Category Archives: कोकण
सिंधुदुर्ग: १४४ वर्षातून येणारी पर्वणी म्हणजेच महाकुंभ मेळ्यासाठी कोकणातून सावंतवाडी येथून प्रयागराज साठी विशेष ट्रेन चालवण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने कोकण रेल्वेकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यां रेल्वेच्या सर्व संबंधितांकडे यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी दिली आहे.
१४४ वर्षांत एकदा साजरा होणारा हा महोत्सव लाखो भाविकांसाठी जीवनातील एक अद्वितीय आणि धार्मिक अनुभव ठरेल. त्यामुळे कोकणातील अनेक भक्त प्रयागराजला प्रवास करण्यासाठी इच्छुक आहेत.महा कुंभमेळ्यासाठी सावंतवाडी ते प्रयागराजदरम्यान काही विशेष गाड्यांची व्यवस्था करावी, कोकण रेल्वे मार्गावरील सर्व तालुक्यांतील नागरिकांना लाभ व्हावा, यासाठी या गाड्यांना सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पेण व पनवेल स्थानकांवर थांबे देऊन पुढे प्रयागराजला रवाना करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
हिंदू धर्मात महाकुंभाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातून सनातन धर्माच्या परंपरेचे सखोल प्रतिबिंब उमटते. दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला पूर्णकुंभ म्हणतात. बाराव्या पूर्णकुंभमेळ्यानंतर महाकुंभमेळा होतो. तब्बल १४४ वर्षांनंतर यंदा महाकुंभ होत आहे. महाकुंभमेळ्यात शाही स्नानाची व्यवस्थाही आहे. कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी काही तारखा निश्चित केल्या जातात. यंदा महाकुंभात एकूण ६ शाही स्नान होणार असून त्यापैकी २ स्नान पूर्ण झाले आहेत.
महाकुंभ शाही स्नानाच्या तारखा
१. पौष पौर्णिमा: १३-०१-२०२५/सोमवार
२. मकर संक्रांत : १४-०१-२०२५/मंगळवार
३. मौनी अमावस्या (सोमवती): २९-०१-२०२५/बुधवार
४. वसंत पंचमी: ०३-०२-२०२५/सोमवार
५. माघी पौर्णिमा: १२-०२-२०२५/बुधवार
६. महाशिवरात्री: २६-०२-२०२५/बुधवार
महाकुंभमेळा कधी संपणार?
महाकुंभमेळ्याचा समारोप महाशिवरात्रीला होणार आहे. यावर्षी २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. महाकुंभाचे शेवटचे शाही स्नानही याच दिवशी केले जाणार आहे.
Konkan Railway: गणेश चतुर्थी नंतर कोकणातला मोठा सण म्हणजे शिमगोत्सव म्हणजेच होळी. अगदी तळकोकणापासून पालघर ठाणे पर्यंत ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. गणेश चतुर्थी प्रमाणेच हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातो. चाकरमान्यांचा मोठा वर्ग गावी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देतो.
यावर्षी होलिकाउत्सव मार्च १३ रोजी पासून सुरू होत आहे. मात्र या तारखे दरम्यानच्या जवळ जवळ सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने ज्या चाकरमान्यांना आरक्षण भेटले नाही त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. होळी आणि धूलिवंदन दिवशीच्या आणि आदल्या दिवशीच्या (१२,१३, १४ मार्च) तुतारी, कोकणकन्या, मांडवी, वंदे भारत, जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा – सावंतवाडी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेसची आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ दाखवत आहे.
नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांना अतिरिक्त गाड्यांची घोषणा होण्याची वाट पहावी लागणार आहे. अजूनपर्यंत रेल्वे प्रशासनाने कोणत्याही अतिरिक्त गाडीची घोषणा केली नाही आहे. मात्र या सणादरम्यान गाड्यांची आरक्षण स्थिती पाहता रेल्वे प्रशासनाला या मार्गावर जास्त गाड्या सोडाव्या लागणार आहेत.
सेवा सहयोग फाउंडेशनचा उपक्रम
Follow us onचिपळूण:- SS &C – Globe Op या कंपनीच्या माध्यमातून व सेवा सहयोग फाउंडेशन या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा टेरव क्रमांक १ या शाळेतील इयत्ता १ली ते ७ वीच्या १५१ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोटबुक व इतर शैक्षणिक साहित्याचे रविवार दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी दहा वाजता वितरण करण्यात आले.
तसेच श्री रुपेश श्याम कदम फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने वरील शाळेतील तसेच सुमन विद्यालय टेरव या शाळेतील मिळून २५८ विद्यार्थ्यां खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास मा.श्री. सुधाकर कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.रश्मी काणेकर, उपाध्यक्षा सौ. दिक्षिता मोहिते, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ.मानवी मेंगे, सौ.मानसी दाभोळकर, सौ. रूचीता हेमंत तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री.महेंद्र खांबे, टेरव वेतकोंड पोलीस पाटील सौ.वृषाली लाखण, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक मोने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. टेरव सारख्या ग्रामीण भागात SS &C – Globe Op या कंपनीच्या माध्यमातून सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल आभार व ऋण व्यक्त करण्यात आले.
सिंधुदुर्ग : पुण्याहून सिंधुदुर्गातील चीपीसाठी निघालेले विमान सिंधुदुर्ग जिल्हय़ात न उतरवता ते चक्क गोव्याच्या दिशेने नेवून मोपा विमानतळावर उतरविण्यात आले. खराब हवामानामुळे धावपट्टीवर धुके असल्याच्या कारणाने निर्णय घेण्यात आला. या कारणाने आज प्रवास करणार्या ४५ प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
फ्लाय ९१ चे विमान पुणेहून सिंधुदुर्ग साठी ४५ प्रवाशांना घेऊन निघाले. मात्र शनिवारी सकाळी चीपी विमानतळावर धुके असल्याने हे विमान गोवा मोपा विमानतळावर उतरण्यात आले व तिकडून प्रवाशांना कारने मोफत सिंधुदुर्गात आणण्यात आले. हवामान खराब असल्याचा अंदाज आल्याने हे विमान गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. या दरम्यान चिपी ते पुणे प्रवास करण्यासाठी प्रवासी चिपी विमानतळावर दाखल झाले होते. मात्र विमान न आल्याने प्रवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
सिंधुदुर्गात येणारे विमान आज शनिवारी पुन्हा एकदा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आले .या विमानतळावर दिवसा येणारी विमाने खराब हवामानामुळे वारंवार रद्द करण्याची नामुष्की येत आहे याकरिता या विमानतळावर नाईट लँडिंग ची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी प्रवाशांकडून होत आहे.
- गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्स्प्रेस ही गाडी दिनांक २६ जानेवारीपासून (वेळ ०३.०० – ०३.०२)
- गाडी क्रमांक. १११०० मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २५ जानेवारीपासून ( वेळ २०.३० -२०.३२)
- गाडी क्रमांक. २२६२९ दादर तिरुनेलवेली एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून ( वेळ २३.१५ – २३.१७)
- गाडी क्रमांक. २२६३० तिरुनेलवेली – दादर एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून ( वेळ १२.१० – १२.१२)
- गाडी क्रमांक.१२२१७ कोचुवेली-चंदिगड एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून ( वेळ ०९.१५ – ०९.१७ )
- गाडी क्रमांक. १२२१८ चंदिगड कोचुवेली एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून ( वेळ ०९.२० – ०९.२२)
- गाडी क्रमांक. २०९३१ कोचुवेली – इंदूर एक्स्प्रेस २५ जानेवारीपासून ( वेळ १२.१० – १२.१२)
- गाडी क्रमांक. २०९३२ इंदूर – कोचुवेली एक्स्प्रेस एक्स्प्रेस २९ जानेवारीपासून ( वेळ १२.४५ – १२.४५ )
- गाडी क्रमांक. २२४७५ हिसार -कोइम्बतूर एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून ( वेळ १६.५० – १६.५२ )
- गाडी क्रमांक. २२४७६ कोइम्बतूर-हिसार एक्सप्रेस २६जानेवारीपासून ( वेळ १२.१० – १२.१२)
Konkan Railway: उद्या दिनांक २४/०१/२०२५ (शुक्रवार) रोजी चिपळूण स्थानकावर तिसर्या पॅसेंजर लूप लाईन च्या कामासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ब्लॉकचे रेल्वे सेवांवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
दिनांक २४/०१/२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजर ही गाडी रत्नागिरी स्थानकावरून पुनर्नियोजित वेळेनुसार ०१:२५ तास उशिराने म्हणजे सकाळी ७.०० वाजता रत्नागिरीहून निघणार आहे.
दिनांक २३/०१/२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. १२२०२ कोचुवेली – लोकमान्य टिळक रत्नागिरी – चिपळूण विभागादरम्यान मर्यादित वेगाने म्हणजेच उशिराने चालविण्यात येणार आहे.
पनवेल: कोकण रेल्वे मार्गावर नवीन अमरावती ते कोकण रेल्वेच्या वीर स्थानका दरम्यान एक विशेष अनारक्षित गाडी चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण दोन फेऱ्या होणार आहेत.
०११०१ नवीन अमरावती – वीर अनारक्षित विशेष गाडी गुरुवार दि. ६ फेब्रुवारी, २०२५ दुपारी १५:३० ला नवीन अमरावती येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:४५ ला वीर येथे पोहोचेल.
०११०२ वीर – नवीन अमरावती अनारक्षित विशेष गाडी मंगळवार दि. ११ फेब्रुवारी, २०२५ रात्री २२:०० ला वीर येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२:३० ला नवी अमरावती येथे पोहोचेल.
या गाडीला बडनेरा, मुर्तुजापूर,अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल आणि रोहा येथे थांबे देण्यात आले आहेत.
ही गाडी पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाची असून तिला १६ अनारक्षित डबे आणि २ एसएलआर डबे जोडण्यात येणार आहेत.
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील टेरव गावातील दत्तवाडीचे सुपुत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश सुरेशराव कदम, विलेपार्ले पोलीस ठाणे, मुंबई यांनी अथक परिश्रम, कौशल्य, सातत्य व चिकाटीने सिने अभिनेते सैफ अली खान यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या बांगला देशी नागरिकत्व असलेल्या आरोपीला अटक करणाऱ्या पथकामध्ये सहभागी होऊन ३५० सरकारी व खाजगी सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करून, तांत्रिक कौशल्याचा वापर व दिवस रात्र तपास करून आरोपीस शिताफीने अटक केले.
सदर उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्माननीय सत्यनारायण चौधरी पोलिस सह. आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) बृहन्मुंबई यांनी प्रशंसापत्र देवून महेश कदम यांचं गौरव केला आहे. तसेच जय भवानी ग्रामोन्नती मंडळ मुंबई, सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत टेरव, मंदिर व्यवस्थापन समिती टेरव, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट मुंबई, दसपटी क्रीडा मंडळ मुंबई, रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट मजरे दादर, समस्त ग्रामस्थ टेरव यांनी व इतर अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कुलस्वामीनी श्री भवानी व ग्रामदैवत श्री वाघजाई मातेच्या कृपाशीर्वादाने उत्तरोत्तर महेशराव यांची अशीच प्रगती होत राहो अशी सदीच्छा टेरव ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.











