Category Archives: कोकण

मुंबई गोवा महामार्ग इथेही ‘बदनाम’

   Follow us on        
Mumbai Goa Highway:मुंबई गोवा महामार्गाचे काम काही केल्या पूर्णच होत नाही आहे. कोकणवासीयांना मिळत आहेत त्या पुढे ढकलत जाणाऱ्या फक्त तारखा! गेल्या १७ वर्षांपासून या महामार्गाचे रखडले काम, सुमार दर्जाचे काम या महामार्गावरून नेहमीच टीकेची झोड उठत आहे. हे कमी होते म्हणून की काय या महामार्गाविषयी नकोशी वाटणारी अजून एक बातमी समोर आली आहे.
कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांना शासनाचा साडे नऊ कोटी कर थकविल्याचे उघडकीस आले आहे.  गौण खनिज उत्खननाचा  कर  (रॉयल्टी) न  भरल्याने जिल्हा प्रशासनाकडून या कंपन्यांना  नोटिस बजावण्यात आली आहे. या चार ही  कंपन्यांना जिल्हा प्रशासनाकडून ३१ मार्चपर्यंत कर भरण्याची मुदत देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ईगल इन्फ्रा प्रा. लि., चेकत इंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा, जे. एस. म्हात्रे या कंपन्यांनी सुमारे साडेनऊ कोटी एवढा कर थकविला आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या काम वेगाने सुरु आहे. या कामाचे  सहा टप्पे करून वेगवेगळ्या कंपन्यांना त्याचा ठेका देण्यात आला होता. त्यापैकी काही कंपन्यांनी काम सोडले. मात्र दुसऱ्या कंपन्यांना हे काम देण्यात आले. डिसेंबर २०२५ हा महामार्ग पुर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरण झाले आहे. काही टप्प्यातच हे काम शिल्लक असताना ठेकेदार कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने दुसरा दणका दिला आहे. कंपन्यांनी केलेल्या उत्खननापैकी अनेक कंपन्यांनी गौण खनिज उत्खननाचा कर  भरला नसल्याचे पुढे आले आहे. महामार्गाचे काम करताना काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. त्या तुलनेत कंपन्यांनी रॉयल्टी भरलेली नाही.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांनी शासनाचा साडे नऊ कोटी रुपये  कर थकविला आहे.  इलोक्टॉनिक टोटल स्टेशन (ईटीएस), ईगल इन्फ्रा प्रा, लि (मकरंद गांधी),चेतक इंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा अशी त्या चार कर बुडविणाऱ्या कंपनीची नावे आहेत.

गोवा सरकार चालविणार ‘महाकुंभमेळा विशेष रेल्वे’ सेवा; भाविकांना मिळणार विशेष सोयी

   Follow us on        
पणजी : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी गोव्यातून विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येणार असून गरज भासेल त्याप्रमाणे रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. येत्या ४ दिवसांत या गाड्यांचा मार्ग, वेळापत्रक आणि आरक्षण इत्यादी जाहीर करण्यात येणार आहे.
याशिवाय या प्रवासाला गोवा सरकारतर्फे सवलतीचे तिकीटदर आकारण्यात येणार आहे. तसेच प्रवासात सरकारतर्फे मार्गदर्शक (गाईड्स) नेमण्यात येणार आहेत. तसेच भाविकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होण्यासाठी ईतर सुविधा देण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली.
जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असलेल्या महा कुंभमेळ्याला यावर्षी लाखो भक्त आणि पर्यटक भेट देत आहेत. 13 जानेवारी 2025 पासून सुरू होणारा हा भव्य सोहळा 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे.

“चिपी विमानतळाला टाळे ठोकणारच होतो पण…..” वैभव नाईक नक्की काय म्हणालेत?

   Follow us on        
कुडाळ : चिपी विमानतळ टाळे ठोकणारच होतो पण जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केल्यामुळे आम्ही गप्प राहिलो असे विधान माजी आमदार वैभव नाईक यांनी आज केले. सद्यस्थितीत थोडे दिवस थांबा, विमानतळाला टाळे ठोकू नका अशी जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केल्यामुळे आम्ही गप्प आहोत,पण नजीकच्या काळात आम्ही चिपी विमानतळाला टाळे ठोकणार हे निश्चित असल्याचा पुनरुच्चार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. कुडाळ येथे आंदोलना दरम्यान माध्यमांशी ते बोलत होते.
यावेळी वैभव नाईक म्हणाले की, चिपी-मुबंई सेवा बंद आहे; याबाबत माध्यमांच्या वतीने आम्ही आवाज उठवला होता. परंतु या ठिकाणच्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी आमची भूमिका समजावून न घेता आमच्या विरोधात भूमिका घेत आमच्या घराला टाळा ठोकण्याचा इशारा दिला. चिपी-पुणे विमानसेवा सुरू आहे, परंतु शनिवारीच हवामानातील बदलामुळे ते विमान अचानक रद्द करण्यात आले.परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रविवारी तर प्रवाशांची यापेक्षाही मोठी गैरसोय झाली.
पुण्यावरून चिपीसाठी येणारे विमान अचानकपणे गोवा येथे लँडिंग करण्याची नामुष्की विमान प्रशासनावर आली. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो तर या विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत, त्यामुळे रात्री सोडाच चिपी विमानतळावर दिवसाही विमान उतरू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.यासाठी विमानतळ प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे लाईट सुविधा पुरवा अशी लेखी पत्राद्वारे मागणी केली असल्याचे नाईक यांनी सांगितले.

कोकण रेल्वे मार्गावर ‘महाकुंभमेळा विशेष’ एक्सप्रेस चालविण्यात यावी – अखंड कोकणरेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी

   Follow us on        

सिंधुदुर्ग: १४४ वर्षातून येणारी पर्वणी म्हणजेच महाकुंभ मेळ्यासाठी कोकणातून सावंतवाडी येथून प्रयागराज साठी विशेष ट्रेन चालवण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने कोकण रेल्वेकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यां रेल्वेच्या सर्व संबंधितांकडे यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी दिली आहे.

१४४ वर्षांत एकदा साजरा होणारा हा महोत्सव लाखो भाविकांसाठी जीवनातील एक अद्वितीय आणि धार्मिक अनुभव ठरेल. त्यामुळे कोकणातील अनेक भक्त प्रयागराजला प्रवास करण्यासाठी इच्छुक आहेत.महा कुंभमेळ्यासाठी सावंतवाडी ते प्रयागराजदरम्यान काही विशेष गाड्यांची व्यवस्था करावी, कोकण रेल्वे मार्गावरील सर्व तालुक्यांतील नागरिकांना लाभ व्हावा, यासाठी या गाड्यांना सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पेण व पनवेल स्थानकांवर थांबे देऊन पुढे प्रयागराजला रवाना करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.

हिंदू धर्मात महाकुंभाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातून सनातन धर्माच्या परंपरेचे सखोल प्रतिबिंब उमटते. दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला पूर्णकुंभ म्हणतात. बाराव्या पूर्णकुंभमेळ्यानंतर महाकुंभमेळा होतो. तब्बल १४४ वर्षांनंतर यंदा महाकुंभ होत आहे. महाकुंभमेळ्यात शाही स्नानाची व्यवस्थाही आहे. कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी काही तारखा निश्चित केल्या जातात. यंदा महाकुंभात एकूण ६ शाही स्नान होणार असून त्यापैकी २ स्नान पूर्ण झाले आहेत.

महाकुंभ शाही स्नानाच्या तारखा

१. पौष पौर्णिमा: १३-०१-२०२५/सोमवार

२. मकर संक्रांत : १४-०१-२०२५/मंगळवार

३. मौनी अमावस्या (सोमवती): २९-०१-२०२५/बुधवार

४. वसंत पंचमी: ०३-०२-२०२५/सोमवार

५. माघी पौर्णिमा: १२-०२-२०२५/बुधवार

६. महाशिवरात्री: २६-०२-२०२५/बुधवार

महाकुंभमेळा कधी संपणार?

महाकुंभमेळ्याचा समारोप महाशिवरात्रीला होणार आहे. यावर्षी २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. महाकुंभाचे शेवटचे शाही स्नानही याच दिवशी केले जाणार आहे.

 

Konkan Railway: होळीला सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल; चाकरमान्यांची चिंता वाढली

   Follow us on        

Konkan Railway: गणेश चतुर्थी नंतर कोकणातला मोठा सण म्हणजे शिमगोत्सव म्हणजेच होळी. अगदी तळकोकणापासून पालघर ठाणे पर्यंत ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. गणेश चतुर्थी प्रमाणेच हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातो. चाकरमान्यांचा मोठा वर्ग गावी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देतो.

यावर्षी होलिकाउत्सव मार्च १३ रोजी पासून सुरू होत आहे. मात्र या तारखे दरम्यानच्या जवळ जवळ सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने ज्या चाकरमान्यांना आरक्षण भेटले नाही त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. होळी आणि धूलिवंदन दिवशीच्या आणि आदल्या दिवशीच्या (१२,१३, १४ मार्च) तुतारी, कोकणकन्या, मांडवी, वंदे भारत, जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा – सावंतवाडी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेसची आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ दाखवत आहे.

नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांना अतिरिक्त गाड्यांची घोषणा होण्याची वाट पहावी लागणार आहे. अजूनपर्यंत रेल्वे प्रशासनाने कोणत्याही अतिरिक्त गाडीची घोषणा केली नाही आहे. मात्र या सणादरम्यान गाड्यांची आरक्षण स्थिती पाहता रेल्वे प्रशासनाला या मार्गावर जास्त गाड्या सोडाव्या लागणार आहेत.

 

 

रत्नागिरी: जि. प. शाळा टेरव क्रमांक १ येथे शैक्षणिक साहित्य वितरण

सेवा सहयोग फाउंडेशनचा उपक्रम

   Follow us on        

चिपळूण:- SS &C – Globe Op या कंपनीच्या माध्यमातून व सेवा सहयोग फाउंडेशन या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा टेरव क्रमांक १ या शाळेतील इयत्ता १ली ते ७ वीच्या १५१ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोटबुक व इतर शैक्षणिक साहित्याचे रविवार दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी दहा वाजता वितरण करण्यात आले.

तसेच श्री रुपेश श्याम कदम फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने वरील शाळेतील तसेच सुमन विद्यालय टेरव या शाळेतील मिळून २५८ विद्यार्थ्यां खाऊचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास मा.श्री. सुधाकर कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.रश्मी काणेकर, उपाध्यक्षा सौ. दिक्षिता मोहिते, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ.मानवी मेंगे, सौ.मानसी दाभोळकर, सौ. रूचीता हेमंत तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री.महेंद्र खांबे, टेरव वेतकोंड पोलीस पाटील सौ.वृषाली लाखण, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक मोने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. टेरव सारख्या ग्रामीण भागात SS &C – Globe Op या कंपनीच्या माध्यमातून सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल आभार व ऋण व्यक्त करण्यात आले.

पुण्याहून सिंधुदुर्गासाठी निघालेले विमान चीपी विमानतळावर न उतरता गोव्याला उतरले; कारण काय?

   Follow us on        

सिंधुदुर्ग : पुण्याहून सिंधुदुर्गातील चीपीसाठी निघालेले विमान सिंधुदुर्ग जिल्हय़ात न उतरवता ते चक्क गोव्याच्या दिशेने नेवून मोपा विमानतळावर उतरविण्यात आले. खराब हवामानामुळे धावपट्टीवर धुके असल्याच्या कारणाने निर्णय घेण्यात आला. या कारणाने आज प्रवास करणार्‍या ४५ प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

फ्लाय ९१ चे विमान पुणेहून सिंधुदुर्ग साठी  ४५ प्रवाशांना घेऊन निघाले. मात्र शनिवारी सकाळी चीपी विमानतळावर धुके असल्याने हे विमान गोवा मोपा विमानतळावर उतरण्यात आले व तिकडून प्रवाशांना कारने मोफत सिंधुदुर्गात आणण्यात आले. हवामान खराब असल्याचा अंदाज आल्याने हे विमान गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. या दरम्यान चिपी ते पुणे प्रवास करण्यासाठी  प्रवासी चिपी विमानतळावर दाखल झाले होते. मात्र विमान न आल्याने प्रवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

सिंधुदुर्गात येणारे विमान आज शनिवारी पुन्हा एकदा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आले .या विमानतळावर दिवसा येणारी विमाने खराब हवामानामुळे वारंवार रद्द करण्याची नामुष्की येत आहे याकरिता या विमानतळावर नाईट लँडिंग ची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी प्रवाशांकडून होत आहे.

 

 

Konkan Railway: रोहा स्थानकावर आजपासून थांबणार दहा एक्स्प्रेस

   Follow us on        
Konkan Railway: मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार रोहा स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर दहा गाड्यांना थांबे देण्याची अधिकृतपणे घोषणा केली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवार (ता. २५) पासून रोहा स्थानकात खालील एक्स्प्रेस थांबविण्यात येणार आहेत.
  • गाडी  क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्स्प्रेस ही गाडी दिनांक २६ जानेवारीपासून (वेळ ०३.०० – ०३.०२)
  • गाडी क्रमांक. १११०० मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २५ जानेवारीपासून ( वेळ २०.३० -२०.३२)
  • गाडी क्रमांक. २२६२९ दादर तिरुनेलवेली एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून  ( वेळ २३.१५ – २३.१७)
  • गाडी क्रमांक. २२६३० तिरुनेलवेली – दादर एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून  ( वेळ १२.१० – १२.१२)
  • गाडी क्रमांक.१२२१७ कोचुवेली-चंदिगड एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून   ( वेळ ०९.१५  – ०९.१७ )
  • गाडी क्रमांक. १२२१८ चंदिगड कोचुवेली एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून   ( वेळ ०९.२० – ०९.२२)
  • गाडी क्रमांक. २०९३१ कोचुवेली – इंदूर एक्स्प्रेस २५ जानेवारीपासून  ( वेळ १२.१० – १२.१२)
  • गाडी क्रमांक. २०९३२ इंदूर – कोचुवेली एक्स्प्रेस एक्स्प्रेस २९ जानेवारीपासून  ( वेळ १२.४५ – १२.४५ )
  • गाडी क्रमांक. २२४७५ हिसार -कोइम्बतूर एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून  ( वेळ १६.५० – १६.५२ )
  • गाडी क्रमांक. २२४७६ कोइम्बतूर-हिसार एक्सप्रेस २६जानेवारीपासून  (  वेळ १२.१० – १२.१२)
या गाड्या रोहा स्थानकावर थांबणार आहेत.
विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पाहिल्या गाडीचे स्वागत होणार 
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रोहा स्थानकावरील कोविड काळात काढून घेतलेले थांबे पूर्ववत करावेत यासाठी प्रयत्न केले होते. विद्यमान लोकसभा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने हे थांबे पुन्हा मिळाले आहेत. या गाड्यांच्या थांब्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते रोहा स्थानकावर आज गाडी क्रमांक. २०९३१ कोचुवेली – इंदूर एक्स्प्रेस या गाडीच्या आगमनावेळी होणार आहे.

Konkan Railway: कार्नाक रोड ओव्हर ब्रिज पुनर्बांधणीसाठी मध्य रेल्वेचा ६ दिवसांचा ब्लॉक; कोकण रेल्वेच्या गाड्यांवर परिणाम होणार

   Follow us on        
Konkan Railway:मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मशीद स्थानकांदरम्यान कार्नाक रोड ओव्हर ब्रिजच्या (आरओबी) पुनर्बांधणीसाठी सहा दिवसीय विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ओपन वेब गर्डर्स सुरू करण्यासाठी ब्लॉकची योजना आखण्यात आली आहे. या कामासाठी सलग सहा रात्रींसाठी दीर्घकालीन पॉवर आणि वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान मुंबई  लोकल सेवेबरोबर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या ब्लॉकचा कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर होणार परिणाम खालीलप्रमाणे
गाडी क्र. १२०५२  मडगाव जं. – मुंबई CSMT जनशताब्दी एक्स्प्रेसचा २५/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास  दादर समाप्त होईल.
गाडी क्र. २२१२०  मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेसचा  दिनांक २५/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर समाप्त होईल.
गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. – मुंबई सीएसएमटी चा दिनांक २५/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर स्थानकावर समाप्त होईल.
दिनांक २६/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं.  जनशताब्दी एक्सप्रेस आरंभ स्थानकावरून २० – ३० मिनिटांनी उशिराने निघेल
दिनांक २६/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. २२२२९  मुंबई सीएसएमटी – मडगाव जं.  वंदे भारत एक्सप्रेस आरंभ स्थानकावरून २० – ३० मिनिटांनी उशिराने निघेल
दिनांक २६/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. २२११९  मुंबई सीएसएमटी – मडगाव तेजस एक्सप्रेस आरंभ स्थानकावरून २० – ३० मिनिटांनी उशिराने निघेल
दिनांक २५/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. २०११२ कोकणकन्या एक्सप्रेस अर्धा तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
गाडी क्र. १२०५२  मडगाव  – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस चा दिनांक २६/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर स्थानकावर समाप्त होईल.
गाडी क्र. २२१२० मडगाव  – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस चा दिनांक २६/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर स्थानकावर समाप्त होईल.

चिपळूण: तिसर्‍या लुप लाइनच्या कामासाठी कोकण रेल्वेचा उद्या ब्लॉक; दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम

   Follow us on        

Konkan Railway: उद्या दिनांक २४/०१/२०२५ (शुक्रवार) रोजी चिपळूण स्थानकावर तिसर्‍या पॅसेंजर लूप लाईन च्या कामासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ब्लॉकचे रेल्वे सेवांवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:

दिनांक २४/०१/२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजर ही गाडी रत्नागिरी स्थानकावरून पुनर्नियोजित वेळेनुसार ०१:२५ तास उशिराने म्हणजे सकाळी ७.०० वाजता रत्नागिरीहून निघणार आहे.

दिनांक २३/०१/२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. १२२०२ कोचुवेली – लोकमान्य टिळक रत्नागिरी – चिपळूण विभागादरम्यान मर्यादित वेगाने म्हणजेच उशिराने चालविण्यात येणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search