IRCTC Fake App : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने आपल्या सर्व वापरकर्त्यांना बनावट मोबाइल अॅप आणि वेबसाइटबद्दल चेतावणी दिली आहे. बनावट मोबाइल अॅप आणि वेबसाइट मूळ आयआरसीटीसी अॅप आणि वेबसाइटशी जवळून साम्य दाखवतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना या दोघांमधील फरक ओळखणे कठीण होते. प्रवाशांकडून संवेदनशील माहिती चोरून त्याचा दुरुपयोग करायचा स्कॅमर्सचा हेतू असून प्रवाशांनी हे अॅप आणि वेबसाईट वापरू नये असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
बनावट IRCTC अॅप ‘irctcconnect.apk’ नावाचे आहे आणि ते WhatsApp आणि Telegram सारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे प्रसारित केले जात आहे. स्कॅमर बनावट वेबसाइट किंवा बनावट अँप्लिकेशन च्या एपीके फाइलच्या लिंकसह संदेश पाठवत आहेत की IRCTC वरून रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी हीच खरी वेबसाइट किंवा अॅप आहे.
फसवणूक करणारे खोटे अँप्लिकेशन आणि वेबसाइट वापरून संवेदनशील नेट बँकिंग माहिती मिळवत आहेत, ज्यात UPI तपशील आणि संशयास्पद पीडितांकडून क्रेडिट/डेबिट कार्ड माहिती समाविष्ट आहे. IRCTC ने आपल्या वापरकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे आणि कोणतेही संशयास्पद अॅप डाउनलोड करू नका किंवा कोणत्याही संशयास्पद वेबसाइटला भेट देऊ नका. प्रवाशांनी Google Play Store किंवा Apple App Store वरील IRCTC चे अधिकृत Rail Connect Mobile Apps वापरावेत आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाइट https://irctc.co.in या वेबसाईटवरच आपले तिकीट आरक्षण करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Alert: It has been reported that a malicious and fake mobile app campaign is in circulation where some fraudsters are sending phishing links at a mass level and insisting users download fake ‘IRCTC Rail Connect’ mobile app to trick common citizens into fraudulent activities.…
रत्नागिरी: हातखंबा येथे डंपरने ट्रकला धडक दिल्याने एक जण जखमी झाला आहे .हातखंबा येथील ईश्वर धाब्यासमोर शुक्रवारी दिनांक ४ रोजी सकाळी ११ च्या सुमारास मागून येणाऱ्या डंपरने पुढे असणाऱ्या ट्रकला धडक देत अपघात केला. यात एकजण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
निवळीहुन हातखंब्याच्या दिशेने दोन्ही वाहने मार्गक्रमण करीत असताना ईश्वर धांब्यासमोर ट्रक (गाडी क्रमांक MH 14 BJ 4731) आला असता मागून येणारा डंपरने (क्रमांक-MH10CR-8970) धडक दिली. या अपघातात धडक देणाऱ्या डंपर चालक गणेश दिलीप मयेकर (वय 36 राहणार- पोमेंडी रत्नागिरी) हा स्वतः जखमी झाला. डंपरमधील जखमी चालकाला उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Mumbai Goa Highway :सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळी महामार्गाच्या परिस्थितीची पहाणी केली आहे. या पाहणी दरम्यान त्यांनी दुरुस्ती आणि काँक्रिटीकरणाचाही आढावा घेतला.
मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या १३ वर्षांपासून रखडले आहे. अनेक प्रयत्न करूनही रस्त्याचे काम मार्गी लागताना दिसत नाही. अशातच गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्याला ठिकठिकाणी भरमसाठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि कोकणातील प्रवाशांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी महामार्गाची पाहणी केली. रस्ते दुरस्तीसाठी सिमेंट बेस ट्रीटमेंट पद्धतीचा वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी इंदोर येथून यंत्र सामुग्री आणण्यात आली असून आणखीन काही यंत्र दोन दिवसांत दाखल होणार आहेत. या पद्धतीमुळे पावसातही रस्ता दुरुती करणे शक्य होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल आणि डिसेंबर अखेरपर्यंत दोन्ही मर्गिककेचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Mumbai : रत्नागिरीतील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर एक गंभीर आरोप केला आहे. बारसू आंदोलनासाठी बेंगळुरूतून फंडिग झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी पावसाळी अधिवेशनात बारसू आंदोलनाविषयी निवेदन सादर केले. यादरम्यान, त्यांनी बारसू प्रकल्प विरोधी आंदोलनासाठी बेंगळुरूतून पैसा मिळाला आहे असा गंभीर आरोप फडणवीस यांनी विधानभवनात केला आहे. बारसू आंदोलनात तेच तेच लोक प्रत्येक आंदोलनात कसे दिसतात? असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला.
” ज्यांना या देशाचा विकास नको आहे, तिचं माणसं…”
बारसू (Barsu)रिफानरीला विरोध म्हणून विरोधकांनी केलेल्या आंदोलनावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही लोक ज्यांना या देशाचा विकास नको आहे, तिचं माणसं आपल्याला आरेच्या आंदोलनात, बुलेट ट्रेनच्या आंदोलनात, तीच माणसं बारसूच्या आंदोलनात आणि यातील काही माणसं नर्मदेच्या आंदोलनात देखील होती असेही फडणवीस म्हणाले.
“माझा सवाल आहे की, आपण जर यांचा रेकॉर्ड ट्रेस केला तर वारंवार ही माणसं बंगळुरुला जातात. यांच्या अकाऊंटमध्ये तिथून पैसे येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रीनपीस ज्या संघटना आहे त्यावर आपल्याकडं बंदी घातलेली आहे. त्याचे जे माजी सदस्य आहेत. त्यांच्या संपर्कात हे लोक असतात. त्यामुळं हे फक्त गावकऱ्यांपुरतं मर्यादित नाही असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
बारसू आंदोलकांवरील लाठीचार्जचा आरोप फेटाळला…
पोलिसांनी बारसू आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “बारसू आंदोलनात ताब्यात घेतलेल्या नागरिकांना पोलिसांच्याच गाडीत बसवून त्यांच्या घरी सोडण्यात आलं. कोर्टात गेल्यानंतर कुठल्याही तक्रारदारानं मारहाण केल्याची आणि चुकीची वागणूक दिल्याची तक्रार केलेली नाही. त्यामुळं यावर होणारे आरोप योग्य नाहीत” असेही फडणवीस यांनी सांगितले.
Mumbai Goa Highway: सर्व कोकणवासीयांना खरोखरच शरम वाटावी, प्रशासनबद्दल चीड निर्माण व्हावी अशी एक रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही रील मुंबई गोवा महामार्गाच्या दयनीय अवस्थेसंबधी आहे.
“मी फक्त २० किलोमीटर गाडी चालवली तर माझ्या Nexon या दणकट गाडीची खूप वाईट अवस्था झाली. गाडीचा टायर एका खड्ड्यात आपटला, फुटला, रिंग खराब झाली आणि तो टायर वापरण्या योग्य राहिला नाही. कोकण वासियांनो तुमच्या सहन शक्तीला सलाम…हॅट्स ऑफ…” हा व्हिडिओ पोस्ट केला आहे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका यूट्युबरने.
कोकण वासियांनो या महामार्गाची स्थिती पाहता तुम्ही या राजकारणायांना गेली चार टर्म कसे काय निवडून दिले? का मते देता या लोकांना? असा प्रश्नही या रीलमध्ये विचारण्यात आला आहे.
Reel पाहण्यासाठी लिंक 👇🏻
कोकणकरांनो तुम्हाला Hatsoff आहे🙏 मी फक्त 20 Km गाडी या मुंबई गोवा हायवेवर चालवली तरी माझी ही हालत झाली. तुम्ही इतके वर्ष कसे काय सहन करत आहात हे खरंच समजण्या पलीकडे आहे🤦♂️😣 Nexon सारख्या दणकट गाडीची ही हालत होत असेल तर किती वाईट अवस्था असेल या हायवे ची…#jkv#mumbaigoa#kokanpic.twitter.com/Y4CKKaTs4R
— मराठी युट्युबर (Travel Vlogger) (@JeevanKadamVlog) August 3, 2023
Mumbai Goa Highway Accident :मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटामध्ये महामार्गाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात काल गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक कोसळून भीषण अपघात झाला.
महामार्गाच्या डाव्या बाजूला सुमारे पस्तीस फूट खोल हे दोन्ही ट्रक कोसळले होते. त्यातील एका ट्रकमध्ये तीन लोक अडकले होते. या घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच एक जण गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माशांचे जाळे घेऊन जाणारा एक आयशर ट्रक आणि कंटेनर यांच्यात हा अपघात झाला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला ट्रकने मागून धडक दिल्याने ही दोन्ही वाहने दरीत कोसळली. या घटनेचे वृत्त कळताच पोलीस ग्रामस्थ आणि खेड येथील मदत ग्रुपचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा हे रेस्क्यू ऑपरेशन संपले. येथील एका जखमीला खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची नोंद रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते. खेडचे पोलीस निरीक्षक भोयर आणि सहाय्यक निरीक्षक चव्हाण हे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
Konkan Railway News : नांदगाव रोड प्रवाशांसाठी रेल्वेकडून एक खुशखबर आहे. रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक ११००३/११००४ दादर – सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्स्प्रेस नांदगाव रोड स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर खाली दिलेल्या तारखांपासून तात्काळ थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना पूर्व काळात या गाडीला नांदगाव येथे थांबा होता. मात्र कोरोना लॉकडाउन मुळे हा थांबा बंद करण्यात आला होता. त्यानंतर तो आजपर्यंत चालू केला नाही होता. प्रवाशांनी वारंवार मागणी केल्याने हा थांबा पुन्हा देण्यात आला आहे.
उद्या दिनांक ४ ऑगस्ट पासून हि गाडी नांदगाव रोड या स्थानकावर थांबणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
नांदगाव रोड या स्थानकावर या गाडीची वेळ खालीलप्रमाणे असेल
Konkan Railway News :कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन काल दिनांक ०२ ऑगस्ट रोजी कोंकण विकास समितीने रेल्वे राज्य मंत्री मा. श्री. रावसाहेब दानवे, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक व विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई) यांच्याकडे काही महत्वाच्या मागण्यांसाठी निवेदन लेखी दिले आहे.
यातील एक मागणी म्हणजे ११००३/११००४ तुतारी एक्सप्रेसचे जुनाट डबे बदलून आधुनिक एलएचबी डबे Linke Hofmann Busch (LHB) वापरून ही गाडी चालवणे ही आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरामदायक व्हावा या हेतूने ही मागणी केली गेली आहे. या आधी मुंबई ते मडगाव दरम्यान धावणार्या कोकणकन्या एक्सप्रेस , मांडवी एक्सप्रेस, दिवा- सावंतवाडी तसेच एलटीटी-मडगाव या गाड्या एलएचबी कोच सहित धावत आहेत.
का होत आहे ही मागणी?
अधिक सुरक्षित: एलएचबी डबे जर्मन तंत्रज्ञानाचे असून ते लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टील पासून बनलेले आहेत.दोन ट्रेनची टक्कर जरी झाली किंवा रूळांवरून ट्रेन घसरली तरी या हलक्या डब्यांमुळे कमी जीवितहानी होते.
जलद प्रवास:हे डबे दर ताशी 130 कि.मी. वेगाने धावण्याच्या क्षमतेचे असतात. या कारणाने प्रवास जलद होतो
अधिक प्रवासी क्षमता :एलएचबी डबे पारंपारिक डब्यांपेक्षा 1.7 मीटरने लांब असल्याने त्यात जादा प्रवाशांना बसता येते.
मेन्टेनन्स कमी :रेल्वेच्या पारंपारिक डब्यांची दर 18 महिन्याला मेन्टेनन्स करावे लागते. तर नव्या एलएचबी डब्यांना दोन वर्षांतून एकदा मेन्टेनन्ससाठी कारखान्यात पाठवावे लागते.
आधुनिक तंत्रज्ञान :तसेच हे डबे नव्या थ्री फेज तंत्राचे असल्याने ‘हेड ऑन जनरेशन’साठी (ओएचईच्या वीजेवर डब्यातील वीज उपकरणे चालविणे ) अत्यंत योग्य असतात. आयसीएफचे जुने पारंपारिक कोच टू फेजचे असल्याने त्यात ‘हेड ऑन जनरेशन’ तंत्र वापरण्यासाठी सर्कीट बदल करावा लागतो. नव्या तंत्रज्ञानाच्या एलएचबी डब्यांसाठी हे ‘हेड ऑन जनरेशन’ तंत्र लागलीच वापरता येते.
अधिक आरामदायक :दोन्ही प्रकारच्या कोचची तुलना करता एलएचबी अधिक आरामदायक आहेत.
वरील सर्व बाबी लक्षात घेवून आम्ही ही मागणी करत असल्याचे कोंकण विकास समितीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
या मागणी व्यतिरिक्त २२११९/२२१२० तेजस एक्सप्रेस आणि ११०९९/१११०० लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना वैभववाडी रोड येथे थांबा देण्याची मागणी एका स्वतंत्र निवेदनात केली गेली आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री. जयवंत शंकरराव दरेकर व श्री. अक्षय मधुकर महापदी उपस्थित होते.
आझाद मैदान येथे काल दिनांक २ऑगष्ट २०२३ रोजी जनआक्रोश समितीने मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामा विरोधात धरणे आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान समितीने प्रशासना समोर आपल्या मागण्या ठेवून त्या मागण्या गणेश चतुर्थी पर्यंत पूर्ण न झाल्यास मोठे आंदोलन करू अशा इशारा दिला आहे.
मुबंई | गणेश नवगरे :मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील १३ वर्षापासून रखडले आहे.कोकणातील सर्व जनता या महामार्गावरून प्रवास करताना जिव मुठित घेऊन प्रवास करीत आहेतसदर महामार्गावर आजपर्यंत ३००० ते ३५०० कोकणकराना आपला प्राण गमवावा लागला आहे तर दहा हजार पेक्षा जास्त कोकणकर जखमी झाले आहेत.
मुंबई गोवा महामार्ग ३१ मे २०२३ पर्यन्त एक मार्गिका पूर्ण करण्यात येईल ऐसे आश्वासन सार्वजनिक मंत्री यांच्यावतीने देण्यात आले.परंतु ३१ मे पर्यंत कोकणकरांचा सुखकर प्रवास होईल अशा पद्धतीने खड़्डे देखील भरण्यात आले नाही.सद्यस्थितीत महामार्गाची दयनीय अवस्था असून महामार्ग मृत्युचा सापळा बनत चाललेला आहे.सार्वजनिक मंत्री यांच्याकडून देण्यात आलेल्या नविन तारखेनुसार गणेशोत्सव पूर्वी एक मार्गिका पूर्ण होईल याची शाश्वती दिसत नसल्याने आज आम्ही समस्त कोकणकरांच्या वतीने खालील मागण्यांसाठी आझाद मैदान येथे ऍड.सुभाष सुर्वे अध्यक्ष यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
१)मागील १३ वर्षांपासून रखडलेला महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा व त्वरित महामार्गावरील खड्डे भरण्यात यावेत.
२)महामार्गांवर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या कोकणकरांच्या नातेवाईकांना त्वरित मदत देण्यात यावी.
३) महामार्गाच्या कामात विलंब झाल्याने खर्चात वाढ किती प्रमाणात झाली व विलंब का झाला तसेच विलंब केलेल्या अधिकारी ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांची नावे कळावीत व रखडविण्यास कारणीभूत असलेल्या अधिकारी, ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांच्यावर फौजदारी दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात यावे.
४)मुंबई गोवा महामार्गाची श्वेतपत्रीका काढण्यात यावी.
५)महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोलनाके चालु करू नयेत.
६)मुंबई गोवा महामार्ग अपघातास कारणीभूत ठरत असल्याने मुंबई पुणे द्रूतगती महामार्गांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल आकारू नये.
७)महामार्गांवर ट्रॉमा सेंटर उभारण्यात यावेत.
वरील सर्व मागण्या गणेशोत्सवपूर्वी पूर्ण न झाल्यास समस्त कोकणकरांच्या वतीने पळस्पे ते झाराप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
Mumbai Goa Highway : ”सिधी-सिंगरौली तसेच मुंबई गोवा महामार्ग रखडल्याने आपणास अपराधीपणा वाटतो, मुंबई ते गोवा आणि देशातील सिधी-सिंगरौली महामार्गांवर एक पुस्तक लिहिता येईल” हे वक्तव्य आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे. ते बुधवारी राज्यसभेच्या कामकाजादरम्यान आपल्याच पक्षाच्या खासदाराच्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते.
भाजप खासदार अजय प्रताप यांनी गडकरींचे कौतुक करताना म्हटले की, संपूर्ण देशात त्यांची ख्याती आहे, मात्र सिधी-सिंगरौली रस्त्याबाबत तेथील जनता निराश झाली आहे. या प्रश्नावर सभापती जगदीप धनखड यांनीही हसू आले. गडकरींच्या वाहतूक क्षेत्रातील कामाचेही त्यांनी कौतुक केले. हसत हसत ते म्हणाले की, केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. विशेष गोष्ट म्हणजे नितीन गडकरी यांना फक्त सिधी-सिंगरौली या महामार्गाबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांनी स्वतःहून मुंबई गोवा महामार्गाचा उल्लेख केला आहे. ज्या प्रकारे त्यांनी उत्तर दिले त्यावरून त्यांची हतबलता दिसून आली आहे.
अपराधीपणा वाटतोय
मध्य प्रदेशचे भाजप खासदार अजय प्रताप सिंह यांच्या प्रश्नावर हसत गडकरी म्हणाले की, हे अगदी बरोबर आहे. याचे उत्तर देताना मलाही अपराधीपणा वाटतो. मुंबई ते गोवा आणि देशातील सिधी-सिंगरौली महामार्गांवर एक पुस्तक लिहिता येईल.