Category Archives: कोकण

Chiplun: जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा टेरव येथे साडेतीनशे किल्ल्यांचे सचित्र प्रदर्शन.

   Follow us on        

चिपळूण: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा टेरव क्रमांक १ शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूमधील १ अशा भारतातील बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्याबद्दल ढोल ताशे वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

संयुक्त राष्ट्र संघाच्या युनेस्को या संस्थेने महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळ यादीत केला हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक व अभिमानास्पद क्षण आहे. या ११ किल्ल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग या किल्ल्याचाही समावेश झाल्यामुळे विशेष आनंद आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे अवचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती व ऐतिहासिक वारसा या विषयी अभिमान निर्माण करण्याच्या दृष्टीने शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक मोने सर यांच्या संकल्पनेतून व संग्रहित ३५० किल्ल्यांचे सचित्र माहितीसह प्रदर्शन भरविण्यात आले होते. सदर प्रदर्शन व आनंदोत्सवाचे उद्घाटन टेरव गावचे मुंबई स्थित ग्रामस्थ व सरस्वती कोचिंग क्लासेसचे संचालक श्री सुधाकर कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी सुमन विद्यालय टेरवचे शिक्षक श्री भंडगे, शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक मोने, सौ चिपळूणकर, सौ निशिगंधा कांबळे , श्री अनंत पवार, सौ स्नेहल गायकवाड, श्री प्रवीण सन्मुख, श्रीमती तनुजा मोहिते, हे शिक्षक – शिक्षिका उपस्थित होत्या. या प्रदर्शनाचा लाभ सुमन विद्यालय टेरवचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळा टेरव १ मधील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. सदर कार्यक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पवार सर यांनी केले तर आभार श्री प्रवीण सन्मुख यांनी मानले.

 

श्री दिपक मोने, मुख्याध्यापक

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा टेरव 

Konkan Railway: गणेशचतुर्थी विशेष गाड्यांचे आरक्षण टप्याटप्प्याने सुरु करण्यात यावे

   Follow us on        

मुंबई : गणपती उत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून ६० दिवस आधी याप्रमाणे आरक्षण सुरू करण्यात येते. यंदाच्या वर्षी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या बहुतांश गाड्या फुल झाल्या असल्याने चाकरमान्यांमध्ये नाराजी आहे. यासाठीच रेल्वे प्रशासनाने तारखेनुसार ४५ दिवस, ३० दिवस, १५ दिवस इत्यादी टप्प्याटप्प्यांनी अँडव्हान्स रिझर्वेशन कालावधी (एआरपी) पद्धतीने गणपती विशेष गाड्यांचे बुकिंग उघडण्याचा विचार करावा, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीकडून करण्यात आली आहे.

सध्या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण अप आणि डाऊन दोन्ही दिशांसाठी एकाच वेळी सुरू केले जाते. त्यामुळे तिकिटे उघडल्यानंतर काही मिनिटांतच बुक होतात, ज्यामुळे प्रवासाचे दोन्ही टप्पे सुरक्षित करणे कठीण होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी पर्यायीरीत्या काही अडचणींमुळे निश्चित एआरपी शक्य नसल्यास, अप आणि डाऊन दिशांसाठी बुकिंग वेगवेगळ्या तारखांना उघडावी, जेणेकरून प्रवाशांना त्यांचा संपूर्ण प्रवास नियोजन करण्याची संधी मिळेल, असे संघटनेकडून सांगण्यात आले.

 

दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वे नियमानुसार आयआरसीटीच्या एका आयडीवर प्रत्येक दिवशी फक्त एकच तिकीट काढायचे बंधन आहे. त्यामुळे कोकणात गावी जातानाचे आणि परतीचे तिकीट एकाच दिवशी काढणे शक्य होत नाही.

टप्प्याटप्प्याने आरक्षण कालावधी मिळाला, तर प्रवाशांना दिलासा मिळेल. उत्सवाच्या हंगामात अधिक व्यवस्थित आणि समावेशक प्रवास नियोजन सुनिश्चित होईल. यामुळे तत्काळ कोट्यावर अवलंबून राहणे कमी होईल आणि बुकिंग सिस्टीमचा गैरवापर रोखण्यास मदत होईल.
अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती.

Railway Updates: प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण चार्टिंगच्या वेळेत बदल; सुधारित वेळा अशा असतिल

   Follow us on        

Railway Updates: प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने नियोजित करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या तयारीच्या आणि आरक्षण चार्टच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या आरक्षित प्रवाशांचे नाव, कोच आणि बर्थची माहिती असलेले आरक्षण चार्ट तयार केले जातात आणि मूळ स्थानक किंवा दूरच्या स्थानकातून ट्रेन सुटण्याच्या ४ तास आधी प्रसिद्ध केले जातात.

रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार, १०.०७.२०२५ पासून, ट्रेनचा पहिला आरक्षण चार्ट आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी तयार केला जाईल (४ तासांपूर्वीऐवजी).

सुधारित चार्टिंग वेळा पुढीलप्रमाणे:

• ज्या ट्रेन ०५.०० ते १४.०० वाजेदरम्यान प्रस्थान करतील, त्या ट्रेनसाठी पहिली आरक्षण यादी आधीच्या दिवशी २१.०० वाजता तयार केली जाईल.

• ज्या ट्रेन १४.०० ते ०५.०० या वेळेत प्रस्थान करतील, त्यांची पहिली आरक्षण यादी त्या ट्रेनच्या प्रस्थानाच्या ८ तास आधी तयार केली जाईल.

• दुसऱ्या आरक्षण चार्टसाठी सध्याच्या प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही, जो सध्याच्या तरतुदींनुसार सुरू राहील.

• अंतिम आरक्षण चार्ट ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या ३० मिनिटे आधी तयार केला जाईल.

प्रवासी अंतिम यादी तयार होईपर्यंत रिक्त बर्थसाठी आरक्षण करू शकतील.

प्रवाशांनी कृपया चार्टिंग वेळेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी.हा निर्णय प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करता यावे आणि शेवटच्या क्षणी गोंधळ व गर्दी टाळता यावी या उद्देशाने घेतला आहे. यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांना दोन्हींचा फायदा होईल असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

 

Konkan Tourism: येरवडा कारागृहाच्या धर्तीवर कोकणातही सुरू होणार ‘कारागृह पर्यटन’

   Follow us on        

सावंतवाडी : संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन जिल्हा कारागृहे आहेत. पैकी एक ब्रिटिशकालीन सर्वात जुने जिल्हा कारागृह सावंतवाडी येथे असून दुसरे सिंधुदुर्गनगरी येथे अलीकडेच उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्या पाहता सिंधुदुर्गनगरी येथील कारागृह पुरेसे आहे, त्यामुळे सावंतवाडीतील ब्रिटीशकालीन कारागृह पर्यटनासाठी वापरून त्याठिकाणी ‘कारागृह पर्यटन’ ही संकल्पना राबवता येऊ शकते, त्याने जिल्ह्याच्या पर्यटनला एक नवी दिशा मिळेल, असे मत रविवारी आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. केसरकर यांनी ‘कारागृह पर्यटन’ या संकल्पनेवर विशेष भर दिला. कोणत्याही जिल्ह्यात दोन कारागृह नाहीत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारी दर पाहता, सिंधुदुर्गनगरी येथील कारागृह पुरेसे आहे. सावंतवाडी येथील कारागृह सुमारे 150 वर्षांपूर्वीचे असून ते आता रिकामे झाले आहे.

काही दिवसांपूर्वी या कारगृहाची संरक्षक भिंत कोसळल्याने येथील सर्व कैद्यांना सिंधुदुर्गनगरीतील कारागृहात हलवण्यात आले आहे. त्यामुळे, या ऐतिहासिक कारागृहाचा उपयोग ‘कारागृह पर्यटन’ साठी करता येईल.यामुळे पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळेल. सावंतवाडीला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असल्याने, असे अभिनव पर्यटन उपक्रम सुरू झाल्यास त्याचा जिल्ह्याला निश्चितच फायदा होईल, असे आ. केसरकर म्हणाले.

राज्यातील ऐतिहासिक कारागृहातील ठिकाणे आणि घटनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती होण्यासाठी यापुर्वी येरवडा कारागृहात ‘कारागृह पर्यटन’ सुरुवात केली होती. राज्यातील अनेक कारागृहे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योतर काळातील ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाकडून ऐतिहासिक ठिकाणे आणि संदर्भांचे जतन केले जातात. चित्रपटात दाखविले जाणारी कारागृहे आणि प्रत्यक्षातील कारागृहे पाहण्याची सर्वसामान्य नागरिकांची इच्छा असते. कारागृहे आतून कसे दिसते, कैद्यांना कसे ठेवले जाते, याची नागरिकांमध्ये उत्सुकता असते. मात्र, कारागृहात विविध गुन्ह्यांतील कैदी शिक्षा भोगत असल्याने आणि सुरक्षेच्या दृष्टीने कारागृहात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात नाही.

मात्र, आता राज्य सरकारने कारागृहातील ऐतिहासिक स्थळे दाखवून, घटनांचे साक्षीदार होण्यासाठी आणि त्यातून प्रेरणा मिळावी, या हेतूने राज्यातील कारागृहांत ‘कारागृह पर्यटन’ सुरू करण्याची घोषणा त्यावेळी केली होती. 

 

संगमेश्वर स्थानकावरील गैरसोयींकडे लक्ष वेधण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपतर्फे पाठपुरावा

   Follow us on        

संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या न्याय हक्कासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप या रेल्वे प्रवाशी संघटनेने कोकण रेल्वे प्रशासनाला लेखी पत्र देऊन संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील अत्यावश्यक सुविधांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे.

या पत्रात संगमेश्वर स्थानकाच्या विक्रमी वार्षिक उत्पन्नाचा आढावा देऊन रोज १८००पेक्षा अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. या स्थानकात दोन्ही फलाटांना जोडणारा पादचारी पूल हा इतके दिवस आच्छादन विरहित आहे.

उन्हा- तान्हात पावसाळ्यात प्रवाशांच्या संरक्षणसाठी या पुलावर आच्छादन(पत्र्याचे छत) होणे गरजेचे आहे ही बाब ध्यानात आणून दिली आहे.

याशिवाय रत्नागिरीच्या दिशेला फलाट क्रमांक एक आणि दोन यांना जोडणारा पूल होणे अत्यावश्यक आहे. फलाट क्रमांक दोन वर उतरलेल्या प्रवाशांना पायपीट करत फलाटावरील अर्धे अंतर उलट दिशेने पायपीट करावी लागते. वृध्द व्यक्ती, महिला,बालके , आजारी व्यक्ती यांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे.

तरी या गोष्टीचे गांभीर्य ध्यानात घेऊन उपाययोजना कराव्यात असा उल्लेख या पत्रात केला आहे.

फलाट क्रमांक एक वरील काही‌ कौलारु प्रवाशी निवारा शेड नादुरुस्त आहेत, त्या़ची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पावसाच्या दिवसात अच्छादन नसलेल्या फलाटावर सामानसुमान घेऊन ठिबकणाऱ्या प्रवाशी निवारा शेड मध्ये प्रवाशी बसलेले असतात. या दुरुस्ती कामाला वेग यावा,अशा आशयाचे विनंती पत्र दिले आहे.

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाचे ऐतिहासिक महत्त्व ध्यानात घेऊन पर्यटकांच्या पसंतीला संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक उतरले आहे. पण रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुविधेसाठी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव, जामनगर, पोरबंदर या एक्स्प्रेसना थांबा मिळावा म्हणून मागण्यांचा पाठपुरावा केला होता. इतके विक्रमी उत्पन्न या रेल्वे स्थानकातून मिळत असताना प्रवाशांच्या सुविधेकडे कोकण रेल्वे प्रशासन काना डोळा का करते आहे? असा परखड सवाल या संघटनेचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. परंतु या प्रश्नाचे उत्तर अनाकलनीय आहे!

श्री. रुपेश मनोहर कदम/ सायले

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on         Konkan Railway: उन्हाळी हंगामासाठी विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या गाडी  क्रमांक ०७३११/०७३१२ वास्को द गामा – मुझफ्फरपूर – वास्को द गामा  या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधी धावत असलेल्या वेळापत्रकानुसार आणि डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक २३/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २५/०८/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर – वास्को द गामा साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक २५/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २८/०८/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल ३०/०६/२०२५ ते २५/०८/२०२५ पर्यंत दर सोमवारी वास्को द गामा येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२:३० वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर जंक्शन – वास्को द गामा साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल. ०३/०७/२०२५ ते २८/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी १४:४५ वाजता मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १४:५५ वाजता वास्को द गामाला पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, छे इथं थांबेल. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

 

Railway Updates:रेल्वे तिकीट आरक्षण नियमात मोठे बदल; उद्यापासून अंमलबजावणी

   Follow us on        

Railway Updates:भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल करत आता तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे. 1 जुलै 2025 पासून हे नवीन नियम लागू होणार असून यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता येईल व फसवणूक टाळली जाईल, असा रेल्वे मंत्रालयाचा उद्देश आहे.

रेल्वे मंत्रालयाने 10 जून रोजी एक अधिकृत परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार, “01.07.2025 पासून, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (IRCTC) च्या वेबसाईट किंवा अ‍ॅपद्वारे तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी युजर्सचे खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे. त्यानंतर 15.07.2025 पासून बुकिंग करताना आधार-आधारित ओटीपी व्हेरिफिकेशनदेखील बंधनकारक करण्यात आले आहे.”

हे नवे नियम केवळ ऑनलाइन बुकिंगपुरते मर्यादित नसून काउंटर बुकिंगवरसुद्धा लागू होतील. पीआरएस काउंटर किंवा अधिकृत एजंटमार्फत तत्काळ तिकीट बुकिंग करतानाही वापरकर्त्याला सिस्टम-जनरेटेड ओटीपी प्रमाणीकरण करणे आवश्यक असेल, जो बुकिंग वेळी नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. याची अंमलबजावणी 15 जुलैपासून होणार आहे.

या नवीन नियमामुळे अधिकृत तिकीट एजंटसाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांमध्ये एजंट तत्काळ तिकीट बुक करू शकणार नाहीत. याचा अर्थ, एसी क्लाससाठी सकाळी 10 ते 10.30 या वेळेत व नॉन-एसी क्लाससाठी सकाळी 11 ते 11.30 या वेळेत एजंटना बुकिंगची परवानगी दिली जाणार नाही.

रेल्वे सूचना प्रणाली केंद्र (CRIS) व IRCTC यांना याबाबत सर्व झोनल रेल्वेला माहिती देण्यात आली असून, सिस्टममध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

रेल्वे मंत्रालयानुसार, हे बदल तिकीट बुकिंग प्रणालीतील अनियमितता व दलाली रोखण्यासाठी आवश्यक आहेत. अनेकदा दलाल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून काही सेकंदात हजारो तिकीट बुक करतात, यामुळे सामान्य प्रवाशांना तत्काळ योजना अंतर्गत तिकीट मिळणे अवघड होते. या नवीन नियमांमुळे ही समस्या बर्‍याच अंशी कमी होईल, असा मंत्रालयाचा विश्वास आहे.

 

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना १ कोटीचे विमा संरक्षण मिळणे गरजेचे

   Follow us on        

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या दीड दशकाहून अधिक काळ सुरु आहे. पळस्पे – इंदापूर विभाग, चिपळूण – आरवली – संगमेश्वर – हातखंबा अशा कित्येक भागातील रास्ता गेल्या अनेक वर्षांपासून बिकट अवस्थेत आहे. इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण रस्त्यांचे, पळस्पे – इंदापूर पट्ट्यातील पूल, लोणेरे पूल, चिपळूण पूल अशा कित्येक ठिकाणी कामच अद्याप सुरु न झाल्यामुळे तेथे कित्येक तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. पेण, नागोठणे, सुकेळी येथील रस्त्यांची चाळण झाली आहे. ते टाळण्यासाठी प्रवासी पर्यायी मार्गांचा अवलंब करतात. त्यामुळे काहीही केले तरी वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय होतोच.

काही पर्यायी मार्ग अरुंद असल्यामुळे तेथेही वाहतूक कोंडी होऊन वाहने घासून नुकसान होते. तर मुख्य मार्गावर काही भागांत चांगला रस्ता असला तरी अचानक मध्ये खड्डे येतात. काही ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नसल्यामुळे चिखल मातीतून वाहनचालकांना गाडी हाकावी लागते. या सर्वांत गाडी आपटून टायर फुटणे, गाडीचे काही महत्वाचे भाग तुटणे, गाडी रस्त्यात बंद पडणे असे प्रकार हमखास घडतात. यामुळे सर्वांना या मार्गावरून प्रवास करून झाल्यावर गाडीच्या देखभाल दुरुस्तीचा मोठा खर्च सहन करावा लागतो. तसेच, गेल्या काही वर्षांत हजारो नागरिकांना अपघाती मरण आले तर काहींना कायमचे अपंगत्व आहे. एकूणच, या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे एक दिव्य व जीवघेणे आव्हान आहे. मुळात या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग न म्हणता महाराष्ट्रातील दुर्लक्षित व भारतातील सर्वाधिक काळ रखडलेला महामार्ग म्हणून घोषित केले पाहिजे.

ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गांसारख्या चांगल्या व सुस्थितीत असलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडून टोल घेतला जातो त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मुंबई गोवा मार्गावरून (पळस्पे ते इंदापूर व पुढे इंदापूर ते पत्रादेवी मार्गावरून) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडीची नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक फेरीला काही विशिष्ट रक्कम द्यावी (टोल द्यावा). तसेच, अपघात होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे सर्व प्रवाशांना अपघात झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी किमान ५० लाखांचा व मृत्यू झाल्यास किमान १ कोटी रुपयांचा विमा उपलब्ध करून द्यावा व त्याचा खर्चही शासनाने करावा. अशी मागणी कोकण विकास समितीने निवेदनाद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे.

वाहनांची नोंदणी करण्यासाठी महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच बांधून तयार असलेल्या टोल नाक्यांचा उपयोग करता येईल असेही त्यांनी या निवेदनात सुचवले आहे.

Konkan Railway: गणेशभक्तांसाठी खुशखबर! तब्बल १५ स्लीपर कोच असलेल्या विशेष गाडीला मुदतवाढ; आरक्षण ‘या’ तारखेपासून सुरु होणार

   Follow us on         Konkan Railway: पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष गाडीला दिनांक २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक २९ जून पासून सुरू होणार आहे.
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल दिनांक २८ सप्टेंबर पर्यंत उधना जंक्शन येथून दिनांक दर बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल ती  मंगळुरू जंक्शनला  दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५  वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल ही गाडी दिनांक २९ डिसेंबरपर्यंत मंगळुरु जंक्शन येथून गुरुवार आणि सोमवारी रात्री १० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २१:०५ वाजता पोहोचेल.गुरुवार आणि सोमवारी रात्री २२:१०  वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २३ :०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, एसएलआर – 02.

Amboli: धक्कादायक! वर्षा पर्यटनासाठी आलेला पर्यटक ३०० फूट दरीत पडला; शोधमोहीम सुरु

   Follow us on        

सिंधुदुर्ग : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली घाटाजवळील कावळेसाद पॉईंटवर वर्षा पर्यटनासाठी आलेला कोल्हापूर येथील युवक खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी हा युवक गेला असता, पाय घसरून पडल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरीत पडलेल्या युवकाचा शोध घेतला जात आहे. वाऱ्यांच्या वेगामुळे उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्यापाशी हा युवक कोसळल्याची माहिती आहे.
कोल्हापूरमधून मित्राचा ग्रुप वर्षा पर्यटनासाठी कोकणात आला होता. त्यावेळी, आंबोली घाटाता या पर्यटकांनी आपला गाडी थांबवून निसर्स सौंदर्याचा आनंद लुटला. मात्र, दुर्दैवाने यावेळी एक युवका रोलिंगच्या पलिकडे जाऊन दरीत कोसळल्याची दु:खद घटना घडली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून या युवकाच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांची चौकशी करण्यात येत आहे. युवक नेमकं दरीत कोसळला कसा याबाबत माहिती घेतली जात आहे, पण रोलिंग पलिकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता हा अपघात झाल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी दाट धुके आणि मोबाईल टॉवरला रेंज नसल्यामुळे मदतकार्य करताना पोलिसांना अडचणी येत आहेत.

जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र सनगर
राजेंद्र बाळासो सनगर (45 वर्षे) चिले कॉलनी, कोल्हापूर असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव आहे. ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. कोल्हापूर येथील सनगर हे त्यांच्या 14 सहकाऱ्यांच्या टीमसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. कावळेसाद पॉईंट येथे रेलिंग जवळून असताना पाय घसरला आणि ते दरीत कोसळले. आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search