Category Archives: कोकण

उदय सामंत व किरण सामंत यांचा राणेंना पाठिंबा.. मात्र शिवसैनिक नाराज, राजीनामा सत्र चालू

रत्नागिरी, दि.१९ एप्रिल: नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली असल्याने शिंदे गटातील काही कार्यकर्ते यामुळे नाराज आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणे (Narayan Rane) यांना आपला पाठिंबा जाहीर केला असूनही पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
इतकंच नाही तर रत्नागिरी पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामा सत्र ही चालू केले आहे.  युवा सेनेच्या तीन जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. याची देखील राजकारणात चर्चा होऊ लागली आहे.त्यामुळे सामंत बंधू आपल्या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतात, हे पाहावं लागेल.

Loading

येथे येतो मालदीवचा फील; कोकणातील पांढऱ्या वाळूच्या समुद्र किनाऱ्याला तुम्ही भेट दिलीत का?

Konkan Tourism: मालदीव, थायलंड सारखे देश तेथील पांढऱ्या आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यासांठी प्रसिद्ध आहेत. मात्र आपल्या बजेट मध्ये तोच फील आपल्याच देशात मिळवता येईल अशीही बीचेस आपल्या कोकणात आहेत. त्यात अजूनही कित्येक पर्यटकांच्या बकेट लिस्ट मध्ये नसलेले कुडाळ मधील निवती  बीचचा समावेश होतो.
या समुद्रकिनाऱ्यावर बसून निसर्गाचा हा अद्भुत सोहळा अनुभताना रोजचे ताण तणाव कुठल्याकुठे विरघळून जातात.  किनाऱ्यावरची नारळी-पोफळी आणि सुपारीची झाडं दौलत मिरवत उभी आहेत.  सूर्योदय आणि सूर्यास्त असे सृष्टीतले दोन्ही उत्कट सोहळे अनुभवण्याची उत्तम ठिकाणं म्हणजे निवती समुद्र किनारा. येथे पांढरी रेती आहे. सुमद्राचा तळही दिसेल, इतकं स्वच्छ आणि निळंशार पाणी असा हा समुद्र किनारा आहे. स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आणि खाडीच्या अनोख्या संगमातून तयार झालेलं अद्भूत सौंदर्य म्हणजे निवती समुद्र किनारा.
कसे पोहोचायचे:
निवती हे राज्याच्या इतर भागांशी चांगले जोडलेले आहे आणि राष्ट्रीय महामार्गापासून (NH 66) फक्त 20 किमी अंतरावर आहे. कुडाळ येथे राष्ट्रीय महामार्ग 66 वरून उतरणे आवश्यक आहे जिथून निवती अंदाजे 20 किमी आहे. मालवण आणि वेंगुर्ला यांना जोडणाऱ्या रस्त्यानेही मालवणहून निवतीला जाता येते.
कोल्हापूर ते निवती हा सर्वोत्तम मार्ग
कोल्हापूर-गगनबावडा-कणकवली-कुडाळ-निवती
पुणे ते निवती हा सर्वोत्तम मार्ग
पुणे – सातारा – उंब्रज (साताऱ्यापासून 35 किमी) – चिपळूण – कणकवली – कुडाळ – निवती
मुंबई ते निवती हा सर्वोत्तम मार्ग
मुंबई-पनवेल-पेण-खेड-चिपळूण-कणकवले-कुडाळ-निवती
Enter map content here..

Loading

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! सीएसएमटी स्थानकावर ३ दिवस मेगाब्लॉक; कोकणरेल्वेच्या दोन एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम

Megablock on Central Railway :छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील फलाटाच्या विस्तारासाठी मध्य रेल्वे कडून १९,२० आणि २१ च्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक मुळे काही  एक्सप्रेस च्या सेवा दादर स्थानकापर्यंत स्थगित करण्यात येणार आहेत.तसेच या ब्लॉक दरम्यान मध्यरात्री १२:३० ते पहाटे ४:३० वेळेत सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील वाहतूक बंद असेल. सीएसएमटी येथून कासाराकडे जाणारी रात्री १२:१४ वाजताची लोकल शेवटची असेल.
एक्सप्रेस गाड्या दादरपर्यतच
या ब्लॉक मुळे काही गाड्यांची सेवा दादर स्थानापर्यंतच स्थगित करण्यात आली आहे. या गाड्यांत १२०५२ मडगाव सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस आणि २२१२० मडगाव सीएसएमटी  तेजस एक्सप्रेसचा समावेश आहे. या गाड्या दिनांक  १९,२० आणि २१ एप्रिल रोजी दादरपर्यंच चालविण्यात येणार आहेत.

Loading

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वृक्षतोड; वनप्रेमींकडून चौकशीची मागणी

   Follow us on        

संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीकच्या माभळे येथील शासकीय विश्रामगृहाजवळ वृक्षतोड सुरू आहे. याची वनविभागाने चौकशी करावी, अशी मागणी येथील वनप्रेमींनी केली आहे.

महामार्गावरील माभळे येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वनविभागाकडे पर्यावरणप्रेमींनी तक्रार केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट दिली तसेच ती झाडे जप्तही केली होती. त्यानंतर पुन्हा झाडे तोडण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येथील वनप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ही अवैध असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Loading

Kokanai Exclusive | कोकण रेल्वेचा ईथेही ‘लेटमार्क’

   Follow us on        
Kokan Railway News :सध्या कोकण रेल्वेमार्गावर काही गाड्या नेहमीच उशिराने धावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सिंगल ट्रॅक आणि देखभालीच्या कामांसाठी हा लेटमार्क लागत असल्याची उत्तरे अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. मात्र अजून एका गोष्टीत कोकण रेल्वे नेहेमीच ‘लेट’ होताना दिसते. कोकण रेल्वे आपल्या मार्गावर चालविण्यात येणार्‍या विशेष गाड्यांची माहिती खूपच उशिराने प्रसिध्द करत आहे.

भारतीय रेल्वे माहिती किंवा सुचना प्रसिद्धसाठी सोशल मीडिया चा मोठ्या प्रमाणात वापर करते. त्यात फेसबुक, ट्विटर ही माध्यमे वापरली जातात. त्याचबरोबर रेल्वेचा प्रत्येक विभाग स्वतःचे अधिकृत संकेतस्थळ याकरिता वापरते. या माध्यमातून रेल्वे संबधित माहिती उदा. मेगाब्लॉक, विशेष गाड्यांची घोषणा आणि ईतर माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवते. कोकण रेल्वे सुध्दा या माध्यमातून ही माहिती आपल्या प्रवाशांना देते. मात्र कोकणरेल्वे वर विशेष गाड्यां संबधित होणार्‍या घोषणा उशिराने होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. कोकण रेल्वे माहिती प्रसिद्ध करेपर्यंत विशेष गाड्यांचे आरक्षणही चालू होऊन फुल्ल झालेले असते.

अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर काल कोकण रेल्वेने आपल्या संकेतस्थळावर आणि समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या वास्को द गामा – मुझफ्फरपूर 07309/07310 विशेष गाडीच्या प्रसिद्धी पत्रकाचे (Press Note) चे देता येईल. या विशेष गाडीच्या फेर्‍या दिनांक 17 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने या गाडीचे प्रसिद्धीपत्रक अगदी एक दिवस आधी म्हणजे 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध केले आहे. तोपर्यंत या गाडीचे आरक्षण फुल होऊन प्रतीक्षायादी खूपच वर पर्यंत जावून पोचली आहे. कोकणच्या प्रवाशांना या गाडीची कल्पना नसल्याने या गाडीचा फायदा उत्तरप्रदेश तसेच पाश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना झाला आहे.

ही गोष्ट पहिल्यांदाच झाले असे नाही. असे प्रकार वारंवार घडत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. पाश्चिम आणि मध्य रेल्वे ज्या विशेष गाड्या चालवते त्या गाड्यांची माहिती कोकण रेल्वे योग्य वेळेत आपल्या प्रवाशांपर्यत का पोहोचवत नाही असा प्रश्न विचारला जात आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाला या गाड्यांची कल्पना नसते असे होऊच शकत नाही. कारण कोणतीही विशेष गाडी चालविण्यासाठी त्या योजनेत संबधित विभागाला सामील करून घेऊनच विशेष गाडी सोडण्यात येते. तर मग यामागचे कारण काय? प्रवाशांच्या सेवेपेक्षा आर्थिक फायदा बघून रेल्वे असे जाणूनबुजून तर करत नाही ना? अशी शंका प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे.

अर्धवट माहिती का? 

कित्येकदा रेल्वे प्रशासन विशेष गाड्यांची घोषणा तर करते मात्र आरक्षणाची तारीख जाहीर करत नाही. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होतो. विशेष गाड्यांची माहिती प्रसिद्ध करताना त्यासोबत आरक्षणाची तारीख ही जाहीर करण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे.

 

Loading

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगामात धावणार वास्को द गामा – मुझफ्फरपूर विशेष गाडी

Konkan Railway News: कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. २०२४ च्या उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी अजून एक विशेष साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
ट्रेन क्र. 07309 / 07310  वास्को दा गामा – मुझफ्फरपूर जं. – वास्को द गामा विशेष (साप्ताहिक):
गाडी क्र. 07309 वास्को द गामा – मुझफ्फरपूर जं. विशेष (साप्ताहिक) वास्को द गामा येथून 17/04/2024 ते 08/05/2024 पर्यंत दर बुधवारी संध्याकाळी 16:00 वाजता सुटेल ती  मुझफ्फरपूर जंक्शनला तिसऱ्या दिवशी सकाळी 09:45 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 07310 मुझफ्फरपूर जं. – वास्को द गामा स्पेशल (साप्ताहिक) मुझफ्फरपूर जंक्शन येथून 20/04/2024 ते 11/05/2024 पर्यंत दर शनिवारी दुपारी 13:00 वाजता निघेल ती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 06:30 वाजता वास्को द गामाला पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छोकी, पं. . दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल.
रचना : एकूण 20 एलएचबी कोच = 2 टायर एसी – 01 कोच, 3 टायर एसी – 01 कोच, 3 टायर एसी इकॉनॉमी – 02 कोच, स्लीपर – 10 डबे, जनरल – 04 कोच, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.
वरील गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

Loading

‘चाकरमानी’ निघालेत गावाला; चैन पडेना ‘राजकारण्यांना’

   Follow us on        

मुंबई दि.१५ एप्रिल :लोकसभा निवडणूक ऐन उन्हाळी सुट्टीत आली़ असल्याने मुंबई पुण्यातील राजकारण्यांची चिंता वाढली आहे. मुंबई पुण्यातून लाखो चाकरमानी निवडणुकीच्या काळात गावी जाणार असल्यामुळे नेते, कार्यकर्ते यांची धास्ती  वाढली आहे.

आतापासूनच पुढे मे अखेरपर्यंत मेल-एक्स्प्रेस आणि खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेच्या अतिरिक्त गाड्याही फुल्ल झाल्या आहेत.

मुंबईत दिनांक 20 मे रोजी मतदान आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली बदलापुर तसेच वसई विरार येथे मोठया प्रमाणात कोकणातील चाकरमानी वास्तव्यास आहे. कोकणातील आंबे फणस चाखण्यासाठी तसेच उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. यंदा लोकसभा निवडणुक असल्याने चाकरमानी गावी जाणार नाहीत आणि येथेच राहून आपले कर्तव्य पार पाडणार असे वाटत होते. रेल्वे, एसटी खाजगी वाहनांच्या आरक्षणाची स्थिती पाहता यंदाही मोठ्या प्रमाणात चाकरमानी उन्हाळी सुट्टीत गावीच जाणार असल्याचे दिसत आहे.  20 मेपर्यंत तरी चाकरमानी परततील की नाही या या विचाराने राजकारण्यांना चैन पडेनाशी झाली आहे.

कोकणात जाणाऱ्या खासगी बसगाड्यांचा प्रवाशाचा ओघ पाहता १,२०० रुपयाच्या तिकीटदरात ३०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ मे या महिनाभराच्या काळात किमान ५ लाखांहून अधिक चाकरमानी गावाकडे जाणार असल्याचा अंदाज वाहतूक एजन्सीकडून व्यक्त करण्यात आला आहे यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार हे निश्चित आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत ४० आणि ४५ टक्क्यांवर अडकलेली लोकसभा मतदानाची टक्केवारी यंदाही तशीच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

 

Loading

देहदान: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवयव दानासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

   Follow us on        

सिंधुदुर्ग, १५ एप्रिल :देहदान व अवयवदान यातील मूलभूत फरक समजून घेणं गरजेचं आहे. देहदान नैसर्गिक मृत्यू नंतर करता येते. त्यासाठी मृत्य व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांची इच्छा असल्यास संपूर्ण देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शरिरशास्त्र विभागाच्या ताब्यात स्वतः नातेवाईक यांनी दान करावा लागतो. त्यापुर्वी दोन्ही डोळ्यांचे नेत्रपटल म्हणजे डोळ्यावरची पारदर्शक काच व त्वचा दान करता येते. पण त्या साठी प्रशिक्षित तज्ञांची टीम घरी किंवा दवाखान्यात नेऊन नेत्र व त्वचादान स्विकारतात पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सध्या तरी नेत्र व त्वचापेढी नसल्याचे आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती यांना नेत्र व त्वचादाना साठी कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठावे लागले . पण वेळेअभावी या गोष्टी अशक्य आहेत. नेत्र व त्वचा शिवाय हाडं, अस्तिमज्जा, हृदयाची झडपा, मज्जा पेशी, रक्तवाहिन्या इतकेच नाही तर शरिराचे हात, पाय व डोक्यावरील केस पण दान करुन सुमारे पन्नास रुग्णांना एक मृत व्यक्ती व्याधी मुक्त करू शकतो.

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान स्विकारण्याची सोय करण्यात आलेली असून मृत व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांची ईच्छा असल्यास व्यक्तीच्या मृत्यूनंतर देह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शरिरशास्त्र विभागात स्विकारण्याची सोय केलेली आहे अशी माहिती जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य अवयव व देहदान महासंघचे सक्रिय कार्यकर्ते डॉ. संजीव लिंगवत यांनी कळविले आहे.

अलीकडेच त्यांनी सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज जोशी व शरिरशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. प्राजक्ता थेटे यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा केली. मृत्यू समयी एडस्,कोरोना, कर्करोग सारखा महाभयंकर रोग असल्यास किंवा मृत्यू आत्महत्या, विषप्राशन, गळफास घेऊन झाल्यास अश्या व्यक्तींना देहदान, नेत्रदान, त्वचा दान करता येतं नाही. ईश्वराने शरिराचा कोणताही भाग टाकाऊ बनविला नाही, फक्त आपल्या अज्ञानामुळे आपण शरिर जाळुन टाकतो किंवा मातीत मिसळतो, भारतीय समाज सामाजिक, धार्मिक अंधश्रद्धांच्या परंपरागत गैरसमजुतीं मध्ये अडकुन बसलेला असुन काळानुसार यात बदल घडवून आणणे आवश्यक आहे. कालानुरूप सती जाणं , स्त्री शिक्षण, बालविवाह सारख्या बाबतीत बदल झाले असून देहदान बाबतीत सुद्धा हे बदल हळूहळू होतील अशी आशाही डॉ. संजीव लिंगवत यांनी व्यक्त केली.

 

Loading

Voice Of Konkan | ‘या’ १५ एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा का नाही?

   Follow us on        
सिंधुदुर्ग: कोकण रेल्वेच्या स्थापनेवेळी रेल्वे सेवा फक्त सावंतवाडी पर्यंत देण्यात येणार होती. परंतु नंतर ती ठोकूर पर्यंत नेवून दक्षिण रेल्वेला नेवून पोहोचवली.  त्यामुळे केरळ तामिळनाडू आणि कर्नाटक कारवार पासून पुढचा  आठ तासाचा प्रवासाचा वेळ वाचला. दक्षिणेकडील राज्यांपेक्षा महाराष्ट्राने कोकण रेल्वेच्या स्थापनेत मोठा वाटा उचलला होता. कित्येक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी यासाठी दिल्यात. मात्र ही वस्तुस्तिथी असताना महाराष्ट्र राज्यातील जनतेला किती लाभ मिळाला याबाबत नेहमीच प्रश्न उठवले जात आहेत. त्याची कारणेही आहेत.
उदाहरण द्यायचे झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हयाचे देता येईल. राज्यातील पहिला आणि एकमेव पर्यटन जिल्हा जाहीर झालेल्या या जिल्ह्यातून एक दोन नाही  तर तब्बल १५ गाड्या (दोन्ही बाजूने विचार केल्यास एकूण ३० गाड्या) येथे थांबत नाहीत. वेळोवेळी मागणी करूनही येथे थांबे देण्यात येत नाहीत. मुंबई ते सिंधुदुर्ग अंतर ४५०/५०० किलोमीटर आहे. येथे सुपरफास्ट गाडयांना थांबे देणे गरजेचे असूनही वारंवार या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा नसणाऱ्या गाड्या
१) १२२०१/०२ – कोचुवेली लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
२) १२४३१ /१२४३२ त्रिवंद्रम राजधानी एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
३) १२२२४/२३ एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
४) १२२८३/८४  – हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
५) १२४४९/५०  गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
६) १२२१७/१८ – केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
७) १२९७७/७८  – मारुसागर सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – वीर
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
८) १९५७७/७८ जामनगर तिरुनेलवेली एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
९) १२४८३/८४ अमृतसर कोचुवेली साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – चिपळूण, रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१०) २२६५९/६० ऋषिकेश कोचुवली सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
११ २२४७५/७६ कोईमतूर हिसार एसी सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- चिपळूण, रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१२) २०९२३/२४  गांधीधाम तिरुनवेली हमसफर एक्स्प्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१३) २०९०९/१० कोचुवेली पोरबंदर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१४) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१५) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम  सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
 सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर 
संस्थापक सदस्य, कोकण रेल्वे

Loading

ब्रेकिंग: किरण सामंत उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला नागपूरला रवाना 

   Follow us on        
रत्नागिरी, दि. १४ एप्रिल :रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत नागपूरला रवाना झाले आहेत. नागपूरला ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची  भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मंतरसंघाच्या आगामी निवडणुकीच्या उमेदवाराचा तिढा अजून सुटला नाही आहे. मात्र भाजप तर्फे नारायण राणे यांनी आपल्या नावाने प्रचार करण्यास सुरवात केलेली आहे. एवढेच  नव्हे तर त्यांनी चार उमेदवारी अर्ज खरेदी केले असल्याचीही चर्चा होत आहे. याच पार्श्ववभूमीवर किरण सामंत हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला निघाले आहेत.
भाजप या मतदारसंघावर आपला दावा सोडायला तयार दिसत नाही आहे. तर शिवसेना शिंदे गट सुद्धा पण येथे आपला दावा सांगत आहि. तिसरी शक्यता अशीही वर्तविण्यात येत आहे कि किरण सामंत यांना कदाचित   भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी  सांगितले जाऊ शकते. काहीही असो महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या विनायक राऊत यांना होत आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search