणू, गुजरातच्या दिशेला जाणारी रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू आहे. मात्र गुजरातवरून मुंबई, विरारकडे येणारी सेवा ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासन, पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ सर्व यंत्रणा घटनास्थळावर दाखल झाली आहे. यंत्रसामुग्री आणून घसरलेले डब्बे बाजूला करून रेल्वे सेवा लवकरच सुरळीत करण्यात येईल असे म्हटले जात आहे.

Loading

प्रवाशांचे हाल संपता संपेनात; अजून एका एक्सप्रेसची सेवा ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित

   Follow us on        
Konkan Railway News:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म नंबर 10 आणि 11 चे काम सुरू असल्यामुळे कोंकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांची सेवा दादर आणि पनवेल पर्यंत काही  कालावधीसाठी मर्यादित केली आहे, त्यामध्ये आता ११००४ सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस या गाडीचीही भर पडली आहे.
कोकण रेल्वेने आज दिनांक २८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार दिनांक २८ मे ते ०२ जून पर्यंत ११००४ सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस या गाडीची सेवा ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित Terminate करण्यात येणार आहे.
ऐन हंगामात प्रवाशांना मनस्ताप
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांची सेवा पनवेल, दादर आणि ठाणे या स्थानकापर्यंत मर्यादित केली असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मांडवी एक्सप्रेस ही गाडी पनवेल स्थानकापर्यंत  चालविण्यात येत आहे. मात्र तिचे वेळापत्रक पाळले जात नसून तिला पनवेल पर्यंत पोहोचायला उशीर होत आहे. अनेकदा त्या वेळेपर्यंत पनवेल ते ठाणे या लोकल मार्गावरील लोकल सेवा रात्री बंद होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवासात वरिष्ठ नागरिक, लहान मुलांना सांभाळत घरी पोहोचणे जिकरीचे झाले आहे.

Loading

खळबळजनक: रत्नागिरीतील कंपनीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७८ जणांची फसवणूक केल्याचे उघड; गुन्हा दाखल

   Follow us on        
कुडाळ, दि.२८ मे: रत्नागिरी येथील एका कंपनीने सिंधुदुर्गात २.२५ कोटीची फसवणूक केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी येथील एका जॉब वकर्सच्या नावाखाली प्रस्थापित झालेल्या प्रा. लि. कंपनीच्या विरोधात सिंधुदूर्गातील ७८ जणांनी आपली २.२५ कोटीची फसवणूक झाल्याचा गुन्हा कुडाळ पोलिसांत दाखल केला आहे.
ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील असून जॉब वकर्सच्या नावाने या कंपनीने सिंधुदुर्गातही आपली शाखा उघडली होती. विशेष म्हणजे पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा कार्यरत होती. रत्नागिरीत या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरताच सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी कुडाळ पोलिस ठाणे आवारात गर्दी केली. यावेळी ७८ जणांनी एकत्र येत आपल्या फसवणूकीची तक्रार कुडाळ पोलिसांकडे दिली आहे. त्यावर ७८ जणांची नावे व त्यासमोर आपण जमा केलेली रक्कम टाकण्यात आल्याचे समजते. यामध्ये २५ हजारांपासून १ लाख ७५ हजारांपर्यंतची रक्कम नमुद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जवळपास २ कोटी २५ लाख रुपयांची ही ७८ जणांची रक्कम आहे.
दरम्यान, फसवणूक झालेल्यांचा आकडा अजुनही मोठा असून रक्कमही त्याच पटीत वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत कुडाळ पोलिसांत रितसर तक्रार झाली नसल्याचे सांगण्यात आले असून या फसवणुकीत अनेक जनसामान्यांना गंडा बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तकार दारांच्या अर्जाची दखल घेऊन फसवणूक झालेल्यांनी तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मेगाब्लॉक; दोन गाड्या उशिराने धावणार

   Follow us on        
Konkan Railway News: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी  आहे. येत्या शुक्रवारी दिनांक २४/०५/२०२४ रोजी सकाळी  ०७:०० ते ०९:०० या वेळेत सावर्डा – भोके विभाग दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे रेल्वेसेवेवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
गाडी क्र. १२६१७ एर्नाकुलम जं. – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसचा या गाडीचा दिनांक २३/०५/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी ते मडगाव जंक्शन दरम्यान ११० मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
गाडी क्र. २०९२३ तिरुनेलवेली – गांधीधाम एक्सप्रेसचा दिनांक २३/०५/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी ते मडगाव जंक्शन दरम्यान ७० मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

प्रवाशांना दिलासा; कोकण रेल्वे मार्गावरील विशेष गाडीचा जून १५ पर्यंत विस्तार

   Follow us on        
Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीत कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या एका विशेष गाडीची सेवा १५ जूनपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने चालविण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक 07309 / 07310  वास्को दा गामा – मुझफ्फरपूर जं. – वास्को द गामा विशेष (साप्ताहिक) गाडीच्या सेवेचा विस्तार होणार आहे. संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे
07309 वास्को दा गामा – मुझफ्फरपूर जं. (साप्ताहिक) विशेष  या गाडीची सेवा दिनांक 08/05/2024 या दिवशी समाप्त होणार होती. मात्र आता ही गाडी दिनांक 12/06/2024 पर्यंत चालविण्यात येणार आहे.ही गाडी  वास्को द गामा येथून दर बुधवारी संध्याकाळी 16:00 वाजता सुटेल ती  मुझफ्फरपूर जंक्शनला तिसऱ्या दिवशी सकाळी 09:45 वाजता पोहोचेल.
07310 मुझफ्फरपूर जं. – वास्को दा गामा (साप्ताहिक) विशेष  या गाडीची सेवा दिनांक 11/05/2024 या दिवशी समाप्त होणार होती. मात्र आता ही गाडी दिनांक 15/06/2024 पर्यंत चालविण्यात येणार आहे. ही गाडी मुझफ्फरपूर जंक्शन येथून दर शनिवारी दुपारी 13:00 वाजता निघेल ती तिसऱ्या दिवशी सकाळी 06:30 वाजता वास्को द गामाला पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छोकी, पं. . दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल.
रचना : एकूण 20 एलएचबी कोच = 2 टायर एसी – 01 कोच, 3 टायर एसी – 01 कोच, 3 टायर एसी इकॉनॉमी – 02 कोच, स्लीपर – 10 डबे, जनरल – 04 कोच, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Konkan Railway | NSG1 की NSG2? जाणून घ्या तुमचे स्थानक भारतीय रेल्वे स्थानकांच्या कोणत्या श्रेणीत मोडते ..

   Follow us on        
Categorization of Railway Stations:भारतातील रेल्वे स्थानकांच्या वर्गीकरणासाठीच्या निकषांमध्ये नोव्हेंबर, 2017सुधारणा करण्यात आली आहे. नवीन वर्गीकरणानुसार, स्थानकांच्या वर्गीकरणासाठी त्या स्थानकावरील आणि प्रवाशांची संख्या आणि एकूण कमाई या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या आहेत.
त्यानुसार भारतातील स्थानकांची 3 गटांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहेत.
१) नॉन उपनगरीय (NSG)
२) उपनगरीय (SG)
३) हॉल्ट (HG).
पुढे या गटांना अनुक्रमे 1-6, 1-3 आणि 1-3 या श्रेणींमध्ये विभागण्यात येते. ही वर्गवारी खालील कसोटीच्या आधारे करण्यात येते.
नॉन उपनगरीय स्थानके NSG
स्थानकांची वर्गवारी कमाई प्रवासी संख्या 
NSG 1 500 कोटीपेक्षा जास्त 2 कोटींहून अधिक
NSG 2 100 ते 500 कोटी 1 ते 2 कोटी
NSG 3 20 ते 100 कोटी 50 लाख ते 1 कोटी
NSG 4 10 ते 20 कोटी 20 लाख ते 50 लाख
NSG 5 1 ते 10 कोटी 10 लाख ते 20 लाख
NSG 6 1 कोटी पेक्षा कमी 10 लाख पेक्षा कमी
उपनगरीय स्थानके  SG
स्थानकांची वर्गवारी कमाई प्रवासी संख्या
SG 1 25 कोटीपेक्षा जास्त 3 कोटींहून अधिक
SG 2 10 ते 25 कोटी 1 ते 3 कोटी
SG 3 10  कोटी पेक्षा कमी 1 कोटी पेक्षा कमी
हॉल्ट  स्थानके   HG  
स्थानकांची वर्गवारी कमाई प्रवासी संख्या 
HG 1 50 लाखपेक्षा जास्त  3 लाखपेक्षा जास्त 
HG 2 5 लाख ते 50 लाख 1 लाख ते 3 लाख
HG 3 5 लाख पेक्षा कमी  1 लाख पेक्षा कमी 
कोकण रेल्वे मार्गावरील स्थानके कोणत्या श्रेणीत मोडतात?
२०२२-२३ च्या वार्षिक उत्पन्नानुसार केलेल्या वर्गीकरणानुसार कोकण रेल्वे मार्गावरील कोणत्याही स्थानकाचा समावेश NSG1 या श्रेणीत समावेश होत नाही. तर फक्त मडगाव या स्थानकाचा NSG2 या श्रेणीत समावेश होतो. इतर स्थानकाचा तपशील खालीलप्रमाणे

NSG2 (१ स्थानक)

मडगाव जं.

NSG3 (७ स्थानके)  

चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, करमाळी, उडुपी

NSG4 (२ स्थानके) 

सावंतवाडी रोड, कारवार

NSG5 (२२ स्थानके)  

माणगाव, वीर, खेड, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, सिंधुदुर्ग, पेर्नेम, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, होन्नावर, मुर्डेश्वर, भटकळ, कुंदापुरा, बारकुर, मुल्की, सुरथकल

NSG6 (३३ स्थानके) 

कोलाड, इंदापूर, गोरेगाव रोड, सपे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाण खवटी, अंजनी, कामठे, कडवई, उक्षी, भोके, निवासर, वेरावली, खारेपाटण, नांदगाव रोड, झाराप, मदुरे, वेर्ना, माजोर्डा जं., बल्ली, कानाकोना, लोलिम, अस्नोती, हार्वर्ड, मानकी, शिरूर, बिजूर, सेनापुरा, इन्नांजे, पाडुबिद्री, नंदीकूर, ठाकूर

HG1 (१ स्थानक)

बाइंदूर मुकांबिका रोड

HG2 (२ स्थानके)

सौंदल,  सुरावली

HG3 (१ स्थानक)

चित्रपूर

Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Mumbai Goa Highway | पोलादपुरात कारला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, ३ जण जखमी

   Follow us on        
Accident on Mumbai Goa Highway:आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथील आंबेडकर नगर येथे झालेल्या कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात  २ जण जागीच मृत्युमुखी तर ०३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की आज सकाळी पोलादपूर येथील आंबेडकर नगर येथे उभ्या असलेल्या कंटेनर क्रमांक NL01 AE3150 ला मुंबई दिशेकडून खेड दिशेकडे जाणाऱ्या MH03 CS 1177 या कारने मागून भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने हा अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कंटेनर च्या मागील भागात अडकली. या कार मध्ये ५ प्रवासी प्रवास करीत होते. या भीषण अपघातात २ जण जागीच मृत्युमुखी तर ०३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास ४५ मिनिटांचा कालावधी लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाणे येथील कर्मचारी, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी,स्थानिक ग्रामस्थ, नरवीर रेसक्यू टीम, श्री काळभैरवनाथ रेसक्यु टीम यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

प्रवाशांना दिलासा; कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ

   Follow us on        
Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीत कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे.   वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या एका विशेष गाडीची वारंवारता Frequency वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या समन्वयाने चालविण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक 01129 / 01130 लोकमान्य टिळक (टी) – थिविम – लोकमान्य टिळक (टी)  त्रि-साप्ताहिक अनारक्षित या गाडीच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे
गाडी क्र. 01129 लोकमान्य टिळक (टी) – थिविम (साप्ताहिक) अनारक्षित विशेष जी फक्त शनिवारी  चालविण्यात येत होती ती दिनांक13/05/2024 ते 05/06/2024  या कालावधीसाठी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे आता सोमवार, बुधवार आणि शनिवारी चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या एकूण ८ फेऱ्या होतील.
 गाडी क्र. 01130 थिविम – लोकमान्य टिळक (टी) (साप्ताहिक) अनारक्षित विशेष जी फक्त रविवारी चालविण्यात येत होती ती दिनांक 14/05/2024 ते 06/06/2024 या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि रविवारी चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या एकूण ८ फेऱ्या होतील.

Loading

ताडोबाच्या वाघांचे सह्याद्रीच्या अभयारण्यात स्थलांतर करण्यात येणार

   Follow us on        
रत्नागिरी : सहयाद्री टायगर रिझर्व (STR)मधील वाघांच्या लोकसंख्येचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्यातील वन विभागाने एक निर्णय घेतला आहे. वन विभाग लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे येथे  स्थलांतर करणार आहे. एसटीआरमधील सह्याद्री कोकण वन्यजीव कॉरिडॉर आणि गोवा, कर्नाटकमधील जंगले पुरेशी सुरक्षित आणि मानवी उपद्रवांपासून मुक्त असल्यामुळे प्रकल्पाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे तज्ज्ञांना वाटते.
उत्तर पश्चिम घाटात असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा(STR)ची स्थापना जानेवारी २०१० मध्ये झाली आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यांपर्यंत त्यांची हद्द पसरली. त्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो. शिकारी आणि बदलत्या अधिवासामुळे या प्रदेशात वाघांची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या कमी झाली आहे. एसटीआर राखीव अभयारण्य केल्यानंतरही वाघांची संख्या वाढली नाही, कारण प्रजनन करणाऱ्या वाघांनी राखीव भागात वसाहत केली नाही. एसटीआरच्या हद्दीत वाघांच्या उपस्थितीचे फोटो कमी आहेत आणि पद मार्गांच्या पुराव्याने सात ते आठ वाघांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाली आहे.
वाघांची लोकसंख्या वाढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एसटीआरच्या दक्षिणेकडे असलेल्या जंगलांमधून गोवा आणि कर्नाटकातील वाघांना इथे आणणे आहे. त्यामुळे वन्यजीव कॉरिडॉर मजबूत होऊ शकतो. परंतु वाघांच्या संख्येत वाढ होण्यास अनेक वर्षे लागू शकतात. परिणामी, अल्पकालीन परिणामांसाठी वाघांचे स्थलांतर निवडण्यात आले आहे.

Loading

कौल जनतेचा | रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मैदान कोण मारणार?

   Follow us on        

कौल जनतेचा

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मैदान कोण मारणार?

*नारायण राणे* की *विनायक राऊत*

आपला उमेदवार मागे ईथेही मागे पडता नये… खालील लिंक वर क्लिक करून आपले मत नोंदवा…

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search