Category Archives: ठाणे

​दु:खद: HSC परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू

   Follow us on        

डोंबिवली:मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील गर्दी आणि सुरक्षेच्या अभावामुळे आणखी एका तरुण विद्यार्थ्याचा बळी गेला आहे. डोंबिवली येथील रहिवासी असलेल्या १८ वर्षीय सोहम सचिन कठरे या विद्यार्थ्याचा मंगळवारी (१० फेब्रुवारी २०२६) सकाळी कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडल्याने मृत्यू झाला.

​सोहम आपल्या इंग्रजी विषयाच्या HSC (बारावी) बोर्ड परीक्षेसाठी कळव्याला जात होता. सकाळी सुमारे ९.१५ वाजता हा अपघात झाला. रेल्वे रुळांजवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळल्यानंतर त्याला तातडीने कळवा पोलिसांनी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सकाळी १०.३० वाजता त्याला मृत घोषित केले. विशेष म्हणजे, त्याची परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार होती.

​ठाणे रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी ‘अपघाती मृत्यू’ (ADR) नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु मुंबई लोकल ट्रेनमधील प्रचंड गर्दीमुळे असे अपघात सातत्याने घडत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

​या घटनेमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सुरक्षा उपाययोजना आणि गर्दी नियंत्रणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्र सरकारला टॅग करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सोहमच्या निधनामुळे कठरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण डोंबिवली परिसरात शोककळा पसरली आहे.

”मीरा-भाईंदरचा महापौर मराठीच हवा; अन्यथा…” मराठी एकीकरण समितीचा इशारा

   Follow us on        

मीरा-भाईंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदासाठी मराठी व्यक्तीचीच निवड व्हावी, अशी आक्रमक भूमिका मराठी एकीकरण समितीने घेतली आहे. समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला कडक इशारा दिला आहे.

काय म्हणाले गोवर्धन देशमुख?

देशमुख यांनी स्पष्ट केले की, मुंबईप्रमाणेच मीरा-भाईंदरमध्येही मराठी महापौर बसला पाहिजे. जर प्रशासनाने किंवा राजकीय पक्षांनी ‘अमराठी’ व्यक्तीला महापौर बनवण्याचा प्रयत्न केला, तर समिती गप्प बसणार नाही. त्यांनी पुढील मुद्दे मांडले:

रक्त सांडले तरी चालेल: “जर अमराठी महापौर बसवला, तर शहरात तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रसंगी रक्त सांडले तरी चालेल किंवा माझे बलिदान द्यावे लागले तरी मी मागे हटणार नाही,” असे भावनिक आणि आक्रमक आवाहन त्यांनी केले.

पर्याय उपलब्ध: भाजपमध्ये अनिता पाटील, ध्रुवकिशोर पाटील यांसारखे अनेक अनुभवी मराठी चेहरे आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना डावलून अमराठी व्यक्तीला संधी दिल्यास ते सहन केले जाणार नाही.

*दुसरा ‘संयुक्त महाराष्ट्र’ लढा: जर मराठी अस्मितेचा विचार केला नाही, तर मीरा-भाईंदरमध्ये दुसऱ्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यासारखे चित्र पाहायला मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रफुल्ल कदम यांचा बोलबाला! प्रभाग क्रमांक १३, विभाग “ड” मध्ये प्रचाराची रणधुमाळी!

   Follow us on        

संदेश जिमन /ठाणे: मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत महानगरपालिका निवडणूकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रचाराची धग शिगेला पोहोचली असताना त्यात एखाद्या अपक्ष उमेदवाराने जन सेवेची अपेक्षा ठेऊन प्रचारात आघाडी घ्यावी अशीच परिस्थिती ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १३ , “ड” विभागातील अपक्ष उमेदवार यांनी निर्माण केली आहे.

वाढता प्रतिसाद, सेवाभावी व्यक्तीमत्वाचा प्रभाव यामुळे जनतेचा प्रफुल्ल कदम यांच्यावरील विश्वास वाढतो आहे.

प्रफुल्ल कदम हे कोकणाचे सुपुत्र, त्यांनी सामाजिक कार्य करताना आजवर कोणत्याही मोठ्या पदाची अपेक्षा बाळगली नाही. शारीरिक शिक्षण , कराटे प्रशिक्षक म्हणून काम करत असताना सशक्त, जागृत समाज घडविण्यासाठी, सामान्य माणसाचा दबलेला आवाज सुस्त प्रशासना पर्यंत पोहचवण्यासाठी आपण निवडणूकीच्या रिंगणात दाखल झाल्याचे म्हटले आहे.

मुंबईत सध्यातरी मोठा प्रश्न आहे तो म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन, या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर लढाई करावी लागणार, हा काळ संघर्षाचा आहे. एकजुटीने लढलो तर विजय निश्चितच आपला आहे. म्हणून कायम सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा असणारा प्रतिनिधी निवडावा असे आवाहन प्रभागातील जनतेला प्रफुल्ल कदम यांनी केले आहे.

हा संघर्ष,ही लढाई सत्तेच्या मदमस्त सुखासाठी नाही तर ती हक्क, न्याय,सन्मान यासाठी आहे असा ठाम विश्वास प्रफुल्ल कदम यांनी मतदारांना दिला आहे. “केक” ही निशाणी आहे.

मतदारांनी मोठ्या संख्येने पाठींबा द्यावा असे त्यांनी नम्र आवाहन केले आहे.

निवडणूकीच्या रिंगणात नियोजित उद्देशाने येणारे , प्रचार आणि जनतेचा विश्वास यांच्या जोरावर निवडणूक जिंकतात. जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हाताळणाऱ्या उमेदवारांचे मनोरथ पूर्ण होईल असा विश्वास वाटतो आहे.

Thane: गणेशोत्सव रेल्वे आरक्षणासाठी ठाणे स्थानकावर दोन अतिरिक्त खिडक्या उघडणार

   Follow us on        

Thane: गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू होणार आहे. या खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेले 4 वर्ष लावून धरली होती. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संघटनेने ही मागणी नरेश म्हस्के यांच्याकडे करताच अवघ्या काही दिवसांतच हा प्रश्न मार्गी लागला आहे.

खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे 7 मे रोजी या संदर्भात पत्रव्यवहार केला. या पत्राची तातडीने दखल घेत 2 जून रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू करत असल्याची माहिती दिली आहे. 20 जून ते 5 जुलै 2025 या दरम्यान या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू राहणार आहेत.

सध्या 4 आरक्षण खिडक्या कार्यरत असून 2 अतिरिक्त खिडक्या सुरू होणार आहेत. 6 आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासियांची वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत रहावे लागणार नसल्याने प्रवासी संघटनेने आनंद व्यक्त केला आहे. आपल्या खासदारकीच्या पाहिल्याच टर्ममध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी अनेक रेल्वे विषयक प्रश्न मार्गी लावले असल्याबद्दल प्रवासी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.

 

ठाणे: फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग

   Follow us on        

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात संपुष्टात आणण्यासाठी कल्याण पश्चिमेतील सर्वात वर्दळीच्या सहजानंद चौकामध्ये केडीएमसी आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांतर्फे फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग राबविण्यात येत आहे.

सहजानंद चौकात असलेले 5 रस्त्यांचा विचार करता याठिकाणी सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील महिनाभर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ठेवून त्यातून येणाऱ्या निष्कर्षानंतर अभ्यास करून केडीएमसीतर्फे याठिकाणी कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सहजानंद चौकात कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मात्र इथल्या वाहतुकीचा, वर्दळीचा आणि वाहनांच्या संख्येचा अभ्यास न करता सिग्नल यंत्रणा बसवली गेल्यास केडीएमसीचा पैसा वाया जाऊ शकतो. कल्याणकरांच्या कराचा हा पैसा विचारात घेऊन कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने ही सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील 1 महिनाभर त्याद्वारे इथल्या वाहतुकीचा अभ्यास करण्यात येणार त्यासोबतच कोणते रस्ते वन वे करणे, कोणता डिव्हायडर मागे घेणे, कोणता हायमास्ट शिफ्ट करणे आदींचा विचारही केला जाणार आहे. आणि मग त्यानंतर या चौकाच्या आणि इथल्या वाहतुकीच्या अनुषंगाने कायमस्वरुपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. अशाच प्रकारची सिग्नल यंत्रणा नागपूर शहरात सुरू असून त्याचे चांगले रिझल्ट मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे यांचे अपघाती निधन

   Follow us on        

ठाणे, दि.23:-

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत असणाऱ्या सौ. पल्लवी सरोदे (वय 37 वर्ष) यांचे आज सकाळी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन झाले. कार्यालयीन मैत्रिणींसह त्या हरिहरेश्वर या ठिकाणी सहली निमित्त गेल्या होत्या. तेथील समुद्रकिनारी त्या लाटेत अचानक ओढल्या गेल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्वांच्याच मनाला चटक लावून गेली.

सौ.पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हा प्रशासनात 2012 रोजी लिपिक या पदावर रुजू झाल्या होत्या. मार्च 2024 मध्ये त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली होती. त्या सध्या जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या.

ठाणे जिल्हा प्रशासनासाठी अत्यंत दुर्दैवी घटना..

ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध असलेल्या, सर्वांना हसतमुखाने सर्व प्रकारची मदत करणाऱ्या, अतिशय सुस्वभावी, मेहनती, प्रामाणिक, कामात तत्पर, चेहऱ्यावर कायम स्मित हास्य असलेल्या पल्लवी सरोदे यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, अशी प्रार्थना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्ह्यातील इतर महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि ठाणे जिल्हा प्रशासनातील अन्य विविध शासकीय विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

स्व. सरोदे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे पती, सासू- सासरे आणि मुलगा (वय 13 वर्ष) असा त्यांचा परिवार आहे.

 

…. शेवटी ‘तो’ चुकीच्या मराठीत लिहिलेला बॅनर बदलण्यात आला..

   Follow us on        

डोंबिवली: समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून आपला आवाज योग्य ठिकाणी पोहोचवून प्रशासनाकडून झालेल्या चुका सुधारता येतात हे डोंबिवली मध्ये एका नागरिकाने सिद्ध केले आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर पादचारी पूल आणि सरकत्या जिन्यासाठी काम चालू असल्याच्या सुचनेचा बॅनर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लावण्यात आला होता. मात्र या बॅनर वर लिहिण्यात आलेली मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आली होती. त्यात बर्‍याच चुका होत्या.

ही गोष्ट अनुजा धाकरस नावाच्या महिलेने ‘एक्स’ माध्यमावर दिनांक १० फेब्रुवारी रोजीला पोस्ट करून मध्य रेल्वे आणि संबधित आस्थापनांना टॅग केले.

”हे कोणतं मराठी आहे??? रेल्वेमध्ये मराठी भाषिकांचा एवढा तुटवडा असावा का की २ ओळींची सूचना सुद्धा धड मराठीत लिहू शकत नाहीत?” अशा शब्दात ही पोस्ट करण्यात आली होती.

रेल्वे प्रशासनाने या प्रकारची दखल घेतली आणि दोन दिवसांतच या जागी चुका दुरुस्त केलेला बॅनर लावला.

धक्कादायक! ठाण्यात तब्बल ८१ शाळा बेकायदेशीर; यादी ईथे वाचा

(File Photo)

   Follow us on        

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा सुरू असलेल्या ८१ शाळांची यादी पालिकेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. यात एक मराठी, दोन हिंदी तर, ७८ इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दिवा परिसरात सर्वाधिक म्हणजे ५५ शाळा बेकायदा सुरू असल्याची बाब यादीतून समोर आली आहे. या शाळा तात्काळ बंद केल्या नाहीतर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई सुरू केलेली आहे.

ठाणे महापालिकेची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. वाढत्या नागरिकरणाबरोबरच शहरात बेकायदा शाळा सुरू करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात सुरू झाले आहेत. अशा बेकायदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊन त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी पालिका प्रशासन गेल्या काही वर्षांपासून बेकायदा शाळांची यादी जाहीर करत आहे. यंदाही पालिकेने शहरातील बेकायदा शाळांची यादी जाहीर केली असून त्यानुसार संपुर्ण पालिका क्षेत्रात ८१ शाळा बेकायदा सुरू असल्याचे उघड झाले आहे.दिवा परिसरात ५५ बेकायदा शाळा असल्याचे समोर आले,या शाळा तात्काळ बंद करण्याचा आदेश. नाहीतर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई सुरू केलेली आहे.

बेकायदेशीर शाळांची यादी

आरंभ इंग्लीश स्कूल, आगापे इंग्लिश स्कूल, नालंदा हिंदी विद्यालय, रेन्बो इंग्लिस स्कूल, सिम्बाॅयसेस हायस्कूल, जीवन इंग्लिश स्कूल, एम.एस इंग्लिश स्कूल, कुबेरेश्वर महादेव इंग्लिश स्कूल, आर.एल.पी हायस्कूल, आदर्श हायस्कूल, श्री. दत्तात्रय कृपा इंग्लिश स्कूल, एम.आर.पी इंग्लिश स्कूल, एस.एस. मेमोरियल इंग्लिश स्कूल, ओम साई इंग्लिश स्कूल, स्टार इंग्लिश हायस्कूल, श्री. विद्या ज्योती इंग्लिश स्कुल, केंब्रिज इंग्लिश स्कुल, पब्लिक इंग्लिश स्कूल, पब्लिक मराठी स्कूल, टिवकल स्टार इंग्लिश स्कूल, होली एंजल इंग्लिश स्कूल, आर्या गुरूकुल इंग्लिश स्कूल, सेंट सायमन हायस्कूल, शिवदिक्षा इंग्लिश स्कूल, श्री. राम कृष्णा इंग्लिश स्कूल, केंट व्हॅलो इंटरनॅशनल स्कूल, ब्रायटन इंटर नॅशनल इंग्लिश स्कूल, अक्षर इंग्लिश स्कूल, स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कूल, यंग मास्टर्स इंग्लिश स्कूल, स्मार्ट इंटरनॅशनल स्कूल, एस.एम. ब्रिल्ऐट इंग्लिश स्कूल, न्यु माॅर्डन स्कूल, एस.डी.के इंग्लिश स्कूल, डाॅन बाॅस्को स्कूल, मदर टच, लिटील विंगस, आर.म. फाॅउंडेशन, कुबेरेश्वर महादेव, जिनियस, ऑरबिट इंग्लिश स्कूल, जागृती विद्यालय सेमी इंग्लिश स्कूल, नंदछाया विद्यानिकेतन, सेंट सिमाॅन हायस्कूल, अलाहादी मक्तब ॲँड पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम), होलो ट्रोनेटो हायइंग्लिश स्कूल, एस.जी. इंग्लिश स्कूल, अलहिदाया पब्लिक स्कूल, ड्रिम वर्ल्ड इंग्लिश स्कूल, प्रभावती इंग्लिश स्कूल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, बुरहानी स्मार्ट चॅम्प, लिटील एंजल्स प्रायमरी स्कुल, आयेशा इंग्लिश प्रायमरी स्कूल, द कॅम्पेनियन हायस्कुल, इव्हा वर्ल्ड स्कूल, गुरूकूल ब्राईट ब्लर्ड स्कूल, खैबर इंग्लिश स्कूल, गौतम सिंघानिया स्कूल (घोडबंदर), झोरेज इंग्लिश ॲँड इस्लामिक स्कूल, अशरफी स्कूल, अल-हमद इंग्रजी स्कूल, ह्युमिनीटी पब्लिक स्कुल, आइशा इंग्लिश स्कूल, एम.एम. पब्लिक स्कूल, हसरा इंग्रजी ॲकेडमी अशी बेकायदा शाळाची यादी आहे.

मुंब्रा माफीनामा प्रकरणी दोन्ही बाजूने गुन्हे दाखल

   Follow us on        

ठाणे: मराठीची मागणी केली म्हणून तेथील जमावाने मराठी मुलाला माफी मागायला लावली आणि हा माफीचा विडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल केला होता. या प्रकरणाची मुंब्रा पोलिसांनी दखल घेतली असून या प्रकरणी दोषींवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट 

मुंब्रा येथे घडलेल्या प्रकरणी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी काल शुक्रवारी मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट देवून त्या जमावातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

मुंब्रा पोलिसांनी जाहीर केलेली प्रेसनोट

मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.०२/०१/२०२५ रोजी रोजी १५:३० वा.सु कौसा आयडियल मार्केट, अंबाजी मेडिकल समोर कौसा, मुंब्रा, ता. जि. ठाणे येथे एक मराठी युवक फळ विक्रेताकडुन फळे विकत घेताना फळविक्रेता यास मराठीत बोलण्याची विनंती केली असता फळविकत्याने मराठी युवकासोबत हुज्जत घातली होती. सदरवेळी फळ विक्रेता याने एस.डी.पी.आय. पक्षाचे पदाधिकाऱ्यांना बोलावुन गर्दी जमा केली तसेब सदर जमलेल्या गर्दीतील लोकांनी मराठी युवकास घेराव करून त्यास कान पकडुन माफी मागण्यास सांगीतली व सदरवेळी त्याचा हिडीओ बनवुन तो सोशल मिडीयावर प्रसारीत केला होता.

सदरचा हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत झाल्याने तसेच विविध न्युज चॅनेलवर प्रसारीत झाल्याने मराठी व हिंदी भाषीक यांच्यात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सदरचा व्हिडीओ मुंब्रा पोलीस स्टेशनला प्राप्त होताच त्यांनी नमुद प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेवुन सदर फळ विक्रेता शोएब मोहम्मद नसीम कुरेशी, व्हिडीओमधील एस.डी.पी.आय. पक्षाचे पदाधिकारी अब्दुल रहेमान दिलशाद अन्सारी, उजेर जाफर आलम शेख तसेब २० ते २५ अनोळखी इसम यांचे विरुध्द मुंब्रा पोलीस स्टेशन येथे सरकारतर्फे गु.र.नं.१२/२०२५ म.पो.का. कलम ३७ (३)१३५ प्रमाणे तसेच फिर्यादी मारूती गवळी यांचा जबाब नोंद करून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९६, १३५, ३५३(२), ३५१ (२) (३), ३५२, १२७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयातील आरोपीत यांची ओळख पटवुन त्यांचा शोध घेवुन त्यांचे विरुध्द सदर गुन्हयावे अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यावी तजविज ठेवण्यात आली आहे.

नमुद गुन्हयाच्या तपास मा. पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर वव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त श्री सुभाष बुरसे, सहा. पोलीस आयुक्त श्री उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सपोनि / लोंढे हे करीत आहेत.

मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ठाण्यावरून कल्याणला वळवली.. कारण काय?

   Follow us on        

मुंबई: आजची मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे ठाणे ते पनवेल दरम्यान तिच्या नियमित मार्गावरून वळविण्यात आली. या कारणाने पुढे तिचा गोव्याला जाणारा प्रवास ९० मिनिटे उशिराने झाला.

कोकणात जाणारी ही गाडी दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर पनवेल स्थानकाकडे जाण्याऐवजी सकाळी ६:१० वाजता कल्याण मार्गावरून निघाली.

या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील मुंबई लोकल सेवेवरही परिमाण झाला आणि या दरम्यानच्या लोकल गाड्यांनी लेटमार्क लावला.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, दिवा जंक्शनवरील कोकणात जाणार्‍या गाड्यांचा मार्गावर म्हणजे डाऊन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन दरम्यान पॉइंट क्रमांक १०३ वर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे ही घटना घडली.

ट्रेनने नियोजित मार्गावरून मार्ग बदलल्यानंतर, ती कल्याण स्टेशनला रवाना झाली आणि दिवा जंक्शनवर परत फिरविण्यात आली आणि दिवा-पनवेल मार्गावर मडगावकडे परत प्रवास सुरू केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नीला म्हणाले की, सकाळी ६:१० ते ६:४५ पर्यंत कल्याणकडे जाण्यापूर्वी ही गाडी दिवा जंक्शनवर सुमारे ३५ मिनिटे थांबली होती.

जून २०२३ मध्ये सुरू झालेली प्रीमियम सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबईतील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून सकाळी ५:२५ वाजता निघते आणि त्याच दिवशी दुपारी १:१० वाजता गोव्यातील मडगावला पोहोचते.

 

 

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search