Author Archives: Kokanai Digital
आजचे पंचांग
- तिथि-चतुर्दशी – 29:05:45 पर्यंत
- नक्षत्र-मृगशिरा – 11:25:39 पर्यंत
- करण-गर – 17:48:30 पर्यंत, वणिज – 29:05:45 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-ब्रह्म – 09:09:12 पर्यंत, इंद्रा – 30:44:14 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 07:16
- सूर्यास्त- 18:18
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- 16:45:00
- चंद्रास्त- 30:42:59
- ऋतु- शिशिर
- राष्ट्रीय युवा दिवस.
- १७०५: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.
- १७०८: मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहू संभाजी भोसले महाराजांचा राज्याभिषेक केल्या गेल्या.
- १९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
- १९३१: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी
- १९३१: प्रसिद्ध पाकिस्तानी कवी अहमद फ़राज़ यांचा जन्म.
- १९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा
- १९३६: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचा जन्म.
- १९४९: माजी संसद चे सदस्य पारसनाथ यादव यांचा जन्म.
- १९६४: राजनीतिज्ञ अजय माकन यांचा जन्म.
- १९६४: उत्तर प्रदेश चे माजी उपमुख्यमंत्री तसेच राजनीतिज्ञ दिनेश शर्मा यांचा जन्म.
- १९७२: कॉंग्रेस च्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचा जन्म.
- १९८४: स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी या दिवशी “राष्ट्रीय युवा दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
- १९९७: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला ’बाया कर्वे पुरस्कार’ प्रदान
- २००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना
- २००६: हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू
- २००७: “रंग दे बसंती” या चित्रपटाला ब्रिटिश अॅकेडमी फिल्म पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
- २००९: जगप्रसिद्ध ए. आर. रेहमान हे गोल्डन ग्लोब अवार्ड मिळणारे पहिले भारतीय ठरले.
- १५९८: राजमाता जिजाबाई (मृत्यू: १७ जून १६७४)
- १८५४: व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद (मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)
- १८६३: स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली. (मृत्यू: ४ जुलै १९०२)
- १८६९: भारतरत्न पुरस्काराने सन्मानित शास्त्री भगवान दास यांचा जन्म.
- १८९३: हर्मन गोअरिंग – जर्मन नाझी (मृत्यू: १५ आक्टोबर १९४६)
- १८९९: पॉल हर्मन म्युलर – डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९४८) मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: १२ आक्टोबर १९६५ – बेसल, स्वित्झर्लंड)
- १९०२: महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक (मृत्यू: १३ जुलै १९६९)
- १९०६: पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (मृत्यू: १२ डिसेंबर १९९२)
- १९१७: महर्षी महेश योगी (मृत्यू: ५ फेब्रुवारी २००८)
- १९१८: सी. रामचंद्र – संगीतकार (मृत्यू: ५ जानेवारी १९८२)
- १८९७: सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (जन्म: ४ जानेवारी १८१३)
- १९२४: भारतीय स्वातंत्र्य सैनिक गोपीनाथ साहा यांचे निधन.
- १९३४: भारतीय स्वातंत्र्य सैनिक सूर्य सेन यांचे निधन.
- १९४४: वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त (जन्म: २८ एप्रिल १८५४)
- १९६६: नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (जन्म: १० जानेवारी १८९६)
- १९७६: अॅगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथालेखिका, पहिल्या महायुद्धाच्या काळात त्या रेडक्रॉस इस्पितळात काम करत होत्या. त्यावेळेस त्यांनी ’मिस्टिरियस अफेअर्स अँड स्टाइल्स’ ही पहिली रहस्यकथा लिहिली. ६८ कादंबर्या, १०० हून अधिक कथा, १७ नाटके अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांचे साहित्य १०३ भाषांत अनुवादित झाले आहे. (जन्म: १५ सप्टेंबर १८९०)
- १९९२: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ’ कुमार गंधर्व’ (जन्म: ८ एप्रिल १९२४)
- १९९७: ओ. पी. रल्हन – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते. ’तलाश’, ’ फूल और पत्थर’, ’हलचल’, ’पापी, ’शालिमार’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. (जन्म: ? ? १९२५)
- २००५: अमरीश पुरी – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार (जन्म: २२ जून १९३२ – लाहोर, पंजाब, पाकिस्तान)




रत्नागिरी : गोवा – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हातखंब्यानजीक रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कारने अवजड ट्रेलरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालक ठार झाला.
अपघाताची सविस्तर माहिती अशी शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून हातखंब्याजवळ ट्रक जीजे 27 टिएफ 6818 हा गोव्याहून नवी मुंबईकडे चाललला होता. त्याला मागून येत असलेल्या कार एमएच 01 एएक्स 9281 ने जोराची धडक दिली. त्यात कारचालक नितीन श्रीकांत शिरवळकर, रा. मुंबई गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची हातखंबा येथील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यातून जखमीला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.
दोन्ही वाहनांची धडक मोठी होती. त्यात कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला आहे. अपघतस्थळी लोकांनी गर्दी केली होती. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून वाहने बाजूला घेतली व वाहतूक पूर्ववत सुरू केली.
आजचे पंचांग
- तिथि-द्वादशी – 08:24:11 पर्यंत, त्रयोदशी – 30:36:26 पर्यंत
- नक्षत्र-रोहिणी – 12:30:26 पर्यंत
- करण-बालव – 08:24:11 पर्यंत, कौलव – 19:28:37 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-शुक्ल – 11:48:22 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 07:16
- सूर्यास्त- 18:17
- चन्द्र-राशि-वृषभ – 23:56:13 पर्यंत
- चंद्रोदय- 15:43:59
- चंद्रास्त- 29:42:59
- ऋतु- शिशिर
- राष्ट्रीय सड़क सुरक्षा सप्ताहाला सुरुवात.
- १६१३: मुघल सम्राट जहागीर ने पहिल्यांदा इस्ट इंडिया कंपनी ला सुरत येथे कारखाना उभारण्यास परवानगी दिली.
- १७८७: विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.
- १९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.
- १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले
- १९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
- १९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
- १९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
- १९९९: ’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी
- २०००: छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना
- २००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- २००९: स्लमडॉग मिलियनर या चित्रपटाला ६६ वा. गोल्डन ग्लोब अवार्ड मिळाला.
- १८१५: जॉन ए. मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: ६ जून १८९१)
- १८५८: श्रीधर पाठक – हिन्दी कवी, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६)
- १८५९: लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (मृत्यू: २० मार्च १९२५)
- १८९८: ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म.
- १९२८: थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म: २ जून १८४०)
- १९४४: शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार
- १९५४: बाल मजुरांच्या विरुद्ध आवाज उचलणारे आणि नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांचा जन्म.
- १९५५: आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका
- १९६६: स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. (जन्म: २ आक्टोबर १९०४)
- १९७३: क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म.
- १९८३: घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी (जन्म: १० एप्रिल १८९४)
- १९९७: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)
- १९२८: थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म: २ जून १८४०)
- १९५४: सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष. क्लेमंट अॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)
- १९६२: भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे नेता अजय घोष यांचे निधन.
- १९६६: स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. (जन्म: २ आक्टोबर १९०४)
- १९८३: घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी (जन्म: १० एप्रिल १८९४)
- १९९०: भारतीय संगीतकार राम चतुर मलिक यांचे निधन.
- १९९७: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)
- २००८: य. दि. फडके – लेखक व इतिहाससंशोधक (जन्म: ३ जानेवारी १९३१)
- २००८: सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (जन्म: २० जुलै १९१९)




HSC exam hall tickets: बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीटे आजपासून उपलब्ध देण्यात येणार आहेत.
यासोबतच उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in ‘ या संकेतस्थळावरून आज पासून ऍडमिट कार्ड लिंकद्वारे डाऊनलोड करता येणार आहेत.
बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीटे आजपासून उपलब्ध देण्यात येणार आहेत.
ऑनलाईन हॉल तिकिटे मिळविण्यास काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत अशी माहिती सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
आजचे पंचांग
- तिथि-एकादशी – 10:22:17 पर्यंत
- नक्षत्र-कृत्तिका – 13:46:36 पर्यंत
- करण-विष्टि – 10:22:17 पर्यंत, भाव – 21:22:19 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-शुभ – 14:36:35 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 07:16
- सूर्यास्त- 18:16
- चन्द्र-राशि-वृषभ
- चंद्रोदय- 14:48:00
- चंद्रास्त- 28:38:59
- ऋतु- शिशिर
- जागतिक हिंदी दिवस.
- १६६६: सुरत लुटून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.
- १७३०: पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
- १८०६: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
- १८१०: नेपोलियन बोनापार्टने जोसेफाइन या आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.
- १८३९: पहिल्यांदा भारताचा चहा इंग्लंड ला पोहचला.
- १८६३: चार्ल्स पिअर्सन याच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.
- १८७०: जॉन डी. रॉकफेलर याने ’स्टँडर्ड ऑईल’ कंपनीची स्थापना केली.
- १८७०: बॉम्बे, बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B. B. C. I. Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.
- १८८४: ब्रिटन च्या रसायन शास्त्रज्ञ जोज़फ एस्पीडियन यांनी पहिल्यांदा सिमेंट बनविले.
- १९२०: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
- १९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
- १९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले ’द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.
- १९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
- १९७२: पाकिस्तानमधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.
- २००६: माजी प्रधान मंत्री मनमोहन सिंग यांनी १० जानेवारी ला जागतिक हिंदी दिवस म्हणनू साजरे करण्याची घोषणा केली.
- २००८: टाटा कंपनी ने जगातील सर्वात स्वस्त कार नॅनो कार ला बाजारात आणण्यासाठी सुरुवात केली.
- १७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ – ब्रम्हावर्त)
- १८९६: नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू: १२ जानेवारी १९६६)
- १९००: मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)
- १९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म (मृत्यू: ? ? ????)
- १९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.
- १९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म.
- १९३७: भातीय राजनीती तज्ञ मुरली देवड़ा यांचा जन्म.
- १९४०: के. जे. येसूदास – पार्श्वगायक व संगीतकार
- १९४९: प्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांचा जन्म.
- १९५०: आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित यांचा जन्म.
- १९७१: प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरसिया यांचा जन्म.
- १९७४: हृतिक रोशन – सिनेकलाकार
- १९८४: भारतीय अभिनेत्री कल्कि कोचेलिन यांचा जन्म.
- १६९३: कोलकत्याचे निर्माते म्हणून ओळखले जाणारे जाब चारनाक यांचे निधन.
- १७६०: दत्ताजी शिंदे – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर (जन्म: ? ? १७२३)
- १७७८: कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ, वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली. ही पद्धत त्याला इतकी आवडली की त्याने स्वत:चेही नाव बदलून कॅरोलस लिनिअस असे केले. (जन्म: २३ मे १७०७)
- १९६९: उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री संपूर्णानंद यांचे निधन.
- १९९४: ला प्रसिद्ध लेखक गिरिजाकुमार माथुर यांचे निधन.
- १९९९: आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत (जन्म: ? ? ????)
- २००२: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)




नवी दिल्ली : मुंबई-गोवा महामार्गवरील परिस्थितीमुळे मला रोज प्रवाशांची नाराजी सहन करावी लागते. ही नाराजी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजते. यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या महामार्गचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
याशिवाय दिल्ली- मुंबई या महत्त्वाकांक्षी महामार्गचे काम या वर्षात पूर्ण होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या वाहतूक मंत्र्याची ४२ वी बैठक भारत मंडपम येथे पार पडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येवर खंत व्यक्त केली. सरकारने कॅशलेस उपचारांची व्यवस्था केली गेली आहे. अपघातात जखमी व्यक्तीचा ७ दिवस उपचार किंवा १.५ लाखांचा खर्च मंत्रालय करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आजचे पंचांग
- तिथि-दशमी – 12:25:06 पर्यंत
- नक्षत्र-भरणी – 15:08:11 पर्यंत
- करण-गर – 12:25:06 पर्यंत, वणिज – 23:23:25 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-साघ्य – 17:29:21 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 07:16
- सूर्यास्त- 18:16
- चन्द्र-राशि-मेष – 20:47:33 पर्यंत
- चंद्रोदय- 13:58:00
- चंद्रास्त- 27:33:59
- ऋतु- शिशिर
- प्रवासी भारतीय दिवस,अनिवासी भारतीयांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी केलेले उपकार आणि योगदान लक्षात ठेवणे.
- १७६०: बरारीघाट येथे अफगाण्यांनी मराठ्यांचा पराभव केला.
- १७८८: कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५ वे राज्य बनले.
- १७९०: ला बरारी घाटाच्या झालेल्या लढाई मध्ये अहमद शाह दुर्रानी ने मराठ्यांचा पराभव केला.
- १८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा
- १९१५: महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन
- १९८२: ला भारताचा पहिला शास्त्रज्ञ वर्ग अंटार्क्टिकाला पोहचला.
- २००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
- २००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
- २००२: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.
- २००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
- २००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.
- २०१२: ला लिओनेल मेस्सी ने सतत दुसऱ्या वर्षी सुद्धा “बैलोन डीओर” नावाचा पुरस्कार जिंकला.
- १८३१: फातिमा शेख : भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका
- १९१३: रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ एप्रिल १९९४)
- १९१८: मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म.
- १९२२: हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)
- १९२१: बिहार चे माजी मुख्यमंत्री राम सुंदर दास यांचा जन्म.
- १९२६: कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते (मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ – मुंबई)
- १९२७: सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा जन्म.
- १९३४: महेंद्र कपूर – पार्श्वगायक (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ – मुंबई)
- १९३८: चक्रवर्ती रामानुजम – गणिती (मृत्यू: २७ आक्टोबर १९७४)
- १९५१: पं. सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य
- १९६५: फराह खान – नृत्यदिग्दर्शक
- १९७४: ला बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर यांचा जन्म.
- १९८३: ला भारतीय अभिनेता शरद मल्होत्रा यांचा जन्म.
- २०००: ला भारताची प्रसिद्ध धावपटू हिमा दास यांचा जन्म.
- १८४८: कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असून तिनेही ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले आहेत. (जन्म: १६ मार्च १७५०)
- १८७३: तिसरा नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन.
- १९२३: सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) (जन्म: १ जून १८४२)
- १९४५: प्रसिद्ध राजनीती तज्ञ छोटू राम यांचे निधन.
- १९७३: फ्रांसचे पहिले अध्यक्ष लुई-नेपोलियन बोनापार्ट उर्फ नेपोलियन ३रा यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८०८)
- २००३: कमर जलालाबादी – गीतकार व कवी (जन्म: ? ? १९१९)
- २००४: शंकरबापू आपेगावकर – पखवाजवादक (जन्म: ? ? १९११)
- २०१३: जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (जन्म: ३ आक्टोबर १९१९)




कोल्हापूर: बेळगाव-चंदगड सावंतवाडी रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालीन. रेल्वे मंत्र्यांना लवकरच भेटून निधी आणण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन खा. धनंजय महाडिक यांनी बेळगाव, चंदगड, सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
बेळगाव-चंदगड, सावंतवाडी रेल्वे हा रेल्वे मार्ग ११४.६ कि.मी.चा असून जवळपास १८०५ करोडचा खर्च अपेक्षित आहे. या रेल्वे मार्गाचा सर्व्हे रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला असून या रेल्वे मार्गामुळे चंदगड, आजरा व गडहिंग्लज या तालुक्याचा विकास अपेक्षित आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण विभाग रेल्वे मार्गाने देशाशी जोडला जाईल. या संदर्भात कोल्हापूर, बेळगावचे खासदार यांना प्रत्यक्ष भेटून संघर्ष समितीने निवेदने दिली आहेत.
खा. महाडिक यांना नेसरी येथे बेळगाव, चंदगड, सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष विजयकुमार दळवी, भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर, चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई, संघर्ष समितीचे सरचिटणीस रवी नाईक, एकनाथ वाके आदी उपस्थित होते.