Author Archives: Kokanai Digital
कोल्हापूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बास्केट ब्रिज भूमिपूजनाच्या कार्यक्रमात होणाऱ्या ब्रिजच्या रस्त्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.कितीही मोठा पूर आला तरी पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक थांबणार नाही. सांगली-कोल्हापुरात सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधू.पुढचे ५० वर्षे या रस्त्यावर खड्डा पडणार नाही, याची हमी देतो, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे.गेली अनेक वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात महापरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच महापुराचे पाणी पुणे-बंगळुरू महामार्गावर येत असल्यामुळे अनेक दिवस या परिसरातील वाहतूकही ठप्प होत असते. यासाठी सातारा ते निपाणी या दरम्यान सहा पदरी महामार्ग तयार करण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुलावरून थेट कोल्हापूरपर्यंत बास्केट ब्रिजची निर्मिती करण्यात येणार आहे. याची पायाभरणी तसेच रत्नागिरी कोल्हापूर राज्य मार्ग चौपदरीकरण टप्पा 2 , रत्नागिरी कोल्हापूर चौपदरीकरण टप्पा 3 याचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झालं आहे.
या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी पुढे म्हणाले, ‘पुण्यासाठी लवकरत रिंग रोड बांधणार आहे. नागपूर ते कोल्हापूर सात तासात अंतर पार होईल अशी व्यवस्था करत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यात टेक्नॉलॉजीच्या आधारावर नवीन उद्योग झाले पाहिजेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना ऊर्जा दाता बनवलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यानेच पुढाकार घेतला पाहिजे’. असे गडकरी म्हणाले
मुंबई :आजपासून 4 दिवस म्हणजे 28 ते 31 जानेवारीपर्यंत बँका बंद राहतील. बँक कर्मचारी 30 आणि 31 जानेवारीला संपावर (Bank Strike) जाणार आहेत. यापूर्वी 28 जानेवारीला महिन्याचा चौथा शनिवार आणि 29 जानेवारीला रविवार असल्याने बँका बंद राहणार होत्या. अशा परिस्थितीत लोकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. मात्र, या काळात इंटरनेट बँकिंगची सुविधा सुरू राहणार आहे. यामुळे लोक पैशाचे व्यवहार करू शकतील.
दोन दिवस संपावर
संपाबाबत देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सांगितले की, 30-31 जानेवारी रोजी युनियन फोरम ऑफ बँक युनियन्सने पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाचा परिणाम त्यांच्या शाखेतील कामगारांवर होऊ शकतो. बँक कर्मचाऱ्यांच्या या संपात देशभरातील बँक शाखा कर्मचारी सहभागी होणार आहेत. ग्राहकांनी त्यांचे शाखेशी संबंधित काम अगोदरच निकाली काढले तर बरे होईल.
संपूर्ण देशात संप
SBI ने सांगितले की, आम्हाला इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने कळवले आहे की युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने UFBU शी संबंधित संघटनांना म्हणजे AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA इत्यादींना संपाची नोटीस जारी केली आहे. बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी देशव्यापी बँक संपावर जाण्याची घोषणा केली आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या 5 मागण्या
एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम म्हणाले की, बँक कर्मचाऱ्यांच्या 5 मागण्या आहेत. बँकिंग वर्किंग कल्चरमध्ये सुधारणा करा, बँकिंग पेन्शन अपडेट करा, नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) रद्द करा, पगारात सुधारणा करा आणि सर्व कॅडरमध्ये भरती करा आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
T-01429 | Station Name | T-01430 |
08:30 | MADGAON | 08:30 |
06:14 | KARMALI | 09:14 |
05:54 | THIVIM | 09:36 |
04:54 | SAWANTWADI ROAD | 10:20 |
04:32 | KUDAL | 10:42 |
04:18 | SINDHUDURG | 10:56 |
04:00 | KANKAVALI | 11:12 |
03:36 | VAIBHAVWADI RD | 11:42 |
03:14 | RAJAPUR ROAD | 12:02 |
02:25 | RATNAGIRI | 15:05 |
01:10 | SANGMESHWAR | 15:42 |
00:32 | CHIPLUN | 16:32 |
00:10 | KHED | 17:02 |
23:02 | MANGAON | 18:10 |
22:40 | ROHA | 18:50 |
21:15 | PANVEL | 20:10 |
सिंधुदुर्ग : मालवण शहरातील धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड लागत असलेल्या दुकानांपैकी दोन दुकांनाना आज पहाटे आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही पण आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबतची माहिती अशी- धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड लगत अनेक दुकाने आहेत. यातील विलास परुळेकर यांचे शिलाई मशीन दुरुस्ती व विक्रीचे एक दुकान असून त्यांच्या दुकानाला अचानक आग लागली. मॉर्निग वॉकला गेलेल्या नागरिकांना ही आग लागल्याचे दिसून येताच त्यांनी अन्य लोकांशी संपर्क साधत याची माहिती दिली. स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन बंब ही दाखल झाला. यात दुकानातील नव्या व जुन्या अशा एकूण १२ ते १५ मशीन तसेच फर्निचरसह संपूर्ण दुकानच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तर बाजूला असलेले मृणाल मोंडकर यांचे लेडीज टेलर व शिवणक्लास हेही दुकान जळून खाक झाले. यात मशीन साहित्य व ग्राहकांचे कपडे हे जळून खाक झाले. काही ग्राहकांचे लग्नाचे कपडेही दुकानात होते. तेही जळून नुकसान झाले.
(Also Read >कोकणातील ग्रामपंचायतीचा हायटेक फंडा! करवसुलीसाठी ‘क्यूआर कोड’ सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत…)
दुकान मालक, स्थानिक नागरिक तसेच मंदार केणी, महेश सारंग, राजू बिडये, भाई कासवकर यासह अन्य नागरिक, नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली. मात्र दोन्ही दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुकानांना लागूनच अन्य काही दुकाने आहेत. त्यांनाही धोका निर्माण झाला होता. मात्र आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.
या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार गंगाराम कोकरे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व पुढील प्रक्रिया महसूल प्रशासनाच्या माध्यमातून सुरू होती.