Author Archives: Kokanai Digital

८ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 14:28:20 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 16:30:38 पर्यंत
  • करण-कौलव – 14:28:20 पर्यंत, तैतुल – 25:26:53 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सिद्ध – 20:23:09 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:15
  • चन्द्र-राशि-मेष
  • चंद्रोदय- 13:13:00
  • चंद्रास्त- 26:30:00
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.
  • १८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.
  • १८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले. अमेरिकेच्या जनगणनेत १८९० मध्ये या गणकयंत्राचा उपयोग करण्यात आला.
  • १९२९: नेदरलँड्स आणि वेस्ट इंडिज यांच्या मध्ये पहिल्यांदा टेलिफोन वर संपर्क झाला.
  • १९४०: दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.
  • १९४७: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.
  • १९५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात खितपत पडून होते. अखेर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार (१९८६), पद्मश्री (२००१) व सांगली भूषण (२००६) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
  • १९५८: १४ व्या वर्षाच्या बॉबी फिशर ने अमेरिकेची चेस चॅम्पियनशिप जिंकली होती.
  • १९६३: लिओनार्डो डा व्हिन्सिच्या ’मोनालिसा’चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.
  • १९७१: पाकिस्तान चे राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो यांनी नेता शेख मुजीबुर रहमान यांची जेल मधून सुटका करण्यात आली.
  • १९७३: रशियाने “मिशन ल्‍यूना २१” ला स्पेस मिशन चे प्रक्षेपण केले.
  • २०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड
  • २००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.
  • २००९: ४,३०० वर्षाआधीची रानी सेशेशेट ची इजिप्त येथे ममी सापडली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १९०९: ला भारतीय कादंबरीकार आशापूर्णा देवी यांचा जन्म.
  • १९२४: गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य (मृत्यू: ४ मार्च २०००)
  • १९२५: राकेश मोहन – हिन्दी नाटककार (मृत्यू: ५ डिसेंबर १९७३)
  • १९२६: केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक (मृत्यू: ७ एप्रिल २००४)
  • १९२९: सईद जाफरी – अभिनेता
  • १९३५: एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’ (मृत्यू: १६ ऑगस्ट १९७७)
  • १९३६: ज्योतिंद्रनाथ दिक्षीत – परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू: ३ जानेवारी २००५)
  • १९३९: नंदा – अभिनेत्री
  • १९४२: स्टिफन हॉकिंग – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक
  • १९८६: प्रसिद्ध अभिनेता नवीन कुमार गोवडा उर्फ यश यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६४२: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १५ फेब्रुवारी १५६४)
  • १८२५: एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक (जन्म: ८ डिसेंबर १७६५)
  • १८८४: केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक (जन्म: १९ नोव्हेंबर १८३८)
  • १९४१: लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
  • १९६६: बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (जन्म: १२ जुलै १९०९)
  • १९६७: डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १० डिसेंबर १८८० – नरसोबाची वाडी, शिरोळ, कोल्हापूर)
  • १९७३: नारायण भिकाजी तथा ‘नानासाहेब’ परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह, स्वच्छ समाजदृष्टी, उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: २० सप्टेंबर १८९८)
  • १९७६: चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ५ मार्च १८९८)
  • १९८४: पहिल्या भारतीय महिला वैमानिक सुषमा मुखोपाध्याय यांचे निधन.
  • १९८७: माजी भारतीय क्रिकेटर नाना जोशी यांचे निधन.
  • १९९२: आनंद मासिकाचे माजी संपादक दं. प्र. सहस्रबुद्धे यांचे निधन
  • १९९४: ६८वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती यांचे निधन.
  • १९९५: मधू लिमये – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी (जन्म: १ मे १९२२)
  • १९९६: फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ आक्टोबर १९१६)
  • २००३: भारतीय कीटकशास्त्रज्ञ महादेव सुब्रमण्यम मनी यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५०% जमिनींवर वक्फ बोर्डाचा दावा; नितेश राणे यांचा धक्कादायक खुलासा

   Follow us on        

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० ते ६० टक्के जमिनींवर वक्फ बोर्डनं दावा ठोकला आहे. महत्वाच्या देवस्थानावर ही दावा केला गेला आहे, असं विधान राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दावा केलेल्या जागांची यादी समोर आली असून देवगड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला आदी तालुक्यांचा समावेश या यादीत आहे. १५६ ठिकाणी वक्फ बोर्डानं दावा केल्याचं समोर येत आहे. मंत्री नितेश राणे म्हणाले होते की, या बोर्डानं दावा ठोकल्यावर आपण न्याय देखील मागू शकत नाही. या काद्यात कोर्ट, अधिकाऱ्यांसह सर्व मंडळी ही विशिष्ट समाजाची असणारी आहेत. या कायद्याचा विचार अन् माहिती आपण घेतली पाहिजे व सावध झालं पाहिजे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव विधेयक पारीत करत आहेत. इस्लामिक राष्ट्रामध्ये असा कोणाही वक्फ बोर्ड नसताना आपल्याच देशात का? हा खरा प्रश्न आहे. हिंदुराष्ट्रात अशा प्रकरचे इस्लामीकरण षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही. देशात आणि राज्यात हिंदूच सरकार आहे. हिंदू नीही धर्माभीमान बाळगून 100% कडवट पणा दाखवून पुढे यावे, असे नितेश राणे म्हणाले होते. तसेच जिल्ह्यात ५० ते ६० टक्के जमिनींवर वक्फ बोर्डनं दावा ठोकल्याचे विधान त्यांनी आंबोली येथील हिंदू धर्म परिषदेत केला होता.

सिंधुदुर्गातील आंबोलीमध्ये हिंदू धर्म परिषदेत मंत्री नितेश राणे यांनी धक्कादायक माहिती समोर आणलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० टक्के जागा आणि महत्त्वाच्या देवस्थानांवर वक्फ बोर्डने दावा केल्याचा खुलासा केला होता. तसेच त्यात जिल्ह्यातील देवस्थानं असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. त्या आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५६ ठिकाणी वक्फ बोर्डाने दावा केल्याची यादी आपल्या हाती लागली आहे. जिल्ह्यातील १५६ ठिकाणी वक्फ बोर्डाच्या जमिनीवर दावा केल्याचं दिसून येत आहे. यात शेतजमिनीवर दावा केल्याचं देखील दिसत आहे.

 

७ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 16:29:06 पर्यंत
  • नक्षत्र-रेवती – 17:50:53 पर्यंत
  • करण-भाव – 16:29:06 पर्यंत, बालव – 27:29:09 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शिव – 23:15:29 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:14
  • चन्द्र-राशि-मीन – 17:50:53 पर्यंत
  • चंद्रोदय- 12:31:59
  • चंद्रास्त- 25:29:00
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १६१०: गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.
  • १६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
  • १७१४: पहिल्यांदा हेनरी मिल ने टाईप राईटर चा शोध लावला.
  • १७८९: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.
  • १९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.
  • १९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
  • १९३५: कोलकाता येथे ’इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी’चे (INSA) उद्‌घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.
  • १९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
  • १९६८: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.
  • १९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
  • १९७८: एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.
  • १९८०: पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणूकांमध्ये कॉंग्रेस बहुमताने विजयी.
  • २००३: जपान ने विकास कामांसाठी भारताला ९० कोटी डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली.
  • २०१४: आजच्या दिवशी शेख हसीना ने बांगलादेश च्या निवडणुक जिंकली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८९३: जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना (मृत्यू: २१ मे १९७९)
  • १९२०: सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी (मृत्यू: १९ एप्रिल २००८)
  • १९२१: चंद्रकांत गोखले – अभिनेते (मृत्यू: २० जून २००८)
  • १९२५: ’प्रभात’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या (मृत्यू: ? ? ????)
  • १९२८: विजय तेंडुलकर – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक (मृत्यू: १९ मे २००८ – पुणे, महाराष्ट्र)
  • १९४८: शोभा डे – विदुषी व लेखिका
  • १९५०: ला बाल मजूर विरोधी कार्यकर्त्या शांता सिन्हा यांचा जन्म.
  • १९६१: सुप्रिया पाठक – अभिनेत्री
  • १९६७: ला जगप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचा जन्म.
  • १९७९: बिपाशा बासू – अभिनेत्री व मॉडेल
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९८९: मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (जन्म: २९ एप्रिल १९०१)
  • १९४३: वाय फाय चा शोध लावणारे संशशोधक निकोला टेसला यांचे निधन.
  • २०००: डॉ. अच्युतराव आपटे – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्‍च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ? ? ????)
  • २०१६: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Viral News: ४० लाख रुपये कमावणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला आली जीएसटी नोटीस…

   Follow us on        

GST Notice to Panipuri Vendor:तमिळनाडूतील पाणीपुरी दुकानदाराने ऑनलाइन पेमेंटद्वारे एका वर्षात 40 लाख रुपये कमावल्याचं समोर आलं आहे. यानंतर या दुकानदाराला जीएसटीची नोटीस मिळाली आहे. हीच नोटीस सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ही नोटीस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जीएसटी नियमानुसार, 40 लाख एवढी वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांने नोंदणी करणे आणि कर आकारणी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

नोटीसचा फोटो अनेकांनी शेअर करत आपल्या पोस्ट केल्या आहेत. या व्हायरल नोटीसमध्ये 17 डिसेंबर 2024 ही तारीख लिहिली आहे. ही नोटीस ‘तामिळनाडू वस्तू आणि सेवा कर कायदा’ आणि ‘केंद्रीय जीएसटी कायद्याच्या कलम 70’ अंतर्गत जारी करण्यात आली आहे. यामध्ये विक्रेत्याकडून गेल्या तीन वर्षातील व्यवहारांचा तपशील मागवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षात मिळालेल्या मोठ्या रकमेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही माहिती डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरून गोळा करण्यात आली आहे. 40 लाख वार्षिक उलाढालीची मर्यादा ओलांडल्यानंतरही जीएसटी नोंदणी न करता वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करणे हा गुन्हा मानला जातो, असेही या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. जीएसटीची नोटीस मिळाल्यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

६ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 18:25:45 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 19:07:09 पर्यंत
  • करण-गर – 07:22:14 पर्यंत, वणिज – 18:25:45 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-परिघ – 26:04:51 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:15
  • सूर्यास्त- 18:14
  • चन्द्र-राशि-मीन
  • चंद्रोदय- 11:54:00
  • चंद्रास्त- 24:30:00
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.
  • १६७३: कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकुन महाराजांचे १३ वर्षे अपुर्ण असलेले स्वप्‍न पूर्ण केले.
  • १८३२: पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ’दर्पण’ सुरू केले.
  • १८३८: सॅम्युअल मॉर्स यांनी तारयंत्राचा शोध लावला.
  • १९०७: मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.
  • १९१२: न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.
  • १९२४: राजकारणात भाग न घेणे व रत्‍नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता
  • १९२९: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन
  • १९४४: दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.
  • १९४६: आजच्या दिवशी विएतनाम येथे पहिल्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यात आल्या.
  • १९८९: केहर सिंह आणि सतवंत सिंह यांना इंदिरा गांधींच्या हत्या करण्याच्या गुन्हात फाशीची शिक्षा देण्यात आली.
  • १९९४: सिडनी टेस्ट सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या टीम ने ऑस्ट्रेलिया च्या टीम ला ५ रन नी हरविले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १४१२: फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्‍या ’जोन ऑफ आर्क’चा जन्म. तिला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती ’द मेड ऑफ ऑर्लिन्स’ या टोपणनावानेही ओळखली जाते. (मृत्यू: ३० मे १४३१)
  • १७४५: बलूनच्यासहाय्याने आकाशात उडण्याचे प्रयोग करणाऱ्या जाक्कास एलियन माँटगोल्फिएर यांचा जन्म.
  • १८१२: बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह, १८३२ मधे ‘दर्पण’ हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. ’दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले. (मृत्यू: १८ मे १८४६)
  • १८२२: उत्खनन करून ट्रॉय आणि मायसेनी या नगरीचा शोध लावणाऱ्या हेन्रीचा श्लीमन यांचा जन्म.
  • १८६८: गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ ‘दासगणू महाराज’ – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’, ’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६२)
  • १८८३: खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (मृत्यू: १० एप्रिल १९३१)
  • १९१०: ला प्रसिद्ध भारतीय गायक जी. एन. बालासुब्रमनियम यांचा जन्म.
  • १९१८: ला भारतीय प्रसिद्ध गायक भारत व्यास यांचा जन्म.
  • १९२५: रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक (मृत्यू: १९ जून १९९८)
  • १९२८: नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे २००८ – पुणे, महाराष्ट्र)
  • १९३१: डॉ. आर. डी. देशपांडे – पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ, ’महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’चे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष
  • १९४०: प्रसिद्ध भारतीय लेखक नरेंद्र कोहली यांचा जन्म.
  • १९४९: परमवीर चक्राने सन्मानित सुभेदार बाना सिंग यांचा जन्म.
  • १९५५: रोवान अ‍ॅटकिन्सन – विनोदी अभिनेते व पटकथालेखक
  • १९५९: कपिल देव निखंज – भारतीय क्रिकेटकप्तान, समालोचक व प्रशिक्षक
  • १९६५: हिमाचल प्रदेश चे १४ वे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांचा जन्म.
  • १९६७: ऑस्कर पुरस्कार विजेते जगप्रसिद्ध गायक ए. आर. रेहमान यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७९६: जिवबा दादा बक्षी – महादजी शिंदे यांचे सेनापती, मुत्सद्दी (जन्म: ? ? ????)
  • १८४७: त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार (जन्म: ४ मे १७६७)
  • १८५२: लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (जन्म: ४ जानेवारी १८०९)
  • १८८४: ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (जन्म: २० जुलै १८२२)
  • १८८५: भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक, १८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात ’भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो. (जन्म: ९ सप्टेंबर १८५०)
  • १९१८: जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (जन्म: ३ मार्च १८४५)
  • १९१९: थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २७ आक्टोबर १८५८)
  • १९७१: प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार (जन्म: २३ फेब्रुवारी १९१३)
  • १९८१: ए. जे. क्रोनिन – स्कॉटिश लेखक (जन्म: १९ जुलै १८९६)
  • १९८४: ’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (जन्म: १ फेब्रुवारी १८८४)
  • २००८: भारतीय ऑर्थोपेडिक सर्जन प्रमोद करन सेठी यांचे निधन.
  • २००९: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री गुलाम मोहम्मद शाह यांचे निधन.
  • २०१०: प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (जन्म: १६ जुलै १९४३)
  • २०१७: भारतीय अभिनेता ओम पुरी यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Vande Bharat Sleeper: १८० किमी प्रतितास वेग, एकूण ३ श्रेणी आणि ८२३ प्रवासी क्षमता…लवकरच सुरु होणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन नेमकी कशी असणार ?

   Follow us on        
Vande Bharat Sleeper: रेल्वेचा प्रवास हा इतर प्रवासापेक्षा उत्तम पर्याय मानला जातो. प्रवाशांच्या वाढत्या सोयीसाठी तसेच प्रवासाला अधिक आरामदायी बनवण्यासाठी भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या ट्रेनची चाचणी सुरू असून लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे लांबच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
   Follow us on        
वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CRS) हिरवा कंदील मिळताच ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होईल. समोर आलेल्या माहितीनुसार ही ट्रेन 160 ते 180 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे. तसेच एका रिपोर्ट्सनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनची पहिली सेवा दिल्ली-मुंबई किंवा दिल्ली-कोलकाता मार्गावर सुरू होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2025 अखेर ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
   Follow us on        
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये (Vande Bharat Sleeper Trains) एकूण 16 डबे असतील. यामध्ये 11 एसी 3-टायर कोच, 4 एसी 2-टायर कोच, आणि 1 फर्स्ट क्लास कोच समाविष्ट आहे. तसेच, ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि लवचिकतेसाठी 2 एसएलआर (स्लिपर) कोच असतील, जे लगेज आणि गार्डसाठी वापरले जातात. यामुळे प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा पुरवली जाणार आहे , तसेच विविध विभागात प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध करतो. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही अत्याधुनिक सुविधा आणि सोयींच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
   Follow us on        
ट्रेनमध्ये (Train) एकावेळी 823 प्रवासी प्रवास करू शकतील. यात 3 टायर एसी कोचमध्ये 611 बर्थ, 2 टायर एसी कोचमध्ये 188 बर्थ, आणि फर्स्ट क्लास एसी कोचमध्ये 24 बर्थ उपलब्ध असतील. यामुळे विविध प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सुविधांचा पुरवठा होईल. ट्रेनचे डिझाइन आणि सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेतली गेली आहे. ही ट्रेन ऑस्ट्रेनिटिक स्टेनलेस स्टीलपासून बनवली आहे, जे अधिक मजबूती पुरवते. तसेच, क्रॅश बफर आणि कप्लर्स यांसारख्या सुरक्षिततेसाठी आवश्यक बाबींवर लक्ष देऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. ही अत्याधुनिक स्लीपर ट्रेन इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई येथे तयार करण्यात आली आहे. भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड (BEML) नेही या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे.
   Follow us on        

Konkan Coastal Highway: रेवस ते रेड्डी महामार्गाच्या ‘वाटेत’ पहिला अडथळा

   Follow us on        

अलिबाग: प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबईला थेट कोकणाशी जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी करंजा (उरण) ते रेवस (अलिबाग) या बहुप्रतीक्षित सागरी पुलाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे.  एमएसआरडी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांनी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. यावेळी ग्रामस्थांनी तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांच्या १९८० च्या आराखड्यानुसार मार्गिका द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.

रामायणातील पौराणिक काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांनाच माहीत आहे. अनेक आयुर्वेदिक वनस्पती, औषधी संजीवनी याच डोंगराच्या कडेकपारीमध्ये आहेत. या परिसरात डोंगरदेवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या करंजा ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या द्रोणागिरी मातेवर भाविकांची श्रद्धा आहे. मात्र या पौराणिक काळातील द्रोणागिरी पर्वताला पोखरून करंजा-रेवस सागरी सेतूची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. त्यामुळे उरणकर, भाविक तसेच गडप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ(एमएसआरडीसी) च्या माध्यमातून नव्याने हा मार्ग उभारण्यात येत आहे. प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबईला थेट कोकणाशी जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे. याची दखल घेत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. उरणच्या करंजा ते अलिबाग येथील रेवस दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे भूमिपूजन १४ ऑक्टोबरला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. २ हजार ४७८ कोटी रुपयांची निविदा या पुलाच्या उभारणीसाठी मागविण्यात आली आहे. या पुलाची एकूण लांबी ही १०.२०९ किलोमीटर आहे. मुंबईतील सागरी अटल सेतू मार्गे द्रोणागिरी नोड येथून या पुलावरून कोकणात हा प्रवास करता येणार आहे. नियोजित रेड्डी ते रेवस मार्गापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने १९८० साली महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अ.र अंतुले यांनी करंजा ते रेवस मार्गाची घोषणा केली होती. यावेळी भूसंपादनाची प्रकिया राबवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव सत्ताबदल होऊन अंतुले यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने या पुलाचे काम बंद झाले होते.

५ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 20:17:22 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाभाद्रपद – 20:18:29 पर्यंत
  • करण-कौलव – 09:11:03 पर्यंत, तैतुल – 20:17:22 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्यतापता – 07:31:37 पर्यंत, वरियान – 28:50:25 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:13:01
  • सूर्यास्त- 18:14:38
  • चन्द्र-राशि-कुंभ – 14:35:28 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:16:00
  • चंद्रास्त- 23:33:00
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १६५९: मुघल सम्राट औरंगजेब ने शाह शुजा ला युद्धात हरविले.
  • १६६४: छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.
  • १६७१: मराठ्यांनी मुघलांबरोबर साल्हेरची लढाई जिंकली.
  • १८३२: दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
  • १९१९: द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.
  • १९२४: महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले.
  • १९३३: सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.
  • १९४८: ’रोझ बाऊल फुटबॉल’ स्पर्धेचा जगातील पहिला रंगीत माहितीपट (News Reel) ’वॉर्नर ब्रदर्स’ तर्फे जगांतील चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला.
  • १९४९: पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
  • १९५७: विक्रीकर कायदा सुरू झाला.
  • १९७१: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या मध्ये पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना मेलबर्न येथे खेळल्या गेला.
  • १९७४: अंटार्क्टिकामधील सर्वोच्‍च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद
  • १९९७: रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.
  • १९९८: ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते ’महात्मा गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
  • १९९९: द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.
  • २००४: ’संभाजी ब्रिगेड’ या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.
  • २००६: भारत आणि नेपाळ ने पारगमन करार ६ महिन्यांनी वाढविला.
  • २०१४: ला भारतीय संचार उपग्रह जीसॅट -१४ चे यशस्वी प्रक्षेपण. तेही भारतीय क्रायोजेनिक इंजिन चा वापर करून.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५९२: शहाजहान – ५ वा मुघल सम्राट (मृत्यू: २२ जानेवारी १६६६)
  • १६६६: ला शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंह यांचा जन्म.
  • १८५५: किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक (मृत्यू: ९ जुलै १९३२)
  • १८६८: मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू यांचा जन्म.
  • १८६९: कन्नड साहित्यिक व्यंकटेश तिरको कुलकर्णी यांचा जन्म.
  • १८८०: ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक बारीन्द्र कुमार घोष यांचा जन्म.
  • १८९२: कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ (मृत्यू: १२ जून १९६४ – मुंबई)
  • १९१३: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २००७)
  • १९२२: मोहम्मद उमर ’मुक्री’ – आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते (मृत्यू: ४ सप्टेंबर २०००)
  • १९२५: मराठी साहित्यिक रमेश मंत्री यांचा जन्म.
  • १९२८: झुल्फिकार अली भुट्टो – पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान (मृत्यू: ४ एप्रिल १९७९)
  • १९३४: भारतीय राजनीती तज्ञ मुरली मनोहर जोशी यांचा जन्म.
  • १९४१: मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९ वे व शेवटचे नबाब (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)
  • १९४८: पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (मृत्यू: २० आक्टोबर २०१०)
  • १९४८: फैय्याज – अभिनेत्री व गायिका
  • १९५२: ला भारतीय संसदेचे सदस्य शुशील कुमार मोदी यांचा जन्म.
  • १९५५: ममता बॅनर्जी – केंद्रीय मंत्री, पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री
  • १९७३: ला भारतीय चित्रपटाचे अभिनेते तसेच निर्माता उदय चोप्रा यांचा जन्म.
  • १९८६: दीपिका पदुकोण – कन्नड, हिन्दी आणि तामिळ चित्रपट कलाकार
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८४७: कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन.
  • १९३३: काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ४ जुलै १८७२)
  • १९४३: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (जन्म: १ फेब्रुवारी १८६४)
  • १९५९: ला मैसूर चे महाराजा मिर्ज़ा इस्माइल यांचे निधन.
  • १९७१: भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन.
  • १९८२: सी. रामचंद्र – संगीतकार (जन्म: १२ जानेवारी १९१८)
  • १९९०: रमेश बहल – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)
  • १९९२: दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार (जन्म: ३ जुलै १९१४)
  • २००३: गोपालदास पानसे – पखवाजवादक (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी मोटरमनने गाडी दीड किलोमीटर मागे घेतली

   Follow us on        

मनमाड : मुंबई वरून नांदेड कडे जाणारी तपोवन एक्सप्रेस मनमाड यार्डात (हद्दीत) आली असतांना एक प्रवाशी पडला असल्याचे समजले आणि काय मग रेल्वे ड्रायव्हर आणि गार्डने थेट एक ते दिड किलोमीटर मागे घेतली व इतर प्रवाशांच्या मदतीने जखमी असलेल्या सहप्रवाशाला गाडीत टाकून मनमाड रेल्वे स्थानकावर आणले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस मुंबईवरून नांदेड कडे जात असताना मनमाड नजीक अर्थात मनमाड आल्यानंतर या गाडीतून एक प्रवासी पडल्याची घटना घडली गाडी पुढे गेली असता शेवटच्या बोगीत असलेल्या गार्डच्या लक्षात हा प्रकार आला गार्डने तात्काळ इंजिन ड्रायव्हरसोबत संपर्क साधला व सर्व कल्पना दिली ड्रायव्हरला सर्व माहिती मिळेपर्यंत गाडी दीड ते दोन किलोमीटर पुढे निघून आली होती. ड्रायव्हरने तात्काळ गाडी थांबवली व दोन किलोमीटर गाडी मागे घेतली सहप्रवाशांना घेऊन गाडीच्या गार्डने जखमी प्रवाशाला गाडीत टाकले.

रेल्वे स्थानकावर तात्काळ रुग्णवाहिका ही उपलब्ध करून देण्यात आली. जखमी प्रवाशाला उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. रेल्वे ड्रायव्हर गार्ड व इतर प्रवाशांचे अथक प्रयत्न करूनही तो प्रवासी वाचू शकला नाही. तो प्रवासी कोण होता कुठला होता याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकली नाही. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला आठवडाभर मुदतवाढ

   Follow us on        
कोंकण रेल्वे: कोकण रेल्वे मार्गावर नववर्षासाठी सोडण्यात आलेल्या अहमदाबाद थिवीम गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात आलेली  हि गाडी आता अजून आठवडाभर चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी दोन अशा एकूण चार फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्र. ०९४१२ अहमदाबाद – थिविम द्विसाप्ताहिक विशेष ही गाडी दिनांक ०५ जानेवारी २०२५ (रविवार) आणि ०८ जानेवारी २०२५ (बुधवार) तर गाडी क्र. ०९४११ थिविम – अहमदाबाद द्विसाप्ताहिक विशेष ही गाडी  दिनांक ०६ जानेवारी २०२५ (सोमवार)आणि ०९ जानेवारी २०२५ (गुरुवार) या दिवशी आपल्या पूर्वनियोजित थांब्यासह आणि  वेळापत्रकासह चालविण्यात येणार आहे.
   Follow us on        

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search