Category Archives: कोकण

KR Updates | कोकणकन्या आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस सावंतवाडी पर्यंतच, अजून काही गाड्या रद्द, यादी ईथे वाचा

   Follow us on        

Konkan Railway Updates: दिनांक 10.07.2024 मडुरे – पेडणे विभागादरम्यानच्या पेडणे येथे बोगद्यामध्ये पाणी भरल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे ह्याआधी काही गाड्या रद्द केल्याचे तसेच काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यात अजून काही गाड्यांची भर पडली आहे.

कोकण रेल्वेने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार खालील गाड्या रद्द, शॉर्ट टर्मिनेटेड आणि अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत

गाडी क्र. 12449 मडगाव जं. – 10/07/2024 रोजी सुरू होणारा चंदीगड एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. 12620 मंगळुरु सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) 10/07/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. 12134 मंगळुरु जं. – 10/07/2024 रोजी सुरू होणारा मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. 50107 सावंतवाडी टर्मिनस – मडगाव जं. 10/07/2024 रोजी सुरू होणारा प्रवासी प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन आणि आंशिक रद्द केलेल्या गाड्या. 

दिनांक 09/07/2024 रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. 20111 मुंबई सीएसएमटी – मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी टर्मिनस येथे समाप्त करण्यात आला आहे

दिनांक 09/07/2024 रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. 12619 लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी टर्मिनस येथे समाप्त करण्यात आला आहे.

 

Loading

Konkan Railway Updates: कोकण रेल्वे मार्गावर अडकलेल्या गाडय़ा मागे फिरवून पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या

Konkan Railway Updates : आताच हाती आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील अडकलेल्या गाड्या मागे फिरवून पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

अधिक माहिती खालील प्रमाणे 

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. २२११३ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली एक्स्प्रेस सिंधुदुर्ग स्थानकावरून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे वळविण्यात आली आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. १२४३२ ह. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस राजापूर रोड येथून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे मागे वळवली आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. 19260 भावनगर – कोचुवेली एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकावरून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे मागे वळवली आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र.१२२२३ लोकमान्य टिळक (टी) – एर्नाकुलम एक्स्प्रेस चिपळूण येथून मागे फिरवून पनवेल-पुणे जंक्शन- सोलापूर जंक्शन मार्गे वळविण्यात आला आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. 20932 इंदूर जं. – कोचुवेली एक्स्प्रेसचा प्रवास सुरत – जळगाव – बडनेरा जं. – वर्धा जं. – बल्हारशाह – वारंगळ – विजयवाडा जं. – रेनिगुंटा जं. – काटपाडी जं. आणि कोईम्बतूर मार्गे वळविण्यात आला आहे.

Loading

Breaking: कोकण रेल्वे ठप्प; अनेक गाड्या रद्द तर लांब पल्ल्याच्या गाडय़ा पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या

   Follow us on         Kokan Railway Stopped :काल दिनांक 09/07/2024 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास कोकण रेल्वेच्या कारवार विभागातील मडूरे-पेडणे विभागादरम्यानच्या बोगद्यात पाण्याच्या फुटलेल्या मोठ्या पाझरामुळे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल जमा झाला होता. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतुक ठप्प झाली होती. रात्री 10 वाजून 13 मिनिटांनी कोकण रेल्वेने मोठ्या शर्थीने प्रयत्न करून हा बोगदा वाहतुकीसाठी योग्य केला आणि वाहतुक सुरू केली होती मात्र आज(10/07/2024) पहाटे 3 वाजताच्या सुमारास पुन्हा मोठा पाझर फुटला आणि बोगद्यात पुन्हा पाणी जमा झाले असल्याची माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.

अनेक गाड्या रद्द
या घटनेमुळे कोकण रेल्वेने या मार्गावरील अनेक गाड्या रद्द केल्या असून तर काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविल्या आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार खालील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्रमांक २२२२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. जनशताब्दी एक्स्प्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. मांडवी एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १२१३३ मुंबई सीएसएमटी – मंगळुरु एक्सप्रेसचा ०९/०७/२०२४ रोजी सुरु होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १०१०४ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेसचा – दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. ५०१०८ मडगाव जं. – सावंतवाडी दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवासी प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक २२१२० मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी – जनशताब्दी एक्स्प्रेसचा १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड -दिवा एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

खालील गाड्या पर्यायी मार्गाने चालविण्यात येणार आहेत.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र. १२६१८ एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. मंगला पनवेल – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव मार्गे चालविण्यात येणार आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्स्प्रेसचा प्रवास शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र. १६३३६ नागरकोइल – गांधीधाम एक्स्प्रेसचा शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १२२८३ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन शोरानूर जंक्शन मार्गे वळवली जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक १०/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र.गाडी क्र. २२६५५ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक १०/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र.गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसचा प्रवास तिरुअनंतपुरम सेंट्रल येथून 16:55 वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात आला आणि शोरानूर जंक्शन मार्गे वळवण्यात आला आहे – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

 

More Information Awaited…… 

Loading

पेडण्यात रुळांवर पाणी; कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत

Konkan Railway Stopped: तळकोकणात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे मालपे (पेडणे) येथील बोगद्यात रूळांवर पाणी साचल्याने कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे.

पाणी साचल्याने मार्ग पूर्ण झाला असून दक्षिणेकडून मुंबईच्या दिशेने येणार्‍या गाड्या गोवा राज्यातील स्थानकांवर तर दक्षिणेला जाणार्‍या गाड्या सिंधुदुर्गातील स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. गाड्यांची सद्यस्थिती पाहता (08:00 PM) गोव्याचा दिशेने जाणार्‍या गाड्यांपैकी तेजस एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा एक्सप्रेस अजुनहि सावंतवाडी स्थानकावर पोहोचल्या नाही आहेत. तर मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर आहे.

रेल्वेकडून प्रवाशांसाठी याबाबत अजूनही कोणती माहिती आली नसली तरी रेल्वे कर्मचारी त्या बोगद्याकडे पोहोचले असून लवकरच याबाबत सविस्तर माहिती जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.

Loading

सावंतवाडी टर्मिनसच्या प्रवेशद्वारावर स्थानकाच्या नावाचा चुकीचा फलक; प्रवासी संघटना आक्रमक

   Follow us on        
सिंधुदुर्ग: सावंतवाडी टर्मिनसच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र सुशोभीकरणात प्रवेशद्वारावर स्थानकाच्या नावाचा चुकीचा बोर्ड लावल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रवेशद्वारावर “सांवतवाडी टर्मिनस” असा बोर्ड न लावता “सावंतवाडी रोड” असा बोर्ड लावल्याने तळकोकणातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराबद्दल प्रवासी रेल्वे संघटना देखील सक्रिय झाल्या असून याबद्दल त्यांनी आपला निषेधही नोंदविला आहे. प्रशासनाने त्वरीत हा बोर्ड हटवून सावंतवाडी टर्मिनस असा बोर्ड लावावा अशी मागणी केली आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे भूमिपूजन 9 वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले होते. मात्र मा. सुरेश प्रभू यांचा केंद्रीय रेल्वेमंत्रिपदावरून पायउतार होताच हे काम रखडले ते आजतायगत पूर्ण झाले नाही. रेल्वे प्रवासी संघटनांनी या दरम्यान कित्येकदा आवाज उठवला, मात्र त्याच्या हाती पोकळ आश्वासनांशिवाय काहीच आले नाही. आता तर स्थानकाच्या नावातून “टर्मिनस” हा शब्द कायमचा हटवण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे सावंतवाडी टर्मिनस चे भूमिपूजन ज्या सरकारच्या कार्यकाळात झाले होते तेच सरकार आता सत्तेत असताना हा प्रकार होत असल्याने तळकोकणातील प्रवाशांच्या मनात सरकारविषयी आणि  लोकप्रतिनिधींविषयी चीड निर्माण होत आहे.
टर्मिनस समस्त कोकणकरांसाठी फायद्याचे
सावंतवाडी टर्मिनस होणे हे फक्त सावंतवाडी पंचक्रोशीतील प्रवाशांसाठीच नाही तर समस्त कोकण प्रवाशांसाठी फायद्याचे ठरणार आहे. कारण हे टर्मिनस झाले तर वसई/बोरिवली  – सावंतवाडी, पुणे – सावंतवाडी, कल्याण – सावंतवाडी या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या गाड्या सोडणे शक्य होणार आहे . त्याचबरोबर गणेश चतुर्थी, होळी या सारख्या सणांसाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्या दक्षिणेकडे न पाठवता सावंतवाडी पर्यंत मर्यादित करणे शक्य झाले असते. त्यामुळे सध्या गुरं ढोरांसारखा प्रवास करण्याऱ्या कोकणकरांचा प्रवास चांगल्या प्रमाणात सुखकर झाला असता.
   Follow us on        

Loading

Heavy rain in Mumbai: मुंबईतील मुसळधार पावसाचा कोकणरेल्वेच्या गाड्यांवर परिणाम

   Follow us on        
मुंबई: मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर झाला आहे. रुळांवर पाणी साचल्याने मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या ४ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहे. आज सकाळी सीएसएमटी वरून कोकणात जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकांवर झाला आहे.
सीएसएमटी वरून सुटणारी मांडवी एक्सप्रेस सुमारे ४ तास उशिराने सकाळी सोडण्यात आली आहे. तर जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या वेळेवर सुटल्या असल्या तरी सुमारे २ ते अडीच तास उशिराने धावत आहे.

Loading

अखेर रेल्वेला आपली चूक उमजली, सामान्य वर्गातील प्रवाशांसाठी घेतला मोठा निर्णय

   Follow us on        




Indian Railway News: भारतीय रेल्वे अपग्रेड करण्याच्या आणि उत्त्पन्न वाढविण्याच्या नादात प्रशासनाला सामान्य वर्गातील प्रवाशांचा विसर पडला होता. मात्र उशिरा का होईना सरकारला आपली चूक उमजली आहे. रेल्वे बोर्डाने पुढच्या दोन वर्षांत १० हजार नॉन एसी कोच निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे.
रेल्वे गाड्यांमधील वाढलेली प्रचंड गर्दी आणि जनरल कोचची कमी असलेली संख्या यामुळे सामान्य वर्गातील प्रवाशांची प्रचंड कुचंबना होत आहे. त्या संबंधाने मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. त्या लक्षात घेता  यातील ५३०० कोच जनरल राहणार आहेत, हे विशेष !गेल्या वर्षभरात सर्वच मार्गावर रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात रेल्वेकडून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गाड्यांमधील जनरल कोचची संख्या कमी केल्याने गरिब वर्गाच्या रेल्वे प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. एसीचे तिकिट काढून प्रवास करणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे ते जनरलच्या तिकिटा घेऊन गाडीत चढतात. जागा मिळेल तेथे बसून, उभे राहून प्रवास करतात. त्यामुळे अन्य प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे रेल्वे गाड्यात वाद होतात. त्याच्या तक्रारीही होतात अन् अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा केला जातो. हा सर्व प्रकार प्रवाशांसाठीच नव्हे तर रेल्वे अधिकाऱ्यांसाठीही मनस्तापाचा विषय ठरला आहे. तो लक्षात घेता रेल्वे बोर्डाने पुढच्या दोन वर्षांत १० हजार नवीन कोच निर्माण करण्याची योजना तयार केली आहे. त्यात ५३०० कोच जनरलचे राहणार आहेत. असा आहे कोच निर्मितीचा आराखडा२०२४ -२५ मध्ये अमृत भारत जनरल कोच सह एकूण २६०५ कोच, १४७० स्लीपर आणि नॉन एसी कोच, ३२३ एसएलआर कोच, ३२ पार्सल व्हॅन आणि ५५ पॅन्ट्री कार तयार करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे २०२५-२६ मध्ये अमृत भारत जनरल कोचसह २७१० कोचची निर्मिती केली जाणार असून, १९१० नॉन एसी स्लीपर, ५१४ एसएलआर कोच, उच्च क्षमतेच्या २०० पार्सल व्हॅन आणि ११० पॅन्ट्री कार निर्माण करण्याची योजना रेल्वेने बनविली आहे.




Loading

Konkan Railway | लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा राखून ठेवण्यासाठी वाढीव थांबे देण्यास रेल्वेचा नकार

कोकण रेल्वे सांतरण हॉल्ट ‘Staggering Halt’ या धोरणाचा अवलंब करत असून या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा राखून ठेवण्यासाठी या गाड्यांना स्थानकांवर आलटून पालटून काही मोजकेच थांबे देण्यात आले असल्याचे उत्तर एका निवेदनाला उत्तर देताना कोकण रेल्वेने सांगितले आहे. 
   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडी क्रमांक 01139/40 नागपूर मडगाव या विशेष द्विसाप्ताहिक गाडीला कोकण रेल्वे मार्गावर दिलेल्या थांब्याव्यतिरिक्त अन्य स्थानकांवर थांबे देण्यास असमर्थता दर्शविली आहे. ही गाडी कायमस्वरूपी करावी तसेच वाढीव थांबे मिळावेत अशी मागणी कोकण रेल्वेकडे आली होती. मात्र या गाडीची मुदतवाढ करणे, कायमस्वरूपी करणे किंवा थांबे देणे हे सर्व मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डच्या अधिकार कक्षेत येत असल्याचे सांगून कोकण रेल्वेने हात वर केले आहेत.
खान्देश, विदर्भ व कोकणाला जोडणाऱ्या या विशेष गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या गाडीला अतिरिक्‍त थांबे देवून ती कायमस्वरूपी करावी अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना, शेगांव यांनी देशाचे विद्यमान पंतप्रधान, केंदीय रेल्वे मंत्री, कोकण रेल्वे, रेल्वे बोर्ड तसेच संबधित लोकप्रतिनिधींना पोस्टल निवेदनातून केली होती. कोकण रेल्वे मार्गावरील वीर, आडवली, विलवडे, वैभववाडी रोड, नांदगाव, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी टर्मिनस येथे थांबेही देण्याची मागणी या निवेदनात केली होती. या निवेदनाचे उत्तर कोकण रेल्वेने दिले असून त्यात या गाडीची मुदतवाढ करणे, कायमस्वरूपी करणे किंवा थांबे देणे हे सर्व मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डच्या अधिकार कक्षेत येत असल्याचे सांगून कोकण रेल्वेने हात वर केले आहेत.
कोकण रेल्वे ‘Staggering Halt’ या धोरणाचा अवलंब करत असून या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा राखून ठेवण्यासाठी या गाड्यांना स्थानकांवर आलटून पालटून काही मोजकेच थांबे देण्यात आले आहेत. आपण विनंती केलेल्या स्थानकात गरजेप्रमाणे थांबे या आधीच देण्यात आले आहेत. तसेच गणेश चतुर्थी, होळी आणि इतर हंगामात चालविण्यात येणाऱ्या विशेष गाडयांना या स्थानकांवर थांबे देत येत असल्याचेही या उत्तरात कोकण रेल्वेने नमूद केले आहे.
सावंतवाडीचा थांबा अजूनही पूर्ववत नाही.
या गाडीला सावंतवाडी स्थानकावर पूर्वी थांबा होता. मात्र या गाडीला प्रवासीसंख्या Footfall जास्त असुनही या गाडीचा थांबा काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीने ही गाडी महत्वाची  मानली जात आहे. कारण विदर्भातील आणि खान्देशातील पर्यटक या गाडीने कोकणात उतरत आहे. सावंतवाडी तालुका येथील लाकडी खेळण्यांसाठी तसेच रेडी, आंबोली या सारख्या पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध मानला जात असताना या गाडीला सावंतवाडी स्थानकावर थांबा असणे गरजेचे आहे.

Loading

सावंतवाडी – वेंगुर्ल्यात मायनिंग प्रकल्प? ग्रामपंचायतीला आलेल्या ‘त्या’ पत्रामुळे खळबळ

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जेएसडब्लू कंपनीने तळकोकणातील आजगाव ग्रामपंचायतीला पत्र देऊन खनिज उत्खननाच्या सोमवारपासून गावातील ८४० हेक्टर भागात सोमवार पासून ड्रोन ने मायनींग विषयक सर्व्हे -तपासणी करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येथील स्थानिक ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आजगाव ग्रामपंचायत कडे गुरुवार दिनांक ४ जुलै २०२४ सायंकाळी सहा वाजता JSW (जिंदाल कंपनी )चे अधिकारी मायनींग संदर्भात पत्र घेऊन ग्रामपंचायत ऑफिस मध्ये आले होते. त्यांनी आपण सोमवार पासून सर्व्हे सुरू करीत आहोत याची माहिती ग्रामपंचायत ला कळवीत आहोत असे सांगितले. सदरील पत्रात ८४० हेक्टर एवढी आजगाव ब्लॉक मधील जमीन महाराष्ट्र सरकार कंपनी ला मायनींग साठी देणार आहे ,त्यासाठी खनिज साठा किती आहे याची तपासणी करण्याबाबत चे हे पत्र आहे. त्या पत्रात असे नमूद आहे की, मायनींग साठी ड्रोन ने सर्व्हे करायची परवानगी कंपनी ला महाराष्ट्र सरकार ने तसेच जिल्हाधिकारी (कलेक्टर )सिंधुदुर्ग यांनी दिली आहे .आणि ते सोमवार दिनांक ८ जुलै ते ३० जुलै या कालावधीत ड्रोन ने मायनींग विषयक सर्व्हे -तपासणी करणार आहेत. मात्र या सर्व्हे साठी ग्रामपंचायतीने परवानगी दिली नसल्याची माहिती आहे.

याआधीही येथे मायनींग विषयक चाचणी करण्याचे प्रयत्न झाले होते मात्र येथील स्थानिक ग्रामस्थांकडून त्याला विरोध केला गेला होता. मायनिंग मुळे या क्षेत्रातील जमिनीचे तसेच परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कारण संभाव्य खनिज क्षेत्रामध्ये ड्रिलिंग होणार असून भविष्यात याचे परिणाम धोकादायक असल्याचं सांगत ग्रामस्थांकडून विरोध केला जात आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता जर संबंधित खनिज प्रकल्पाला मान्यता दिल्यास तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. तसेच कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास करणारा प्रकल्प होऊ देणार नाही. परिणामी आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला त्यावेळी होता. आता पुन्हा मायनिंगसाठी प्रयत्न चालू झाल्याने येथील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

 

 

 

Loading

गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी: एसटी महामंडळाने एसटी आरक्षणाबाबत घेतला मोठा निर्णय.

   Follow us on        

मुंबई:कोकणातील सर्वात मोठा सण म्हणुन ओळखला जाणारा गणेशचतुर्थी सण अवघ्या दोन महिन्यांवर आला. यंदा गणेश भक्तांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण लवकरच सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्यतः एसटीचे आरक्षण एक महिना अगोदर सुरू होते, मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा एसटी गाड्यांचे आरक्षण 60 दिवसआधी खुले करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

अॅप किंवा वेबसाईटवरुनही करता येईल बुकींग
कोकणातील अनेक चाकरमानी हे गावी जाण्यासाठी गणेशोत्सवासाठी वाड्या-वाड्यांचे एकत्रित आरक्षण करतात. त्याच पार्श्वभूमीवर आता प्रवाशांना वैयक्तिक आरक्षणासह समूह आरक्षणही एकाच दिवशी करता येणार आहे. महामंडळाच्या आरक्षण केंद्रासह मोबाईल अॅप आणि महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवाशांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
कोकणासह राज्यातील सर्व विभागांमध्ये गणेशोत्सव काळासाठी नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण गुरुवारपासून खुले होणार आहे. सध्या धावणाऱ्या नियमित गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुटतील. त्यासोबतच मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर या ठिकाणाहून २ आणि ३ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यासोबतच गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search