Category Archives: कोकण रेल्वे
Konkan Railway News :मध्यरेल्वेच्या काही गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद आणि गर्दी लक्षात घेऊन काही गाड्यांच्या डब्यांत वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेतर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार एकूण 10 एक्सप्रेस गाड्यांमध्ये एकुण 34 (सर्व 10 गाड्यांचे मिळून) डबे कायमस्वरुपी वाढविण्यात येणार आहेत.
या गाड्यांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार्या नागपूर-मडगाव-नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीला एक थ्री टायर एसी आणि एक जनरल असे दोन अतिरिक्त डबे कायमस्वरूपासाठी जोडण्यात येणार आहेत.
Nagpur – Madgaon Jn Special (Bi-Weekly) 01139 या गाडीला दिनांक 14 ऑक्टोबर 2023 पासून तर
Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01140 या गाडीला दिनांक 15 ऑक्टोबर 2023 पासून हे अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.
या गाडीच्या डब्यांची सुधारित संरचना
2 Tier AC – 01, 3 Tier AC – 05, Sleeper – 11, General – 05, SLR-02 =एकूण 24 आयसिएफ कोच.
मध्य रेल्वे खालील १० एक्सप्रेस मध्ये १२/१०/२३ पासुन पुढे एकुण ३४ डब्बे कायमस्वरुपी
वाढवत आहे…१) २२१३९ पुणे अजनी एक्सप्रेस-
आधीचे डब्बे – १५ LHB
सुधारित डब्बे – २० LHB
२) २२१४० अजनी पुणे एक्सप्रेस-
आधीचे डब्बे – १५ LHB
सुधारित डब्बे – २० LHB
३) २२१४१ पुणे नागपूर एक्सप्रेस-… pic.twitter.com/ggfWyv4BNB— Central Railway (@Central_Railway) October 10, 2023
मालगाडी अपघातानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक चुकीच्या पद्धतीने हाताळली गेल्याचा आरोप..
मुंबई :गेल्या आठवड्यात कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती त्याचे कारण साफ आणि स्वच्छ होते. पनवेल स्टेशनच्या पुढे दोन फरलांगावरती नवीन पनवेल जुना पनवेलच्या पुलाखाली मालगाडी घसरली पण ही मालगाडी घसरण्याचे कारण आता पुढे येत आहे तेथे असलेल्या नाल्यावर टाकलेले पाच स्लीपर चुकीच्या पद्धतीने टाकले गेले होते त्या स्लीपर च्या वरती अचानक लोड आल्यामुळे रेल्वे रूळ वाकले आणि मालगाडी घसरली असे समजते परंतु त्याच वेळेला कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून जवळपास च्या लाईन वरून कोकण रेल्वेची दुसरी गाडी येत नव्हती अन्यथा हा अपघात भीषण असा झाला असता.
या अपघाताची पार्श्वभूमी अशी आहे अगोदर शनिवारपासून हार्बर लाइन मार्गावरती बेलापूर ते पनवेल मेगाब्लॉक घेण्यात आला होता आणि तो मेगाब्लॉक चालू असताना बेलापूर पासून रेल्वे मार्ग पनवेल पर्यंत बंद करण्यात आला होता. परंतु ज्या वेळेला अपघात घडला त्यावेळेला कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू झाली असती परंतु मालगाडीमुळे ही वाहतूक पुढे होऊ शकणार नव्हती याचे निदान स्पष्ट झाल्यानंतर त्वरित मेगा ब्लॉक रद्द करणे गरजेचे होते व कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाड्या पनवेल पर्यंत आणून तिथे रिकाम्या करून त्या गाड्या कर्जत उरण मार्गावर वळवून पुढे उभ्या करून ठेवता आल्या असत्या, परंतु हे न करता सरळ पुढे गाड्या येऊन देण्याचा मूर्खपणा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला यावर कोणाचाच लक्ष जात नाही आहे कसे? पनवेलच्या पुढे रेल्वे घसरली म्हणजे पनवेल पर्यंत गाड्या आरामात येऊ शकत होत्या .पनवेलला एकंदरीत तीन गाड्या येऊन लागू शकत होत्या या तीन गाड्या रिकाम्या करून पुन्हा कुठेतरी पुढे कर्जत उरण मार्गावरती पाठवून येणाऱ्या गाड्यांना पनवेल पर्यंत येऊ द्यायला पाहिजे होते व मेगाब्लॉक रद्द करून प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन चार वरून ठाणा गोरेगाव आणि सीएसटी वडाळा अशा लोकल सेवा चालू ठेवल्या पाहिजे होत्या परंतु मेगा ब्लॉक का रद्द केला गेला नाही ?तसेच या गाड्या पनवेल पर्यंत येऊ शकत होत्या पनवेलला त्या गाड्या रिकाम्या करून त्या गाड्या कर्जत उरण मार्गावरती नेऊन कुठेतरी सायडींगला उभ्या करून ठेवल्या पाहिजे होत्या तेवढी जर समय सुचकता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दाखवली असती तर किमान गणपतीला गावाला गेलेले सगळे चाकरमानी सुखरुप पणे पनवेल पर्यंत येऊ शकले असते आणि मेगा ब्लॉक रद्द केला असता तर पनवेल पासून पुढे प्रवास करून लोक सुखरूप घरी गेली असती.तीस तीस तास रखडपट्टी झाली नसती
त्यात आणखीन एक शहाणपणा केला तो म्हणजे जनशताब्दी एक्सप्रेस लोढा मिरज मार्गे वळवली त्यामुळे पनवेलच्या पुढे मडगाव पर्यंत ती गाडी कुठेही स्टॉप वर थांबणार नव्हती ती गाडी लोढा मिरज मार्गे मडगाव करून मडगावला गेली मडगावला गेल्यानंतर तिथे नेत्रावती एक्सप्रेस तिथल्या लोकांना पाच मिनिटांसाठी चुकली मडगावच्या अधिकाऱ्यांनी पाच मिनिटं नव्हे तर अर्धा तास तरी नेत्रावती एक्सप्रेस थांबवुन ठेवली असती तर मडगाव पासून ते चिपळूण पर्यंतच्या प्रवाशांना नेत्रावती मध्ये जागा करून घेता आली असती कारण गाडीचा खोळंबा झाल्यामुळे नेत्रावतीचीअनेक तिकिटे रद्द झालेली होती आणि प्रवास फक्त पाच तासाचा होता रेल्वेच्या ह्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे तिसपस्तिस तास मनस्ताप प्रवाशांनी का बरं सोसावा? याचे उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे आणि या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करणे गरजेचे आहे असे मला वाटते.
कोकण रेल्वेचे रेल्वे रूळ हार्बर लाइन मार्गावरती आज तीस वर्षे झाली अजून जोडलेले नाहीत ते जर जोडले असते तर गाडी ठाणा हार्बर मार्गे सुद्धा नेता आली असती याबाबतचे पत्र मी दोन ऑगस्ट २३ रोजी पा ठवलेले होते आता तरी गंभीर होऊन कोकण रेल्वे मार्ग हार्बर लाइन ला जोडला जावा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोकण रेल्वे वाशी ठाणा मार्गे सीएसटी पर्यंत पोहोचू शकते आपला एक शेअर कोकण रेल्वेचे भविष्य बदलू शकते.
मे महिन्यात गणपती मध्ये वाशी बेलापूर येथून थेट केरळ कन्याकुमारी पर्यंत गाड्या सोडता येतील गणपती मध्ये बेलापूर वाशी येथून थेट गाड्या सावंतवाडी चिपळूण रत्नागिरी ला सोडता येतील
श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर.
मोबाईल क्रमांक -9404135619
Konkan Railway News: कोकण रेल्वेवरील वीर, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि पेडणे स्थानकांवरील मॅन्युअल कोटा आरक्षण प्रणाली (क्यूआरएस/QRS) बुकिंग काउंटर कोरोनानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना संबंधित स्थानकांवरून आरक्षित तिकिटांचे व्यवहार करता येत नाहीत. काही ठिकाणी पोस्टात आरक्षण केंद्रे आहेत, परंतु ते आरक्षण सुरु होणेच्या वेळेत (सकाळी ८ वाजता) सुरू होत नसल्यामुळे व काही वेळा योग्य इंटरनेट कनेक्शन अभावी बंद असल्यामुळे प्रवाशांना तोही पर्याय उपलब्ध नाही.
याचाच विचार करून जल फाउंडेशनने वरील स्थानकांतील अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) बुकिंग काउंटरचे यूटीएस-कम-पीआरएस (UTS-cum-PRS) काउंटरमध्ये रूपांतर करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्र आज मंगळवार दि. ३ ऑक्टोबर, २०२३ रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात देण्यात आले. याबाबतची माहिती जल फाउंडेशन (कोकण विभाग) चे संस्थापक अध्यक्ष नितीन सखाराम जाधव यांनी दिली आहे.