Category Archives: राजकारण

मोठी बातमी: २९ महापालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर; मुंबई, पुणे, नागपूरसह ‘या’ शहरांत महिला राज!

   Follow us on        

मुंबई: महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत अखेर आज जाहीर झाली आहे. मंत्रालयातील परिषद सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. या आरक्षणामुळे अनेक शहरांतील राजकीय समीकरणे बदलणार असून, दिग्गजांच्या नजरा आता आपल्या प्रभागातील गणितांकडे लागल्या आहेत.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांसाठी ही सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि खुला प्रवर्ग (Open) अशा विविध प्रवर्गांसाठी पदे आरक्षित करण्यात आली आहेत.

​प्रमुख शहरांतील आरक्षणाची स्थिती

​१. महिलांसाठी आरक्षित महापालिका (खुला प्रवर्ग):

राज्यातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी मुंबई महानगरपालिका यंदा महिलांसाठी आरक्षित झाली आहे. यासोबतच खालील शहरांतही महिला महापौर विराजमान होतील:

​मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, नांदेड, धुळे, मालेगाव आणि मीरा-भाईंदर.

​२. अनुसूचित जाती आणि जमाती (SC/ST):

​कल्याण-डोंबिवली: अनुसूचित जमाती (ST) – सर्वसाधारण.

​ठाणे: अनुसूचित जाती (SC) – सर्वसाधारण.

​जालना आणि लातूर: अनुसूचित जाती (SC) – महिला.

​३. इतर मागास प्रवर्ग (OBC):

​पनवेल, उल्हासनगर, कोल्हापूर, इचलकरंजी: ओबीसी – सर्वसाधारण.

​अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव: ओबीसी – महिला.

राजकीय हालचालींना वेग

​आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे, तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांत महिला आरक्षण आल्यामुळे राजकीय पक्षांना आता महिला उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे.

​पुढील काही दिवसांत या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीला वेग येईल, हे निश्चित.

महानगरपालिका नुसार आरक्षण यादी 

महापालिका आरक्षणाचा प्रवर्ग

  1. मुंबई सर्वसाधारण (महिला)
  2. पुणे सर्वसाधारण (महिला)
  3. नागपूर सर्वसाधारण (महिला)
  4. पिंपरी चिंचवड सर्वसाधारण (महिला / पुरुष)
  5. ठाणे अनुसूचित जाती (महिला / पुरुष)
  6. नाशिक सर्वसाधारण (महिला)
  7. कल्याण डोंबिवली अनुसूचित जमाती (महिला / पुरुष)
  8. छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  9. वसई विरार सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  10. सोलापूर सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  11. नवी मुंबई सर्वसाधारण (महिला)
  12. मिरा भाईंदर सर्वसाधारण (महिला)
  13. अमरावती सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  14. पनवेल ओबीसी- (महिला / पुरुष)
  15. भिवंडी- निजामपूर सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  16. नांदेड- वाघाळा सर्वसाधारण (महिला)
  17. अकोला ओबीसी (महिला)
  18. मालेगाव सर्वसाधारण (महिला)
  19. कोल्हापूर ओबीसी- (महिला / पुरुष)
  20. सांगली- मिरज- कुपवाड सर्वसाधारण खुला
  21. जळगाव ओबीसी (महिला)
  22. धुळे सर्वसाधारण (महिला)
  23. उल्हासनगर ओबीसी- (महिला / पुरुष)
  24. लातूर अनुसूचित जाती (महिला)
  25. अहिल्यानगर ओबीसी (महिला)
  26. चंद्रपूर ओबीसी (महिला)
  27. परभणी सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  28. इचलकरंजी ओबीसी (महिला / पुरुष)
  29. जालना अनुसूचित जाती (एससी महिला)

”मीरा-भाईंदरचा महापौर मराठीच हवा; अन्यथा…” मराठी एकीकरण समितीचा इशारा

   Follow us on        

मीरा-भाईंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदासाठी मराठी व्यक्तीचीच निवड व्हावी, अशी आक्रमक भूमिका मराठी एकीकरण समितीने घेतली आहे. समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला कडक इशारा दिला आहे.

काय म्हणाले गोवर्धन देशमुख?

देशमुख यांनी स्पष्ट केले की, मुंबईप्रमाणेच मीरा-भाईंदरमध्येही मराठी महापौर बसला पाहिजे. जर प्रशासनाने किंवा राजकीय पक्षांनी ‘अमराठी’ व्यक्तीला महापौर बनवण्याचा प्रयत्न केला, तर समिती गप्प बसणार नाही. त्यांनी पुढील मुद्दे मांडले:

रक्त सांडले तरी चालेल: “जर अमराठी महापौर बसवला, तर शहरात तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रसंगी रक्त सांडले तरी चालेल किंवा माझे बलिदान द्यावे लागले तरी मी मागे हटणार नाही,” असे भावनिक आणि आक्रमक आवाहन त्यांनी केले.

पर्याय उपलब्ध: भाजपमध्ये अनिता पाटील, ध्रुवकिशोर पाटील यांसारखे अनेक अनुभवी मराठी चेहरे आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना डावलून अमराठी व्यक्तीला संधी दिल्यास ते सहन केले जाणार नाही.

*दुसरा ‘संयुक्त महाराष्ट्र’ लढा: जर मराठी अस्मितेचा विचार केला नाही, तर मीरा-भाईंदरमध्ये दुसऱ्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यासारखे चित्र पाहायला मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Sindhudurg: मोठी बातमी:प्रशासकीय राजवट संपणार! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अखेर जाहीर

   Follow us on        

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेली ही निवडणूक येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच या निवडणुका होत असल्याने जिल्ह्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले असून इच्छुकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे.

​प्रशासकीय राजवट संपणार; ५.९९ लाख मतदार बजावणार हक्क

​मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन पेचामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती होती. आता या निवडणुकांमुळे जिल्ह्याला पुन्हा एकदा लोकनियुक्त प्रतिनिधी मिळणार आहेत.

​एकूण मतदार: ५,९९,५६७

​मतदान केंद्रे: ८७०

​जिल्हा परिषद जागा: ५०

​पंचायत समिती जागा: १००

​अध्यक्षपद ‘खुले’; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

​पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ‘खुले’ (General) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. हे पद सर्वांसाठी खुले झाल्याने जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवण्यासाठी आणि जिल्ह्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

​पंचायत समित्यांचे आरक्षण: ४ तालुक्यांत ‘महिला राज’

​जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षणही प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आठपैकी चार तालुक्यांचे नेतृत्व महिलांकडे जाणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

​तालुकानिहाय आरक्षण खालीलप्रमाणे:

सावंतवाडी – अनुसूचित जाती (महिला)

कणकवली – ओबीसी (महिला)

दोडामार्ग – सर्वसाधारण (महिला)

मालवण – सर्वसाधारण (महिला)

वेंगुर्ला – ओबीसी (सर्वसाधारण)

कुडाळ – सर्वसाधारण (खुले)

वैभववाडी – सर्वसाधारण (खुले)

देवगड – सर्वसाधारण (खुले)

निवडणुकीचे महत्त्व

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हे जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ मानले जाते. ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणूक होत असल्याने मतदारांमध्येही मोठा उत्साह आहे. प्रलंबित विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांवरून या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या या मतदानानंतर जिल्ह्याची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी ४० ‘स्टार प्रचारक’ नेत्यांची यादी जाहीर

   Follow us on        

मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुका २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाने आपली कंबर कसली असून, प्रचारासाठी ४० ‘स्टार प्रचारक’ नेत्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी जाहीर करण्यात आली असून, यात दिग्गज नेत्यांपासून ते युवा चेहऱ्यांपर्यंत सर्वांना स्थान देण्यात आले आहे.

​प्रचाराची धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर

​या यादीत पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यांच्यासोबतच पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तीकर आणि आनंदराव अडसूळ हे देखील प्रचाराचे मुख्य आकर्षण असतील.

​शिवसेनेने या यादीत अनुभव आणि तरुण रक्त यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

यादीतील प्रमुख नावे:

​शिवसेनेने या यादीत अनुभव आणि तरुण रक्त यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. यातील काही प्रमुख नावे खालीलप्रमाणे आहेत:

​कॅबिनेट मंत्री: गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि दीपक केसरकर.

​खासदार: डॉ. श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, मिलिंद देवरा, आणि नरेश म्हस्के.

​महिला नेतृत्व: डॉ. नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि शयना एन.सी.

​इतर महत्त्वाचे चेहरे: संजय निरुपम, नीलेश राणे आणि प्रसिद्ध अभिनेते व माजी खासदार गोविंदा आहुजा.

शिवसेना स्टार प्रचारक संपूर्ण यादी (२०२५-२६)

​१. मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब (मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री)

२. श्री. रामदास कदम (नेते)

३. श्री. गजानन कीर्तीकर (नेते)

४. श्री. आनंदराव अडसूळ (नेते)

५. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते)

६. श्री. प्रतापराव जाधव (केंद्रीय मंत्री)

७. डॉ. नीलमताई गोऱ्हे (नेत्या)

८. सौ. मिनाताई कांबळी (नेत्या)

९. श्री. गुलाबराव पाटील (नेते व मंत्री)

१०. श्री. दादाजी भुसे (उपनेते व मंत्री)

११. श्री. उदय सामंत (उपनेते व मंत्री)

१२. श्री. शंभूराज देसाई (उपनेते व मंत्री)

१३. श्री. संजय राठोड (मंत्री)

१४. श्री. संजय शिरसाट (प्रवक्ते व मंत्री)

१५. श्री. भरतशेट गोगावले (उपनेते व मंत्री)

१६. श्री. प्रकाश आबिटकर (मंत्री)

१७. श्री. प्रताप सरनाईक (मंत्री)

१८. श्री. आशिष जयस्वाल (राज्यमंत्री)

१९. श्री. योगेश कदम (राज्यमंत्री)

२०. श्री. दिपक केसरकर (प्रवक्ते व आमदार)

२१. श्री. श्रीरंग बारणे (उपनेते व खासदार)

२२. श्री. धैर्यशील माने (खासदार)

२३. श्री. संदीपान भुमरे (खासदार)

२४. श्री. नरेश म्हस्के (खासदार)

२५. श्री. रवींद्र वायकर (खासदार)

२६. श्री. मिलिंद देवरा (खासदार)

२७. डॉ. दीपक सावंत (उपनेते व माजी मंत्री)

२८. श्री. शहाजी बापू पाटील (उपनेते व माजी आमदार)

२९. श्री. राहुल शेवाळे (उपनेते व माजी खासदार)

३०. डॉ. मनिषा कायंदे (सचिव व आमदार)

३१. श्री. निलेश राणे (आमदार)

३२. श्री. संजय निरुपम (प्रवक्ते)

३३. श्री. राजू वाघमारे (प्रवक्ते)

३४. डॉ. ज्योती वाघमारे (प्रवक्ते)

३५. श्री. पूर्वेश सरनाईक (युवासेना कार्याध्यक्ष)

३६. श्री. राहुल लोंढे (युवसेना सचिव)

३७. श्री. अक्षयमहाराज भोसले (शिवसेना प्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना)

३८. श्री. समिर काझी (कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग)

३९. श्रीमती शयना एन.सी. (राष्ट्रीय प्रवक्त्या)

४०. श्री. गोविंदा आहुजा (माजी खासदार)

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप अखेर जाहीर, गृहखाते अखेर कोणाकडे? पाहा संपूर्ण यादी

   Follow us on        

नागपूर: आताची मोठी बातमी समोर येत आहे, अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडेच गृहमंत्रालय असणार आहे. . तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व गृह निर्माण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

कोणाला कोणतं खातं?

देवेंद्र फडणवीस – गृह

अजित पवार – अर्थ

एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

गणेश नाईक – वन मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा

पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा

दादा भुसे – शालेय शिक्षण

गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

संजय राठोड – मृद व जलसंधारण

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

जयकुमार रावल – विपणन, शिष्टाचार

अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण

अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक

शंभुराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

माणिकराव कोकाटे – कृषी

दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

संजय सावकारे – कापड

संजय शिरसाट – सामाजिक न्याय

प्रताप सरनाईक – वाहतूक

भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन

मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

आकाश फुंडकर – कामगार

बाबासाहेब पाटील – सहकार

प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

योगेश कदम – गृहराज्य शहर

पंकज भोयर – गृहनिर्माण

मोठी बातमी: नारायण राणे यांची खासदारकी अडचणीत

   Follow us on        

मुंबई : लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनिवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला. मात्र, नारायण राणेंची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर 5 वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाते नेते विनायक राऊत यांनी केली आहे. याबाबत, अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक ,अ‍ॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत कायदेशीर नोटिसही विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे.

निवडणूक प्रचार कालावधी 5 मे 2024 रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करीत होते, नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतांनाही ई.व्ही.एम.मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याचकडेच निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी 13 एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली, त्याचाही उल्लेख या नोटिसमध्ये करण्यात आलेला आहे.

निवडणूक आचार संहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगने चौकशी करावी, अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिसमधून केलेली आहे.

केंद्रीय निवडणुक आयोगाने 07 दिवसात या नोटिसवर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल, असेही माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणुक निर्णय अधिकार्‍यांच्या मदतीने करण्यात आलेत हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी म्हटले म्हणाले.

 

 

….म्हणून नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळले

सिंधुदुर्ग: भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून सुद्धा त्यांना पक्षाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या मंत्रिमंडळात स्थान आणि नारायण राणे यांचा राजकारणातील अनुभव आणि वजन पाहता त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची सर्वाधिक शक्यता होती. एनडीएने बहुमत सिद्ध केल्यावर राज्यातील सर्व न्यूज माध्यमांनी नारायण राणे यांचे नाव मंत्रिमंडळात असणार अशा बातम्या प्रसिद्धही केल्या होत्या. मात्र घडले उलटेच. नारायण राणे यांना मंत्रीपद न मिळण्यामागे काय कारण असेल याच्याही चर्चा चालू झाल्यात.
या आधीच्या मंत्रीमंडळात नारायण राणे यांच्यावर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र नारायण राणे यांच्या कारकिर्दीत सरकारच्या अपेक्षेप्रमाणे लघु उद्योगाची निर्मिती झाली नाही.  नारायण राणे यांना मंत्रिपद नाकारण्यात हे कारण असल्याचे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे.
कणकवली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे हे राज्याच्या राजकारणात आपली चमक दाखवत आहेत. राज्यात मंत्रिपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असूनही विधानसभेच्या या टर्म मध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही . मात्र येणाऱ्या निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आल्यास नितेश राणे यांना मंत्रिपद दिले जाणार आहे. भाजप एकाच घरात दोन मंत्रीपदे देत नसल्याने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला गेला नाही आहे अशी चर्चा राणे समर्थकांमध्ये होत आहे.

मोठी बातमी: नारायण राणे यांना नवीन सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान नाही

   Follow us on        
दिल्ली: कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे आणि मराठवाड्यातील नेते भागवत कराड यांना मंत्रीमंडळ स्थान दिले जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये कोकण आणि मराठवाड्याचे नेतृत्त्व आता कोण करणार? या भागातून अन्य कोणत्याच नेत्याला संधी मिळणार नाही का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
दिल्लीतून कराड, नारायण राणे यांना फोन 
मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात नारायण राणे यांच्याकडे शूक्ष्म व लघु उद्योगमंत्री होते. तर भागवत कराड हे राज्य अर्थमंत्री होते. खरं म्हणजे नारायण राणे यांना यावेळीदेखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. कारण ते कोकणातील एक मोठा चेहरा आहेत. दुसरीडे भागवत कराड हेदखील मराठवाड्यातील मोठे नाव आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्ष मात्र आता मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली जाणार नसल्याचं सांगितलं जातंय. तसा फोनदेखील भाजपच्या दिल्लीतील नेतृत्त्वाकडून कराड आणि नारायण राणे यांना गेल्याचे म्हटले जात आहे. त्यामुले आता कराड आणि राणे या दोघांचाही पत्ता कट झाल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
वेगळी महत्वाची जबाबदारी दिली जाणार? 
भाजपचे सरकार आल्यावर नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तविण्यात येत होती. मात्र भाजपने नारायण राणे यांना मंत्रीपद देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र नारायण राणे यांचे राज्यातील खासकरून कोकण भागातील राजकीय वजन पाहता त्यांना दुसरी महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते असे बोलले जात आहे.

आता मिशन विधानसभा; राणे बंधूंचा ‘या’ दोन जागांवर दावा, महायुतीत वादाची ठिणगी पडणार?

   Follow us on        
सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीत कोकणात १००% यश मिळवलेल्या महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजप नेते निलेश राणे यांनी थेट मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. तर आमदार नितेश राणे यांनी भर पत्रकार परिषदेत राजापूर मतदार संघावर भाजप पक्षातर्फे दावा केला आहे. 
निलेश राणेंचे रत्नागिरी मतदारसंघाबाबत ट्वीट
निलेश राणे ट्वीटमध्ये लिहितात, नितेशने फक्त राजापूर मतदार संघावर भाजपचा दावा सांगितला… माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदार संघ पण पारंपारिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार
मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते उच्चशिक्षण मंत्री होती. तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे उद्योगमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उदय सामंत आत्तापर्यंत 4 वेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. दोन वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली तर दोन वेळेस शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आले आहेत.
तर लोकसभा निवडणुकीत भाजपला राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात दोन नंबरची मते मिळाली आहेत. फक्त 21 हजार मतांनी भाजपा पिछाडीवर आहे. 2019 च्या तुलनेत राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात भाजपा ने चांगला लोकाश्रय मिळवला आहे. हे भाजपसाठी सुचिन्ह असुन येत्या विधानसभेला राजापूर विधानसभेवर भाजपाचा दावा असणार असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आता विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर असताना निलेश राणे आणि नितेश राणे यांनी असे ठोकल्याने महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. 

Lok Sabha Election Result 2024: कोकण महायुतीचेच; मविआचा सुपडा साफ

   Follow us on        
Loksabha Election Result 2024: राज्यात जरी मविआ ला भरघोस यश मिळाले असले तरी कोकणात मात्र महायुतीने १००% जागांवर यश मिळवले आहे. ठाणे, कल्याण, रायगड, पालघर आणि रतनागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात युतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.   
ठाणे मतदारसंघात ठाकरे गटाचे राज विचारे यांचा पराभव झाला, तर शिंदे गटाचे नरेश म्हस्के विजयी उमेदवार ठरले. पालघरमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत.  हेमंत सावरा 184422 मताधिक्याने विजयी ठरले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले आहेत. सुनील तटकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते (Anant Gite)  यांचा 82784 मतांनी पराभव केला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये देखील ठाकरे गटाला अपयश आलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्धात नारायण राणेंचा 47 हजार 858 मतांनी विजय झाला आहे.
ठाणे, कोकणातील विजयी खासदारांची यादी
ठाणे – नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
पालघर – हेमंत विष्णू सवेरा  (भाजप)
रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
रत्नागिरी-सिंधुदर्ग – नारायण राणे (भाजप)
रायगडमध्ये अजित पवारांचा हुकमी ‘एक्का’ 
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रायगडमध्ये मिळालं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांचा विजय झाला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा पराभव केला आहे. अजित पवार यांनी राज्यात चार जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांना एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांनी अजित पवारांचा हुकमी ‘एक्का’ असं म्हणावं लागेल.
पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा विजयी
पालघर लोकसभेवर अखेर महायुतीने आपला झेंडा फडकवला असून महायुती भाजपाचे डॉ. हेमंत सावरा हे एक लाख 84 हजार ह्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतं. पालघर लोकसभेवर अखेर पुन्हा एकदा महायुतीने आपलं नाव कोरलं असून भाजपाचे डॉक्टर हेमंत सावरा हे एक लाख 84 हजार मतांनी विजयी झाले असून. या विजयानंतर जिल्ह्यातील प्रश्न आहेत. त्यांना प्राधान्य देण्याचं त्यांनी सांगितलं असून हा विजय महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झाले असून त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे विनायक राऊत यांचा ४७८५८ मतांच्या फरकाने पराभव केला आहे. सावंतवाडी  भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरविल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची लढत प्रतिष्ठेची झाली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या या आधी दोनदा खासदार झालेल्या विनायक राऊत यांचे आव्हान त्यांच्यासमोर होते. शिवसेनेला असलेली सहानुभूती, जातीय ध्रुवीकरणाची शक्यता, रत्नागिरीत असलेले संघटनात्मक बळ याच्या जोरावर लढणाऱ्या राऊत यांचे बळ भाजपच्या नियोजनबद्ध रणनीतीसमोर कमजोर पडले. शिवसेनेतील फुटीनंतर मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत हे शिंदे शिवसेनेत आले. साहजिकच त्यांच्या अनुक्रमे सावंतवाडी आणि रत्नागिरी मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे बळ कमी झाले. त्या दोघांनी राणेंसाठी ताकद लावली..

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search