Category Archives: देश

धक्कादायक: कोविशील्ड लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका; लस बनविणाऱ्या कंपनीची कबुली

   Follow us on        

Covishield Vaccine Side Effects:कोरोना महामारीपासून बचाव व्हावा यासाठी लोकांना लस देण्यात आली. दरम्यान यावेळी ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका लस लोकांना देण्यात आली होती. आपल्या भारतात अदार पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली होती. देशभरातील अनेकांनी ही लस घेतली. साथीच्या आजारानंतर जवळपास 4 वर्षांनी AstraZeneca ने आता कबूल केलंय की, या लसीचे लोकांमध्ये दुर्मिळ दुष्परिणाम दिसून येऊ शकतात.

कोविशील्ड लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका

एका कायदेशीर प्रकरणात, AstraZeneca ने कबूल केलं आहे की, कोविशील्ड आणि वॅक्सजेव्हरिया या ब्रँड नावाने जगभरात विकल्या जाणाऱ्या कोरोना लसीमुळे ब्लड क्लॉट्स होण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. याशिवाय यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. कंपनीने असंही सांगितलंय की, हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होईल आणि सामान्य लोकांना घाबरण्याची गरज नाही.

ब्रिटनमध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने AstraZeneca कंपनीविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, ॲस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर मेंदूला हानी पोहोचल्याचं दिसून आलं. इतर अनेक कुटुंबांनीही लसीच्या दुष्परिणामांबाबत न्यायालयात तक्रारी केल्या आहेत.

यूके उच्च न्यायालयात उत्तर देताना, कंपनीने मान्य केलंय की, अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्यांच्या लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) होऊ शकतो. यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. ही कबुली देऊनही कंपनी लोकांच्या भरपाईच्या मागणीला विरोध करत आहे. कंपनीचे म्हणण्यानुसार, इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यानंतर ही समस्या काही लोकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

AstraZeneca-Oxford ही लस सुरक्षिततेच्या कारणास्तव यूकेमध्ये दिली जात नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा दावा मान्य केल्यास कंपनीला मोठी रक्कम भरावी लागू शकते. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पहावं लागणार आहे.

Loading

प्रवाशांसाठी खुशखबर! रेल्वे देत आहे फक्त २० रुपयांत जेवण

   Follow us on        
Indian Railway News:आरक्षण डब्यात आणि एसी डब्यांमध्ये जेवण आणि पाणी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोरपोरेशन (आयआरसीटीसी) दिले जाते. परंतु जनरल डब्यात काहीच मिळत नाही. रेल्वेन जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार केला आहे. जनरल डब्यात स्वस्तात जेवण आणि पाणी दिले जाणार आहे. 20 आणि 50 रुपयांत जेवण दिले जाणार असून तीन रुपयांत पाण्याचा ग्लास दिला जाणार आहे.
उन्हाळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोरपोरेशनच्या मदतीने जनरल डब्ब्यामध्ये स्वस्त दरामध्ये जेवण आणि नास्ता दिला जाणार आहे. रेल्वेत परवडणारे जेवण 20 रुपयांत असणार आहे. तसेच 50 रुपयांत जेवण मिळणार आहे.
जेवणात काय काय असणार?
सर्वसामान्य डब्यांजवळ रेल्वे स्थानकावर असलेल्या काउंटरवर हे जेवण मिळणार आहे. त्यात
20 रुपयांमध्ये मिळणाऱ्या इकोनॉमी जेवणात सात पुऱ्या (175 ग्रॅम), बटाट्याची भाजी (150 ग्रॅम) आणि लोणचे देणार आहे. तर 50 रुपयांत (कॉम्बो पॅक) मिळणाऱ्या जेवणाच्या पाकिटात राजमा, छोले, भात, खिचडी, पावभाजी, मसाले डोसा दिले जाणार आहे. 350 ग्रॅम हे जेवण असणार आहे. सर्वसाधारण प्रवाशांना परवडणाऱ्या या जेवणाची गुणवत्ता आणि स्वच्छतेकडे लक्ष दिले जाणार आहे.

Loading

Breaking | लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाची यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील 16 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.”

ठाकरेंचे कोणते शिलेदार लोकसभेच्या रिंगणात? 

  • बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
  • यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
  • मावळ – संजोग वाघेरे-पाटील
  • सांगली -चंद्रहार पाटील
  • हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
  • छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
  • धाराशिव – ओमराजे निंबाळकर
  • शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
  • नाशिक – राजाभाई वाजे
  • रायगड – अनंत गीते
  • सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
  • ठाणे – राजन विचारे
  • मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
  • मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
  • मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
  • परभणी – संजय जाधव
  • मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई 

 

Loading

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; तुमच्या मतदार संघात कोणत्या दिवशी निवडणुक? जाणून घ्या ईथे

Loksabha Election Updates:देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आज निवडणुकांची घोषणा केली आहे. एकूण ७ टप्प्यात देशात मतदान पार पडणार आहे. या सात टप्प्यांमध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?👇◾️

◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे.

चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार आहे

पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे.

सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे रोजी होणार आहे.

सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. तर ०४ जूनला मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की १.८२ कोटी तरुण मतदार मतदान करणार आहेत. 18 ते 29 वयोगटातील 21.5 लाख मतदार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी यंदा देशात ९७ कोटीहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. यासाठी ५५ लाखापेक्षा जास्त ईव्हीएम तयार आहेत. यासाठी देशात दीड कोटी निवडणूक अधिकारी काम करणार आहेत. १६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी दिली आहे.

Loading

Breaking | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; यादीत महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचा समावेश

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे. नितीन गडकरी यांना नागपूर, नगरमधून सुजय-विखे पाटील, माढामधून रणजीत निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड पंकज मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारत पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित

 

Loading

Vande Bharat Sleeper | रेल्वेमंत्र्यांनी केले वंदे भारत स्लीपरच्या कारबॉडीचे उद्घाटन; सुविधांच्या बाबतीत ठरणार राजधानी एक्सप्रेसपेक्षाही सरस

Vande Bharat Sleeper Train: भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ने पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेस स्लीपर गाडीचे उत्पादन सुरू केले आहे. ही गाडी प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करतीलच आणि  प्रवाशांना आराम आणि सुविधा देतील .उत्तम बर्थ, सेन्सर-आधारित प्रकाश आणि सुधारित रात्रीची प्रकाशयोजना अशा एकूण १० वैशिष्ट्यांसह ही गाडी  राजधानी एक्स्प्रेस गाड्यांच्या मानकांना मागे टाकणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी (9 मार्च) बंगळुरूमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनसेटच्या कारबॉडी स्ट्रक्चरचे उद्घाटन केले. हा ट्रेनसेट भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ने त्यांच्या बंगळुरू येथील रेल्वे युनिटमध्ये तयार केला आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, वंदे भारत स्लीपरमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करण्यात आले आहेत. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन बर्थच्या दरम्यान योग्य उंची देता यावी यासाठी खास छताची रचना करण्यात आली आहे. वातानुकूलन सुधारले आहे.
याशिवाय ट्रेनमध्ये व्हायरस नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. जी 99.99% व्हायरस नष्ट करेल. ट्रेनमध्ये कोणतेही धक्के, आवाज आणि कंपन होणार नाहीत. कारबॉडी पूर्ण आहे. आता फर्निशिंग करायची आहे, त्यानंतर लवकरच ट्रेन सुरू होईल.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचा वेग ताशी 160 किमी असेल
स्लीपर वंदे भारत हे कंसोर्टियम म्हणजेच दोन कंपन्यांनी मिळून बांधले आहे. यामध्ये रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) आणि रशियाच्या TMH समूहाचा समावेश आहे. या संघाने 200 पैकी 120 स्लीपर वंदे भारत चालवण्यासाठी सर्वात कमी बोली लावली होती. उर्वरित 80 गाड्या टिटागड वॅगन्स आणि भेल यांच्या संघाद्वारे पुरवल्या जातील.
RVNL GM (मेकॅनिकल) आलोक कुमार मिश्रा यांनी ऑगस्ट 2023 मध्ये सांगितले होते की वंदे भारत स्लीपर ट्रेनचा वेग ताशी 160 किमी असेल. यात 11 एसी3, चार एसी2 आणि एक एसी1 कोच असे 16 डबे असतील. ते म्हणाले की, कोचची संख्या 20 किंवा 24 पर्यंत वाढवता येऊ शकते.

Loading

या रेल्वे स्थानकावर प्रवासी तिकीट खरेदी करतात मात्र प्रवास करत नाही; नेमके कारण काय?

दक्षिण भारतात एक रेल्वे स्थानक आहे. जिथे दररोज 60 हून अधिक तिकिटे खरेदी केली जातात, परंतु प्रवासासाठी कोणीही त्यांचा वापर करत नाही. जर ते प्रवास करत नसतील तर ते तिकीट का घेतात असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर मग या प्रश्नाचे उत्तरही खाली वाचूया.
तेलंगणा राज्यात वारंगल जिल्ह्यातील नरसंपेटा मतदारसंघासाठी नेकोंडा रेल्वे स्टेशन हे एकमेव थांबा आहे. परंतु तिरुपती, हैदराबाद, दिल्ली आणि शिर्डी यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना जाणाऱ्या गाड्या तिथे थांबत नाहीत, ज्यामुळे प्रवास करू इच्छिणाऱ्या रहिवाशांना अडचणी येतात. पद्मावती एक्स्प्रेसचा परतीचा प्रवासही रद्द करण्यात आला, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली होती.
प्रवाशांच्या वारंवार विनंती केल्यामुळे अलीकडेच सिकंदराबाद ते गुंटूर या इंटरसिटी एक्स्प्रेसला नेकोंडा येथे तात्पुरता थांबा देण्यात आला. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांनी एक अट घातली आहे: तीन महिन्यांसाठी उत्पन्न मिळाल्यासच ते पूर्ण थांबा देतील; अन्यथा, ते ते रद्द करतील.
मग काय? कसाबसा मिळालेला हा थांबा न गमावण्याचा निर्धार असलेले नेकोंडा येथील सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्याची त्यांनी ‘नेकोंडा टाउन रेल्वे तिकीट फोरम’ नावाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला, ज्यामध्ये सुमारे 400 लोक सदस्य म्हणून सामील झाले. त्यांनी रु. 25 हजार रुपये देणगीद्वारे जमा केले. या रकमेतून ते  याद्वारे ते नेकोंडा ते खम्मम, सिकंदराबाद आणि इतर ठिकाणी दररोज रेल्वे तिकीट खरेदी करतात मात्र प्रवास करत नाहीत.
स्थानकाला उत्पन्न दाखवण्यासाठी ते असे करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्टेशनवर अधिक गाड्या थांबवण्याच्या दिशेने काम करण्याची त्यांची योजना आहे.

Loading

भारतीय रेल्वे मंडळात ५६९६ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी शेवटचे २ दिवस बाकी

 RRB Bharti 2024: भारतीय रेल्वे मंडळने असिस्टंट लोको पायलट (ALP) या पदांसाठी ५६९६ जागांसाठी भरती करण्याचे जाहीर केले आहे. त्यासंबंधी जाहिरात सुध्दा प्रसिदध करण्यात आली आहे.  योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.  अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी  २०२४ आहे. 
  • अर्ज करण्याचे माध्यम -ऑनलाइन
  • एकूण पदसंख्या – ५६९६ पदे
  • संस्था – भारतीय रेल्वे मंडळ
  • नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
  • शेवटची दिनांक – ३१ जानेवारी २०२४
  • जाहिरात दिनांक – जानेवारी २०२४
  • भरती प्रकार – सरकारी
  • निवड मध्यम (Selection Process) –
  • अधिकृत वेबसाईट www.indianrailways.gov.इन
  • पद- असिस्टंट लोको पायलट (ALP)
  • पदसंख्या – ५६९६
  • शैक्षणिक योग्यता/ Eligibility Criteria: – असिस्टंट लोको पायलट (ALP): १० वी उत्तीर्ण आणि ITI.
  • वेतन/ पगार/ Pay Scale: -असिस्टंट लोको पायलट (ALP): वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
  • वय मर्यादा/ Age Limit: या तारखेप्रमाणे: 2024 रोजी.
  • कमीत कमी: १८ वर्ष.
  • जास्तीत जास्त: ३० वर्ष.
  • वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

 

भरतीची जाहिरात

Loading

महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकवून देण्यासाठी आपले मत महत्वाचे; ‘असे’ देता येईल मत

मुंबई: कर्तव्यपथावरील संचलनात आज अनेक नेत्रदीपक चित्ररथ समाविष्ट झाले होते. या सर्व चित्ररथातील विजेता चित्ररथ निवडण्यासाठी जनतेकडून मते मागविण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्यातर्फे ‘छत्रपतीशिवाजीमहाराज : लोकशाहीचे जनक’ या विषयावर अतिशय चित्त वेधक आणि नितांत सुंदर असा चित्ररथ कर्तव्यपथावरील संचलनात सहभागी झाला. या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी आता आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे सर्वानी आपले मत नोंदवून या राज्याच्या चित्ररथाला जिंकवून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचनालय तर्फे काण्यात आले आहे.
उद्या २७ जानेवारी सायं. ५.३० पर्यंत हे मतदान आपणास करता येणार आहे.
कसे नोंदवाल मत?
👇मार्ग पहिला :-
स्वत:च्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावरून MYGOVPOLL(स्पेस)344521(comma) 9 असा संदेश 7738299899 या क्रमांकावर पाठवावा.
म्हणजेच हा मेसेज खालील प्रमाणे होईल
MYGOVPOLL 344521,9 
👇मार्ग दुसरा :-
प्रथमत: https://mygov.in/group-poll/vote-your-favourite-tableau-republic-day-2024/ या लिंकवर क्लिक करुन लॉगिन करा. त्यानंतर महाराष्ट्राचा चित्ररथ निवडून मत नोंदवा.

Loading

ज्ञानवापी मशीदच्या जागी हिंदू मंदिर होते; ASI ने पुरावे समोर आणले

नवी दिल्ली: ज्ञानवापी मशीद संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाचा (ASI) रिपोर्ट आला आहे. या अहवालातून ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी मंदिरच होते. मंदिर पाडून मशीद उभारण्यात आली आल्याचे स्पष्ट झाले आहे. मंदिर असल्याचे 32 पेक्षा जास्त पुरावे मिळाले आहेत. 32 शिलालेखमधून हिंदू मंदिर असल्याचे स्पष्ट होत आहे. हा अहवाल दोन्ही पक्षांना एएसआयने दिला आहे. मशीद बांधताना हिंदू मंदिरातील खंबे थोड्याप्रमाणात बदलण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या अहवालातील काही माहिती पुढे आली आहे. 
नेमके काय आहे रिपोर्टमध्ये
ज्ञानवापीत मंदिर असताना एक मोठा केंद्रीय कक्ष होता. तसेच उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम विभागात एक एक खोली होती. त्यातील उत्तर, दक्षिण आणि पश्चिम विभागातील अवशेष मिळाले. परंतु पूर्व विभागाचे अवशेष अजून मिळाले नाही. मंदिराचे जे केंद्रीय कक्ष होते ते आता मशिदीचे केंद्रीय कक्ष आहे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडून होता. हे प्रवेशद्वार दगडांनी बंद करण्यात आला आहे. मशीद बनवताना मंदिराच्या अनेक खुणा मिटण्याचा प्रयत्न झाला असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
  • मशिदीच्या आधी, तिथे बांधलेल्या मंदिरात एक मोठा मध्यवर्ती कक्ष होता आणि उत्तर बाजूला एक लहान खोली होती.
  • मध्यवर्ती कक्ष आणि पूर्व-अस्तित्वात असलेल्या संरचनेचे मुख्य प्रवेशद्वार आहे.
  • मशिदीची पश्चिमेकडील खोली आणि पश्चिमेकडील भिंत आहे.
  • मशिदीच्या बांधकामादरम्यान, मंदिराच्या खांबांमध्ये तसेच इतर भागांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले. ज्यामुळे त्याला मशिदीचा आकार देण्यात आला.
  • विद्यमान संरचनेवर शिलालेख दिसून आले.
  • दगडांवर अरबी आणि पर्शियन शिलालेख आहे.
  • तळघरात शिल्पाचे अवशेष आहेत.
  • शिलालेखामध्ये देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपी
ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी 32 शिलालेख सापडले. त्यात देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपी मिळाली आहे. त्यावर जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर असे देवांचे नाव मिळाले. महा-मुक्तिमंडप यासारखे तीन शब्द शिलालेखांमध्ये मिळाले आहे. मंदिराचे अनेक शिलालेख मशीद बनवताना वापरल्याचे अहवालात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे येथे शिवलिंग, हनुमान आणि गणेशजी च्या मुर्त्या आढळून आलेल्या असल्याने येथे मंदिरच असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search