Category Archives: कोकण

कोकणरत्न | संगीत दिग्दर्शक वसंत देसाई

कोकण गौरव – वसंत देसाई (जन्म : सोनावडे, सावंतवाडी, महाराष्ट्र, ९ जून, १९१२; – मुंबई, २२ डिसेंबर, १९७५) हे मराठी, तसेच अन्य भारतीय चित्रपटांस संगीत देणारे मराठी संगीतकार होते. त्यांनी दिलेल्या चालींनुळे त्यांचे नाव भारतात आणि परदेशांत अजरामर झाले आहे.

घरात सांज-सकाळ होणाऱ्या आणि गाव देवळात होणाऱ्या भजन-कीर्तनांमुळे छोट्या वसंताला संगीतात रुची निर्माण झाली. त्यातच गावात एक सर्कस आली; ती पाहिल्यावर त्यांना सर्कशीत कामे करून लोकांना आनंद स्यावे असे वाटू लागले. त्यासाठी त्यांणी गाव सोडले व ते कोल्हापूरला आले. सर्कशीत काम मिळाले नाही पण प्रभात फिल्म कंपनीत नोकरी मिळाली. त्यावेळी अयोध्येचा राजा या चित्रपटाची निर्मिती होत होती; गोविंदराव टेंबे संगीत देत होते. वसंत देसाईंनी त्यांचा साहाय्यक होण्याचे पत्करले. पुढे कंपनी कोल्हापूरहून पुण्याला आल्यावर वसंत देसाईही पुण्यात आले आणि त्यांना मास्तर कृष्णराव व केशवराव भोळे यादोन दिग्गज संगीतकारांचा सहवास लाभला. तेथेच वसंतराव संगीतातले स्वर, तान, फिरकी, आणि रसानुकृत भावदर्शन शिकले.

इ.स. १९४३ मध्ये वसंत देसाई यांनी राजकमल कलामंदिराच्या शकुंतला या पहिल्या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यांची ही संगीत कारकीर्द पुढे तीस वर्षे चालूच राहिली. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे ‘जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर]ांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती.

मुंबईतल्या एका अतिउंच इमारतीच्या लिफ्टच्या दारात अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

वसंत देसाई यांनी संगीत दिग्दर्शन दिलेले चित्रपट

अमर भूपाळी (मराठी)

आशीर्वाद (हिंदी)

गुड्डी (हिंदी)

गूंज उठी शहनाई (हिंदी)

झनक झनक पायल बाजे (हिंदी)

दो आँखे बारा हाथ (हिंदी)

राम जोशी (मराठी)

शकुंतला (हिंदी)

 

वसंत देसाई यांची संगीत असलेली मराठी नाटके

गीता गाती ज्ञानेश्वर

जय जय गौरीशंकर

देव दीनाघरी धावला

पंडितराज जगन्‍नाथ

प्रीतिसंगम

शाबास बिरबल

देह देवाचे मंदिर

 

सन्मान आणि पुरस्कार 

सरकारी संगीत दिग्दर्शक, महाराष्ट्र राज्य

पद्मश्री पुरस्कार, १९७१

 

माहिती स्त्रोत : विकिपीडिया 

 

Loading

Konkan Railway | पावसाळी वेळापत्रकाचा एलटीटी-मडगाव आणि तेजस एक्सप्रेसवर परिणाम; ‘हा’ बदल होणार

Konkan Railway News: जून महिन्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या पावसाळी वेळापत्रकानुसार चालविण्यात येतात. यावर्षी पावसाळी हंगामात कोकण रेल्वेने या मार्गावरील काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकानुसार पावसाळी वेळापत्रकाचा परिणाम खालील गाड्यांवर होणार असल्याचे जाहीर केले आहे. 
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक ११/०६/२०२३ ते २९/१०/२०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे. 
तसेच ही गाडी १०/०६/२०२३ (शनिवार) आणि ३१/१०/२०२३ (मंगळवार)  रद्द केली गेली आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १२/०६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे. 
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express 
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express 
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२३ ते २९/१०/२०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे. 
तसेच ही गाडी ३१/१०/२०२३ मंगळवारी रद्द केली गेली आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express 
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक ११/०६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे. 
दिनांक ०१/११/२०२३ पासून या दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत होईल असे जाहीर करण्यात आलेले आहे. 
टीप: सदर माहिती रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार देण्यात आलेली आहे. भविष्यात त्यामध्ये रेल्वे प्रशासनातर्फे काही बदल केला जाऊ शकतो. आपल्या प्रवासाची योजना आखताना कृपया रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी किंवा रेल्वे चौकशीच्या इतर पर्यायाचा वापर करावा.

Loading

चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी | कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार एक विशेष ट्रेन; एकूण ६ फेर्‍या

Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीच्या हंगामात गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.  चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे पूर्व रेल्वेच्या सहकार्याने एक वीकली समर स्पेशल गाडी चालविणार आहे. या गाडीच्या दोन्ही दिशेने एकूण ६ फेर्‍या सोडण्यात येतील. ही गाडी विशेष प्रवासी भाडे आकारून चालविण्यात येणार आहे. 

Train No. 09424 / 09423 Ahmedabad – Mangaluru Jn – Ahmedabad Weekly Special on Special Fare :

ही गाडी अहमदाबाद ते मंगळुरू स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे. 

Train No. 09424 Ahmedabad – Mangaluru Jn Weekly Special on Special Fare :

दिनांक ०९/०६/२०२३, १६/०६/२०२३, २३/०६/२०२३ शुक्रवारी ही गाडी अहमदाबाद या स्थानकावरुन संध्याकाळी १६:०० वाजता सुटेल ती दुसर्‍या दिवशी संध्याकाळी १९:४० वाजता मंगळुरू या स्थानकावर पोहोचेल.

Train No. 09423 Mangaluru Jn – Ahmedabad Weekly Special on Special Fare :

दिनांक १०/०६/२०२३, १७/०६/२०२३, २४/०६/२०२३ शनिवारी ही गाडी मंगळुरू या स्थानकावरुन रात्री २१:१० वाजता सुटेल ती तिसर्‍या दिवशी रात्री १:१५ वाजता अहमदाबाद या स्थानकावर पोहोचेल

या गाडीचे कोकणातील थांबे

वसई रोड, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, थिवी, करमाळी आणि मडगाव

डब्यांची संरचना

टू टायर एसी – 03 + इकॉनॉमी थ्री टायर एसी – 12 + स्लीपर – 03 + जनरल – 02 + एसएलआर – 01 + जेनेरेटर व्हॅन – 01 असे मिळून एकूण 22LHB डबे

Loading

Mumbai Goa Highway | या गतीने काम चालू राहिल्यास महामार्गाचे काम पूर्ण होण्यास डिसेंबर २०२५ उजाडेल – जनआक्रोश समिती

गणेश नवघरे | मुबंई गोवा महामार्गाची जनआक्रोश समितीच्यावतीने निरीक्षण व सर्व्हे शनिवार दिनांक ३ जुन रोजी करण्यात आले.केद्रींयमंञी नितीन गडकरी यांच्या म्हणन्यानुसार ३१ मे पर्यंत एक मार्गीका तर डिसेंबर २०२३ पर्यंत संपुर्ण महामार्ग पूर्ण केला जाईल असे आश्वासन दिले होते.परंतु महामार्गावर तसे काहीही पहायला मिळले नाही असे जनआक्रोष टीमचे म्हणने आहे. या पहाणी दौऱ्यासाठी NHAI चे अधिकारी तसेच जे. एन. म्हात्रे व कल्यान टोलवेचे ठेकेदार यांना सोबत घेऊन पळस्पे ते ईंदापुर असा पहाणी दौरा जनआक्रोश टीमचे सचिव रुपेश दर्गे व त्यांचे पदाधिकारी ऊपस्थित होते.

या रस्त्याच्याबाबत विचारणा करत असताना अधिकारी माञ ऊत्तर देण्यास टाळाटाळ करताना दिसुन येत आहेत असे माणगाव सचिव रमेशभाई ढेबे म्हणाले.

जनआक्रोश समितीकडून श्री.रुपेश दर्गे, श्री.अजय यादव,श्री.गणेश नवघरे,श्री.संजय जंगम,श्री. अनिल जोशी,श्री.अशोक देवरुखकर काका,श्री. रवींद्र पवार, श्री.संजय सावंत,श्री.अतुल चव्हाण,श्री.राज गुजर,श्री. निलेश घाग(CA),श्री. प्रकाश पालांडे,श्री.सचिन मुनगेकर, श्री.रमेशभाई ढेबे,श्री.सुधीर सापळे,श्री.रवींद्र सांगळे उपस्थित होते.

Loading

मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज; सुरक्षिततेसाठी केल्यात ‘या’ उपाययोजना.


Konkan Railway News |कोकण पट्टय़ातील डोंगराळ भाग आणि मोठ्या प्रमाणात पडणार पाऊस यामुळे कोकण रेल्वे मार्ग अत्यंत धोक्याचा बनतो. या कालावधीत अपघात टाळण्यासाठी या मार्गावर चालविण्यात येणार्‍या गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात येते,तसेच सर्व कर्मचाऱ्यांना सावधगिरी साठी मार्गदर्शक सूचना दिल्या जातात.यावर्षीही मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून सुरक्षितच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केलेल्या आहेत. गस्तीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नऊ स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी पुलांसाठी पूर चेतावणी देणारी यंत्रणा व चार ठिकाणी अॅनिमोमीटर बसवण्यात आले आहेत.

कोकण रेल्वेने ७४० किमी मार्गावर नियोजित सुरक्षा कामे पूर्ण केली आहेत. पाण्याच्या नाल्यांची साफसफाई आणि कलमांची तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणावर भू-सुरक्षा कार्ये राबवण्यात आल्याने, खड्डा पडण्याच्या आणि माती घसरण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे गाड्या सुरक्षितपणे चालवणे सुनिश्चित झाले आहे.

रेल्वे गाड्या सुरक्षितपणे चालवल्या जाव्यात यासाठी कोकण रेल्वे विहित मार्गदर्शक तत्त्वांनुसार मान्सून पेट्रोलिंग करण्य‍ात येते. पावसाळ्यात सुमारे ८४६ कर्मचारी कोकण रेल्वे मार्गावर गस्त घालणार आहेत. असुरक्षित ठिकाणे ओळखून चोवीस तास गस्त घातली जाणार असून, वॉचमन तैनात करण्यात येणार आहे.
रत्नागिरी आणि वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीची तरतूद असलेली सेल्फ प्रोपेल्ड एआरएमव्हीएस (अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन) सज्ज ठेवण्यात आली आहे. वेर्णा येथे एआरटी (अपघात निवारण ट्रेन) सज्ज ठेवण्यात आली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कार्यालय / स्थानकाशी संपर्क साधण्यासाठी सर्व सुरक्षा श्रेणी कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन प्रदान करण्यात आले आहेत. दोन्ही लोको पायलट आणि गार्ड ऑफ ट्रेन्सना वॉकी-टॉकी सेट प्रदान करण्यात आले आहेत. तसेच कोकण रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावर २५ वॅटचे व्हिएचएफ बेस स्टेशन आहे. हे ट्रेन क्रू तसेच ट्रेन क्रू आणि स्टेशन मास्टर यांच्यात वायरलेस संप्रेषण सक्षम करते. कोकण रेल्वे मार्गावर इमर्जन्सी कम्युनिकेशन (ईएमसी) सॉकेट्स सरासरी १ किमी अंतरावर प्रदान करण्यात आले आहेत. ज्यामुळे गस्तीवर, वॉचमन, लोको पायलट, गार्ड आणि इतर फील्ड मेंटेनन्स कर्मचारी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्टेशन मास्तर आणि नियंत्रण कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. १ आपत्कालीन संपर्कासाठी एआरएमव्हीमध्ये सॅटेलाइट फोन संपर्क प्रदान करण्यात आला आहे.

सिग्नल दृश्यमानता सुधारण्यासाठी कोकण रेल्वेवरील सर्व मुख्य सिग्नल पैलू आता एलईडीने बदलले आहेत. ९ स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत.
माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडपी या प्रदेशात पावसाची नोंद होईल आणि पावसाचा जोर वाढल्यास अधिकारी सतर्क करतील. पुलांसाठी पूर चेतावणी देणारी यंत्रणा ३ ठिकाणी प्रदान करण्यात आली आहे, उदा. काली नदी (माणगाव-वीर दरम्यान), सावित्री नदी (वीर-सापे वामणे दरम्यान), वाशिष्ठी नदी (चिपळूण-कामठे दरम्यान) आणि पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त झाल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करेल. चार ठिकाणी अॅनिमोमीटर बसवण्यात आले आहेत. उदा. पानवल मार्ग (रत्नागिरी-निवसर दरम्यान), मांडोवी पूल (थिवी-करमळी दरम्यान), झुआरी पूल (करमळी-वेर्णा) आणि शरावती पूल (होन्नावर-मानकी दरम्यान) वाऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी बसविण्यात आले आहेत.

या मार्गावर डोंगरकड्यांतून बोगदे तयार केले असून पुलांची संख्याही जास्त असल्याने वेगमर्यादा घालून गाड्या चालवल्या जाणार आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाकडून रोहा ते वीर ११० किमी प्रतितास, वीर ते कणकवली ७५ किमी प्रतितास, कणकवली ते उडपी ९० किमी प्रतितास, उडपी ते ठोकूर ११० किमी प्रतितास या वेगाने गाड्या चालणार आहेत.

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे. याशिवाय डोंगरकड्यांतून जाणार्‍या गाड्यांच्या वेगावरही निर्बंध येणार असल्याने प्रवासाच्या कालावधीत वाढ होईल.

Loading

सावधान | ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत आहे; कोकण किनारपट्टीला धोका

 

Cyclone Alert |अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ निर्माण झाल्याने देशाच्या किनारपट्टीसह इतर भागातही धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ असं नाव देण्यात आलं आहे. 

ताज्या माहितीनुसार  हा कमी दाबाचा पट्टा गोव्यापासून 920km किमी अंतरावर दक्षिण-पुर्व अरबी समुद्रात असून उत्त्तर दिशेने सरकत आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात तसेच महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील काही भागात चक्रिवादळाची शक्यता आहे. 

मान्सून आधी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने पावसावरही परिणाम झाला आहे.

 

Loading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सावंतवाडी – कुडाळात; असा आहे दौरा कार्यक्रम…

सिंधुदुर्ग | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  आज मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सकाळी 9.45 मोपा, विमानतळ गोवा येथे आगमन व मोटारीने जयप्रकाश चौक,सावंतवाडी जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण.

सकाळी 10.15 वाजता सावंतवाडी मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- जयप्रकाश चौक, सावंतवाडी.

सकाळी 11.30 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण.

दुपारी 12 वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- कुडाळ हायस्कुल कुडाळ.

दुपारी 2 वाजता कुडाळ हायस्कुल येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण.

दुपारी 2.30 वाजता मंत्री उदय सामंत, यांच्या निवासस्थानी, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव.

दुपारी 3.15 वाजता वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. सायं.

4 वाजता चिपी विमानतळ सिंधुदुर्ग येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Loading

शुक्रवारी सीएसएमटी मडगाव दरम्यान धावणार वन वे विशेष गाडी…

CSMT-Madgaon Special Train | कोकणरेल्वे मार्गावर शुक्रवारी दिनांक ०९ जून २०२३ रोजी एक वन वे विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.

Train No. 01149 Mumbai CSMT – Madagon Jn. One Way Special:

ही गाडी सकाळी 5:30 वाजता सीएसएमटी या स्थानकावरून सुटून मडगाव या स्थानकावर संध्याकाळी 17:20 वाजता पोहोचणार आहे.

या गाडीचे थांबे

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली सावंतवाडी रोड आणि करमाळी

डब्यांची संरचना

या गाडीच्या डब्यांची संरचना जनशताब्दी एक्सप्रेस प्रमाणे असणार आहे. विस्टाडोम – 01+ एसी चेअर कार – 03 + सेकंड सीटिंग – 10 + एसएलआर – 01 + जनरेटर कार – 01 असे मिळून एकूण 16 एलएचबी डब्यांसहित ही गाडी चालविण्यात येणार आहे. 

Loading

”… येथून जीवघेणा मुंबई गोवा महामार्ग सुरू होतो… ” मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीची घोषणा फलकांद्वारे जनजागृती. 

 

Mumbai Goa Highway | मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले आणि सुमार काम याविरोधात विविध उपक्रमातून आवाज उठवणाऱ्या मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने जनजागृती करण्यासाठी एक विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत मुंबई गोवा महामार्गावर महामार्गाच्या रखडलेल्या कामा विरोधात जनजागृती करणारे घोषणा फलक लावण्यात येणार आहेत. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते महाड महामार्गाच्या दुतर्फी ५० बॅनर लावले गेले आहेत. 

”पळस्पे ते महाड महामार्गाच्या दुतर्फी ५० बॅनर लावण्यात येत आहेत.झोपेचा सोंग घेऊन झोपलेल्याना आमच्या कोकणकरांच्या समस्या कळाव्यात व जास्तीत जास्त कोकणकर या आंदोलनात जोडले जावेत व स्थानिक जनतेपर्यंत जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वाना विनंती आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी वरील बॅनर आपल्या विभागात फोटोसहित लावले तर एक सहकार्य मिळेल.” असे समितीचे सचिव रुपेश दर्गे म्हणाले आहेत.

या अभियानाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली असून जनजागृती होवून अधिक चांगला परिणाम मिळणार आहे त्यामुळे दुसर्‍या टप्प्यात या अभियानाचे मुंबईत ठाणे व नवी मुंबई पालघर जिल्हा येथे ही नियोजन करण्याचे समितीने ठरवले आहे. जे प्रतिनिधी स्व-योगदानाने हे बॅनर आपल्या परिसरांत लावु इच्छित असतील त्यांना आपले नाव व फोटोसकट आपल्या घोषणाफलक लावु शकतात. त्यासाठी 8652505542 संपर्क साधण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

 

 

Loading

‘जन्मोजन्मी हीच पत्नी मिळूदे’; कुडाळात पुरुषांच्या वडाला फेऱ्या I समाजापुढे नवा आदर्श

सिंधुदुर्ग – जन्मोजन्मी हाच पती मिळावा, त्याच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटपौर्णिमेचे व्रत करते. पण जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून कुडाळमध्ये काही पुरुषांनी सुद्धा हे व्रत करून वडाला फेऱ्या मारल्या आहेत. यंदाचं नाही तर  गेली १४ वर्ष वट पोर्णिमेला ते व्रत करत आहेत. 
महिलांच्या बरोबरीने या पुरुषांनी वटवृक्षला फेऱ्या मारून आपल्या पत्नीप्रती आपली निष्ठा, आपलं प्रेम जपले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ संजय निगुडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १४ वर्षांपूर्वी हि परंपरा सुरु केली. कुडाळमध्ये श्री गवळदेव मंदिराकडे असलेल्या वटवृक्षाची पूजा करून त्याला फेऱ्या मारून हे व्रत पुरुषमंडळी सुद्धा करत आहेत. ही सर्व मंडळी आज सकाळी गवळदेव मंदिर इथं जमली. देवाला श्रीफळ ठेवून सांगणं करण्यात आले. त्यांनतर ब्राह्मणाच्या उपस्थितीत वटवृक्षाची पूजा करून त्याला सात फेरे मारण्यात आले. आपल्या पत्नीप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी प्रत्येक पुरुषाने हे व्रत करावे असे आवाहन यावेळी करण्यातआले.
पती-पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाक आहेत. दोघेही समान आहेत. पत्नी जर आपल्या पतीच्या आरोग्यासाठी, सौख्यासाठी हे व्रत करते तर आपल्या पत्नीचा सन्मान राखावा यासाठी महिलांप्रमाणे पुरुषांनी सुरु ठेवलेले व्रत खूप चांगले असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search