Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: स्वातंत्र्यदिनाच्या लांब सुट्टीसाठी मुंबई-सावंतवाडी विशेष गाड्या चालविण्यात याव्यात

   Follow us on        

मुंबई, ३० जुलै २०२५: येत्या १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यानच्या लांब सुट्टीच्या पार्श्वभूमीवर, कोकणमार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई ते सावंतवाडी मार्गावर विशेष गाड्या चालवाव्यात, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कडून करण्यात आली आहे.

मुंबई–कोकण दरम्यान धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस, वंदे भारत, तेजस, जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस यांसारख्या सर्व गाड्यांचे आरक्षण या काळात प्रचंड गर्दीमुळे प्रतीक्षा यादी अथवा “नो रूम” (REGRET) दाखवत आहेत.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जर वेळेवर अतिरिक्त गाड्यांची घोषणा झाली नाही, तर पनवेल, ठाणे, दादर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. याआधीही अशा लांब सुट्ट्यांमध्ये अपुरी रेल्वे व्यवस्था असल्याने रेल्वेरोको, दगडफेक आणि प्रवाशांना आरक्षित तिकीट असूनही चढता न आल्याच्या घटना घडल्या आहेत.

याआधीही प्रवाशांकडून अनेक वेळा विशेष गाड्यांची मागणी करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे यंदाच्या लांब सुट्टीसाठी सीएसएमटी–सावंतवाडी रोड आणि बांद्रा टर्मिनस–सावंतवाडी रोड दरम्यान विशेष गाड्यांची तातडीने घोषणा करावी, अशी प्रवाशांची आग्रही मागणी आहे.

विशेष गाड्या न सोडल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ई-मेल निवेदनाद्वारे समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.

 

कोकण रेल्वेची भरती – २०२५: सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागांतील पदांसाठी थेट मुलाखती

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागात कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर केली असून, जम्मू-काश्मीरमधील कटरा ते बनिहाल दरम्यानच्या युएसबीआरएल प्रकल्पासाठी ही भरती करण्यात येणार आहे. एकूण २८ पदांसाठी ही भरती असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या पदांमध्ये कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (JTA) साठी ४ जागा आणि टेक्निशियन पदासाठी २४ जागांचा समावेश आहे.

या पदांसाठी उमेदवारांना पाच वर्षांच्या ठराविक कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार असून कामकाज समाधानकारक राहिल्यास कालावधी वाढविण्याचा अधिकार कोकण रेल्वेकडे राहील. JTA पदासाठी पात्र उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, IT किंवा संगणक शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच रेल्वेमधील सिग्नल प्रणालीत किमान एक वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. टेक्निशियन पदासाठी ITI, B.Sc. किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा आवश्यक असून अनुभव नसलेल्या उमेदवारांना नियुक्तीनंतर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

JTA पदासाठी मासिक एकूण वेतन ₹४३,३८०/- इतके असेल, तर टेक्निशियनसाठी ₹३७,५००/- इतके वेतन ठरविण्यात आले आहे. त्याशिवाय नियुक्त उमेदवारांना विमा संरक्षण, आरोग्य विमा भत्ता, रेल्वे पास, विश्रांतीगृह, प्रवास भत्ता, सुट्ट्या यांसारख्या विविध सुविधा देण्यात येणार आहेत. उमेदवाराचे वय १ जुलै २०२५ रोजी ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

JTA पदासाठी मुलाखत ५ ऑगस्ट २०२५ रोजी, तर टेक्निशियन पदासाठी ७ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. दोन्ही मुलाखती सकाळी ९ ते १२ दरम्यान नोंदणीसह जम्मूतील त्रिन्ठा, ग्रानमोर येथील कोकण रेल्वेच्या प्रकल्प कार्यालयात पार पडतील. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे आणि स्वमोसताखत प्रतिंसह अर्जाचा नमुना भरून आणणे बंधनकारक आहे.

ही संधी केवळ तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी असून, कंत्राटी स्वरूपाची असल्याने उमेदवारांनी सर्व अटी व नियम समजून घेऊनच अर्ज करावा. या भरतीबाबत अधिक माहिती व अर्ज नमुना कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.konkanrailway.com उपलब्ध आहे.

कोकण रेल्वेच्या या भरतीमुळे तांत्रिक क्षेत्रातील तरुणांना उत्तम संधी उपलब्ध होणार असून जम्मू-काश्मीरमधील प्रकल्पावर कार्य करण्याचा अनुभव मिळणार आहे. ही भरती पारदर्शक पद्धतीने थेट मुलाखतीद्वारे पार पडणार असल्यामुळे पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

सावंतवाडी स्थानकात गाड्यांच्या थांब्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

   Follow us on        

सिंधुदुर्ग : सावंतवाडी रोड (ZBTT) रेल्वे स्थानकात पुन्हा गाड्यांचे थांबे सुरु करण्यात यावे, तसेच काही नव्या गाड्यांनाही थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. त्यांनी १७ जुलै २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवले असून स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्यांवर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

खासदार सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे की, कोविड-१९ महामारीपूर्वी १२२०१/१२२०२ (एलटीटी-कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेस) आणि १२४३४/१२४३१ (ह. निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम एक्सप्रेस) या गाड्यांचा सावंतवाडी स्थानकात नियमित थांबा होता. या थांब्यांमुळे स्थानिक प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा फायदा होत असे. मात्र, या थांब्यांच्या बंदीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

त्याचबरोबर १२१३३/१२१३४ (मंगलोर एक्सप्रेस) या गाडीला देखील सावंतवाडीत थांबा देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे मांडली आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात, कोकणात हजारो लोक प्रवास करतात आणि थांबा नसल्यामुळे प्रवासात अडचणी निर्माण होतात, असेही त्या म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयाकडे पुढील मागण्या मांडल्या आहेत:

  • गाडी क्र. १२२०१/१२२०२ आणि १२४३४/१२४३१ साठी सावंतवाडी येथे पुन्हा थांबा सुरू करावा

  • गाडी क्र. १२१३३/१२१३४ (मंगलोर एक्सप्रेस) साठी  सावंतवाडी येथे नवीन थांबा मंजूर करावा

या थांब्यामुळे स्थानिक जनतेच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण होतील आणि संपूर्ण कोकण परिसरात रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढेल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘शिवसेना एक्सप्रेस’

   Follow us on        

मुंबई, दि. २९: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेच्या वतीने एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘शिवसेना एक्सप्रेस’ नावाने मोफत विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येत असून, या सेवेमुळे अनेक चाकरमान्यांना वेळेवर आणि विनाखर्च आपल्या गावी गणपती साजरा करण्याची संधी मिळणार आहे.

ही विशेष रेल्वे २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकातून कुडाळकडे रवाना होणार आहे. मात्र ही मोफत सेवा फक्त पूर्वनियोजित बुकिंग केलेल्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असणार आहे. बुकिंगसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क साधता येईल.

 

या उपक्रमाचे आयोजन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९६६५८९६९६६ किंवा ९६६५२७०२३१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर अजून काही गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: गणेशोत्सव २०२५ दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता लक्षात घेता, प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाला अधिक सुलभ व आरामदायक करण्यासाठी कोकण रेल्वेने अजून काही अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या विशेषतः गणेशभक्त, सुट्टीसाठी कोकणात जाणारे प्रवासी आणि गावाकडची वाट धरू इच्छिणाऱ्यांसाठी नियोजित करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि त्यांना सुट्टीचा आनंद अधिक निर्बंधांशिवाय घेता येईल.

या विशेष गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग व थांबे यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१) क्रमांक ०११३१ / ०११३२ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (आठवड्यातून दोनदा): 

गाडी क्रमांक ०११३१ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष (आठवड्यातून दोनदा) २८/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०४/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी सकाळी ८:४५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी २२:२० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३२ सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (द्वि-साप्ताहिक) सावंतवाडी रोडवरून २८/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०४/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी २३:२० वाजता सुटेल. ही गाडी लोकमान्य टिळक (टी) येथे दुसऱ्या दिवशी १२:३० वाजता पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबेल.

रचना : एकूण २२ कोच = ३ टायर एसी – ०२ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरल – ०६ कोच, एसएलआर – ०२.

२) ट्रेन क्रमांक ०११३३ / ०११३४ दिवा जंक्शन – खेड – दिवा जंक्शन मेमू स्पेशल (दैनिक): 

गाडी क्रमांक ०११३३ दिवा जंक्शन – खेड मेमू स्पेशल (दैनिक) २२/०८/२०२५ ते ०८/०९/२०२५ पर्यंत दररोज दिवा जंक्शन येथून दुपारी १:४० वाजता सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी रात्री २०:०० वाजता खेड येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३४ खेड – दिवा जंक्शन मेमू स्पेशल (दैनिक) २३/०८/२०२५ ते ०९/०९/२०२५ पर्यंत दररोज सकाळी ८:०० वाजता खेड येथून निघेल. ही ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:०० वाजता दिवा जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी निलजे, तळोजा पंचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे,दिवाणखवती,कळंबणी बुद्रुक,येथे थांबेल.

रचना : एकूण 08 मेमू कोच.

३) गाडी क्रमांक ०१००४ / ०१००३ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष: )

गाडी क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष (दैनिक) दर रविवारी म्हणजे २४/०८/२०२५, ३१/०८/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६:०० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून दर सोमवारी म्हणजेच २५/०८/२०२५, ०१/०९/२०२५ आणि ०८/०९/२०२५ रोजी सकाळी ८:२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

थांबे – करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे

डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०३ कोच, ३ टायर एसी इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

या गाड्यांसाठी आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आली नसून लवकरच त्याची ती जाहीर करण्यात येणार आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडीच्या स्लीपर डब्यांत कायमस्वरूपी वाढ

   Follow us on        

Railway Updates: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून ह. निजामुद्दीन (दिल्ली) ते एर्नाकुलम (केरळ) दरम्यान चालणाऱ्या ‘दुरंतो एक्सप्रेस’ (गाडी क्रमांक १२२८४ / १२२८३) मध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डब्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

लांब पल्ल्याची ही गाडी साप्ताहिक स्वरूपात धावत कोकण रेल्वे मार्गे जाते. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मागणी लक्षात घेता, डब्यांची रचना पुढीलप्रमाणे बदलण्यात येत आहे:

 

   

सध्याची कोच रचना (एकूण १९ LHB डबे):
फर्स्ट एसी (1A) – ०१
सेकंड एसी (2A) – ०२
थर्ड एसी (3A) – १०
स्लीपर क्लास – ०३
पँट्री कार – ०१
जनरेटर कार – ०१
एसएलआर – ०१

सुधारित कोच रचना (एकूण २२ LHB डबे):
फर्स्ट एसी (1A) – ०१
सेकंड एसी (2A) – ०२
थर्ड एसी (3A) – १०
स्लीपर क्लास – ०६ (पूर्वीपेक्षा ३ डब्यांनी वाढ)
पँट्री कार – ०१
जनरेटर कार – ०१
एसएलआर – ०१

यामुळे प्रवाशांना विशेषतः स्लीपर प्रवर्गात अधिक जागा उपलब्ध होणार आहे.

सुधारित कोच रचना लागू होण्याच्या तारखा:
गाडी क्र. १२२८४ (ह. निजामुद्दीन – एर्नाकुलम) : दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ पासून
गाडी क्र. १२२८३ (एर्नाकुलम – ह. निजामुद्दीन) : दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ पासून

गाडीच्या मार्गातील थांबे, वेळापत्रक आणि इतर तपशीलांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES (National Train Enquiry System) मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा. प्रवाशांनी याबदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Konkan Railway: कार-ऑन-ट्रेन सेवा सध्या नकोच

   Follow us on        

Konkan Railway: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोलाड (महाराष्ट्र) – वर्ना (गोवा) दरम्यान जाहीर करण्यात आलेली Ro-Ro (Roll-on/Roll-off) कार-फेरी रेल्वे सेवा ही संकल्पना नाविन्यपूर्ण असली तरीही, सध्या ही सेवा सुरू करणे अत्यंत गैरसोयीचे आहे. म्हणून, ही सेवा तत्काळ रद्द करण्यात याव, त्याऐवजी, हीच वेळ, ट्रॅक स्लॉट, मनुष्यबळ आणि संसाधने वापरून अधिक प्रवासी विशेष गाड्या चालवाव्यात अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती तर्फे करण्यात आली आहे.

Ro-Ro सेवेसंदर्भातील मुख्य आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत:

१. वेळ आणि खर्चात फारसा फरक नाही:

रस्त्याने कोलाड ते वेर्णा प्रवासास सध्या १० ते १२ तास लागतात, तर Ro-Ro सेवेमुळे रेल्वेने १२ तासांचा प्रवास आहे. मात्र, ३ तासांपूर्वी पोहोचणे आणि गाडी लोडिंगची आवश्यकता असल्याने, एकूण वेळ वाचत नाही. त्यासोबतच ₹७,८७५ प्रति वाहन आणि प्रवाशांचे स्वतंत्र भाडे हा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नाही.

२. एका वाहनामागे फक्त ३ प्रवाशांची अट अव्यवहार्य:

गणपतीसारख्या सणामध्ये कुटुंबात ५ ते ७ सदस्य एकत्र प्रवास करतात. फक्त ३ प्रवाशांना परवानगी असल्याने उर्वरित सदस्यांसाठी स्वतंत्र प्रवासाची गरज भासते, आणि एकत्र प्रवासाचा हेतूचसाध्य होत नाही.

३. मर्यादित साधनसंपत्तीचा अपव्यय:

Ro-Ro गाडी चालवण्यासाठी लोको पायलट, सहायक, ट्रेन मॅनेजर आदींचा स्वतंत्र ताफा लागतो. हेच मनुष्यबळ आणि मार्ग वापरून एखादी पूर्ण प्रवासी गाडी चालवता आली असती, जी अधिक उपयोगी ठरली असती.

४. आधीच व्यापलेल्या मार्गावर आणखी भार:

कोकण रेल्वे मार्ग गणपती काळात अत्यंत गजबजलेला आणि तणावाखाली असतो. अशावेळी मालवाहतुकीसाठी वेगळी गाडी चालवणे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम करू शकते.

५. मधल्या स्थानकांवर चढ-उतार सुविधा नाही:

रो-रो सेवेसाठी कोलाड ते वेर्णा हा मार्ग थेट आहे. मार्गामध्ये कोणत्याही जिल्ह्यातील स्थानकांवर गाड्या लोड किंवा अनलोड करता येणार नाहीत, ज्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील प्रवाशांना याचा लाभच होणार नाही.

वरील गोष्टी लक्षात घेता, आपणास विनम्र विनंती आहे की:कोलाड–वेर्णा Ro-Ro सेवा रद्द करण्यात यावी, आणित्याऐवजी तिथे लागणारे स्लॉट, कर्मचारी आणि साधने वापरून अधिक प्रवासी विशेष गाड्या चालवाव्यात, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा थेट लाभ होईल.

आपण यावर गांभीर्याने विचार करून जनहितासाठी योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Konkan Railway: गणेशोत्सव विशेष गाड्यांच्या नियोजनात अनेक त्रुटी; रेल्वे प्रवासी समितीने वेधले लक्ष

   Follow us on        

Konkan Railway: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर सोडलेल्या गणपती विशेष गाड्यांची यादी प्रसिद्ध झाली. ही प्रवाशांना दिलासा देणारी बाब असली तरी या नियोजनात काही त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तरी, आपण याकडे लक्ष देऊन आणखी गणपती विशेष गाड्या सोडताना काही गोष्टींचा विचार करावा अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीतर्फे एका निवेदनातून करण्यात आली आहे. 

या निवेदनात समिती लिहिते….  

१. पुण्यातून सावंतवाडीसाठी एकही गाडी नाही. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला कोंकणाचे वावडे?

यंदा मध्य रेल्वे तर्फे २५० गणपती विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या मध्ये पुणे विभागातून केवळ १२ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ह्या १२ फेऱ्याही केवळ रत्नागिरीपर्यंतच असल्याने रत्नागिरी पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अद्यापही पुण्याहून आपल्या गावी जायला थेट रेल्वेगाडीची सोय नाही.

मात्र ह्याच पुणे विभागाने एप्रिल,मे,जून ह्या दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या म्हणून दानापूर, गोरखपूर, बनारस,गाझीपूर,जयपूर येथे तब्बल १९२ फेऱ्या चालवल्या होत्या. ह्यात अधोरेखित करणारी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या फेऱ्या ह्या महाराष्ट्रात नसून इतर राज्यात जाणाऱ्या आहेत. जर ह्या फेऱ्या ३ महिन्यांपूर्वी चालवल्या जात होत्या तर मग आताच पुणे विभागाकडे विशेष गाड्या चालवण्याची क्षमता नाही का असा प्रश्न उपस्थित होतो.

२. ⁠चिपळूणसाठी फक्त ८ डब्यांची मेमू. संपूर्ण अनारक्षित गाडीचा फायदा केवळ गाडी सुटण्याच्या स्थानकातील प्रवाशांनाच होतो; त्यापुढील स्थानकांत गाडीत चढताच येत नाही.

येत्या गणेशोत्सवात सोडलेली ०११५५/०११५६ दिवा चिपळूण दिवा मेमू म्हणजे कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स किंवा दादर येथूनच चिपळूणकरिता विशेष गाडी सोडण्याची आवश्यकत

चिपळूण गाडी दादर आणि ठाण्याला थांबलीच पाहिजे. अन्यथा एवढ्या कमी अंतराच्या प्रवासासाठी गिरगाव, लालबाग, परळ, दादर, माहिम, वरळी, अंधेरी, सांताक्रुज, बोरिवली, कांदिवली, भाईंदर, विरार, वसई, घाटकोपर, भांडुप, ठाणे परिसरातील प्रवासी दिवा किंवा पनवेलला गाडी बदलण्यास उत्सुक नसतात. अति गर्दीचे दिवस वगळता लोक या दिवा किंवा पनवेल गाडीने जाणे टाळतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादरहून सुटल्यास चिपळूण गाडी वर्षभर गर्दीने भरून धावेल.

 संपूर्ण अनारक्षित गाडीत असल्यामुळे वेळेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांना रेल्वेने आगाऊ आरक्षण करण्याचा पर्यायच दिलेला नाही. संपूर्ण अनारक्षित गाडी सुरुवातीच्या स्थानकातच पूर्णपणे भरत असल्यामुळे त्यापुढील स्थानकांतील प्रवाशांना या गाडीत जागा मिळत नाही. इतर स्थानकांवर केवळ गाड्यांची संख्या वाढलेली दिसते. त्याचा प्रवाशांना प्रत्यक्ष फायदा होत नाही. याउलट किमान काही आरक्षित डबे उपलब्ध असल्यास प्रवाशांना आपल्या जागेबाबत हमी मिळू शकते.

तसेच, ही दिलेली गाडीही केवळ आठ डब्यांची मेमू आहे. मुंबई ते कल्याण या ५५ किमीच्या मार्गावरही १२ डब्यांच्या गाड्या कमी पडत असून १५ किंवा १८ डब्यांची मागणी होत असताना दिवा चिपळूण या २३३ किमीसाठी भर गणेशोत्सवाच्या गर्दीच्या दिवसांत ८ डब्यांची गाडी देण्याची कल्पनाच चुकीची आहे. तसेच, खालील सीटच्या वरील भागात बसण्याची सोय नसणे तसेच, प्रत्येकी चार डब्यांमध्ये एक मोटार कोच असल्यामुळे मेमूची प्रवासी वहन क्षमता सामान्य गाडीपेक्षा ५०% कमी असते.

तरी, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादर येथूनच चिपळूणकरिता सामान्य द्वितीय श्रेणी आरक्षित, एसी चेअर कार तसेच सामान्य अनारक्षित डबे असलेली विशेष गाडी सोडावी. तसेच, ८ किंवा १२ डब्यांच्या मेमू न चालवता २२ डब्यांच्या गाड्याच चालवाव्यात.

३. ⁠गुजरातहून सावंतवाडीकरिता एकही गाडी नाही.

पश्चिम रेल्वेने गुजरातहून सोडलेल्या गाड्यांपैकी एकही गाडी सावंतवाडीपर्यंत जात नसल्यामुळे सध्या गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वापी, तर पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोईसर, पालघर विभागात राहणाऱ्या कोकणवासीयांना रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण भाग व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी एकही गणपती विशेष गाडी उपलब्ध नाही. तरी, पश्चिम रेल्वेने अहमदाबाद येथून सावंतवाडी किंवा पेडणेपर्यंत एखादी विशेष गाडी सोडण्याची आवश्यकता आहे.

४. मध्य रेल्वेतर्फे द्वितीय श्रेणी आरक्षित आणि एसी चेअर कार प्रकारातील एकही गाडी नाही

सर्व विशेष गाड्या विशेष दरांवर चालवल्या जात असल्यामुळे स्लीपर प्रकारातील डब्यांसाठी किमान ५०० किलोमीटरचे भाडे द्यावे लागते. त्यामुळे पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड अशा मुंबईपासून तुलनेने कमी अंतरावरील ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना दुपटीहून अधिक भाडे द्यावे लागते. उदा. ठाणे ते खेड प्रवासासाठी स्लीपर डब्याला सामान्य गाडीला प्रति प्रवासी १८५ रुपये आणि एसी थ्री टायरसाठी ५१५ रुपये भाडे असते तर विशेष गाडीला हेच भाडे स्लीपरला ३९० तर एसी थ्री टायरला १०६० रुपये द्यावे लागतात. हे नियमित गाडीपेक्षा दुपटीपेक्षा अधिक आहे.

म्हणूनच, दिवसा धावणाऱ्या सर्व गाडयांना सीटिंग आणि एसी चेअर कार डबे असावेत किंवा स्लीपर डबे सीटिंग म्हणून आणि एसी थ्री टायर डबे एसी चेअर कार म्हणून वापरावेत.

५. मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड विशेष गाडीच्या वारंवारतेत मागील वर्षीपेक्षा कपात 

मागील वर्षी पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल सावंतवाडी विशेष गाडी आठवड्यातून सहा दिवस सोडली होती. यावर्षी त्यात कपात करून ही गाडी आठवड्यातून केवळ चार दिवस सोडलेली आहे. परराज्यात भरभरून गाड्या सोडणाऱ्या पश्चिम रेल्वेला महाराष्ट्रात गाड्या सोडण्यासाठी साधनसंपत्ती (डबे, इंजिन, पिटलाईन,ई.) उपलब्ध नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. तरी, पश्चिम रेल्वे मुंबई विभागाने आणखी काही गाड्यांची व्यवस्था करावी. 

६. मागील वर्षी खेड येथून सोडलेल्या गाड्या केवळ पनवेल पर्यंतच होत्या. त्या ऐवजी या गाड्या मध्य रेल्वेवर दादर किंवा पश्चिम रेल्वेवर वसई रोड पर्यंत चालवाव्यात.

वरील निवेदन समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी संबधित रेल्वे कार्यालये आणि अधिकार्‍यांना पाठवले आहे. 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर ’कार ऑन ट्रेन’ सेवेची सुरवात; उद्यापासून बुकिंग चालू, संपूर्ण माहिती इथे वाचा

   Follow us on         रत्नागिरी: कोकण रेल्वेने सुरु केलेल्या ’रो-रो’ सेवेच्या यशस्वी प्रयोगानंतर, आता प्रथमच प्रवाशांसाठी ’कार ऑन ट्रेन’ ही अभिनव सेवा सुरू केली जात आहे. यामुळे आता तुम्ही स्वतः प्रवास करताना तुमची लाडकी कार थेट रेल्वेने कोकणात किंवा गोव्यात घेऊन जाऊ शकणार आहात.

ही सेवा येत्या २३ ऑगस्टपासून सुरू होणार असून, यासाठीचे आरक्षण २१ जुलै २०२५ पासून खुले होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव चाकरमान्यांसाठी खर्‍या अर्थाने ’चिंतामुक्त’ प्रवासाचा अनुभव देणारा ठरेल.

प्रवास भाडे
सुरवातीला  कोलाड (महाराष्ट्र) ते वेर्णा (गोवा) दोन्ही बाजूने फक्त अंतिम स्थानकांकरिता ही सेवा सुरु केली जाणार आहे. या सेवेसाठी प्रत्येक कारसाठी शुल्क ७ हजार ८७५ रुपये असणार असून बुकिंग करताना ४००० रुपये ( नोंदणी शुल्क) घेतले जाणार आहेत. उर्वरित रक्कम प्रवासाच्या दिवशी जमा करावी लागणार आहे. कारसोबत त्याच गाडीमध्ये तिघांना प्रवास करता येणार आहे. दोन प्रवाशांना ३ टायर एसी कोच मध्ये प्रति प्रवासी ९३५ रुपये तिकीट रक्कम आकारण्यात येणार आहे. तिसरा प्रवासी असल्यास त्यास स्लीपर कोच मध्ये सेकंड सीटिंगच्या प्रवास भाड्यात म्हणजे १९० रुपये आकारून प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. जर काही अतिरिक्त प्रवासी असतील त्यांना कोचमध्ये रिकाम्या जागा असतील तरच परवानगी दिली जाईल. त्यासाठी रेल्वे प्रशासन बांधील असणार नाही. प्रवासाच्या दिवशी, ग्राहकाने प्रस्थान वेळेच्या आधी दुपारी २:०० वाजेपर्यंत उपस्थित राहावे आणि मालवाहतुकीची उर्वरित रक्कम स्टेशनवर भरावी. जर प्रवासी आले नाहीत तर नोंदणी शुल्क जप्त केले जाईल

प्रवासाची वेळ
ही सेवा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान उपलब्ध असेल. या सेवेची सुरुवात कोलाड (महाराष्ट्र) येथून २३ ऑगस्ट २०२५ पासून तर वेर्णा (गोवा) येथून २४ ऑगस्ट २०२५ पासून होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता ही गाडी गोव्याच्या दिशेनं रवाना होणार असून ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता वेर्णा येथे पोहचेल. परतीच्या प्रवासातही ती वेर्णा येथून संध्याकाळी ५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता कोलाड येथे पोहोचेल. प्रवाशांना मात्र तीन तास अगोदर म्हणजे दुपारी २ वाजता आरंभ स्थानकांवर पोहचणे गरजेचे आहे.

सेवा कधीपासून सुरू?
– कोलाड (महाराष्ट्र) येथून: 23 ऑगस्ट 2025 पासून.
– वेर्णा (गोवा) येथून: 24 ऑगस्ट 2025 पासून.
– ही सेवा 11 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहील.

ही सेवा खालील दिवशी उपलब्ध असणार आहे.

आरक्षण कधी आणि कसे?

-बुकिंग सुरू: 21 जुलै 2025.
-बुकिंगची अंतिम तारीख: 13 ऑगस्ट 2025.

कोलाड-वेर्णा सेवेसाठी संपर्क
मुख्य वाणिज्य व्यवस्थापक यांचे कार्यालय
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
४था मजला, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर,
नवी मुंबई ४०० ६१४.
संपर्क क्रमांक ९००४४७०९७३

वेर्णा-कोलाड सेवेसाठी संपर्क
वेर्णा रेल्वे स्टेशन
वेर्णा, गोवा
संपर्क क्रमांक ९६८६६५६१६०

…तर प्रवास रद्द होईल
प्रत्येक ट्रिपची कमाल क्षमता ४० कारची असेल. रेकमध्ये २० वॅगन असतील आणि प्रत्येक वॅगनमध्ये दोन कार असतील. जर प्रत्येक ट्रिपमध्ये १६ कारपेक्षा कमी बुकिंग झाली तर त्यादिवसाची सेवा रद्द केली जाईल. अशा परिस्थितीत, ग्राहकाने भरलेले नोंदणी शुल्क कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून परत केले जाईल.

एकदा सेवा बुक केल्यानंतर रद्द करण्याची परवानगी नाही. जर केआरसीएल द्वारे सेवा चालवल्या जात नसतील, तर ग्राहकाने भरलेले नोंदणी शुल्क बुकिंगच्या वेळी ग्राहकाने दिलेल्या बँक खात्यात परत केले जाईल.

आवश्यक कागदपत्रे
(i) आधार कार्डची प्रत
(ii) पॅन कार्डची प्रत
(iii) गाडीच्या आरसी बुक/कार्डची प्रत
(iv) गाडीच्या वैध विम्याची प्रत

काय आहेत फायदे?
-मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांपासून सुटका.
– प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत.
– लांबच्या प्रवासात गाडी चालवण्याचा शारीरिक आणि मानसिक त्रास वाचणार.
– कोकणात किंवा गोव्यात फिरण्यासाठी स्वतःची गाडी उपलब्ध.

या सेवेच्या अधिक माहितीसाठी, www.konkanrailway.com ला भेट द्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Western Railway Ganpati Special Trains: पश्चिम रेल्वेची गणपती स्पेशल गाड्यांची यादी जाहीर; संपूर्ण माहिती इथे वाचा

   Follow us on        

Konkan Railway: यंदा कोकणात गणेश चतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेनेही खुशखबर दिली आहे. दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवादरम्यान कोकण रेल्वे मार्गावर नियमित गाडयांना होणारी गर्दी कमी करण्याच्या हेतूने पश्चिम रेल्वे यंदा मुंबईहून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविणार आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे

१) गाडी क्रमांक ०९०११ / ०९०१२ मुंबई सेंट्रल – ठोकूर – मुंबई सेंट्रल (साप्ताहिक) विशेष :

गाडी क्रमांक ०९०११ मुंबई सेंट्रल – ठोकूर साप्ताहिक विशेष मंगळवार, २६/०८/२०२५ आणि ०२/०९/२०२५ रोजी मुंबई सेंट्रलहून सकाळी ११:३० वाजता सुटेल. ही  गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:५० वाजता ठोकूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०९०१२ ठोकूर – मुंबई सेंट्रल साप्ताहिक विशेष बुधवार, २७/०८/२०२५ आणि ०३/०९/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता ठोकूरहून सुटेल. गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:१५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.

ही गाडी बोरीवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव,
कारवार, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, मुकांबिका रोड बयंदूर (एच), कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल स्टेशन.

रचना : एकूण २४ कोच = २ टायर एसी – १ कोच, ३ टायर एसी – १ कोच, स्लीपर – १६ कोच, जनरल – ४ डबे, एसएलआर – २.

२) गाडी क्रमांक ०९०१९ / ०९०२० मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल (आठवड्यातून ०४ दिवस) विशेष :

गाडी क्रमांक ०९०१९ मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड (आठवड्यातून ०४ दिवस) विशेष भाड्याने मुंबई सेंट्रलहून बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी म्हणजेच २२/०८/२०२५, २३/०८/२०२५, २४/०८/२०२५, २७/०८/२०२५, २९/०८/२०२५, ३०/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०५/०९/२०२५, ०६/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी रात्री ११:३० वाजता सुटेल. गाडी दुसऱ्या दिवशी ०२:३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०९०२० सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल (आठवड्यातून ०४ दिवस) ही विशेष भाडेपट्टा गुरुवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी म्हणजेच २३/०८/२०२५, २४/०८/२०२५, २५/०८/२०२५, २८/०८/२०२५, ३०/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०१/०९/२०२५, ०६/०९/२०२५, ०७/०९/२०२५ आणि ०८/०९/२०२५ रोजी सावंतवाडी रोडवरून सकाळी ४:५० वाजता सुटेल. गाडी त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.

ही गाडी बोरीवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्टेशन येथे थांबेल.

रचना : एकूण २४ कोच = २ टायर एसी – १ कोच, ३ टायर एसी – १ कोच, स्लीपर – १६ कोच, जनरल – ४ डबे, एसएलआर – २.

३) गाडी क्रमांक ०९०१५ / ०९०१६ वांद्रे (टी) – रत्नागिरी – वांद्रे (टी) (साप्ताहिक) विशेष :

गाडी क्रमांक ०९०१५ वांद्रे (टी) – रत्नागिरी (साप्ताहिक) विशेष गुरुवारी म्हणजेच २१/०८/२०२५, २८/०८/२०२५ आणि ०४/०९/२०२५ रोजी दुपारी २:२० वाजता वांद्रे (टी) येथून सुटेल. गाडी दुसऱ्या दिवशी ००:३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०९०१६ रत्नागिरी – वांद्रे (टी) (साप्ताहिक) विशेष शुक्रवारी म्हणजेच २२/०८/२०२५, २९/०८/२०२५ आणि ०५/०९/२०२५ रोजी दुपारी १:३० वाजता रत्नागिरी येथून सुटेल. त्याच दिवशी १२:३० वाजता ही गाडी वांद्रे (टी) येथे पोहोचेल.

ही गाडी बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकांवर थांबेल.

रचना : एकूण २२ एलएचबी कोच = दुसऱ्या आसनासाठी – २० कोच, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१.

४) गाडी क्रमांक ०९११४ / ०९११३ वडोदरा जंक्शन – रत्नागिरी – वडोदरा जंक्शन (साप्ताहिक) विशेष :

गाडी क्रमांक ०९११४ वडोदरा जंक्शन – रत्नागिरी (साप्ताहिक) विशेष मंगळवारी म्हणजेच २६/०८/२०२५ आणि ०२/०९/२०२५ रोजी रात्री ११:१५ वाजता वडोदरा जंक्शन येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी ००:३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०९११३ रत्नागिरी – वडोदरा जंक्शन (साप्ताहिक) विशेष रत्नागिरीहून बुधवारी म्हणजेच २७/०८/२०२५ आणि ०३/०९/२०२५ रोजी दुपारी १:३० वाजता सुटेल. त्याच दिवशी सायंकाळी ५:३० वाजता वडोदरा जंक्शन येथे पोहोचेल.

ही गाडी भरूच जंक्शन, सुरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकांवर थांबेल.

रचना : एकूण २१ एलएचबी कोच = फर्स्ट एसी – ०१ कोच, २ टियर एसी – ०२ कोच, ३ टियर एसी – ०४ कोच, ३ टियर एसी इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०६ कोच, जनरल – ०४ कोच, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१.

५) गाडी क्रमांक ०९११० / ०९१०९ विश्वामित्री – रत्नागिरी – विश्वामित्री (द्वि-साप्ताहिक) भाड्याने:

गाडी क्रमांक ०९११० विश्वामित्री – रत्नागिरी विशेष  बुधवार आणि शनिवारी म्हणजेच २३/०८/२०२५, २७/०८/२०२५, ३०/०८/२०२५, ०३/०९/२०२५ आणि ०६/०९/२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता विश्वामित्री येथून सुटेल. गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ००:३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०९१०९ रत्नागिरी – विश्वामित्री विशेष  रत्नागिरी येथून गुरुवार आणि रविवार म्हणजे २४/०८/२०२५, २८/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०२/०९/०२५ आणि ०२/०५९ रोजी ०१:३० वाजता सुटेल. गाडी त्याच दिवशी 17:30 वाजता विश्वामित्रीला पोहोचेल.

ही गाडी भरुच जंक्शन, सुरत, वलसाड, वापी, डहाणू रोड, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकांवर थांबेल.

रचना : एकूण २४ कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०१ कोच, स्लीपर – १६ कोच, जनरल – ०४ कोच, एसएलआर – ०२.

आरक्षण

गाडी क्रमांक ०९०१२, ०९०२०, ०९०१६, ०९११३ आणि ०९१०९ चे बुकिंग २३/०७/२०२५ रोजी सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम्स (पीआरएस), इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल.

वरील गाड्यांच्या थांब्या आणि वेळेबद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.प्रवाशांनी या सेवांचा लाभ घ्यावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search