Category Archives: कोकण

गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘शिवसेना एक्सप्रेस’

   Follow us on        

मुंबई, दि. २९: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेच्या वतीने एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘शिवसेना एक्सप्रेस’ नावाने मोफत विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येत असून, या सेवेमुळे अनेक चाकरमान्यांना वेळेवर आणि विनाखर्च आपल्या गावी गणपती साजरा करण्याची संधी मिळणार आहे.

ही विशेष रेल्वे २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकातून कुडाळकडे रवाना होणार आहे. मात्र ही मोफत सेवा फक्त पूर्वनियोजित बुकिंग केलेल्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असणार आहे. बुकिंगसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क साधता येईल.

 

या उपक्रमाचे आयोजन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९६६५८९६९६६ किंवा ९६६५२७०२३१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर अजून काही गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: गणेशोत्सव २०२५ दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता लक्षात घेता, प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाला अधिक सुलभ व आरामदायक करण्यासाठी कोकण रेल्वेने अजून काही अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या विशेषतः गणेशभक्त, सुट्टीसाठी कोकणात जाणारे प्रवासी आणि गावाकडची वाट धरू इच्छिणाऱ्यांसाठी नियोजित करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि त्यांना सुट्टीचा आनंद अधिक निर्बंधांशिवाय घेता येईल.

या विशेष गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग व थांबे यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१) क्रमांक ०११३१ / ०११३२ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (आठवड्यातून दोनदा): 

गाडी क्रमांक ०११३१ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष (आठवड्यातून दोनदा) २८/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०४/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी सकाळी ८:४५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी २२:२० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३२ सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (द्वि-साप्ताहिक) सावंतवाडी रोडवरून २८/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०४/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी २३:२० वाजता सुटेल. ही गाडी लोकमान्य टिळक (टी) येथे दुसऱ्या दिवशी १२:३० वाजता पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबेल.

रचना : एकूण २२ कोच = ३ टायर एसी – ०२ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरल – ०६ कोच, एसएलआर – ०२.

२) ट्रेन क्रमांक ०११३३ / ०११३४ दिवा जंक्शन – खेड – दिवा जंक्शन मेमू स्पेशल (दैनिक): 

गाडी क्रमांक ०११३३ दिवा जंक्शन – खेड मेमू स्पेशल (दैनिक) २२/०८/२०२५ ते ०८/०९/२०२५ पर्यंत दररोज दिवा जंक्शन येथून दुपारी १:४० वाजता सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी रात्री २०:०० वाजता खेड येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३४ खेड – दिवा जंक्शन मेमू स्पेशल (दैनिक) २३/०८/२०२५ ते ०९/०९/२०२५ पर्यंत दररोज सकाळी ८:०० वाजता खेड येथून निघेल. ही ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:०० वाजता दिवा जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी निलजे, तळोजा पंचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे,दिवाणखवती,कळंबणी बुद्रुक,येथे थांबेल.

रचना : एकूण 08 मेमू कोच.

३) गाडी क्रमांक ०१००४ / ०१००३ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष: )

गाडी क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष (दैनिक) दर रविवारी म्हणजे २४/०८/२०२५, ३१/०८/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६:०० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून दर सोमवारी म्हणजेच २५/०८/२०२५, ०१/०९/२०२५ आणि ०८/०९/२०२५ रोजी सकाळी ८:२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

थांबे – करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे

डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०३ कोच, ३ टायर एसी इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

या गाड्यांसाठी आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आली नसून लवकरच त्याची ती जाहीर करण्यात येणार आहे.

कोकणातील नागपंचमी: सर्पपूजेचा श्रद्धेचा सण

   Follow us on        

भारताची संस्कृती ही निसर्गपूजेवर आधारित आहे आणि विविध जीवसृष्टीशी सहअस्तित्वाचा संदेश देणारे सण आपण साजरे करतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी, विशेषतः कोकणातील नागपंचमी ही पारंपरिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक श्रद्धेची सुंदर अभिव्यक्ती आहे.

नागपंचमीचा पारंपरिक संदर्भ

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. यामागे प्राचीन आख्यायिका, धार्मिक कथा आणि लोकसाहित्य आहेत. पुराणानुसार, या दिवशी शेषनागाची पूजा केल्यास भय, रोग, संकट टळते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. कोकणात नागदेवतेबद्दल विशेष श्रद्धा असून घराघरांतून या दिवशी सर्पपूजा केली जाते.

कोकणातील सण साजरा करण्याची वैशिष्ट्ये

कोकणातील नागपंचमीची पूजा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केली जाते:

नागपंचमीला घरोघरी नागदेवतेच्या मूर्तीची पूजा केली जाते. पूर्वी घरोघरी स्त्रिया नदीकाठची किंवा विशिष्ट मऊ माती घेऊन नागदेवतेच्या मूर्ती स्वतः तयार करत असत. आता या मूर्ती बाजारात उपलब्ध होत आहेत. या मूर्ती घराच्या पूजास्थानी ठेवून त्यांची विधिपूर्वक पूजा होते. नागदेवतेला दूध, फळे, लाह्या, नारळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. साखर घालून केलेले दूध सर्पांना अर्पण करणे ही श्रद्धेची खूण मानली जाते. काही घरांमध्ये हळद-कुंकवाने किंवा शाडूने भिंतीवर किंवा उंबरठ्यावर नागाचे चित्र रंगवले जाते. हे चित्र संकटांपासून रक्षण करणारे मानले जाते.

कोकणात जंगल आणि शेतीशी नाते असल्याने सर्पांशी अनेक वेळा थेट सामना होतो. त्यामुळे त्यांच्याशी सौहार्दपूर्ण सहअस्तित्व राखण्याचा संदेश या सणातून मिळतो.

सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टीने महत्त्व

नागपंचमीचा सण हा केवळ धार्मिकच नव्हे, तर पर्यावरणीय जागृतीचा संदेशही देतो. सापांचा परिसंस्थेतील महत्त्वाचा सहभाग असून त्यांचं अस्तित्व शेती आणि निसर्गासाठी आवश्यक आहे. सर्पांना न मारता त्यांना वाचवण्याचा संदेश नागपंचमी देतो.

कोकणातील नागपंचमी हा केवळ एक सण नाही, तर निसर्गाशी नातं जोडणारा, सजीव सृष्टीविषयी आदर निर्माण करणारा आणि पारंपरिक श्रद्धा जपणारा एक संस्कृतिक पर्व आहे. मातीतून मूर्ती बनवणं, नैवेद्य अर्पण करणं, सहअस्तित्वाचा विचार – हे सर्व कोकणातील जीवनपद्धतीचं प्रतिबिंब आहे.

पेंडूर येथे २० फूट लांबीचा महाकाय अजगर आढळल्याने खळबळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

   Follow us on        

पेंडूर (ता. मालवण) – मालवण तालुक्यातील कट्टा-नेरुरपार मार्गे कुडाळ येथे जाणाऱ्या हमरस्त्यावर, पेंडूर गावाच्या हद्दीत सुमारे १५ ते २० फूट लांबीचा एक महाकाय अजगर रस्ता ओलांडताना दिसून आला. रस्त्याने जात असलेल्या गावातील वाहनचालक व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींनी हा अजगर प्रत्यक्ष पाहिला असून, त्यातील एका युवकाने हा क्षण मोबाईलमध्ये चित्रीत केला. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या महाकाय सापाचे पहिल्यांदाच दर्शन झाल्यामुळे गावातील शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “कधी हा अजगर गुरांना गिळंकृत करेल की काय?” अशी काळजी शेतकऱ्यांच्या मनात आहे.

गावाच्या एका बाजूने वाहणारी कर्ली नदी, तसेच आजूबाजूच्या निसर्गसंपन्न भागामुळे यापूर्वी देखील वन्य प्राणी आढळले आहेत. काही वर्षांपूर्वी, एक भली मोठी मगर पेंडूर तलावात सापडली होती. ती स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या मदतीने पकडून पुन्हा नदीत सोडली होती.

   

याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांची मागणी आहे की, या अजगरालाही तात्काळ पकडून जंगलात सोडावे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या गुरांना किंवा इतर जनावरांना धोका पोहोचणार नाही.

पेंडूर ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून वनविभागाकडे या संदर्भात तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे.

Kudal: कुडाळ आगारात टेलिफोन आणि एस टी फेऱ्यांचा सावळा गोंधळ

   Follow us on        

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आगाराला जो सावळा गोंधळ चालू आहे तो त्वरीत थांबवावा आणि कायम स्वरुपी नवीन चालू दूरध्वनी देण्याची व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन केले जाईल अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे. प्रासीद्धिस दिलेल्या पत्रकात बापर्डेकर म्हणाले की कुडाळ डेपोचा कोरोना काळापासून दूरध्वनी नव्हता तो आजमितीस सुस्थितीत नाही. अधून मधुन तिघांचे मोबाईल नंबर बाहेर पेपर फलकावर लावलेले परंतु तो ज्या आधीकारि वर्ग अगर विभाग नियंत्रक,वाहतूक नियंत्रकजवळ असतो ते कधीच फोन उचलत नाही . रिंग वाजून जाते . मुंबई हून कुडाळ रेल्वे स्टेशनला येण्यापूर्वी अगर स्टेशनला आल्यावर अगर मालवाहून कुडाळला जायचं असेल मग स्वतःचा फोन असुदे की इतरांच्या फोन वरून केव्हाही मालवण एस टी बस संबंधी विचारपूस करिता फोन केला तर त्याठिकाणी उपस्थित आणि ज्यांच्याजवळ आहे ते रिंग वाजली तरी फोन उचलत नाही अशावेळी दमून भागून आलेल्या प्रवाशांनी करावं तरी काय .खाजगी वाहन की रिक्षेला भरमसाठ पैसे देऊन प्रवास करावा की कमी पैशात एस टी महामंडळाने प्रवास करण्यास ताटकळत रेल्वे स्टेशनला किंवा मालवण राहावे? असा प्रश्न या पत्रकात विचारला आहे.

मालवण आगार व्यवस्थापनाला मानाव लागतं ते मालवण आगाराच्या सर्व अधिकारी ,कर्मचारी यांना कारण त्यांचा कोरोना काळापासून दूरध्वनी आणि वाहतूक काही अपवाद वगळता आजपर्यंत बंद नाही.वाहतूकही कुडाळ ची बंद नाही.कुडाळला विचारले तर त्याचं एकच उत्तर मालवणवाल्याच आम्हाला काही विचारू नका ती आली तर सोडू परंतु कित्येकवेळा रेल्वे स्टेशनला न जाता कुडाळ आगारातूंनच बस वळविली जाते.याला जबाबदार कोण? याचे मूळ कारण कुडाळ आगाराला वाली नाही त्याचे बाप हे वर्क शॉप ठिकाणी बसतात तक्रार घेऊन दूरवर त्यांच्या पर्यंत जाणे कोणत्याही प्रवाशांना शक्य नाही.कुडाळ मालवण कुडाळ एस टी फेऱ्याना प्रवाशांन बरोबर शाळा ,कॉलेज विद्यार्थी तर कित्येक वेळा सरकारी कर्मचारी असतात मग अचानक एखादी गाडी रद्द करणे कारण नसताना उशिरा एस टी सोडणे प्रवाशांसोबत पर्यटक इतरांना कितपत परवडणार याची माहिती संबंधित अधिकारी यांनी द्यावी .प्रवाशांनी लेखी तक्रार पुस्तकात तक्रार केली तर त्याच निरसन होत नाही.याला जबाबदार कोण आहेत. तरी येत्या पंधरा दिवसांत आगार व्यवस्थापक आणि आगार प्रमुख तसेच दूरध्वनी यांची व्यवस्था कायमस्वरूपी डेपोला ज्याठिकांनाहून जिल्ह्यातील बस सोडल्या जातात त्याठिकाणी करावी.अन्यथा आंदोलन करावे लागेल याची सूचना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे सुरेश बापर्डेकर यांनी दिली आहे

   

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडीच्या स्लीपर डब्यांत कायमस्वरूपी वाढ

   Follow us on        

Railway Updates: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून ह. निजामुद्दीन (दिल्ली) ते एर्नाकुलम (केरळ) दरम्यान चालणाऱ्या ‘दुरंतो एक्सप्रेस’ (गाडी क्रमांक १२२८४ / १२२८३) मध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डब्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

लांब पल्ल्याची ही गाडी साप्ताहिक स्वरूपात धावत कोकण रेल्वे मार्गे जाते. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मागणी लक्षात घेता, डब्यांची रचना पुढीलप्रमाणे बदलण्यात येत आहे:

 

   

सध्याची कोच रचना (एकूण १९ LHB डबे):
फर्स्ट एसी (1A) – ०१
सेकंड एसी (2A) – ०२
थर्ड एसी (3A) – १०
स्लीपर क्लास – ०३
पँट्री कार – ०१
जनरेटर कार – ०१
एसएलआर – ०१

सुधारित कोच रचना (एकूण २२ LHB डबे):
फर्स्ट एसी (1A) – ०१
सेकंड एसी (2A) – ०२
थर्ड एसी (3A) – १०
स्लीपर क्लास – ०६ (पूर्वीपेक्षा ३ डब्यांनी वाढ)
पँट्री कार – ०१
जनरेटर कार – ०१
एसएलआर – ०१

यामुळे प्रवाशांना विशेषतः स्लीपर प्रवर्गात अधिक जागा उपलब्ध होणार आहे.

सुधारित कोच रचना लागू होण्याच्या तारखा:
गाडी क्र. १२२८४ (ह. निजामुद्दीन – एर्नाकुलम) : दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ पासून
गाडी क्र. १२२८३ (एर्नाकुलम – ह. निजामुद्दीन) : दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ पासून

गाडीच्या मार्गातील थांबे, वेळापत्रक आणि इतर तपशीलांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES (National Train Enquiry System) मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा. प्रवाशांनी याबदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Weather Updates: पुढील २४ तास महत्त्वाचे! मुंबईसह कोकणातील किनारपट्टी जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी

   Follow us on        

Weather Update: पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट दिला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.

किनारपट्टी भागात उंच लाटांचा इशारा

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांच्याकडून महाराष्ट्रातील विविध किनारपट्टी जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा हवामानविषयक इशारा जारी करण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार, २४ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजल्यापासून ते २६ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत समुद्रात लाटांची उंची सुमारे ३.८ मीटर ते ४.७ मीटर पर्यंत असू शकते.

हा इशारा विशेषतः ठाणे, मुंबई शहर व उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील किनारपट्टी भागांसाठी लागू आहे. समुद्रात निर्माण होणाऱ्या उंच लाटा आणि संभाव्य वादळवाऱ्यांमुळे समुद्र परिस्थिती अतिशय अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे, लहान होड्यांचे मालक, मासेमारी करणारे आणि किनारपट्टीवरील रहिवासी यांना खबरदारीचे उपाय घेण्याचे आणि या कालावधीत समुद्रात न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडूनही स्थानिक पातळीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, समुद्र किनारी जाणाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

 

 

Konkan Railway: कार-ऑन-ट्रेन सेवा सध्या नकोच

   Follow us on        

Konkan Railway: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोलाड (महाराष्ट्र) – वर्ना (गोवा) दरम्यान जाहीर करण्यात आलेली Ro-Ro (Roll-on/Roll-off) कार-फेरी रेल्वे सेवा ही संकल्पना नाविन्यपूर्ण असली तरीही, सध्या ही सेवा सुरू करणे अत्यंत गैरसोयीचे आहे. म्हणून, ही सेवा तत्काळ रद्द करण्यात याव, त्याऐवजी, हीच वेळ, ट्रॅक स्लॉट, मनुष्यबळ आणि संसाधने वापरून अधिक प्रवासी विशेष गाड्या चालवाव्यात अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती तर्फे करण्यात आली आहे.

Ro-Ro सेवेसंदर्भातील मुख्य आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत:

१. वेळ आणि खर्चात फारसा फरक नाही:

रस्त्याने कोलाड ते वेर्णा प्रवासास सध्या १० ते १२ तास लागतात, तर Ro-Ro सेवेमुळे रेल्वेने १२ तासांचा प्रवास आहे. मात्र, ३ तासांपूर्वी पोहोचणे आणि गाडी लोडिंगची आवश्यकता असल्याने, एकूण वेळ वाचत नाही. त्यासोबतच ₹७,८७५ प्रति वाहन आणि प्रवाशांचे स्वतंत्र भाडे हा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नाही.

२. एका वाहनामागे फक्त ३ प्रवाशांची अट अव्यवहार्य:

गणपतीसारख्या सणामध्ये कुटुंबात ५ ते ७ सदस्य एकत्र प्रवास करतात. फक्त ३ प्रवाशांना परवानगी असल्याने उर्वरित सदस्यांसाठी स्वतंत्र प्रवासाची गरज भासते, आणि एकत्र प्रवासाचा हेतूचसाध्य होत नाही.

३. मर्यादित साधनसंपत्तीचा अपव्यय:

Ro-Ro गाडी चालवण्यासाठी लोको पायलट, सहायक, ट्रेन मॅनेजर आदींचा स्वतंत्र ताफा लागतो. हेच मनुष्यबळ आणि मार्ग वापरून एखादी पूर्ण प्रवासी गाडी चालवता आली असती, जी अधिक उपयोगी ठरली असती.

४. आधीच व्यापलेल्या मार्गावर आणखी भार:

कोकण रेल्वे मार्ग गणपती काळात अत्यंत गजबजलेला आणि तणावाखाली असतो. अशावेळी मालवाहतुकीसाठी वेगळी गाडी चालवणे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम करू शकते.

५. मधल्या स्थानकांवर चढ-उतार सुविधा नाही:

रो-रो सेवेसाठी कोलाड ते वेर्णा हा मार्ग थेट आहे. मार्गामध्ये कोणत्याही जिल्ह्यातील स्थानकांवर गाड्या लोड किंवा अनलोड करता येणार नाहीत, ज्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील प्रवाशांना याचा लाभच होणार नाही.

वरील गोष्टी लक्षात घेता, आपणास विनम्र विनंती आहे की:कोलाड–वेर्णा Ro-Ro सेवा रद्द करण्यात यावी, आणित्याऐवजी तिथे लागणारे स्लॉट, कर्मचारी आणि साधने वापरून अधिक प्रवासी विशेष गाड्या चालवाव्यात, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा थेट लाभ होईल.

आपण यावर गांभीर्याने विचार करून जनहितासाठी योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Konkan Railway: गणेशोत्सव विशेष गाड्यांच्या नियोजनात अनेक त्रुटी; रेल्वे प्रवासी समितीने वेधले लक्ष

   Follow us on        

Konkan Railway: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर सोडलेल्या गणपती विशेष गाड्यांची यादी प्रसिद्ध झाली. ही प्रवाशांना दिलासा देणारी बाब असली तरी या नियोजनात काही त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तरी, आपण याकडे लक्ष देऊन आणखी गणपती विशेष गाड्या सोडताना काही गोष्टींचा विचार करावा अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीतर्फे एका निवेदनातून करण्यात आली आहे. 

या निवेदनात समिती लिहिते….  

१. पुण्यातून सावंतवाडीसाठी एकही गाडी नाही. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला कोंकणाचे वावडे?

यंदा मध्य रेल्वे तर्फे २५० गणपती विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या मध्ये पुणे विभागातून केवळ १२ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ह्या १२ फेऱ्याही केवळ रत्नागिरीपर्यंतच असल्याने रत्नागिरी पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अद्यापही पुण्याहून आपल्या गावी जायला थेट रेल्वेगाडीची सोय नाही.

मात्र ह्याच पुणे विभागाने एप्रिल,मे,जून ह्या दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या म्हणून दानापूर, गोरखपूर, बनारस,गाझीपूर,जयपूर येथे तब्बल १९२ फेऱ्या चालवल्या होत्या. ह्यात अधोरेखित करणारी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या फेऱ्या ह्या महाराष्ट्रात नसून इतर राज्यात जाणाऱ्या आहेत. जर ह्या फेऱ्या ३ महिन्यांपूर्वी चालवल्या जात होत्या तर मग आताच पुणे विभागाकडे विशेष गाड्या चालवण्याची क्षमता नाही का असा प्रश्न उपस्थित होतो.

२. ⁠चिपळूणसाठी फक्त ८ डब्यांची मेमू. संपूर्ण अनारक्षित गाडीचा फायदा केवळ गाडी सुटण्याच्या स्थानकातील प्रवाशांनाच होतो; त्यापुढील स्थानकांत गाडीत चढताच येत नाही.

येत्या गणेशोत्सवात सोडलेली ०११५५/०११५६ दिवा चिपळूण दिवा मेमू म्हणजे कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स किंवा दादर येथूनच चिपळूणकरिता विशेष गाडी सोडण्याची आवश्यकत

चिपळूण गाडी दादर आणि ठाण्याला थांबलीच पाहिजे. अन्यथा एवढ्या कमी अंतराच्या प्रवासासाठी गिरगाव, लालबाग, परळ, दादर, माहिम, वरळी, अंधेरी, सांताक्रुज, बोरिवली, कांदिवली, भाईंदर, विरार, वसई, घाटकोपर, भांडुप, ठाणे परिसरातील प्रवासी दिवा किंवा पनवेलला गाडी बदलण्यास उत्सुक नसतात. अति गर्दीचे दिवस वगळता लोक या दिवा किंवा पनवेल गाडीने जाणे टाळतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादरहून सुटल्यास चिपळूण गाडी वर्षभर गर्दीने भरून धावेल.

 संपूर्ण अनारक्षित गाडीत असल्यामुळे वेळेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांना रेल्वेने आगाऊ आरक्षण करण्याचा पर्यायच दिलेला नाही. संपूर्ण अनारक्षित गाडी सुरुवातीच्या स्थानकातच पूर्णपणे भरत असल्यामुळे त्यापुढील स्थानकांतील प्रवाशांना या गाडीत जागा मिळत नाही. इतर स्थानकांवर केवळ गाड्यांची संख्या वाढलेली दिसते. त्याचा प्रवाशांना प्रत्यक्ष फायदा होत नाही. याउलट किमान काही आरक्षित डबे उपलब्ध असल्यास प्रवाशांना आपल्या जागेबाबत हमी मिळू शकते.

तसेच, ही दिलेली गाडीही केवळ आठ डब्यांची मेमू आहे. मुंबई ते कल्याण या ५५ किमीच्या मार्गावरही १२ डब्यांच्या गाड्या कमी पडत असून १५ किंवा १८ डब्यांची मागणी होत असताना दिवा चिपळूण या २३३ किमीसाठी भर गणेशोत्सवाच्या गर्दीच्या दिवसांत ८ डब्यांची गाडी देण्याची कल्पनाच चुकीची आहे. तसेच, खालील सीटच्या वरील भागात बसण्याची सोय नसणे तसेच, प्रत्येकी चार डब्यांमध्ये एक मोटार कोच असल्यामुळे मेमूची प्रवासी वहन क्षमता सामान्य गाडीपेक्षा ५०% कमी असते.

तरी, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादर येथूनच चिपळूणकरिता सामान्य द्वितीय श्रेणी आरक्षित, एसी चेअर कार तसेच सामान्य अनारक्षित डबे असलेली विशेष गाडी सोडावी. तसेच, ८ किंवा १२ डब्यांच्या मेमू न चालवता २२ डब्यांच्या गाड्याच चालवाव्यात.

३. ⁠गुजरातहून सावंतवाडीकरिता एकही गाडी नाही.

पश्चिम रेल्वेने गुजरातहून सोडलेल्या गाड्यांपैकी एकही गाडी सावंतवाडीपर्यंत जात नसल्यामुळे सध्या गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वापी, तर पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोईसर, पालघर विभागात राहणाऱ्या कोकणवासीयांना रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण भाग व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी एकही गणपती विशेष गाडी उपलब्ध नाही. तरी, पश्चिम रेल्वेने अहमदाबाद येथून सावंतवाडी किंवा पेडणेपर्यंत एखादी विशेष गाडी सोडण्याची आवश्यकता आहे.

४. मध्य रेल्वेतर्फे द्वितीय श्रेणी आरक्षित आणि एसी चेअर कार प्रकारातील एकही गाडी नाही

सर्व विशेष गाड्या विशेष दरांवर चालवल्या जात असल्यामुळे स्लीपर प्रकारातील डब्यांसाठी किमान ५०० किलोमीटरचे भाडे द्यावे लागते. त्यामुळे पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड अशा मुंबईपासून तुलनेने कमी अंतरावरील ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना दुपटीहून अधिक भाडे द्यावे लागते. उदा. ठाणे ते खेड प्रवासासाठी स्लीपर डब्याला सामान्य गाडीला प्रति प्रवासी १८५ रुपये आणि एसी थ्री टायरसाठी ५१५ रुपये भाडे असते तर विशेष गाडीला हेच भाडे स्लीपरला ३९० तर एसी थ्री टायरला १०६० रुपये द्यावे लागतात. हे नियमित गाडीपेक्षा दुपटीपेक्षा अधिक आहे.

म्हणूनच, दिवसा धावणाऱ्या सर्व गाडयांना सीटिंग आणि एसी चेअर कार डबे असावेत किंवा स्लीपर डबे सीटिंग म्हणून आणि एसी थ्री टायर डबे एसी चेअर कार म्हणून वापरावेत.

५. मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड विशेष गाडीच्या वारंवारतेत मागील वर्षीपेक्षा कपात 

मागील वर्षी पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल सावंतवाडी विशेष गाडी आठवड्यातून सहा दिवस सोडली होती. यावर्षी त्यात कपात करून ही गाडी आठवड्यातून केवळ चार दिवस सोडलेली आहे. परराज्यात भरभरून गाड्या सोडणाऱ्या पश्चिम रेल्वेला महाराष्ट्रात गाड्या सोडण्यासाठी साधनसंपत्ती (डबे, इंजिन, पिटलाईन,ई.) उपलब्ध नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. तरी, पश्चिम रेल्वे मुंबई विभागाने आणखी काही गाड्यांची व्यवस्था करावी. 

६. मागील वर्षी खेड येथून सोडलेल्या गाड्या केवळ पनवेल पर्यंतच होत्या. त्या ऐवजी या गाड्या मध्य रेल्वेवर दादर किंवा पश्चिम रेल्वेवर वसई रोड पर्यंत चालवाव्यात.

वरील निवेदन समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी संबधित रेल्वे कार्यालये आणि अधिकार्‍यांना पाठवले आहे. 

आरे-वारे दुर्घटना: तीन सख्ख्या बहिणींचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

रत्नागिरी:आरे-वारे समुद्रात चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. मृतांमध्ये ३ सख्ख्या बहिणींचा समावेश आहे आणि एकीच्या नवऱ्याचा समावेश आहे. या मुलींचे वडील शमसुद्दीन शेख हे दुबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असून मुली व जावयाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तातडीने ते रत्नागिरी येथे येण्यासाठी निघाले असून त्यानंतर तिनही मुलींवर अंत्यसंस्कार केले जातील, असे सांगण्यात आले.

उज्मा शमसुद्दीन शेख (१८), हुसेरा शमसुद्दीन शेख (२०), जेनब जुनेद काझी (२८) अशी या तीन सख्ख्या बहिणींची नावे आहेत. तर जैनब यांचे पती जुनेद यांचाही आरे-वारे येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. १९ जुलै रोजी शमसुद्दीन यांच्या ३ मुली व जावई हे दुचाकीवरुन आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटनासाठी गेले होते. समुद्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने चारही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या शमसुद्दीन यांच्या मुली सुट्टी असल्याने रत्नागिरीत आल्या होत्या. तर त्यांचे वडील हे दुबई येथे वास्तव्यासाठी होते. घटनेची तातडीने खबर शमसुद्दीन यांना कळविण्यात आली. यानंतर दुबई येथून ते भारतात येण्यासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान चारही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ठेवण्यात आले आहेत. मुलींचे वडील आल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search