Author Archives: Kokanai Digital

शुक्रवारी कोकण रेल्वे मार्गावर ब्लॉक; ‘या’ ४ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी शुक्रवारी ७ जुलै रोजी दुपारी १२.२० वाजल्यापासून ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ४ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

वीर ते  खेड विभागादरम्यान बुधवारी दु. १२.२० वाजता सुरू होणारा मेगाब्लॉक दुपारी ३.२० वाजता संपेल. या मेगाब्लॉकमुळे

६ जुलै रोजी सुटणारी २०९१० क्रमांकाची पोरबंदर कोच्युवेली एक्स्प्रेस रोहा-वीर विभागादरम्यान १ तास ५० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल.

६ जुलै रोजी सुटणारी १२४३२ क्रमांकाची थिरूअनंतरपुरम-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरी-खेड विभागादरम्यान ३० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.

७ जुलै रोजी सुटणारी १६३४५ क्रमांकाची थिरूअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेसही रोहा-वीर विभागात ३५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.

७ जुलै रोजी सुटणारी १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा पॅसेंजर रत्नागिरी – खेड विभागात १ तास ५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून प्रवाशांनी या सूचनेची नोंद घेऊन आपल्या प्रवासाची योजना आखावी असे आवाहन केले आहे.

Loading

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर ५२ विशेष गाड्या; आरक्षण ‘या’ तारखेपासून

Ganpati Special Trains : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या भाविकांसाठी एक खुशखबर आहे. या मार्गावर गणेशोत्सव दरम्यान अजून 52 विशेष फेर्‍या चालवण्याचा निर्णय मध्यरेल्वेने घेतला आहे. या आधी सोडलेल्या 156 विशेष गाड्या पकडून एकूण विशेष गाड्यांची संख्या आता 208 झाली आहे. 

1)दिवा-चिपळूण मेमू विशेष गाडी(एकूण 36 फेऱ्या) 

01155 मेमू दिवा इथून 13.09.2023 ते 19.09.2023 आणि 22.09.2023 ते 02.10.2023 पर्यंत दररोज 19.45 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 01.25 वाजता चिपळूणला पोहोचेल.

01156 मेमू चिपळूण इथून 14.09.2023 ते 20.09.2023 आणि 23.09.2023 ते 03.10.2023 पर्यंत दररोज 13.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19.00 वाजता दिवा इथं पोहोचेल.

या गाडीचे थांबे

थांबे: पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी.

 

Press and hold on image to preview

2) मुंबई आणि मंगळुरू जंक्शन विशेष सेवा – एकूण 16 फेर्‍या

01165 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15.09.2023, 16.09.2023, 17.09.2023, 18.09.2023, 22.09.2023, 23.09.2023, 23.09.2023, आणि 23.09.2023 -22.15 वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन 17.20 वाजता दुसऱ्या दिवशी पोहोचेल.

01166 स्पेशल मंगळुरु जंक्शन 16.09.2023, 17.09.2023, 18.09.2023, 19.09.2023, 23.09.2023, 24.09.2023,30.09.2023 आणि 01.10.2023 ला 13.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.

या गाडीचे थांबे

ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा , मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकूर

डब्यांची रचना 

1 AC-2 टियर, 2 AC-3 टियर, 10 स्लीपर क्लास, 5 जनरल सेकंड क्लास आणि 2 जनरल सेकंड क्लास कम गार्डची ब्रेक व्हॅन.

 

Press and hold on image to preview

विशेष गाड्यांसाठी बुकिंग दिनांक 03.07.2023 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

 

Loading

समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात; २५ प्रवासी ठार.

Bus Accident :समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून अंदाजे 33 प्रवाशी प्रवास करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात बसचे टायर फुटले.टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही अनियंत्रित बस थेट डिव्हायरला धडकली. अपघातानंतर बसने क्षणात पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. बसमध्ये अडकून पडल्याने 25 प्रवाशांचा कोळसा झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेस आहे. सध्या मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतदेह पूर्ण जळले असल्याने त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. या भीषण अपघातामध्ये चालकासह 8 जणांचा जीव वाचला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त केले असून मृत प्रवाशांचा नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच जखमीं प्रवाशांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Loading

आंबोली धबधबा : प्रवाहाबरोबर दगड खाली; पर्यटकांची तारांबळ

सिंधुदुर्ग : वर्षा पर्यटनासाठी पहिली पसंती असलेल्या आंबोली येथे धबधब्याच्या ठिकाणी सायंकाळी धबधब्याचा प्रवाह वाढल्याने दगड त्याबरोबर खाली येवून पर्यटकांना धोका निर्माण झाला होता. या वेळी काही पर्यटक आनंद लुटत असताना अचानक धबधब्याच्या प्रवाहातून दोन- तीन दगड खाली आले. यामुळे तेथे असलेल्या सगळ्यांचीच धावपळ उडाली. त्यातील एक दगड एका पर्यटकाच्या पायावर आदळल्याने दुखापत झाली.

काल आंबोली येथील मुख्य धबधब्यकडे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटताना अचानक धबधब्याच्या प्रवाहातून दगड कोसळू लागल्याने पर्यटकांची तारांबळ उडाली. यात बेळगाव येथील युवक किरकोळ जखमी झाला. ही बाब तेथे बंदोबस्तासाठी असलेले पोलिस दीपक शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रसंगावधान राखत पर्यटकांना धबधब्याकडे जाण्यास मनाई केली.

Aam

Loading

Vande Bharat Express : मुंबई ते गोवा दुसर्‍या फेरीचे आरक्षणही जवळपास फुल्ल

मुंबई : बहुचर्चित मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या सुरवातीच्या फेर्‍यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

या गाडीच्या सुरवातीच्या फेरीची म्हणजे दिनांक 28 जूनची मुंबई ते गोवा या फेरीची सर्व तिकीटे विकली गेली होती. तसाच प्रतिसाद उद्याच्या दुसर्‍या फेरीला फेरीला मिळाला आहे.

उद्याच्या फेरीचे 94% आरक्षण आतापर्यंत झाले आहे. 530 पैकी 499 सीट्स आरक्षित झाल्या आहेत. या आरक्षणातून 6.75 लाख रुपये जमा झाले आहेत. रात्रीपर्यंत पूर्ण म्हणजे 100% आरक्षण होण्याची अपेक्षा आहे.

परतीच्या प्रवासासाठी पण प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दिनांक 01 जुलै च्या मडगाव ते मुंबई फेरीची फक्त 58 तिकिटे बूक होण्याची बाकी आहेत. उद्याचा दिवसात ती पण आरक्षित होतील अशी अपेक्षा आहे. 

Loading

आषाढीला राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी…

Rain updates : राज्यात उद्या आषाढी एकादशीला काही जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

पुणे हवामान विभागप्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटर दिलेल्या माहितीनुसार उद्या दिनांक 29 जून रोजी रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि इतर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

 

अलर्ट आणि त्यांचे अर्थ 

ग्रीन अलर्ट – धोका नाही Green Alert 

यलो अलर्ट – सतर्क रहा Yellow Alert

ऑरेंज अलर्ट – तयार रहा Orange Alert

रेड अलर्ट – कृतीची वेळ Red Alert

 

Loading

Konkan Railway : गणपती स्पेशल गाड्यांच्या आरक्षणात घोळ; चाकरमान्यांच्या पदरी पुन्हा निराशा

संग्रहित फोटो

Konkan Railway : गणेशोत्सवासाठी नियमित गाड्यांची तिकिटे न मिळाल्याने विशेष गाड्यांची तिकिटे तरी मिळतील अशी आस धरून बसलेल्या बर्‍याच चाकरमान्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. IRCTC या संकेतस्थळावर आरक्षण सुरू झालेल्या सर्व गाड्यांच्या समोर सुरुवातीची १५ मिनिटे ट्रेन ‘Train Cancelled’ असे स्टेटस दाखवत होते. त्यानंतर अचानक आरक्षण चालू झाले आणि त्वरित  फुल्ल झाले. या प्रकारामुळे या आरक्षणात गैरप्रकार झाला आहे असा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 27 जून रोजी कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार होते. आरक्षित तिकीटे मिळविण्यासाठी अनेक चाकरमानी आरक्षण सुरू होण्यापूर्वी लॅपटॉप मोबाईल वर लॉग इन करुन बसले होते. मात्र 8 वाजता जेव्हा आरक्षण चालू झाले तेव्हा आरक्षण सुरू झालेल्या सर्व गाड्यांच्या समोर ‘Train Cancelled’ असे स्टेटस दाखवत होते. काही तांत्रिक अडचणींमुळे रेल्वेने या गाड्यांचे आरक्षण पुढे ढकलले असेल आणि आरक्षणाची नवीन तारीख रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर होईल असा विचार करून अनेकांनी प्रयत्न सोडले आणि लॉग आउट झालेत. मात्र 15 मिनिटानंतर अचानक बूकिंग चालू झाली आणि नेहमीप्रमाणे 1/2 मिनिटांत आरक्षण फुल्ल झाले. या कारणाने अनेकांना आरक्षित तिकिटे भेटली नाहीत. 

या प्रकारामुळे आरक्षणात गैरप्रकार झाला असल्याचे आरोप समाजमाध्यमांतून होत आहेत. 

एकतर रेल्वेच्या आरक्षणाचे सर्व्हर हॅक करण्यात आले असेल किंवा रेल्वेचे काही अधिकारी आणि दलाल यांनी मिळून काही गैरप्रकार केला असल्याचा आरोप होत आहे. 

रेल्वे प्रशासनाने अजूनपर्यंत या प्रकाराबद्दल काही स्पष्टीकरण दिले नाही आहे, त्यामुळे काही प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. 

पहिला प्रश्न म्हणजे या गाड्यांचे स्टेटस ‘Train Cancelled’ असे का दाखवले गेले? तांत्रिक अडचणी असल्यास ‘System/Server Error’ किंवा दुसरा स्पष्ट मेसेज का दाखविण्यात आला नाही? 

दुसरे म्हणजे आरक्षण 15 मिनिटे उशिराने चालू करण्याचे पूर्वनियोजन असल्यास त्यासंबंधी आधीच जाहीर करण्यात का आले नाही? 

या संबंधी स्पष्टीकरणाची मागणी प्रवाशांकडून होत आहे. 

 

 

 

Loading

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ सोहळा संपन्न; एक्सप्रेस मुंबईसाठी रवाना..

Mumbai Goa Vande Bharat Express :मुंबई-गोवा सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 जून) हिरवा झेंडा दाखवला. भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी अकरा वाजता मोदींनी मुंबई-गोवासह इतर चार वंदे भारत एक्सप्रेसला गाड्यांचा शुभारंभ केला.

गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेन सकाळी अकरा वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली. उद्घाटन होण्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात ट्रेनचे स्वागत करण्यात आले. मडगाव स्थानकावर यावेळी उत्साही वातावरण होते.

यावेळी मडगाव रेल्वे स्थानकावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (गोवा राज्य), मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(गोवा राज्य), केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक (गोवा राज्य), पर्यटनमंत्री रोहन खंवटे(गोवा राज्य), महाराष्ट्राचे अन्न व नागरीपुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, गोवा राज्याचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, अधिकारी उपस्थित होते.

Loading

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे आरक्षण आजपासून सुरू

Mumbai Goa Vande Bharat Express :कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे आरक्षण आज दिनांक 26 जून पासून सुरू होणार आहे. 

आज सकाळी 8 वाजल्यापासून रेल्वेच्या तिकिट खिडक्यांवर तसेच ऑनलाईन संकेतस्थळांवर या गाडीचे आरक्षण करता येईल. आगामी 4 महिन्यांचे बूकिंग चालू होत असल्याने गणेशोत्सवासाठी सुद्धा बूकिंग करता येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

उद्या दिनांक 27 जून रोजी या गाडीचे उद्घाटन होणार असून नियमित सेवा बुधवार दि. 28 जून पासून सुरू होणार आहे. 

 

Loading

Parshuram Ghat : एक लेन वाहतुकीसाठी खुली मात्र अपघाताचा धोका कायम

Mumbai Goa Highway News :परशुराम घाटातील एक लेन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, मात्र या पावसातही हा घाट धोकादायक ठरण्याची चिन्ह पहिल्याच पावसात दिसू लागली आहेत.

रत्नागिरी जिल्हय़ात काल अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला होता. मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात किरकोळ स्वरूपाचे दगड महामार्गावर काल शनिवारी २४ जून रोजी खाली कोसळले होते. सुदैवाने एक गाडी याच्यातून बचावल्याची माहिती परशुराम घाट येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या घाटातून गाडी चालवताना वाहकांना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

या धोक्याबरोबरच या परिसरातील ६० ते ७० घरांना दरडीचा धोका कायम आहे. दरम्यान, या ठिकाणी चिपळूण पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी शनिवारी घटनास्थळी परिसराला भेट दिली. यावेळी, घाटात सुरक्षेचा उपाय म्हणून सगळ्या यंत्रणा सज्ज ठेवण्यात याव्यात, अशा सूचना सबंधित कंपनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search