Author Archives: Kokanai Digital

विधानपरिषदेमध्ये शिंदे गटाला फटका तर विधानसभेमध्ये ठाकरे गटाला फटका

मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) 17 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. 17 ते 26 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांची नामनियुक्त यादी जाहीर करण्यात आली आहे. 
विधानसभा कामकाज सल्लागार समितीमध्ये ठाकरे गटाला डावलून शिंदे गटातील उदय सामंत आणि दादा भुसे यांचा समावेश केला गेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
विधानसभा कामकाज सल्लागार समितीवर खालील सदस्यांची नामनियुक्ती 
समिती प्रमुख
१)  राहुल नार्वेकर,  (अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा तथा समिती प्रमुख)
सदस्य
1)  एकनाथ शिंदे, मा. मुख्यमंत्री
2)  देवेंद्र फडणवीस, मा. उप मुख्यमंत्री
3) अजित पवार, मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा
4) राधाकृष्ण विखे-पाटील, मा. मंत्री
5) सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री
6) चंद्रकांत पाटील, मा.मंत्री
7) दादाजी भुसे, मा.मंत्री
8)  उदय सामंत, मा. मंत्री
9) जयंत पाटील, विधानसभा सदस्य 
10) बाळासाहेब थोरात, विधानसभा सदस्य
11) अशोक चव्हाण, विधानसभा सदस्य
निमंत्रित सदस्य
1) नरहरी झिरवाळ, माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा
2)आशिष शेलार, विधानसभा सदस्य 
3) छगन भुजबळ, विधानसभा सदस्य 
4) अमिन पटेल, विधानसभा सदस्य 
विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीमध्ये ठाकरे गट वरचढ.
विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीमध्ये शिंदे गटाऐवजी ठाकरे गटाने बाजी मारली आहे.. ठाकरे गटाचे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड आणि अनिल परब यांचा विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाला हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल. 

निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना धक्का, पुरावे सादर करण्याची मुदत कमी केली

नक्की शिवसेना आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाचे ह्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटात वाद चालू आहे त्यात निवडणूक आयोगाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे याना एक आजून धक्का दिला आहे. पक्षावर किंवा निवडणूक चिन्हावर आपला दावा सिद्ध करण्यासाठी शिवसेनेला त्यासंबंधी पुरावे आणि कागदपत्रे जमा करण्यासाठी सांगण्यात आले होते. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी १ महिन्यांची मुदत मागितली होती.पण आज निवडणूक आयोगाने एक महिन्याची मुदत न देता जेमतेम १५ दिवसांची मुदत दिली आहे. 
येत्या २३ ऑगस्ट पर्यंत त्यांना सर्व पुरावे आणि कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागतील. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे संख्याबळ जास्त असल्याचे पुरावे म्हणजे त्यांच्यासोबत असलेल्या खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष आणि इतर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींची प्रतिज्ञापत्रे सादर करावी लागतील. 
  

नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांचा येत्या शनिवारी सावंतवाडी येथे जाहीर मेळावा.

सावंतवाडी : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी येत्या शनिवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी आपल्या मतदारसंघात जाहीर मेळावा घेण्याचे जाहीर केले आहे. मेळाव्याचे ठिकाण आणि वेळ ह्याबद्दल त्यांनी आजून काही सांगितले नाही आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून चालत आलेल्या महाराष्ट्र राज्यातील सत्ता राज्य नाट्यामध्ये दीपक केसरकर यांचा रोल महत्वाचा राहिला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी ह्या गटाची एक महत्त्वाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिली आहे.

दीपक केसरकर हे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून दोन वेळा मतदारसंघात येवून गेले होते. त्यावेळी त्यांनी कोणतीही सभा किंवा शक्तिप्रदर्शन केले नव्हते. ह्याच दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी येथे सभा झाली होती. ह्या सर्व गोष्टींमुळे दीपक केसरकर यांना त्यांच्या मतदारसंघातील शक्ति कमी झाल्याची विधाने त्यांच्या विरोधकांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणुन हा जाहीर मेळावा म्हणजे एक प्रकारचे शक्ति प्रदर्शन असेल असे बोलण्यात येत आहे.

शिंदेगट सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडी येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले होते. आता दीपक केसरकर यांना कॅबिनेट मंत्रीपद पण मिळाले आहे. ह्या सर्वाचा फायदा मतदारसंघात विकास कामांसाठी होईल अशी आशा आहे असे बोलले जात आहे.

Related news – सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच उभे राहणार – मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ‘दुखणे’ जरा वेगळे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पवारांना टोला.

ठाणे:भाजप मित्रपक्षांना कधी संपवण्याच्या प्रयत्न करत नाही. महाराष्ट्रचे उदाहरण पाहता आमचे संख्याबळ जास्त असताना आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले. कालच्या मंत्रिमंडळात दोन्ही पक्षांच्या 9/9 नेत्यांनी मंत्रीपदाच्या शपथा घेतल्या. बिहारचे उदाहरण द्यायचे म्हंटले तर आमचे संख्याबळ जास्त असताना JDU ह्या आमच्या मित्रपक्षाला मुख्यमंत्रीपद दिले. असे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ”भाजप मित्रपक्षांना संपवते” ह्या विधानावर उत्तर दिले आहे. लोकमत च्या ठाण्यातील कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार असेही बोलले होते की आपण जेव्हा कॉंग्रेस सोडली आणि नवीन पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी नवीन नाव आणि नवीन निवडणूक चिन्ह घेतले, पण शिंदे गट ह्या विरुद्ध करत आहे.

ह्या विधानाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की शरद पवारांनी कॉंग्रेस सोडली तेव्हा कायदे आज आहेत तसे नाही होते. पक्षांतरबंदी कायद्या मध्ये बदल करण्यात आला आहे, त्यामुळे शिवसेनेला ही कायदेशीर लढाई लढावी लागत आहे. शरद पवारांनी ह्या दोन्ही घटनेचे एका तराजूत तुलना करू नये.

शरद पवारांचे दुखणे जरा वेगळे आहे ते सर्वाना माहीत आहे असा खोचक टोला पण त्यांनी मारला.

 

 

१८ मंत्र्यांच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान नाही, हे दुर्दैवी – सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी खासदार.

राज्यातील अनेक नेते जे कधी काळी आमच्यासोबत होते त्यांना भाजपने मंत्रिपदाची संधी दिली आहे. मात्र आज झालेल्या १८ मंत्र्यांच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान नाही, हे दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
आमच्या पक्षाकडून तिथे गेलेल्या नेत्यांना मंत्रिपद दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, कारण आमच्या विचाराचे आणि आमच्या बरोबर काम केलेले नेते ह्या मंत्रिमंडळात दिसतात ह्याचे आम्हाला खूप समाधान वाटते आणि सर्वाना माझ्या मनपुरवर्क शुभेच्छा असे त्या म्हणाल्या.
महिलांना मंत्रीमंडळात स्थान नाही.
१८ मंत्र्यांच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान नाही, हे दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. ५०% लोकसंख्या ह्या देशात महिलांची आहे. विध्यमान सरकार च्या ह्या कृतीतून ते महिलावर्गाचा आणि त्यांच्या अधिकारांचा मन करत नाही हे दिसत आहे. 
गंभीर आरोप असलेल्यांना मंत्रीपदे.
ह्यासंबंधी प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या कि संजय राठोड आणि विजयकुमार गावित ह्यांच्यावर आरोप हे भाजपने केले होते. अनेक मंत्र्यावर आरोप होते त्यांना क्लीन चिट देऊन मंत्रीपदे देण्यात आली आहेत. आर्थर रोड मधील सर्व कैदयांना क्लीन चिट द्या आणि भाजपमध्ये प्रवेश द्या त्यामुळे प्रशासनाचा ह्या कैद्यांवर होणारा खर्च वाचेल असा खोचक टोला त्यांनी ह्यावेळी मारला.

मंत्रिपद वाटपावरून शिंदेगटात नाराजी – काही आमदार परत शिवसेनेत जाण्याच्या चर्चा?

मुंबई- मीविआ सरकारात मंत्री राहिलेल्यानाच मंत्रीपदे दिल्याने शिंदे गटातील काही नेते नाराज झाल्याचे समजते आहे. शिंदे यांना सुरवातीला साथ देणाऱ्या आमदारांना डावलून नंतर त्यांच्या गटात उशिरा आलेल्या आमदारांना मंत्रीपदे दिल्याने हि नाराजी आहे. काही आमदारांनी परत शिवसेनेत जाण्याची आपआपसात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. 
जुन्याच मंत्र्यांना मंत्रिपद दिले तर नवीन सरकार स्थापून नेमका बदल काय झाला असा प्रश्न शिंदे गटातील आमदारांनी उपस्थित केला आहे. 
बच्चू कडू यांना मंत्री मंडळाच्या पहिल्या टप्प्यात स्थान देण्यात आलेले नाही आहे. ह्यासंबंधी आमदार बच्चू कडू यांना विचारले असता त्यांनी खालील विधान केले.
बच्चू कडू हा मंत्रीपदापेक्षा मोठा आहे. आमचा उद्देश मंत्रिपदासाठी नाही होता.मंत्रिपद दिले तरी चांगले, नाही दिले तरी चांगले, पण आशा करतो कि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिपदासाठी दिलेला शब्द पाळतील.

आज सकाळी मंत्रिमंडळात समाविष्ट केलेल्या मंत्र्यांच्या नावाची यादी खालील प्रमाणे

शिंदे गटातील मंत्री 

शंभूराज देसाई
अब्दुल सत्तार
दादा भुसे
दीपक केसरकर
उदय सामंत
गुलाबराव पाटील
संदीपान भुमरे
तानाजी सावंत
संजय राठोड

 

भाजपकडून मंत्री

चंद्रकांत पाटील

सुधीर मुनगंटीवार
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
राधाकृष्ण विखे पाटील
सुरेश खाडे
रविंद्र चव्हाण
विजयकुमार गावित
अतुल सावे

  

मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मराठीतील ज्येष्ठ कलाकार प्रदीप पटवर्धन यांचे आज त्य्नाच्या राहत्या घरी गिरगाव मुंबई येथे आज सकाळी निधन झाले.  त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने  झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मराठीतील हास्य कलाकार अशी त्यांची ओळख होती. त्यांचे वय ६५ वर्षे होते. 
त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे.  ‘मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांचे काम आजही स्मरणात राहील. या नाटकातील ‘भैया पाटील’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीची. भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह त्यांनी रंगभूमी गाजवली आहे. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘लावू का लाथ’ या सिनेमातील त्यांच्या रंजक भूमिकांनी प्रेक्षकांना नेहमीच हसवलं.
एक फुल चार हाफ (१९९१), चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध,पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
रंगभूमी अन् विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी अखेरच्या क्षणी मात्र चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यांच्या जाण्याने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्राचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नमू डायनॅमिक आर्टचा व्यसनमुक्तीसाठी उपक्रम

देशात व्यसनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्याच्या आणि राष्ट्राच्या युवा शक्तीचा ऱ्हास होत आहे. यामुळे सदर व्यसनाला आळा घालणे हे राज्याचे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तसेच नशायुक्त औषधे व अन्य नशायुक्त पदार्थ सेवना पासून समाज दूर राहावा याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नमू डायनॅमिक आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जुलै ते ३० जुलै २०२२ ह्या कालावधीत नमु डायनॅमिक आर्ट संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आंगणे आणि त्यांचे सहकारी आर्यन देसाई, संदीप सावंत रवी लोहार राजू मोरे अनंत अंकुश रामदास तांबे सुनील देवळेकर संजय चाचे व दिलीप परळकर आणि मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील पथनाट्य सादर करणारे चाळीस कलावंत मिळून कोकण विभागातील मुंबई शहर,मुंबई उपनगर,ठाणे,पालघर,रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्हा मधील एकावन्न तालुक्यामध्ये मध्ये व्यसनमुक्ती अभियान राबविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

 

उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार. जाणून घ्या कोणाला भेटणार कोणते खाते.

प्रलंबित राहिलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या करण्याचे निश्चित झाले असून त्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्याचे समजते.

मुख्यमंत्र्याच्या ”नंदनवन” ह्या निवासस्थानी ह्या बाबत सुमारे 1 तास 45 मिनिटे ही बैठक संपन्न पडली आहे. विस्ताराच्या कार्यक्रमासाठी राजभवनातील दरबार हे सभागृह उद्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

उद्या पाहिल्या टप्प्यात सुमारे 17 ते 18 आमदारांचा शपथविधी होणार आहे. ह्या टप्प्यात महत्त्वाच्या खात्याचे वाटप होणार असून शिवसेनेच्या 6 ते 7 शिवसेनेचे मंत्री आणि 10 ते 11 भाजपचे मंत्री शपथ घेतील अशी चर्चा आहे.

ह्या बैठकीत ह्या नावांवर शिक्कामोर्तब झाली असून नक्की कोणा कोणाची वर्णी लागणार हे अधिकृत रीत्या जाहीर करण्यात आलेले नाही आहे. तरीपण शिंदे गटातील आधीच्या सरकारातील मंत्री असलेले आमदारांना उद्या मंत्री पदे भेटतील असे सांगण्यात येत आहे. भाजपने मंत्री वाटप करताना प्रादेशिक समतोल साधेल ह्याची दक्षता घेतली आहे असे सांगितले जात आहे. ज्येष्ठ नेते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील आणि रविन्द्र चव्हाण यांची नावे नक्की केली गेली आहेत.

खात्यांबाबत बोलायचे म्हंटले तर महत्त्वाची खाती म्हणजे अर्थ आणि गृह खाते भाजपकडे जाणार आहे. महसूल खात्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यांच्या गटाला ते भेटले की नाही हे आजून समजले नाही आहे. उच्चशिक्षण, जलसंपदा ही खाती पण भाजपा कडे तर पाणीपुरवठा आणि कृषी ही खाती एकनाथ शिंदे गटाकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गृहमंत्री पद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या कडे ठेवतील आणि अर्थमंत्री पदासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे असे सांगितले जात आहे.

आज रात्री उशिरापर्यंत ही सर्व नाही जाहीर करण्यात येतील अशी शक्यता आहे.

शिवसेना खासदार राऊतांचा मुक्काम ईडी कोर्टातून आर्थर रोड तुरुंगात हलविला.

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत याना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांचा  मुक्काम ईडी कोर्टातून आर्थर रोड तुरुंगात हलविण्यात आला आहे. 
पत्राचाळ राऊत यांची ३१ जुलै ला चौकशी करण्यात आली होती आणि सबळ पुराव्याच्या आधारावर त्यांना ईडी ने ताब्यात घेतले होते. आता त्यांना न्यायालयाने २२ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठवण्याचे आदेश दिले गेले आहेत. 
तब्येतीच्या कारणामुळे त्यांना न्यायालयाने  घरच्या जेवणासाठी मुभा दिली आहे. पण त्यांनी केलेल्या बेडची  विनंती अमान्य करण्यात आली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search